(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • मालेगाव : हिदु आतंकवादाची भाकडकथा !

    ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेला हा लेख जनजागरणासाठी शेअर करत आहे.

  • पैसा…. फक्त एक जगण्याचं साधन !

    ‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे मुळातच खूप पैसा आहे तिथे अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर संपत रहातो. पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर’, आपण निघून जातो, पैसा मात्र इथेच रहातो !!!

  • सुट्ट्यांचा सुकाळ; देशाचं वाटोळं!

    या देशातील सुट्ट्यांचा सुकाळ आणि कर्मचार्‍यांचा बेजबाबदारपणा लक्षात घेता असे काही कठोर निर्णय घेणे ही काळाची गरज आहे; परंतु ब्रिटिशांनी मस्तवाल करून ठेवलेल्या आणि ती मस्ती अजूनही कायम असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेला शिस्त लावण्याची धमक सरकार दाखवू शकते का, हा खरा यक्षप्रश्न आहे.

  • माझा रिसर्च चा विषय

    नैराश्य :बालमनातील स्व-संकल्पना (Despair in Child Self-Concept)

    वेगवान स्पर्धेच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही सुखी व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी धडपडत असते.संयुक्त कुटूंबातून एकल कुटुंबापर्यंत ,ग्रामीण भागातून शहराकडे, त्याच्या गरजा ,स्वप्नं ,आशाआकांक्षा ,राहणीमान, खानपान, चैनीच्या वस्तू ,सुंदर घर ,शिक्षण ,चांगली नोकरी ,सुंदर जीवन-साथी इ. गोष्टीच्या लालसेने स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. अनिश्चित घटना आणि अस्थिरता,अगतिकता,असुरक्षितता,अपेक्षांचं ओझं ,अपमानास्पद वागणूक त्यामुळे ताणतणाव,चिंता व नैराश्य या घटनांना सामोरे जावे लागत आहे.

    ताणतणाव म्हणजे,
    " ज्या एका मानसिक अवस्थेतेमुळे शरीर स्वास्थ्य प्रभावित होऊ शकते ती म्हणजे ताण (Stress). ""ज्यांच्यामुळे शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेत विघटन घडून येते किंवा घडून येण्याचा धोका संभवतो,अशा घटनांद्वारे उद्धवणारी प्रक्रिया म्हणजेच ताण (by Lazhrous /fhokman,psychologist).

    वाईट घटनांमुळे निर्माण होणारा ताण खऱ्या अर्थाने त्रासदायक असतो तर चांगल्या घटनांमुळे होणारा ताण हा आनंददायक किंवा सुखद असतो.

    स्व-संकल्पना म्हणजे ,
    "स्वतःचे स्वतःविषयीची कल्पना,भावना,अभिवृत्ती,आवडी निवडी ,सवयी,क्षमता,राहणी,प्रेरणा इत्यादींचे मूल्यांकन म्हणजे स्वसंकल्पना होय." ताण निर्माण करणाऱ्या घटना :

    जीवनात ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे झाल्या नाहीत तर मानवी जीवन अस्वस्थ होण्यास सुरुवात होते . जसे ,जीवनसाथी ,नोकरी दैनंदिन वादविवाद ,संशयवृत्ती ,भांडणे ,वैचारिक मतभेद ,नोकरीमधील वरिष्ठांची अपमानित वागणूक, प्रेमप्रकरणं ,फसगत अशा अनेक कारणांमुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक घटकांवर प्रतिकूल परिणाम होऊन मानवी आरोग्य बिघडते . अपमान ,एकाकीपणा ,अभ्यासाचे दडपण ,भीती व अपयश, नातेसंबंधातील दुरावा ,जीवनातील अनेक लहान सहान समस्यांनी त्रस्त होणे,इतरांकडून न मिळणारा आधार,प्रेम ,यामुळे सतत तणावात राहणे त्यामुळे आंतरिक प्रतिकार शक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होतो . व्यक्तीच्या आयुष्यात एका उंचीपर्यंत कार्यक्षमतेच्या प्राप्तीसाठी ताण येणे आवश्यक असते ,परंतु ताणाच्या कार्यक्षमतेची पातळी सतत वाढली तर त्याचे रूपांतर नैराश्याकडे जाऊ शकते . बालपणातील मानसिक,शारीरिक किंवा लैंगिक आघात . नकारात्मक विचार येणे,त्याबद्ल स्वप्नं पडणे,भीती वाटणे,लक्ष केंद्रित करता न येणे,स्मरणशक्ती कमी होणे,नकारात्मक विषयावरील टीव्ही सिरीयल पाहणे . समाजात मिळून मिसळून वागायची भीती वाटणे . कमकुवत आर्थिक स्थितीमुळे नेहमी ताण येतो.

    समस्या १ : दीपाली मॅडम सरकारी शाळेत नोकरीला. वर्गात छान शिकवायच्या,प्रेमळ होत्या . त्यांच्या लग्नानंतर पतिपत्नीतील वैचारिक वादावरून पटेनासे झाले, नित्याची भांडणे,मारझोड,संशयवृत्ती यामुळे पतीचा त्रास वाढत गेला. सतत ताणतणावात असल्याने चिंता,नैराश्य यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. या दरम्यानच्या काळात दोन अपत्य झाली .घरच्या सदस्यांनी समजाविले परंतु मार्ग निघाला नाही.एकाकीपणा ,सामाजिक नीति-नियम ,प्रतिष्ठेच्या कल्पना यामुळे इतरांना समस्या न सांगण्याचे धाडस अशा अनेक नकारात्मक कारणांमुळे नैराश्यात आयुष्य जगणे सुरु झाले .

    मॅडम होळीला आपल्या सहा वर्षाच्या मुलासह माहेरी गेल्या . ताणतणावाचा परिणाम त्यांच्या शरीरावर व मनावर झालेला होता. आईला म्हणाल्या, माझ्या मुलांचा सांभाळ करशील का? या सवांदावरून आई वडिलांनी काळजी घ्यायला हवी होती. त्यांना आईवडिलांची साथ लाभले नाही व आई वडिलांनी त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी सारं काही असहय होऊन आपल्या मुलासह आत्महत्या केली .

    समस्या २ : सरिता मुलाला घेऊन आईवडिलांकडे वास्तव्याने राहायला आली. ती नोकरी करते. पाहायला सुंदर, प्रेमळ ,इतरांना मदत करणारी ,काय झालं असेल तिच्या आयुष्यात ?लग्नानंतर लहानसहान कारणावरून भांडण, वादविवाद,मतभेद ,नेहमीचा ताणतणाव चिंता यामुळे एकत्र आयुष्य जगणे असह्य झाले .समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न झाला परंतु अपयश .

    दरम्यानच्या काळात पतीने एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केला परंतु सरिताने नकार दिला .पती मुलाला शाळेतून परस्पर घेऊन गेला . पतीला काहीही न बोलता आपल्या ताणतणावाचे व वात्सल्याचे समायोजन केले पालकांनी सकारात्मक मानसिक धाडस दिलं . जगण्याची नवी उमेद दिली . तिच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या प्रेमळ सहवासाने पती व मुलाविना सरिता आनंदाने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतेय .

    व्यक्तीच्या बालमनांतील स्वसंकल्पना :

    स्पर्धेच्या काळात मनुष्य स्वतःच्या मानसिक आरोग्याचा विचार न करता स्वतः अंध काळोखात जात आहे. ही लहानपणातील स्वसंकल्पना होय .अनुवंश व बाह्य घटकांमुळे व्यक्तीची जडणघडण होते. उदा .स्वतःचे विचार व्यक्त न करू देणे ,स्वतःला कमी लेखणे, काळा वर्ण ,शारीरिक व्यंग इ .कारणांमुळे व्यक्तिमत्व न्यूनतेची स्व-संकल्पना बालमनात बनते . उद्धट बोलू नकोस ,वाद घालू नकोस,मुलीच्या जातीने जास्त बोलायचे नाही , अशा नकारात्मक गोष्टीचे मुले अनुकरण करतात यातून स्वसंकल्पनेची बीजे रुजविल्या जातात .कुटुंब व शाळेत मुलांमधील स्वतःचे महत्व कमी असल्याची स्वसंकल्पना दृढ होत जाते .बालकाच्या स्वसंकल्पनेवरच जीवनाचे यश अपयश अवलंबून असतेबालमनात कुटुंब व शाळामधून ऐकविलेल्या काल्पनिक परिकथा /गोष्टी उदा. सिंड्रेला, भुताच्या गोष्टी इत्यादींमधून स्वसंकल्पना बनत जातात समस्येचे मूळ त्याच्या बालमनांतील स्वसंकल्पनेत दडलेले असते .

    बालमनातील भीतीयुक्त स्वसंकल्पनेमुळे समस्येचे समायोजन दीपाली मॅडमला करता आले नाही. पालकांनी समस्या व्यक्त करण्याचे धाडस निर्माण केले असते तर टोकाचा निर्णय घेतला नसता . आयुष्यातील चिंता ,ताणतणाव, नैराश्य या बाबत पालक ,जीवलग मित्र ,यांना सांगून समस्येचे निराकरण झाले असते.स्वतः कमावती असल्याने पतीपासून विभक्त किंवा वेगळे राहून आनंदी जीवन जगता आले असते .पालक, मित्र, नातेवाईकांनी भावनिक आधार दयायला हवा होता .आत्महत्या करण्यापेक्षा थोडे अपमान सहन करण्याची सकारात्मक हिंमत करायला हवी होती . सरिताने आयुष्यातील ताणतणावाचे आईवडिलांच्या भावनिक आधाराने,प्रेम व सहकार्याने समस्येचे व्यवस्थापन केले, आज आपले आयुष्य आनंदाने जगत आहे .

    तणाव, चिंता ,नैराश्य यातून सुटका होण्यासाठी योगा आणि प्राणायाम यांचा उपयोग नियमित करावा .नैराश्य दूर करण्यासाठी परिस्थिशी जुळवून घेणे व समस्येचे भावनिक समायोजन करण्यास शिकणे .जीवनशैली साधी व गरजा कमी ठेवणे . बालमनावर कुटुंब व शाळांमधून सकारात्मक स्वसंकल्पनेची बीजे रुजविणे .स्वतःची बलस्थाने आणि उणिवा ओळखून त्याचा स्वीकार करणे .नकारात्मक विचार, गैरसमजुती, व्यसनाधीनता यापासून दूर राहणे, रागावर नियंत्रण ठेवावे .विनोदबुद्धी, छंद जोपासणे ,मैत्रीपूर्ण नातेसंबंध ठेवणे, साजेसा जीवनसाथी शोधणे. आपले काम प्रामाणिकपणे करणे व आनंदी राहणे. स्वआदरभाव राखून स्वतःचा व इतरांचा मानसन्मान करणे .अपमान सहन करायला शिकले पाहिजे .सकारात्मक प्रेरणा देणाऱ्या महामानवांच्या जीवनावरील पुस्तकांचे वाचन करावे. जसे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले , सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम, बाबा आमटे इ. स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा, मी माझे मानसिक आरोग्य उत्तम ठेऊन आनंदाने आयुष्य जगू शकतो,असे स्वतःला सुचवित राहावे . सकारात्मक विचार देणाऱ्या चित्रपट, टीव्ही मालिका पाहाव्या .

    ताणतणाव ,चिंता व नैराश्य यावर मात करून सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावा व सकारात्मक विचारधारेचा अंगीकार करावा.

    -- प्रा. हितेशकुमार पटले

    ExamVishwa

  • परनिंदा माणसाला भगवंतापासून दूर नेते

    परनिंदा करण्यासारखे पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते; तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते.

    दुसर्याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो, पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो ? म्हणजे मग आपण यात काय साधले ?
    निंदेमुळे आपलेच मन दूषित होते. दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते.

    ज्याला परनिंदा गोड वाटते, त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे.

    तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाचे विष उतरल्याची खूण आहे, त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असे समजावे. म्हणून, ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वाहावी.

    भगवंताच्या मार्गाने जाणार्याने, दुसर्याच्या ठिकाणी दिसणार्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे, आणि अवगुणाचे तण आपल्या अंतःकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे.

    पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताचा आड येतात हे देखील कळते, पण त्याला आपला इलाज नसतो. उदाहरणार्थ, काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते. एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते. असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाहीत. पण सत्संगती जर लाभली तर मात्र असले दोषदेखील सुधारतात. हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे.

    मनुष्य स्वभावतः आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही. तो दुसर्याला त्याचा दोष दाखवून देईल, पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही.

    विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते. वारकरी पंथातले अडाणी लोक 'विठ्ठल विठ्ठल' म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत.

    घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तांत मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे, पुस्तकीज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते.

    भगवंताकरिता कुणीही कष्ट करून नका; कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे. ती वस्तू सात्त्विक प्रेमाने साध्य होणारी आहे; आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो.

    तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा, आपापसांत प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय, प्रेममय दिसू लागेल, आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल.

    निंदा ही आपल्या साधनाची होळी करते.

    -- सुमंत आचार्य

  • नितीन गडकरी आणि Route 66

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न असलेला मुंबई –पुणे एक्सप्रेस वे तयार झाला आणि नितीन गडकरी या माणसाकडे लक्ष गेले. आजही त्यांच्या शिरावर संपूर्ण देशाचे रस्ते बांधण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकली ती त्यांचे मुंबई–पुणे या रस्त्याचे काम पाहूनच.महाड -पोलादपूरचा ब्रिटिश कालीन पूल कोसळल्या नंतर जी विधान सभेत चर्चा झाली त्याचे वृत्त अनेक वृत्त वाहिन्या दाखवत होत्या . सरकार मधील कुणीही ” हो या अनर्थाची जबाबदारी आमची आहे” असे स्पष्ट पणे म्हणत नव्हते. पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उद्गार ऐकले आणि जरा बरे वाटले.

  • मुलभूत समस्या !

    भारताला जागतिक महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्याचे प्रयत्न अगदी जोरात सुरू आहेत. येत्या पंधरा वर्षांत भारताची ओळख ‘सुपर पॉवर’ म्हणून स्थापित करण्यासाठी सगळ््या नेत्यांनी अगदी कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेशी नुकत्याच करण्यात आलेल्या आण्विक कराराकडे त्या दृष्टीनेच पाहिले जात आहे.

  • राखेतून सोन्याचा धूर!

    तार्किकदृष्ट्या या आगींमागील कारणांचा वेध घेतल्यास अशा घटनांमागे मोठे अर्थकारण असल्याचे सहज स्पष्ट होते. कापूस खरेदी आटोपलेली असते, कापसाच्या गठाणी बांधून तयार झालेल्या असतात. बाकी असते ती केवळ प्रतवारी आणि मूल्यांकन.

  • नोकर शाहीचा अजगरी विळखा!

    देशाच्या विकासासाठी खर्च होणाऱ्या एका रूपयातले 85 पैसे आयएएस अधिकारी आणि त्यांच्या खुषमस्कऱ्यांच्या खिशात जातात असा आरोप कुण्या ऐऱ्यागैऱ्याने नव्हे तर केंद्रीय मंत्रिमंडळातील एका जबाबदार मंत्र्याने केला आहे. केंद्रीय पंचायतराज मंत्री मणिशंकर अय्यर यांनी नागपूरात एका कार्यक्रमात बोलताना ठाामीण भागाच्या विकासात नोकरशाही हा मोठा अडसर असल्याचे स्पष्ट शब्दात सुनावले. या कार्यक्रमाला मणिशंकर अय्यर आणि मीराकुमार उपस्थित होते.

  • रामजन्मभूमी इतिहास आणि न्याय

    सर्वोच्च न्यायालयाचा  निकाल लागला आणि श्री रामांना एकदाचा मानवी जगात, मानवी न्यायालयात न्याय मिळाला पण श्री रामानी स्वतः च्याच जन्मभूमी मध्ये जेथे त्यांनी कधी काळी राज्य केले होते . त्यांचे मंदिर बांधान्या साठी त्यांच्या भक्तांना न्यायालयात याचिका दाखल करून खटला का लढावा लागला ?त्याचा पूर्व इतिहास काय? याचा उहापोह आज या लेखात मी करणार आहे.