(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • आरसा

    कृष्ण कमळ-

  • ही माझी शाळा

    आहे ती लहान परि किर्ती महान,
    छोटे येऊन शिकले मोठे होऊन गेले ।।१।।

    आले घेऊन पाटी अ आ इ ई लिहिण्यासाठी,
    लिहून वाचून ज्ञानी बनले देशांत नांव कमविले ।।२।।

    शहर चालते, देश चालतो महान बनले लोकांमुळे
    बीजांचे वृक्ष झाले त्या केवळ शाळेमुळे ।।३।।

    कुणी बनला डॉक्टर काळजी घेई आरोग्याची,
    कुणी झाला इन्जिनियर देई बांधून सर्वा घर ।।४।।

    शिक्षक झाले कुणी केले सर्वा शहाणे,
    ज्ञान मार्ग अनेक शाळाच त्याचा पाया एक ।।५।।

    आईसम प्रेम करतो आपल्या शाळेवरी,
    जो कोण घडला ह्याची उकल शाळाच करी ।।६।।

    जन्म देते आई परी शाळा घडवी जीवन,
    कधीही न फिटे ह्या जन्मी तिचे ऋण ।।७।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • खरी शांतता

    वाटत होता शांत मला तो, बघुनी त्याच्या हालचालींना

    शिस्तबद्ध ते जीवन असूनी, हास्य उमलते त्याच्या मना....१,

    अल्प बोलणें अल्प चालणें, आहार तोहीं अल्पची घेणे

    प्रभू नाम ते मुखी असूनी, चिंतन त्याचे सतत करणे....२,

    संघर्षाला टाळीत होता, परिस्थितीशी जुळते घेवूनी

    वातावरण ते शांत ठेवण्या, प्रयत्न चाले लक्ष देवूनी...३,

    अहंकार तो सुप्त असूनी, राग न दाखवी चेहऱ्यावरी

    जगण्याचे ते प्रेम बघूनी, मोहाचे वेष्ठन दिसे शरिरी...४,

    दाबता साऱ्या षढरिपूंना, बेगडी शांतता बाह्य दिसे

    जिंकती त्यांनाच सहजपणे, खरी शांतता चित्तीं वसे...५

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • काव्य कलश

    ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा ।

    उपसतो जरी सतत, होत नसे निचरा ।।

    गोड पाणी शब्दांचे, ओठी अमृत वाटे ।

    पेला भरता काठोकाठ, काव्य हृदयी उमटे ।।

    पेला पेला जमवूनी, कलश भरून आला ।

    नाहून जाता त्यात, देह भान विसरला ।।

    सांडता पाणी वाहे, परसते चोहीकडे ।

    आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • जाणीव

    माझ्या कविता,माझ्या कथा
    माझ्या नसतात,त्या तिच्या असतात

    त्या जगाला,तिच्या असण्याची
    माझ्या आजूबाजूला, आणि माझ्या अस्तित्वातील जगण्यात
    तिच्या भूमिकेची जाणीव करून देत असतात...

    ©कवी - निलेश बामणे

  • मैनेचे मातृहृदय

    आम्रवनांतील शोभा बघत,
    भटकत होतो नदी किनारी,
    मैनेची ती ओरड ऐकूनी,
    नजर लागली फांदीवरती ।।१।।

    एक धामण हलके हलके ,
    घरट्याच्या त्या नजीक गेली,
    पिल्लावरती नजर तिची,
    जीभल्या चाटीत सरसावली ।।२।।

    मैनेच्या त्या मातृहृदयाला,
    पर्वा नव्हती स्वदेहाची,
    जगावयाचे जर पिल्लासाठी,
    भीती न उरी ती मृत्यूची ।।३।।

    युक्त्या आणि चपळाईने,
    तुटून पडली त्या मृत्यूवरी,
    रक्त बंबाळ केले शरीर,
    चोंच मारीत धामणीवरी ।।४।।

    हार मानून निघून गेली,
    जखमी होऊनी शरीराने,
    पिल्लामध्ये बसूनी मैना,
    शांत करीते हृदय स्पंदने ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • पुंडलिकाचे दैवत

    आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला,
    उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।।

    आईबाप हे दैवत ज्याचे,
    रुप पाही त्यांच्यात प्रभूचे ।
    सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला
    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।१।।

    निद्रेमध्यें असतां दोघे,
    मांडी देऊनी आपण जागे ।
    कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला,
    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।२।।

    वीट देऊनी विठ्ठलासाठीं,
    उभे केले त्या जगजेठी ।
    आपण गेला घेऊन त्यांना, स्नानाकरीता चंद्रभागेला,
    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।३।।

    आठ्ठाविस युगे गेली उलटूनी,
    कटीवरती हात ठेवूनी ।
    पांडूरंग बघे वाट तयांची, भक्तितच जे विसरती जगाला,
    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

  • आवळे-जावळे

    कवितेचे नाव – आवळे-जावळे ; कवयित्री – श्रीमती सुधा नांदेडकर

  • शारीरिक जखम बरी होते

    शारीरिक जखम बरी होते
    पण मनाचं दुखणं गहिर असतं
    भावना खेळणं सहज होतं
    पण मनाचं तुटण जिव्हारी घडतं..
    मनातल सगळंच बोलता आलं असत
    तर मोकळं आभाळ भरलं नसतं
    सगळंच जर हृदयातलं कळलं असतं
    तर मनालाही रडावं वाटलं नसतं..
    भावनेत ओलं हळवं होणं
    सहज अलवार होत असतं
    मनाच्या तारा छेडल्या हलकेच
    तर दुःख सहज मोकळं होतं..
    कुणी खूप छान कुणी दुःखी
    कुणी मस्त कुणी कष्टी
    हेच तर आयुष्यात माणसांचं
    राहणं मग कळतं असतं..
    वेदना देतात मनाला शब्द
    तरी शब्दांचं बोलणं चालू असत
    कवितेच्या प्रेमात भावना रडल्या
    काव्य शब्दांनी अलवार रडवून नेलं..
    मनाच्या तळात साचलं निर्माल्य
    कोणी भावना त्यात मोडून गेलं
    माणसांना माणसं नकोशी आता
    हेच सगळीकडे अंतिम सत्य दिसतं..
    प्राजक्त मोहरते अलवार पहाटे
    चाफ्याला तिचा न गंध कळतो
    नाजूक तिच्या अंतरीचा गंध
    मनात हलकेच मिटून जातो..

    -- स्वाती ठोंबरे.

  • माझ्या कविता

    माझ्या कविता वाचून
    माझ्या प्रेमात पडू नकोस
    विचार मला त्या कवितेतील
    प्रत्येक ओळींचा अर्थ...
    माझ्या कवितेची प्रत्येक ओळ
    आहे एक प्रेम मंत्र
    जीवनातील एक रहस्य
    न सुटलेल्या साऱ्या
    कोड्यांचं उत्तर...
    प्रेमात पडणं सोप्प असत
    पण जगण अवघड
    ते अवघड सोप्प कस करायचं
    ते सांगते ती माझी कविता...
    म्हणून माझ्या कविता वाचून
    माझ्या प्रेमात पडू नकोस
    माझ्या प्रेमात पडून
    मग माझ्या कविता वाच
    तुझेच जगणे सोप्पे होईल...

    कवी - निलेश बामणे ( बी डी एन)