(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आम्ही स्वतंत्र आहो

    (१५ ऑगस्ट २०१८ , स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ )

    आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो
    स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा”
    अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता
    बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो
    त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो
    निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो ।।
    ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    प्रगतिचें नांव घेउन वाढत ‘आयात’ राही
    परकीय-चलन सरलें, आश्चर्य यात नाहीं
    गंगाजळीच संपे , हातीं कटोरा धरला
    जागतीकरण मारी देशी उद्योगाला
    इंडस्ट्री ग्रस्त अजुन, ऐशीच ध्वस्त राहो ।।
    ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    मुठभर सुदूरदेशीं ‘आय्. टी.’ मधून जाती
    झालें भलेंच, होवो, पण लाख अन्य मरती
    जणुं बनवतां न येती ‘कंझ्यूमर-गुडस्’सुद्धा
    परदेश धरत लावुन ‘आयात-शुल्क’-मुद्दा
    उणवलें शुल्क, प्रार्थत, ‘चलनी-प्रवाह वाहो’ ।।
    ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    बेकायदाच रस्ते भूमीत बांधुनीया
    साळसूद-देश म्हणे, ‘आमुच्या संगतीं या’

    शेजारी, जो अपुला ‘व्यापार-पार्टनर’ही
    घुसती दहशतवादी, त्यांना आधार देई
    कळुनही विसंगति, कां, तूं गप्प वज्रबाहो ।।
    ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    परदेशी-कंपन्यांची चंगळ बहू जहाली
    देशी उत्पादनांचा आलेख जाइ खाली
    बेरोजगार वाढत , पसरते हलाखीही
    डोळ्यावरील अमुच्या हटतच ‘झापड’ नाहीं
    वदतो , ‘शाबास ! ऐशा प्रगतीत देश नाहो !’ ।।
    ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    कळलेंच ना अम्हांला दुर्दैव हाय ! अमुचें
    बनलो ‘अधीन’ आम्ही परदेशवासियांचें
    पश्चिम व पूर्व इथुनी ‘कंटेनर’ रोज येती
    नागरीक बेपर्वा , तो विकत माल घेती
    ‘टोचणी’स निजलेल्या, निद्रा अशीच वाहो ।।
    ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    निज चालते न मर्जी, कैसा असे स्वतंत्र ?
    परकीय गारुड्यांचे चालती येथ मंत्र
    राष्ट्रें पुढारलेली पिरगाळतात हाता
    उघडलें दार आम्हिच, सार्‍या उगाच बाता
    बोळ्यानें दूध पितो, त्या काय म्हणावें हो ?
    ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    किति ही अदूरदृष्टी ! लांबचा विचार नसे
    पत्ता न, पतन-खड्डा पायाखालीच असे
    शेतें उजाडलेली , पुरते न वीज, पाणी
    आयुष्य जाहलें हें, ‘अघोषित-आणिबाणी’
    ‘जयकार’ झाकतो की - जन फोडतात टाहो ।।
    स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    ऐसे नव्हे , कुणाला कांहींच ठावकी ना
    प्रतिसाद मिळेल कसा कोणाचिया प्रयत्नां ?
    करण्यांस साध्य, कोणां उरली न संधि कांहीं
    लागली चटक, त्याला रोखणें शक्य नाहीं
    एकल्या-यत्नवंतां लोभी-जगत् न दाहो ।।
    ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    सगळेंच सत्य, दोस्ता, अतिशयोक्ती न कांहीं
    सारेच आपण दोषी, तूंही, तसाच, मीही
    चकमा न खाउं, जोखूं अपुलेंच आपण स्वत्व
    दावूं ममत्व कोठें , देऊं कशां महत्व
    ठरवूं या - हृदयिं खरें निजदेशहितच राहो ।।
    स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

    - - -
    लाहो : लाभो, मिळो, प्राप्त होवो
    वज्रबाहू : ज्याचे हात वज्राप्रमाणें आहेत असा
    (अर्थात्, आपल्या सेनेमधील वीर सैनिक )
    -

    - सुभाष स. नाईक
    ( M- 9869002126).

  • तो माझा कृष्णसखा

    निळ्या जळी, काष्ठी, पाषाणी,
    मज मेघ:श्याम दिसे,
    ऐहिक जीवनी वावरताना,
    रंग निळसर भासत असे,--!!
    निळा काळा शाम तो,
    वाजवी मधुर बासरी,
    जिथे असेन तिथे मी,
    हरवून बसते परोपरी,--!!!
    राधिका मी त्याची,
    तो माझा कृष्णसखा,
    जिथे जाईन तिथे तो,
    बनत असे पाठीराखा,--!!!
    नावेत बसुनी चालले ,
    या तीरावरून त्या तीरी,
    यमुनाही डचमळे सारखी, माझ्यासारखी उलघाल उरी,--!! मधुसूदनाचे प्रतिबिंब,
    पाहते मी पाण्यात खाली,
    त्यातच माझे मुख दिसे,
    प्रतिमा एकरुपच झाली,--!!!
    प्रवास हा प्रेममय,
    ओढ त्याची विचक्षण,
    हृदये दोन परंतु,
    एकच आहे तनमन, --!!!
    सावळ्याची होता भेट,
    अद्वैताचाच साक्षात्कार,
    कोण राधा,कोणता कृष्ण, जगासकोडेवाटे फार,-!!

    हिमगौरी कर्वे

  • माते दुर्गे चंडिके

    जय दुर्गे चंडिके

    माते, हे दुर्गे चंडिके

    तुझ्या वरदहस्ताविण, माते, जग ना चालुं शके ।।

    तूं चामुंडा, काली माता

    अंबा, ‘शेरोंवाली’ माता

    वेगवेगळें रूप तुझें भक्तांच्या मनिं झळके ।।

    रुंड चेचशी पायाखालीं

    मुंडमालिका कंठीं घाली

    शूल नि खड्गावरुन करींच्या खलशोणित टपके ।।

    तुझ्या कृपेनें जीवन फळतें

    विश्व तुझ्या इच्छेनें पळतें

    आज्ञेनेच तुझ्या, रविशशिनें अंबर नित चमके ।।

    जन्ममृत्युचें करसि नियंत्रण

    तूंच काळचक्राचें कारण

    काल-आज-अन्-उद्यापलिकडे तव अस्तित्व टिके ।।

    तव गरिमा गातात सर्वजण

    जगत् तुला करताहे वंदन

    लक्ष देवदेवींचें मस्तक तुझियापुढे झुके ।।

    नयनें उत्सुक करण्यां दर्शन

    पदरज करो ललाटा पावन

    अथक तुझें गुणगान गर्जुं दे सार्‍या भक्तमुखें ।।

    पापांचें क्षालन कर माते

    क्लेशांचा आतप हर माते

    भर माते आमुच्या जीवनीं चिन्मय सर्व सुखें ।। - - -

    - - -

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

  • स्मृति

    जीवनाचा प्रवाह हा भरला आहे घटनांनीं

    विसरुनी जातो काहीं काहीं राहती आठवणी ।।१।।

    बिजे ज्यांची खोलवर रुतुनी जाई त्या घटना

    देह आणि मनावर बिंबवूनी जाई भावना ।।२।।

    काळाचा असे महिमा आच्छादन टाकी त्यावरती

    परि काहीं काळासाठी विसरुनी जातात स्मृति ।।३।।

    प्रसंगी त्या अवचित जागृत होती आठवणी

    पुनरपि यत्न होतो जाण्यासाठीं त्या विसरुनी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग १०

    सरांच्या ओळखीने चंदरला एका डॉक्टरकडे काम करण्याची संधी मिळाली .रोज चार तास काम करावे लागेल “, या अटीवर चंदर या कामावर हजर झाला . आल्या-गेल्याची नोंद ठेवणे , पेशंटची नोंद ठेवणे , त्यांची बिले तयार करणे”, अशा स्वरूपाचे काम “,हे जास्त जिकीरीचे काम नाही या नव्या कामातून जे पैसे मिळतील त्यातून तुझा इतर खर्च भागू शकेल “, गुरुजींची हे सांगणे.

  • शब्दांविना संवादू

    शब्दांविना संवादू,असंभव"" तो वाटतो,
    किमया त्यांची न्यारी",
    अर्थ मर्म दाखवतो,
    शब्दांवाचून किती भाषा,
    मानव नेमका वापरतो,
    परंतु त्यांच्यासम हा ,
    म्हणत म्हणत कसा,
    वर्चस्व त्यांचे मानतो,--
    स्पर्श बोले कधीकधी,
    मात्र शब्दांसारखा,
    तान्हुल्यांची खास सोय,
    जाणे बाळ ममता, माय--!!!
    , हाच स्पर्श जादू करे,
    प्रेमभावना व्यक्त करे,--!!
    आबालवृद्धां आधार वाटे ,
    इतुका बोलका अगदी भासे,--
    खाणा-खुणा करत लोक,
    बोलती काही एकमेकांशी,
    मूक सांकेतिक भाषा जणू,
    मदत करे सार्थ अशी,--!!
    चित्रलिपी केव्हातरी,
    आंतरिक संवाद साधे,
    मार्मिक प्रसंग रेखाटुनी,
    हृदयांशी हृदये जुळवे,
    कित्येक कलाही बोलती,
    आत्मिक संवाद साधती,
    खूण पटे आत्म्याला आत्मी, यथोचित अबोल भाषा साची,
    नयनांची भाषा आगळी,
    फक्त डोळ्यांमधुनी बोले,
    कधी अनेक शब्द हारती,
    असे भाव प्रदर्शित करे,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • ग्राहक मंच तक्रारी मराठीतच- अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख

    न्यायाच्या अपेक्षेने ग्राहक मंचाकडे तक्रार घेऊन येणार्‍या ग्राहकांना आता महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासा दिला आहे. आता ग्राहक मंचाकडे दाखल करण्यात येणार्‍या तक्रारी मराठीतूनच घेण्यात येतील आणि त्याची उत्तरेही मराठीतूनच दिली जातील असा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

  • जादूच्या दिव्यातला राक्षस

    कुटुंबात नव्या सोयीसुविधा आल्या तशीच करमणुकीची नवीन साधनेसुध्दा आली. ज्ञानार्जनास उपयुक्त अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणे मिळू लागली. व्हिडिओद्वारे गॅजेट्स वापरण्यास मार्गदर्शन होऊ लागले. काही सुविधांमुळे शारिरिक श्रम कमी होऊ लागले. तांत्रिक प्रगतीचा हा झंझावात शरीरास विश्रांती व मेंदूस विरंगुळा देता देता, शरीरास आळशी व मेंदूस व्यसनी केव्हा बनवू लागला हे कळले नाही.

  • गरीब-श्रीमंत

  • भिकारीण

    मधूर आवाज मिळूनी,
    उपकार झाले तिजवर,
    सुंदर गाणे गाऊनी,
    आनंदीत करी इतर ।।१।।

    हातपाय दुबळे होते,
    दृष्टी नव्हती तिजला,
    कष्ट करण्या शक्ति नव्हती,
    कसा मिळेल घास तिला ।।२।।

    परि ती होती आनंदी,
    गाण्याच्या ओघांत,
    उचलित होती पैसे,
    पडता तिच्या पदरांत ।।३।।

    जरी झाला देह दुर्बल,
    जगण्याची होती आंस मनी,
    मिळालेल्या आवाजाला,
    समजे ती ऋणी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com