(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मुलांचं विश्व

    आमच्यासाठी घर हेच
    आमचं संपूर्ण विश्व होतं
    विश्वाच्या पसाऱ्यात यांना मग
    आमचंच घर कसं दिसत नाही

    आसूसून यांच्यासाठी आम्ही
    किती जमवले आनंदाचे कवडसे
    नाही खिजगणतीतही त्यांच्या
    आम्ही किंवा आमचे उसासे

    उमेद होती तेव्हा कशाकशाची
    तमा नाही बाळगली श्रमाची
    उमजत नाही बाळगावी का
    उमेदही यांच्या तारतम्याची

    केवढा ध्यास आम्हाला, यांचे
    हात लागावेत गगनाला
    पाय तरी ठरतील जमिनीत का
    वाटते आता शंका मनाला

    घ्यावी भरारी त्यांनी म्हणून
    धावलो घेऊन वेड्यागत आपण
    दिशा हुकली की आशाच चुकली
    वाटतं पाहून आता रिकामं अंगण

    कळकळ नि काळजी आमच्या
    असायची काळजात घर करुन
    आता नशिबी आहे रहाणं
    काळजाला पडलेली घरं मोजून

    काळजातले झरे आमच्या
    वाहले प्रसंगी प्रवाही बनून
    कातळात खडखडाट यांच्या
    नसावा पाझर जराही काहून

    सदैव अवतीभोवती यांच्या
    करत आम्ही बाळ, बाळ
    त्यांना फुरसत नसावी पुसाया
    का असाही आता यावा काळ?

    व्यापात कामाच्या आपण
    तरीही घेत होतो यांची चाहूल
    गुंग हे स्वतःतच कायम
    विश्वात आपल्या होऊन मश्गूल

    यांच्या हुसक्याच्याही धसक्याने
    जागलो कितीकदा दचकून आपण
    धसका अजूनही बसतो हृदयाला
    हाक आमची कुठंवर पोचेल
    कानावर यांच्या की पल्याड होऊन

    आमच्या अपेक्षांची तुम्ही
    करा भले उपेक्षा, केवळ
    उपेक्षेचीच तुमच्या करायला
    लावू नका आम्हाला अपेक्षा

    एकंदरीत हे जगच सारा आहे केवळ भास
    तेव्हाही, जेव्हा वाटलं आपण होतो मुलांचे
    आताही, अन्... जेव्हा जाणवतं मुलं नव्हतीच आपली

    -संगोपनास समर्पण
    (आईच्या, आईच्या पिढीच्या आशंकित भावनांना शब्दरुप)

    --यतीन सामंत
    ऋणानुबंध या कविता संग्रहातून
    (९/१२/२००१)

  • दृष्टीची भ्रमंति

    बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं

    लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी १

    चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे

    फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे २

    वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले

    भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले ३

    मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला

    स्थिरावली ना दृष्टी तेव्हां, क्षणभर देखील एका बिंदूला ४

    दृष्टीला परि पडले बंधन, एका दिशेने बघण्याचे

    व्यवहारातील जगामध्ये, पडता पाऊल तारुण्याचे ५

    प्रवाही होते जीवन सारे, जगण्यासाठी धडपड लागे

    रम्य काय ते मधुर काय ते, विसरु गेली जीवन अंगे ६

    राग लोभ आणि प्रेम गुणांचे, दृष्टीमध्ये मिश्रण होते

    अहंकाराने ताठर करुनी, प्रेमाने कधी झुकविले होते ७

    दुजासाठी मी आहे येथे, विवेक सांगे हे दृष्टीला

    शोध सुखाचा घेता घेतां, थकूनी गेलो संसाराला ८

    तन मन जेव्हां झाले दुबळे, दूर दृष्टी ही गेली निघूनी

    आकाशातूनी क्षितीजावरती, आणि तेथूनी आतां धरणीं ९

    वाकूनी गेले शरीर आणि, ह्रदय स्थरावर दृष्टी लागली

    दाही दिशांनी धुंडत धुंडत, अखेर देहा भवती वळली १०

    फिरली दृष्टी जीवनभर जी, वैचित्र्याला शोधीत असता

    डोळे मिटूनी नजीक पहा, सांगे तिजला निसर्ग आता ११

    आनंदाचे मुळ गवसले, अंतर्यामी वसले होते

    आज पावतो विश्व फिरुनी, मुळ ठिकाणी आले मग ते १२

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • परिपूर्ण स्त्री

    आयुष्याच्या वाटेवर अचानक एक दगड आला ठेच लागूनी पायाला देह तिचा कोसळून पडला ज्यावर होता विश्वास खूप तोच टाळून निघून गेला अश्रू आले अलगद गाली पापण्यांतून सडा गेला आजवर त्यांनी जे काही होतं जपलेलं सारं क्षणात होतं तिथे पसरलेलं प्रेमळ त्या संसाराचा पाया पार खचून गेला

  • दु:खांचे हे ऊन्ह रणरणत आहे

    दु:खांचे हे ऊन्ह रणरणत आहे

    गझल; जाती: समजाती-पद्मावर्तनी-वंशमणि; मात्रा: ८+८+४=२०मात्रा

  • आत्मविश्वास

    जे जे मजला हवेच होते, मिळवित गेलो यत्न करूनी

    चालत असता जेव्हा पडलो, उठलो होतो धीर धरूनी

    आतंरिक ती शक्ती माझी, पून्हा पून्हा तो मार्ग दाखवी

    शरिराला ती जोम देवूनी, वाटेवरती चालत ठेवी,

    निराश मन हे कंपीत राही, विश्वालासा तडे देवूनी

    दु:ख भावना उचंबळता, देह जाई तेथे हादरूनी

    परि विवेक हा जागृत होता, विश्लेषन जो करित राही

    सुख, दु:खाचा अर्थ लावूनी, मनास तेव्हा धीरच देयी

    गीळून घेता अपयश सारे, खंत वाटली कधी न त्याची

    समज आली मनास ही की, चूक असावी मार्ग निवडीची.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • भाषाभगिनी

    व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली गीतेश शिंदे यांची हि कविता

  • मातृभूचा मी सेवक

    मातृभूचा मी सेवक,
    देशसेवा करत रक्षक,
    सीमेवरचा मी जवान ,
    तिच्यासाठी देतो पंचप्राण,--!!!

    मातृभूचा मी सेवक,
    एक सामान्यच शिक्षक,
    घडवेन उत्तम नागरिक,
    निष्ठेने पिढ्या जोपासेन,--!!!

    मातृभूचा मी सेवक,
    अभियंता म्हणून काम,
    जीव ओतून घडवेन,
    पुरते जाणून तंत्रज्ञान, --!!!

    मातृभूचा मी सेवक,
    धन्वंतरी असे नाव,
    लेकरांना सांभाळेन,
    मार्गदर्शन आरोग्यवर्धक,--!!!

    मातृभूचा मी सेवक,
    शेत पिकवणारा काटक,
    लेकरांना पुरवेन अन्न‌ ,
    जाणून आपले कर्तव्यकर्म,--!!! मातृभूचा मी सेवक,
    मला म्हणतात मजूर,
    मी एक तिचा श्रमिक,
    श्रमांवर वैभव उभारेन,--!!!

    मातृभूचा मी सेवक,
    आहे एक संशोधक,
    विज्ञानाची सेवा करत,
    नाव तिचे मोठे करेन, --!!!

    मातृभूचा मी सेवक,
    मला म्हणतात व्यावसायिक,
    पाहेन तिची भरभराट,
    पोचेन जगाच्या नकाशावर,--!!!

    मातृभूचा मी सेवक,
    एक विमानचालक,
    तिच्यासाठी आभाळा भिडेंन
    नाव तिचे दूर दूर पोहोचवेन,--!!!

    मातृभूचा मी सेवक,
    आहे एक साहित्यिक,
    लेखण्यांच्या माध्यमातून,
    तिचा लौकिक वाढवेन,--!!!

    मातृभूचा मी सेवक,
    आहे मी कलाकार ,
    आपली कला करून जिवंत,
    तिच्या चरणी अर्पेन,--!!!

    मी मातृभूची सेविका,
    स्त्री असो अथवा बालिका,
    तिच्या कुशीतून वर येऊन आभाळाचा ठांव घेईन-!

    मातृभूचा मी सेवक,
    आहे प्रगाढ पंडित,
    धर्म संस्कृती जोपासत,
    करेन त्यांचे संरक्षण,---!!!!

    हिमगौरी कर्वे©

  • जरा धीर ठेव

    ज्या ज्या वेळी धीर ठेवशी
    मिळेल कांहीतरी
    गडबड मनां होऊन जातां
    निराशाच पदरीं ।।१।।

    शांत चित्त आपुले
    तूं ठेव प्रत्येक समयी
    मिळेल यश पदरी तुझ्या
    खात्री याची घेई ।।२।।

    आत्मविकास तूं सोडूं नको
    आपल्या कामाचा
    मोबदला मिळेल तुजला
    योग्य प्रयत्नाचा ।।३।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • गेला आस्तालं सुरयं……

    ना.धो.महानोर सर भावपूर्ण श्रद्धांजली

    गेला अस्तालं सुरयं,काळवंडलं आभाळं
    जिवं झाला कासावीसं,झाला काळुख आंधारं
    उजेडाची हि लेखनं,कशी रूकली रूसली
    आज सरोसती माय,हुंदका फोडून रडली
    झाली पोरकी कविता, रानी आंधार आंधारं
    कुठं शोधु तुलं आत्ता,कुठं गेलासी सोडूनं
    युगां पडलं भगदाडं,झाला युगांत युगांत
    वलावल्या पापण्यां त्या,वघळत वघळती
    अवकाश मोठा झाला,त्यालं तुहीच गरजं
    ये रे आता परतुनी,उजवं सरू मायची कुसं

    ©गोडाती बबनराव काळे
    9405807079

  • दु:खी अनूभवी

    दु:ख जाणण्या दु:खी व्हावे, या परि अनूभव दुजा कोणता
    सत्य समजण्या कामी न येई, तेथ कुणाची कल्पकता

    धगधगणारे अंगारे हे, जाळती जेथे काळीज
    शब्दांचे फुंकार घालूनी, येईल कधी का समज

    मर्मा वरती घाव बसता, सत्य येते उफाळूनी
    चेहऱ्यावरले रंग निराळे, हलके हलके जाती मिटूनी

    त्या दुःखीताला जाणीव असते, जीवनामधली निराशा कशी
    झेप घेवूनी समरस होतो, इतर जणांच्या काळजाशी

    सुख दु:खातील दु:ख आधीक ते, पदोपदी जे दिसून येई
    दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी, दु:खी अनूभवी धाव घेई

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com