(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अजीर्ण

    न जीर्यती सुखेनान्नं विकारान् कुरुते डपिच |
    तदजीर्णमिति प्राहुस्तन्म्ला विविध रुजः |

    सेवन केलेल्या आहाराचे सम्यक् परिणमन (पचम) न होता तो अपक्वावस्थेतच राहणे म्हणजे अजीर्ण होय. अगिमांद्यजनीत हे अजीर्ण विविध प्रकारच्या रोगांचे कारण होऊ शकते. ‘डॉक्टर, मला अजीर्णाचा त्रास आहे.’ अशी तक्रार प्रत्येक डॉक्टरांकडे घेऊन दिवसांतून एखादा तरी रुग्ण सर्रास पहायला मिळतो. साधारण २५ टक्के तरी लोक अजीर्णाने ग्रासलेले आहे.

    आता आपण जर ही पाश्चाेत्य जीवनशैली बदलून आपली भारतीय संस्कृतीचे अनुकरण केले नाही, तर ही टक्केवारी वाढत जाईल. अजीर्णाचे रुग्ण वाढतील व त्याचबरोबर अजीर्णाने मोठ-मोठ्या आजारांना आमंत्रण मिळेल.

    अजीर्णाची कारणे
    विषमाशन – आयुर्वेदामध्ये आहार हा कधी घ्यावा, कसा घ्यावा, कीती घ्यावा, कुठल्याक्रमाने घ्यावा, कुठल्या संयोगाने घ्यावा, कीती शिजलेला घ्यावा व कोणत्या विधिनुरूप घ्यावा याचे काही नियम सांगितलेले आहे. पण आपण मात्र या नियमांविरुद्ध जेवण घेतो यालाच विषमाशन म्हणतात. आज बहुतांशी आई-वडिल दोघेही काम करतात. त्यामुळे जेवण हे एकदाच बनवले जाते व तसेच ते फ्रीजमध्येही ठेवले जाते. संध्याकाळी आल्यावर मायक्रोव्हेवमध्ये गरम केले की झाले. पण या सवयीमुळे आपली फ्वन शक्ती कमी होते. ‘रेड टू यूज’ पॅनटचा जास्त वापर घरात व्हायला लागला. क्षारयुक्त व रसायने वापरून टिकवलेल्या पदार्थांमुळे पौष्टिकता कीती? बर्यासचवेळा सकाळी डब्यासाठी शिळेच अन्न नेले जाते. ताज्या फळाऐवजी ‘फेव्हरेट जूस’लाच सगळ्यांची जास्त पसंती आहे. भाज्यापण आठवड्याभराच्या फ्रीजमध्ये भरून ठेवल्या जातात. त्यामुळे ताजेपणाचा विचार हा केलाच जात नाही. वेळेअभावी जीवनशैली बदलली, पण आजारही वाढले.

    आज हॉटेलमध्येही सर्रास खाणे-जेवणे वाढले. भाजी, मांस, मटण याची स्वच्छता, निवडणे हा विचार तर केलाच जातच नाही. जीभेला बरे लागते ना मग झाले. खाली आसनमांडी घालून शांत जेवणे ही प्रथा तर आता नष्टच झालेली आहे. हॉटेलमध्ये म्हटलं की परत वर खुर्चीवर बसून गप्पा गोष्टी करत टीव्ही पाहत जेवले म्हणजे आपण काय खातो व कीती खातो याचा तर अंदाजच लागत नाही. फॅशन म्हणून चिकन-मटण खाऊन परत वर आणि आईस्क्रीम खातात किंवा स्वीट डीश खातात. परिणामतः शरीरात कफदोष वाढतो व खालेले पचत नाही व सर्दी, खोकला सारखे त्रासही होतात.

    त्याचप्रमाणे हल्ली आपण संध्याकाळी कामावरून घरी येताना समोसा, वडा, केक, भजी यासारखे पदार्थ आणतो, म्हणजे जेवणापूर्वी खाल्ले जाते. जेवण बनवायला उशीर असल्याने हा पर्याय निवडतात. पण याने होत काय तर साहजिकच रात्री उशिरा जेवले जाते. त्यानंतर सोफ्यावर आडवे पडून मालिका बघण्यात अभ्यास करण्यात चॅट करण्यात वेळ घालवतो. जेवणं होईपर्यंत मध्यरात्र होते व आपण लगेच झोपतो. त्यामुळे खाल्लेले जेवण पोटात तसेच पडून राहते. रात्रीचे अन्न पचन नाही. त्यामुळे सकाळी शौचाला होत नाही. पोट साफ नसल्यास निरुत्साह वाटतो. परत सकाळी बाहेर पडायच्या गडबडीत नाश्ता करतो किंवा तसेच बाहेर पडतो. मग दुपारी आणलेला डबा भूक लागू दे किंवा न लागू दे वेळ झाली की खातो. पौष्टिक अन्न जरी असले तरी शांतचित्ताने न जेवल्यास किंवा टेन्शन, राग, दुःख, भीती अशा भावना मनात असल्यास पचन नीट होत नाही व खाल्लेले अंगाला लागत नाही.

    वेगविधारण – खाल्लेले अन्न पचते की आपल्याला सपाटून भूक लागते, सकाली उठल्या उठल्या शौचास जाण्याची संवेदना होते, पण सकाळी शौचास न झाल्याने अवेळी होते व मग वेगाचा धारण केला जातो व दोष प्रफुल्लित होऊन पचनसंस्था बिघडते.

    दिवास्वाप – रात्रीजागरण – आपल्या जीवनाचं सगळंच वेळापत्रक बदलल्याने आपण रात्री उशिरा झोपतो व ती झोप पुरी करण्यासाठी दिवसा झोपतो. अति गुरु-शीत-स्निग्ध-विदाही अशा आहाराचे सेवन करणे या सर्व कारणांनी अग्निमेद होतो आणि अजीर्ण ही व्याधी उत्पन्न होते.

    काही वेळा द्रवरूप पित्त वाढते. प्रफुल्लित झालेले पित्त व कफाने अवरोध होऊन अन्न पोटात पडून राहते. पित्ताच्या उष्ण, तीक्ष्ण गुणांमुळे कोष्ठाच्या इतर भागात प्रक्षोभ होऊन भूक लागल्यासारखी वाटते. ही खरी भूक नव्हे. अशावेळी आहार घेतला जातो व साहजिकच अजीर्णाची उत्पत्ती होते. म्हणूनच खूप खाल्लेतरीही अंगाला लागत नाही.

    अजीर्णाची सामान्य लक्षणे
    भूक न लागणे, तोंडास चव नसणे, पोट जड वाटणे, पोटात आवाज येणे, गॅस होणे, कधी पातळ संडास कधी मलावरोध, अंग दुखणे, अंग जड होणे, डोके दुखणे, भरभूर जांभया येणे, अंग मोडल्याप्रमाणे होणे.

    आमाजीर्ण असल्यास कफ वाढतो व थोडसेही खाल्ले तरी पोटजड होते. रुग्णास अम्लरहित अशा किंवा ज्या प्रकारचे अन्न घेतले असेल त्याचा रस गंध असलेल्या ढेकरा अतिप्रमाणात येतात.

    विदग्धाजीर्ण – पित्तप्रकोपाने विदग्धाजीर्ण होते. घशाशी आबंट, तिखट, कडवट येणे, छातीत पोटात जळजळणे, जास्त घाम येणे व तहान फार लागणे. अशी लक्षणे दिसतात.

    विष्टब्धाजीर्ण – या प्रकारात वायू व पुरीष यांचा अवष्टंळ होतो. विविध प्रकारच्या वेदना, आध्यान, डोकेदुखी, अंग दुखणे अशी लक्षणे दिसतात.

    अजीर्णामध्ये घ्यायाची काळजी व उपचार
    अजीर्ण झाले असता, सर्वप्रथम खाल्लेले अन्न जोपर्यंत पचत नाही तोपर्यंत उपाशी रहावे. नंतर जसजसा अग्धी वाढेल, भूक लागेल त्याप्रमाणात, विविध प्रकारचे यूश, लिंबू सरबत, ताक, पेया, फलरस आणि द्रवाहार द्यावा.

    जेवणाच्या वेळा चुकवू नये. दुपारचे जेवण १-२ च्या दरम्यान व रात्री शक्यतो ९ च्या अगोदर. भूक नसल्यास जेवणापूर्वी आल्याच्या तुकड्यावर सैंधव घालून चघळावा. रात्री नुकतेच सॅलाड वैगेर खाऊ नये. अन्न शिजवूनच खावे.

    जमत असल्यास आठवड्यातून एक वेळ उपवास करावा. साबुदाणा खिचडी खाऊन नव्हे, तर पोटाला पूर्ण विश्रांती द्यावी. जेवताना शांत चित्ताने, एकाग्रतेने व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या ताटातल्या जेवणावर भरपूर प्रेम करावे.

    औषधी द्रव्यांमध्ये त्रिटकू, पंचकोल, शंखवटी, हिंग्वाष्टक चूर्ण, आमपाचक वटी, भास्कर लवण उपयुक्त ठरतात.

    आपल्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून आहारासंबंधी नियम पाळल्यास अजीर्णाचा त्रास होणार नाही. आहाराचे योग्य तर्हेंने पचन होऊ लागले म्हणजे अजीर्ण होत नाही. शुद्ध ढेकर, उत्साह वाटणे, मलमूत्रादिंचे वेग योग्य प्रकारे येणे, चांगली भूक लागणे, शरीर लाघव प्राप्त होणे ही अन्नाचे संपूर्ण पचन झाल्याची लक्षणे होय व पर्यायाने अजीर्ण न घेण्याची.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- डॉ.मनाली महेश पवार

      January 23, 2017


  • तुमची वेबसाईट गुगलमध्ये येतेय?

    गेल्या काही दिवसांत अनेकजणांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्ताने येथे एक साधी-सोपी टिप देतोय. आपल्या वेबसाईटवरच्या पानांची नावं कशी असावीत त्याबाबत.

      April 19, 2015


  • सारे आपलेच बंधू !

    परिसरातील सगळीच माणसं खूप चांगल्या स्वभावाची असतात, असा एक गोड गैरसमज करून घेऊन आपण स्वतःला घडवलं. तर त्यामुळे भांडण करणं आणि कुणाला पाण्यात पाहणं, उखाळ्या-पाखाळ्या काढणं हे आपल्या स्वधर्माच्या/स्वभावधर्माच्या विरुद्धच होऊन जातं.

      December 8, 2019


  • अमेरिकेतील धार्मिकता – भाग ७

    अमेरिकेच्या पहिल्या तेरा वसाहतींमधे प्रामुख्याने प्रॉटेस्टंट लोकांचा भरणा होता. वर उल्लेखल्याप्रमाणे, या सुरवातीच्या काळात अमेरिकेस जाणार्‍या लोकांमधे, युरोपातील जाचक धार्मिक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी पळ काढणार्‍या लोकांचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे १७७६ साली अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू होईपर्यंत अमेरिका हा प्रामुख्याने प्रॉटेस्टंट पंथीय देश होता. यात प्रामुख्याने इंग्लंड आणि उत्तर युरोपीयन देशातल्या लोकांचा समावेश होता. यात अ‍ॅंग्लीकन, बॅप्टीस्टस, कॅल्व्हीनीस्टस, प्युरीटन्स, प्रेसबीटेरियन, लुथर्न, क्वेकर्स, आमीश, मेथॉडीस्ट, मोरव्हारियन या प्रवाहातील लोकांचा भरणा होता. पुढे आयर्लंडमधल्या भयानक दुष्काळानंतर, तिथल्या गरीबी आणि उपासमारीला कंटाळून मोठ्या प्रमाणावर आयरीश लोक अमेरिकेत येऊ लागले. आयरीश, इटालियन, पोलिश, फ्रेंच, स्पॅनिश, हंगेरियन, जर्मन निर्वासीतांनी त्यांच्या बरोबर त्यांचा रोमन कॅथलिक पंथ अमेरिकेत आणला. पुढे हिस्पॅनिक (मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश भाषा बोलणार्‍या देशांतील लोक) लोकांबरोबर, कॅथलिक पंथीयांची भरच अमेरिकेत पडत गेली. ग्रीक, रशियन व इतर पूर्व आणि मध्य युरोपीयन देशांतील लोकांनी अमेरिकेत आपल्याबरोबर ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन पंथाची परंपरा आणली.

    गेल्या ५० वर्षांत, एशियन लोकांचे अमेरिकेतील प्रमाण आणि त्याचबरोबर मुस्लिम, हिंदू आदि धर्मियांचा विस्तार, हळू हळू का होईना पण होऊ लागला आहे. अशा प्रकारे एकीकडे अमेरिकेतली लोकसंख्या वाढत चालली आहे तर त्यातील प्रॉटेस्टंट पंथीयांचे प्रमाण कमी होत चालले आहे. अगदी अलीकडे म्हणजे १९७२ ते १९९३ या काळात देखील प्रॉटेस्टंटांचे अमेरिकेतील प्रमाण ६३% होते. ते २००२ साली ५२% झाले. २००६ च्या सुमारास, अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच, प्रॉटेस्टंटांचे प्रमाण एकंदर ख्रिश्चनांमधे ५०% हून कमी झाले असावे असा अंदाज आहे. आज प्रॉटेस्टंटांच्या २०० हून अधिक शाखा-उपशाखा झालेल्या आहेत; त्यातील सदर्न बॅप्टीस्ट्स ही सर्वात मोठी. त्यामानाने कॅथलिकांमधे फारसे फाटे न फुटल्यामुळे, कॅथलीक्स हे आज अमेरिकेतील ख्रिश्चनांमधला सर्वात मोठा एकसंध प्रवाह (२४%) झालेले आहेत.

    थोडक्यात ढोबळमानाने अमेरिकेची आजची धार्मिक विभागणी ही अशी आहे :-

    कॅथलिक २३.९%
    प्रॉटेस्टंट बॅप्टीस्ट (सर्व शाखा मिळून) १७.२%
    इतर प्रॉटेस्टंट ३४.१%
    इतर धर्मीय / विचार धारा ८.८%
    (कुठल्याच धार्मिक संकल्पनेवर विश्वास नसलेले) १६.१%

    याचाच अर्थ असा की :-

    अमेरिकेतले निम्मे लोक प्रॉटेस्टंट आहेत.
    दर सहावा अमेरिकन बॅप्टीस्ट आहे.
    दर चौथा अमेरिकन कॅथलिक आहे.
    दर चौथा अमेरिकन हा इतर धर्म/पंथाचा किंवा कुठल्याच धर्मसंकल्पनेवर विश्वास न ठेवणारा आहे.

    भौगोलिक दृष्ट्या पहायला गेलं, तर अमेरिकेच्या नॉर्थ ईस्टमधे (जिथे आयरीश आणि इटालियन लोकांचे प्राबल्य आहे), सुमारे ४०% लोक रोमन कॅथलिक आहेत. दक्षिणेकडच्या राज्यांमधे प्रॉटेस्टंट लोकांचे प्रमाण खूप आहे आणि त्यात देखील सुमारे ४०% लोक सदर्न बॅप्टीस्ट या विशिष्ट प्रॉटेस्टंट शाखेचे उपासक आहेत. अमेरिकेचा नॉर्थ वेस्ट भाग हा पूर्वापार कमीत कमी धार्मिक असा भाग आहे. तुलनाच करायची झाली तर दक्षिणेकडच्या राज्यांमधले ८६% लोक देवावर विश्वास ठेवणारे आहेत तर पश्चिमेकडे हेच प्रमाण ५९% आहे. त्यामुळेच अमेरिकेतल्या दक्षिणेकडच्या या धार्मिक राज्यांना एकत्रितपणे “बायबल बेल्ट” असे संबोधले जाते.

    -- डॉ. संजीव चौबळ

      June 5, 2016


  • आयुष्याचा निर्णय कुणाचा ?

    आपलं आयुष्य कसं असावं हा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. जे विद्यार्थी आई वडिलांनी पसंतीचं करीयर करू दिलं नाही म्हणून आपल्या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडतात. तसंच घरच्यांचा विरोध असतांनाही व्यसनं करतात, आपल्याच पसंतीचा जोडीदार आणतात. ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला जेथे सोईस्कर असते तिथे आपण आपले निर्णय घेतो आणि इतर ठिकाणी आपल्या त्रासाचा किंवा अपयशाचा दोष दुसऱ्यांना देतो.

      March 11, 2019


  • ‘ऑगस्ट’चे अधिपती’ (ऑगस्ट महिन्यात जन्मलेले प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू )

    ‘ऑगस्ट’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या नेतृत्वगुण असलेल्या, विचारी, प्रभावी संवादकौशल्य जपणाऱ्या असल्याचे मानले जाते. ‘ऑगस्ट’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.

      August 11, 2025


  • नरेंद्र मोदींनी ५०० व २००० च्या नोटा का चालू ठेवल्या असाव्यात…

    देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे सर्वच थरातून स्वागत होत आहे. विशेषतः सामन्यांसाठी हा निर्णय अतिशय योग्य असल्याच्या प्रतिक्रिया मुंबईतल्या ट्रेन मध्ये, रस्त्यावर फिरताना प्रवासी, रिक्षा-टॅक्सीवाले, किरकोळ भाजी विक्रेते यांच्याकडून ऐकायला येत आहेत.

      November 10, 2016


  • डिसेंबर १८ : भाऊसाहेबांचे चतुःशतक

    …महाराष्ट्राचे कर्णधार राजा गोखले आणि सामनाधिकार्‍यांची ठाकूरसाहेबांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. दोन षटकांचा तरी खेळ व्हावा आणि भाऊसाहेबांना ब्रॅडमनचा विक्रम मोडण्याची संधी दिली जावी अशी विनंतीही करून पाहिली, पण व्यर्थ…ठाकूरसाब संघाला घेऊन मैदानाबाहेर गेले आणि त्यांनी थेट स्टेशन गाठले !

      December 21, 2010


  • सुवर्णमहोत्सवी चित्रपट “खामोशी”

    सुवर्णमहोत्सवी चित्रपट “खामोशी”

    ५१ वर्षापूर्वी २५ एप्रिल १९७० रोजी गीतांजली पिक्चर्सचा खामोशी चित्रपट प्रदर्शित झाला. ‘खामोशी ‘ हा चित्रपट आशुतोष मुखर्जी यांच्या ‘नर्स मित्र’ या साहित्यकृतीवर आधारित आहे. गुलजार यांची या चित्रपटाचे लेखन आणि गीत लेखन केले होते.

      April 30, 2021


  • प्रवास; एक समृद्ध करणारा अनुभव..

    सकाळचा उत्तराखंडातल्या नैनीताल जिल्ह्यातील रामनगर ते जुनी दिल्ली असा प्रवास, ‘रामनगर -दिल्ली संपर्क क्रांती लिंक एक्सप्रेस’ अशा त्या रेल्वेसारख्याच लांबलचक नांवाच्या रेल्वे गाडीनं केला. उत्तर प्रदेश-बिहारकडच्या रेल्वेप्रवासातील गर्दीच्या काही फिल्म्स डिस्कव्हरी-नॅशनल जिओग्राफीक चॅनलवर पाहील्या होत्या, त्या प्रत्यक्ष अनुभवल्या.

      May 29, 2017