वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

रताळे हे कंदमूळ आहे. रताळी हे एक उपवासाचे पदार्थ. तसेच रताळे हे प्रत्येक माणसाला आवडतेच. लहान मुलांना भूक लागली तर आई लागलीच दूध व साखर घालून मुलाला देतात. रताळे हे प्रत्येकासाठी अत्यंत पौष्टिक अन्न आहे. बटाट्याप्रमाणेच रतळ्याचेही उपयोग आहेत. भरपूर जीवनसत्त्वे त्याचप्रमाणे भरपूर खनिजे तसेच भरपूर प्रथिने यात आहेत. रताळ्याचा उगम कसा व कुठून झाला हे अज्ञात आहे. मात्र रताळ्यात अमेरिकेमध्ये तयार होते तसेच आफ्रिका व काही ठिकाणी दक्षिण आशियातही मिळते. मात्र फार पूर्वीपासून रताळा हे भारताला परिचित आहे. तसे बघितले तर फूड अँड अॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन (एफ.ए.ओ.) यांनी सर्व जगात संवर्धन केल्याप्रमाणे संबंध जगात रताळ्याचे उत्पादन जास्त असते. चीनमध्ये जगात दुसऱ्या नंबरवर रताळ्याचे उत्पादन होते.. अगदी नवीन अमेरिकन शेतकरी डॉ. मॅथ्यू मॉरिसन याने रताळ्याचे अनेक पृथ्थकरण करून त्यातील उपयोगाकरिता पुढे आणली. रताळे ही कोणीही कुठून आणले तरी अत्यंत पौष्टीक असे जाहीर केले. याचे कारण म्हणजे रताळे कोठेही कोणत्याही हवामानात वापरता येते. आश्चर्य म्हणजे रताळी अनेक देशात निर्यातही करतात, हे विशेष.
आता रताळी सर्वत्र उपलब्ध असल्याकारणाने रताळ्याचे अनेक प्रकार करण्यात येतात. अगदी बटाटे उकडून बटाट्याची भाजीदेखील उपवासाला चालते म्हणजे ते एक पूरक अन्न चालू शकते. रताळ्याची कापा बटाट्यासारखी तेलात अगर तुपात तळून चांगल्या लागतात. रताळे किसणीने किसून त्याची पॅटीस अथवा अनेक प्रकार उपयोग करता येतो. तसेच लहान मुलांचे अथवा ज्येष्ठ नागरिकांचे पाय दुखत असल्यास रताळ्याचा उपयोग अवश्य करता येतो. थोडक्यात रताळे हे एक चविष्ठ आणि निरनिराळ्यात प्रकारात केलेली अपूर्व देणगीच म्हणावे लागेल.
रताळ्यात सगळे आढळते. त्यात जेजे आहे ते ते सर्वत्र मिळते.
१०० ग्रॅम रताळ्याचा गुणधर्म खालीलप्रमाणे आहे.

– मदन देशपांडे
भारतामध्ये वांगी हे बारा महिने येणारे पीक आहे. बाजारात कोणत्याही वेळी गेले तर तुम्हांला वांगी सहज कोठेही मिळू शकते. गेल्या चार हजार वर्षांपासून वांगे भारतात उपलब्ध आहेत. जंगलामध्ये काही वेळा वांगी येतात. कारण वांग्याचे बी कोठेही मिळू शकते. आणि म्हणूनच गरीब लोक गोळा करून खात असतात
आज काल बऱ्याच घरांमध्ये हायपर टेन्शन, हाय किंवा लो ब्लड प्रेशरची समस्या किंवा आजार असतो. रक्तदाब म्हणजेच BP चा त्रास असणाऱ्या व्यक्तीचा वेळोवेळी BP चेक करावा लागतो. व तो आपण BP मशीन द्वारे चेक करू शकतो. तसेच प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाणे शक्य होत नाही, त्यासाठी घरात एखादे BP मॉनिटर मशीन असणे सोयीस्कर होते.
लहान मुले म्हणजे साधारणपणे ८ ते १० वर्षे असताना कुठेही हिंडावे फिरतात. परत शाळेतील आपला अभ्यास संपवून खेळावयास जातात व सतत हुंदडत असतात. जेवण झाल्यावर सगळे काम अथवा जाग येताना आईचे काम करीत बाळ मोठ्याने ओरडत असते. आई माझे पाय वळत असतात, असे सांगून मोठ्याने ओरडत असते किंबहुना रडतसुद्धा असतो. आई बिचारी मुलांना जवळ ठेवून सतत पाय चेपत असते.
सीताफळ हे एक कोरडवाहू झाड असे म्हणतात. तरी हे कोरडवाहू आहे असे म्हटले तर हे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. सीताफळाची लागवड अवषर्णग्रस्त भागात व हलक्या जमिनीत होते. म्हणूनच याला कोरडवाहू झाड असे म्हणतात. सिताफळाची लागवड भारतातील अनेक भागात केली जाते.
कोथिंबीर ही एक अतिशय सौंदर्यपूर्वक सुगंधी आणि अगदी नाजूक अशी वनस्पती आहे. १४व्या शतकात हा प्रकार ब्रिटिशांनी भातात आणला. आता मात्र असे सुगंधी सुवासिक बारीकसे रोपटे बघून संबंध जगात सर्वत्र पसरला आहे. कोथिंबीरीची फळे अगदी सोनेरी रंगाची असतात व याला आपण धणे असे संबोधतो.
आजच्या धावपळीच्या व दमवणाऱ्या जगण्यात अचानक चाळिशी येते व आपल्याला आपल्यातले हे असे बदल अचंबित करतात. पण लक्षात घ्या की हे सगळे बदल रातोरात होत नाहीत. पळापळीच्या आयुष्यात आपल्याला जाणवत असतील तरीही त्यांची दखल घ्यायची जरूरी आपल्याला भासत नाही आणि मग कधीतरी अचानक चालत्या गाडीला ब्रेक बसावा तसे काहीतरी निमित्त होते व जाणवते की खरंच, असं सगळं झालेलं दिसतंय ! पण या सदराद्वारे मी आपल्याला थोड्याफार प्रमाणात या चाळिशीसाठी तयार कसे रहायचे हे सांगायचा प्रयत्न करणार आहे.
आपल्याकडे एक अत्यंत वाईट गोष्ट असते. ती म्हणजे प्रत्येक जण ज्येष्ठ नागरिक उठसूठ डॉक्टरकडे धावत असतो. डॉक्टर औषध देतो. परंतु आपणास काय होते, हे पाहण्याकरिता थोडा वेळ थांबावे. घरातील वडील माणसे अथवा इतर लोक काही तरी तक्रारी सांगतात. हेच उदाहरण म्हणजे रात्री झोपतेवेळी पाणी अजिबात पीत नाही आणि हेच पायात गोळे अथवा वळ येण्याचे कारण होते.
गुग्गुळ ही भारतातील एक औषधी आहे. धार्मिक कार्यक्रमात हिचा उपयोग धुपावर टाकण्यासाठी करतात. ही जंतुघ्न आहे. गुग्गूळ हा बर्सेरेसी कुलातील मध्यम उंचीचा एक पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव कॉमिफोरा मुकुल आहे. शुष्क वातावरण आणि खडकाळ जमिनीवर हा वृक्ष वाढतो. भारतात मुख्यत्वे उत्तर भारतातील राज्यांमध्ये तो आढळतो. गुजरात आणि राजस्थानमध्ये बेसुमार तोडीमुळे तो दुर्मिळ झाला असल्याने या वृक्षाचा समावेश नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींच्या यादीत करण्यात आला आहे.
भारतात मुळा कोणाला आवडत नाही? कारण मुळ्यातच सगळे चांगले गुणधर्म असतात आणि दुसरे म्हणजे मुळा सर्व जगात कुठेही सापडतो. मुळ्याचे उत्पादन साधारणपणे जर वर्षभर होते तरी पण एप्रिल ते जून व ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात विशेष सापडतो. मुळ्याचे बी पेरल्यापासून साधारण ३ ते ७ दिवसांत त्याला उगवण येते व पूर्ण मुळा तयार होण्यास तीन ते चार आठवडे लागतात. मात्र मुळ्याची पानेही फार देखणी दिसतात. मात्र मुळ्याला कीडही लवकर लागते. मुळा तयार केल्यास ती ताजी असल्यास भाजी त्वरीत करता येतात.
Copyright © 2025 | Marathisrushti