वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफळ म्हणजे नारळ. नारळ या फळाला भारतीय संस्क़ृतीमध्ये अन्ययसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
शुभ कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी नारळ फोडण्याचा कुळाचार प्रामुख्याने हिंदू धर्मात दिसून येतो. तांब्याच्या कलशावर आंब्याच्या पानांमधये नारळ ठेवून त्याची पूजा वास्तुशांतीचे वेळी केली जाते. सुवासिनींची ओटी नारळाने भरतात. मान्यवरांचा व कलावंतांचा सत्कार करताना नारळ दिला जातो. देवापु़ढे अक्षता देताना विड्याच्या पानावर नारळ ठेवतात. विशेष म्हणजे देवघरात ठेवलेले नारळ शुभकार्याचे प्रतीक आहे.
याशिवाय कोकणवासियांना नारळ अतिशय प्रिय असून सागराने आपल्यावर कृपा करावी म्हणून ते सोन्याचाही नारळ त्याला अर्पण करतात. नारळाचे पाणी औषधी असून ते सेवन केले असता बध्दकोष्ठ नाहीसा होतो. देवाला जो नैवेद्य दाखविला जातो त्यातही नारळाच्रा खोबर्याचे विविध प्रकार असतात. उदाहरणार्थ गणेशाला आवडणारे मोदक.
विविध प्रकारच्या भाज्यांमध्येही नारळ किसून घालतात ज्यामुळे भाज्या चवदार होतात. नारळाच्या करवंटीपासूनही अनेक वस्तू बनवतात.
January 5, 2016
प्रकाशन दिनांक :- 14/03/2004
फार जुनी गोष्ट आहे. याच भरतभूमीत एक महान ऋषी होऊन गेले. त्यांचे विचार आणि आचारधर्माच्या शिकवणीचा मोठा प्रभाव त्याकाळी जनमानसावर पडला होता.
March 14, 2004
रोहिंग्यांच्या परतपाठवणीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, तीही न्यायालयाने फेटाळून लावली. त्यातून या ‘डिपोर्टेशन’च्या निर्णयावर सर्वोच्च शिक्कामोर्तब झाले आहे. हा निर्णय भारताच्या राष्ट्रीय संरक्षणाच्या हिताच्या दृष्टीने घेतला गेलेला आहे.
October 18, 2018
तुम्हाला माहिती असेल की, साप चावला की त्याच्या दोन दातांचे निशान दिसतात. दोन दातांनी तो विश मनुष्याच्या शरिरात सोडतो. ते विश रक्तात सोडल्यानंतर ते हृदयापर्यंत जातं त्यानंतर पूर्ण शरिरात पोहचतं. साप शरिरावर कुठेही चावला तरी ते विश आधी हृदयापर्यंत जातं नंतर पूर्ण शरिरात पसरतं. हे विश पूर्ण शरिरात पोहचण्यासाठी साधारण तीन तास लागतात असे मानले जाते.(अंतु)
म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास तरी मरणार नाही. जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच अंगांमध्ये विश पोहचलं तरंच तो व्यक्ती मरण पावतो. त्यामुळे तुमच्याकडे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तीन तास आहेत. या तीन तासात तुम्ही काही करू शकाल तर चांगलंच आहे.
तुम्ही काय करू शकता?
एक मेडिसीन तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवू शकता. ही मेडिसीन होमिओपॅथी असून स्वस्त आहे. त्याचं नाव आहे NAJA २०० (N A J A ) हे औषध कोणत्याही होमिओपॅथी मेडिसीन शॉपमध्ये तुम्हाला मिळेल. या औषधाने तुम्ही तब्बल १०० लोकांचा जीव वाचवू शकता. आणि याची किंमत केवळ पाच रूपये इतकी आहे.
NAJA हे औषध जगातील सर्वात खतरनाक मानल्या जाणा-या सापाचं विश आहे. त्या सापाचं नाव आहे क्रॅक. या सापाचं विश सर्वात घातक मानलं जातं. हे विश दुस-या सापाचं विश उतरवण्यासाठी कामात येतं. या औषधाचा एक थेंब जीभेवर ठेवा आणि १० मिनिटानंतर पुन्हा एक थेंब ठेवा आणि पुन्हा एकदा १० मिनिटांनी एक थेंब. तीनदा थेंब टाकून सोडून द्यावे.
