काढूनी झाडाच्या सालींचा आडोसा घेतला ज्या कुणीं
स्वांतंत्र्याच्या कल्पनेला बंधन पडले त्या क्षणीं ।।१।।
नग्नपणें फिरत होता श्र्वानासारखा चोहींकडे
सुसंस्कृतीची जाण येतां स्वच्छंदाला बाधा पडे ।।२।।
स्वतंत्र असूनी देखील पडते परिघ भोवती
जीवन जगण्या करितां बंधने ती कांहीं लागती ।।३।।
स्वांतत्र्याची तुमची व्याप्ती असावी दूजांना जाणूनी
दिव्य करण्याच्या ईर्षेने संस्कृतीस होइल हानी ।।४।।
ओंगळपणाचे चित्रण करती जे लेखक- कवि
आगळेपणाची भूमिका मनांत त्याच्या असावी ।।५।।
बाध न येतां बंधनाला भव्य असे करुं शकतात
चाकोरी मध्येंच राहूनी आकाशाला भिडूं शकतात ।।६।।।
निर्माण करुन गीतेला हजारों वर्ष ती झाली
तोच विषय पुन्हां घेउनी ज्ञानोबांनी बाजी मारली ।।७।।
सोडा तुम्हीं वेडा विचार स्वचछंदी त्या जगण्याचा
गढूळ होता वातावरण गुदमरेल जीव तुमचा ।।८।।
जेव्हां कुणी स्वातंत्र मागे त्याच्याही मर्यादा असती
दुजे त्याच्या पाठीमागचे एक पाऊल पुढे टाकती ।।९।।
दुसऱ्याचे हेच पाऊल पहिल्यास ठरे घातक
दुष्टचक्र स्वच्छंदाचे पोखरुन टाकील कित्तेक ।।१०।।
तयार करित आहात बेतालपणाचा भस्मासुर
तुम्हांलाही नष्ट करील हात ठेउनी शिरावर ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मी ह्या उघड्या डोळ्यांनी पाहिले —
जंगलात कित्येक गाढव सिंह होताना,
आणि कित्येक सिंह गाढव होताना...
जंगलाचा खरा राजा सिंहच होता,
पण आज जंगलात गाढवालाही
राजाचं मान मिळालं आहे.
कारण जंगलात सिंहाचे नाही,
तर गाढवाचे समर्थक जास्त झालेत...
आज गाढवाला मिळणारे समर्थन पाहून
सिंहही स्वतःला शेळी समजू लागला आहे.
प्रत्यक्षात नाही, पण मनाच्या आत
त्याचाही जणू लिंगबदल झाल्यासारखा आहे.
शंभर गाढवे मिळून
एका सिंहाला मूर्ख ठरवतात,
त्याला नाममात्र राजा करून
वर्षानुवर्षं जंगलावर राज्य करतात...
©कवी – निलेश बामणे
( दिनांक: 25/10/2025 )
चोविस तासहि विठ्ठलमंदिर राहिल हें उघडें
ना भक्तांना दर्शन घेण्यां आतां कष्ट पडे ।। १
जेव्हां जेव्हां विठ्ठल झोपे
मूर्ती दारामागुती लपे
भलीथोरली वारकर्यांची दारीं रांग अडे ।। २
पांडुरंग अन् भक्तांमधलें
हवें कशाला अंतर असलें ?
दार उघडुनी बडवे करती पुण्यकार्य तगडें ।। ३
आतां विठुला निद्रा नाहीं
अष्टप्रहर तो दर्शन देई
आतां त्याला भेटायाला होतिल ना झगडे ।। ४
वारकर्यांनो, भक्तांनो, या
वैकुंठाचा लाभ लुटाया
दिठी मारतां विठुस मिठी, मनिं चिदानंद लगडे ।। ५
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
साडी चोळी सुंदर नेसूनी,
आभूषणें ती अंगावरती,
लज्जा सारी झांकुनी टाकतां,
तेज दिसे चेहऱ्यावरती ।।१।।
आत्म्यासम ती लज्जा भासे,
सौंदर्य जिवंत त्याच मुळें,
लोप पावतां लज्जा माग ती,
जिवंतपणा तो कसा कळे ।।२।।
लपले असते सौंदर्य सारे,
एक बिंदूच्या केंद्रस्थानीं
शोध घेण्या त्याच बिंदूचा
लक्ष्य घालतां उघडे करुनी ।।३।।
विकृत ती मनाची वृत्ती
स्वच्छंदीपणात ती असते
क्षणिक पणाच्या मागें लागून
खरा आनंद ती गमावते ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
खोड्या करणे, त्रास देणे, हाच बनला स्वभाव त्याचा
वाटत होते बघून त्याला, दूरोपयोग करि तो शक्तीचा...१
पाय ओढणे, खाली पाडणे, कपड्यावरी तो चिखल फेकणे
मारपिट ती करूनी केंव्हां, गुंडपणा तो करित राहणे...२,
बेफिकीर ती वृत्ती तयाची, स्वार्थाने तो भरला पुरता
तुच्छ लेखी इतर जनाना, स्व आनंद साधत असतां....३,
'आनंद' मिळवणे हेच ध्येय, जीवनाचे तत्त्व खरे ते
विपरीत मार्ग अवलोकितां, समाधान राही दूर तेथें...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
छेडछाड, बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण..महाराष्ट्रात २०१० सालातील छेडछाडीच्या एकूण गुन्ह्यांपैकी फक्त 5 टक्के गुन्ह्यांमध्ये आरोपींना दोषी ठरवून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. मुंबईतील सन २०११ पर्यंत दाखल झालेल्या एकूण १,६१,५२८ गुन्ह्यांतील फक्त १७ टक्के आरोपींना शिक्षा झाली आणि उरलेले ८३ टक्के गुन्हेगार कोर्टात सुटल्याची धक्कादायक माहिती.या गुन्ह्यांपैकी ४४,८७४ गुन्हे गंभीर स्वरूपाचे.
कवि होणें सुलभ असावे रसिक होण्यापरि
जिवंत ठेविती कवितेला हीच मंडळी खरी ।।१।।
भावनेचे उठतां वादळ व्यक्त होई शब्दानीं
भाव शब्दांचा हार दिसतो काव्य ते बनूनी ।।२।।
भाव येणे सहज गुण तो मानवी मनाचा
परि बंदिस्त त्याला करणे खेळ हा कवीचा ।।३।।
शब्द पिंजरा नि भाव पक्षी ओळखी को रसिक
कवि मनाशीं 'स्व' भावांचे करी तो जुळवणूक ।।४।।
कवितेवरली टीका टिपणी मूल्यमापन त्याचे
खरी चेतना रसिक असूनी भाव जागवी मनाचे ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आत्मा-ईश्वर, या शब्दांचा, अर्थ होई आई |
त्या मायेचा, थांग न लागे, इतुकी गहराई ||१||
आईवाचुनी, नसे वेगळा, जगात परमेश्वर |
स्वर्ग आणि सूर्य-चंद्रही, त्यापुढती नश्वर ||२||
सोशी वेदना, झेली यातना, नसे तया गणती |
स्वतः जळुनी, प्रकाशणारी, ऐसी ती पणती ||३||
चिमणचोचिने भरवी बाळा, राही स्वतः उपाशी |
होईल याची, तुलना कैसी, सांगा बरे कुणाशी? ||४||
लिंबलोण ती, नित्य उतारी, निजबाळावरूनी |
कळी काळाला, यम् राजाला, लावी ती परतुनी ||५||
काळीज कातरणारा ऐसा, कारुण्याचा स्वर |
स्वरातुनी या, जणु हाकारी, आई रुपात ईश्वर ||६||
कमलकरांचा, करुनी पाळणा, जोजवी लडीवाळा |
तिला भासते, बाळ तिचा जणु, पंढरीचाच नीळा ||७||
उत्सव कां तो, एक दिनाचा, करे साजरा कुणी ?|
क्षण क्षण सारे, जरी वेचले, तरिही शक्ति उणी ||८ ||
जीवन अवघे जरी अर्पिले, आईच्या चरणाशी |
तरिहि पुर्तता, कधी न होई, ऐश्या आशिषराशी ||९ ||
© कवी : उपेंद्र चिंचोरे
८ मे २०१६
कविता-गझल
उपकार करुन त्याने मन माझे जिंकिले
परि वेळ गेला निघूनी आभार ना मानले
केली नाही परतफेड उपकाराची मी
कामाचे होते वेड सतत मग्न कामी
कामाच्या मार्गांत चालता पाऊल वाट
प्रयत्न करुन कार्यांत यश साधले अर्धवट
खंत वाटली मनां आठवोनी उपकार
पश्चाताप सांगु कुणा उशीर झाला फार
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti