असे वाटते की ही दिवाळी कधी येऊच नये ।
तेल नाही म्हणून पाण्याऐवजी मेणबत्ती लावू नये ।
पारिजातकाच्या सड्यासारखे रक्ताचे थेंब पडताना ।
बाँबस्फोटचे आवाज, तलवारी नाचताना ।
भ्यायलेल्या हरिणीसारखे घरात लपताना ।
रोषणाईच्या माळा मला भावतच नाही ।
असे वाटते की ही दिवाळी कधी येऊच नये ।।१।।
पु़ढार्यांच्या भूलथापांना भाळून जाण्यासाठी ।
करंट्याचा जन्म आमुचा असतो मरण्यासाठी ।
त्यांच्या खुर्चीखाली असते जीवन सरण्यासाठी ।
ते मात्र निर्लज्जपणे दारोदारी फिरतात मतांसाठी ।
असे वाटते की... ।।२।।
एन्रॉनचे फुगे उडताना आमच्या घरी रॉकेल नाही ।
भ्रष्टाचार करताना यांची पोटे फुटत नाही ।
करंज्या कडबोळी खायला आमच्या घशात दात नाही ।
गरीबांना घरे देताना घरांवर नांगर फिरल्याशिवाय रहात नाही ।
असे वाटते की... ।।३।।
-- चंदाराणी कोंडाळकर
वरसगांव, कोलाड
पावसाने हलकं झालेलं आभाळ
आज पक्षांनी पार भरून गेलं
चिव चिव निनादली रानभर
मन रानभर वार्यासंग हुदडलं
-- शरद शहारे
जातो छापील अभ्यासक्रमाच्या बाहेर
काळजी घेतो ” मानसिक ” आरोग्याची
हळुवार शब्दांनी फुलवतो मने
विकासाच्या फुलांना गंध देतो
आला, आला, आला,--- $$$$बघा, बाप्पू चिवडेवाला,----,
या मुलांनो, या तायांनो,
या दादांनो,या बायांनो,
या मित्रांनो, या बाप्यांनो,
लवकर सगळे, पटपट या,
आला,आला,आला,
बाप्पू चिवडेवा$$$$ला,$$$ ----
माझ्या चिवड्याची गंमत न्यारी,
लई, लई लज्जतदार,
खुमारी'''''ही भारी,---!!!
तळलेले शेंगदाणे, अन्
खोबऱ्याचा चुरा,----!!!
आला, आला,आला,---
तिखट नाही, तेलकट नाही,
आहे कसा खुसखुशीत,
तोंडात जरा टाकून पहा,
जीभ होईल रसरशीत,
सुटेल तोंडाला पाणी,
मग मागाल आणखी थोडा,
आला, आला, आला,---
बघा बाप्पू चिवडेवाला,----
मस्त, मसालेदार, चविष्ट,
खूष' होणार, कोणी रूष्ट',
फार महाग नाही हो,---
दहाला छोटा पुडा,----!!!
आला, आला, आला,---!!!
रूपये दहा काढा बंदे,
सोडुन धावा सगळे धंदे,
याच्यापुढे 'गारद' सर्व खंदे,
थोडासा, खाऊन बघा आजोबा,
आला,आला, आला,$$$$
अशी मारल्ये त्याला,
खमंग खमंग फोडणी,
हिरव्या मिरच्यांची चुरी,
त्यात कोथिंबीरीचीही हजेरी,
लसणाची, खास चटक पेरणी,
काजूही आत खूप,---
मारा की हो फक्का,---!!!!
आंबट---गोड चवीची मस्ती,
अशी आगळी' चवच नसती,
दहा रूपयांत भरपूर, बघा,--
यां, ना यां, --पोटाला खा, ---!!!
आला, आला, आला,--!!!
जेथे जाईन तेथे,
ग्राहक आपले सगळे,
गडी, कामगार, नेते,
आपुल्या चिवड्याचे चाहते,''''
बाप्पूला ओळखे,--
हरेक वस्तीवाला,---!!!!
आला, आला, आला,---
घ्याल तेवढा कमीच पडे,
पुन्हा पुन्हा, जो तो मागे,
आज रोख अन् उद्या उधार,
एवढेच लक्षात ठेवा,---
आला, आला, आला,---
ऐकून माझी आरोळी,
धावतात की हो सगळी,
नुसत्या मारता मिटक्यां,
पटापट आता पैसे काढा,
आला, आला, आला,---!!!
ताई, माई,आक्का,--
दुसरीकडून घेऊ नक्का,
क्षणार्धात माझ्या चिवड्याचा,
पाडाल बघा, कसा फडशां,
आला, आला, आला,
बघा बाप्पू चिवडेवाला,---$$$$
बाप्पू चि$$$$ वडेवाला,---!!!
© हिमगौरी कर्वे ७७७ ५०८५६५७.
मनावरचं ओझं हलकं करायला शिका.
प्रत्येक नातं शेवटपर्यंत टिकत नाही,
हे सत्य हसत स्वीकारायला शिका.
ज्यांनी साथ अर्ध्यावर सोडली,
त्यांच्यावर रुसत बसू नका.
स्वतःच्या आनंदाच्या शोधात,
नव्या वाटा चालायला शिका.
गेल्या क्षणांच्या सावल्यांत,
वर्तमान हरवू देऊ नका.
कालच्या वेदना विसरून,
उद्याच्या आशेला कवटाळायला शिका.
सोडून देणं म्हणजे पराभव नव्हे,
तो आत्मविश्वासाचा नवा आरंभ असतो.
मन मोकळं करून जगताना,
खरा आनंद स्वतःमध्येच सापडत असतो.
सोडून द्यायला शिका...
कारण काही गोष्टी हातातून निसटल्या,
की आयुष्य आपल्याला
स्वतःची खरी ओळख करून देतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
उत्साहाने करित होता, सारे कांहीं इतरांसाठी
क्षीण होवूनी जाता शरीर, आधार तयाला झाली काठी...१,
धनाचा तो प्रवाह वाहतां, गंगाजळीचे पाणी पाजले
दुजाकरिता त्याग करूनी, समाधानी ते इतरा केले....२,
धन संपत्तीचे झरे आटतां, प्रेमळपणाचे शब्द राहीले
कालक्रमणाच्या ओघामधल्या, दुर्बलतेस कुणी न जाणले...३,
अपेक्षा ती सदैव असते, मिळत रहावा सहयोग
अवमूल्यन ते केले जाते, दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
चाललो होतो मित्रासह सहल करण्या एके दिनीं
आनंदाच्या जल्लोषात आम्हीं गात होतो सुंदर गाणीं १
वेगामध्यें चालली असतां आमची गाडी एका दिशेने
लक्ष्य आमचे खेचले गेले अवचित एका घटनेने २
चपळाईनें चालला होता काळसर्प तो रस्त्यातूनी
क्षणांत त्याचे तुकडे झाले रस्त्यावरी पडला मरूनी ३
काय झाले कुणास ठाऊक सर्व मंडळी हळहळली
जीव घेणाऱ्या प्राण्यालाही सहानुभूती ती लाभली ४
अंत:करणीं दया भाव तो असतो ईश्ररी गुणधर्म
जीवमात्रीं वसला असूनी निर्मितो आपसातील प्रेम ५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
वातावरणी वस्तू पडतां,
नाश पावते लवकर ती,
हवा पाण्याच्या परिणामानें,
हलके हलके दूषित होती ।।१।।
ठेवूं नका उघडयावरती,
वस्तू टिकते निश्चितपणे,
दूषितपणाला बांध घालता,
कसे येई मग त्यात उणे ।।२।।
बाह्य जगातील साऱ्या शक्ती,
आघात करती मनावरी,
दूषिततेचे थर सांचूनी,
मनास सारे दुबळे करी ।।३।।
देहामध्यें बंदीस्त ठेवून,
एकाग्रचित्त करा मनाला,
कांहीं न करता येते तेव्हां,
राग लोभादी बाह्य गुणाला ।।४।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नभ तव स्मृतींचे, ओघळते लोचनी
वाटते तुझ्या प्रीतीत विरघळूनी जावे
ठोके स्पंदनाचे दंग तुझ्याच आठवात
सभोवार दूजे काय आहे मला न ठावे
मनमंदिराच्या गाभारी तुझीच गे मूर्ती
निरंजनी दीपणारे तव रूप मज भावे
अजूनही अंतरी निनादते राऊळ घंटा
तुझी, पाऊल प्रदक्षिणा श्रद्धा जागवे
जणू तूच राधा मीरा भक्तीत दंगलेली
निरागस त्या भक्तीरुपात हरवूनी जावे
कशा, किती? व्यक्त करू मी भावनां
वाटते, मंगल नभप्रीतीचे मिठीत घ्यावे
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ५३
२० - २ - २०२२.
न्यायाच्या अपेक्षेने ग्राहक मंचाकडे तक्रार घेऊन येणार्या ग्राहकांना आता महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासा दिला आहे. आता ग्राहक मंचाकडे दाखल करण्यात येणार्या तक्रारी मराठीतूनच घेण्यात येतील आणि त्याची उत्तरेही मराठीतूनच दिली जातील असा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
Copyright © 2025 | Marathisrushti