(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सेवानिवृत्त दिवस

    सेवानिवृत्ती हा आयुष्यातला एक नवीन टप्पा. येथेच ‘स्व’चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते. या आनंदाचा शोध घेत घेत मार्गक्रमण करणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य.

      December 17, 2021


  • आयुर्वेदाची आजाराचा विचार करण्याची पद्धत

    आयुर्वेद शास्त्रात मनुष्य शरीर , त्यात उत्पन्न होणारे रोग , त्याची चिकित्सा याचा विचार फार वेगळ्या पद्धतीने केला गेला आहे . वेगळे मी एवढ्यासाठीच म्हणीन की , आताची आपली जीवन शैलीच फार बदलली आहे

      October 15, 2022


  • घरोघरी आयुर्वेद – वजन कमी करण्यासाठी उपास?

    डायट' हे आपल्याकडे गेल्या काही वर्षांत बरेच फोफावले फॅड आहे. ज्यूस डायट ते केटोजेनिक डायट असे विविध डायट प्रकार घाऊक दराने आढळून येतात. वजन कमी करण्यासाठी उपास करणे हा एक 'अनोखा' मार्ग काहीजण अवलंबतात. विशेषतः महिलावर्गात ही पद्धत फारच प्रसिद्ध आहे.

    "सध्या वेट ओब्सर्व्ह करतेय. डायटचा भाग म्हणून रात्री जेवत नाही." असं वाक्य बऱ्याचदा कानावर पडत असतं. किती मात्रेत जेवावे हे आपण याआधीच पाहून झाले आहे. आज या उपास(मारी)बद्दल पाहू. आयुर्वेद म्हणतो; चार घास कमी जेवावे. मात्र योग्य मात्रेपेक्षा कमी जेवणे हे आरोग्यास अपायकारक आहे असेही आयुर्वेदाचेच मत आहे. भूक मारून उपास केल्यास शरीराला पुष्टी प्राप्त होत नाही. पुष्टी नसल्याने बळ कमी होते. शरीराची जडणघडण (उपचय) ढासळू लागते. हा उपचयच आपली रोगप्रतिकार शक्ती ठरवत असतो. तोच कमी झाल्याने या शक्तीवरही विपरीत परिणाम होऊन शरीर आतून पोखरण्यास सुरुवात होते. याशिवाय अशी उपासमार केल्याने शरीरात वेगवेगळे वाताचे विकार (सांधेदुखी वगैरे) घर करू लागतात.

    वजन कमी करण्याच्या नादात भूक मारून रात्रीचे जेवण बंद केलेत तर सुरुवातीला चांगला फरक अवश्य जाणवतो; काही प्रमाणात वजन कमीदेखील होते. मात्र हे वजन शरीरातील अतिरिक्त पाण्याचे असते. प्रत्यक्षात मेद मात्र मुळीच कमी झालेला नसतो. शिवाय अशा प्रकारे काही किलो वजन घटवलेत तर पुढे केव्हाही नेहमीचा आहार घेण्यास सुरुवात केल्यावर त्याच्या जवळपास दीड ते दोन पट वजन वाढते हा कित्येकांचा अनुभव असेल. आरोग्य उत्तम राखून वजन कमी करायचे असल्यास; 'योग्य आहार- संतुलित व्यायाम- आयुर्वेदीय उपचार' ही यशस्वी त्रिसूत्री आहे.

    वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      October 22, 2016


  • भारताच्या अण्वस्त्रविषयक धोरणाचा पुनर्विचार आवश्यक

    पाकिस्तान आणि चीनचे संयुक्त आव्हान भारतासमोर उभे राहिले आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्यातील मैत्री आणि दोघांचेही भारताच्या विरोधातील वागणे पाहता भारताने सुरक्षेच्या आणि प्ररोधनाच्या दृष्टीने आपल्या अणुधोरणावर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे वाटते. पहिल्यांदा अणुहल्ला करणार नाही. मात्र, भारतावर अणुहल्ला झाल्यास प्रतिहल्ला करून शत्रूचे अधिकाधिक नुकसान करण्याचे भारताचे सध्याचे धोरण आहे.

      September 13, 2019


  • निष्ठा

    कौन म्हणतो मला दलबदलू
    मी आहे एक वफादार पाया
    माझी निष्ठा आहे अत्तूट
    फक्त खुर्चीशी

    -- विवेक पटाईत

      June 5, 2010


  • आहारसार भाग ५

    वांगी खावीत तर कृष्णाकाठचीच. आणि अस्सल नारळाच्या रसातील सोलकढी प्यावी तर कोकणातीलच. हीच वैशिष्ट्ये. हे वेगळेपण. हीच परंपरा. हाच प्रदेशविचार.

      August 23, 2016


  • बांगलादेशची निर्मिती

    भारताने फक्त १४ दिवसातच पाकिस्तानला आपली शस्त्रे खाली ठेवण्यास भाग पाडलं. भारताने या युद्धात निर्णायक विजय मिळवला. पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांनी शरणगतिपत्रावर सही केली. भारताने लगेचच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला.

      December 3, 2021


  • सौभाग्यलेणं – बांगड्या

    भारतीय संस्कृतीमध्ये बांगड्यांना विशेष स्थान आहे. हा अलंकार हाताचे सोंदर्य वाढवतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या हातात घालण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात हिरव्या बांगड्याना विशेष मान आहे. यालाच “चुडा” असेही म्हणतात.

      March 4, 2024


  • पन्नास वर्षांची मराठी रंगभूमी आणि नाट्यलेखनाचे प्रवाह

    मराठी रंगभूमीवरील नाट्यलेखनाचा गेल्या पन्नास वर्षांचा हा धावता आढावा. हा प्रवास सत्तरच्या दशकानंतर विविध माध्यमांच्या आक्रमणाने खडतर होत गेला आणि मराठी प्रेक्षकांच्या पारंपरिक सवयीही बदलल्यामुळे तो अधिकच दुष्कर झाला. पण गुणात्मकदृष्ट्या मराठी नाटक मागे पडत चाललं आहे हा ओरडा खोटा आहे.

      March 18, 2022


  • यष्टीवेधी बर्टी आणि सच्चूचे पहिले शतक

    कसोटी इतिहासातील यष्टीमागील बळींचे शतक पूर्ण करणार्‍या पहिल्या व्यक्तीचा जन्म ९ सप्टेंबर १८९४ रोजी झाला. त्याने बूट खुंटीला टांगून ठेवले तेव्हा त्याच्या ग्लोव्ह्जवर १३० बाद-खुणा उमटलेल्या होत्या आणि त्यापैकी केवळ अठ्ठ्याहत्तर खुणा झेलांच्या होत्या. तब्बल ५२ फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या बर्ट ओल्डफील्डने यष्टीचित केले होते.

      September 8, 2010