वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
या अंतिम श्लोकात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शिरस्त्याप्रमाणे फलश्रुती सादर करीत आहेत.
भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी भगवान श्रीगणेशांची एकूण चार स्तोत्रे रचली आहेत. कृपारूपी जलाचे महासागर असणाऱ्या श्रीगणेशाचे मी वंदन करतो.
आचार्यश्री म्हणतात, मी सदैव अशा भगवान गणेशांना शरण जातो.
प्रकाशितात्मतत्वक- साधकांच्या आत्मतत्वाला प्रकाशित करणारे. त्यावर पडलेला मायेचा मळ दूर करणारे.
अशा भगवान गणाधिपांना मी वंदन करतो.
मुदा नमामि विघ्नपम् ! अशाच या विघ्नविनायकांना मी अत्यंत आनंदाने वंदन करतो.
या जीवनात जीवाला त्रस्त करणार्या अनेकानेक गोष्टी उपलब्ध आहेत. प्रारब्धवशात या सगळ्यांशी संघर्ष करताना माणसाला येणाऱ्या श्रमाला ज्यांच्या उपासनेने शांती प्राप्त होते असे.
या अंतिम श्लोकात भगवान जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराज या स्तोत्राचा पठणाचे फळ सांगतांना म्हणतात, हे भगवान गणाधिपांचे स्तोत्र नरांना त्यांचे ईप्सित प्रदान करणारे आहे. अर्थात ज्याला ज्याला ,जे जे हवे ते ते सर्व या स्तोत्राने प्राप्त होते.
भगवान गणेशांच्या स्तोत्रांनंतर जगदंबेच्या स्तोत्रांच्या रसग्रहणाला आरंभ करताना आज नेमकी वसंत पंचमी असावी हा नियतीचा सुंदर योगायोग. वसंत पंचमी हा ज्ञानदायीनी देवी शारदेच्या, सरस्वतीच्या पूजनाचा दिवस
जगदंबेचे स्वरूप आहे तेज. त्या तेजानेच ज्ञान होते. दिवसा सूर्य, रात्री चंद्र, अंधारात दीप इत्यादी तेजाचे सर्व प्रकार आई जगदंबेच्या कला आहेत. या सगळ्यांच्या द्वारे ती ज्ञान प्रदान करते. यापैकी कोणते ना कोणते साधन सदैव उपस्थित असल्याने तिला विनिद्रा असे म्हटले.
आई जगदंबेने आपल्या ललाम अर्थात कपाळावर कुंकुमाची चंद्रकोर रेखाटली आहे. त्यामुळे तिला ललामाङ्कफाला असे म्हणतात.
Copyright © 2025 | Marathisrushti