सामाजिक असंतुलन हे दहशतवादाचे मुळ आहे. सत्तेची हाव, अधिकार नाकारणे, स्वत:च्या फायद्यासाठी दुसज्याला ओलीस ठेवणे, धर्मसत्ता लादणे, जाती भिन्नता, धर्मभेद तसेच समाजातील भिन्न संस्कृतीचे लोक एकमेकांबरोबर आणि एकाच राजकीय छत्राखाली व एकाच न्यायव्यवस्थेखाली राहायला नाखुश असतात. बरेचदा राज्यकर्ते एखाद्या भागाकडे दुर्लक्ष करतात व त्या भागाची प्रगती खुंटते त्यामुळे एकाच देशात आर्थिक भेदभाव निर्माण होतात आणि त्यातून आतंकवादाचा जन्म होतो.
May 21, 2022
किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती.
एकच गोष्ट सतत कानी पडत होती.
उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा.
भडीमार होत होता आईकडून शब्दांचा..
आम्ही होतो बालपणीच गांधीवादी.
एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे.
मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे.
खेळणें, कुदणें, उड्या मारणें,
त्यातच ढोपर, कोपर, हातपाय फुटून जाणें, भळभळा रक्त वाहायचे.
पण सांगा रडून कुणाला ?
कारण ते असायचे स्वतःच्याच प्रतापाचे...
निमुटपणें बाजूस बसून, सहन करायचे
आणि कुणास समजू नये, म्हणून माती टाकायचे.
भरत होत्या साऱ्या जखमा हलके हलके.
न भरून कसे चालायचे ?
मस्तीची रग, खेळातील धडपड आणि
स्वत:च डॉक्टर बनून जखामाबद्दल वाटणारी मायेची कढ.
सारे तुटून पडायचे, घाव बरे करण्यासाठी.
* * *
... संध्याकाळची वेळ, सूर्य अस्ताला चाललेला.
किती घटका राहील्या होत्या, त्याला डुबण्यासाठी !
विचार करितो मी. शांत बसून पंचाहत्तरीच्या काठी.
हातपाय खाजवितो, कुरवाळीतो, सुरकुतलेल्या कातड्याकडे बघतो.
मध्येच नजर खिळून राहते, ती जखमांच्या वणावर.
कितीतरी लहान मोठ्या आकाराची.
ज्यावर दिसत होती चित्रे आठवणीची.
प्रत्येक वणावर होता एक इतिहास, एक घटना, एक जबरदस्त प्रसंग.
कोडगे बनून केलेली मस्ती, आईचा मार, शिव्या आणि बाबांचा राग.
पण आज सारे काही मनाला आनंदीत करून टाकणारे.
शरिरावरले वण बनले होते एक जीवन आलबंम.
नेत होते भूतकाळांत.
जो होता निश्चित आणि उपभोगलेला.
त्यात भविष्यकाळाची अनिश्चितता नव्हती, कि वर्तमान काळाची क्षणिकता.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 1, 2016
June 8, 2022
नाच नाचती तालावरती
मीरेची पाऊले
चित्त ते हरीमय जाहले. - - - धृ
लागला प्रभुचा ध्यास
हरि दिसे नयनास
चलबिचल नजर होऊन
अंग सारे मोहरले - - -१
चित्त ते हरीमय जाहाले
न राही आपले भान
झाली भजनी तल्लीन
तनमन प्रभुचे ठायी जाता
संसार ते विसरले. - - - २
चित्त ते हरीमय जाहाले
विषाचा घेता प्याला
हरि तो त्यातची दिसला
झेपावूनी गेली त्याच क्षणी
घट घटा प्राशन केले. - - - ३
चित्त ते हरीमय जाहाले
जहाल होते विष
मृत्युचा तो पाश
प्रभूभक्तीच्या शक्तीने परि
अमृत ते बनले - - - ४
चित्त ते हरीमय जाहाले
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
March 19, 2016
ढ्यांग ढ्यांग इलेक्शन-मृदंग गुंजला
मीबी मंग तिकिटाचा चंग बांधला
वाटप-रांगेत धरी जोर चांगला
लांगुलचालन करून जोड सांधला
संप्रदाय ‘थोरां’चा नमुन वंदला
पवित्र ‘मंदिरीं’ कृपाप्रसाद लाभला
अखेरीस कँडिडेट-टिळा लागला
धुंदीला नच पारावार राहिला
प्रचंड फंड ज्यासाठी आजवर दिला
पक्षानें आज खरा पांग फेडला. १
‘सीट’ नको-तीच, तरी ती सुमंगला
‘यंदा यशवंत तूं’, संदेश पोंचला
खांद्यावर झेंडा पक्षीय बांधला
उच्चनाद करत युद्ध-शंख फुंकला
दक्ष पूर्ण, लक्ष ‘मंद’ आजुबाजुला
‘भांग’ चढे , ‘खचित जय असेल आपला’
वृद्धिंगत करिन पक्ष-यशद-शृंखला.
पण फडात ‘दंगली’त नविन मामला
षंढ विरोधकगण, नव-डाव मांडला
माझ्याविरुद्ध ‘फ्रंट्’ एकत्र बांधला
उमेदवार फक्त-एक उभा ठाकला
दंड थोपटुन लढावयास पातला.
कुत्र्यांचा घोळका कितीक भुंकला
माशी-थवा जरी कितीक शिंकला
कितिक जरी अरिनें धरबंध सोडला
द्वंद्वाचा निश्चय मी ठाम ठेवला
प्रतिद्वंद्व्या, बघच रंगढंग आगळा
जंगजंग पछाडले , मी नसे बुळा
रंक न मी, खूप money, गाडी-बंगला
चीत कराया पुंडां , सज्ज मम व्हिला. २
लढतीचा मी गुलाल उंच उधळला
संत न मी, पंथ स्वीकरी बुराभला
गुंडझुंड-संगतीत खेळ मांडला
संच-मंच-वृंद एकसंध जुंपला
तंत्रबद्ध जंत्री-आधार घेतला
मंत्रघोष यंत्रवत् ‘जय-जय’ निनादला
शिणती गात्रें, तरि विश्राम लांबला
गुंग रात्रिही , नसे प्रचार थांबला
धनसंचय उधळाया संगं आणला
बांध फोडला, न हात तंग ठेवला
साम-दाम-दंड-भेद योग्य मानला
डाव बघुन, जन-तांडा दंग जाहला. ३
क्लांत जरि, न शांतता, संघर्ष वाढला
मोजणीत जय नि पराजय हिंदोळला
आस-निराशेचा थांबे न जरि झुला
मुगुट मनीं धरलेला, मी न सोडला.
रिझल्ट अखेरिस, तो भूकंप थोरला !
हाय हाय ! जय खूपच लांब राहिला !
दंतओष्ठ खात गड बुलंद लढवला
झुंज शर्थिची, परि बलदंड जिंकला
मंथर मतदार, दिली वंचना मला
संपलेंच स्वप्न , पंथ बंद , खुंटला
गंतव्याचा प्रवास विफल, थांबला
भरण्यांआधीच सुयश-कुंभ सांडला. ४
‘कमिशन’नें उंच जधिं निकाल टांगला,
ब्रह्मांडच आठवलें तत्क्षणीं मला !
तोंच, चंगळींत जो आकंठ डुंबला
चाटुकार-संघ, सांगतां न, पांगला
गजबज-संबंध नुरे, ओस चौफुला
‘हॉल’ हा सबंध खायला-उठे ‘दिला’
एकांतच फक्त हा सन्मित्र राहिला
शब्दहीन होतसे आक्रंद मोकळा
रुदन जरि न, नेत्रानें थेंब सिंचला
हुंदका फुटे न, मी तुरन्त दाबला. ५
सुन्न करी ऐसा रिझल्ट जन्मला
अनंत-उदासी-कुठार-घाव घातला
‘सोंग’ कोणतें पुढें , महत्व ना मला
सिंह कसा कोल्ह्यांशी ‘जंग’ हारला ?
टांग मारतां नशीब, जीव आंबला
मात्र अंक प्रथम, नाट्यपूर्ण संपला.
खंक जाहलो पुरा, न खंत ही मला
मानभंग होइ म्हणुन प्राण खंगला
यत्न व्यर्थ सर्वसर्व , गर्व भंगला
हन्त हन्त ! अंत मी असा न कल्पला. ६
*
द्यूत-आरंभाआधीच काढ अर्गला
ऐक, श्रेष्ठ-गुरु अनुभव सांगतो सला
पंडित प्रकांड नको हें कथायला -
राजकारणाचा कर बंद चोचला.
दु:खांमधिं जीव जे सांडत सुखातला
‘पढतमूर्ख’, बोंबलुन ‘किताब’ त्यांजला
मतमतांत संचरि तव गल्बला-खुळा
जाण परी, पॉलिटिक्स ही बुरी बला
अंग बद्ध, पंख बंद, पंक-नद खुला
लांघण्यास लागतो ‘महंत’ ‘पोचला’
सज्जन तूं, उंचसखल-वक्र कां वळा ?
परवडेल कधि नच धंदा असा तुला
फुकट आत्महत्या ही, धुंड नच हिला
बंधु, शांत संथ पथ नि:शंक तुज भला. ७
चुकलो मी, चुनावीय घाट घातला
तूंतरि हरव न आनंद अंतरातला . ८
- - -
मंग : मग
फड : कुस्त्यांच फड
दंगल : कुस्यांची ‘दंगल’ (स्पर्धा)
जधिं : जेंव्हां
जंग : लढाई
दिला : दिलाला, मनाला, हृदयाला
सला : सलाह्, सल्ला
पंक : चिखल
किताब : ख़िताब, पदवी
चुनाव : इलेक्शन, निवडणूक
संगं : संगें, साथीनें, सोबतीनें
आस : आशा
कमिशन : इलेक्शन कमिशन
बुरी बला : वाईट, त्रासदायक अशी गोष्ट / बाब.
अर्गला : कडी
-- सुभाष स. नाईक
August 2, 2018
एक विनोदी लेखक, कवी म्हणून सुरु झालेला अत्रेंचा प्रवास, आक्रमक वक्ता, विडंबनकार, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, परीक्षक, चित्रपट पटकथा-संवाद लेखक आणि अखेर सयुंक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रेसर राजकारणी अश्या अनेक वळणावरून ४० वर्षे अविरत पणे सुरु राहिला.
October 8, 2019
आपलं कधी असं ठरलं नव्हतं
आपण बोलताना
हा असा अमुक अमुक विषय काढू
तमक्या विषयावर तू तुझं मत मांड
हा विषय ऐनवेळीचा विषय म्हणून
घेऊया का चर्चेस
हा एक इतका महत्वाचा विषय आहे
तू तुझे विचार ऐकव
आणि मग मी माझे मत मांडते
मग तुझ्या वाट्याला एवढी वाक्ये आणि
एका वाक्यात अमके एवढेच शब्द बसण्याची मर्यादा
आपलं अस काहीच नव्हतं ठरलं
हे आज आठवलं म्हणजे मग
आताशा माझ्या लक्षात येतंय की
फक्त मीच तर बोलायचे...
मी बोलायचे आणि तू ऐकायचास
असही नाहीच म्हणू शकत मी
मी बोलायचे आणि मला तू ऐकत
असल्याचा निदान आभास तरी व्हायचाच
मी बोलायचे
काही जुन्या आठवणी निघायच्या
काही आवडती गाणी सांगायचे
मी आजूबाजूच्या
प्रत्येक गोष्टीवर बोलायचे
मला पडलेल्या स्वप्नांवर
माझ्या स्वतःच्या स्वप्नांवर
तू काय केले पाहिजेस सांगायचे
तू आज कसा छान दिसतोस हे देखील
बोलूनच सांगायचे
आपण भेटलो ना की मी बोलायचे
उधानलेल्या पावसाने
उधानलेले पाणी जणू
तसे कसेही आणि कुठेही वळायचे माझं बोलणे
आणि ...
माझ्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद म्हणून
तू हसायचास..
मग मीच अर्थ लावायचे या हसण्याचे
तू खळाळून हसलास की
तुला पटल किंवा तू तुझ्या हास्याच्या धबधब्यात
माझं बोलणं उडवून लावलंस
तू फक्त बुद्धासारखं पुसटस हसलास की
मला वाटायचं तुला नाही बोलायचं या विषयावर
हे असे नेमके हेच आहेत का अर्थ
असही मी विचारलंच नाही तुला कधी
पण आज ....
प्रत्येक गोष्ट बोलून का दाखवतेस?
या तुझ्या एका प्रश्नासरशी
तुझ्या अव्यक्ततेमधील व्यक्तता जाणवली
'नाहीच बोलणार मी आता'
आता हे देखील नसते बोलले तरी चाललं असतंच म्हणा
असो.....
©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
१८/०८/२०१८
August 20, 2018
प्रेम
एक स्त्री
एक पुरुष
यांचे मिलन नसते...
प्रेम
समुद्र
आहे अमर्याद
खोल अथांग...
प्रेम
पाण्यात साखर विरघळते
तसे विरघळणे असते
अस्तित्वात नसतानाही
आपला गोडवा राखणारे...
प्रेम
मेणबत्ती सारखे
जळणे असते
जगाला प्रकाश देत...
प्रेम
फक्त मरणे असते
जगणे त्यास माहीतच नसते
प्रेम
एक भ्रम असते
जे साऱ्या जगाला भ्रमित करते...
©निलेश बामणे
June 9, 2017
एक बाबा थकलेला कमरेमध्ये वाकलेला
हातात काठी तुटका चष्मा उदासवाणा बसलेला
अंगावर सुरकुत्या चुरगळलेल्या स्वप्नांच्या
फाटकं धोतर फाटका सदरा अनवाणी चाललेला..!
कधीकाळचा सूर्य आज निस्तेज झाला आहे
करपलेल्या मनाचा एक कोपरा ओला आहे
डोळ्यांवर हात ठेवून वाट अजून पाहतो आहे
येईल कधीतरी लेक माझा शहरात राहतो आहे..!
वाट पाहून वाटा सरल्या नवी वाट दिसत नाही
काळोखात रडतो चंद्र, सूर्य कधीही हसत नाही
जगरहाटी चालू आहे वेळ कुणाला मिळत नाही
रोज मरणा-या बापाचं मन कधीच कुणाला कळत नाही...!!
राजेश जगताप
मुंबई..
९८२१४३५१२९
April 2, 2023
तुमचे जीवन अवलंबूनी,
ग्रहराशीच्या दशेवरती
तेच होई जीवनी तुमच्या,
जसे ग्रहमंडळ फिरती...१,
मित्र मंडळी सगे सोयरे,
शत्रू असोत वा प्रेमाचे,
जीवनातल्या हालचालीवरी,
परिणाम ते होई सर्वांचे...२,
हेच सर्व ते ग्रह असूनी,
सतत स्थान ते बदलती
परिस्थिती बघूनी तुमची,
वागण्यात तो फरक करती...३
अपयशाला कारणीभूत तो,
असतो कुणीतरी नजीकचा
राहू-केतू शनि वा मंगळ,
ग्रहमान बनतो त्या घडीचा...४,
यशाची चालता घौडदौड ती,
मदत लाभते काही जणांची
हे तर सारे इष्ट ग्रह ते,
फुलवी सुमने जीवनाची...५
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
March 21, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti