(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बाळक्रीडा अभंग क्र.३७

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      September 17, 2018


  • फ्रीडम वॉल

    मुलांना जाणवणारा हा भाषिक अडसर दूर करुन त्यांना त्यांच्याच भाषेत व्यक्त होण्याची संधी आसगावच्या जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली. शाळेतीलच एक भिंत काळ्या रंगाने रंगवण्यात आली. या भिंतीवर मुलांनी त्यांच्या मनातलं बिनधास्त लिहावं असे सांगण्यात आले. मुख्य म्हणजे भिंतीवर लिहिताना नाव न लिहिण्याची सूट देण्यात आली. या भिंतीचं फ्रिडम वॉल असं नामकरण करण्यात आलं.

      August 12, 2014


  • गणपती प्रिय दुर्वा

    गणपतीला दूर्वा अत्यंत प्रिय आहेत. गणपतीची पूजा दूर्वाच्या शिवाय होऊ शकत नाही असे मानले जाते. गणपतीचे स्थान मूलाधार मानले जाते. मूलाधार चक्राशी निगडित अवयव म्हणजे पुरुषांचे प्रोस्टेट व व्रुषण ग्रंथी आणि स्रियांचे गर्भाशय व ओव्हरीज हे होत. जे देवाला प्रिय ते माणसाला उपयुक्त . गणपती प्रिय दूर्वा सेवन केल्याने स्रियांच्या ओव्हरीज वगर्भाशयातील व पुरुषांच्या प्रोस्टेटमधील हीट कमी होते. असा अनुभव आहे. त्यामुळे होणारे त्रास म्हणजे वय वाढल्यावर झोप न लागणे,पायाना सूज येणे, काही प्रमाणात पाय दुखणे, टाचा दुखणे वगैरे त्रास कमी होतात.

    पाच दूर्वा रोज खाल्यातर फायदा होतो. हे शहरातील जीवन पध्दतीत शक्य होत नाही. त्यासाठी एकदा एक दूर्वांची जुडी आणून थोडेसेच पाणी घालून मिक्सरमधे चटणी करावी. फडक्यातून पिळून रस काढावा. हा रस नासू नये म्हणून त्यात दीड पट मध घालून ढवळून बाटली मधे भरून ठेवावे. दररोज ह्यतील पाव चमचा मध वाटी भर पाण्यात चांगला विरघळवून ते पाणी प्यावे. असे दिवस भरात दोन वेळा करावे. ह्या मुळे वरील त्रास कमी होतात. मी दूर्वाच्या टिंक्चरपासून साखर करून पेशंटना देऊन टाचा दुखणे, पायावरील सूज, वयस्कमंडळींची चिड चीड, झोप न लागणे हे आजार बरे केले आहेत.

    अरविंद जोशी BSc.
    9421948894

    कृपया लेख फाँरवर्ड करताना त्यात कोणताही बदल करू नये.

      April 10, 2017


  • ‘सु’संवाद साधा !!

    ‘शादी का लड्डू’ खाऊन झालेल्यांना प्रत्येक वेळेस तो पचतो असं नाही. काही काळातच छोट्या छोट्या कुरबुरी सुरु होतात. या छोट्या छोट्या कुरबुरी दुर्लक्षित ठेवल्या तर काही काळातच मोठ्या कटकटी बनतात आणि हळूहळू त्या जोडप्यांत वादविवाद सुरु होतात. या अडचणी ठरवून केलेल्या लग्नांतच (arranged marriage) येतात असं नाही हं!! काही महिने ते काही वर्षं ‘डेटिंग’ नंतर झालेल्या प्रेमविवाहातदेखील हे खटके मोठ्या प्रमाणात उडत असतात हे अशा कित्येक केसेस हाताळल्यावर सांगू शकतो.
    या तक्रारींची कारणे दोनच. त्या जोडप्यात १. संवादाचा असलेला अभाव आणि २. सततचा विसंवाद. एखाद्या नवीन लग्न झालेल्या जोडप्याने चार प्रमुख बाबींत आपल्या जोडीदाराशी मोकळा संवाद साधायला हवा. या चारही बाबींबद्दल आपण यथावकाश सविस्तरपणे जाणून घेणार असलो तरी आज तोंडओळख करून घेऊया!
    १. मानसिक:
    आपली भावनिक गुंतवणूक, त्यामागील कारणे, क्षमता इत्यादि गोष्टींचा यात समावेश होईल.
    २. बौद्धिक:
    आपले क्षेत्र, सभोवतालची सामाजिक/ राजकीय परिस्थिती इथपासून ते आपल्या आवडीनिवडींपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींचा यात अंतर्भाव होईल.
    ३. शारीरिक:
    वैवाहिक जीवन सुखासमाधानाचे असावे याकरता आपल्या शारीरिक गरजा, आवडीनिवडी यांबाबत आपल्या जोडीदाराशी संवाद साधणे.
    ४. अन्य:
    जसे की आपल्या कुटुंबातील अन्य सदस्य, मित्रपरिवार, आर्थिक बाबी इत्यादि.
    या चार मुद्यांच्या अनुषंगाने एकमेकांशी संवाद साधताना कोणतेही पूर्वग्रह ठेवू नका. अगदी कोऱ्या पाटीने एकमेकांना सामोरे जा. आपल्याला संपूर्ण आयुष्य एकमेकांसह अतिशय सुखाने व्यतीत करायचं आहे हा विचार डोक्यात सतत असू द्या. या मुद्यांतील ज्या गोष्टींत मतभेद असतील त्यांवरही पुन्हा संवाद साधून मार्ग काढणे सहजशक्य असते हेदेखील ध्यानी असू द्या. लग्नच कशाला; कोणतेही नातेसंबंध बळकट होत असतात ते संवाद साधल्यानेच. कितीही वर्षे एकमेकांना ओळखत असलात तरी पुन्हा एकदा अशी सुरुवात करा. नव्या लग्न झालेल्या जोडप्यांनीच नव्हे तर; ‘लग्नाळलेली’ जोडपी आणि छोट्या छोट्या कुरबुरीवाली विवाहित जोडपी अशा सगळ्यांनीच…..सुसंवाद साधा!!
    © वैद्य परीक्षित स. शेवडे; एम.डी. (आयुर्वेद)
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।।
    0251-2863835
    (लेखक हे आयुर्वेदीय वंध्यत्व उपचार तज्ज्ञ असून विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशन करतात.)

      February 4, 2017


  • रंग बदलणारं झाड – करू

    रंग बदलण्याची गोष्ट  निघाली  तर सरड्याचे नाव पहीले घेतले जाते  मात्र  नागपूर जिल्ह्यातील  वैनगंगा नदीकाठच्या आभोरा जंगलातील खोलेश्वर(कोलेश्वर) पहाडावर एक असं झाड पाहावयास मिळतं की ते बदलत्या रूतूनुसार आपला रंग बदलतं. ह्या जादूई वृक्षास परीसरात करू चे झाड म्हणून ओळखल्या जाते.

      December 15, 2019


  • मुक्ताबाई-गुप्ताबाई

    रत्नागिरी जिल्ह्यातील ताम्हाणे राजापूर या ठिकाणी गुप्ताबाई देवीचे मंदीर वसलेलं आहे. गुप्तदेवी म्हणजे निर्गुण स्वरुपाची देवी असा आशय प्रतीत होतो,

      October 5, 2013


  • अर्थाने समर्थ होण्याचा स्वार्थ

    अर्थाने समर्थ होण्याचा स्वार्थ

    ख्रिस्त पूर्व काळात विकसित झालेल्या सिंधू खोऱ्यातील सभ्यतेमध्ये प्रगत आणि भरभराटीची आर्थिक व्यवस्था होती. सिंधू खोऱ्यातील लोक शेती, पाळीव प्राणी, तांबे, कांस्य आणि कथील यापासून अवजारे आणि शस्त्रे बनवत तसेच मध्यपूर्वेतील काही देशांशी व्यापारही करत.

      December 26, 2022


  • जूलियन एसनर- दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

    जुलीएन चा जन्म फ्रांस मधील एंगलूर येथे ३० नोव्हेंबर १८९९ रोजी झाला. ती जुजू ह्या नावाने सुद्धा ओळखली जाई.ती फ्रांस व इंग्लंडसाठी हेरगिरी करत होती. तिचे कोड नाव क्लेयर होते. १९२४ मध्ये तिचे लग्न लुएरशी झाले.तिला एक मुलगा झाला. १९२७ साली लुएरचा मृत्यू झाला. तिचे कुटुंब हनोई येथे स्थाईक झाले ती तिथे इंग्लिशची शिक्षिका होती.

      December 15, 2022


  • गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचे छिन्नविच्छिन्न शिल्प

    उन्मादाच्या नशेत झिंगून आपल्या विकृतीचे भयंकर प्रदर्शन करताना , मांडलेले थैमान सर्वांना भयकंपित करणारे होते . विच्छिन्न झालेले ते शिल्प पाहताना यातनांनी तडफडणाऱ्या आपल्या आत्म्याला किती भयंकर क्लेश झाले असतील याची कल्पना सुध्दा करता येत नाही .

      September 9, 2024


  • समाजाचं मन बदलायला हवं !

    समाजमनाला आज स्त्री – पुरूष यांचा एकत्रीतपणे विचार करायचा सोडून देत त्यांच्या स्वतंत्रपणे विचार करायला सुरूवात करायला हवी. तरच आपल्या देशात स्त्री- पुरूष समानता कर्या अर्थाने अस्तित्वात येईल.

      June 7, 2013