काळाची आपली एक गती असते, एक प्रवाह असतो. हा प्रवाह सतत बदलत असतो. या बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेतच आपली वाटचाल सुरू असते. काळासोबत अनेक गोष्टी बदलत जातात, हे बदल स्वीकारले जातात, स्वीकारावेच लागतात. काळाच्या प्रवाहात टिकून राहायचे असेल तर दूसरा पर्याय नसतो. प्रत्येक जीवमात्रात ही प्रवृत्ती आढळून येते. मानव त्याला अपवाद नाही. आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर काळासोबत बदलावेच लागते. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवप्राणी बौद्धिकदृष्ट्या खूप अधिक विकसित असल्याने या बदलांचे स्वरूप त्याच्यासाठी बरेच व्यापक असते. या बदलांचा थेट संबंध त्याच्या जीवनशैलीवर पडतो. हजार-पाचशे वर्षांपूर्वी एखादी गोष्ट उपयुत्त* असेल तर ती त्या काळच्या संदर्भात उपयुत्त* असते, आज त्या गोष्टीची उपयुत्त*ता कायमच असेल असे नाही. अशा वेळी केवळ रूढी, परंपरांच्या नावाखाली या कालबाह्य गोष्टींना चिकटून राहण्यात अर्थ नसतो. बदलाचे हे सूत्र ज्यांना समजते ते काळाच्या वेगाशी जुळवून घेण्यात यशस्वी होतात. ज्यांना हे जमत नाही ते साहजिकच विकासाच्या दौडीत मागे पडतात.
पृथ्वीतलावरील मानवाच्या बौद्धिक विकासाची सरासरी गती सारखीच असली तरी सगळेच आज प्रगतीच्या समान टप्प्यावर आहेत, असे म्हणता यायचे नाही. काही देश, तर एखाद्या देशातील काही विशिष्ट समाज इतरांच्या तुलनेत विशेषत: आर्थिकदृष्ट्या अधिक प्रगत दिसतात. काळाच्या गतीशी अधिक लवकर आणि अनुकूल दिशेने जुळवून घेण्यात ते इतरांपेक्षा वेगवान ठरले हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. मध्ययुगीन कालखंडात सातासमुद्रापलीकडून नवे नवे सागरी मार्ग शोधत युरोपीय व्यापारी भारताकडे येत होते त्याच काळात भारतात मात्र समुद्र ओलांडणे पाप समजले जायचे. या चुकीच्या धारणेने देशाचे खूप मोठे नुकसान झाले.
जबरीने धर्मांतर करण्यात आलेल्यांना पुन्हा स्वधर्मात परतायचे असेल तर त्यालाही मोठ्या प्रमाणात विरोध व्हायचा. परतण्याचा हा मार्ग जवळपास बंदच होता. शिवाजी महाराजांनी या विरोधाला न जुमानता नेताजी पालकरांसारख्या मातब्बर सरदाराला पुन्हा स्वधर्मात प्रवेशित करून घेतले, परंतु असे उदाहरण अपवादात्मकच होते. विहिरीत खाण्याचा पाव (ब्रेड) टाकून ख्रिश्चन मिशनऱ्यांनी गावचे गाव धर्मांतरीत करून घेतले होते. पाव त्याकाळी निषिद्ध समजला जायचा. त्यामुळे जो कोणी त्या पाव पडलेल्या विहिरीचे पाणी प्यायचा तो बाटला, असे समजण्यात येई. अशाप्रकारे बाटलेल्यांना पुन्हा स्वधर्मात जागा नसायची. असल्याच असंख्य खुळचट समजुतीमुळे आपल्या समाजाचे खूप नुकसान झाले आहे, आजही होत आहे. काळासोबत बदलणे, काळाच्या गतीशी जुळवून घेणे आजही या समाजाला जमलेले नाही.
आजही अनेक कालबाह्य रूढी, परंपरा आपल्या समाजात ठाण मांडून बसल्या आहेत. साधे मृत्युपरांत संस्कारांचेच उदाहरण घ्या. एखाद्या घरात मृत्यू झाला की त्या घरातल्या सगळ्यांनाच तेरा दिवसाचे सुतक असते. हे तेरा दिवस बाहेरचे सगळे व्यवहार बंद असतात. कुणी कामावर जात नाही, काही व्यवसाय असेल तर तोही बंद ठेवला जातो. एकेका मिनिटाला मोल असलेल्या आजच्या या जगात तेरा दिवसाची निष्क्रियता कोणत्या भावात पडत असेल? परंतु हे समजून घ्यायला कुणाची तयारी नाही. मराठी समाजातच हे कर्मकांड मोठ्या प्रमाणात चालते. इतर समाजातले मृत्युपरांत कर्मकांड फारतर दन, तीन दिवसात संपतात आणि चौथ्यादिवशी सगळ्यांची जगरहाटी पूर्ववत सुरू होते. मराठी समाजात मात्र अजूनही तेरा दिवसांचे सुतक पाळले जाते. ही प्रथा ज्याकाळात रूढ झाली त्या काळात ती योग्यच होती. तेव्हा दळणवळणाची, संवाद साधण्याची वेगवान साधने नव्हती. दूरवरून नातेवाईक यायचे, इतक्या लांबून आल्यावर ते काही दिवस थांबणारच. सांत्वनासाठी आलेली ही मंडळी घरात असताना घरच्या इतरांनी आपले कामधंदे करणे प्रशस्त वाटत नव्हते. शिवाय त्याकाळी वैद्यकीय सुविधा फारशा नव्हत्या. प्लेग, टी.बी. किंवा तत्सम दुर्धर आजारांना लोक बळी पडत. दवाखाने वगैर प्रकार नसल्यामुळे बहुतेक उपचार घरीच व्हायचे आणि मरणही घरच्या खाटेवरच यायचे. अशावेळी त्या व्यत्त*ीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रोगाच्या विषाणूंचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता असायची. अशा परिस्थितीत त्या व्यत्त*ीच्या सतत संपर्कात आलेल्या त्या घरातील लोकांच्या माध्यमातून या विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता असायची. हे टाळण्यासाठी काही दिवस त्या घरातील लोकांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये म्हणून सुतक पाळण्याची प्रथा पडली.
मृत शरीर जाळताना शेणाच्या गोवऱ्या, कडुलिंबाचा पाला वगैरेंचा वापर व्हायचा त्यामागेही जंतुसंसर्ग रोखणे हेच मुख्य कारण असायचे. अनेक प्रकारच्या घातक विषाणूंचा फैलाव रोखण्याचे सामर्थ्य गाईच्या शेणात व मुत्रात तसेच कडुलिंबाच्या पाल्यात आहे. त्याचमुळे स्मशानातून आल्यानंतर कडुलिंबाची पाने खाण्याचा किंवा कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून त्याने आंघोळ करण्याची पद्धत होती. तसेच घरात गोमुत्र शिंपडले जायचे. मृतकाच्या नातेवाईकांनी मुंडन करण्यामागेही जंतूप्रसाराला अटकाव करणे हाच उद्देश असायचा. हे सगळे प्रकार किंवा या सगळ्या रूढी त्याकाळी योग्यच होत्या. परंतु आज तेवढ्याच कर्मठपणे या सगळ्या गोष्टी पाळण्याची गरज नाही. कारण दुर्धर आजारी माणसे आजकाल रुग्णालयातच जीव सोडतात व अनेकदा रुग्णालयातुनच त्यांना स्मशानात नेले जाते. त्यामुळे जंतु घरात शिरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जेथे हे नसेल व रोगाचा प्रादुर्भाव असेल तेथे हे पाळणे समजण्यासारखे आहे. दळणवळणाची, संवादाची अतिशय वेगवान साधने आज उपलब्ध आहेत. त्यामुळे मृत्यु झाल्याबरोबर काही मिनिटात ती बातमी सर्वांना समजते. तसेच विमानाने सातासमुद्रापारचे नातेवाईक अगदी 24 तासात येऊ शकतात. आधुनिक वैद्यकीय सुविधा आज सहज उपलब्ध आहेत. शिवाय तेरा दिवस शोक करण्याइतका वेळही आज नाही. इतर समाजांनी हे सत्य स्वीकारून आपली मृत्युपरांत कर्मकांडे दोन-तीन दिवसात आटोपण्याचा मार्ग स्वीकारला. मराठी समाज तो केव्हा स्वीकारणार? बरेचदा केवळ लोक काय म्हणतील या विचारानेही 'शोक' लांबविला जातो. खरेतर आजच्या या आधुनिक युगात लोक काय म्हणतील याचा विचार करण्याइतकीही सवड लोकांकडे नाही किंवा घरातील वृद्ध व्यत्त*ीनेच त्या संदर्भात सविस्तर लिहून ठेवले तर प्रश्न आपोआपच सुटतो. कालबाह्य रूढींचा सगळ्यांनीच त्याग करायला हवा. प्रत्येक रूढीमध्ये, प्रत्येक परंपरेत काही विचार निश्चित असतो. तो विचार समजून घेणे आणि आजच्या युगात तो कितपत समर्थनीय आहे हे पाहून त्या रूढी आणि परंपरा सुरू ठेवायच्या, त्यचे स्वरूप बदलायचे की त्या बंदच करायच्या हे आपण ठरवायला हवे. प्रत्येक काळाची गरज वेगळी असते आणि त्या काळाच्या गरजेनुसार काही बदल स्वीकारावेच लागतात. विचार हे नहमीच प्रवाही असतात, उगाच त्यांचे डबके बनविण्यात अर्थ नाही. या पार्श्वभूमिवर आपल्या कृतीतून नव्या विचारांना जन्म दणार किंवा जुन्या विचारांना नवे वळण देणारे लोक समाजासाठी दीपस्तंभ ठरू शकतात.
असे अनेक लोक आपल्या समाजात आजही आहेत. समाजप्रबोधनाचे कार्य ते आपल्या परिने करीतच असतात. फत्त* काही लोक प्रकाशात येतात तर काही कायम पडद्याआड असतात; परंतु त्याने काही फरक पडत नाही. दिवा खोलीत कुठे आहे यावरून त्याची अंधार दूर करण्याची क्षमता मोजली जात नाही. आमच्या आजोबांचा सत्यशोधक समाजाचा वारसा चालविणाऱ्या आमच्या वडिलांनी तर स्पष्टच सांगून ठेवले आहे की त्यांच्या मृत्यूनंतर तेरवी, गोडजेवण वगैरे प्रकार अजिबात करायचे नाही. त्यासाठी एरवी जो काही खर्च आला असता तो एखाद्या सामाजिक संस्थेला दान करा. लोक काय म्हणतील याचा विचार करण्याचीही गरज नाही. मी तसे मृत्युपत्रच करून ठेवतो. बाबांसारखी अशी साधी माणसंही बरेचदा आपल्या कृतीतून खूप मोठा संदेश देऊन जातात. खरेतर अशाच लोकांची आज समाजाला नितांत गरज आहे. बरेचदा कालबाह्य रूढी, परंपरा आपल्या पायातील बेड्या ठरत असतात. त्या बेड्या तोडण्याची हिंमत कुणीतरी आधी दाखवायला पाहिजे, मग त्याचे अनुकरण करायला इतर अनेक लोक पुढे येतील. गेल्या शे-दोनशे वर्षांत संपूर्ण जग झपाट्याने बदलले आहे. युरोपीय देशांनी हा बदल चटकन आत्मसात केला आणि ते विकासाच्या दौडीत खूप पुढे गेले. एकेकाळी समृद्ध असलेला आपला देश अजूनही कालबाह्य रूढी, परंपरांच्या जाळ्यातून म्हणावा तेवढा मोकळा झाला नाही आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या विकासावर झाला. याचा अर्थ सगळ्याच रूढी किंवा परंपरा कालबाह्य झाल्या आहेत असा होत नसला तरी बदलत्या परिस्थितीत त्यांचे स्वरूप बदलणे गरजेचे ठरले आहे.
-- प्रकाश पोहरे
July 8, 2007
अमरनाथ देवस्थान मंडळाला यात्रेकरूंच्या सोईसाठी जम्मू-काश्मीर सरकारने शंभर हेक्टर जागा देण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण काश्मीर खोऱ्यात आंदोलनाचा भडका उडाला. ठिकठिकाणी निदर्शने झालीत, निदर्शकांच्या पोलिस आणि लष्कराशी चकमकी उडाल्या, निदर्शक हिंसक झाले. या हिंसक आंदोलनापुढे मान तुकवित गुलाम नबी आझाद सरकारने अमरनाथ यात्रा मंडळाला जमीन देण्याचा संपूर्ण विचारांती घेतलेला निर्णय फिरवला.
September 7, 2008
एखाद्या व्यत्त*ीचे निधन झाल्यावर त्याच्या आप्तस्वकीयांना दु:ख होणे स्वाभाविक असते. डोळ््यांतील अश्रूंची वाट मोकळी करून हे दु:ख व्यत्त* केले जाते. दु:खाचा तो स्वाभाविक उद्रेक असतो परंतु बरेचदा असेही आढळून येते की, मृत व्यत्त*ीशी कुठलेही भावनिक संबंध नसलेली माणसेही आपल्या न झालेल्या दु:खाचे अतिरेकी प्रदर्शन करीत असतात.
June 25, 2006
एक नागरिक म्हणून सरकारने पुरविलेल्या सगळ्या सुविधांचा उपभोग तुम्ही घेत असाल तर या देशाने स्वीकारलेल्या न्यायव्यवस्थेचा, शासनव्यवस्थेचा आदर करणे तुमची जबाबदारी ठरते. एक आदर्श नागरिक म्हणून आपण आपल्या हक्कांबाबत जितके जागृत असायला हवे, तितकेच किंबहुना त्यापेक्षा थोडे अधिक जागृत आपल्या कर्तव्यांबाबतही असणे गरजेचे आहे. आपले हित साधताना इतरांच्या हिताला बाधा पोहचत तर नाही ना, आपल्यासाठी ज्यांचा काहीही दोष नाही असे इतर अनेक लोक विनाकारण फरफटले तर जात नाहीत ना, याची खातरजमा आपणच करायला हवी.
September 13, 2009
वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याकरिता सरकारने शेतकर्यांच्या शेतीला सामूहिक कुंपण घालून द्यावे आणि त्याला मध्ये-मध्ये शेतकर्यांच्या सोयीनुसार फाटक लावून द्यावे. प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले असेल, तर संभाव्य उत्पन्नाइतकी नुकसान भरपाई तातडीने शेतकर्यांना देण्याची एक सूत्रबद्ध योजना तरी सरकारने राबवावी. हा दुसरा उपाय करणे सरकार आणि नोकरशाहीला पैशा अभावी राबविणे शक्य नाही, याची मला खात्री आहे. त्यामुळे शेतकर्यांनाच या प्राण्यांना पाळण्याची परवानगी देणे आणि त्यातून सरकारने महसूल मिळविणे हा पहिला उपाय स्वीकारल्याशिवाय सरकार समोर पर्याय नाही याची मला खात्री आहे.
August 21, 2012
मला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन.” – थॉमस हक्सले खरं आहे, आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहीले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत? हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल. आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत – खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मुलभुत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत.
June 3, 2017
चूक सरकारच्या धोरणामध्ये आहे. दुर्दैवाची बाब ही आहे, की हे चुकीचे धोरण बदलून नवे धोरण कसे असावे हे सांगण्याऐवजी अण्णा हजारे सारखे लोक केवळ भ्रष्टाचार आणि काळा पैशाच्या नावे बोंब ठोकत साप सोडून भुई थोपटत आहेत. नवीन धोरण लागू करण्याची हिंमत कोणतेही सरकार दाखवू शकत नाही. सरकारने ही हिंमत दाखविली, तर आज खुरडत चालणारा हा देश उद्या भरधाव वेगाने पळू लागेल; परंतु असे सरकार या देशाला लाभेल का हाच खरा प्रश्न आहे!
June 11, 2012
रस्त्याने प्रवास करताना बरेचदा एक सूचना वाचायला मिळते, ‘शॉर्ट कट मे कट शॉर्ट युअर लाइफ’. ही सूचना खूपच अर्थगर्भ आहे. रस्त्यावर लिहिलेली सूचना जरी केवळ वाहन चालकांशी संबंधित असली तरी इतर संदर्भातही ही सूचना तशी खूप मौलिक आहे.
February 18, 2007
बहिष्कार हे एक उत्तम शस्त्र आहे. लोकांनी या स्पर्धेकडे पाठ फिरविली तर ही स्पर्धा बंद पडायला वेळ लागणार नाही.एरवी क्रिकेटमधील सट्टेबाजीबद्दल तावातावाने बोलणारे लोक संध्याकाळ झाली की आवर्जून टीव्हीसमोर बसतात आणि सामना पाहतात. लोकांच्या या दोगल्या वृत्तीमुळेच अनैतिक काम करणार्यांचे फावत असते.
May 27, 2013
माझ्या निर्देशांचे काय होते, हे तुम्हाला ठाऊक आहे. अशा परिस्थितीत मंत्र्यांना निर्देश देण्याचा आठाह माझ्याकडे कशाला धरता?, ‘ या सरकारचा कारभार म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पिठ खातंय’ असा आहे.
March 16, 2008
Copyright © 2025 | Marathisrushti