(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मुंबईतील पृथ्वी थिएटर

    पृथ्वी थिएटरची स्थापना झाल्यानंतर सादर झालेल्या पहिल्या नाटकांमध्ये गो. पु. देशपांडे लिखित उध्वस्त धर्मशाळा या नाटकाच्या हिंदी रुपांतरणाचा समावेश होता. त्यामध्ये नासीरुद्दीन शाह, ओम पुरी, बेंजामिन गिलानी यांनी काम केले होते.

      November 5, 2021


  • चला देवगडला, पावसाला कडकडून भेटायला..

    देवगडचा पाऊस’ हा माझा लेख वाचून माझ्या अनेक परिचितांनी देवगडला भिजण्यासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली.. मलाही तुम्हाला घेऊन जायला खुप खुप आवडेल..इथे पावसाळ्यात जायलाच हवं..पण त्यासाठी काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे..

      August 6, 2016


  • महिलांसाठी आवश्यक हेल्थ चेकअप कधी आणि का करावे?

    आजच्या व्यस्त जीवनामध्ये महिलांना आपल्या आरोग्याविषयी अत्यंत जागरूक असणे गरजेचे झाले आहे. आज महिलांमध्ये हृद्यविकार, मधुमेह, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर, हाडांचे विकार, रक्तदाब या सारखे विविध गंभीर विकार उद्भवत आहेत. त्यामुळे अकाली मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले आहे. या ‘सायलंट किलर’ ठरणाऱ्या विकारांचे वेळीचं निदान झाल्यास त्यापासून आपला बचाव करणे शक्य आहे यासाठी वेळोवेळी हेल्थ चेकअप करून घेणे गरजेचे झाले आहे.

    सामान्य आरोग्य तपासणी
    महिलांनी नियमित एक किंवा दोन वर्षातून एकदा आपल्या शरीराचे चेकअप करून घ्यावे. यामुळे भविष्यात होणाऱ्या रोगांचे निदान वेळीचं होण्यास मदत होते.

    याशिवाय तीन किंवा चार वर्षातून एकदा थायराइड टेस्ट (टीएसएच, टी 3, टी -4) जरूर करून घ्या असे केल्याने थायराइड ग्रंथी संबंधीत विविध रोग होण्यापासून रक्षण करता येते.

    हाडांची तपासणी
    वाढत्या वयाबरोबर आपली हाडे कमजोर होऊ लागतात. हाडे ठिसुळ बनल्याने अनेक रोगांना निमंत्रण मिळते यासाठी हाडांचे चेकअप करने गरजेचे आहे. महिलांनी आपली बीएमडी म्हणजे बोन मिनरल डेंसिटी टेस्ट ची तपासनी वयाच्या ५०शी नंतर करून घ्यावी.

    ब्रेस्ट कॅन्सरचा चेकअप
    बहुतांश वेळेला स्त्रीला स्वत:ला स्तनांचा कर्करोग झाला आहे हे कळतच नाही. जेव्हा कळतं तेव्हा उशिर झालेला असतो. आज भारतीय स्त्रियांना होणा-या कर्करोगाच्या प्रकारांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण सर्वात जास्त आहे स्तनांचा कर्करोग हा असा आजार आहे की, ज्याचे जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर यावर उपाय करणे शक्य होते. यासाठी वयाच्या पस्तीशी नंतर वर्षातून एकदा मेमोग्राफी टेस्ट व क्लीनिकल ब्रेस्ट चेक-अप करणे तर 35 वर्षाच्या आतिल स्त्रियांनी किमान दोन वर्षाआड तज्ञांकडून क्लीनिकल ब्रेस्ट चेक-अप करुन घ्यावी. या टेस्टमुळे सुरवातीच्या अवस्थेमध्येचं ब्रेस्ट कॅन्सरला ओळखून त्याला अटकाव करण्यास मदत होते.

    डायबिटीज चेकअप
    डायबिटीज म्हणजेचं मधुमेहापासून रक्षण करण्यासाठी वयाच्या 30शी नंतर वर्षातून एकदा ब्लड ग्लूकोस टेस्ट करून घ्या. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कळते आणि डायबिटीज आणि त्याच्या दुष्परीणामापासून रक्षण करण्यास मदत होते.

