(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पैलतीर

    आला आला आला आला
    आला पैलतीर ।
    चला चला चला आता
    गावु हरिनाम आले हरिद्वार ।। धृ ।।
    त्रिभुवनी केवळ एक सत्य
    एकची हरिनाम ।
    मनुजा मोहमाया मृगजळ सारे
    येथे नाही कुठे राम ।
    जीव हा चालता, बोलता
    झणी जाईल सोडुनी दूरदूर ।। १ ।।
    जीवनी सारे सुख दुणावे,
    दुःख ते उणावे ।
    जगता जगता सकला जगवुनी
    नित्य रामनाम घ्यावे ।
    नाम भजता भजता हरिनाम
    अंती भेटावा कृपाळू हरिहर ।। धृ ।।
    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)
    9766544908
    रचना क्र. ७७.
    ११ - ३ - २०२२.
  • वातावरण

    विचारांची उठूनी वादळे
    अशांत होते चित्त सदा
    आवर घालण्या चंचल मना
    अपयशी झालो अनेकदां

    विष्णतेच्या स्थितीमध्यें
    नदीकांठच्या किनारीं गेलो
    वटवृक्षाच्या छायेखालच्या
    चौरस आसनावरी बसलो

    डोळे मिटूनी शांत बसतां
    अवचित घटना ती घडली
    विचारांतले दुःख जावूनी
    आनंदी भावना येऊं लागली

    एक साधूजन ध्यान लावीत
    बसत होता त्या आसनावरी
    पवित्र्याची वलये फिरती
    आसन दिसले रिकामें जरी

    वातावरणाची ही किमया
    अनुभवते ती प्रखरतेनें
    शुद्ध अशुद्ध ते विचार येती
    सभोवतालच्या जाणिवेने

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail - bknagapurkar@gmail.com

  • वेळेचे मूल्य

    मूल्य नाही कुणा,
    तूं दिल्या वेळेचे,
    गमावून टाकी,
    जाणूनी फुकाचे ।।१।।

    लागत नसते,
    दाम वेळेसाठीं,
    म्हणून दवडे,
    अकारणा पोटीं ।।२।।

    वस्तूचे मूल्य ते,
    पैशांनीच ठरते,
    परी वेळेची किंमत,
    कुणा न समजते ।।३।।

    वेडे आहोत सारे,
    कसे होई मूल्य
    वेळ जातां मग,
    आयुष्य जाईल ।।४।।

    आयुष्य खर्चणे,
    हेच वेळेचे मुल्य ठरते,
    जीवनांतील यश,
    त्यावरुन कळते ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • तुला लाभलेली निसर्ग देणगी

    खळी पडून गालावरी सुंदर तूं दिसते

    आनंदाचे भाव दर्शनी मधूर तूं हांसते

    इवले इवले ओठ फूलपाकळ्यांपरि

    लांब लांब केस काळे भुर भुर उडती मानेवरी

    मोत्यासारखे दांत भासे कुंदकळ्या

    बदामाचा आकार मिळे तुझ्या डोळ्या

    इंद्रधनुष्याचा बाक दिसे भुवयाला

    चाफेकळीची शोभा मिळाली नाकाला

    चमकते अंगकांती फाटलेल्या झग्यातूनी

    दिसते निसर्गाची देणगी तुझ्या गरीबीतूनी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    Bknagapurkar”Gmail.com

  • रंग पहा नभांगणात

    रंग पहा नभांगणात,रोज कसे जमतात,
    एकत्र येऊन फिरतात,
    पंचमी साजरी करतात,--!!

    निळेशार राखाडी पांढरे,
    मेघांची लगीनघाई,
    इकडून तिकडे जाती कुठे ? बघणाऱ्यांना ठाऊक नाही,--!!!

    प्रभात काळी एकेक रंग,
    उषा क्षितिजावर उधळते,
    पिवळे निळे काळे तांबडे,
    त्यात सोनसळी भर असे,--!!!

    कुठून येई,लख्ख प्रकाश ,
    खजिनाच वर वर येई,
    ढगांआडून प्रकाशदाता,
    सगळ्यांना आपुले दर्शन देई,--!!!

    सकाळ होता राज्य त्याचे,
    सम्राटाची सारी जादू ,
    रंग पिवळसर सोनेरी,
    लागतो पसारा मांडू,--!!!

    श्यामल संध्या गगनी येतां,
    पुन्हा रंगांचीच लीला,
    तांबडे निळे राखाडी सोनेरी,
    क्षितिजावर पखरण होतां,--!!!

    वसुंधरेवर तम टाकते,
    आपले पहिले पाऊल,
    जसा सूर्या घरी निघतो,
    होता तांबूस संधिकाल,--!!!

    काळा रंग आता पसरे,
    महत्त्व त्याचे येता रजनी,
    नभी दुधी चांदणे,उगवता,
    काळ्या ढगांस कडा रुपेरी,--!!!

    हिमगौरी कर्वे ©

  • करून बघ !

    फुलेल नातं तुझं माझं
    करून बघ एक उपाय
    नको विचारुस पुन्हा पुन्हा
    खरं काय? खोटं काय?------!!

    तोलू नकोस ताजव्यात
    आल्या गेल्या क्षणांना
    काठावरच बसून रहा
    सोडून फक्त पाण्यात पाय
    नको विचारुस पुन्हा पुन्हा
    खरं काय? खोटं काय?------!!१

    माझ्या मनात तूच आहेस
    चाचपडणं सोडून दे
    खदखदतंय मनात जे
    अलगद त्यावर धरेल साय
    नको विचारुस पुन्हा पुन्हा
    खरं काय? खोटं काय?------!!२

    मोजु नकोस वळणं वेडी
    घालु नकोस अवघड कोडी
    वळून बघ तुझ्यामागे
    पाऊल माझं पडत जाय
    नको विचारुस पुन्हा पुन्हा
    खरं काय? खोटं काय?------!!३

    ………. मी मानसी

  • पाऊस

    पाऊस असा हा पडताना
    वर्षाव, आठवांचा होतो
    बरसणाऱ्या सरिसरितूनी
    तू बिलगल्याचा भास होतो
    स्मरते, अजुनही ती पिंपर्णी
    अंतरी मी चिंब भिजुनी जातो
    पाऊस असा हा पडताना
    तुझा, गंध बकुळी दरवळतो
    रिमझिमता भावनांच्या स्मृती
    अंतरास, आजही मोहर येतो
    पाऊस असा हा पडताना
    तुझ्याच, आठवात मी दंगतो
    पाऊस,असा हा पडताना
    गड़गडाट, गतस्मृतींचा होतो
    मनभावनांची, ओढ़ अनावर
    जीव, व्याकुळ होवूनी जातो
    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)
    9766544908
    रचना क्र.१२६.
    २९ - ४ - २०२२.
  • माझा मीच गुरू

    मीच माझा गुरू, जे मनी ठरवू
    विचारांती तेच करू ....।।धृ।।

    सल्ला घेईन सर्वांचा, वाटे मज किंमतीचा
    मनाची कदर करूं...१

    मीच माझा गुरु
    निर्णय असे अनेक, सारेच असती ठिक
    निवड एकाची करूं...२

    मीच माझा गुरु,
    इतरांना जे वाटते, माझ्या सोईचे नसते
    सोईचा आग्रह धरूं...३

    मीच माझा गुरू
    शेवटीं माझ्या करिता, गोष्टीची उपयोगिता
    स्वतःसाठीं योग्य करू...४

    मीच माझा गुरू
    ईश्वर वसतो मनीं, इच्छा त्याची समजोनी
    आदर त्याचाच करूं...५

    मीच माझा गुरू

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • अणूतील ईश्वर

    पदार्थाचे गुण जाणता, एक गोष्ट दिसून येते,

    सूक्ष्म भाग अणू असूनी, त्यांत सुप्त शक्ती असते...१,

    या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही,

    अधिक उणे नी सम, विद्युतमय प्रवाही....२,

    हेच तत्त्व निसर्गाचे , तीन गुणांनी बनले,

    उत्पत्ती लय स्थिती, यांनी सर्वत्र व्यापिले...३,

    ब्रह्मा विष्णू महेश, प्रतिकात्मक ही रुपे

    अणूरेणूच्या भागांत, समावताती स्वरूपे...४,

    याच विद्युत शक्तीला, चेतना म्हणती कुणी,

    अणूरेणूत लपलेली, ईश्वरमय गुणांनी...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • कन्या रत्न हे जन्मता

    कन्या रत्न हे जन्मता
    सदा असावे स्वागता
    जाईची रे भासे कळी
    ह्या अंगणामध्ये ती रांगता
    का खुडता रे सुगंधी कळी
    तीचं नशिब असे तीच्या भाळी
    का रक्ताने हात माखता
    घेऊन तो निष्पाप बळी
    आई म्हणजे ईश्वर असे
    मुलीमध्ये तो का न दिसे
    भावी जगाची तीच आई
    उमटते सोनपावलांचे ठसे
    शिवा जन्मला जिजा पोटी
    सावित्री झाली क्रांती ज्योती
    अन्यायाचा करण्यास अंत
    राणीच्या हाती तलवार होती
    येऊ द्या तीला ह्या जगती
    वंशाची समजा पणती
    पाहू द्या हे जग तीला ही
    आनंदाच्या क्षणासंगती
    आकाशी ती घेईल भरारी
    घेईल जिंकून दुनिया सारी
    फक्त एकदा जन्म घेऊ द्या
    करील जादू ती सोनपरी

    कवी - महेश सुखदेव पुंड
    तामसवाडी,ता - नेवासा, जि - अहमदनगर
    मो.नं - 8459043090