(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • सीकेपी म्हणजे …..

    या एक दोन महिन्यातील वेगवेगळ्या मोर्चांच्या वातावरणामुळे हल्ली लोक खूप चौकशी करू लागलेत हो. म्हणजे,तुम्ही कोणत्या जातीचे, तुम्ही सीकेपी सीकेपी म्हणजे नक्की कोण वगैरे. उत्तरादाखल मी सांगतोच की आम्ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच सीकेपी. साधारणपणे ठाणे मुंबई बाहेरच्या लोकांना हा प्रश्न पडतो. "अच्छा म्हणजे तुम्ही मच्छी खाणारे ब्राह्मण का ?" हे ऐकून तर मला गंमतच वाटते. अहो मच्छी खाणाऱ्या काही ब्राह्मणांनी आम्हाला कधीच मागे टाकलंय. आम्ही सोमवार गुरुवार तरी पाळतो. पण आमचे हे दाते, कुलकर्णी, रिसबूड,जोशी, देशपांडे या आडनावांचे घट्टमित्र तर सगळेच वार सारखेच म्हणत आम्हा सीकेप्यांनाच कुठे काय 'बेस्ट' मिळतं हे सांगतात. म्हणून वाटलं कि या चौकस मंडळींना थोडं आपल्याविषयी सांगावं. खरंतर जातीपातीचे दिवस आपल्या दृष्टीने काही दशकांपूर्वीच संपले असले तरी आपली ओळख देताना काही गोष्टी सांगणे गरजेचं. बघा तुम्हाला पटतंय का... सीकेपी म्हणजे .....

    सीकेपी म्हणजे बाजीप्रभूंचा आवेश,
    सीकेपी म्हणजे बाळासाहेबांचा आदेश,
    सीकेपी म्हणजे गडकऱ्यांचे प्याले,
    सीकेपी म्हणजे आमचे खळे काका आणि मोहिले

    सीकेपी म्हणजे अवधूतच गाणं,
    सीकेपी म्हणजे दिलखुलास जगणं,
    सीकेपी म्हणजे नितांत सौंदर्याच लेणं,
    सीकेपी म्हणजे बुद्धिमत्तेच खणखणीत नाणं

    सीकेपी म्हणजे रविवारच मटण,
    सीकेपी म्हणजे बोम्बलाच कालवण,
    सीकेपी म्हणजे चीम्बोरीचा घट्ट रस्सा,
    सीकेपी म्हणजे चवदार हातांचा रुचकर वारसा

    सीकेपी म्हणजे निष्ठा ,
    सीकेपी म्हणजे विश्वास,
    सीकेपी म्हणजे भरवसा,
    सीकेपी म्हणजे प्रगत समाजाचा खराखुरा आरसा

    सीकेपी म्हणजे नितिमत्ता,
    सीकेपी म्हणजे गुणवत्ता,
    सिकेपी म्हणजे विद्वत्ता,
    सीकेपी म्हणजे क्रांतिकारी विचारांची सुबत्ता,

    सीकेपी म्हणजे धैर्य,
    सीकेपी म्हणजे शौर्य ,
    सीकेपी म्हणजे संकटांशी दोन हात,
    सीकेपी म्हणजे ताठ मानेने जगणाऱ्यांची जात

    देशाच्या उभारणीत हिरहिरीने भाग घेणारा,कला क्रीडा मनोरंजन क्षेत्रात आपली अनोखी छाप पाडणारा, सरकारी प्रशासकीय सेवेत सदैव अग्रस्थानी असलेला पुरोगामी विचारांचा सुशिक्षितांचा हा समाज. स्वाभिमान आणि देशाभिमानापेक्षा जगात काहीही मोठं नाही हे जन्मापासूनच मनावर बिंबवलेला हा आमचा समाज. अल्पसंख्यांक असूनही आरक्षणापेक्षा देश रक्षणासाठी लढणारा आमचा हा समाज. आपल्या संभाषण चातुर्याने, बुद्धिवादाने आणि अर्थातच पाककौशल्याने इतर सर्व समाजबांधवांची हृदये काबीज करणारा हा आमचा समाज. खऱ्या अर्थाने नाती जोडून मैत्रीचे बंध दृढ करणारा आणि या देशाच्या इतिहासात अनेक गौरवास्पद पदे भूषविलेल्या दिग्गजांचा हा समाज. सर्वात महत्वाचे म्हणजे... तुमची जात, तुमचा धर्म कोणताही असो, चांगल्या कामासाठी आजही तुमच्यासाठी आणि तुमच्यापाठी भक्कमपणे उभा राहणारा, तुमच्या दुःखात हळहळणारा आणि सुखात समरस होणारा आमचा हा समाज. अजून काय सांगू.

    एक लाख नसू कदाचित..पण लाखात एक नक्कीच आहोत!

    माझ्या सर्वधर्मीय समाजबांधवांना, मित्र परिवाराला आणि तमाम देशबांधवांना आम्हा सर्व सीकेपी समाजबांधवां तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

    समीर गुप्ते, ठाणे.
    samhere#sameergupte.blogspot.in#sameer6949@gmail.com
    ( आवडलं तर फॉरवर्ड करा ...माझ्या नावासहित केलं तर मला पण आवडेल)

  • स्वतः जळून उब देता आली पाहिजे !

    आपण निस्वार्थी प्रेम करून, जर इतरांच्या जीवनात थोडासाही आनंद निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले तर आपल्या जीवनात आनंदाचे लक्ष लक्ष क्षण येतील.

    काडीकचऱ्यात सडून नष्ट होण्यापेक्षा स्वतः जळून दुसऱ्यांना उब देता आली पाहिजे.

  • काळाचा खेळ

    मनुष्य हा काळाच्या हातातील बाहूले असतो, काळ्-सुत्री बाहूले. तो बरेच काही ठरवतो पण घडतं तेच जे काळ ठरवतो.

    माझ्या लहानपणापासुन पहाण्यातील एक व्यक्ती आहे,खूप कष्टाळु व मेहेनती, आता अन्दाजे वय ५८-६० असेल, पण मेहेनतीने व्यवसाय करायचे. लग्न झाले तेव्हा परिस्थिति अगदिच बेताची होती, कसेबसे खर्चाची तोंड मिळवणी व्ह्यायची, दोन वेळचे साधे जेवण कसेबसे मिळायचे त्यामुळे जीभेचे चोचले पुरवणे तर दुरच... पण मुले मोठी होत होती व संसाराचा गाडा चालू होता. हळुहळू काळ सरला, मुले मोठी झाली, कामधंद्याला हातभार देउ लागली व आर्थिक परीस्थीती सुधारू लागली. त्यातच अचानक वडीलोपार्जीत जमीनीला सोन्याचा भाव आला, पैसा अडका आला, नविन घर, गाडी ई सुखसोयी आल्या व आयुष्य सुखासिन झाले. धंद्यातपण बरकंत आली व सगळेच रुळावर आले. खाण्याची चंगळ सुरु झाली, जे जे पुर्वायुष्यात हुलकावण्या देत होतं ते ते मिळू लागलं.

    एक दिवस साध्या आजाराच्या कारणाने तो मनुष्य माझ्याकडे आला व मला शंका आली म्हणुन रक्त तपासले तर मधुमेह असल्याचे निदान झाले. तो मनुष्य खेळकर स्वभावाचा असल्याने त्याने लगेच मिश्किलपणे हसंतच हे आयुष्याचे नवे वळंण स्विकारले. औषधे, पथ्य पाणी, आहार विहार याबद्दलची माहीती घेतली, मधुमेह झालाय हे कळल्यावरही तो दु:खी न होता त्याने ते लगेच स्विकारले हे बघून मला समाधान वाटले. ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तो जाण्यासाठी उठला व हसंतच मनातील एक गोष्ट बोलला ...... "तरूण वयात ईच्छा असुनही परीस्थीतेने खायला मिळंत नव्हतं व आता हवे ते खायला मिळणार तर खाऊ शकंत नाही" !

    मिही क्षणभर स्तब्ध झालो, तो हसंतच खोलीबाहेर गेला, पण मी मात्र विचार करंत राहीलो की काळाचा खेळ पण काय अजब असतो ......... !!!

    -- डॉ. मयुरेश जोशी

  • भाजपला झाले तरी काय?

    लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित धक्कादायक पराभवाने सध्या भाजपमध्ये प्रचंड निराशा पसरलेली दिसते. पक्षाच्या नेतृत्वाला, पक्षाच्या सिद्धांतांना, पक्षाच्या वैचारिक धोरणाला आव्हान देणाऱ्यांची वाढती संख्या पाहता ही निराशा आता असंतोषातून व्यत्त* होऊ लागली आहे, असेच म्हणावे लागेल. एका छोट्या चकमकीत झालेला पराभव म्हणजे महायुद्धातला अंतिम पराभव नसतो, हे लक्षात घ्यायला भाजपमध्ये कुणी तयार नाही.

  • काळजी

    आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका …

  • राज्यकर्त्यांचे बौद्धिक ‘गहाणखत’?

    अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अभ्यासू आणि राजकारणातील सावध व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत. राज्य गहाण ठेवण्याच्या त्यांच्या वक्तव्यामागील उद्देश हा स्मारकासाठी निधी कमी न पडू देण्याबाबतचा असेलही. मात्र तो व्यक्त करत असताना योग्य शब्दांचा वापर केला जावा. नाहीतर टाळ्याखाऊ विधानं करण्याच्या नादात गफलत होऊन जायची. डॉ. आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून  व्हायचे ते राजकारण आजवर खूप झाले. आता निधीच्या मुद्द्यांवर राजकारण केल्या जाऊ नये. एव्हडीच अपेक्षा..!

  • बेताल आणि बेभान

    अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 

    सुशांत सिंहच्या मृत्यूपासून अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूड मधील नेपोटिझ्म विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. नंतर या केसला ड्रॅगचा अँगल जोडल्या गेल्यावर ड्रग्ज माफियांविरोधातही कंगणाने आवाज उठवला आहे. एकाद्या क्षेत्रात काही चुकीचे घडत असेल तर त्यावर आवाज उठवलाचं पाहिजे. त्यात काहीही गैर नाही. आणि, व्यवस्थेलाही प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार आहेच. पण, हे करत असताना तारतम्य ठेवून बोलणे अपेक्षित असते. महाराष्ट्र पोलिसांबाबत कंगणाने वापरलेली भाषा किंवा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्याचा प्रकार कोणत्याच दृष्टीने समर्थनीय ठरणार नाही.

  • समरसता की समरांगण?

    प्रकाशन दिनांक :- 29/02/2004

    ब्रह्यदेवाने ही सृष्टी निर्माण केली असे आम्ही मानतो. वृक्ष-वेली, पशु-पक्षी, वैविध्यपूर्ण जीवसृष्टी त्यानेच निर्माण केली. असे म्हणतात की, ही संपूर्ण जीवसृष्टी निर्माण केल्यावरही सर्वोत्तम निर्मितीचे समाधान ब्रह्यदेवाला झाले नाही.

  • chk-आम्ही मागे का?

    आधुनिक काळात जगाची विभागणी प्रामुख्याने तीन गटात केली जाते. विकसित, विकसनशील आणि अविकसित. विकसित राष्ट्रांची संख्या विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या तुलनेत नगण्य असली तरी संपूर्ण जगावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या या मुठभर राष्ट्रांचेच वर्चस्व आहे, हे तथ्य नाकारता येणार नाही.

  • वर्क कल्चर अंगी बाणविणे गरजेचे

    जगात अन्याय केवळ दुर्बलांवर होत असतो, हा नियमच आहे आणि तो अन्याय दूर करायचा असेल तर इतरांना शिव्याशाप घालून काही फायदा नाही, आपल्यात प्रथम कौशल्य निर्माण करावे लागते, परंतु आम्हा भारतीयांची मानसिकताच नकारात्मक आहे. कष्ट उपसायची आमची तयारी नसते. शिवाजी जन्माला यावा, परंतु तो शेजारच्या घरात, हा आमचा बचावात्मक पवित्रा असतो,आळस हा आमचा स्थायीभाव आहे, आयते मिळेल तेवढे आम्हाला हवे असते आणि कुणी ते देत नसेल तर त्याच्या नावाने शंख करण्यास आम्ही सज्ज असतो.