वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपण कुटुंबप्रिय व समाजप्रिय आहोत. दैनंदिन जीवनात आपले अनेकां बरोबर संबंध येत असतात. कुटुंबातील सदस्यांनी जशी काही बंधने पाळायची असतात, तसेच अमुक एका परिस्थितीत कसे वागावे याचे काही निकष समाजाने स्वीकारलेले असतात. यापेक्षा वेगळी वागणुक दिसून आली तर ती समाजमान्य नसते. मग असं वागणार्याला ‘वेडा’ ठरविलं जातं ते योग्य आहे का, असा मला प्रश्न पडतो. याचे उत्तर देण्याआधी काही उदाहरणे देतो.
आजचा दिवस आणखी एका कारणानेही खास आहे. बरोबर १८ वर्षांपूर्वी, २००१ साली आजच्याच दिवशी, म्हणजेच विजयादशमीला, `लोकसत्ता फॉन्टफ्रिडम’ या सॉफ्टवेअरचं अनावरण झालं आणि बघता बघता ते सॉफ्टवेअर इतकं प्रचंड लोकप्रिय झालं की आजमितीला जगातील किमान ४ लाखांहून जास्त संगणकांवर ते इन्स्टॉल झालंय.
ऑफिसच्या कामामुळे माझे सिमेंट प्लांटमध्ये येणे जाणे असायचे.हे प्लांट शहरापासून बरेच दूर असतात.तेथे काम करताना आलेले अनुभव,तेथेपर्यंत पोचण्याचा प्रवास आणि प्लांट मधील वर्णन आहे या लेखात केले आहे.
कृष्णविवर म्हणजे आपल्या अतितीव्र गुरुत्वाकर्षणापायी आपल्याकडच्या प्रकाशालासुद्धा बाहेर पडू न देणारी वस्तू. प्रकाशही बाहेर पडत नसल्यामुळे, कृष्णविवराच्या केंद्रापासून ठरावीक अंतरापर्यंत, कुठली घटना घडते आहे, ते आपल्याला बाहेरून दिसू शकत नाही. या अंतराला कृष्णविवराचं ‘घटनाक्षितिज’ म्हटलं जातं. एका दृष्टीनं कृष्णविवराचा हा आकारच! कृष्णविवराचा हा आकार त्याच्या वजनावर अवलंबून असतो. कृष्णविवराचं वजन जितकं जास्त, तितका त्याचा आकार मोठा. जेव्हा दोन कृष्णविवरांचं विलीनीकरण होतं, तेव्हा नव्या कृष्णविवराचं वजन हे दोन्ही कृष्णविवरांच्या एकत्रित वजनापेक्षा कमी असता कामा नये, हे अपेक्षितच आहे. तसंच, विलीनीकरणातून निर्माण झालेल्या या कृष्णविवराचा आकारही, दोन्ही कृष्णविवरं एकत्रित केल्यानंतर अपेक्षित असलेल्या आकारापेक्षा कमी असता कामा नये.
चार अब्ज वर्षांपूर्वी, चंद्राच्या कवचावर लावा सांडला आणि आज आपण पाहत असलेल्या चंद्रावर माणूस कोरतो. पण ज्वालामुखींनीही खूप थंड वारसा सोडला असेल आणि तो बर्फाच्या स्वरूपात असावा असा संशोधकांचा दावा आहे.
केंद्रातली मुले जर एखाद्या विमानाची प्रतिकृती तयार करणार असतील तर त्याआधी ही मुले विमानबांधणीशास्त्र, वायुगतीशास्त्र यातील संकल्पना स्लाइड शो किंवा फिल्म्सच्या माध्यमातून समजून घेतात. काही तज्ज्ञ व्यक्तींना या संदर्भात व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले विमानांच्या प्रतिकृती तयार करतात.
पाणी म्हणजे जीवन. “पानी बिना जग सुना” असेही म्हणतात. पाण्याशिवाय जगावयाची कल्पनाही पृथ्वीवरील सजीवांना सहन होणार नाही. ह्या पाण्याची अनेक रूपे आहेत. त्याचे शात्रीय विवेचन आपण करणार आहोत.
तुम्ही नवा मोबाईल विकत घेता तो किती वर्षे वापरता? नवा टीव्ही, गाडी, फ्रिज , लॅपटॉप , फूड प्रोसेसर, वॉशिंग मशिन विकत घेताना पुढे किती वर्षे ती गोष्ट आपण वापरणार आहोत याचा विचार टिपिकल मध्यमवर्गीय माणूस तर नक्कीच करतो. एके काळी, मोठ्या मुलाचे कपडे छोट्याला वापरायचे आणि नंतर त्यालाही तोकडे पडायला लागल्यावर त्याचे पायपुसणे नाहीतर भानशीरे ( या शब्दाची उत्पत्ती कुणास ठावूक असल्यास सांगावी!) बनवायचे आणि तेही पार फाटून वाट लागल्यावर काही नाही तर पाणी तापवण्याच्या चुलीत विस्तव पेटविण्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा!
डॉ. नारळीकर १९७२ मध्ये भारतात आले आणि लगेचच त्यांचे मराठी विज्ञान परिषदेबरोबर जे गहिरे नाते जुळले ते आजपर्यंत अबाधित आहे एव्हढेच नाही तर आता चांगलेच मुरले आहे. याच ह्रद्य नात्याच्या प्रवासाचा स्मरणरंजनात्मक आढावा घेतलाय या लेखात श्री. अ. पां. देशपांडे यांनी.

दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता अरसिबो दुर्बीण कोसळली… वेस्ट इंडिजच्या परिसरातील प्युर्तो रिको या बेटावर असलेली ही जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बीण कोसळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून यापूर्वीच व्यक्त केली गेली होती! या दुर्बिणीच्या ३०५ मीटर व्यासाच्या तबकडीवरून परावर्तित होणारे रेडिओ किरण या तबकडीपासून सुमारे दीडशे मीटर उंचीवर असणाऱ्या साधनांद्वारे टिपले जात होते. ही साधनं ज्या सांगाड्यावर बसवली होती, त्या नऊशे टन वजनाच्या सांगाड्याला तोलणारे दोरखंड तुटून हा सांगाडा तबकडीवर कोसळला आणि दुर्बिणीची मोठ्या प्रमाणावर हानी झाली.
१९६०च्या दशकात उभारल्या गेलेल्या या दुर्बिणीत आणि तिच्यावरील विविध उपकरणांत वेळोवेळी दुरुस्त्या आणि सुधारणा केल्या गेल्या. परंतु, दुर्बिणीवरील सांगाडा तोलणारे दोरखंड हे काळानुरूप खराब होत होते. तसंच २०१४ सालच्या जानेवारी महिन्यातील भूकंपामुळे आणि २०१७ सालच्या चक्रीवादळामुळेही या दुर्बिणीच्या बांधणीवर परिणाम झाला होता. त्यानंतर या दुर्बिणीवरचा एक दोरखंड गेल्या ऑगस्ट महिन्यात एक आणि तर आणखी एक दोरखंड नोव्हेंबर महिन्यात तुटला. आता जर यापुढे आणखी दोरखंड तुटले तर पुर्ण सांगाडाच तबकडीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसंच या अवस्थेतील दुर्बिणीची दुरुस्तीही शक्य नव्हती. त्यामुळे दुसरा दोरखंड तुटल्यानंतर, या दुर्बिणीचा वापर बंद केला जात असण्याची घोषणा, या दुर्बिणीची मालकी असणाऱ्या, अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशन या संस्थेनं केली. त्याचबरोबर या दुर्बिण विविध भाग कसे वेगळे करायचे, याचा विचारही सुरू झाला. परंतु, दुर्बीण उतरवण्याचा हा विचार सुरू असतानाचा या दुर्बिणीवरली साधनं ज्यावर बसवली आहेत तो सांगाडा खालील तबकडीवर पूर्णपणे कोसळला व दुर्बिणीचं आयुष्यच संपुष्टात आलं.
प्युर्तो रिकोवरील डोंगराळ भागातील एका घळीत उभारलेल्या या रेडिओ दुर्बिणीची बांधणी १९६३ साली पूर्ण झाली. त्यानंतरची पाच दशके ही दुर्बीण एकाच तबकडीचा वापर करणाऱ्या दुर्बिणींमध्ये सर्वांत मोठी दुर्बीण ठरली होती. या प्रचंड दुर्बिणीनं रेडिओ खगोलशास्त्रात मोठी कामगिरी केली आहे. बुध आणि शुक्राच्या पृष्ठभागाचे सविस्तर नकाशे याच दुर्बिणीद्वारे तयार केले गेले, तसेच बुधाचा स्वतःभोवतीच्या प्रदक्षिणेचा ५९ दिवसांचा काळही याच दुर्बिणींद्वारे मोजला गेला. स्पंदनांच्या स्वरूपात रेडिओलहरी उत्सर्जित करणाऱ्या, स्पंदक ताऱ्यांच्या जोडीच्या निरीक्षणांद्वारे गुरुत्वीय लहरींचा अप्रत्यक्ष पुरावा याच दुर्बिणीनं मिळवून दिला. स्पंदक ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा शोध याच दुर्बिणीद्वारे सर्वप्रथम लावला गेला.
रेडिओ खगोलशास्त्राच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अरसिबो दुर्बिणीच्या निकामी होण्यानं खगोलशास्त्रज्ञ अत्यंत व्यथित झाले आहेत. कारण अरसिबो दुर्बीणीचा शेवट झाल्यानं खगोलशास्त्रज्ञ आणि अंतराळातील रेडिओस्रोत यांच्यात संवाद साधून देणारा एक महत्त्वाचा दूवा नष्ट झाला आहे!
चित्रवाणी:
https://www.youtube.com/embed/b3AASKr_iHc?rel=0
-- डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: SPACE.com / Twitter
Copyright © 2025 | Marathisrushti