वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पालक ही एक सुंदर पालेभाजी आहे. विशेष म्हणजे अगदी हिमालय ते कन्याकुमारी कोठेही पालक होऊ शकतो. ही एक अत्यंत चविष्ठ आणि अतिशय पौष्टिक भाजी आहे. केवळ भारतातच नव्हे तर सर्व जगाच्या पाठीवर आज पालकला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. फार पूर्वीपासून अरेबियन प्रदेशात पालकला अतिशय महत्त्व आहे.
पोषण म्हणजे काय? याला संतुलित आहार ज्यामुळे जीवनसत्त्वे, खनिज द्रव्ये आणि प्रथिने यांचे मिळून सलग केलेले आहार असेही म्हणता येईल. आता कुपोषण म्हणजे ज्या पोषणात जीवनसत्त्वे अथवा खनिज द्रव्ये नसतात आणि ज्याला प्रथिने अजिबात नसतात यालाच कुपोषण असे म्हणता येईल. मध्यंतरी अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल ब्युट्रीशन याने कुपोषणावर खूपच चर्चा झाली. कारण कुपोषण फक्त गरिबात आढळते, असे नाही पण अति श्रीमंत लोकांनाही कुपोषणाचा त्रास होतो.
सुरण याला इंग्रजीत याम म्हणतात तर आयुर्वेद याला अर्शघ्न असे म्हणतात. अत्यंत गुणकारी व पौष्टिक आयुर्वेदात याचे वर्णन करतात. यात काय नाही जे जे पाहिजे ते सर्व यात आहे. मात्र सर्वात जास्त सुरणात होणारे गुण म्हणजे मूळव्याधापासून मुक्तता. सुरण कोणत्याही प्रकारे म्हणजे उकडून अथवा तुपात तळून अशा प्रकारे सुरणाचा वापर करता येतो.
प्रत्यक्ष गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत केळे सर्व लोकांना आवडते. केळ्याची उत्पत्ती कशी झाली हे सांगणे कठीण. साधारणपणे १६व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात पहिल्या प्रथम केळ्याची लागवड केली. मात्र केळीचा प्रसार ब्राझील, आफ्रिकन देश वगैरे देशात मोठ्या प्रमाणात झाला. केळ्याला इथर प्लँटेन असे म्हणत असत.
ज्येष्ठमध हे बहुगुणी औषध असून त्याचा वापर पित्तनाशक म्हणून देखील केला जातो. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बुद्धी देखील तेजस्वी बनते. ज्येष्ठमध वात आणि कफच्या समस्येवर देखील उपयुक्त आहे.
अमायनो ॲसिड साठवता येत नाही, हा अतिशय महत्त्वाचा शोध होता. डॉ. रोज याप्रमाणे नेहमी अमायनो ॲसिड शोधून त्याला नाव दिले. लेओनिन यांनी त्याला नाव दिले इसेंशियल अमायनो ॲसिड. असे डॉ. रोज यांनी पहिल्या प्रथम दहा अमायनो ॲसिड आणि त्याला विशेष नाव दिले. आता यात काही अमायनो ॲसिड बाहेरूच घ्यावी लागतात.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत परकीय चलन मिळवून देणाऱ्या पिकामध्ये काजूचा तिसरा नंबर लागतो. या पिकामुळे परकीय चलन मिळवून आर्थिक परिस्थिती जर सुधारतेच पण त्याचबरोबर रोजगाराची संधीही उपलब्ध होते. हे पीक ४०० वर्षापासून पोर्तुगीजांनी भारतात आणले. याचा मुख्य हेतू जमिनीची सुधारणा करणे हा होता. जंगलामध्येही मिळू शकणारे पीक आहे.
ज्येष्ठ नागरिक जे साधारणपणे ६५ ते ७५ वयाचे असतात यांना मूत्रदोषाचा त्रास होतो. ही परिस्थिती कोणालाही सांगता येत नाही अथवा कोणाजवळ बोलताही येत नाही. काय आहे हा मूत्रदोष? वास्तविक हा दोष कोणालाही म्हणजे स्त्री अथवा पुरुष यांनाही होऊ शकतो.
एक लहानसे फळ. ते फोडले तर लालचुटूक दाणे पाहूनत्या लाल रंगाने कोणीही भारावून जाते. ही सगळी निसर्गाची किमया. डाळींब आले कुठून आले. पण आयुर्वेदशास्त्रानुसार डाळींब हे हिमालयाच्या पायथ्याशी वाढते, असे म्हटले आहे. डाळींब हे एक अत्यंत पौष्टीक तसेच जीवनसत्त्वे, प्रथिने अथवा खनिज द्रव्ये यांनी भरलेले असते. तसेच यात एनर्जी म्हणजे शक्तीदेखील प्रचंड मोठ्या प्रमाणात असते.
रक्तदाब हा विशिष्ट जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. म्हणूनच अति किंवा कमी रक्तदाब निष्पन्न झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच सजग होणे शहाणपणाचे आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti