(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • हल्ली दिखाव्याचाच जमाना जास्त आहे…..

    पहा ना... काय आहे हल्ली सर्वंचजण "मी खुपच बिझी आहे.... वेळच मिळत नाही..." अशी अनेक अपेक्षाभंग वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात... म्हणजे अवघड कामे विज्ञानाने तंत्रज्ञान्याच्या मदतीने सहजसुलभ ऊपलब्ध करुनसुध्दा जो-तो प्रचंड प्रमाणात व्यस्त असतो... असो...

    पण या विज्ञानाचा कशा प्रमाणात गैरफायदा घ्यायचा.... हे काही अतीहुशार महाशयांना माहीती असतच... किंबहुना यांचा जन्मच यासाठीच झालेला असतो. अशा महाशयांच्या मुखातुनच पुढील वाक्यरचना आपण ऐकत असतोच....,

    "अरे मी म्हणजेच अॉफीसच... ,

    माझ्या शिवाय अॉफीसमधील एक काम पुर्णंपणे संपत नाही...,

    आमचे साहेब न... पुर्णंपणे माझ्यावरच अवलंबून असतात...

    अरे एक दिवस सुट्टी घेतली ना...साहेब जाम चिडचिड करतात...

    मी म्हणजे सरांचा ऊजवा हातच.......

    मी म्हणेल तस सर ऐकतात..........

    हल्ली कामाचा व्याप.. म्हणजे मलाच ताप...........

    हाफ डे घ्यायचा म्हणल तरी अॉफीसच दोन दिवसांच काम रखडत.........."

    अशी किंवा अनेक स्वताःचा मोठेपणा सांगण्याच्या नादात ही मंडळी ईतरांना खिणवत असतात... असो....

    पण खरच अस असत का हो....? म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी खरच काम अडु शकतात का हो....? [याला थोड्याफार प्रमाणात सरकारी अधिकारी अपवाद आहेच म्हणा].. पण मी पाहीलय की 99 टक्के अॉफीसमध्ये एक प्रणाली (System) कार्यरत असती.. आणि हीच प्रणाली प्रत्येक अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या कुवतीनुसार त्याच्याकडून काम करुन घेत असती...तरीपण काहीजण जर आपल्याच कामात खोटेपणाने समरसुन जातात आणि "वेळच नसतो हो..." हीच वाक्यरचना सतत बडबडत असतात..

    घ्या सांभाळुन.... आपलीच माणस असतात...
    असतात अशीही मंडळी सभोवताली.......

    -- विवेक जोशी

  • मनस्पंदन..

    “पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा.. अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात..” फुलं साठवणं सोपं असतं, पण त्याचा सुगंध आपल्याला मनातच साठवावे लागतात. तसचं सुखाचे क्षण हे क्षणिक असतात. त्याना टिकवून ठेवता येत नाही. पण मनात साठवून ठेवल्यावर तेही चिरतरूण राहतात आणि आपणही…

  • स्पर्धाच गुरू

    एकांगी वर्चस्व किंवा ‘मोनोपोली’ ही कोणत्याही क्षेत्रासाठी तशी घातकच असते. केवळ फायद्याच्या दृष्टीने विचार केला तर कदाचित असे एकांगी वर्चस्व घातक ठरणार नाही, उलट चारही बाजूने फायदाच होऊ शकतो. परंतु एकूण विकासाचा विचार केला तर मात्र असे एकांगी वर्चस्व नक्कीच घातक ठरू शकते.

  • बागुलबुवा महागाईचा

    ध्या भारतात चर्चा केवळ महागाईची आहे. विरोधी पक्षांना महागाईच्या रूपाने आपल्या तलवारी पाजळण्यासाठी चांगला मुद्दा मिळाला आहे आणि तिकडे सरकारही प्रचंड अस्वस्थ आहे. महागाई सध्या राष्ट्रीय संकट ठरले आहे.

  • सुपारीबाज नेते!

    अलीकडील काळात भारतातले अनेक उद्योग झपाट्याने बंद पडत असले, उद्योजक बेकार होत असले तरी एक धंदा मात्र अगदी जोरात सुरू आहे आणि त्या धंद्याला मरणही नाही, कुठला धंदा म्हणून काय विचारताय? अहो, तो धंदा म्हणजे राजकारण! पावसाळ्यातील छत्र्यांसारखे आपल्याकडे नेते उगवत असतात.

  • चिनी वस्तू स्वस्त का आहेत?

    पुण्यातील एक नामवंत उद्योगपती चंदू चव्हाण यांचा व्यापारी अनुभवावर आधारीत हा लेख, भावनांच्या डोहात डुंबणाऱ्या देशप्रेमी लोकांना विचार करायला लावणारा हा लेख.. फेसबुकवरुन आला तसा शेअर केलाय. वाचा आणि प्रतिक्रिया लिहा.

    खुळचट राष्ट्रवादी penny wise pound foolish आहेत.ती त्यांच्या अभिमान cum फुकाचा गर्व या समर्थ रामदासांनी सांगितलेल्या मूर्खपनाच्या लक्षणाला साजेसं वर्तन आहे.

    असो या लेखाचा उद्देश आपण जो देश म्हणूंन आर्थिक/सामाजिक/राजकीय मुर्खपणा करतो आणि त्यामुळे आपल्या देशाच्या वस्तुंच्या किमती जास्त आहेत त्याबद्दल आहे.

    चांगल्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी गरज आहे इकॉनॉमी मध्ये efficiency of capital असण्याची. कशाने येते हि efficiency of capital?

    मी चीन मध्ये 45 दिवस राहिलो, शेतकऱ्यांच्या घरी राहिलो, 10000 पेक्षा जास्त किलोमीटर passenger train ने प्रवास केला. युनिव्हर्सिटी च्या प्राध्यापकांना भेटलो, शेकडो लोकांना भेटलो.एवढच जाणून घ्यायचं होतं की 1950 साली भारतापेक्षा मागासलेला असलेल्या देशाने एव्हडी सामाजिक आणि आर्थिक प्रगती कशी केली?

    काही कारणं सांगतो जी महत्वाची आहेत. मूलभूत प्रश्न सोडवल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.

    1) कंमुनिस्ट क्रांतीने स्त्रियांना मुक्त केलं, जबरदस्तीने का होईना शर्ट पॅन्ट घालायला लावली, केस कापायला लावले आणि कामाला लावलं.चीन च्या आणि भारताच्या GDP मधला फरक समजून घ्यायचा असेल तर फक्त पडद्यात आणि बुरख्यात असलेल्या स्त्रियांचं उत्पन्न (जर त्यांनी काम केलं असतं तर) gdp मध्ये जमा करा आणि 65 वर्षाचं compounding करा. चीन शी स्पर्धा करायची असेल तर पाहिलं काम स्त्रीमुक्ती चं करा.

    एका बाजूला कोट्यवधी बालमजूर शाळेत जात नाहीत आणि दुसऱ्या बाजूला कोट्यवधी स्त्रिया चूल आणि मूल यात अडकवून ठेवण्याविषयी तुम्ही काही करत नसाल तर तुमची देशभक्ती नपुंसक आहे. तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे

    कारण देश म्हणजे देशातील माणसे असतात

    2) कंमुनिस्टांनी धर्म संपवला, आता बौद्ध मंदिरात फक्त पर्यटक जातात.
    धर्मांच्या मठात आणि ट्रस्ट मध्ये राष्ट्रीय बचत चीन मध्ये अडकली नाही ती productive use मध्ये येऊन capitalism चा विकास चिनी कंमुनिस्ट पार्टी च्या नियंत्रणाखाली झाला.

    भारतात प्रचंड पैसा धर्मामुळे unproductive कामासाठी मंदिर/मशीद/चर्च मध्ये ब्लॉक झाला आहे

    आज भारतात जवळपास 30 टक्के deposit हे तिरुपती/शिर्डी/मशीद/चर्च सारख्या धार्मिक ट्रस्ट/सोसायटी/क्लबचे आहेत,
    त्यांना बँका 10 टक्के व्याज देतात त्यामुळे उद्योगांवर कर्जावरील व्याजाचे दर 13-14 टक्के आहेत. चीन मध्ये हेच व्याजाचे दर उद्योगांसाठी 6 टक्के आहेत,

    म्हणजे आपण तिरुपती आणि त्यासारख्या मंदिरांना संपत्ती ब्लॉक करायची. त्या संपत्तीला 10 टक्के व्याज द्यायचं आणि आपल्या उद्योजकांना सांगायचं वस्तू स्वस्त द्या.
    कसं शक्य आहे?

    बाकी 50 टक्के deposits गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट्स चे आहेत, गरीब/मध्यमवर्गीय जनतेचे deposits फक्त 20 टक्के आहेत.
    रिटेल loans जी लोकांनी घेतली आहेत ती जवळपास 30 टक्के आहेत त्याला व्याजाचे दर अजून जास्त आहेत, ढोबळमानाने असं म्हणता येईल की 50 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज सामान्य जनता भरते

    हि व्याजरूपी लूट कोणाच्या बोडक्यावर टाकली जाते-साईबाबा/तिरुपती/मंदिर/मशीद इत्यादी, त्यांची संपत्ती जप्त केली तर
    हाऊसिंग/education/शेती या साठी लोन एक टक्क्याने देता येतील. आणि उद्योगांसाठी 5-6 टक्क्याने. मग इथले उद्योजक वस्तू स्वस्त बनवू शकतील.

    धर्म नष्ट करा ती सर्वात मोठी देशभक्ती होईल.
    चिनी वस्तू आपोआप महाग आणि भारतीय वस्तू स्वस्त होतील. धार्मिक मूर्खपणामुळे efficiency of capital कमी होते

    3) चीन मध्ये जमिनीची मालकी राष्ट्राची असल्यामुळे सगळ्या जमिनीवर शेती होते, सगळ्या तळ्यात मत्स्य शेती होते, त्यामुळे अन्न धान्य/ फळं/मास मच्छी हि खूप स्वस्त आहे. त्यामुळे लोकांचं जीवनमान चांगलं आहे.

    भारतातल्या 40 टक्के शेतीयोग्य जमिनीवर शेतीच होत नाही. जमिनीच्या मालकांना शेतीत इंटरेस्ट नाही आणि मजुरांकडे शेती नाही.

    तळ्यात मत्स्यशेती तर नगण्य होते, त्यामुळे अन्नधान्याच्या किमती खूप जास्त आहेत. या व अनेक धार्मिक कारणांमुळे भारत in general कुपोषित आहे. Business हे देखील युद्ध असतं, कोट्यावधींना कुपोषित/वंचित ठेवून तुम्ही ते जिंकू शकत नाही. इतिहासात तसं केल्याने आपण खूप वेळा हरलो आहोत.

    हे बदला धर्माना जमिनीत गाडा .ती खरी देशभक्ती, चिनी वस्तूंवरील बंदी तुम्ही करू पन शकत नाही आणि ते करणं मुर्खपणा आहे

    चीन ची भांडवलशाही यामुळे ही अमेरिकेपेक्षा efficient आहे. आज अमेरिकेपेक्षा पेक्षा चीन ची अर्थव्यवस्था PPP बेसिस वर मोठी आहे. हि जादू त्यांनी कॅपिटलीसम आणि कंम्युनिसम चं त्यांच्या देशाला योग्य मिश्रण ठेवून आणि धर्म संपवून केलेलं आहे. चीन ला शिव्या घालणारे आणि वस्तूंवर बहिष्कार टाका म्हणणारे माझ्या मते अभ्यास नं केलेले आहेत. त्यांना आग सोमेश्वरी असताना बंब रामेश्वरी पाठवणारे मूर्खच म्हणायला लागेल. हे मूर्ख आम्ही मुतून एक गवताची आग कशी विझवली यात यात खुश आहेत.

    असो शेवटी मुखशुद्दी साठी

    "गोरा सोजीर मज समक्षच माझ्या भार्येशी कुकर्म करीत असतांना, मी सुद्धा त्याच्यावर धरलेली आपल्या हातातली छत्री मधुनमधून किंचित् कलती करून त्यास उन्ह लागेल असें करून त्या दुष्ट सोजीरावर सूड उगवत होतो."

    चिल्लर चिनी चीजवस्तुंवर चिंधीचोर राष्ट्रवाद्यांनी घातलेल्या "कडक" बहिष्काराच्या निमित्ताने, अनेक वर्षांपूर्वी वाचलेलं (बहुधा चिं.वि.जोशी?) हे वाक्य आज सहज आठवलं.

  • chk-आम्ही मागे का?

    आधुनिक काळात जगाची विभागणी प्रामुख्याने तीन गटात केली जाते. विकसित, विकसनशील आणि अविकसित. विकसित राष्ट्रांची संख्या विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या तुलनेत नगण्य असली तरी संपूर्ण जगावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या या मुठभर राष्ट्रांचेच वर्चस्व आहे, हे तथ्य नाकारता येणार नाही.

  • अपयश ही अफलातून गोष्ट आहे

    आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्यासाठी अपयशाचा अर्थ आजच्यापेक्षा वेगळा होता. जेव्हा तुम्ही सायकल चालवायला शिकत होता तेव्हा तुम्ही पडलात, बऱ्याचवेळा पडलात. कदाचित तुमचे गुडघे फुटले असतील, रडला असाल पण तुम्ही परत उठलात. पुन्हा पेडल मारायला सुरुवात केली आणि काही काळातच तुम्ही अशी सायकल चालवू लागता की जशी तुम्ही ती गोष्ट बऱ्याच आधीपासून करत आहात.

  • मोबाईल अन् बलात्कार

    मोबाईल फोनच्या वापरामुळे बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांत वाढ होत असल्याचा निष्कर्ष काढून कर्नाटक विधानसभेच्या एका समितीने मोबाईल फोनवर बंदी घालण्याची शिफारस सरकारकडे केली आणि देशभरात …..

  • पारतंत्र्याचे पाश आवळले जात आहेत!

    एखाद्या राष्ट्राची शक्ती प्रामुख्याने तीन घटकांवर अवलंबून असते. पहिला घटक म्हणजे त्या राष्ट्रातील नागरिकांना एकमेकांशी बांधून ठेवणारी संस्कृती आणि परंपरा, दुसरा घटक म्हणजे त्या राष्ट्राची व्यापार-उदिमात सामावलेली आर्थिक ताकद आणि तिसरा व सर्वाधिक महत्त्वाचा घटक म्हणजे त्या देशाची तरूणाई! हिंदुस्थानला कायम अधिपत्याखाली ठेवू पाहणाऱ्या शक्तींनी या तिन्ही घटकांवर आपले लक्ष केंद्रित केले. हिंदुस्थानरूपी कामधेनूचे कायमस्वरूपी दोहन करण्यासाठी ही कामधेनू कायम लाचार करण्याचे षडयंत्र शिजवले गेले. पुन्हा एकदा हिंदुस्थानला हलाल करण्यासाठी कसायांनी आपल्या सुऱ्या परजल्या आणि यावेळी तर इंठाज कसायांचे कौशल्य फिके पडावे, इतके बेमालूम तंत्र वापरले गेले. पहिला आघात या महाकाय राष्ट्राला एकत्र बांधून ठेवणाऱ्या संस्कृतीरूपी धमणीवर केल्या गेला.