बस इतके करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो.
मित्रांनो नक्की शेअर करा
September 14, 2016
हेडफोनने श्रवणाच्या क्षेत्रात मोठीच क्रांती केली आहे यात शंका नाही. आजकाल आपण मोबाइल फोन, एमपी ३ प्लेयर यातही हेडफोनचा वापर करतो त्यामुळे फोन कानाला लावायची गरज राहात नाही.
September 29, 2023
बँकेत नोटा मोजण्यासाठी आता कॉशयरची भूमिका तुलनेने कमी झाली आहे, त्याच्या मदतीला करन्सी काऊंटिंग मशीन आले आहे. या मशिनमध्ये नोटा टाकल्या की, तुम्हाला त्या किती नोटा आहेत हे कळते.
August 26, 2023
मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुध्दी | प्रपंचीक नाही जयाते उपाधी |
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा | जगी धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||51||
क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे | न लिंपे कदा दंभवादे विवादे |
करी सूखसंवाद जो ddऊगमाचा | जगी धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||52||
सदा आर्जवी प्रीय जो सर्वलोकी | सदासर्वदा सत्यवादी विवेकी |
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा | जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||53||
सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी | मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी |
चळेना मनी निश्र्चयो दृढ ज्याचा | जगी धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||54||
नसे मानसी नष्ट आशा दुराशा | वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा |
ऋणी देव हा भक्तीभावें जयाचा | जगीं धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||55||
दिनाचा दयाळू मनाचा मवाळू | स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू |
तया अंतरी क्रोध संताप कैंचा | जगी धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||56||
जगी होइजे धन्य या रामनामे | क्रिया भक्ती उपासना नित्यनेमे |
उदासीनता तत्वता सार आहे | सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ||57||
नको वासना वीषयी वृत्तिरूपे | पदार्थी जडे कामना पूर्वपापे |
सदा राम निष्काम चिंतीत जावा | मना कल्पनालेश तोही नसावा ||58||
मना कल्पना कल्पिता कल्पकोटी | नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी |
मनी कामना राम नाही जयाला | अती आदरे प्रीति नाही जयाला ||59||
मना राम कल्पतरू कामधेनू | निधी सार चिंतामणी काय वानू |
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता | तया साम्यता कायसी कोण आता ||60||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
December 31, 2015
आपल्या देशात काय चालले आहे? टुंडा अथवा यासिन भटकळ यांना झालेली अटक, त्यांनी दिलेल्या कबुल्या, त्यातून पाकिस्तानविरुद्ध पुरावे हे सारे प्रसार माध्यमांचा टिआरपी वाढवण्यासाठी ठीक आहे, पण दहशतवादाचा कर्करोग त्यातून संपणार नाही. दहशतवादविरोधी लढाई लांब पल्ल्याचे युद्ध आहे. यासिन भटकळ आणि ‘टुंडा’ यांना अटक हे सुरक्षा यंत्रणेचे यश नक्कीच प्रशंसनीय आहे.
September 14, 2013
सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशात मोडणारा जव्हार तालुका. या तालुक्यात आदिवासींची संख्या ही अधिक आहे. दर्या-डोंगर, झाडे झुडपांनी बनलेल्या या जव्हार तालुक्यातील दुर्गम भागात खडतर जीवन जगणार्या महिलांनी मेहनत व जिद्दीने बचत गटाच्या माध्यमातून गुणकारी औषध निर्मिती करून नावलौकिक मिळविला आहे.
September 28, 2010
२६ जुलै २०१९ ला कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण होतील. कारगिल युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आजही जिवंत आहे. आजपर्यंतच्या युद्धांपैकी केवळ कारगिल युद्धाचा प्रसार वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्याबरोबरच देशप्रेमी नागरिकांचीही भारताला गरज आहे. २६ जुलै ‘कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने देशाकरता प्राणार्पण करणार्या, भारतीय सशस्त्र दलांतील शूर अधिकारी आणि सैनिकांना, देशवासीयांची आदरांजली.
July 26, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti