वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
काही (असामान्य) करण्याची, नवनवीन गोष्टी शिकत, स्वतःला समृद्ध करत राहण्याची जिद्द, महत्त्वाकांक्षा, त्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक तडजोड, आणि आपल्या (अविश्रांत) जबाबदाऱ्यांमधून घेतलेली (तात्पुरती का होईना) जाणीवपूर्वक निवृत्ती. हे सगळं खूप खूप जास्त matter करतं जेव्हा सादरकर्ते ‘बाल’ नसतात. लहानपणी जमलं नाही तरी काय झालं, आयुष्यात जेंव्हा मला वेळ मिळतोय, सवड काढता येतेय, तेंव्हा तेंव्हा मी स्वतःसाठी झटेन, ही अत्यंत आदर्श बाब वाटते मला!
February 28, 2020
कोलंबो एअरपोर्ट वरुन टेक ऑफ घेतल्यावर विमान जकार्ता च्या दिशेने ३६० अंशात फिरले. कोलंबो च्या किनाऱ्याला मुंबई च्या किनाऱ्या प्रमाणे समुद्र भिडत होता. पण मुंबई सारखं काँक्रिटचे जंगलाने कोलंबो च्या किनाऱ्याला वेढलेले नव्हते.
नारळाची हिरवीगार झाडे आणि त्या झाडांच्या आतून डोकावणारी लहान मोठी घरे कोलंबो शहर मागे पडताना दिसत होती.
April 2, 2023
वरवर पाहता प्रमुख रस्त्यांचं जाळं कोंकणात विणल्याचं दिसत असलं तरी राष्ट्रीय महामार्ग वगळता अन्य रस्त्यांमध्ये सलगता आणि थेट जोडलेपणा यांचा अभाव आहे.
December 27, 2022

आता मूळ प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी थोडी प्राथमिक माहिती समजून घेणं जरूरी आहे.
थोडक्यात सांगतो.थायरॉइड नावाची ग्रंथी गळ्यात असते फुलपाखराच्या आकाराची अणि ती ‘टी3’ व ‘टी4 ‘ अशा नावाची दोन हार्मोन्स किंवा संप्रेरके बनवते. आता या दोन हॉर्मोनचे रिसेप्टर्स (receptors) शरीरातील बहुतांश अवयवांवर असतात. या हार्मोन्सचे प्रमुख काम आहे की, आपल्या खाण्यातून आलेल्या ऊर्जेचा वाटप करण्याचे प्रमाण (BMR कंट्रोल) नियंत्रणात ठेवणे (चयापचय क्रिया नियंत्रण).
असं समजा की, एखाद्या गाडीत जसं एक्सेलटर काम करतं तसं ही हार्मोन्स काम करतात. म्हणजे एक्सेलेटर जास्त झाली की गाडी जोरात पळते आणि कमी झाली की गाडी संथ होते.
अगदी तसेच टी 3 टी 4 जास्त झाल की हायपरथायरोडिझम (hyperthyroidism) म्हणजे हृदय हे ठोके वाढणे (धड धड), हाता पायाला कपकपी (tremors), वजन कमी होणे, जुलाब इत्यादी.
आणि टी 3 टी 4 कमी झाले की हायपोथायरोडिझम (hypothyroidism) म्हणजे वजन वाढणे, केस गळणे, सूज येणे, पोट साफ न होणे, थकावट, अंग दुखी, कमज़ोरी, उदासीनता, महीना पुढे जाणे इत्यादी. हा प्रकार खूप जास्त सामान्य (कॉमन) आहे.
हे झाले टी 3 आणि टी 4 कमी जास्त झाले की पण आता लक्षात घ्या की ही थायरॉइड ग्रंथी ही पिट्युटॅरी (pituitary) ग्रंथीच्या नियंत्रणाखाली असते.ही pituitary ग्रंथी थायरोड स्टीमयूलेटिंग हॉर्मोन अथवा टी एस एच (TSH) बनवते अणि ह्याची मात्रा टी 3 टी 4 च नियंत्रण करते.जेव्हा टी 3 टी 4 कमी होते तेव्हा (टी एस एच) वाढते जेणेकरुन ग्रंथी ला चालना मिळेल.
आता मूळ उत्तराकडे येतो.टी 3 आनि टी 4 हार्मोन्स ही आयोडीनने बनतात.जेवणात आयोडीन फक्त दोन गोष्टीतून मिळते आणि ते म्हणजे टाटा मीठ म्हणजे आयोडीन युक्त मीठ (iodine fortified salt) आणि दुसरे म्हणजे जी गोष्ट समुद्रातून येते म्हणजे मासे.
(याशिवाय आयोडीन काही कफ सिरप, MRI CT स्कॅन चि कॉन्ट्रॅस्ट (contrast) डाय, हृदयविकार याच्या गोळ्या amiodarone यात देखील असते) आयोडीन हा मूळ घटक आहे ज्याने थायरोड हार्मोन्स बनतात म्हणजे आपल्याला जेवणात तेच पुरेश्या मात्रेत घेणे गरजेचे आहे.
याचा अर्थ जास्त मीठ खा असा मुळीच नाही. आपण नेहमीच्या आहारात जेवढे मीठ घेतो ते पुरेसे आहे. मासे खाणे आरोग्याला चांगले आहे.
अगोदर हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या बहुतांश भारतीयांना गोयटर (goiter) म्हणजे गळा मोठा असणे कॉमन होते. कारण भारतीय मातीत आयोडीन चि कमतरता होती म्हणूनच सरकारने मीठात आयोडीन घालणे बंधनकारक केले.
तुम्ही बर्याचदा इंटरनेट वर वाचलं असेल की सोयाबीन, ब्रूसेल्स मोड़, पालक, गोबी वगैर वगैरे खाण्याने थायरोइड होतो. मुळात ह्या सर्व गोष्टी रक्तातून आयोडीन पकडतात आणि ग्रंथी पर्यंत जाऊ देत नाहीत. परंतु हे प्रमाण फार कमी असत आणि योग्य प्रमाणात जेवणात आयोडीन असेल तर ह्याचा काहीच परिणाम दिसुन येत नाही.
शिवाय सोयाबीन वगैरे गोष्टी शरीराला आवश्यक असतात आणि आयोडीन ब्लॉक करण्यासाठी ह्यांची लागणारी मात्रा खूपच जास्त आहे जी नेहमीच्या जेवणातून पोहोचू शकत नाही. त्यामुळे ते खाणं टाळू नये व आहारात यांचा समावेश असावा.
तुम्हाला जर माझा लेख आवडला असेल तर हा लेख तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.अशाच प्रकारच्या नवीन माहिती साठी ब्लॉग ला बुकमार्क करून ठेवा.
धन्यवाद
जय हिंद जय महाराष्ट्र
डॉ निखिल प्रभु
मधुमेह स्पेशलिस्ट मुंबई
August 21, 2020
मिरची तिखट आहे, अन्नाची चव आणि वास दोन्हींना वाढवते. कोलेस्टेरॉललासुद्धा कमी करते. पण अल्सर होण्याची भीती पण वाढते.
एकाच वेळी एखाद्या पदार्थाचे गुण पण सांगितले जातात, आणि अवगुण पण.
गुण वाचताना वाटते...
व्वा. याच्याएवढं चांगलं काहीच नाही, किती चविष्ट आहे ! छान छान !!
आणि अवगुण वाचताना वाटतं, याच्याएवढं डेंजर आणि तिख्खट दुसरं काही नाही.
(मी मोदींबद्दल बोलत नाहीये, तिखट चवी विषयीच बोलतोय.)
कसं ते बघा.
तिखट चव इंद्रियांना उत्तेजना देणारी पण शुक्राचा नाश करणारी आहे.
योग्य प्रमाणात मूर्च्छानाशक तर जरा जास्ती प्रमाणात चक्कर यायला मदत करणारी आहे.
योग्य प्रमाणात भूक आणि पचनशक्ती वाढवणारी आहे, तर जरा प्रमाणात चुकले तर अंगाची पोटाची आग करवणारी आहे.
कफनाशक, शरीरातील ओलावा कमी करणारी आणि बंधने सैल करणारी आहे तर त्याच वेळी अशक्तपणा वाढवणारी, धातुंचे बल नाहीसे करणारी पण आहे.
त्वचा रोगांवर उपयोगी पण आहे आणि त्वचेतून रक्तस्राव घडवणारी पण आहे.
प्रमेहात उपयोगी पण आहे, आणि नपुंसकता वाढवणारी पण आहे.
एकाच वेळी ही दोन दोन परस्परांना विरोधी वाटणारी कामे कशी होतात, मराठीत सांगायचे झाले तर हे वाचून फक्त कन्फ्युज व्हायला होते. नेमकं काय करायचं कळतंच नाही.
असं गोंधळून जाऊ नका. पॅनिक होऊ नका.
दोन्ही बाजू बरोबर आहेत.
आहार सहा चवींचा हवा, हे तर आपलं आधीच ठरलेलं होतं. प्रश्न आहे, महत्व कुणाला द्यावं ?
मिरची खावीशी तर वाटते, पण तिखट लागता नये.
कोलेस्टेरॉल कमी तर झालं पाहीजे, पण अल्सर होता नये. सगळं एकदम कसं जमणार ?
वर वर बघताना वाटते, हे खूप डेंजर आहे, पण तसे नाही. दूरगामी परिणाम पण लक्षात घ्यावे लागतात.
कुछ पाने केलिए कुछ खोना तो पडताही है !
सगळं काही ठीक होईल.
कर नाही त्याला डर कशाला ...
तिखट खाणं बंद पण करायचं नाहीये, आणि भरपूर पण खायचं नाहीये.
खायचं पण किती, त्याला पण मर्यादा असतात ना !
माझंच शेत आहे, मी हवं तेवढं खाईन, असं म्हणून मिरच्या खात बसलात, तर दूरगामी परिणाम कसे होतील ?
आपली क्षमता ओळखा.
पचनशक्ती ओळखा.
प्रतिकारशक्ती ओळखा.
भूतकाळाचा विचार करू नका.
भविष्याची चिंता करू नका.
वर्तमानात रहा.
दुसऱ्यावर विश्वास न टाकता, स्वतःला ओळखा, म्हणजे चुकीचे सल्ले ऐकले जाणार नाहीत.
पचेल एवढंच खा.
(मग अन्न असूदे, किंवा पैसा )
नाही पचलं तर, एकतर देह सोडावा लागतो नाहीतर देश तरी.....
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
10.11.2016
November 10, 2016
म्हणावयास व समजण्यासही सोपे असे आर्या वृत्तात रचलेले हे स्तोत्र फक्त पाच श्लोकांचे आहे. हनुमान या दैवताचे स्थान महाराष्ट्रात फार मोठे असल्याने या स्तोत्रासंबंधी अधिक माहिती देण्याची आवश्यकताच नाही.
April 26, 2021
मध्यंतरी आमच्या सोसायटीची सांडपाणी वाहून नेणारी ड्रेनेज व्यवस्था तुंबली. त्यातच पावसाळ्याचे दिवस होते. पावसाचं पाणी, गटार भरून वहाणाऱ्या सांडपाण्यात मिसळून दुर्गंधी आणि डासांचा फैलाव वाढू लागला. सोसायटीच्या केरकचरा, सफाई करणाऱ्याला विचारलं, त्याने असमर्थता दर्शवली, पण दुसऱ्या दिवशी दोन माणसांना या कामासाठी तो घेऊन आला आणि म्हणाला, “हे करून देतील काम”.
September 10, 2022
सफेद मुसळी ही उष्ण प्रदेशाच्या आर्द्र वनातील वनस्पती आहे. ती ॲस्पॅरागेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लोरोफायटम बोरिविलियानम आहे. चोपचिनी ही वनस्पतीही ॲस्पॅरागेसी याच कुलातील आहे. सफेद मुसळी मूळची भारतातील असून हिमालयातील उपोष्ण वनात आणि आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तराखंड व महाराष्ट्र या राज्यांतील वनांमध्ये आढळते. तिच्या औषधी गुणधर्मांमुळे महाराष्ट्र तसेच अन्य काही राज्यांत तिची लागवड केली जाते.
March 5, 2025
जेवण करताना ही प्रार्थना नेहमी करा की, ज्याच्या शेतातून माझं जेवण येते त्यांची मुले कधीच उपाशी झोपु नयेत !
July 25, 2017
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 2, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti