वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मूर्तीपूजा ही पंचेद्रियांवर अवलबून असलेल्या माणसाच्या आकलनशक्तीची अगतिकता आहे. मूर्तिपूजक आणि मूर्तिभंजक या दोघांनीही जर हे सत्य समजावून घेतले तर दोघेही त्या विश्वनिर्मात्याची उपासना वेगवेगळ्या पद्धतीने करतानाही परस्परबंधुभाव सांभाळू शकतील. एवढेच नव्हे तर तो वृद्धिंगतही करू शकतील.
June 13, 2022
मुळ्याचा वापर हा भाजी करायला तर केला जातोच, तसेच सांबार,आमटी,डाळ,कोशिंबीर,लोणचे इ पदार्थ तसेच कोलंबीची मुळा घालून केलेली आमटी हे सर्वच पदार्थ रूचकर व चविष्ट लागतात.
November 21, 2016

पोपटांच्या आकलनशक्तीवर आधारलेल्या पूर्वीच्या संशोधनात पोपट आणि माणसाच्या मेंदूतील अनेक साम्यस्थळं स्पष्ट झाली होती. यांनुसार माणसाप्रमाणेच पोपटाच्या मेंदूचा आकारही, शरीराच्या आकाराच्या तुलनेत मोठा असतो. तसंच दोघांच्या मेंदूच्या पुढच्या भागात मज्जापेशींची संख्या मोठी असते. इतकंच नव्हे तर, दोघांच्या जनुकीय आराखड्यातल्या, मेंदूच्या विकासाशी संबंधित भागांतही मोठं साम्य दिसून आलं आहे. माणसाला जशी उत्तम आकलनशक्ती आणि दीर्घायुष्य मिळालं आहे, तसंच पोपटाच्या बाबतीतही उत्तम आकलनशक्ती आणि दीर्घायुष्य यांचा मिलाफ घडून आला आहे.
May 3, 2022
आता निवडणुकांचा काळ आहे. सध्या पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांची धामधूम चालू आहे. सात महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे हा निवडणुकांचा काळ चालू झाला आहे, भाजपने आता नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा विषय उपस्थित केला आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी बिहारमध्ये पाटण्यात मोदी यांचा हुंकार मेळावा होता. या मेळाव्यात मोदी भाषण देणार होते.
November 12, 2013
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावाबाबतचा महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले ‘मुंबई’ हे नाव वगळून समितीने ‘महाराष्ट्र’ असे नाव ठरविले व राज्याची स्थापना कामगार दिनास म्हणजे १ मे रोजी केली गेली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्यठमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर निश्चित झाली.
May 1, 2022
सध्या तर फळभाज्यांसह विविध गोष्टींचे रस भल्या पहाटे पिण्याची चढाओढच अनेक स्त्री-पुरुषांमध्ये दिसते. जॉगिंग ट्रॅक्सवर तर भल्यासकाळी त्या रसठेल्यांसमोर रांगा लागतात. कुणी दुधीचा रस रोज पितो, तर कुणी कढीपत्त्याचा, कुणी गव्हाचा तृणरस तर कुणी कारल्याचा, कोरफड, काकडी, गाजराचा किंवा कुणी या सगळ्याचा मिक्स रस रोज नियमित, न चुकता सेवन करतात. एकवेळ व्यायाम राहिला तर चालेल; पण हे रस अनेकजण पितातच.
खरंच असे रस रोज पिणं हे आरोग्यवर्धक असतं?
नियमित फिरायला जाणारे आणि नियमित ज्यूस / रस घेणारे असे अनेकजण कधी विचार करतात की, याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? त्यासाठी कधी डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे का? मी कोणता रस घेऊ? किती घेऊ? किती दिवस घेऊ? आणि घेऊ की नको? असं कुणी विचारतं का डॉक्टरांना? छे.छे.! असा सल्ला घेण्याची आपल्याला गरजच वाटत नाही, कारण सेल्फ मेडिकेशन करणा:यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. पण निदान त्याबद्दल वाचन, नेटवरून काही माहिती तरी घेतो का? तर नाही. ते औषधी आहे ना? मग सर्वाना चालते, असाच एक समज. पण ते औषधी आहे म्हणूनच प्रश्न आहे, कारण औषध म्हटलं की त्याला डोस म्हणजे मात्र / प्रमाण आले. कालावधी आला आणि मुख्य म्हणजे तुम्हाला याची गरज आहे का हे तपासणं आलं.
मधुमेह नसणा:यानं मधुमेहाचं औषध घेतलं तर चालेल का?
जेव्हा पहाटे आपल्याला रस विकत मिळतात, तेव्हा ते कधी काढले आहेत याची माहिती घेणं आवश्यक आहे. तसंच त्यांची साठवण करताना, वाटप करताना स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात आहे का हे बघणंसुद्धा आवश्यक आहे. रस काढताना ती वनस्पती स्वच्छ धुवून, निवडून नंतर रस काढला जातो का? ते ही बघा. जर औषधांवर पेस्टिसाइडचे फवारे मारले जात असतील तर ते साध्या पाण्यानं धुवून निघत नाहीत. त्यांचे अंश रसातही येतात. म्हणून ही द्रव्यं कुठून आणली जातात त्याचीही माहिती घ्यावी. अनेक जण स्वत:च्या घरीच ज्यूस काढतात. आणि विचारतात, हे तर चालेल ना प्यालं तर? पण त्यांनीसुद्धा काळजी घेणं, सल्ला घेणं आवश्यकच आहे. आपण जे काही खाणार आहोत त्याची पूर्णत: शास्त्रीय माहिती घेणं आवश्यक आहे. साधे कपडे खरेदीला गेल्यावरही आपण किती चौकसपणो खरेदी करतो? आणि सेवीय पदार्थाबाबत मात्र फारच उदासीन असतो. म्हणूनच आधी सारासार विचार करा, तो महत्त्वाचा!
कुठल्याही प्रकारचे रस पिताना ऋतू, वय, प्रकृती, आजार, वनस्पतीचे गुणधर्म या सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. आणि तुमच्या डॉक्टरांनी/वैद्यांनी सुचवलं असेल, सांगितलं असेल तर त्यांच्या सल्ल्यानुसारच हे रस घेणं योग्य. स्वत:च्या मनानं, आपल्याला वाटतं म्हणून किंवा सगळे पितात म्हणून हे रस पिऊ नका.
आयुव्रेदामध्ये रसचिकित्सा सांगितली आहे. याचे दोन अर्थ होतात.
1) रस - स्वरस, एखाद्या वनस्पतीचा अंगचा रस.
2) रस+षड्रस- चव जिभेलाच ‘रसना’ असे म्हणतात.
कारण यामुळे चवीचं ज्ञान होतं. या चवी सहा प्रकारच्या असतात. गोड, आंबट, खारट, तुरट, कडू आणि तिखट. या प्रत्येक चवीचे शरीरावर परिणाम होत असतात. या चवीसुद्धा ठरावीक प्रमाणात घेणं आवश्यक असतं. हे प्रमाण कमी-जास्त झाल्यास आजार होतात.
उदा. गोड चव ही फक्त मधुमेहींनाच वज्र्य नाही तर ज्यांचं वजन वाढते आहे, ज्यांना सर्दी-खोकल्यासारखे कफाचे आजार सतत होतात त्यांनीसुद्धा गोड जास्त खाऊ नये. याचप्रमाणो कडू चव जरी आवश्यक असली तरी त्याचं प्रमाण अत्यल्प असावं, अधिक प्रमाणात घेतल्यास शरीरात रुक्षता वाढते. सतत तहान लागणं, त्वचा कोरडी होणं, हे त्यातूनच घडतं. रोज कारल्याचा रस घेण्यानं त्या बाईंचं काय झालं, हे आता तुम्हालाही समजलं असेल! औषध ही दुधारी तलवार आहे. स्वत:च्या मनानं औषधं घेऊन स्वत:वर प्रयोग करणं, स्वत:ला ‘गिनिपिग’ बनवणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे औषधींचा / वनस्पतींचा रस वापरून चिकित्सा करणं. यात ज्या वनस्पतींमध्ये भरपूर रस असतो, प्रामुख्यानं त्यांचा रस वापरला जातो. विविध स्वरूपात औषधं वापरली जातात. उदा. चूर्ण, काढा, गोळ्या यापैकी एक म्हणजे रस. ज्या वनस्पतींमध्ये दृवांश कमी असतो त्यात थोडं पाणी टाकून, कुटून हा रस काढला जातो. यास अग्निसंस्कार नसतो यामुळे रस टिकाऊ नसतात. 2-3 तासांपेक्षा अधिक टिकत ते टिकत नाहीत. ते फसफसतात. आंबट होतात. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, रक्तदाब कमी करण्यासाठी हृदयाला बल्य म्हणून दुधी भोपळा रस उपयोगी आहे. पण तुम्ही रोज घेत असाल तर त्यावर किटकनाशकं फवारणी किती प्रमाणात आहे याची माहिती घ्या. रक्तवाढीसाठी किंवा डोळ्यासाठी अनेक जण गाजर, बीट दुर्वाचा असे रस घेतात. गाजर रस स्वरूपात किंवा त्यासह स्निग्ध पदार्थ तेल, तूप इत्यादि असल्यासच शरीरात शोषला जातो. सलाड म्हणून गाजर कच्चं खाल्यास शरीरास काहीही मिळत नाही. त्याऐवजी तेलाची फोडणी असलेली कोशिंबीर किंवा गाजर हलवा खाणं योग्य. त्याचप्रमाणं गाजर रसही सतत घेत राहिल्यास शरीरातील केरॅटिन वाढते. त्वचा तांबूस होते. बीट रससुद्धा रोज घेऊ नये. मधूनमधून खंड करावा. गाजर-बीट एकत्र घेतल्यास 1/4 भाग बीट व 3/4 भाग गाजर रस असं प्रमाण ठेवावं. कोरफड रस नियमित घेणा:या व्यक्तीही आहेत. त्याचा ब्रँडेंड रसही आता बाजारात मिळतो. कोरफडीचं कार्य मुख्यत: यकृत, गर्भाशय यावर होतं. सतत कोरफड रस घेण्यानं मूळव्याध होण्याची शक्यता असते. तसेच गर्भिणी, पाळीच्या वेळी अति रक्तस्त्रव होणा:या स्त्रिया, यांनी हा कोरफड रस घेऊ नये.
-- संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. वैद्य रजनी गोखले
October 1, 2016
।। गजाननाय नम: श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि ।।
गजाननप्रिय दुर्वा खरोखरच तन मन शांत करायचे महत्त्वाचे कार्य करते.
ह्याचे जमीनीवर पसरणारे बहुवर्षायू क्षुप असते.अनेक पर्व असणारे व ह्या पर्व संधी जवळ उगवणारी मुळे ही पुन्हा जमीनीत शिरतात व पुन्हा वाढतात व पसरतात.ह्याची पाने १-१० सेंमी लांब असून,फुले हिरवी अथवा वांगी रंगाची एका मंजीरीत २-८ असून मंजीरी १-८ सेंमी लांब असतात.बिया अगदी बारीक पिंगट रंगाच्या असतात.
ह्याचे उपयुक्तांग पंचांग आहे.
आता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात:
ह्याची चव तुरट,गोड,थंड गुणाचे असून हल्के असते.ही कफपित्तनाशक अाहे.
चला आता ह्याचे शरीराला काय फायदे आहेत ते जाणून घेऊया:
दुर्वाचा लेप हा आघात,जखम,व्रण ह्यात लेप केल्यास डाग कमी होतात व वर्ण सुधारतो.
डोळ्यांची आग होत असल्यास दुर्वा फायदेशीर आहे.
शरीरात वाढलेली उष्णता कमी करायला उपयुक्त आहे.
स्त्रियांच्या अंगावर लाल अथवा पांढरे जात असल्यास दुर्वारस फायदेशीर ठरतो.
दुर्वा गर्भाशयाची शक्ती वाढविते.
वारंवार तहान लागणे,उल्टी होणे ह्यात देखील दुर्वा उपयुक्त आहे.
मनाला शांत करणे हा अलौकिक गुण ह्या वनस्पती मध्ये आढळतो म्हणूनच तर गणपतीला ह्या वाहिल्यास आपले ही मनशांत होते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९६०६९९७०४
July 30, 2017
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जागतिक आश्चर्य आहे. हजारो वर्षांपूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झाले असून, या सरोवराचे पाणी खारे आहे. हे सरोवर पाहायला जगभरातील लोक लोणारला भेट देतात.
January 4, 2025
आता आपण खोबरेल तेलाचे घरगुती उपयोग पाहूयात:
१)खोबरेल तेल व चुन्याची निवळी हे मिश्रण घोटून केले मलम केसांना लावल्यास केस गळणे थांबते.
२)थंड हवेशी संपर्क आल्याने त्वचा फुटते ह्या करीता खोबरेल तेल व लोणी हे मिश्रण समभाग मिसळून त्वचेवर लावावे.
३)खोबरेल तेल अंगाला नियमीत चोळल्यास मांसपेशी व स्नायू पुष्ट होतात.
४)संडास करताना व नंतर गुदद्वाराची आग होत असल्यास खोबरेल तेलाचा फाया गुदद्वारात ठेवावा.
५)लहान मुलांची टाळू भरायला खोबरेल तेल टाळूवर लावावे.
६)बोटांना होणाऱ्या कोरी बऱ्या होण्सासाठी त्यावर लोखंडी न गांजलेली सुरी तापवून त्यावरून खोबरेल तेल सोडावे.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 26, 2016
राम मंदीर’ हे नांव या नविन स्टेशनला दिलं हे चांगलच झालं यात दुमत नाही. पण सारा परिसर पूर्वीपासून ‘औशिवरा’ या नांवाने प्रख्यात आहे. मला वटातं ‘ओशिवरा’ हे नांव ‘ओम शिव हरा’ या भगवान शंकराच्या नांवाचा अपभ्रंश असावा. कारण आताच काही दिवसांपूर्वी गोरेगांच्या प्रसिद्ध राम मंदीर परिसरात मंदीरा पेक्षा प्राचिन शिव मंदीराचे अवशेष सापडले
January 2, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti