वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
1948 ते 1972 या सालांच्या मध्ये काश्मीर मध्ये शांती होती. 1972 पासून ऑपरेशन टॉपेझ च्या प्लॅन प्रमाणे मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी घुसखोरी सुरू झाली. अनेक तरूणांना भडकवून पाकिस्तानी आतंकवादी ट्रेनींग कॅम्पस् मध्ये पाठवण्यात आले. या काळामध्ये आपले सरकार पूर्णपणे झोपले होते.
March 28, 2013
ज्या ज्या वेळी महागाई भडकल्याने लोकांचे जीणे हराम झाल्याचे चित्र उभे केले जाते, त्यावर आंदोलने केली जातात, सरकारला महागाई रोखण्यासाठी पावले उचलणे भाग पाडले जाते त्या त्या वेळी या महागाईचा संबंध केवळ कृषी उत्पादनांशी असतो. भाजीपाला, कांद्याचे वगैरे भाव वाढले की लगेच लोकांचे जीणे दुष्कर होऊन जाते, विरोधी पक्षांच्या घशाखाली घास उतरत नाही आणि सरकारलाही नीट झोप लागत नाही. या उत्पादनांचे भाव वाढून चार पैसे शेतकऱ्यांच्या घरात गेले तर किती मोठे संकट उभे राहणार, या विचारानेच सगळे अस्वस्थ होतात.
August 9, 2009
चार हात, लाल रंग, सोंडे सह असलेला अवतार हे या द्वापार युगातील आपल्या सगळ्यात जवळच्या अवताराचे वैशिष्ट्य असल्याने सामान्यतः गणेशमूर्ती याच स्वरूपात केल्या जातात. या अवताराचा प्रगटोत्सव देखील भाद्रपद शुद्ध चतुर्थीचाच आहे.
September 4, 2019
आई जगदंबेचे स्वरूप अत्यंत शांत आहे. अशांती, हलचाल काही मिळवण्यासाठी असते. ती पूर्णतृप्त असल्याने शांत आहे.
February 1, 2020
सध्याच्या निवडणूकीत भाजपावर एक आरोप सतत होत आहे की भाजपा ३७० विषयावर प्रचार करतोय. ३७० चा आणि महाराष्ट्राचा काय संबंध?? "तुम्ही केलेल्या कामावर बोला", "विकासाच्या मुद्यावर बोला", "तुम्ही पुन्हा निवडणून आल्यावर काय करणार यावर बोला" अशा अनेक गोष्टी विरोधक आणि काही पत्रकारांकडून उपस्थित होत आहेत.
सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ३७० आणि महाराष्ट्राचा संबंध नाही ही बाब चुकीची आहे. काश्मिर मधून विस्थापित झालेले अनेक काश्मिरी पंडीत महाराष्ट्राचे नागरिक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ३७० हटवल्यानंतर काश्मिर मधे जमीन घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरू शकते, MTDC च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार काश्मिरमधे दोन Resort बांधायची योजना बनवत आहे. याचा फायदा काश्मिरी आणि मराठी युवकांना रोजगाराच्या दृष्टीने होऊ शकतो. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ३७० हे काँग्रेसने केलेल्या काही मोठ्या पापांपैकी एक आहे आणि ते हटवण्यासाठी जेव्हा मतदान केले तेव्हा ते देशातल्या प्रत्येक कोपऱ्यातल्या खासदारांनी मत दिले ज्यात महाराष्ट्रातील खासदार पण आहेत. पण या देशहिताच्या कार्यातही महाराष्ट्रातल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खासदारांना भाग घ्यावासा वाटला नाही. आज भाजपा ३७० वरून बोलतो तेव्हा काहींना होणाऱ्या जळजळीचे मुख्य कारण हे आहे की यामुळे पक्षाचा जनाधार आणि विश्वासार्हता आणखीनच वाढली आहे. पण मुद्दा हा आहे की भाजपा फक्त ३७० विषयावर प्रचार करतो हे कितपत योग्य आहे??
तर मुळात हे अर्धसत्य आहे. भाजपाचे नेते जेव्हा प्रचारा दरम्यान भाषण करतात तेव्हा ते आपल्या सरकारने केलेली कामे मांडतात. त्या केलेल्या अनेक कामांतील एक म्हणून ३७० मांडले जाते पण भाजपाचा प्रचार तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. गेल्या काही दिवसांत भाजपा नेत्यांच्या ज्या काही सभा झाल्या त्यात मांडल्या गेलेल्या निरनिराळ्या विकास कामांची यादी करायची झाल्यास ती खालीलप्रमाणे होते.
१) ३०,००० किमी रस्तेबांधणी
२) १८,००० गावांचा पाणी प्रश्न सोडवला
३) ग्रामीण आवास योजने अंतर्गत गरिबांसाठी ७ लाख घरे
४) २०२१ पर्यंत सर्व गरिब कुटुंबांना घरे देण्याचे उद्दिष्ट
५) शिक्षणात महाराष्ट्र क्रमांक ३ चे राज्य
६) दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्नशील
७) १५ वर्षांत आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत २०,००० कोटी तर भाजपा युती सरकारने ५ वर्षांत दिलेली मदत ५०,००० कोटी
८) आघाडी सरकारच्या काळात शेतकरी बोनस रू.५० असायचा, भाजपा सरकारने २०१४ ते २०१७ रू.२०० तर २०१८-२०१९ मधे रू.५०० बोनस दिला.
९) मुंबई-गोवा महामार्गाचे काम जोमाने सुरू. दीड वर्षात पूर्ण होणार
१०) ३८ जलप्रकल्पांचे काम जोमाने सुरू
११) रायगड हे आगामी Industrial Hub बनणार
१२) मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण दिले
१३) धनगर आणि आदिवासींचे प्रश्न मार्गी लावले
१४) ST समाजाच्या योजनांचा वाभ धनगर समाजालाही होणार
१५) OBC समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिकण्यासाठी शिष्यवृत्ती
१६) स्मार्ट सिटी योजने अंतर्गत हजारो कोटींची कामे
१७) क्लस्टर बांधकामाचा प्रश्न सोडवला
१८) मेट्रोचे जाळे
१९) १,६०,००० विहिरींचे बांधकाम
२०) ५ लाख शेतकऱ्यांना पंप पुरवले
२१) १९,००० गावे दुष्काळमुक्त
२२) आगामी काळात गरिबांसाठी १० लाख घरे बांधणार
२३) ४० लाख लोकांना वैद्यकीय सहाय्यता
२४) जल जीवन मिशनसाठी ३.५ लाख कोटी रूपयांची तरतूद
२५) ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी २५ लाख कोटींची तरतूद
२६) गरिब शेतकऱ्यांसाठी पेंशन योजना
२७) Direct Benefit Transfer मुळे थेट १००% मदत शेतकऱ्या पर्यंत
२८) किसान निधीचा शेतकऱ्यांना फायदा
२९) शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी Vaccination Programme
३०) कौशल्य विकास आणि मुद्रा लोन सारख्या योजनांचा ग्रामीण भागातील युवकांना फायदा
३१) One Ticket Policy साठी प्रयत्न (Local/Metro/Best etc. साठी एक टिकीट)
३२) कोळीवाडा आणि गावठाणांसाठी नवीन योजना
३३) Airport लगतच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास
३४) प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ३०० चौ.फुटांची घरे देणार.
३५) आशियातला सगळ्यात मोठा पूनर्विकास धारावीत होणार
३६) उज्वला योजनेचा १.५ कोटी गरिब कुटुंबांना लाभ
३७) बांद्रा-वर्सोवा Sea Link
३८) विविध ठिकाणी रिंग रोडचे बांधकाम
३९) जलवाहतूकीला चालना
४०) जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे योजनेचा शेतकऱ्यांना लाभ
हि केंद्र आणि राज्य सरकारची 'काही' कामे ज्यांचा उल्लेख 'काही' ठिकाणच्या भाषणांमधे झाल्याचे मी नोंदवून ठेवले. या व्यतिरिक्त अनेक भाषणे झाली आहेत आणि त्यात अनेक वेगळे मुद्दे आणि कामे मांडली आहेत ज्याचा वरिल यादीत समावेश नाही. तसेच यात एका विशिष्ट शहरासाठी/प्रदेशासाठी केलेल्या किंवा प्रत्येक उमेदवाराने त्याच्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामांचा उल्लेख नाही. मग आता विचार करा की त्या सगळ्या मुद्द्यांना जोडले तर किती मुद्दे होतील??
मग जर एवढे महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे मांडून जर भाजपा नेते ३७० वर ३-४ मिनीटे बोलत असतील तर त्याचा एवढा बाऊ का??
पण तरिही तो होत आहे आणि निवडणूक संपपर्यंत जाणीवपूर्वक चालू राहील. पण भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नम्रपणे सांगतो की आम्हाला फरक पडत नाही. कारण आमच्यावर अटलजींचे संस्कार आहेत. अटलजी भर संसदेत म्हणाले होते, "सत्ता का खेल तो चलता रहेगा,सरकारे आएगी-जाएगी,पार्टियां बनेगी-बिगडेंगी पर ये देश रहना चाहिए,इस देश का लोकतंत्र रहना चाहिए" हा देश आणि या देशातील लोकतंत्र टिकवण्यासाठी आम्ही ३७० हटवण्याचे काम केले आहे आणि त्याविषयी भरभरून बोलणार कारण त्यासाठी आमच्या नेत्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे. मग त्याने आमच्या विरोधकांना पोटदूखी होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे आमचा नाही. आम्ही एकच जाणतो की 'राष्ट्र प्रथम'!!! आणि हो आणखीन एक जाणतो, आएगा तो देवेंद्र ही!!!
- SwaG
(स्वानंद गांगल)
October 15, 2019
प्रकाशन दिनांक :- 26/09/2004
सध्या संपूर्ण राज्यात निवडणूक आणि गणेशोत्स्वाची धूम सुरु आहे. संपूर्ण राज्यातील वातावरण एकप्रकारच्या धुंदीने भारावून गेले आहे. एक उत्सव सामाजिक आणि भक्तिभावाने प्रेरित असलेला तर दुसरा म्हणजे पंचवार्षिक तमाशाचा फड असलेला.
September 26, 2004
एक सुंदर असे टुमदार एक गाव होते. त्या गावाच्या वेशीवर एक गुरुकुल होते. गुरुकुलामध्ये ज्ञान देणारे एक ॠषीमुनी होते. या गुरुकुलामध्ये नित्यनियमाने शिष्य येत असत. आपल्या गुरुंकडुन ज्ञान घेत असत. गुरुंसोबत गप्पागोष्टी करत असत. असा उपक्रम गुरुकुलामध्ये नित्यनियमाने होत असे.
June 25, 2020
पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करून आजकाल लोकं हाताऐवजी चमच्याने जेवतात. आणि या प्रकारे जेवताना स्वत:ला श्रेष्ठ समजतात. मात्र आपल्या संस्कृतीमध्ये हाताने जेवण्याची पद्धत असून त्यामागे काही वैज्ञानिक कारणंदेखील आहेत. आयुर्वेदाप्रमाणे आमचे शरीर पंचतत्त्वांनी निर्मित झाले असून हाताच्या प्रत्येक बोटाच्या अग्रभागी एका तत्त्वाचे अस्तित्व आहे.
अंगठा- अग्नी
तर्जनी- वायू
मध्यमा- आकाश
अनामिका- पृथ्वी
कनिष्का- पाणी
जेव्हा आपण हाताने जेवतो तेव्हा पाची बोटांना आपसात जोडून तोंडात घास भरतो, याने पंचतत्त्वांचा समतोल होत असून शरीराला मिळणारं अन्न ऊर्जा देणारं असतं. हाताने जेवल्याने आमचा मेंदू आमच्या पोटाला अन्नग्रहण करण्याचा इशारा देतो ज्याने पचन क्रिया सुधारते.
हाताने जेवताना आमचं सर्व लक्ष खाण्यावर केंद्रित असल्याने शरीराला मिळणारी पोषकता वाढते.
याव्यतिरिक्त हाताने जेवण केल्याने तोंड भाजण्याचा धोकाही कमी होतो. कारण अन्नाला स्पर्श केल्याने पदार्थ अतिशय गरम तर नाही याचा अंदाज येतो.
आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुपवरुन
September 28, 2016
मनुष्याच्या आयुष्यात सुखाचा भोग असो किंवा दुःखाचा भोग ! तो मनुष्याला संचित पाप कर्म व पुण्यकर्म यामुळेच भोगावा लागतो. संतश्रेष्ठ जगतगुरु संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात प्रमाण देतात की,
भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ||
ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म ||
देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ||
तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा पोटीं ||
संतश्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा गाथ्यातील अभंग आहे. संत तुकोबाराय या अभंगात असे सांगत आहेत की, एखादा मनुष्य प्रपंचातील विषय भोग घेत असेल आणि त्याला काही काळानंतर त्याचा त्याग करावा वाटला आणि त्याने त्या विषयांचा त्याग केला कि, त्याला लगेच त्या सर्व संचित पाप आणि पुण्य कर्माचा भोग भोगावा लागतो. म्हणजे एखाद्या वाईट व्यक्तीने वाईट कर्म करीत असताना तो करीत राहिला परंतु त्याने तो वाईट कर्म न करण्याचा संकल्प केला आणि त्याने ते वाईट करने सोडून दिले. परंतु त्याने वाईट कर्म सोडून देताच त्याच्यावर दुःखाचा डोंगर किंवा मोठा संकटांचा डोंगर कोसळतो. याचाच अर्थ असा की, त्याने वाईट कर्माचा त्याग करताच त्याच्या पूर्व कर्माचा भोग समोर उभा राहतो.
संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय असेही सांगतात की, हे असे उफराटे वर्म म्हणजे उलटे वर्म आहे. आणि धर्मा अंगीच अधर्म आहे. ज्या कर्मामुळे देवात आणि भक्तामध्ये अंतर पडते ते कर्म म्हणजे पाप कर्म ! आणि देवाचे कर्म म्हणजेच सत्कर्म ! हे लक्षात घेऊनच भक्ताने नीतीने आणि न्यायाने जगायला शिकले पाहिजे. खोटे व्यर्थ संकल्प चांगल्या व्यक्तीने कायमचे सोडून द्यावे.
तुकोबाराय शेवटच्या चरणात असे सांगत आहेत की खोटे संकल्प, व्यर्थ संकल्प, खोटी भीड न धरता जिथे आपला लाभ असेल, जिथे आपला परमार्थ असेल तेथे आपण आपला लाभ बघावा. आणि आपण नीती न्यायाने कर्म करीत जगत राहावे.
*विठोबासी शरण जावे |*
*निजनिष्ठे नाम घ्यावे ||*
विठोबाचे शरण जाऊन त्याचे नाम घेत अखंड चिंतन करत राहण्यातच खरा धर्म आहे, खरा स्वार्थ आहे आणि खरा लाभ आहे. कारण विठोबाचे नामस्मरण हे फक्त निमित्तमात्र आहे, परंतु त्यामुळे आपल्या मनात नकारात्मक विचार येत नाहीत. आपण सकात्मक विचाराने पुढील कार्य करायला लागतो, ज्याचे भोग आपणास सकारात्मकच मिळते.
-- डॉ. शांताराम कारंडे
November 12, 2018
आजचे युग हे संगणक युग आहे. संगणक हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहे. सर्व क्षेत्रातील कामे संगणकामुळे अतितत्पर होऊ लागली आहेत.
September 28, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti