(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • भ्रमर

     

  • बहिणीची एक इच्छा

    विसरू नकोस मजला माझ्या भाऊराया
    नाते अतूट असते घे, हे समजुनिया
    आठव सारे बालपण कसे गेले खेळांत
    भांडत होतो, रुसत होतो सारे केले प्रेमांत
    ओवाळणीची तुझी सुपारी ठेवली मी जपुनी
    आठवण होता तुझी मजला काढून बघते पेटीतुनी
    जाणीव आहे मजला संसार जीवनाची
    कर्तव्ये पडली शिरावरी तुझाच संसाराची
    खूप प्रेम दे वाहिनीला संसार कर सुखाने
    काढून ठेव अल्पसे प्रेम देण्या मज त्या साठ्यातुनी
    वर्षातून एके दिवशी बांध राखी प्रेमाची
    स्वार्थी आहे रे मी काढते तुझाच आठवणी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • संत संगती

    ललाटी ज्यांच्या जे जे लिहिले,

    संत जाणती दिव्य दृष्टीने,

    नियतीच्या ह्या हलचालींना,

    दिली जाती आवाहने ।।१।।

    जाणून घेता भविष्यवाणी,

    जीवन मार्ग हे ज्यांना कळती,

    तपशक्तीने संत महात्मे,

    योग्य मार्ग ते दाखवूनी देती ।।२।।

    कर्माने जरी भाग्य ठरते,

    सुख दुखःच्या गुंत्या भोवती,

    त्या गुंत्यातील धागा शोधूनी,

    सुसाह्य त्याचे जीवन करीती ।।३।।

    कृपा होता संत जनाची,

    चुकला-मुकला जाई ठिकाणी,

    घनदाट त्या जंगलामधली,

    पाऊलवाट ते देई दाखवूनी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • जीवन मृत्यू खेळ

    सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं

    सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी....१,

    भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा,

    काळाची ती भूक असूनी, माहीत असते सर्वांना....२,

    अविरत चालू लपंडाव , जगण्या मरण्याचा

    शेवट हा जरी निश्चीत असला, हक्क तुम्हां खेळण्याचा....३,

    खेळती काही तन्मयतेने, रिझविती इतरजणां,

    खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां....४

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • भाटांतील पहाट – 2

    आळस देत देत बाळकृष्णा
    भजनाचे सूर आळवीत होता आणि
    दामू ठाकूर ढोलक्यावर
    थापा मारीत त्याला साथ करीत होता
    बाबांच्या मुखांतून रामरक्षा
    वातावरण भक्तिमय करीत होती
    त्याचवेळी धोंडू सबनीस
    नगराची सेवा करण्यासाठी
    लगबगीने निघाले होते
    आळसावलेला सदा धुमाळ
    हातांत मशेरी घेऊन
    अंगणातच पचापचा
    थुंकून अंगण काळे करीत होता
    आणि ....
    डोक्यावर टोपले घेऊन
    व फटकूर नेसून
    सुंद्रा कालवे आणण्यासाठी
    खाजणाकडे निघाली
    एव्हं! नां उन्हे रणरणली
    कराड्याच्या पोरांनी
    अंगणातच रस्ता वेढून
    गोट्यांचा खेळ मांडला
    खिशांतील चिठ्या सावरीत
    क्लोजिंगचा हिशोब करीत
    दि ना सबनीस लगबगीने
    घराबाहेर पडला

    -श्री. सु. ग. दिघे.

  • तू फक्त तुझे चंद्र आवर …

    खुसखुशीत भाषेत नेमके व्यक्त करण्यात हातखंडा आहे ह्यांचा !

  • चिमण्यांनो शिकवा.

    चिव् चिव् करित बोलतां तुम्ही सारी भाषा

    दोन स्वरातून विचारांना देत असता दिशा

    शब्द आमचे सप्तसुरांतून येती बाहेरी

    व्यक्त करिती भाव सारे असती जे अंतरी

    दोन अक्षरी किमया सारी तुमच्या भाषेची

    त्याच चिव चिवे समजुन घेता धडधड ह्रद्धयाची

    भाव मनीचे टिपून घेण्या शब्द लागती थोडे

    चेहऱ्यावरल्या हलचालीनी प्रश्न उकलूनी पडे.

    समज तुमची आपसांतली कौतूक करणारी

    शब्द मोजके असून देखील भाव दाखविणारी

    चिमण्यानो तुम्ही शिकवा सारे मानव जातीला

    व्यर्थ बडबड करुन सारी वाहूनी तो गेला

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • प्रेमाची शांतता

    प्रेमाची शांतता'
    प्रेमानंतरची शांतता
    ती आणि तो
    यांच्यामधील शांतता...
    वादळापुर्वीची शांतता...
    वादळानंतरची शांतत...
    .....आणि मग आपण दोघे
    जेव्हा उरतो तेव्हाची शांतता...
    कधी कधी आपण एकमेकांना
    एकत्र असताना विसरतो
    तेव्हाची शांतता.....
    खुप प्रकारआहेत शांततेचे..
    पण ' प्रेम ' हे एकच असते..
    जे शांतता निर्माण करते
    आणि 'बि' घडवते देखील...
    ती....मी...प्रेम...आणि
    ..शांतता...
    एकाच त्रिकोणाची चौथी
    बाजू..
    म्हणजेच..
    शांतता...
    शोधू नका
    अपोआप सापडेल....

    -- सतीश चाफेकर.

  • काही शब्दांचे ओरखडे हृदयी उमटतात

    काही शब्दांचे ओरखडे हृदयी उमटतात
    कळत नाही निःशब्द घाव कधी बसतात
    कुणी येत अवचित वसंत पालवी लेऊन
    आयुष्यात स्थिरावत अलगद सावली बनून
    मन भरुन झालं की भावनांचा खेळ होतो
    कोण मग हलकेच अंतरी रडवून जातो
    इथे तिथे शब्दांचे फटकारे सारे बसतात
    स्त्रीला संयमाचे धडे सहज मिळतात
    कुणी आयुष्य अलगद व्यापून जातं
    आईचं बोलणं शब्दांत शहाण करुन जातं
    शब्दांचे बाण जिव्हारी फटकन लागतात
    चुकलेल्या वाख्येत मनाला घाव बसतात
    शब्दांचा खेळ सारा रोज बोथट करतो
    रोज नव्याने घाव आल्हाद होत जातो
    अश्रूनाही फारशी किंमत उरत नसते
    माणस माणसांना वापरुन धार बोथट होते
    टाईमपास हा कधी कधी शिकवून जातो
    कळ्यांचा भाव फुलांना न कळतो
    सहज कुणी आयुष्यात येऊन जातं
    विखुरलेले रंग विस्कटून आल्हाद जातं
    विश्वासात अविश्वास सहज खपून जातो
    माणूस माणसाला बोलून तोडून टाकतो
    निःशब्द मन अलवार हरवून जातं
    त्यालाही माहीत नसतं खेळ मनाचा उरतं
    अशी कशी बोच एकाकी मग रुतते
    कोण दुःखी होतो तर कोणाचे मन हर्षते
    भावविश्वात प्रेम कुणावर करु नये
    गुंतल मन अलवार तर मोहात रुतु नये
    शब्दांचे घाव कुणी मनावर सहज करतात
    असे कसे अश्रू अंतःकरण रडवून जातात
    आईच्या वात्सल्यात ऊब मायेची असते
    कोण हलकेच रडवून आयुष्य मिटून जाते
    संथ पाण्यात सायंकाळ केशरी भिजते
    जीव लावला अंतरी तर सल कातरी बोचते
    -- स्वाती ठोंबरे.
  • अणूतील ईश्वर

    पदार्थाचे गुण जाणता, एक गोष्ट दिसून येते,

    सूक्ष्म भाग अणू असूनी, त्यांत सुप्त शक्ती असते...१,

    या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही,

    अधिक उणे नी सम, विद्युतमय प्रवाही....२,

    हेच तत्त्व निसर्गाचे , तीन गुणांनी बनले,

    उत्पत्ती लय स्थिती, यांनी सर्वत्र व्यापिले...३,

    ब्रह्मा विष्णू महेश, प्रतिकात्मक ही रुपे

    अणूरेणूच्या भागांत, समावताती स्वरूपे...४,

    याच विद्युत शक्तीला, चेतना म्हणती कुणी,

    अणूरेणूत लपलेली, ईश्वरमय गुणांनी...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०