शब्दांविना संवादू,
असंभव"" तो वाटतो,
किमया त्यांची न्यारी",
अर्थ मर्म दाखवतो,
शब्दांवाचून किती भाषा,
मानव नेमका वापरतो,
परंतु त्यांच्यासम हा ,
म्हणत म्हणत कसा,
वर्चस्व त्यांचे मानतो,--
स्पर्श बोले कधीकधी,
मात्र शब्दांसारखा,
तान्हुल्यांची खास सोय,
जाणे बाळ ममता, माय--!!!
, हाच स्पर्श जादू करे,
प्रेमभावना व्यक्त करे,--!!
आबालवृद्धां आधार वाटे ,
इतुका बोलका अगदी भासे,--
खाणा-खुणा करत लोक,
बोलती काही एकमेकांशी,
मूक सांकेतिक भाषा जणू,
मदत करे सार्थ अशी,--!!
चित्रलिपी केव्हातरी,
आंतरिक संवाद साधे,
मार्मिक प्रसंग रेखाटुनी,
हृदयांशी हृदये जुळवे,
कित्येक कलाही बोलती,
आत्मिक संवाद साधती,
खूण पटे आत्म्याला आत्मी, यथोचित अबोल भाषा साची,
नयनांची भाषा आगळी,
फक्त डोळ्यांमधुनी बोले,
कधी अनेक शब्द हारती,
असे भाव प्रदर्शित करे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
प्रदीप निफाडकरांची गझल
एका हिंदी कवितेचा मुक्त अनुवाद
चादर कायेवर लपेटून,धुक्याची,
पायवाटेची सैर करावी,
थेंब स्पर्शती पायांना अनवाणी,
जाणीवही ती सुखावह किती,--!!
निळे-गहिरे स्वैर तरंग,
हृदयाला जेव्हा छेदती,
असेच आपुले गुपित एखादे,
ते कसे उलगडती,--!
केसांच्या बटांना स्पर्शून,
झुळूक जाते एखादी,
आपल्या प्रेमाची जाणीव,
देऊन जाते ना कधी,--!!!
दूरवर उभ्या झाडांवर,
पक्षी कूजन करिती,
हृदयाला ताजेतवाने,
करुन सोडती अगदी,
शिवाय मोसम हा असा,
थंडी त्यात गुलाबी,
यात काळीज हरवून,
प्रेमपूजा करतो तसा,--!!!!
( गुलजार)
हिमगौरी कर्वे©
दिन दिन दिवाळी...
गायी म्हशी ओवाळी...
वसु बारसला ।।१।।
दिन दिन दिवाळी...
आरोग्य सांभाळी...
धन त्रयोदशीला ।।२।।
दिन दिन दिवाळी...
दुःखाला पिटाळी...
नरक चतुर्दशीला ।।३।।
दिन दिन दिवाळी...
लक्ष्मीला सांभाळी...
अश्विन अमावस्येला ।।४।।
दिन दिन दिवाळी...
नववर्षाची नवाळी...
बळी प्रतिपदेला ।।५।।
दिन दिन दिवाळी...
भावाला ओवाळी...
यम द्वितियेला (भाऊबीज) ।।६।।
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
कवि होणें सुलभ असावे रसिक होण्यापरि
जिवंत ठेविती कवितेला हीच मंडळी खरी
भावनेचे उठतां वादळ व्यक्त होई शब्दानीं
भाव शब्दांचा हार दिसतो काव्य ते बनूनी
भाव येणे सहज गुण तो मानवी मनाचा
परि बंदिस्त त्याला करणे खेळ हा कवीचा
शब्द पिंजरा नि भाव पक्षी ओळखी को रसिक
कवि मनाशीं 'स्व' भावांचे करी जुळवणूक
कविते वरली टीका टिपणी मूल्यमापन त्याचे
खरी चेतना रसिक असूनी भाव जागवी मनाचे
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
गर्जा मद्यराष्ट्र माझा….(विडंबन)
चंद्र तू पौर्णिमेचा
काळोख मी आमवस्येचा ...
तुझे सौंदर्य कलेकलेने वाढत जाते
पौर्णिमेला ते पूर्ण होते...
माझ्या हृदया व्यापून टाकते
आणि पुन्हा कलेकलेने कमी होते...
आमवस्येला सौंदर्य तुझे
शेवटी कुरूप होते...
तेव्हाच खऱ्या अर्थाने
आपले मिलन होते...
©कवी - निलेश बामणे
नदी वाहे झुळझुळ झुळ,
पाणी तिचे थंडगार.
कचरा टाकू नका कुणी,
नदी रडते वारंवार.
नदी देते पाणी गोड,
झाडे, शेती, फुले फुलती.
नदी जर झाली स्वच्छ सुंदर,
पक्षी आनंदाने गाती.
चला मिळून वचन देऊ,
नदी नेहमी स्वच्छ ठेवू.
नदी हसली, आपण हसू,
आनंदी भारत घडवू.
पावसाचे थेंब पडती,
नदी आनंदाने हसते.
स्वच्छ नदी, सुंदर धरती,
सारे मिळून तिला जपू.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
भाकरीच्या पाठीवर ठसे दिसती हातांचे
जातां तव्यावर भाजूनी निशाण राहते कष्टांचे
एका भाकरीच्या पाठीं हात कितीक गुंतले
कण कण देती ग्वाही मन भरुनी कसे आले
उन्हां पावसात फिरे शेतामधीं शेतकरी
टप् टप् घाम गाळी उभी करितो जवारी
पोती पोती उचलूनी वाहून नेई मजूर
दमछाक होऊनी ही मिळत नाहीं पोटभर
ओवी म्हणत मुखानें आई थापिते भाकरी
साऱ्यांच्या कष्टामध्यें तिच्या मायेची भागीदारी
धरणीच्या पोटातून जीवन रस येई वर
दुजासाठी जगा तुम्ही बघा सांगते भाकर
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti