सासुरवाशिण
दोघे एका डहाळीवरच झुलू,
निसर्गाचे ,देणे किती पाहू,
बघ, रसरशीत खाली फळे,
दोघे मिळून चवीने खाऊ,--!!!
पक्ष्यांची जात आपुली,
निसर्गमेवा"आपुल्याचसाठी,
मानव त्याचा बाजार मांडे,
निसर्गराजा, फिरवी कांडी,
एका वृक्षा,-- किती फळे,
रसाळ,गोड,चविष्ट मधुर,
तुझ्यासमवेत स्वाद वाढे,
फळ बने आणखी रुचिर,
प्रेमसंगत वाढून आपुली,
एकमेकांचे उष्टे' खाऊ,--!!
त्यागातच प्रेम असते,
सखे, दुनियेस दाखवून देऊ,--!!
दोन "सांसारिक" जीव आपुले,
करती मधुर रसपाना,--!!!
निसर्गच लुटून देतो सारे,
शिकवतोही साऱ्या जगतां,--!!!
संसार या कैरीसारखा,--
कच्चा असता चटकदार,
चाखण्यां मिळती सर्व चवी,
आंबट, तुरट, गोडसर फार,--!!
नवीन संसार सुरु होतां,
फळां, जपावे लागते,
करतां-करतां,फळ मग,
कशी संपन्नता आणते,--!!!
हिरवाकंच रंग संपे,
जो असतो तारुण्याचा,
पिवळसर कांतिमान रंग चढे,
पिकल्यावर तो प्रौढत्त्वाचा,--!!!
आंबट, तुरट फळ,
हळूहळू, होई जसे गोड,
तसेच साथीदार होती कृतार्थ,
संसारी मिळतां योग्य जोड,--!!!
फळ संपे दुसऱ्यासाठी,
बघ त्याचे समर्पण,
सूचित होई त्यातून प्रिये,
संसाराचेच उदाहरण,--!!!
हिमगौरी कर्वे.©
“तुझ्या गळा
माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा'
“ताई, आणखि कोणाला ?'
“चल रे दादा चहाटळा ! ॥१॥
“तुज कंठी
मजअंगठी !
“आणखि गोऽफ कोणाला?"
“वेड लागले दादाला !'
“मला कुणाचे ? ताईला !' ॥२॥
“तुज पगडी
मज चिरडी !
“आणखि शेला कोणाला ?'
“दादा, सांगूं बाबाला ?'
“सांग तिकडल्या स्वारीला !' ॥1३॥
खुसू खुसू
गालि हंसू -
वरवर अपुले रुसू रुसू !'
“चल निघ, येथे नको बसू
“घर तर माझे तसू तसू ॥४॥
कशी कशी
आज अशी
गंमत ताईची खाशी !'
“अता गट्टी फू दादाशी'
“तर मग गट्टी कोणाशीं?' ॥ ५॥
ती पण तशीच
तो पण तसाच..
दोघेही विकृतच
म्हणावे लागतील...
त्याने समाजाची,
पैसा मिळावा म्हणून
वाट लावली तर तिने
स्वतःच्या भुकेसाठी...
दोघांच्या भुका घातकच
आज दोघांचे चेहरे
त्यांच्या विकृतीमुळे
संध्याकाळी विझू पाहत आहेत
अजूनही लंगडत लंगडत
तो त्याची विकृती सांभाळून आहे...
त्याला माहित आहे..
आपला शेवट जवळ आहे..
तरी पण विकृतीला चिकटून आहे
त्याची सत्तेची हाव..पैशाची हाव
तशीच आहे...
हे पण स्वतःवरचेच
प्रेम आहे पण विकृतच
असे अनेक तो आणि ती
आपल्याला आपल्याच
आजू-बाजूला
दिसतात तेव्हा जाणवते...
कालाय तस्मे नमः.....
-- सतीश चाफेकर.
आहे ती लहान परि किर्ती महान,
छोटे येऊन शिकले मोठे होऊन गेले ।।१।।
आले घेऊन पाटी अ आ इ ई लिहिण्यासाठी,
लिहून वाचून ज्ञानी बनले देशांत नांव कमविले ।।२।।
शहर चालते, देश चालतो महान बनले लोकांमुळे ।।३।।
बीजांचे वृक्ष झाले त्या केवळ शाळेमुळे ।।४।।
कुणी बनला डॉक्टर काळजी घेई आरोग्याची,
कुणी झाला इन्जिनियर देई बांधून सर्वा घर ।।५।।
शिक्षक झाले कुणी केले सर्वा शहाणे,
ज्ञान मार्ग अनेक शाळाच त्याचा पाया एक ।।६।।
आईसम प्रेम करतो आपल्या शाळेवरी,
जो कोण घडला ह्याची उकल शाळाच करी ।।७।।
जन्म देते आई परी शाळा घडवी जीवन,
कधीही न फिटे ह्या जन्मी तिचे ऋण ।।८।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
सोळा वर्षांचा ज्ञानोबा
महाकवी झाला,
गीतेंवरी टिपणी लिहून
मुकुटमनी ठरला ।।१।।
गजाननाचा आशीर्वाद
लाभला त्याला,
ज्ञानेश्वरीचा प्रवाह
हातून वाहूं लागला ।।२।।
अष्टावक्र दिसे विचित्र
परि महागीता रचली,
अकरा वर्षाच्या मुलानें
मान उंचावली ।।३।।
विटी दांडू खेळत असतां
काव्य करुं लागला,
शारदा होती जिव्हेवरती
ज्ञान सांगू लागला ।।४।।
निसर्गाची रीत न्यारी
चमत्कार तो करीतो,
भव्य दिव्यता दाखवूनी
अस्तित्वाचा प्रत्यय देतो ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
तू प्राजक्ती सुंदरा
मधुगंधा मनमोहिनी..
तू सुवर्णकांती
कोमलांगी कमलिनी..।।
तू दवबिंदू सुपर्णी
अंतरी ओघळणारी
नाजूका चंदनगंधी
मनांतरी गंधाळणारी..।।
तू गुलमुशी बिंब कोवळे
हृदयांतरा दीपविणारे
तू भावनांचे इंद्रधनू
आसमंता कवटाळणारे..।।
तू मस्त पवन गंधधुंदला
अलवार जातेस स्पर्शूनी
प्रीत ! शीतल शिडकावा
तृप्त सुखदानंद जीवनी..।।
केतकीच्या बनात प्रीती
स्वर्गानंदी मंतरलेली
अनावर अधीर लोचने
तव रूपात हरविलेली.।।
मूक मुग्ध अबोल अधरे
अंतरी प्रीतभाव पाझरलेले
क्षणक्षण तृषार्थ सारे
तव प्रीतीत नित्य गुंतलेले..।।
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)*
9766544908
रचना क्र. ३६
दिनांक:- ९ - ३ - २०२१*
देख मेरे संसारकी हालत
क्या हो गयी भगवान
मेरेही घरमें मै मेहेमान,
सूरज न बदला, चॉद ना बदला,
ना बदला रे आसमान
देखो वो कैसी है अकडती,
बात बात पर मुझसे झगडती,
देरसे आऊॅ दफ्तरसे तो
देती ना वो ध्यान, बिबिकी.....
मांसे तू-तू-मै-मै करती
उसका बदला मुझसे लेती,
रातरातभर पीठ दिखाकर
करती वो हैरान, बिबिकी......
योगा-पार्लर, जीम भी जाती,
पर कमरका कमरा रोक न पाती,
हे दाता अब तू भी
कुछ ऐसी करदे करनी,
बदलके मेरे बिबिको भेजो
शीला या मुन्नी
भेजो शीला या मुन्नी
-- सौ. अलका वढावकर
जिथे नदी किनारी शंख-शिंपले शोधले
वाळूत खेळताना किती किल्ले बांधले // धृ //
त्या दिवसांची आठवण येता, तुला ना विसरावे
स्पर्श होता तुझ्या बोटांचा, पुन्हा सर्व आठवावे
परंतु हा भास आता, स्वप्न वाटे चांगले //१//
ते थोडेसे दिवस सुखांचे, भुर्रकन उडुन गेले
जीवनात सात रंगांचे - इंद्रधनुष्य बनवुन गेले
दिवस - रात्र, पुनर्भेटीचे वेध लागून राहीले //२//
दिवस गेले, ऋतू बदलले- प्रेम पुन्हा न झाले
तू सांगितलेल्या मार्गावरुन, जीवन निरंतर चाले
एक दिवस आहे मिलनाचा, हे हृदयी मी जाणले //३//
श्री. सुनील देसाई
२०/०६/२०२२
Copyright © 2025 | Marathisrushti