AMOR FATI - नशिबावरचा विश्वास
हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. याचा उच्चार कसा करतात मला माहित नाही. मी आमोर फाटी असा करतोय.
याचा अर्थ आहे "नशिबावरचा विश्वास".
आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली तरीही ती तशी घडणे आवश्यक होते... अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्विकारणे. ती गोष्ट आवडली नाही तरीही ती स्विकारणे... अगदी झेन तत्वज्ञानात सांगितलेल्या शांततेने, प्रसन्नतेने स्विकारणे.
थाॅमस एडिसन जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला. त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली होती.
एडिसनने त्याला कशी प्रतिसाद दिला असेल असे वाटते?
"अरे देवा, काय हे... माझं नशिबच फुटकं... माझी सगळी मेहनत वाया गेली... " अशी?
की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?
पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला "अरे तुझ्या आईला आधी बोलाव, तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही"
स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला "आग लागली हे बर झालं माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या."
आमोर फाटी खऱ्या स्वरुपात स्विकारणे म्हणजे काय, याच हे उदाहरण म्हणता येईल - नशिबात असलेली गोष्ट आनंदाने स्विकारणे.
६७ वर्षांचा एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.
मी या आमोर फाटी कल्पनेच्या प्रेमातच पडलोय. का माहितेय? कारण आपलं नशिब स्विकारण्यातली ताकत मला समजलीय. यात अक्षरशः एवढी प्रचंड ताकत आहे की आपल्याला काहीच अशक्य वाटत नाही. प्रत्येक गोष्ट होण्यामागे काही कारण असतं आणि ती गोष्ट सकारात्मकतेने स्विकारणे हे तुमच्या हातात असते.
# कदाचीत तुमचा जाॅब गेला असेल,
# कदाचीत तुमची आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,
# कदाचीत तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तिला असाध्य रोग झाला असेल,
# कदाचीत तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणुक दिली असेल,
# कदाचीत आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल ज्यातून तुमची सुटका नाही,
तुम्ही हे सगळं हसत स्विकारता आणि त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता याला आमोर फाटी म्हणतात.
तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्याच तर तेव्हा तुम्हाला ओके किंवा चांगल वाटावं हा या लेखाचा उद्देश नाही. काहीही घडलं तरी तुम्हाला ते ग्रेट वाटावं आणि तुम्ही ते हसत स्विकारावं हा उद्देश आहे.
जर ते घडलं तर ते घडणारच होतं आणि त्यातून तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्यावा हा आहे.
एखादी आपत्ती आली असतांना शांत रहाणं हे अनैसर्गिक वाटतं.
पण तेव्हा शांत रहा.
जेव्हा आपल्याला हरल्यासारखं वाटेल तेव्हा ते शांत रहाणंच जोमाने प्रवास करण्यासाठी नविन उर्जा देणारं ठरेल...
बास आता, झालं तेवढं खुप झालं अस वाटेल तेव्हा ते शांत रहाणं नवं इंधन देणार ठरेल...
सगळं विपरित घडत असतांना ते शांत रहाणं थिंक बिग सांगणारं ठरेल...
हताशा आली असतांना ते शांत रहाणं तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं ठरेल...
चला मित्रांनो आमोर फाटी स्विकारुया...
-- राम जोशी, अलिबाग
(अनुवाद)
-- संकलन : अमित कुलकर्णी
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..
जागतिकीकरण आणि आधुनिक पाश्चात्य तंत्रज्ञान यांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि प्रसारामुळे जग जवळ येत आहे हे आपण मान्य करुच. पण, याचं मुख्य कारण भाषेचं आदान प्रदान आहे हे ही विसरात कामा नये. कारण, भाषा हे एकमेव माध्यम आज जागतिक स्तरावरील अनेक क्रांती, अनेकविध व परिवर्तनांसाठी जितकं महत्वाचं मानलं गेलं तितकीच महत्त्वता आज भाषेतून होण्याच्या संपर्कालाही प्राप्त होतेय असं तज्ज्ञांच मत आहे.
क्रिकेटचे हे भूत लोकांच्या डोक्यावरून उतरवायचे असेल, तर एक चांगला उपाय आहे आणि तो म्हणजे क्रिकेटसाठी जी मैदाने उभी करण्यात आली आहेत ती सगळी मैदाने इतर खेळांसाठी सक्तीने उपलब्ध करून द्यावीत. या मैदानांवर आधी इतर खेळांना प्राधान्य देण्यात यावे. ही मैदाने हॉकी, फुटबॉल, खो-खो, कबड्डीसारख्या खेळांना अग्रक्रमाने देण्यात यावी. या खेळांच्या वेळापत्रकातून वेळ मिळालाच, तर त्यावर क्रिकेटचे सामने घेण्याची परवानगी दिली जावी.
महाराष्ट्रात दुर्गकारण यशस्वी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर याच किल्ल्यांच्या साक्षीने मराठी आणि मावळी मन लढले! आज किल्ल्यांची दुरवस्था झाली असली तरी निखळलेला प्रत्येक चिरा स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या पराक्रमी पूर्वजांची कहाणी सांगतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य दुर्गविज्ञानाची दृष्टी पाहून म्हणावेसे वाटते.
शेतकर्यांना न्याय देणारी, इतर समाज घटकांसोबतच त्याचाही बरोबरीने विचार करणारी आणि संवैधानिक आधार असलेली यंत्रणा उभी होणे काळाची गरज आहे. हे होत नाही तोपर्यंत या देशाचे दारिद्र्य संपणार नाही. आणि शेतकर्यांचे रस्त्यावर उतरणे बंद होणार नाही.
स्वातंत्र्याचे साठावे वर्ष सगळ्याच नेत्यांनी ‘चिंता वर्ष’ म्हणून साजरे करायचे ठरविलेले दिसते. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या विषयावर चिंता व्यत्त* करताना दिसत आहे. ज्याला कोणताच विषय सुचत नाही त्याच्यासाठी ‘शेतकऱ्यांची दयनीय अवस्था’ हा विषय ठेवलेलाच आहे.
आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चा होत आहे ती केवळ घोटाळ्यांची. प्रत्येक क्षेत्रात घोटाळा आहे आणि त्याचे आकडेही केवळ काही कोटींचे राहिले नसून लाखो कोटींचे झाले आहेत.
मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला आणि मुठा नदीत तो फेकून दिल्याचं म्हटलं जात आहे. राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. संभाजी ब्रिगेडने याआधी दादाजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता. त्यावर बरीच चर्चा रंगली होती. आता पुन्हा ब्रिगेड चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजी ब्रिगेडने राजकीय पक्ष स्थापन केला आहे. काही महिन्यांमध्ये पुणे महापालिका निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिेगेडने हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. कारण काही असो. कृती निषेधार्ह आहे.
मुळात मूर्तीभंजनाची परंपरा अरबस्तानातून आली आहे. जे आपल्याला पटत नाही, जे आपले नाही किंवा ज्यांचे आपण विरोधक आहोत (जे आपले विरोधक आहेत, असा अर्थ नव्हे) ते ते सर्व नष्ट झाले पाहिजे अशी ही धारणा आहे. अरबस्तानातून आलेल्या आक्रमकांनी भारतातील मंदिरे पाडली, मुर्त्या फोडल्या, ग्रंथ जाळून टाकले. ही त्यांची परंपरा आहे. कारण त्यांना चर्चा अमान्य आहे. ख्रिस्ती साहित्यातील एक कथा वाचली होती (कोणत्या पुस्तकात किंवा नियतकालिकात ते आठवत नाही). अरबस्तानातील काही आक्रमक ख्रिस्त्यांच्या देशात गेले. तेथील एका चर्चवर त्यांनी आक्रमण केले व फादरला विचारले की "सांग कोणाचा ग्रंथ महान आहे, तुझा की आमचा? जर तू म्हणालास, तुझा ग्रंथ महान आहे तर आम्ही तुला मारुन टाकू आणि जर तू म्हणालास, आमचा ग्रंथ महान आहे, मग तू आमचा ग्रंथ शिरोधार्थ न मानता तुझा ग्रंथ शिरोधार्थ मानलास म्हणून तुला मारुन टाकू". ही मूर्तीभंजकांची मानसिकता आहे. त्यांना चर्चा नकोय, त्यांना केवळ भंजन करायचे आहे. जो आपल्या विचारांचा नाही त्याच्या विचारांचा आदर करण्याची परंपरा त्यांच्यात नाही. ती परंपरा हिंदूंमध्ये आहे. म्हणूनच आपलं मस्तक गौतम बुद्ध आणि महावीर जैन यांसारख्या महापुरुषांसमोरही आपसुक झुकलं जातं. ही भारतीय परंपरा आहे. भारतीय परंपरा तोडण्यावर भर देणारी नसून जोडण्यावर आणि उभारण्यावर भर देणारी आहे. म्हणून आपल्यात मूर्त्या घडवल्या जातात. श्रद्धेचा विषय सोडा. परंतु मूर्ती घडवणे ही कलाकृती आहे. त्या कलेचा आणि कलाकाराचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे.
१८९६ रोजी चापेकर बंधूंनी व्हिक्टोरिया राणीचा पुतळा विटंबित केला होता. परंतु त्यामागची भावना उदात्त होती. त्या काळी इंग्रजांचे शासन होते आणि आपल्या कृतीतून इंग्रजांच्या साम्राज्याविषयीचा राग व्यक्त करायचा होता. तसेच इंग्रजांना दाखवून द्यायचे होते की भारतीय तरुण तुमच्या क्रूर शासनाविरोधात पेटून उठले आहेत. या भावनेने चापेकर बंधूंनी राणीच्या पुतळ्याला काळे फासले. ते राज्यच आपले नव्हते. आता लोकशाही आहे. कोणतेही सरकार असले तरी आपले भारतीयांचे राज्य आहे. स्वा. सावरकरांनी इंग्रजांचा निषेध म्हणून विदेशी कपड्यांची होळी टिळकांच्या नेतृत्वाखाली केली. हा सुद्धा चीड व्यक्त करण्याचा मार्ग आहे. कारण आपल्या देशात परकीयांचे राज्य होते आणि ते राज्य उलथवून टाकणे हे कोणत्याही देशभक्ताचे परमकर्तव्यच होते. पुढे अशीच होळी गांधीजींनी केली. ती खुप गाजली देखिल. सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते असलेले सावरकर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतः म्हणाले की आता पुढे क्रांती ही बंदूकीच्या गोळीने नव्हे तर मतदानाच्या पेटीत आपले मत टाकून करायची आहे. हे लोकशाहीचे महत्व सावरकरांनी सांगितले आहे. त्याच सावरकरांच्या अंदमानातील काव्यपंक्ती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी खोडल्या होत्या. त्यामुळे कॉंग्रेस आणि अय्यर सुद्धा मूर्तीभंजकांच्या परंपरेत अगदी शोभून दिसतात. ही मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. संभाजी ब्रिगेड ही त्या मानसिकतेची अनुयायी आहे. चर्चा करण्यापेक्षा भांडण, तंटे करायचे, मारामार्या, तोडफोड करायची. कारण असे केल्याने कोणाला उत्तर देणे बंधनकारक राहत नाही आणि त्यांची कृती सुद्धा पूर्ण होते. संभाजी महाराजांची बदनामी केली असे ब्रिगेड म्हणत आहे, त्या ब्रिगेडला गोविदाग्रंजांनी शिवरायांचा रचलेला सुंदर पाळणा माहित नसावाच. असो
१९१० च्या सुमारास लिहिलेले राजसंन्यास हे नाटक कोणाच्याही लक्षात नव्हते. वादासाठी मान्य केले की गडकरींनी संभाजी महाराजांचा अपमान केला. पण त्याचा आता काय संबंध? हा वाद उपटून काढण्याला काहीच अर्थ नाही. राम गणेश गडकरींना हे जग सोडून जवळ जवळ ९८ वर्षे झालीत. त्या नाटकाचा प्रयोगही आता होत नाही. त्यात ते अपूर्ण राहिलेले नाटक आणि जर निषेध करायचाच होता, तर त्यावर सविस्तर लेख लिहून लोकांचे प्रबोधन करता आले असते. मुळात प्रबोधन या शब्दाचीच एलर्जी ह्यांना असावी. कारण प्रबोधन करण्याआधी स्वतःला बोध व्हाया लागतो. असो.
माझे फेसबुकवरील मित्र डॉ. सुबोध नाईक यांनी लिहिलेल्या माहितीनुसार, १९३७ मध्ये मुंबई प्रांताच्या विधानसभेत शिवाजी महाराज युगपुरुष नव्हते असे कॉंग्रेसने सांगितले होते. मग आता गोविंदाग्रजांची मूर्ती हटवणारे ब्रिगेडी कॉंग्रेसचे काय करतील? नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुक पेजवर म्हटले की "संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नाही.. ज्या मर्द मराठ्यांनी केलं त्यांना सलाम" मग आता नितेशरावांचे वडील ज्या कॉंग्रेसमध्ये आहेत, त्या कॉंग्रेसने शिवरायांचा अपमान केला होता. या विरोधात मराठाचा अभिमान वगैरे बाळगणारे नितेशराव कोणती कार्यवाई करणार आहेत? आपल्या वडीलांना राजांचा अपमान करणार्या कॉंग्रेसचा राजीनामा देण्यास भाग पाडतील का? पण असे काही होणार नाही. कारण ह्यांचा पंथ आणि परंपरा मूर्तीभंजनाची आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता या सर्व गोष्टी तोंडी लावण्यापुरत्या आहेत. हे जरी भारतीय असले तरी ही मानसिकता भारतीय नाही. ही वाळवंटाची मानसिकता आहे. ती वाळवंटातून आलेली आहे आणि नतद्रष्टांनी पोसली आहे. संभाजी ब्रिगेडच्या त्या कार्यकर्त्यांना अटक होईलही. पण ही गलिच्छ मानसिकता, ही राक्षसी परंपरा कशी आणि कधी नष्ट होणार? मुळात ती नष्ट होण्याच्या मार्गातच आहे. कारण सज्जन आता जागरुक होत आहेत. त्यामुळे दुर्जनांची कोंडी होत आहे. गोविंदाग्रजांचा पुतळा हटवला या कृतीला प्रत्यूत्तर म्हणून गोविंदाग्रजांचे सहित्य अधिक वाचले आणि खपले जाईल ही आशा आणि खात्री मला आहे. गोविंदग्रजांनी त्यांच्या कवितेत "भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा" असं म्हटलंय. पण बुद्धी नसलेले काही जीव महाराष्ट्रात राहतात हे या घटनेमुळे सिद्ध झाले आहे. तर अरबस्तानातील मूर्तीभंजनाची परंपरा चलवणार्या भारतीय ब्रिगेड्यांचे मी एक कलाकार म्हणून निषेध करतो आणि त्यांनी कितीही मूर्त्या फोडल्या तरी आम्ही विचारांची लढाई विचारांनीच आणि लोकशाही मार्गानेच लढणार, अशी प्रतिज्ञा घेतो. २३ जानेवारी रोजी राम गणेश गडकरींची पुण्यतिथी आहे. आपण सर्व साहित्यप्रेमींनी आपापल्या भागात आणि आपापल्या क्षमतेने ही पुण्यतिथी जागवायला हवी. या दिनानिमित्त गडकरींचे स्मरण करुया, त्यांचे साहित्य वाचूया, विकत घेऊया, साहित्य वाटप करुया किंवा त्यांची नाटके सादर करुया. आपल्याला जे शक्य होईल ते करुया. या भ्याड कृतीचा, या मूर्तीभंजनाच्या परंपरेचा निषेध करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
या आदिवासींकडून दिवसभर ढोर मेहनत करून घेऊन
मजूरी म्हणून शेरभर मीठ त्यांच्या झोळीत टाकणाऱ्या, आदिवासींच्या बायका आपलीच संपत्ती मानणाऱ्या, त्यांना जगण्याच्या साध्या प्राथमिक सुविधांपासून हेतूपूर्वक वंचित ठेवणाऱ्या सुशिक्षित समाजाला आज याच आदिवासींच्या मुलांनी बंदूका हाती घेतल्यावर घाम फुटत आहे. त्यांच्या बंदुकीतून गोळ्या नव्हे तुमची शेकडो वर्षांची पापं बाहेर पडत आहेत. तुम्हाला हे सहन करावेच लागेल.
मतदान केले नाही तर सगळ्या सोयी बरखास्त होतात, याचा एकदा अनुभव घेतला, की लोक अगदी मसणातून उठून मतदान करायला येतील. पाच राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका आणि त्याचवेळी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झालेल्या निवडणुकांचे तुलनात्मक विश्लेषण केल्यास मतदानाची अनिवार्यता किती गरजेची आहे, हे स्पष्ट झाल्याशिवाय राहत नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti