(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री वेंकटेशाची आरती – चित्रफित..

    श्री वेंकटेशाची आरती – चित्रफित..

    डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी लिहिलेली ही वेंकटेशाची आरती सादर केली आहे गायिका सौ रेखा कुलकर्णी यांनी….

      June 23, 2021


  • समर्थ रामदास स्वामी – भाग १

    परवा फेस बुक वरील माझ्या एका मित्राने समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख "नारायण ठोसर" असा एकेरी केला. मुद्दा वादाचा जरी होता तरी त्यात समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख अशा प्रकारे आल्याने मी फार व्यथित झालो. समर्थ कुठल्याही जातीच्या पलीकडले व्यक्तिमत्व होते, नव्हे ते तर प्रत्यक्ष हनुमान स्वरूप होते. ते ब्राम्हण जातीत जन्माला आले किंवा त्यांचा उल्लेख शिवरायांचे गुरु म्हणून इतिहासात आला आहे यावर कुणाचाही आक्षेप असू शकतो. परंतु त्यांनी केलेल्या दासबोधाची निर्मिती हि एक दैवी चमत्कार असलेली निर्मिती आहे या बद्दल माझ्या मनात शंका नाही. मी दासबोधाचा नियमित वाचक आणि अभ्यासक आहे. अमृतानुभव जितका मला प्रिय आहे तितकाच दासबोध आणि तुकारामांची गाथा मला प्रिय आहे.

    समर्थ जन्मताच "परामानस विद्या" ज्याला इंग्रजीत " Advanced Psychology " असे म्हणतात त्यात पारंगत होते. दासबोध हा त्यांचा ग्रंथ ३५० वर्षापूर्वीचा Advanced Psychology चाच ग्रंथ आहे.

    समर्थांनी लिहिलेल्या आरत्या आणि स्त्रोत्र हि आजही घरोघरी गायली जातात. समर्थ देश भर फिरले, निबिड अरण्यात त्यांनी गुहेत बसून तपस्या केली. ग्रंथ निर्मिती केली. समर्थांचे आयुष्य वादातीत होते.

    मी काही दिवस समर्थांच्या वर लिहिण्याचे ठरवले आहे. सुरवात करताना त्यांनी लिहिलेल्या "चातुर्य लक्षणा"पासून करणार आहे.
    उच्च नीच जातीत जन्मणे हे कुणाच्याही हातात नसते. शरीराचे सुंदर दिसणे अथवा कुरूप पणा हा सुद्धा निसर्गदत्त असतो. पण म्हणून लोकांनी जाणीव पूर्वक काही 'गुण' धारण करावे असे समर्थ म्हणतात. या गुणांना समर्थ "आगंतुक गुण" असे म्हणतात.

    समास सहावा : चातुर्यलक्षण || १४.६ ||

    ॥श्रीराम॥

    रूप लावण्य अभ्यासितां नये | सहजगुणास न
    चले उपाये | कांहीं तरी धरावी सोये | अगांतुक गुणाची ||१||
    काळें माणुंस गोरें होयेना | वनाळास येत्न चालेना |
    मुक्यास वाचा फुटेना | हा सहजगुण ||२||
    आंधळें डोळस होयेना | बधिर तें ऐकेना |
    पांगुळ पाये घेइना | हा सहजगुण ||३||
    कुरूपतेचीं लक्षणें | किती म्हणोनि सांगणें |
    रूप लावण्य याकारणें | पालटेना ||४||
    अवगुण सोडितां जाती | उत्तम गुण अभासितां येती |
    कुविद्या सांडून सिकती | शाहाणे विद्या ||५||
    मूर्खपण सांडितां जातें | शाहाणपण सिकतां येतें |
    कारबार करितां उमजतें | सकळ कांहीं ||६||
    मान्यता आवडे जीवीं | तरी कां उपेक्षा करावी |
    चातुर्येंविण उंच पदवी | कदापी नाहीं ||७||
    ऐसी प्रचित येते मना | तरी कां स्वहित कराना |
    सन्मार्गें चालतां जनां | सज्जना माने ||८||
    देहे नेटकें श्रुंघारिलें | परी चातुर्येंविण नासलें |
    गुणेंविण साजिरें केलें | बाष्कळ जैसें ||९||
    अंतर्कळा श्रुंघारावी | नानापरी उमजवावी |
    संपदा मेळऊन भोगावी | सावकास ||१०||
    प्रेत्न करीना सिकेना | शरीर तेंहि कष्टविना |
    उत्तम गुण घेईना | सदाकोपी ||११||
    आपण दुसऱ्यास करावें | तें उसिणें सवेंचि
    घ्यावें | जना कष्टवितां कष्टावें | लागेल बहु ||१२||
    न्यायें वर्तेल तो शाहाणा | अन्याइ तो दैन्यवाणा |
    नाना चातुर्याच्या खुणा | चतुर जाणे ||१३||
    जें बहुतांस मानलें | तें बहुतीं मान्य केलें |
    येर तें वेर्थचि गेलें | जगनिंद्य ||१४||
    लोक आपणासि वोळावे | किंवा आवघेच कोंसळावे |
    आपणास समाधान फावे | ऐसें करावें ||१५||
    समाधानें समाधान वाढे | मित्रिनें मित्रि जोडे |
    मोडितां क्षणमात्रें मोडे | बरेपण ||१६||
    अहो कांहो अरे कां रे | जनीं ऐकिजेतें किं रे |
    कळत असतांच कां रे | निकामीपण ||१७||
    चातुर्यें श्रुंघारे अंतर | वस्त्रें श्रुंघारे शरीर |
    दोहिमधें कोण थोर | बरें पाहा ||१८||
    बाह्याकार श्रुंगारिलें | तेणें लोकांच्या हातासि काये
    आलें | चातुर्यें बहुतांसी रक्षिलें | नाना प्रकारें ||१९||
    बरें खावें बरें जेवावें | बरें ल्यावें बरें नेसावें |
    समस्तीं बरें म्हणावें | ऐसी वासना ||२०||
    तनें मनें झिजावें | तेणें भले म्हणोन घ्यावें |
    उगेंचि कल्पितां सिणावें | लागेल पुढें ||२१||
    लोकीं कार्यभाग आडे | तो कार्यभाग जेथें घडे |
    लोक सहजचि वोढे | कामासाठीं ||२२||
    म्हणोन दुसर्‍यास सुखी करावें | तेणें आपण सुखी व्हावें |
    दुसऱ्यास कष्टवितां कष्टावें | लागेल स्वयें ||२३||
    हें तों प्रगटचि आहे | पाहिल्याविण कामा नये |
    समजणें हा उपाये | प्राणीमात्रांसी ||२४||
    समजले आणी वर्तले | तेचि भाग्यपुरुष जाले |
    यावेगळे उरले | तें करंटे पुरुष ||२५||
    जितुका व्याप तितुकें वैभव | वैभवासारिखा हावभाव |
    समजले पाहिजे उपाव | प्रगटचि आहे ||२६||
    आळसें कार्येभाग नासतो | साक्षेप होत होत होतो |
    दिसते गोष्टी कळेना तो | शाहाणा कैसा ||२७||
    मैत्रि करितां होतें कृत्य | वैर करितां होतो मृत्य |
    बोलिलें हें सत्य किं असत्य | वोळखावें ||२८||
    आपणास शाहाणें करूं नेणें | आपलें हित आपण
    नेणें | जनीं मित्रि राखों नेणे | वैर करी ||२९||
    ऐसे प्रकारीचे जन | त्यास म्हणावें अज्ञान |
    तयापासीं समाधान | कोण पावे ||३०||
    आपण येकायेकी येकला | सृष्टींत भांडत चालिला |
    बहुतांमध्यें येकल्याला | येश कैंचें ||३१||
    बहुतांचे मुखी उरावें | बहुतांचे अंतरीं भरावें |
    उत्तम गुणीं विवरावें | प्राणीमात्रांसी ||३२||
    शाहाणे करावे जन | पतित करावे पावन |
    सृष्टिमधें भगवद्‍भजन | वाढवावें ||३३||
    इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
    चातुर्यलक्षणनाम समास सहावा || १४.६ ||

    -- चिंतामणी कारखानीस

      February 22, 2016


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग बारा

    एकदा मिक्सर सुरू झाला की झाकण मधेच उघडायचं नाही, मधेच झाकण उघडलं की आतील सर्व बाहेर उडते. तस्संच एकदा पचन सुरू झाले की आत टाकणे बंद करायचे. एकदा भोजनान्ते पिबेत तक्रम् झाले, तोंड धुतले, मुखवास खाल्ला की नंतर अधे मधे काही खायचे नाही की प्यायचे नाही.

    पातेल्यात समजा भात करायला ठेवलाय, पाणी उकळायला सुरवात झालेली आहे, तांदुळ आत घातले आहेत, अर्धवट शिजलेले आहेत, आणि मधेच आणखी दोनतीन पाहुणे आले. त्याच्यासाठी वाढीव भात करायचा झाला तर, अर्धवट शिजत असलेल्या भातात परत तांदुळ टाकायचे का ?
    असं केलं तर भात नीट होणार नाही. बिघडून जाईल.

    पीठाच्या चक्कीमधे वरून धान्य घातले आहे. पीठ पडायला सुरवात झाली आहे, आणि अचानक लोड शेडींग सुरू झाले, चक्की बंद झाली.
    तर काय होते ?
    जे धान्य आतमधे होते ते जैसे थे अवस्थेत रहाते. पुनः जेव्हा लाईट येतील, तेव्हा परत चक्की सुरू होईल, पण धान्याचे काही कण, न भरडताच पुढे जातात आणि पीठ चाळून घ्यावे लागते.

    तसेच पचन एकदा सुरू झाले, मिक्सर एकदा सुरू झाला की मधे थांबवणे नाही. कोणत्याही कारणाने मधेच आतला मिक्सर थांबला/ थांबवला की पचनावर परिणाम होतोच.

    म्हणून आज्जी म्हणायची, अरे जेवताना मधेच उठू नये. भरल्या ताटावरून उठून जाऊ नये एकदा जेवायला सुरवात केली की, सर्व लक्ष जेवणातच हवे. मन जेवताना तिथेच हवे. नाहीतर आतमधे काय हवं नको, हे समजणार कसं ?

    आज आपण जेवण कसे जेवत आहोत, याचा या निमित्ताने विचार व्हावा. आजच्या काळाचा विचार केला तरीसुद्धा जेवताना शांतपणे, पूर्ण लक्ष जेवणातच ठेवून, पूर्ण आनंद घेऊन जेवणे एवढे अशक्य कोटीतले आहे का ? टीव्हीवर मॅच नाहीतर मालिका मल्लिका पहात जेवणे, गप्पागोष्टी करत जेवणे, मोबाईल वर चॅट करत जेवणे, वाॅटसप पहाता पहाता जेवणे, जेवण अर्धवट टाकून उठणे, जेवताना अभ्यास करणे, जेवणानंतर स्वीट डिश, आईस्क्रीम खाणे, हे असे केल्याने पचन बिघडते.

    स्टार्ट टू फिनिश जेवण एका स्ट्रोकमधेच झाले पाहिजे.
    विदाऊट ब्रेक, विदाऊट जाहिराती कार्यक्रम पहायलादेखील आपल्याला किती आनंद मिळतो ना !

    मग अस्सच जेवण, विदाऊट ब्रेक, विदाऊट कमर्शियल अॅड, झालं तर पचवणाऱ्याला किती आनंद होईल ना ?

    पण नाही.
    "मला जेवतानाचाच वेळ बोलायला मिळतो, जेवत असताना समजा अर्जंट काॅल आले तर काय करायचं ?" हे असे लंगडे समर्थन आपले आपण करून घेत असतो, आणि त्याचा आनंद, आपण हिरावून घेत असतो.

    म्हणजे, पोट माझे आहे, मी काय हवे ते करेन, त्या पोटाने मी जे (अत्याचार ) करतो ते सहन केलेच पाहिजे, या मानसिकतेतून आपण बाहेर पडले पाहिजे.

    ही इंद्रिये हे अवयव, हे मन, त्याने या जन्मापुरते आपल्याला सांभाळायला दिलेले आहे. ते नीटच सांभाळले पाहिजे. त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. ....

    नाहीतर तो देईल त्या शिक्षा भोगायला तयार असले पाहिजे..
    वुई आर ओन्ली अ केअर टेकर ऑफ थिस बाॅडी ! वुई हॅव टु........

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.03.2017

      March 27, 2017


  • छत्रपतींच्या नावावर “अशाप्रकारे” कोटींच्या कोटी उड्डाणे नकोत.

    छत्रपती शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषांत प्रकाशित झाल्या आहेत व इथून पुढच्या काळात येत ही राहतील. पूर्वीच्या काळी पुस्तके, कादंबऱ्या, व्याख्याने ह्या माध्यमांद्वारे छत्रपती घराघरात पोहचवले गेलेत परंतु जसा काळ बदलला तशी ही माध्यमे देखील बदललीत, सध्या चित्रपट, वेब सिरीज, इंटरनेट या माध्यमांद्वारे छत्रपतींच्या आयुष्यावर आधारित बरेच सिनेमे व मालिका आल्यात व घराघरात लोकप्रिय देखील झाल्यात.

    छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदुस्थानातील असंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान व तसेच भावनिक विषय आहे, त्याचमुळे छत्रपतींवरील आधारित चित्रपट हे तिकीट बारीवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास साऱ्या जगभरात पोहोचत असला तरी, ज्यांनी महाराजांचा इतिहास वाचला आहे त्यांना हे असे सिनेमे पाहताना अनेक गोष्टी खटकतात किंवा खटकू शकतात. सत्यघटनेवर बेतलेल्या या सिनेमांना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं योग्य आहे का हा मूळ मुद्दा आहे. कोणताही चित्रपट तयार करताना सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केला तर त्यात काही गैर नाही, पण याच लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शक सत्य घटना, त्याची मांडणी कशी काय बदलू शकतो हाही प्रश्न पडतो.

    सध्या युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढाकार घेऊन पुढे येऊ घातलेल्या काही छत्रपती वरील आधारित चित्रपटावर काही गंभीर आक्षेप घेतलेत व माझ्या लेखी ते योग्य देखील आहेत. इतिहासावर कोण्या एका व्यक्तीची मक्तेदारी नाही. त्यामुळे चित्रपटांच्या निमितानं पडद्यावर इतिहास जिवंत होणार असेल, तर चांगलंच आहे. परंतु, हा इतिहास सिनेमात मांडताना मूळ इतिहास दिग्दर्शक, लेखकानं जपणं महत्त्वाचं आहे. परंतु कोटींच्या कोटी उड्डाने घेण्यासाठी इतिहासात नसलेल्या गोष्टी किंवा आहेत त्या खूपच अतिरंजित करून अशा चित्रपटात दाखविल्या जातात. आपल्या इतिहासात भरपूर नाट्यमय घटना आहेत; त्यामुळे आपण त्यात आणखी चार गोष्टी घालून, त्याचा अतिरेक करण्याची गरज नाही. इतिहास हा आपल्यासाठी केवळ विषय नाही, तर भावभावनांशी जोडलेला आणि जगण्याचा मूळ पाया आहे. सध्याचे महाराष्ट्र सरकार व मा. राजसाहेब ठाकरे या सर्व चित्रपट सृष्टीच्या मागे भक्कम पणे उभे आहेत हे बऱ्याचदा दिसून आले आहे व ही खूपच उत्साहवर्धक बाब आहे, परंतु त्यांनी देखील या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहेत.

    माझं तर मत असे आहे की, हे दिग्दर्शक आणि निर्माते छत्रपती वर आधारित चित्रपटातून कोटींच्या कोटी कमावणार असतील तर त्यांनी खर्च व अपेक्षित फायदा झाल्यानंतर उरलेली रक्कम हे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी द्यावेत. आपण सर्व जन जाणतोच की छत्रपती हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत त्यामुळे त्यावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतो व ती केलीच पाहिजे आणि चित्रपट सुपरहिट होतात, परंतु सध्या दिग्दर्शक आणि निर्मात्यानी छत्रपतींचे विषय हाती घेऊन चित्रपट बनवून पैसे कमावण्याचे सोपे माध्यम तर केले नाहीय ना अशी शंका घेण्यास वाव आहे.

    शेवटी एकच सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज ही एक भावना आहे. ती "जपा" आणि "टिकवा". महाराष्ट्र धर्म घडवा...

    -- श्री. राहुल अविनाश कळंके
    वैजापूर, जि. संभाजीनगर

      November 7, 2022


  • अमेरिकेतील फ्रेंडस् लायब्ररी

    लेक फॉरेस्ट इथल्या EI Toro Branch Library या लायब्ररीला आम्ही आज भेट दिली. Friends of the library bookstore खरं तर आम्ही लायब्ररीत शिरलोच नाही. या तिच्या दर्शनी भागात बाहेर साधारण चार, साडेचार फूट उंचीच्या तीन रॅक्स होत्या.

      June 14, 2023


  • मराठी वाङ्मयातील ग्रामीण कादंबरी

    ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला वीणा सानेकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 

      March 25, 2022


  • क्रुरांची भूक

    क्रुरांची भूक

    एका मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्या नंतर तिच्या घरच्यांवर वर दुःखाचा डोंगर कोसळतो आभाळ फाटत. जणू एकाचा नाही तर पूर्ण परिवाराचा जीव जातो. आणि हे सर्व फक्त काही क्रुरांची भूक भागवण्यासाठी.

      December 1, 2021


  • कोरफड

    कोरफड कुंडीत सहज लागते व थोड्याशा पाण्यावरही झपाट्याने वाढते. कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत. यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.

    रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्तयस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.

    शरीरावर कोठेही भाजले असता कोरफडीचा गर लावल्याने दाह कमी होतो व फोड वगैरे न येता त्वचा पूर्ववत होते. मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास किंवा आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा नुसता गर ठेवण्याने बरे वाटते.

    कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.

    संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे वाटते.
    याप्रमाणे कोरफडीचे एकाहून एक उत्तम उपयोग असल्याने आजकाल कोरफडीचा गर बाटलीत भरून विकायला ठेवतात; पण टिकण्याच्या दृष्टीने यात प्रिझर्वेटिव्ह्‌ज टाकली आहेत का हे बघावे लागेल व कोरफडीतील एखादे तत्त्व नष्ट झाले आहे का हेही पाहावे लागेल. त्यापेक्षा घरी कोरफड लावली, तर घरच्या घरी कोरफडीचा ताजा गर सहज मिळू शकतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 2, 2017


  • दशश्लोकीस्तुती – ३

    त्रिपुरासुर वधाची लीला करताना भगवान शंकरांनी जे विश्वव्यापक रूप धारण केले त्याचा संदर्भ चिंतनात घेऊन आचार्य श्री प्रस्तुत श्लोक सादर करीत आहेत.

      August 27, 2020


  • जागतिक रजोनिवृत्ती दिन

    रजोनिवृत्ती दरम्यान आणि त्यानंतर स्त्रियांच्या शरीरात होणाऱ्या आमूलाग्र बदलाबद्दल जागृती करण्यासाठी १८ ऑक्टोबर हा ‘जागतिक रजोनिवृत्ती दिन’ म्हणून पाळला जातो. रजोनिवृत्ती म्हणजे जीवनातून निवृत्ती नव्हे; ती केवळ एक शारीरिक प्रक्रिया आहे हे समजून घेतले पाहिजे.

      October 18, 2021