(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तरंग पहिला-पार्श्वभूमी

     

  • भक्तांसाठी कष्ट भोगतो श्रीहरी

    युगानू युगें उभा राही, एका विटेवरी

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी ।।धृ।।

    आई वडिलांची सेवा

    पुंडलीक भक्तीचा ठेवा

    भक्तित होई तल्लीन

    जगास गेला विसरुन

    उभा करुनी तुजला, गेला निघूनी चंद्रभागेतीरी ।।१।।

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी

    विषाचा तो पेला

    मीरेनें प्राशन केला

    भजनांत गेली दंग होऊनी

    पचविलेस विष तूं घेऊनी

    दुधामधले विष शोषूनी, दाह त्याचा सहन करी ।।२।।

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी

    भक्तीत गुंगली राधा

    तुमचा होता ध्यास सदा

    कष्ट पडता संसारी

    विसरुन गेली ती सारी

    झेललेस तूंच ते वार पडले तिच्या पाठीवरीं ।।३।।

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी

    राहीला नाथाघरीं

    आनंदाने पाणी भरी

    श्रीखंड्या समजे तुजला

    कुणी न जाणी भक्तीला

    सुगंधी चंदन घासूनी, सेवा नाथाची करी ।।४।।

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी

    सखूसाठीं धावला

    देह तो झिझविला

    निवडणे केले, कांडणे केले

    राशीभर धान्य दळले

    उभा राहूनी पाठीं, सखूचे कामी मदत करी ।।५।।

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • जात प्रमाणपत्राची पडताळणी

    जातीचे प्रमाणपत्र आपल्याला उपजिल्हाधिकारी कार्यालयातून दिले जाते.आणि हे देत असताना तहसील कार्यालयामार्फत आपली सर्व कागदपत्रे तपासून पाहिली जातात आणि त्याची छाननी करून व सर्व सत्यता पडताळून पाहिली जावून आपली फाईल एकेक टेबल पुढे सरकत जाते. आणि शेवटी सर्व सोपस्कार पूर्ण करून आपल्याला जातीचे प्रमाणपत्र दिले जाते.

    आपल्याला हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही आपली फरपट संपत नाही.जेव्हा केव्हा निवडणुका येतात तेव्हा याप्रमाणपत्राची वैधता ( VALIDITY ) करून घ्यावी लागते.हे कशामुळे?

    ज्या यंत्रणेद्वारे जातीचे प्रमाणपत्र दिले गेले ती यंत्रणा म्हणजे शासन. मग या शासनाच्या अधिकृत क्लास वन आणि सुपर क्लास वन अधिकार्यांनी एकेक कागदपत्रे अक्षरश:चाळणीतून तपासूनच हे प्रमाणपत्र दिले ना.... मग हि यंत्रणा विश्वासार्ह नव्हे काय? जर विश्वासार्ह आहे तर मग VALIDITY कशासाठी?

    जर का एखादी फाईल VALIDITY न होता लातूर येथून जर परत आली तर हे प्रमाणपत्र देणारा अधिकारी दोषी आहे असे समजावे काय?

    VALIDITY चे एक टेबल जर उपजिल्हाधिकारी कार्यालयातच वाढविले तर जमणार नाही काय? काय तो येथेच फैसला होवून सामान्याची ससेहोलपट तरी होणार नाही.कारण जातीचे प्रमाणपत्र मिळविताना किती कष्ट लागतात हे प्रमाणपत्र काढ्लेल्यालाच माहित...

    प्रशासनाने या बाबत जरूर सकारात्मक विचार केल्यास जनतेला नक्कीच दिलासा मिळू शकेल.

    -- महादेव विश्वनाथ कापुसकरी

  • दसऱ्याचं सोनं

    दसरा सण आनंदाचा
    सोनं द्या प्रेमाचं मोठं
    देऊन पानं आपट्याची
    नका देऊ सोनं खोटं

    आलिंगन देऊन परस्परांना
    सोनं म्हणून वृक्षबीज देऊ
    झाडे जगवा झाडे वाचवा
    वसा आज हा आपण घेऊ

    हर्षाच्या या मंगल समयी
    नका रडवू अबोल वृक्षा
    रक्षण करती आपुले जीवन
    आपण करूया त्यांची रक्षा

    वृक्ष सदैव देतच असती
    पाने-फुले किती संपदा
    होऊ नकोस तू कृतघ्न
    वृक्षाविन ओढवी आपदा

    वृक्ष असती मित्र आपुले
    आपटा, वड, पिंपळ, शमी
    वृक्ष-मानव सहजीवनाने
    करू साजरी विजयादशमी

    - प्रा.अरूण सु.पाटील (असु)

  • तीळगुळ घ्या हो (गीतरचना)

    तीळगुळ घ्या हो
    गोड गोड बोला।।
    खाली सांडू नका,
    आणि भांडू नका।।धृ।।

    ऊस ,बोरं ,ओंब्या,
    वाण लावू चला।।
    काटेरी हलवा
    गोडव्याची कला।।
    द्यायला मुळीच
    विसरूच नका।।
    खाली सांडू नका
    आणि भांडू नका।।१।।

    सुगड्याचं वाण
    लावूया गं छान।।
    उपयोगी वस्तू
    त्यांना देऊ मान।।
    हवाय कशाला
    प्लॅस्टीकचा हेका।।
    खाली सांडू नका
    आणि भांडू नका।।२।।

    उखाणा घेऊया
    मौजही करुया।।
    घरोघरी जाऊ
    स्नेह हा वाटूया।।
    राग,द्वेश,सारे
    काढूनच टाका।।
    खाली सांडू नका
    आणि भांडू नका।।३।।

    -- सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

  • सुखदुःखात मी नित्य डूंबलो

    सुखदुःखात मी नित्य डूंबलो
    अंतरी वेदनांच उरली नाही

    वाटसरु मी अनवट वाटेवरचा
    चालायचे कधी थांबलो नाही

    जगणारा मी एक मुक्त कलंदर
    दु:श्वास कुणाचाच केला नाही

    जीणे रिते , खरे सुखशांतीचे
    मी हव्यासात गुंतलोच नाही

    निर्माल्य जळात मुक्त वाहते
    हे सत्य शाश्वत लपले नाही

    जन्म उदरी तर अंत स्मशानी
    हा न्याय कुणास चुकला नाही
    ********

    --वि.ग.सातपुते.(भावकवी)

    (9766544908)

    रचना क्र. ३२०

    ५/११/२०२२

  • जीवन / दोन चारोळ्या

    रेशमी कोशात शोधले

    मधाचे मोहोळ त्याने….

  • २६ जानेवारी २०२०

    प्रिय वाचक वर्ग मंडळीना

    भारतीय प्रजासत्तक दिनानिमीत्य शुभेच्छा.

    जन गण मन अधिनायक जय हे

    भारत भाग्य विधाता ।।

    पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा

    द्राविड उत्कल बंग ।

    विंध्य, हिमाचल, यमुना गंगा

    उच्छल, जलधितरंग ।

    तव शुभ नामे जागे,

    तव शुभ आशिस मागे

    गाहे तव जयगाथा

    जन गण मंगल दायक जय हे,

    भारत भाग्य विधाता ।।

    जय हे , जय हे, जय हे

    जय जय जय हे ।।

    भारतमाता की जय हो.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • क्षणभर थांबतो का?

    क्षणभर
    थांबतो का?
    क्षणमात्र
    उशीर हा

    क्षमाशिल
    असतात
    साधुसंत
    जगतात

    क्षण क्षण
    वेचतात
    या क्षणिक
    जिवनात

    ज्ञानदान
    करतात
    ज्ञानदाता
    जिवनात

    ज्ञानेश्वरी
    ज्ञानामृत
    ज्ञानार्थि हे
    हो संतृप्त

    ज्ञात सारे
    असावेच
    विज्ञानात
    शोधावेच

    त्रस्त होती
    मतदाते
    व्यस्त होता
    सत्ता भोक्ते

    त्राहि त्राहि
    जनता रे
    नेता पाही
    स्वहित रे

    त्राता नाही
    जनतेचा
    नेता कोणी
    या राष्ट्राचा

    -- सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

  • गायिका गाऊ लागे

    गायिका गाऊ लागे ,
    शास्त्रीय गान ते "सुस्वर",
    रसिकश्रोते स्तंभित,
    लुब्ध" होती गानावर,
    नाद ताल स्वर ,
    आलापी अंतरे मुखडे,
    रसिकांच्या दुनियेत,
    रोमांच "अंगावर खडे,
    स्वरा--स्वरांचे तरंग,
    काळजाला हात घालती,
    स्वर्गीय सुरांची पकड,
    सगळेच तिला वश होती,
    संगीताची दुनियाच न्यारी,
    रसिकांना "खिळवून" ठेवे,
    ब्रह्मानंदी लागता टाळी
    बुडणे त्या स्वरसमुद्री,
    परमानंद"" देई संगीत,
    दुःखे सगळी विसरती,
    अशा गानकलेने केवळ,
    मुक्त"" आनंदही लुटती,
    स्वरांची दुनिया वेगळी,
    या दुनियेची "सर" नाही,
    त्या दुनियेत पोहोचणे,
    इतुके कठीणही नाही,
    ताण ऐहिक जीवनी ,
    काळज्या आणखी चिंता,
    पदोपदी लागते निभावावे,
    अगदी कठोर व्यवहारा,
    संगीताचे जग निराळे,
    कान देऊनी ऐकावे,
    असंख्य प्रकार संगीताचे,
    भान हरपून जावे,
    वरवरचे सुख नसते,
    आत्माही होई शांत,
    परमात्म्याशी पोहोचणे,
    नसावी कुठली "भ्रांत",--!!!!

    हिमगौरी कर्वे.©