कोणताही सजीव मरण पावला म्हणजे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणे, पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून, आवश्यक असते. मानवी पार्थिवावर धार्मिक विधिनुसार अंत्यसंस्कार केले जातात. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅनाॅटॉमी विभागाला, वैद्यकीय अभ्यासासाठी देहदान करणे हाही अेक अंत्यसंस्कारच आहे या विषयी या लेखात चर्चा केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अभ्यासू आणि राजकारणातील सावध व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत. राज्य गहाण ठेवण्याच्या त्यांच्या वक्तव्यामागील उद्देश हा स्मारकासाठी निधी कमी न पडू देण्याबाबतचा असेलही. मात्र तो व्यक्त करत असताना योग्य शब्दांचा वापर केला जावा. नाहीतर टाळ्याखाऊ विधानं करण्याच्या नादात गफलत होऊन जायची. डॉ. आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून व्हायचे ते राजकारण आजवर खूप झाले. आता निधीच्या मुद्द्यांवर राजकारण केल्या जाऊ नये. एव्हडीच अपेक्षा..!
यशवंतराव चव्हाण मुंबईसह संयुत्त* महाराष्ट्राचा अमृतकलश घेऊन दिल्लीहून परतले तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात एका समृद्ध राज्याचे स्वप्न तरळत होते. मुंबईसह संयुत्त* महाराष्ट्र अस्तित्वात येण्यासाठी 105 लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले होते. या लोकांचे हौतात्म्य विसरता येणार नव्हते.
या देशातील सुट्ट्यांचा सुकाळ आणि कर्मचार्यांचा बेजबाबदारपणा लक्षात घेता असे काही कठोर निर्णय घेणे ही काळाची गरज आहे; परंतु ब्रिटिशांनी मस्तवाल करून ठेवलेल्या आणि ती मस्ती अजूनही कायम असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेला शिस्त लावण्याची धमक सरकार दाखवू शकते का, हा खरा यक्षप्रश्न आहे.
स्त्री भ्रूण हत्या व् अवैध गर्भपात यावर चर्चा करणारा लेख
प्राध्यापकांचे आजचे वेतन 60 ते 80 हजारांवर गेले आहे. निखळ उत्पादक मूल्याचा विचार केला तर शिक्षक किवा प्राध्यापकांच्या तुलनेत शेतकरी कैकपटीने सरस ठरतो. परंतु मिळकतीच्या संदर्भात मात्र हाच शेतकरी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत भिकारडा ठरतो. हा अन्याय आहे, असे कुणालाच वाटत नाही. आपल्या पोळीवर तुप ओढून घेताना आपलाच अन्नदाता उपाशी मरत आहे, याचा विचार कुणी करत नाही आणि आज कृषीमालाच्या किमतीत थोडी वाढ झाली तर काय थयथयाट मांडल्या जात आहे.
२ ऑगस्टला आषाढातील अमावस्या आहे. हल्ली या दिवसाला आपल्याला खरेतर लाज वाटावी इतकी कुप्रसिद्धी, “गटारी” म्हणून मिळत आहे.जेव्हा आमच्या आजूबाजूची अमराठी माणसे ”गटारी”चा अर्थ विचारतात तेव्हा आमचेच काही मित्र “त्या दिवशी इतकी प्यायची की गटारात पडून गटारे फुल झाली पाहिजेत”, अशी फुशारकी मारतात.आपल्या समाजातील चांगल्या प्रथा एकमेकांना दाखविण्याच्या स्पर्धेच्या या दिवसात आम्ही मात्र अशा फुशारक्या मारतो.अमराठी लोकांना वाटते की काय यांचे हे गटारात पडायचे सण? शीs!
वास्तविक पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे.
कारण-
१) या कुंद पावसाळी वातावरणात मांसाहार पचत नाही.
२) हा काळ बहुतेक प्राण्यांचा प्रजनन काळ असतो.याच काळात प्राण्यांची हत्या केली तर साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो.त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
३) बाहेरच्या वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरात आणि शरीरावर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते.शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.
त्यामुळे एकदा याला धार्मिक जोड दिली की आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.
अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. शाकाहारामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.
पुढे ४ महिने साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांसाठी,पूजांसाठी तयारी म्हणून पूर्वींच्या मोठमोठ्या घरातून विविध दिवे शोधून ते साफसूफ करून या दिवशी अत्यंत भक्तिभावाने पूजले जात असत.आजही या दिवशी महाराष्ट्रातील लाखो मराठी घरात असेच मनोभावे दीपपूजन करून,अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण नैवेद्य दाखवतात.खूप आनंददायी आणि मंगल अशी ही दीप-अमावास्या आपण सर्वांनी उत्साहात साजरी करूया..
शरीर हे क्षणभंगूर आहे , मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर ‘ अवयव दान ‘ करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयव दान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरता मर्यादित नसून शरिराचे सुमारे 10 विविध अवयव आपण दान करू शकतो. फक्त त्यासाठी पाहिजे पुरेशी माहिती व तुमची इच्छा…
गेल्या २० वर्षात फक्त ७५४ लोकांनीच अवयवदान करून इतरांना जीवनदान दिलेले आहे. या आकड्यावरूनच अवयवदानासंबंधी किती मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे, हे लक्षात येईल.
मनुष्य देहातून प्राण निघून गेल्यावर त्या पार्थिवाला पंचतत्वात विलीन करण्याच्या प्रत्येक धर्माच्या आपापल्या पद्धती आहेत. पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी यात मानवी शरीरासोबत, त्याच्या शरीरातील वेगवेगळे अवयवसुद्धा नष्ट होतात. या शरीरातील काही अवयव आजच्या अत्याधुनिक वैद्यकीय प्रगत शास्त्रामुळे दुसऱ्या रुग्णांमध्ये प्रत्यरोपीत करून त्याला जीवनदान देता येते. अर्थात ही प्रक्रिया सोपी मुळीच नाही. प्रथमत: समाजात जागृती निर्माण होणे, नंतर उच्च वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे, तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशासनाचे सहकार्य अशा अनेक गोष्टींच्या सहकार्यानेच अवयव प्रत्यारोपण प्रत्यक्षात शक्य होते. आपण संक्षेपमध्ये देहदान अवयवदानबाबत माहिती करून घेऊयात.
देहदान : यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर संपूर्ण देहाचेच दान करण्यात येते. देहदान हे मेडिकल कॉलेजमध्येच केले जाते. या देहाचा उपयोग शिकाऊ डॉक्टर यांना प्रशिक्षण देण्यासाठी होतो. यातूनच चांगले डॉक्टर्स तयार होतात याच डॉक्टरला समाज पुढे देवासमान मानतो.
मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहाची उपयोगिता संपल्यावर सन्मानाने तो देह पंचतत्वात विलीन केला जातो. देहदानाचे फॉर्म मेडिकल कॉलेज या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांकडे उपलब्ध आहेत. नागरिकांनी फॉर्म भरून जवळच्या नातेवाईकांची सही घेतल्यास तुमची इच्छा त्यांच्याही लक्षात येईल ती व्यक्ती मृत झाल्यास देहदान करणे सोपे जाईल. फॉर्म भरला म्हणजे देहदान होईलच, असे नाही. जर जवळच्या नातवाईकांनी नकार दिला तर देहदान होऊ शकत नाही. आणि फॉर्म भरला नसेल मृत्यूनंतर जर जवळच्या नातेवाईकांनी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली तर देहदान होऊ शकेल. देहदान करण्यासाठी जवळच्या मेडिकल कॉलेज अथवा सामाजिक संस्थेला फोन करणे एवढेच पुरेसे आहे. देहदान हे जास्तीत जास्त ५-६ तासांत होणे गरजेचे आहे.
अवयवदान : मनुष्य काही कारणाने अती कोमात जातो मेंदू मृत (brain dead) झाल्यावरच अवयवदान करता येते. डॉक्टरांचे सर्व प्रयत्न थकतात रुग्ण कोमातून बाहेर येण्याची शक्यता संपते रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर जिवंत असतो. अशा परिस्थितीत काही अवयवांचे दान करता येते.
आपल्याला डोळे, त्वचा, यकृत, हृदय, मूत्रपिंड, प्लीहा यासारख्या अवयवांची अमुल्य भेट मिळालेली आहे. निसर्गाने दिलेली ही भेट आपल्या मृत्यूनंतर इतर गरजू रूग्णांना तुम्ही दान देऊ शकता. या अवयवदानाने मृत्यूच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या रूग्णांना दुसरे जीवन जगण्याची संधी मिळते व मृत्यूनंतरही आपण दुसर्याच्या शरीरात जिवंत राहू शकतो. अवयवदानाच्या उदात्त कार्याला जाती-धर्माचे, दर्जाचे अथवा लिंगाचे बंधन नाही. सद्य परिस्थितीत देशात सुमारे 5 लाख मूत्रपिंड, 50 हजार यकृत, 2000 हून अधिक हृदय विकारांनी ग्रस्त रूग्ण असून या रूग्णांना अवयवांची गरज आहे. मूत्रपिंड विकारावर कृत्रिम रक्त शुद्धिकरण हा पर्याय आहे. परंतु यकृत, हृदय, फुप्फुस विकारांनी त्रस्त रूग्णांना असा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी नवीन अवयव प्रत्यारोपण हाच एकमेव मार्ग आहे. जागतिक पातळीवर विचार करता मृत्यूनंतर अवयवदान करण्याचे प्रमाण भारतात अत्यल्प आहे. सामाजिक व कौटुंबिक जनजागृतीच हा बदल घडवून आणू शकेल.
श्री.संजीव, वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
प्रकाशन दिनांक :- 31/10/2004
‘अमेरिका आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे म्हणून अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. वस्तुस्थिती ही आहे की, अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत, दळणवळणाच्या सुविधा चांगल्या आहेत म्हणून अमेरिका आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे’, एका नामवंत अर्थशास्त्रज्ञाचे हे विचार पुरेसे बोलके आहेत. एखादे राष्ट्र संपन्न होते ते केवळ नैसर्गिक साधनसंपत्तीमुळेच, हा ठाह चुकीचा आहे.
आज देशाची अशी परिस्थिती आहे की कुणाला कीतीही वाटलं तरी मराठी माणूस देशाच्या पंतप्रधान होणार नाही, नव्हे त्याला होऊच दिले जाणार नाही. अपघातानी झाला तर फारकाळ टिकून राहू शकणार नाही. महाराष्ट्राला केवळ शिवजयंती, सत्यनारायणाची महापूजा, गणेशोत्सव आणि परंपरागत यात्रा उत्सव भरवणे इतकेच स्वातंत्र्य अपेक्षित नाही. मराठी माणूस आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीने स्वंतत्र होण्याची गरज आहे. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाच्या विकासाची कास धरायची तर “संपूर्ण मराठी राज्याचे आरक्षण” हवे.
Copyright © 2025 | Marathisrushti