वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
प्रेशर कुकर पहिल्यांदा बनवला तो फ्रेंच गणितज्ज्ञ डेनिस पॅपिन यांन १६७९ मध्ये त्यांनी एका लोखंडी भांड्याला पक्के झाकण बनवून हा प्रयोग यशस्वी केला होता. कुकरला त्यावेळी डायजेस्टर हा शब्द वापरला जात असे.
January 28, 2023
वातावरणातील प्रदुषणाचे वाढते प्रमाण आणि जागतिक तापमानात होणारी वाढ या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे संचालक गजानन वर्हाडे यांच्या मुलाखतीचे शब्दांकन
March 4, 2011
अणुइंधन म्हणून वापरता येणाऱ्या मूलद्रव्यांपैकी युरेनिअमचे आपल्याकडील साठे मर्यादित तर आहेतच, पण ते कमी प्रतीच्या खनिजाच्या स्वरूपातलेही आहेत. थोरिअम या अणुइंधनाच्या बाबतीत मात्र आपण श्रीमंत असून, थोरिअमच्या वैपुल्यानुसार भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.
July 27, 2023
सरकार केंद्रातले असो की राज्यातले घोषणा करून लोकांना लॉलीपॉप देण्याचे निव्वळ नाटक करीत असते.
September 5, 2010

लोणचं वाला च बोलना हैं क्या ?”
अमिताभ बच्चन ह्यांची एखादी जाहिरात टीव्ही सुरु होते आणि ते शुद्ध मराठीमध्ये बोलत असतात. आपोआप मनात प्रश्न येतो त्यांना मराठी येत असेल काय ?
मराठीच नव्हे तर गुजराती, तामिळ, तेलगू आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्ये ते बोलताना दिसतात. इतक्या भाषा ते बोलू शकतात का ?
March 11, 2026
३) हळद- वनस्पती शास्त्रातील नाव कर्क्यूमा लाँगा, याचे जमिनीतले खोड म्हणजे हळदकुंड. पुराणकाळापासून मंगलकार्यातील व पाककृतीत मानाचे स्थान. पदार्थांना रंग व चव देणारी हळद आहेच तशी गुणकारी. सांगली सर्वात जास्त हळद पिकविणारी व निर्यात करणारी. पिढ्यान्पिढया हळद कृष्णाकाळच्या भूमिगत गोदामात साठवली जाते. जखम झाल्यास रक्तस्त्राव थांबवण्यासाठी व जंतुप्रतिबंधक म्हणून हळद लावण्याचा प्रघात आहे. हळदीमध्ये लोहाचे प्रमाण सर्व पदार्थापेक्षा अधिक आहे. ६८ मि. ग्रॅ. हे लोह शोषले जाण्यासाठी साहाय्य करणारे मँगनीज ९ मि. ग्रॅ., कॅल्शियम १५० मि. ग्रॅ., फॉस्फरस २८०, जस्त ३ मि. ग्रॅ. प्रतिशत असते. लोह खूप असल्यामुळे पांडुरोगात उपयोगी व एकंदरीत प्रतिकारशक्ती वाढवते. यातील कर्क्युमीन कर्करोगप्रतिबंधक आहे.
४) वेलची- एलिटेरिया कार्डामोमम नावाची एवढीशी वेलची! पाकशास्त्रात व मुखशुद्धीसाठी महत्त्वाचे स्थान, पाकशास्त्रातील पाककृतीत वेलची आवश्यक. काळा मसाला तिच्याशिवाय होत नाही. वेलची उत्तेजक, पाचक, पोटातील वायू कमी करणारी, मळमळ कमी करणारी. लवंगेप्रमाणेच कामवासना वाढवणारी. हे गुणधर्म त्यातील तैलद्रव्यामुळे येतात म्हणून ती थंड ठिकाणी ठेवावी म्हणजे तैलद्रव्ये उडत नाहीत. श्वसनसंस्थेला, पचनसंस्थेला शामक. महत्त्वाचे म्हणजे वेलची बिंबिकेची गुठळी होऊ देत नाही. मादी फुलातून वेलची तयार होते. नर फुले दिसायला सुंदर. वेलचीत प्रतिशत कॅल्शियम, १३० मि. ग्रॅ., फॉस्फरस १६०, मॅग्नेशिअम १७३,
मँगनीज ९ जस्त ३ व कोलीन १५५० मि. ग्रॅ. असते.
५) दालचिनी - सीमॅमोमम झीलॅनिकम या
झाडाची साल. याचा क्रियाशील घटक सीनॅमिक अॅसिड. हे जंतूनाशक आहे. त्यामुळे पूर्वी इजिप्तमध्ये कलेवरांना लेप लावायचे. रोमन लोक अत्तरे व मद्यात उपयोग करतात. आशियाई स्वयंपाकात करतात.
दालचिनीचा अर्क औषधात वापरतात, त्यामुळे पोटातील वायू कमी होऊन पोटदुखी कमी होते. पाचक व भूक प्रज्वलित होते.
६) आले - झिंझीबार ऑफिसीनेलचे भूमिगत खोड. भारत सर्वात जास्त आले पिकवले व निर्यात करतो. मुख्य द्रव्य जींजेरॉल. प्रसाधने, सुवासिक द्रव्ये, शीतपेये यात वापर. पाचक, पोटातील वायू कमी करते. चघळल्यास लाळ सुटते. वार्धक्यात लाळ कमी होऊन तोंडात शुष्कता येते. अशावेळी आवळकट्टी, आलेपाक, चघळावी म्हणजे लाळ सुटून पचनास मदत होते. यात लोह ४ मि. ग्रॅ., मॅग्नेशिअम ४०५, मँगेनीज ५, कॅल्शियम २०, फॉस्फरस ६० मि. ग्रॅ. प्रतिशत असते. आल्यामुळे रक्तातील बिंबिकेची गुठळी होत नाही. कर्करोगप्रतिबंधक, रक्तातील शर्करा कमी करते. यावर अधिक संशोधन चालू आहे.
March 14, 2023
नुकताच व्हॉटसऍपवरुन एक लेख वाचायला मिळाला. आपल्या डोळ्यावरील झापडं उघडणारा हा लेख कोणी लिहिलाय ते माहित नाही. मात्र ज्याने कोणी तो लिहिला असेल त्याला तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं नक्कीच वाटत असणार. त्यामुळेच आमचाही खारीचा वाटा म्हणून हा लेख मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर करतोय.
एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज!
ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट पुन्हा आठवली.
सध्या लोक काहीही खातात आणि शेंगा खाल्ल्यावर टरफले इथे तिथे नाही टाकत, तर ती ही खाउनच टाकतात. शेंगा खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे.
संत शब्द तुम्ही तीन प्रकारे लिहिलात.
आता संत शब्द कुठल्याच प्रकारे लिहावा लागत नाही फारसा.
संत व्हायचा प्रयत्न तर कुणीच करत नाही, कुणालाच तेवढी उसंत नसते.
स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक, स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास "उपभोग"ता येतो.
मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा "रोड" आता "आर्थर रोड" पाशी येऊन थांबलाय. तिथं देशद्रोह्याना मिळणार्या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या देशप्रेमी, कायदापालक सज्जनांनाही वाटू लागलाय.
तुम्ही लिहिलंत गीतारहस्य.
गीतेतली बरीच रहस्ये आता नव्याने उलगडू लागली आहेत. कौरवपांडव उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत, तर युती करुन सत्ता भोगतात.
"आप्तस्वकीयांशी कसा लढू" हा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला.
बाप, भाऊ, मामा, काका, गुरू - कुणाच्याही पाठीत सहज खंजीर खुपसतो आजचा अर्जुन.
वस्त्रहरण तर नित्याचंच झालं आहे,
पण कृष्णानं पाठवलेली वस्त्रं कधीच पोचत नाहीत कुठल्याच द्रौपदीपर्यंत.
टिळक, आता "केसरी" शब्दाचा अर्थही कळत नाही कुणाला.
डरकाळ्या फोडणार्या कुठल्याच सिंहाचा आता भरवसा उरला नाही.
सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटाखालचे मांजर बनून जातील.
चिंतन, मनन आणि हवापालट करायला तुम्ही सिंहगडावर जाऊन रहायचात ना टिळक?
तिथली हवासुद्धा आता खूप पालटली आहे.
गडाच्या पायथ्याशी आता रेव्ह पार्ट्या चालतात.
सिंह तर तेव्हाच गेला, गड राखणंही आता कठीण झालं आहे.
तुम्ही सार्वजनिक केलेला गणपतीउत्सव खूप लोकप्रिय होतो आहे. दिवसेदिवस प्रत्येक गल्लीचे, बोळाचे स्वतंत्र गणपती झालेत.
आता गणपती बुडवायला समुद्रही अपुरे पडणार बहुतेक.
"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" असा प्रश्न तुम्ही केला होतात
आता सरकारचे डोकेच काय, सरकारच ठिकाणावर नसते.
सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकलेत सगळ्यांना.
आठवडी बाजारासारखा घोडेबाजार भरलेला असतो तेजीत.
इंग्रजांना हाकलल्यानंतर आम्ही मुलांना आता इंग्रजी शाळेत घातले आहे.
त्यांना विलायतेला धाडायची खूप धडपड चालली आहे आमची.
एकदा ती विलायतेला गेली की भारतदेश, मराठी भाषा, मराठी आईबाप, सारंच परकं होईल त्यांना.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची तशी त्यांना फारशी माहितीही नाही,
मग कुठले टिळक, कुठला एक ऑगस्ट आणि कुठलं काय?
एक ऑगस्टला तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक टिळक. पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली!
August 4, 2016
प्रथम मन म्हणजे काय ते पाहू. मेंदूत सतत चालू असलेला; डोळ्यासमोरच्या निराकार पडद्यावर दिसणारा आणि कानात अविरत ऐकू येणारा दृकश्राव्य चलतपट म्हणजे मन. हा चलतपट डोळ्यासमोर असलेल्या सर्व गोष्टींना आच्छादित करून असतो आणि कानांना आजूबाजूला चाललेलं स्पष्ट ऐकू देत नाही. हा चलतपट अहोरात्र चालू असतो आणि सिनेगृहातल्या दाराचे पडदे बंद झाल्यावर जसा चित्रपट स्पष्ट दिसायला लागतो तसा रात्री आपल्याला दृग्गोचर होतो; त्याला आपण स्वप्न म्हणतो.
January 7, 2020
मुंबईच्या आदर्श गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तातडीने राजीनामा देण्यास सांगितले. त्यामळे पुढे काय होणार याकडे सार्यांचे लक्ष लागले होते. पण एकूण राजकीय घडामोडी लक्षात घेता चव्हाणांची गच्छंती लांबणीवर पडल्याचे दिसते. या प्रकरणी नेमलेल्या समितीला चौकशीसाठी लागणारा वेळ आणि ओबामांचा मुंबई दौरा लक्षात घेऊन चव्हाणांना तूर्तास मुदतवाढ मिळाली आहे.
November 3, 2010
जुळा भाऊ स्टीवपेक्षा चार मिनिटांनी लहान असल्याने ‘ज्युनिअर’ म्हणून ओळखल्या जाणार्या मार्क वॉचे कसोटीपदार्पण झाले २५ जानेवारी १९९१ रोजी इंग्लंडविरुद्ध अॅडलेडवर. संघात निवड झाल्याची बातमी ज्युनिअरला स्टीव वॉनेच दिली. गंमत म्हणजे मार्क वॉची संघात निवड स्टीव वॉची कामगिरी अपेक्षेनुरूप होत नसल्याने झाली होती.
January 25, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti