(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ०९ जुलै (मी आणि माझ्या कविता)

    “ती बेफामपणे पुढे जात होती तो फरफटत होता…. त्याला फरफट असह्य होत होती… शेवटी तो शांत झाला झोपला तो झोपलाच”

  • दुर्बल मन नको

    सारेच आहेत दुबळे कुणाते नसे शक्ति

    वेळ येतां दुर्बल ठरे जे सबळ समजती ।।१।।

    विचार मनी येतां दुसरा शक्तिशाली

    समजोनी जावे तेव्हां हार तुमची झाली ।।२।।

    मनाची सबलता हेच शक्तीचे मापन

    काय कामाचा देह दुर्बल असतां मन ।।३।।

    सुदृढ देह व मन यांची मिळून जोडी

    जीवनातील यश तुमच्या पदरीं पाडी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • तन मनातील तफावत

    देह मनातील, तफावत दिसून येते ।

    चंचल असूनी मन सदैव, शरीर परि बदलत राहते...१,

    चैतन्ययुक्त मन सदा, स्थिर न राहते केव्हांही ।

    जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,

    परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो ।

    शरीराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो...३,

    दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही ।

    परि शरीराचा अशक्तपणा, मनास त्याक्षणी साथ न देई....४

    विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे ।

    विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • माणसांची अलोट गर्दी

    माणसांची अलोट गर्दी
    अनोळख्या ओळखी,
    आयुष्याच्या पटावरी
    भेटतील माणसं वेगवेगळी..
    कोण कुठे कसा राहतो
    दूर दूर असतील घरटी,
    बंध जुळतात जेव्हा
    ओळख होईल तेव्हा थोडी..
    कुठे जास्त कुठे कमी
    माणसं आयुष्यात येती,
    नियतीचे सूत्र सारे अनामिक
    कुणी जवळ कुणी दूर जाती..
    आयुष्याच्या पटावरी
    जमा खर्च आलेख होई,
    प्रारब्ध न चुके कुणाला
    कोण कधी जीवनात येई..
    जीवन हा खुला रंगमंच
    माणसांची अनोखी गर्दी,
    मुखवटे हजार भवती सारे
    जवळ असतील थोडे काही ..
    आयुष्य एक गणित सारे
    कुठे कशी ओळख होई,
    असतील ऋणानुबंध कुठले
    तर कोण आयुष्य व्यापून जाई..
    ओळख अशीच अवचित होते
    कोण भेटे कुठल्या टप्यावरी,
    पुसून जातील ओळखी जरी
    परी आठवणी हृदयात साठती..

    -- स्वाती ठोंबरे.

  • हे वेडे प्रेम पाखरू (काव्य)

    प्रेमात पडते
    हे वेडे प्रेम पाखरू
    तुझ्यावर ही प्रीत जडते
    //१//

    धुंदीत जगते
    मन गुंतले स्वप्नात
    स्वप्नी नभात ते विहरते
    //२//

    बागेत बागडे
    फुलावर विसावले
    फुलपाखरू स्वच्छंदी गडे//३//

    मकरंद घेण्या
    मन आज आतुरले
    फुलाफुलातुनी हुंदडण्या
    //४//

    हुंदडले अती
    हाती भरल्या ओंजळी
    मधुओंजळ करना रिती
    //५//

    प्राशी मधुरस
    हे प्रेम पाखरू खुश
    प्रित-अंगणी लागे चुरस//६//

    -- सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

  • हिशोब

    एक दुखरी नस
    प्रत्येकाला दिलीय देवाने
    नको उतू मातू इतका
    लपेटून अहंकाराने
    आपल्या पोटापुरते
    कमव कि स्वाभिमानाने
    ओरबाडतोस कशाला
    दुसऱ्याचे सुख दोन्ही हाताने
    कितीसे लागते जगण्या
    चूल पेटतेच कष्टाने
    भाकरी पायी उगा कशाला
    भरतो घड्यावर घडे पापाने
    हिशोब नोंदला जातोच
    यावर विश्वास ठेव मनाने
    उडवू नको वाचेची धूळ
    सोडव प्रश्न मौनाने!!
    -- वर्षा कदम.
  • आजची आई

    संस्कार, संस्कार कधी करू बाई
    दिवस नि रात्र, आम्हां रोजचीच घाई
    सकाळ संध्याकाळ चाले काट्यावर बाई
    मनातली ममता कोंडून घेते आई
    घरी सोडून जाताना, जीव तुटतोच गं बाई
    कामावर असतो फक्त देह, मन कधीच घरट्यात उडून जाई
    छोट्याशा पिलापाशी हळूच गिरकी घेऊन येई
    कातरवेळी परतीची वाट खूप दूरची होई
    पिलाच्या आठवणीत जीव कासावीस होई
    घरी येऊन मांडू वाटे, पिलासोबत खेळी
    नाही खेळू शकत बाळा, पुन्हा स्वयंपाकाची घाई
    सरत्या दिवशी घ्यावे कुशीत नि गावी एखादी अंगाई
    सांगावी निवांत गोष्ट, बनून आईचीही आई
    तरी नाही सवड बाळा, काय करेल ही आई
    मोठा होशील तू कधी, तेव्हा कळेल तूला आईतली जिजाई
    -- वर्षा कदम.
  • प्रेम म्हणजे…..

    प्रेम म्हणजे चांगूलपणा कळणं असतं
    प्रेम म्हणजे सुखी स्व—जिवाला उगीचंच छळणं असतं !

    प्रेम म्हणजे तिने हाय म्हणताच कळवळणं असतं
    प्रेम म्हणजे तिने बाय म्हणताच तळमळणं असतं !

    प्रेम म्हणजे उगीचंच तिच्यामागे पळणं असतं
    प्रेम म्हणजे बोलायच्या वेळीच बोबडी वळणं असतं !

    प्रेम म्हणजे खिसा रिकामा होईस्तोवर पिळणं असतं
    प्रेम म्हणजे अापण मित्रंच अाहोत हा मूग गिळणं असतं !

    प्रेम म्हणजे अापल्या भावना अंतापर्यंत पाळणं असतं
    प्रेम म्हणजे स्मितातून नेमका विशाद गाळणं असतं !

    प्रेम म्हणजे अावडतीला परकी , पण सुखी पहाणं असतं
    प्रेम म्हणजे मिळालेल्या माणसाची अावड जपणं असतं !

    प्रेम म्हणजे मधुबालाचं निर्व्याज हसणं असतं
    अाणि.....
    प्रेम म्हणजे बायकोच अापली मधुबाला हे असणं असतं !

    कवी : उदय गंगाधर सप्रेम
    ठाणे

    WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेली कविता साभार प्रकाशित

  • प्रश्न पडतात अनेक काही

    प्रश्न पडतात अनेक काही
    त्याची उकल होतं नाही,
    भाव साठतात हृदयात
    त्याची उत्तरं मिळतं नाही..
    सूर ताल लय चुकतात पण
    शब्दांची मात्रा चुकतं नाही,
    अर्थही बदलतात सारे कधी
    पण भावनांची व्यथा कळतं नाही..
    कवी कल्पनेत रंगवतो सदा
    दुनिया खरी आणि खोटी,
    शब्दही कवीचे मिटतात मग
    स्वार्थाची दुनिया पाहून खरी..
    भाव विश्व सारे उभारतो
    कवी काव्यांतून नेहमी,
    शब्द असतात सोबती सारे
    म्हणूनच जन्मतो कवी हजारातुनी..
    प्रश्नांना प्रश्न पडावे असे
    प्रसंग येतात आयुष्यात कधी,
    उत्तर न शोधावे तेव्हा कुठले
    भाव शोधावा अंतर मनातुनी..
    मोरपीसी रंग न्यारा असा
    आयुष्यात माणस भेटावी अशी,
    पिसासारखे मन हलके करावे
    प्रश्न न पडतील कुठले तेव्हा कधी..

    -- स्वाती ठोंबरे.

  • चौदहवी का चांद’ या चित्रपटाची ६२ वर्षे

    हिंदी चित्रपटसृष्टीतील क्लासिक चित्रपटात या चित्रपटाचा समावेश होतो. मोहम्मद सादिक दिग्दर्शित या चित्रपटात गुरुदत्त आणि वहिदा रहेमान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.