वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारतीय संस्कृती खूप दूरवर पसरलेली आढळते. असे असताना आपल्या शेजारी असलेले राष्ट्र तिबेटात तिची पाळेमुळे न आढळणे अशक्यच. अशा आपल्या शेजारी असलेल्या तिबेट राष्ट्रात प्राचीन काळी वैदिक संस्कृती प्रचलित होती.
June 26, 2012
“आज आसपास पाहता असे आढळून येते की बहुतांश लोक कुठल्याना कुठल्या तणावामुळे त्रस्त आहेत. या सततच्या तणावामुळे नाना प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींचा प्रादुर्भाव वाढत आहे. अर्थात प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय शोधीत असतो. काही वेळा हे उपाय व्यवहार्य वाटत नाहीत म्हणून सोडून दिले जातात. मी सुद्धा या अनुभवातून गेलो आहे. बरीच वर्षे असा त्रास मी पण सहन केला.
माझ्या सुदैवाने काही चांगली ज्ञानी माणसे मला भेटली. काही चांगले साहित्य वाचनात आले. मग मी “परिपूर्ण आणि तणावमुक्त जीवनासाठी” काय करावे लागेल याचा शोध सुरु केला. मी निश्चय केला की असाच मार्ग शोधायचा की नवीन तणाव न निर्माण होता, जो पूर्णपणे व्यवहार्य असेल. जो माझ्यासारख्या सर्व सामान्य गृहस्थाश्रमी माणसाला सहजपणे आचरणात आणता येईल. जो मला हळूहळू का होईना बऱ्यापैकी “परिपूर्ण, तणावमुक्त आणि आनंदी जीवनाकडे” घेउन जाईल.
January 31, 2026
ध्या भारतात चर्चा केवळ महागाईची आहे. विरोधी पक्षांना महागाईच्या रूपाने आपल्या तलवारी पाजळण्यासाठी चांगला मुद्दा मिळाला आहे आणि तिकडे सरकारही प्रचंड अस्वस्थ आहे. महागाई सध्या राष्ट्रीय संकट ठरले आहे.
April 13, 2008
मराठा समाजाचा विकास खुंटला तो, त्यांच्या राजकारणाच्या व्यसनामुळे. ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी आपले खिसे भरून घेतले. त्यांनी सतराशे साठ घोटाळे, भ्रष्टाचार करून आपली घर पैशाच्या पोत्यांनी भरली आणि दुर्दैवाने मराठा समाज अशाच लोकांना त्यांचा आदर्श मानू लागला..फास्ट पैसा... गाडी, बंगला, पाटीलकी, नाव, इज्जत, मान या गोष्टींसाठी मराठा समाज राजकारणात उतरून कुठल्याही थराला जाण्याची तयारी ठेवू लागला..आणि या सगळ्या गोष्टींमधून त्याला सवय लागली ती 'सगळं आयतं, फुक्कट' मिळवण्याची..!
मेहनत नको.. बुद्धी वापरायला नको.. गावा-गावात मंडळं उभी करायची... गावाचा राजकारणासाठी उपयोग करून घ्यायचा.. आपलं नाव मोठं करून घ्यायचं कि संपलं..! मग लागलाच भिक मागायला राजकीय पक्षांकडं अन नेत्यांकडं तिकिटासाठी. मग त्यांचे तळवे चाटण आलंच...खोटी आश्वासनं.. दिशाभूल करणं .. सगळ्या गावाला राजकारण्याच्या धंद्याला लावण.. गावामध्ये भावकीत भांडण लावून देणं.. फुट पाडण हे सुद्धा आलंच.. मग गावं कसं एक राहील? आणि कसा आपला मराठा समाज हा एक- "समाज" म्हणून एकत्र येऊन एकमेकांना मदत करेल?
हे राजकारणी गावा-गावांमध्ये, भावकी-भावकीमध्ये भांडण लावून देणार.. मतासाठी फोडाफोडी करणार.. एकमेकाच्या मळ्यातल-शेतातलं पाणी अडवून धरणार.. शेताचा बांध फोडायला लावणार.. मग कसा आपला मराठा शेतकरी समाज तरी एकोप्यानं राहील..? गावात तरुण पोरांना हाताशी ठरून मंडळ स्थापन करायची... क्रिकेट च्या म्याचेस लावायच्या.. मग तरुण पोर्र पण राजकीय पक्षांच्या नावाखाली 'ब्यानरबाजी' सुरु करतात.. अगदी ५-६ वी मधल्या पोरांपासून पस्तीशी मधल्या तरुणांपर्यंत सर्वांची मुंडकी दिसतील अशा प्रकारे २५-३० जणांचे फोटो असणारे ब्याणार लावायचे.. अगदी गावच्या हागणदारी पर्यंत मग भिडतात आपलीच पोरं आपल्यात..कशासाठी..? राजकारणासाठी.. या राजकीय नेत्यांसाठी.. !
दारू पाजणारे हे पुढारी..आपल्या पोरांना मारामाऱ्या करायला पाठींबा देणार आणि निवडणुकीच्या वेळी त्याचा प्रचाराला उपयोग करून घेणार..आपला पोरगा मात्र हीच दुनियादारी करत बसतो..गावचं राजकारण त्याला पुरत लुबाडून टाकत..ना तो नीट शिक्षण घेत..ना तो नोकरी धंद्यात सेटल्ड होत..मग जातो वाया..आई-बाप..पोरगा वाया जायला लागला म्हणून फसवून कुणाच्या तरी पोरीला गळाला लावतात..मग आमच्या तरुण मराठा पोरांचे बढवलेले बैल होतात . बिनकामाचे..!
बोला.. अजून नादाला लागायचं आहे का राजकीय नेत्यांच्या आणि पक्षांच्या.? ब्राह्मणांना शिव्या घालून त्यांची काय वाकडी झालीयेत .?? ब्राह्मण समाज त्यांच्या बुद्धीने शिक्षण, नोकरी व व्यवसाय क्षेत्रात प्रगती करतोच आहे. १९४८ मधे नथुराम गोडसे या ब्राह्मणाने महात्मा गांधींची हत्या केल्यानंतर देशातील समस्त ब्राह्मण समाजाची घरे जाळण्यात आली..त्यांना बेघर केलं गेलं.. ते गावोगाव सोडून शेतीवाडी जमीनजुमला सोडून शहरांकडे विदेशात निघून जाऊ लागले. आजही तुम्हाला गावागावांत अगदी एखाददुसरं ब्राह्मणाच घर दिसेल...
तर मग कळीचा सवाल हा आहे कि, गेल्या ६५ वर्षे महाराष्ट्रातील ४५,००० खेड्यागावांमध्ये ब्राह्मण नसताना मराठा समाजाची अधोगती कुणी केली..? ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, आमदार, खासदार कुणाचे होते..? सगळे मराठाच होते ना..? का मग मराठा समाजाची अधोगती का झाली..? त्यांना शिक्षणापासून वंचित कुणी ठेवलं?? खेड्यापाड्यात मराठ्यांची सत्ता असून देखील त्यांचा विकास का झाला नाही...?? बऱ्याच मार्केट मध्ये हमाल म्हणून काम करणारे मराठा तरुणच का ? राजाचे हमाल कसे झाले..? कोणी केले..? याला जिम्मेवार कोण..? मग मराठा समाजाला शेंडी लावणारे कोण ब्राह्मण कि मराठा नेते..? म्हणून मराठा समाजाने अन्य कुठल्याही समाजावर टीका, द्वेष करीत न बसता अन्य सर्व समाजांना मित्र बनवून .. आपल्या मराठा समाजातील तरुण मंडळींनी एकमेकांचा आधार घेत शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात प्रगती करावी.
मराठा समाजाच्या अधोगतीचे कारण ब्राह्मण, मागासवर्गीय किंवा अन्य कोणताही समाज नसून..सत्तेत असून सुद्धा मराठा समाजाला आधार न देणारे.. मराठा तरुणांच्या शिक्षण-नोकरी मध्ये मदत न करणारे आणि मराठा शेतकऱ्यांना वार्यावर सोडणारे आपले मराठा नेते आहेत.मराठा समाजाने आपल्या समाजातील नेत्यांना दोषी न धरता अन्य कोणत्याही समाजावर स्वतःच्या अपयशाचे खापर फोडणे म्हणजे..साप सोडून भुई धोपटणे होय..वेळीच जागृत होऊन एकत्र झालो नाहीत तर राजाचे हमाल झालेत पण येणारी जनरेशनचे काय होईल याचा विचार कराल हि अपेक्षा. वर्तमानात समाजात लाखो करोडों फक्त शिवाजी आहेत, परंतु एक हि "छत्रपती शिवरायां सारखे " काम करताना दिसत नाहीत.
वैचारिक सिद्धांत पायदळी तुडवणारे उथळ आणि स्वयंघोषीत नेते मराठ्यांच्या अधोगतीस आजवर कारणीभुत ठरलेत आणि यापुढेही ठरतील.. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर मराठा समाजाचा स्वःतावरील रोष मराठा नेत्यांवरच उलटवला.
असं म्हणतात की.." मराठे युद्धात जिंकतात पण तहात हरतात" पण आजची परिस्थिती पाहून वाटतंय की तहात मराठा समाज हरला.. आणि स्वयंघोषित मराठा नेते जिंकले.. पण या संधीसाधू नेत्यांमुळे मराठा समाज अजून एकजूट होणार.पण ह्या पुढे ह्या मराठा नेत्यांना समाज कधीही माफ करणार नाही.
August 29, 2017
आज ‘नरकचतुर्दशी’.. आपल्यासारख्या चाकरमान्यांच्या दृष्टीने हा दिवाळीचा पहिला दिवस असला तरी वसुबारसेपासून सुरू झालेल्या दिवाळसणाचा आजचा तिसरा दिवस..बहूजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस.. नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले असा पुराणांमधे उल्लेख आहे.
October 29, 2016
महात्मा गांधी आज अनेकांना हवे आहेत, अनेकांना नको आहेत. आऊटडेटेड माणसं व तत्वज्ञान आजच्या परिस्थितीत वापरुन तरुणांना काही संदेश देतांना आजच्या परिस्थितीत relevance, त्याचं दाखवता आलं तरी पुरेसं आहे. महात्मा आज बंदिस्त झाले आहेत. नोटात महात्मा, फोटोत महात्मा, मात्र प्रत्यक्ष जीवनात सगळा खोटाच व्यवहार.
May 9, 2019

हॉलीवूडच्या इतिहासात काही विलक्षण सिनेमे बनले आहेत.
या सिनेमांनी पूर्ण जगभरात आपला प्रभाव पाडला आहे.
जगाभरात या सिनेमांचे चाहते आहेत..
पिढ्यान पिढ्या या सिनेमांची पारायणे होताहेत..
अशा सिनेमांमधला बिनीचा शिलेदार म्हणजे अर्थातच 'गॉडफादर'.
गॉडफादर बद्दल प्रचंड अख्यायीका आहेत..
याच्याबद्दल लिहीले गेलय तितके फारच कमी सिनेमांबद्दल झालय
किंबहुना साडे चार दशके होउनही ही फिल्म बघितली जातेय..
आजही त्याच्यात ते अपील आहे..
याला कारणीभूत बऱ्याच गोष्टी आहेत..
फ्रान्सीस फोर्ड कोप्पोलाचे जबरदस्त दिग्दर्शन..
मारीओ पुझोची अजरामर कादंबरी व त्यावर बेतलेली पटकथा.... ब्रँडो, डि निरो व पचीनो यांनी साकारलेल्या तगड्या भूमिका..
आणि या सिनेमाचे थीम म्युझीक.. निनो रोटाचे
निनो रोटा हा खरेतर एक इटालीयन संगीतकार..
इटालियन माएस्त्रो फ्रेड्रीको फेलीनी च्या सर्व सिनेमांचा संगीतकार..
कोप्पोला ने गॉडफादर च्या मुख्य थीम व पार्श्वसंगीत यासाठी निना रोटाला करारबद्ध केले.
चित्रपटाचा विषय इटालियन माफिया व कुटुंब यांशी निगडीत..
शिवाय चित्रपटाला असलेले सिसीली चे कनेक्शन..
(सिसीली हा इटलीचा तो कुप्रसिद्ध भाग जिथे माफियाचा उगम झाला)
हे सगळे समजून सिनेमात सिन-पूरक संगीत देणे आवश्यक होते..
अमेरिकेतले कथानक..त्याला वेगळे पार्श्वसंगीत..
कथा इटली सिसीलीला सरकली की वेगळे वाद्य व पार्श्वसंगीत..
शिवाय चित्रपटात कधी मधी डोकावणारी गाणी..
पुन्हा तीही इटालियन लेहेजा असणारीच..
या सर्व गोष्टींना निनो रोटा यांनी त्यांच्या संगीताने लिलया पेलले..
इतके की आजही साडेचार दशकांनीही गॉडफादर सिनेमाचे हे संगीत, ही थीम प्रचंड लोकप्रिय आहे.
पहिल्या भागात गॉडफादरच्या लाडक्या मुलीच्या म्हणजे कॉनीच्या विवाहात पहिल्यांदा ती आपल्या कानी पडते.
नंतर पहिल्या व दुसऱ्या भागात ही थीम वेगवेगळ्या स्वरुपात आंपल्या समोर येत राहते..
त्यातल्या प्रसंगानुरुप निना रोटा व कोप्पोला यांनी वाद्यांची निवड केली...
ट्रंपेट च्या रुपात व्हिटो कॉर्लिऑनीची आसहाय्यता आपल्याला भेटत राहते. कधी मँडोलीन बरोबर कॉर्लिओनी फॅमिलीचे इटालियन व सिसीली कनेक्शन दाखवत राहते. कधी ॲकॉर्डिअन बरोबर ती आपल्याला सिसीलीला घेउन जाते. म्हणजे जसे ॲकॉर्डिअन वाजू लागते तसे समजावे की आपण पुढच्या सिनमधे सिसिलीत जातोय. पुढेपुढे याची इतकी सवय होते की अकॉर्डिअन वाजू लागले की आपण मनाने आधीच सिसीलीत पोहोचतो. नंतर आपल्याला मायकल किंवा तरुण व्हिटो दिसतात.
हा पूर्ण थीमचा संच गॉडफादर व्हॉल्टझ म्हणून सुप्रसिद्ध आहे.
काही खास प्रसंग जेंव्हाचे सिन तुम्ही हे थीम ऐकलेच पाहिजे ते म्हणजे कॉनीच्या लग्नात कॉनी आणि व्हिटो यांनी केलेला डान्सचा सिन, डॉन व्हिटोवर झालेला प्राणघातक हल्ला, मायकेल चे सिसीलेतले प्रसंग विशेषतः त्याचे अपोलोनियाच्या प्रेमात पडणे (struck by a thunder bolt), सन्नीच्या मृत्युसमयीचा प्रसंग, मायकेलचे डॉन बनणे, दुसऱ्या भागात तरुण व्हिटोचे डॉन सिसीओला मारुन आपल्या आई,वडील व काकाच्या मृत्युचा बदला घेणे, मायकेलच्या आईचा मृत्यू, आपल्याच भावाला फ्रेडोला मायकलने पाण्यात बुडवून मरवणे, बायको के चे मायकेलला सोडून जाणे व हताश एकाकी मायकेल चे मागे उरणे.. सर्व प्रसंगात निना रोटाचे संगीत तुम्हाला सतत साथीला असतं..
ते संगीत आर्त आहे, भिडणारे आहे..
निना रोटाचे या संगीतामुळेच गॉडफादर हा निव्वळ माफिया मुव्ही न बनता ती एक मानवी भावनांची व एका कुटुंबाच्या अविस्मरणीय प्रवासाची आख्यायिका ठरते. आपण म्हणूनच आजही या सिनेमाशी इतक्या भावनीकरित्या जोडले जातो..अन वारंवार या अख्यायिकेकडे ओढले जातो..
निना रोटाला या थिमसाठी ऑस्कर नॉमिनेशन मिळून परत काढले गेले. कारण यातली एक छोटी सुरावट कुठल्यातरी त्याच्याच आधीच्या सुरावटीशी मिळती होती. 'ओरीजनल स्कोअर' बद्दल आग्रही असणारी अकॕडमी त्याबद्दल तडजोड करणार नव्हती. त्यामुळे ज्या संगीतासाठी खरे तर निना रोटाला थेट ऑस्कर मिळायचा होता, तिथे नामांकनही मिळाले नाही.
गोल्डन ग्लोब आणि ग्रॅमी मिळूनही हे यश अधुरे राहिले..
खरेच न पटणारे आहे पण सत्य आहे..
जर डॉन व्हिटो कॉर्लिओनी ही खरी व्यक्तीरेखा असती तर..?
त्यांनी ॲकॕडमीला निना रोटाला ऑस्कर द्यायला लावले असते..
तो एवढच म्हणाला असता..
'Well..I will make them an offer they wont refuse...'
टीप :
खाली या थीमच्या काही लिंकस देत आहे
2. जगप्रसिद्ध 2Cellos या जोडगळीने फक्त व्हायोलिनवर वाजवलेली गॉडफादर थिम ही नक्की ऐकायलाच हवी.
September 7, 2022
१ जानेवारी २००२ या दिवशी युरो या चलनानं त्या-त्या देशाच्या मूळ चलनाची जागा घेतली. म्हणजेच जर्मनीत १० मार्कची नोट घेऊन आता कुणी बाजारात गेलं तर त्या चलनाला काही अर्थ उरला नव्हता. फक्त युरोमध्येच सगळे व्यवहार होणार असं आता ठरलं होतं. यामुळे आता १२ देशांमधल्या साधारण ३० कोटी जनतेला फक्त युरो हे एकच चलन वापरायचं होतं.
January 5, 2019
….. वसुंधरेला मात्र चंद्र एकच असतो !
January 14, 2011
शीतपेय हे २१ व्या शतकाची तंबाखू. कुठेतरी हे वाक्य वाचले होते.. मनोमन पटले एकदम.
July 1, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti