वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शरीरातील आम्लाचा प्रभाव कमी करण्यासाठी दिवसभरात चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करून जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर देणे, शरीरासाठी केव्हाही उपयुक्त ठरते. दिवसभरात कुठलेही कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा पाणी पिण्यावर आपण भर देणे गरजेचे आहे, ज्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होईल.
बऱ्याच वेळेला पेपरचं पान उघडलं की कोणाच्या तरी अचानक मृत्यूची बातमी आपलं लक्ष वेधून घेते. इतक्या लहान वयात असं कसं झालं? नुकतंच लग्न झालं होतं. लहान मुलं देखील आहेत, आता त्यांचं कसं होणार? यासारख्या विचारांनी त्याच्या कुटुंबियांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात एक सहानुभूतीची भावना निर्माण होते. त्याच्या जागी आपणही असू शकतो या जाणिवेने एक थंड शिरशिरी डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला अक्षरशः थिजवून जाते. एखाद्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर घरी परत येऊ का? असा अपशकुनी विचारही मनात येऊन जातो. नेमका काय हा प्रकार आहे?
लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा नक्कीच मारल्या असतील, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही आपण लावल्या असतील. परंतु मोठे झाल्यावर या व्यायामाला एक वेगळी ओळख प्राप्त होते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम. पण दोरीच्या उडय़ांनी खरेच वजन कमी होते का, ह्याचे उत्तर होय आहे.
सध्याच्या फास्ट लाइफमध्ये बऱ्याच जणांना पोटाच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे, पण ह्याचे जर मूळ कारण शोधले तर बऱ्याचदा आपल्या चुकीच्या आणि अवेळी खाण्याच्या पद्धतीमुळे पोटाच्या समस्या ह्या जास्त प्रमाणात होतात. जर ह्यावर यशस्वीरीत्या मात कराची असेल तर प्रोबायोटिक्स पोटाचे आरोग्य आणि आकार चांगला ठेवण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. परंतु, म्हणून त्याचा अतिरेक करणे योग्य नाही. पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी दैनंदिन जीवनात करण्याच्या काही गोष्टी….
केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी ही केसगळतीची प्रमुख कारणे आहेत. पण यावर नियमित योगसाधना हा एक उत्तम उपाय असून केसांपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होण्यास मदत तर होतेच शिवाय मानसिक ताण, भूक न लागण्याची समस्या, चिंता यापासून देखील सुटका होते.
आजकाल आपण आपल्या आजूबाजूला हेच पाहत आहोत की रोज सकाळी तयारी करून घाईगडबडीमध्ये आज लाखो लोकं ऑफिसला जात आहेत. पण ऑफिसमध्ये जाईपर्यंत सर्व ठीक असते पण ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांना झोप येते किंवा थकवा जाणवू लागतो. समोर कामाचे कितीही मोठे टार्गेट असले तरीही झोप काही केल्या आवरता येत नाही. पण तुमच्या माहितीसाठी म्हणून एक लक्षात ठेवा की असं कधीतरी झालं तर त्यामागे छोटेसे सामान्य कारण असू शकते. पण जर असं वारंवार होत असेल तर मात्र त्या गोष्टीकडे आपण तात्काळ लक्ष दिले पाहिजे आणि त्याची कारणं जाणून घेतली पाहिजेत, तर आज आपण जाणून घेऊयात यामागच्या काही कारणांबाबत…..
आपल्या शरीराची आणि मनाची जर आपल्याला योग्य तशी काळजी घ्यायची असेल तर आपल्या आहारामध्ये रोजच्या रोज विविध पोषकतत्त्वांची गरज भासते.ह्यामध्ये सर्वात महत्वाचा कुठला घटक असेल तर तो आहे कॅल्शियम, कारण हाडे व दात यांच्या मजबूतीसाठी कॅल्शियमची गरज कायमच लागते.
लहानपणी मुलांना प्रथम आपण टाळ्या वाजवायला शिकवतो. टाळ्या वाजवताना लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद काही औरच असतो. लहानपणी शिकलेली टाळ्या वाजवण्याची सवय आपल्याला आजन्म उपयोगी पडते. कारण कुठल्याही चांगल्या प्रसंगी आपण आनंदाने टाळ्या वाजवतो.
दुसर्या महायुद्धाच्या काळात डॉ. ड्वाईट हार्केन यांनी हृदयावर शस्त्रक्रिया करण्याची एक पद्धत विकसित केली. या पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेत प्रथम हृदयाला लहानसे छिद्र पाडण्यात येत असे. मग त्या छिद्रातून हाताचे बोट हृदयात घालून अरुंद झडप (व्हॉल्व्ह) थोडीशी मोठी करण्यात येई. हळूहळू हृदयशल्यचिकित्सकांना यात प्राविण्य मिळाले व अशा शस्त्रक्रिया सुलभतेने होऊ लागल्या. ही झाली ‘क्लोज्ड हार्ट’ अथवा आंधळी शस्त्रक्रिया. या शस्त्रक्रियेमुळे कितीतरी रुग्णांना फायदा झाला असला तरीही या पद्धतीला बर्याच मर्यादा होत्या. जर का हृदयाच्या आत हात घालून काम केले नाही तर यात शस्त्रक्रिया करणे अवघड होते. याशिवाय आणखी एक खूप मोठी अडचण होती ती म्हणजे या पद्धतीमध्ये रुग्णाच्या हृदयाचे स्पंदन चालूच राहात असे. रक्ताभिसरणाचा वेग कमी करून (Temporarily stopping a patient's circulation) शल्यचिकित्सकांना शस्त्रक्रियेसाठी फक्त चार मिनिटे इतकाच अवधी मिळत असे. त्यानंतर रक्तपुरवठा पूर्ववत झाला नाही तर मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे इजा पोहोचण्याची शक्यता निर्माण होण्याचा धोका होता. या पद्धतीला ‘इनफ्लो ऑक्लुजन’ असे संबोधिले जाते. त्यामुळे हृदयावरील ज्या शस्त्रक्रियांना चार मिनिटांपेक्षा अधिक काळ लागेल अशा शस्त्रक्रिया करणे अशक्यच होते.
डॉ. विल्फ्रेड बिगलो यांनी यावर उपाय सुचविला, इतकेच नव्हे तर त्यावर काम करून ती प्रणाली अंमलातही आणली. बिगलो तेव्हा मिनेसोटा विद्यापीठात काम करीत होते. संशोधनादरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की कॅनडामधील (डॉ. बिगलो कॅनेडियन होते) तीव्र कडाक्याच्या हिवाळ्यात ‘ग्राऊंड हॉग’सारखे प्राणी हायबरनेशन मध्ये जातात. थंडीवर मात करण्याचा त्यांच्यासाठीचा तो उपाय आहे. या कालावधीत त्यांच्या हृदयाचे ठोके मंदावतात व त्यांची उर्जेची गरज कमी होते, त्याचा परिणाम म्हणून अन्नावाचून ते बरेच महिने जगू शकतात. या संदर्भात विचार करीत असतांना बिगलोंना असे वाटले की ‘खूप कमी तापमान’ हा एक उपाय होऊ शकतो. मग त्यांनी प्राण्यांवर प्रयोग करून पाहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की श्वानांच्या शरीराचे तापमान खूप कमी केले असता त्यांच्यावर ‘ओपन हार्ट सर्जरी’ बर्याच वेळा चार मिनिटांहून अधिक काळ करता येते व त्यात प्राणी दगावत नाहीत. बिगलोंनी असे सिद्ध केले की कमी तापमान ठेवले असता मेंदू व शरिरातील उतींची प्राणवायूची गरज कमी होते व त्यामुळे रक्तपुरवठा जास्त काळ रोखून धरला तरी मेंदूला इजा पोहोचत नाही. सप्टेंबर १९५२ मध्ये डॉ. लीलेहाय आणि डॉ. जॉन लुवीस यांनी या पद्धतीचा वापर करून प्रथमच एका पाच वर्षांच्या लहान मुलीवर शस्त्रक्रिया केली. या पद्धतीमुळे ती मुलगी शस्त्रक्रिया चालू असतांना, दहा मिनिटेपर्यंत हृदयाची धडधड थांबली असतांना देखील जिवंत राहू शकली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या उपचारप्रणालीला ‘द हायपोथरमिक अॅप्रोच’ असे संबोधिले जाते. हृदयातील छोटे दोष दुरुस्त करण्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरली.
कॅनडामधील मॅनीटोबा येथे १९१३ मध्ये डॉ. बिगलो यांचा जन्म झाला. त्यांचे वडील देखील डॉक्टर होते. त्यांच्या वडिलांनी कॅनडातील पहिले ‘मेडिकल क्लीनिक’ स्थापन केले. १९३८मध्ये बिगलो यांनी टोरोंटो विद्यापीठात प्रवेश घेतला. ‘टोरोंटो जनरल हॉस्पिटल’मध्ये त्यांनी प्रशिक्षणार्थी (सर्जिकल रेसिडेन्ट) म्हणून काम केले.
१९४१ मध्ये त्यांच्याकडे एक रुग्ण चिकित्सेसाठी आला. हिमदंशामुळे (फ्रॉस्ट बाईट) त्याच्या हाताच्या बोटांना गॅन्गरीन झाले होते. बिगलोंना शस्त्रक्रियेद्वारे त्याची बोटे कापावी लागली. या घटनेने ते अस्वस्थ झाले. हिमदंशावर त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. या घटनेतून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. बिगलो यांनी सैन्यात प्रवेश घेतल्यावर युद्धभूमीवरही काम केले. हिमदंश झालेल्या कित्येक सैनिकांवर उपचार करीत असतांना ‘हायपोथर्मिया’वर ते विचार करू लागले. दुसरे महायुद्ध संपल्यावर ते टोरोंटो येथे परत गेले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील बाल्टीमोर येथील जॉन हॉपकिन्स रुग्णालयात प्रशिक्षण घेतले. १९४७मध्ये ते कॅनडाला परतले व ‘टोरोंटो जनरल हॉस्पिटल’मध्ये ‘स्टाफ जनरल सर्जन’ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९५०मध्ये टोरोंटो विद्यापीठाच्या शल्यचिकित्सा विभागात त्यांना नेमणूक मिळाली. १९५३ साली तेथेच ते सहाय्यक प्राध्यापक झाले तर १९७० मध्ये प्राध्यापक झाले. १९८४ साली बिगलो यांनी त्यांच्या या संशोधनावरील पुस्तक प्रकाशित केले. त्याचे नाव होते, ‘कोल्ड हार्टसः द स्टोरी ऑफ हायपोथर्मिया अॅन्ड द पेसमेकर इन हार्ट सर्जरी’
बिगलो यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. जैववैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांना १९५९चा गाईर्डनर फाऊंडेशनचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९८१ साली ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ तर १९९२ साली कॅनेडिअन मेडिकल असोसिएशनचे ‘फ्रेडरिक न्यूटन गिसबोर्न स्टार अॅवॉर्ड’ देण्यात आले. असोसिएशनच्या वतीने कोणत्याही सदस्याला देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. त्यानंतर पाच वर्षांनी ‘कॅनेडिअन हॉल ऑफ फेम’मध्ये बिगलोंना स्थान देण्यात आले. ‘अमेरिकन असोसिएशन फॉर थोरॅसिक सर्जरी’ तसेच ‘सोसायटी फॉर व्हॅस्क्युलर सर्जरी’चे ते अध्यक्ष होते. १९७० ते १९७२ या कालावधीत बिगलो ‘कॅनेडिअन कार्डिओव्हॅस्क्युलर सोसायटी’चे अध्यक्ष होते. टोरोंटो जनरल हॉस्पिटलच्या हृदयशल्यचिकित्सा विभागाचे ते वीसपेक्षा अधिक वर्षे प्रमुख होते. सन २००१ मध्ये ‘इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेस’ तर्फे बिगलो यांना ‘लीव्हिंग लीजंड’या किताबाने गौरविण्यात आले. हृदयशस्त्रक्रियेला शक्यतेच्या कक्षेत आणण्यात डॉ. बिगलो यांच्या संशोधनाचा मोलाचा वाटा आहे. २७ मार्च २००३ रोजी डॉ. बिगलो यांचे निधन झाले.
डॉ. बिगलो मध्यभागी पेस-मेकरचे कार्य समजावून सांगताना, ऑक्टोबर १९८२
टोरोंटो विद्यापीठातील बॅन्टींग इन्स्टिट्यूट येथे काम करीत असतानाच, ५०च्या दशकात डॉ. बिगलो पेस-मेकरचे सह-संशोधन केले होते..
लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा नक्कीच मारल्या असतील, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही आपण लावल्या असतील. परंतु मोठे झाल्यावर या व्यायामाला एक वेगळी ओळख प्राप्त होते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम, पण दोरीच्या उडय़ांनी खरेच वजन कमी होते का, ह्याचे उत्तर होय आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti