(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • दुष्काळ खालपासून वरपर्यंत पसरलेला !

    आमच्या गुणवत्तेवर नव्हे, तर आमच्या जातीचा गौरव करण्यासाठी आम्हाला मंत्रिपद मिळाले, यात धन्यता मानणारे मंत्री या देशात असतील, तर सगळ्याच प्रकारच्या दुष्काळांचा आपल्याला सामना करावा लागेल. ज्या दिवशी या देशाचे सरकार, या देशाची प्रशासकीय व्यवस्था सांभाळणारे लोक आणि या देशातील लोकप्रतिनिधी केवळ गुणवत्तेवर, नैतिक आचरणावर निवडले जातील त्याच दिवशी या देशाचा दुष्काळ खंडीत होईल!

  • नॅक’चे शिवधनुष्य

    जाहिरातीच्या युगात प्रमाणीकरण आवश्यक आहे. महाविद्यालयांनाही त्यामुळे संजीवनीच मिळणार आहे, पण त्यासाठी नॅककडे विधायक दृष्टिकोनातून बघायला हवे. नॅक ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, हे मान्य करावे लागेल, अन्यथा सारी शैक्षणिक प्रक्रिया गोंधळाची होऊन जाईल.

  • अमेरीकेची गुलामी कुठपर्यंत?

    मुंबई हल्ल्याची भारतात तीप प्रतिक्रिया उमटल्यावर कदाचित जनतेच्या दबावाखाली येऊन भारत सरकार या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून पाकवर लष्करी कारवाई करण्याची साधी शंका येताच अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव कोंडोलिसा राईस तत्काळ भारतात दाखल झाल्या. त्यांनी भारताला काय प्रबोधन केले हे कळू शकले नसले तरी त्यानंतर भारताची पाकला कडक शब्दात इशारा देण्यापलीकडे मजल गेली नाही.

    मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचे कवित्व अद्यापही सुरूच आहे.

  • संपूर्ण राज्य नक्षलवादी होण्याच्या मार्गावर

    प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईचा समाचार घेणाऱ्या मागील ‘प्रहार’ला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. खूप एसएमएस आले, बऱ्याच लोकांनी प्रत्यक्ष फोनवर अभिनंदन केले. काही फोन तर जिथे देशोन्नतीचे अंक पोहचत नाहीत, अशा भागातून आले.

  • जसे कराल तसे भराल

    ‘जसे कराल तसे भराल ’ हा कर्माचा अटळ सिद्धांत आहे परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव असा की जो माणूस न्याय-नीती-धर्माने वागत असतो, त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात. उलट अधर्म अनीतीने वागणारे, काळाबाजार आणि तस्करी करणारे, जीवनात मौज-मजा करत असतात. गाडी, बंगला इत्यादी सर्व तऱ्हेच्या सुखसोयी यांची त्यांच्या जीवनात रेलचेल असते.

  • नवे वर्ष,नवी परीक्षा

    सुधारक'कार आगरकरांचे 'शिष्य’ 'तुतारी'कार केशवसुत आपल्या ‘तुतारी’या कवितेत सांगतात-

    "जुने जाऊ द्या मरणालागुनि
    जाळूनी किंवा पुरुनी टाका
    सडत न एका ठायी ठाका
    सावध ऐका पुढल्या हाका
    खांद्यास चला खांदा भिडवूनी"

    असा एल्गार करणारा संदेश त्यांनी नव्या पिढीला दिला.जुन्या गोष्टींना कवटाळून न बसता काळाचे भान ठेवून तरुणांनी नवे विचार आत्मसात करावेत,असे त्यांनी सांगितले.

    क्रांतीकारी कवी ज्ञानपीठ विजेते सर्वांचे आवडते कुसुमाग्रज आपल्या 'प्रेम' या कवितेत म्हणतात-
    "उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
    जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
    नंतर तुला लगिनचिठ्ठी
    आल्याशिवाय राहील काय?
    म्हणून म्हणतो जागा हो
    जाण्यापूर्वी वेळ..."

    तर मित्रांनो,आजचा जमाना हा सतत अपडेट राहण्याचा आहे.जसे आपले स्मार्टफोन तुम्ही सतत अपडेट करत असतात.तसेच तुम्हांला पण अपडेट रहावे लागणार आहे.'लोक काय म्हणतील'? हे आता जुने झाले आहे.ते आता अपडेट करुन 'दिल जो कह रहा हे सुनो' हे नवीन अपडेट तुम्हांला तुमच्या सिस्टीम मध्ये इंस्टॉल करुन घ्यावे लागणार आहे.नाहीतर तुम्ही सतत हँग होणार हे नक्की.

    मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे.समाजाने लागू केलेले नियम आपण पाळत असतो.भलेही ते आपल्या हिताचे नसो.'लोक काय म्हणतील' ही भावना आपला पिच्छा सोडत नाही.मी असं केलं तर लोक काय म्हणतील यातून कोणीही सुटत नाही.(अगदी प्रेमविवाह करायचा पण लोक काय म्हणतील?)

    थोडे स्वार्थी व्हा.सवयींचे गुलाम बनू नका.शेवटी एक तंत्र सांगतो,माणसाला गुलामगिरी सहन होत नाही.किंवा कोणी बोललेलं ही सहन होत नाही.कोणी जर म्हटलं हे तुला जमणार नाही तर आपण पेटून उठतो व ती गोष्ट करुन दाखवितो.

    मी माझ्या मनाला नेहमी म्हणतो,'हे तुला जमणार नाही'.मग माझे संपूर्ण शरीर सर्व शक्ती एकवटून बंड करुन उठते(१८५७ सारखे) व ती गोष्ट प्राप्त केल्याशिवाय शांत बसत नाही.

    -- दीपक गायकवाड

  • बदल विकासाचा आत्मा

    राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी मातृतिर्थ सिंदखेड राजा इथे जनसागर उसळला होता. अक्षरश: लाखो लोक तिथे जमले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात स्वत:ची एक वेगळी वाट, स्वत:चा एक वेगळा प्रवाह निर्माण करणाऱ्या मराठा सेवा संघाने, अर्थात पुरूषोत्तम खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवधर्माची दिक्षा घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

  • त्यांच्या चितेतून उठतील क्रांतीच्या ज्वाला

    कर्ज किंवा नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्त्या, हे मर्यादित वर्णन बातमी म्हणून ठीक असले तरी या बातमीआड दडलेल्या काळोख्या वास्तवाचा वेध कोण घेणार? सरकार? सरकार आणि सरकारातल्या स्वनामधन्य पुढाऱ्यांना तेवढी फुरसत कुठे आहे? राजकारणाची दुकानदारी अव्याहत चालू राहण्यासाठी भांडवल उभारणीतून त्यांना वेळ मिळेल तर ना! शिवाय त्यांच्यासमोर एक-दोन पिढ्यांचा प्रश्न नसतो. पुढच्या सात पिढ्यांची सोय करायची असते. कुठल्यातरी कोपऱ्यात कोणत्या तरी शेतकऱ्याने जीव दिला म्हणून हातातली ‘महत्त्वाची’ कामं सोडून पळण्याइतके का ते मूर्ख असतात? एखाद्या शेतकऱ्याने कर्ज घेतले, त्याला ते फेडता आले नाही आणि म्हणून त्याने आत्महत्त्या केली. या सर्व प्रकारात आमची भूमिका येतेच कुठे, आम्ही दोषी कसे ठरू शकतो, असा कोडगा सवाल उपस्थित करायला ते मोकळे असतात. परंतु वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.

  • नोटबंदी….GST आणि GDP समिकरण….!!

    “महागाई, मंदी आणि बेरोजगारीचा भस्मासुर उसळणार का…? ‘नोटाबंदी’ आणि ‘जीएसटीचा’ निर्णय घाईघाईत घेतल्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकासदर आणखी खालावू शकतो, अशी भीती माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली होती.जीएसटी घाईघाईत लागू करण्यात आल्याने आता त्याचे विपरित परिणाम दिसायला लागले आहेत.

  • अहंकार

    अहंकाराचे विश्लेषण एका विचारवंताने फार सुरेख केले आहे. अहंकार म्हणजे Evil Getting Over you नॅथेनल ब्रोनरच्या मते, अहंकार असा एक राक्षस (बकासुर) आहे की, ज्याला जेवढे खाऊ-पिऊ घालावे तितका तो अधिक भुकेला होतो. बरेचदा अहंकार व स्वाभिमान यांत अत्यंत पुसट रेषा असते. अशा या अहंकाराचे मूळ खालील गोष्टींमध्ये असते-
    (१) अज्ञान
    (२) स्वत:बद्दलचा फाजील आत्मविश्वास
    (३) नकार पचवण्याची कला अवगत नसणे
    (४) स्वत:पाशी असलेले अधिकार
    (५)आध्यात्मिक विचारांची वानवा.

    अहंकारामुळे फक्त नुकसान आणि नुकसानच होते. यामुळे मन:शांती बिघडते, सारासार विवेकबुद्धी नष्ट होते व इतरांशी आपले संबंध दुरावतात. मानसिक तज्ज्ञांच्या मते मनुष्य म्हटला की अहंकार आलाच. हा अहंकार हिंस्र श्वापदासारखा असतो. त्यावर नियंत्रण ठेवून त्याला आपल्या आज्ञेत ठेवणे यातच खरी प्रगल्भ माणसाची कसोटी लागते. तेव्हा आज बघू, करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अहंकाराचे दमन.

    ० जेव्हा आपल्याला ठाऊक असते की, समोरच्या व्यक्तीपेक्षा आपल्याला अधिक ज्ञान आहे तेव्हा बढाया मारून स्वत:चे गुणगान करणे टाळा. यामुळे अहंकार वाढीला लागत नाही.
    ० एखाद्याच्या छोटय़ा-मोठय़ा चुकीमुळे/ वागणुकीमुळे आपला अहंकार दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्या. यासाठी क्षमाशील वृत्ती अंगी बाणवा.

    ० जसा आपल्याला दुसऱ्याची चूक दाखवून देण्याचा अधिकार आहे तसा समोरच्यालाही आहे, हे विसरू नका. आपली चूक असल्यास मोठय़ा मनाने मान्य करा. आपल्या उणिवांवर बोट ठेवले गेल्यास अहंकार दुखावून घेऊ नका, उलट ‘निंदकाचे घर असावे शेजारी,’ या न्यायाने चूक सुधारा व यश संपादन करा.

    ० काही लोक खुशमस्करे असतात. आपली खोटी स्तुती करून आपल्या अहंकाराला खतपाणी घालतात. अशा लोकांचे खरे मनसुबे ओळखा. कारण वेळ आल्यास हीच मंडळी आपले पाय खेचतात.

    ० अधिकारांमुळे अहंकार वाढीस लागत असेल तर गाढव व येशूख्रिस्ताची गोष्ट आठवा. येशू गाढवावर बसून जात असतो व सर्व लोक येशूला अभिवादन करत असतात. गाढवाला वाटते की, लोक आपल्यालाच अभिवादन करत आहेत. येशू उतरून गेल्यावर त्याच गाढवाला सर्वजण हाडतूड करतात. याचप्रमाणे अधिकारपद असल्यामुळे लोक आपल्या अहंकाराला खतपाणी घालतात, पण तेच पद गेल्यावर तेच लोक आपला अपमानही करतात.

    ० मला आता सर्व कळते, असे वाटू लागल्यास, नवीन जे आपण कधीही ऐकलेले / पाहिलेले नाही ते शिकायचा प्रयत्न करा. त्यामुळे ज्ञानसागर किती अपार आहे व आपली ज्ञानाची घागर किती थोटी आहे, हे कळेल. आपसूकच त्यामुळे अहंकाराचे दमन होईल.

    ० उत्तम, देखणे व्यक्तिमत्त्व आहे, म्हणून सर्व लोकांवर आपली भुरळ पडेल हा फाजील आत्मविश्वास / अहंकार बाळगू नका. कारण विचारांची श्रीमंतीच आदरास पात्र असते. लक्षात ठेवा, फळांनी लगडलेले झाड नेहमी वाकलेले असते. तद्वत आपल्या ज्ञान, व्यक्तिमत्त्वाला नम्रतेची झालर असावी.

    ० मी-माझे भौतिक सुख या सर्व कल्पनांना तिलांजली द्या. दुसऱ्याचा विचार करा, यामुळे एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीस मिळाल्यास आपला अहंकार दुखावला जाणार नाही.
    ० दुसऱ्यांना शिकविण्यापेक्षा, दुसऱ्यांकडून जास्तीत जास्त शिका. दुसऱ्यांमधील चांगले गुण आत्मसात करा, त्यामुळे आपल्यालाही शेरास सव्वाशेर भेटल्याचे कळेल व आपसूकच आपला अहंकार निवळून जाईल.

    ० निरपेक्ष वृत्तीने दुसऱ्यांना मदत करा. एखादी गोष्ट चांगली घडून आल्यास आपण फक्त निमित्तमात्र आहोत. सगळी मेहनत ज्याचे काम झाले त्यानेच केली आहे व देवाने हे सर्व घडवून आणले आहे, असा आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगा. त्यामुळे अहंकार वाढणार नाही. आठवा- शिवाजी महाराज-रामदास व बेडकीची गोष्ट. जेव्हा महाराजांना अहंकार जडला की आपण रयतेचे पोशिंदे आहोत तेव्हा रामदासांनी खडक फोडून त्यात जिवंत असणारी बेडकी व पाण्याचे खळगे दाखवले. महाराजांना कळून चुकले की, ही सर्व देवाची लीला आहे. मनुष्यमात्र निमित्तापुरता असतो.

    ० दुसऱ्यांबरोबर स्पर्धा करणे टाळा. कारण आपण पुढे गेलो तर अहंकार वाढतो व दुसरा पुढे गेला तर अहंकार दुखावतो. त्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करा. चांगले काम केल्यास ते अजून कसे उत्तम करता येईल यासाठी परफेक्शनचा ध्यास घ्या.

    ० सर्वात शेवटी अहंकार हा अनेक प्रयत्नांतीच काबूत येतो, त्यामुळे नेहमी अंतरात्म्याशी संवाद साधा, आपले बोलणे ओठावर येण्यापूर्वीच अहंकाराचा दर्प नाही ना हे अवश्य तपासा, मग बघा- तुम्ही अजातशत्रू तर व्हालच, पण करिअरमध्येपण सर्वोच्च स्थानावर जाल.