March 20, 2016
एक होती म्हातारी, ती सर्वांना धारेवर धरी
उपास तापास नी सोवळ ओवळ
त्रस्त केल तीन घर सगळ
तिच्यापुढे चालेना कुणाच काही
कारण ती बाबांची होती आई.
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 24, 2019
अलवार छेडित छेडित आठवांना
August 28, 2021
चंद्रमाच तो पौर्णिमेचा
आभाळ ते चांदण्यांचे
झोंबता शीत धुंद वारा
हितगुज ते मनामनांचे...
आसमंत गंधाळलेला
नाचती मयुर भावनांचे
गुंतती अधर पाकळ्या
मधुस्पर्श, प्रीतभावनांचे...
श्वासातुनी श्वास गुंतता
नि:शब्दी गुंतणे प्रीतीचे
सारेच, तृप्तीचे हिंदोळे
शुभ्रचांदणे आत्मसुखाचे...
शांतले तन मन निरागस
पाझर निष्पाप लोचनांचे
मुक्त मोकळे, रिक्त सारे
हे बंध, या रम्य जीवनाचे...
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २३०
१०/९/२०२२
October 7, 2022
आकाशीं सुर्य तळपला तेजस्वी त्याची किरणें
तप्त करुनी जमिनीला वाळून टाकी जीवने ।।
नभीं मेघ आच्छादतां रोकती रविकिरणे
तुफान पर्जन्य पडतां महापूर त्याचा बने ।।
सुटतां भयंकर वारा निघून जाती ढग
प्रचंड वादळाचा मारा पर्जन्य कसे होईल मग ।।
वादळास अडविती पर्वत वलय त्याचे रोकूनी
सारे करिती मदत आनंदी करण्या धरणी ।।
एकाची शक्ती बनते दुसऱ्यास पुरक
निसर्गचक्र शोधते संतुलन त्यांत एक ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
November 5, 2018
ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे ।
उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे ।।
संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले ।
समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले ।।
खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे ।
बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ।।
विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो ।
यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ।।
संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी ।
प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ।।
वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची ।
आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ।।
एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी ।
शोधीत होतो 'आनंद' तेथे, मिळेल काहीतरी ।।
हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे ।
गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ।।
ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह ।
संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ।।
मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम ।
कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण ।।
आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला ।
देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ।।
हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही ।
‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 7, 2017
जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे... १
मग पाहून हातांकडे
कुलदेवतेला स्मरावे... २
अंथरुणातून उठताक्षणी
धरतीला नमावे... ३
ध्यानस्थ होऊ भगवंताला
आठवावे... ४
सर्व आन्हिके झाल्यावर
देवाचरणी बसावे... ५
काही न मागता
त्यालाच सर्व अर्पावे... ६
घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे... ७
येतो असा निरोप घेऊन
मगच घर सोडावे... ८
क्षणभर दाराबाहेर थांबून
वास्तूला स्मरावे... ९
समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे... १०
चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे..११
येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे... १२
जगात खूप भांडण तंटे
आपण शांत राहावे... १३
सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे... १४
जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे... १५
प्रत्येक क्षण हेच जीवन
हेच मनी ठसवावे... १६
सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे... १७
September 19, 2017
मी थोडा चाललो
तर पायानी बिल दिले लगेच
फुटाप्रमाणे दर लावून
आता मी हाताला
आधीच विचारतो
कविता लिहु का म्हणून ?
-- श्रीकांत पेटकर
कौशल
March 14, 2019
-- आकाश
June 8, 2010
बापू,
आजही तु दिलेल्या टोपीच्या,
झाकणाखालून सडलेल्या मेंदूतले,
नासके विचार वाहू लागतात ना
तव्हा मलं तुह्या अहिंसेतुन जन्मलेल्या
मुक्त स्वातंत्र्याची किंमत कळते....!!!
बापु,
तुलं ते एकदा न कदा मारू शकतात रे,
पण जव्हाबी तेह्यनं तुलं,
मारायचा प्रयत्न केला नं,
तव्हा तव्हा तु रक्तबीजासारखा
पुनर्जिवीत झालास...!!!
वांझुट्या विचारांच्या आडुन त्यांनी तुलं,
मारायचा खुप प्रयत्न केला,
टोप्यांना वेगवेगळे रंगही दिले,
तरी पण त्या जहाल विखारांतुन तु,
चकाकुनच निघालास....!!!
बापु
आजही तुह्या सत्य,अहिंसेच्या विचारावरच
हि पृथ्वी तगुन आहे....!!!
जव्हा तेह्यनं तुव्हा बापच काढला नं,
तव्हा तं मव्हबी डोकं भनकु लागलं,
पण तुह्याच विचारानं,
मह्या डोक्यातीलं आग शांत केली...!!!
बापु भलेही तेह्यनं तुही हत्या,
बंदुकिच्या गोळीनं केली असेल
पण तुह्या विचारांची हत्या,
ते कोणत्या बंदुकीनं करतीलं...?
बापु,
तेह्यनं धर्माची अफु लोकांना चारली,
तुह्या सत्याच्या प्रयोगावरही टिका केली,
तुव्ह लंगोट काढुन वस्त्रहरण करू पाह्यलं,
तुव्हा बापबी काढला अन विचारांचा,
विखारी सापबी तुह्यावरं सोडला,
तरी तु टस का मस झाला नाहीस,
भलेही तेह्यनं कपटानं तुह्या शरीरावर
गोळ्या झाडल्या असतीलं रे,
अन तुही “हे राम!” म्हणत,
धारातीर्थी पडला असशीलं...
पण तुह्या विचारांतला “राम”
ते कव्हाच मारू शकणार नाहीतं.....!!!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
August 5, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti