वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
S5 0014+81 हे मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर आहे. हे मानवाला २०२१ ला सापडले . याचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या वस्तुमानाच्या ४० अब्जपट असून (वर्षाला ४००० सूर्यांच्या वस्तुमानाइतका पदार्थ गिळतं हे कृष्ण विवर) हे कृष्णविवर सातत्याने पदार्थ गिळंकृत करत असल्याने या कृष्णविवराभोवती अत्यंत तेजःपुंज अशी तबकडी तयार झाली आहे ,असे संशोधनाद्वारे दिसून येते . हे तेज आपल्या सूर्याच्या तेजाच्या ३०० पद्मपट (१ पद्म = १००० अब्ज) अधिक आहे किंवा सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या आकाशगंगेतील सर्व ताऱ्यांचं तेज एकत्रित पकडलं, तर त्या तेजाच्या २५००० पट अधिक तेजःपुंज आहे या कृष्णविवराची तबकडी.
सुमारे 8 अब्ज वर्षांपूर्वी, संशोधकांनी मांडले की, दोन बटू आकाशगंगा एकमेकांवर आदळल्या. त्या वैश्विक अपघातामुळे त्या दोन आकाशगंगांमधील वायूचे विभाजन होऊन अनेक नवीन बटू आकाशगंगा तयार झाल्या, ज्यात दोन गडद पदार्थ-मुक्त आकाशगंगा आहेत.
आपल्या भोवती जी ‘हवा ‘ आहे ती अनेक वायूंचे मिश्रण असते हे त्याने सर्वात प्रथम मांडल होत . त्यानं त्यासाठी खास ‘गॅस’ हे नाव वायूला सुचवलं होतं. त्यातही त्याने पुढे बरं संशोधन केलं होतं.हेल्मोटरच्या या संशोधन जीवनात त्याने जी बायोकेमिस्ट्रीची सुरुवात केली होती. ती नंतरच्या काळात अनेकांनी पुढे नेली. ती आजही पुढे सुरू आहे !
१४ ऑगस्ट २०२१ रोजी ग्रीनलँडच्या बर्फाच्या शीटवर पडणाऱ्या पावसाच्या अहवालाने जागतिक मथळे बनवले तेव्हा जगभरातील शास्त्रज्ञांना धक्का बसला. ऐतिहासिक घटना अलीकडील इतिहासातील पहिली घटना होती आणि त्यानंतर पृष्ठभागावरील बर्फ वेगाने वितळत होता. संशोधकांनी आता या घटनेचे विश्लेषण केले आहे आणि उघड केले आहे की वर्षाच्या एका वेळी जेव्हा हंगामी वितळणे कमी होत असते तेव्हा उष्णतेच्या लाटेपूर्वी पाऊस पडला होता.
चंद्राची निर्मिती कशी झाली याबद्दल खगोलशास्त्रज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत. चंद्राची निर्मिती कशी झाली यावर अनेक शास्त्रज्ञांनी तर्क लावले. चंद्राची निर्मिती ही सूर्यमायेच्या उत्पत्ती नंतर सुमारे ५ कोटी वर्षानंतर म्हणजेच जवळपास ४५ अब्ज वर्षांपूर्वी झाली असा शास्त्रज्ञांचा दावा आहे . चंद्राच्या उत्पत्ती बद्दल मुख्य चार मतभेद आहेत.
कणखर आवाज, बोलके डोळे, ग्रामीण भाषा, साधी वेशभूषा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. आई मुलांचे नातेसंबंध साकारताना, त्यांनी दादांना कधी गावरान शिव्या देखील दिल्या तर कधी त्या हळव्या झाल्या. पूर्वीच्या चित्रपटातील, आईची प्रतिमा बदलून टाकणाऱ्या रत्नमाला, खाजगी जीवनातही स्वतःच्या मुलाविषयी संवेदनशील होत्या.
आपण आजकाल कृत्रिम रंगांचा वापर जोरात करतो आहे, तर सुरुवातीला लोक फक्त नैसर्गिक रंग वापरत असत. मोहेंजोदारो आणि हडप्पाच्या उत्खननात सापडलेल्या वस्तूंमध्ये अशी भांडी आणि मूर्ती होत्या, ज्या रंगवलेल्या होत्या. त्यांच्याकडे लाल रंगाच्या कापडाचा तुकडाही सापडला. तज्ज्ञांच्या मते, मजिठ किंवा मजिष्ठाच्या मुळापासून तयार केलेला रंग त्यावर लावला होता. हजारो वर्षांपासून, मदिथचे मूळ आणि बक्कम झाडाची साल हे लाल रंगाचे मुख्य स्त्रोत होते. पीपळ, गुलार, पाकड या झाडांवरील लाख अळीपासून महार रंग तयार केला जात असे. हळदीपासून पिवळा रंग व सिंदूर मिळत असे.
रासायनिक गुणधर्म या दोन शब्दांबरोबर आम्लधर्मी की आम्लारिधर्मी हे गुणधर्म डोळ्यासमोर येतात. कोणत्याही पदार्थातील आम्लधर्म किंवा ओळखण्यासाठी साधी चाचणी असते. या आम्लारिधर्म चाचणीला सामू तपासणे असे म्हणतात. या चाचणीमध्ये कागदाचे खूप बारीक तुकडे करून ते शुद्ध पाण्यात उकळतात. नंतर हे द्रावण गाळतात.
आईन्स्टाईनने सांगितलेल्या व्यापक सापेक्षता सिद्धान्तामध्ये सर्वप्रथम कृष्णविवराच्या अस्तित्वासंबंधी शक्यता निर्माण झाली. गुरुत्वाकर्षणाचा काळावर कसा परिणाम होतो ते या सिद्धान्तामुळे स्पष्ट झाले. कृष्णविवर ही संकल्पना मूलतः सापेक्षतेच्या सिद्धांतामुळे जगासमोर आली.
आधुनिक जगात खनिजापासून लोखंड मिळवण्याची प्रक्रिया ब्लास्ट फर्नेसमध्ये केली जाते. चित्रात दाखवलेल्या या भट्टीच्या सर्वात फुगीर भागात सर्व बाजूंनी तांब्याच्या नळ्या आत सोडलेल्या असतात. त्यातून उच्च दाबाची हवा (ब्लास्ट) आत सतत सोडली जाते. यावरून या क भट्टीला ब्लास्ट फर्नेस असे नाव मिळाले.
Copyright © 2025 | Marathisrushti