    ह्रदय तपासणी
    महिलांनी वयाच्या तिशी नंतर वर्षातून एकदा ब्लड प्रेशर स्क्रीनिंग टेस्ट आणि ECG टेस्ट करून घ्यावी. यामुळे विविध हृद्यरोगांपासून रक्षण करता येते. याशिवाय ३५ वर्षानंतर दर पाच वर्षातून एकदा कोलेस्ट्रॉल स्क्रीनिंग टेस्ट जरूर करून घ्या.

    रिप्रोडक्टिव/सेक्सुअल हेल्थ
    प्रजनन संस्थेचे आरोग्य राखण्यासाठी वयाच्या २१-६५ वर्षानंतरच्या प्रत्येक स्त्रीने ३ वर्षातून एकदा तरी पॅप टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. पॅप स्मिअर टेस्ट करून सर्वाइकल कॅन्सर, गर्भाशयाच्या कॅन्सरचे वेळीचं निदान करता येते.
    तर वंधत्वाची समस्या होऊ नये म्हणून १८ ते ४० वयाच्या महिलांनी नियमित ‘पीसीओएस’ संबंधी हेल्थ चेकअप करून घ्या. ‘पीसीओएस’ हे सध्याच्या काळात वंध्यत्वाचे एक सर्वाधिक प्रमुख कारण बनले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 14, 2016


  • वाडा चिरेबंदी

    उत्साहाने सळसळणा-या ऐन तारुण्यात भविष्याची सुंदर स्वप्नं रंगवत फिरण्याच्या नितांतसुंदर वयात जी घरं आणि त्या घरांना ख-या अर्थाने घरपण प्राप्त करून देणारी माणसं भेटतात त्यांना आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या जुन्या भागातील ‘वाडा संस्कृती’ला तब्बल पंचवीस वर्षांनंतर मी कडकडून भेटलो. व्यवसाय व समाजकार्याच्या निमित्ताने पाचवीला पुजलेल्या भटकंतीमुळे इच्छा असूनही व्यास्तेतून वेळ काढता आला नव्हता. एकदा तरी वाड्यात राहणा-या सर्वांना भेटायला पाहिजे, असं म्हणता म्हणता अनेक वर्षं निघून गेलीत आणि ‘देखावे बघण्याचे वय निघून गेले’ या ओळी ओठाबाहेर पडण्याचं वय गाठण्याच्या आत तो वाडा ज्या गल्लीत होता तिच्यात अखेर मी प्रवेश केला.

    अनेक जुन्या वाड्यांनी आपली कात टाकून धारण केलेल्या त्यांच्या नव्या रूपाकडे मी एखाद्या छोट्याशा गावातून आलेल्या मुलागत बावचळून बघू लागलो. हे वाडे जर एवढे बदललेत तर त्यांच्यात वास्तव्य करणारी माणसं किती बदलली असतील या विचाराने मी उगीचच काळजीत पडलो. वाडा पूर्णत: नामशेष होऊन त्याच्या जागी एक टुमदार इमारत दिमाखात उभी होती. कौलारू घर, सारवलेलं अंगण, त्या अंगणातलं तुळशी वृंदावन यापैकी कशाचाही आता तिथे मागमूस उरला नव्हता. सारवलेल्या अंगणात फिरण्याची सवय असलेली माझी पावलं इमारतीच्या पार्किंगमध्ये काही क्षण रेंगाळली. तुळशी वृंदावनाच्या कोनाड्यात ठेवलेली पणती पूर्ण अंगणात मंद प्रकाश पसरवायची. आज त्याच जागेत अनेक निर्जीव वाहनं स्वत:चा तोरा सांभाळत उभी होती.

    वाड्यातील जुन्या मित्रांनी त्यांचे नवीन ब्लॉक्स उत्साहाने दाखवायला सुरुवात केली. एकेकाळी अंधारलेल्या खोल्यांची जागा आता गुळगुळीत टाइल्स व फॉल्स सीलिंगने सजलेल्या प्रशस्त रूम्सने घेतली होती. त्या दुमजली इमारतीतील ब्लॉक्सवर इंटेरिअर डेकोरेटरचा हात फिरला होता. पूर्वी ‘आजी’ नावाच्या संस्थेच्या अखत्यारित असलेल्या स्वयंपाकघरातील मातीची चूल, घडवंची, माठ, ओगराळं इत्यादी बहुपयोगी वस्तूंनी सक्तीची रिटायरमेंट घेतल्यामुळे त्यांची जागा आता मॉड्यूलर किचनमधील स्टेनलेस स्टीलच्या चकचकीत भांड्यांनी घेतली होती. आधुनिकतेचे सगळे अलंकार अंगाखांद्यावर कौतुकाने मिरवणा-या त्या घरांमधील मंडळींना आधुनिकतेचा स्पर्श नक्कीच झाला असणार, असा विचार करत असतानाच मोबाइल पिढीच्या प्रतिनिधींनी मला वाकून नमस्कार करण्यास सुरुवात केली आणि मी उडालोच! ‘हॅलो अंकल’च्या ऐवजी चक्क वाकून नमस्कार? या मुलांना झालंय तरी काय? मी चांगलाच चक्रावलो. ज्यामध्ये अनैतिक संबंधांशिवाय दुसरं काहीही दाखवलं जात नाही अशा सीरियल्स सतत बघूनही ही मुलं बिघडायला तयार नाहीत म्हणजे काय? मी अवाक् झालो असतानाच एका मित्राच्या बायकोने माझ्यावर आणखी एक बॉम्ब टाकला. ‘दर रविवारी तीनपैकी एका घरी एकत्र जमून आम्ही जेवणाचा उत्सव मनवतो!’ आता मात्र हद्द झाली. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वत:ला फ्लॅट नावाच्या चौकोनी डब्यात बंदिस्त करून घेतलेली व शेजा-याचा खून पडला तरी त्याबद्दल अनेक दिवस अनभिज्ञ असलेली माणसं ज्या कलियुगात राहतात तिथे सर्वांनी एकत्र जमून जेवणाचा आनंद लुटणं हे एक आक्रितच होतं.

    वाडा अस्तित्वात नसला तरी त्याचा आत्मा मात्र प्रत्येकाच्या शरीरात वास्तव्य करत होता हे बघून मी विलक्षण सुखावलो आणि पुन्हा सर्वांना आवर्जून भेटण्याचं आश्वासन देऊन अत्यंत समाधानाने मित्रांचा निरोप घेतला.

    -- श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

      July 13, 2016


  • नवरत्नमालिका – ८

    ॐकार. प्रणव. वैश्विक शक्तीचा आद्यतम हुंकार. सगुना निर्गुणाची जणू काही सीमारेषा.लिखाणाचा एक आकार असल्यामुळे सगुण, साकार. नादब्रह्म हे स्वरूप असल्याने निर्गुण निराकार. आई जगदंबा अशी ओंकारस्वरूपिणी, प्रणवरूपिणी आहे. तिच्या त्याच स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,

      May 22, 2020


  • कचऱ्याचे वर्गीकरण का करावे?

    मुंबई महानगरपालिकेने ओला कचरा आणि कोरडा कचरा अशा दोन भागात रोजच्या कचऱ्याचे वर्गीकरण करावे असा फतवा काही वर्षापूर्वीच काढला आणि जे कोणी असे करणार नाहीत त्यांना दंड करु असेही तेव्हा म्हटले होते. पण लोक आपण काढलेल्या फतव्याचे पालन करतात की नाही यावर देखरेखीची काही सोय केली नाही.

      May 31, 2023


  • मंगलगाणी दंगलगाणी’ ते चौरंग ची पस्तीस वर्षे

    मंगलगाणी दंगलगाणी' पासून सुरू झालेला अशोक हांडे यांच्या चौरंग चा प्रवास आज पस्तीसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे.

    ७ ऑगस्ट १९८७ रोजी सुरु झालेल्या 'चौरंग' या संस्थेने २०२१ पर्यत मंगलगाणी दंगलगाणी, गाने सुहाने, आजादी ५०, अमृत लता, मधुरबाला, अत्रे- अत्रे- सर्वत्रे, आवाज की दुनिया, माणिकमोती, गंगा जमुना, मराठी बाणा, मी यशवंत!, स्वर स्नेहल असे दर्जेदार कार्यक्रम रसिकांना बहाल केले आहेत. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात दौरे केले.

    लंडन, अमेरिका, दुबई, युरोप आदी ठिकाणी पण कार्यक्रम केले आहेत.

    रंगमंचीय सांस्कृतिक विद्यापीठ, चैतन्याचा अखंड वाहणारा झरा, दैदिप्यमान कार्यक्रमांची शृंखला लाभलेल्या 'चौरंग' च्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त अशोक हांडे, समस्त चौरंग परिवारातील सदस्य आणि सर्व रसिकांना अंतःकरणपूर्वक मंगलमय सदिच्छा व पुढील उज्ज्वल यशस्वी वाटचालीस अनेकोत्तम मंगलकामना.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      August 7, 2021


  • प्रमुख आहारसूत्र – प्रमेह अंतिम भाग २५

    आस्यासुखं स्वप्नसुखम दधिनी
    ग्राम्यौदकः आनूपरसः पयांसि ।
    नवान्नपानं गुडवैकृतंच
    प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम।।

    मधुमेह होऊ नये यासाठी काय करू नये, यासाठी आपण बघत असलेल्या या श्लोकाचे सार काय ?

    प्रमेह होऊ नये म्हणून
    अंगाला घाम आणून ।
    शरीरातील क्लेद काढून
    राहून सदैव दक्ष ।
    आहारावर असावे लक्ष ।। 1।।

    प्रमेह होण्यासाठी मधुर रसाबरोबरच न पचलेल्या आहारातून निर्माण झालेल्या कफाचा विकृत चिकटपणा म्हणजे क्लेद कारणीभूत असतो. जो तयार होऊ नये यासाठी सदैव दक्ष राहीले पाहिजे.

    केली जर मेहनत
    प्रमेह होईल नत ।
    शरीरा येई लघुत्व
    शंका मनी आणू नये ।।2।।

    मेहनत केली तर मधुमेह नाहीसा होतो.
    शरीराच्या हालचाली जेवढ्या जास्ती तेवढा शरीराला हलकेपणा येतो.

    फिरायचे फिरोन करावे
    बसायाचे बैसोन लिहावे ।
    बसणे ठिकाणी झोपणे
    ऐसे करणे बरे नव्हे ।। 3 ।।

    जे काम फिरून करता येण्याजोगे असते, ते बसून करू नये, जे बसूनच करायचे असेल ते झोपून करू नये.

    दीवास्वाप टाळावे
    टेबलावरी लवंडावे ।
    पांघरूण घेऊन झोपावे
    हे क्लेदाचे कारण ।। 4 ।।

    दुपारची झोप अजिबात नको. अपवाद ग्रीष्म आणि शरद ऋतु.
    झोपायचे असल्यास जेवणाअगोदर एक डुलकी टेबलखुर्चीत बसून काढावी.

    कष्टाची कामे करोन
    झोपावे निश्चिंत होवोन ।
    फुका कारणे लोळोन
    क्लेद माजतो अंगासी ।।5।।

    झोप तेव्हाच लागते, जेव्हा मेहनत करून थकवा आलेला असतो. जेवणानंतर येणारा अशक्तपणा हा क्लेद वाढवणारा असतो.

    आळसे सुख मानो नये
    सुखाचा अतिरेक करो नये ।
    दुःखाचे दुःख मानो नये
    अंतिम सुखी होण्यासी ।।6।।

    झोपेचे सुख हे थकवा घालवण्यापुरते असावे. झोप पूर्ण होऊनही लोळत राहाण्याचे सुख घेण्याचा प्रयत्न करू नये.
    शरीराला सुखाचा अतिरेक झाल्यास आयुष्य दुःखाचा अतिरेक सहन करावा लागतो. म्हणून देहे दुःख ते सुख मानीत जावे, आत्ता थोडासा त्रास वाटला तरी अंतिम सुख म्हणजे आरोग्य मिळेल.

    आपुले औषध स्वये करिती
    ते कुऱ्हाडीचा दांडा होती ।
    पथ्यापथ्य वैद्यास पुसती
    तयांसी नाव विवेक ।। 7।।

    मिडीयाच्या माध्यमातून अनेक सल्ले घरगुती औषधे वाचनात येत असतील तरी प्रत्येकाची प्रकृती वेगळी म्हणून प्रत्येकाचे औषध वेगळे या नियमानुसार सर्व सल्ले आपल्यासाठीच असतात असे नाही. त्यातील ज्याचा अधिकार आहे, अशा वैद्यांना जरूर विचारावे.

    वेगान न धारयेत
    तहान नसता पाणी घेत ।
    वृक्कासी व्यर्थ ताण देत
    हेची प्रमेहासी आमंत्रण ।।8।।

    पाणी गरजेनुसारच प्यावे.
    तहान नसताना पाणी पिऊ नये.
    सक्काळी सकाळी पाणी नको. रात्री झोपताना मुळीच नको. दात असताना ज्युस नको. अति खाण्याची हौस नको.

    दूर रहावे चार हातं
    फवारणी आणि खतं ।
    पिकवाव्या स्वकष्टातं
    फळे आणि भाज्या ।।9।।

    रासायनिक फवारणी केलेली फळे आणि पालेभाज्या खाणे म्हणजे पोटावर अत्याचार करणे होय.

    बांधून ठेविली कोंबडी
    खाल्ली तिची तंगडी ।
    पडली रोगाची उडी
    वरच्या वरी ।।11।।

    खुराड्यात माजवलेल्या पशुपक्ष्यांचे मांस खाऊ नये, याऐवजी स्वतःचे अन्न स्वतः शोधून खाणाऱ्या प्राण्याची निवड करावी.

    सूरव्यास साक्षी ठेवून
    जे करिती भोजन ।
    सुखे होई परिवर्तन
    खाल्ल्या अन्नाचे ।।12।।

    जे प्राणी सुर्यास्तानंतर खातात, त्यांचे मांस खाऊ नये. किंवा सूर्य नसताना जे खाल्ले जाते, त्याचे रूपांतर क्लेदात होते.

    क्लेद राक्षस जाणावा
    अन्नासी सूर्य दाखवावा ।
    क्लेदासी ठार मारवावा
    सूर्या करवी ।।13।।

    धान्य किमान एक वर्ष जुने करून वापरावे, त्यासाठी कडकडीत उन्हात ते आधी वाळवावे. नाहीतर भाजून वापरावे.

    मत्स्य कूर्म अथवा खेकडा
    जलाधिपति प्रमेहासी वाकडा ।
    असे अन्न त्वरीत सोडा
    जे क्लेदासी कारण ।।14 ।।

    ज्या अन्नात पाणी किंवा जलांश जास्ती आहे ते अन्न टाळावे, जे पाणथळ जागी रहातात किंवा पाण्यातच जगतात, त्यांच्या अंगी मुळातच पाणी जास्त असल्याने असे प्राणी क्लेद वाढवतात.

    मधुर ते ते सर्व सोड
    म्हणजे फक्त नव्हे गोड ।
    पचायला होती जड
    या नाव मधुर ।। 15।।

    गोड पदार्थ म्हणजे फक्त गुळ आणि साखरच नव्हे तर पचायला जे जड ते सर्व मधुमेहाचे कारण आहेत.

    गव्हाचा होतो गाजावाजा
    मधुर रसाचा आहे राजा ।
    प्रमेहाची मिळेल सजा
    चटणी भाकरीत आहे मजा ।।16।।

    समुद्र किनारी गहू नको. कुकरचा चिकट भात नको. चटणी भाकरी सोलकढीशिवाय जेवण नको. गरजेपेक्षा जास्त नको.

    सेवा केल्यावीण खाणे
    म्हणजे नरकात जाणे ।
    कशाला मग दूध पिणे
    ताक तूप असताना ।।17।।

    श्रमाचे काम न करता भरपेट जेवणे, गाईची प्रत्यक्ष सेवा न करता पैसे देऊन विकतचे दूध दही खाणे, त्यापासून बनलेल्या चाॅकलेट, मिठाया यांच्यावर ताव मारणे हे प्रमेहाला बोलावणे आहे. जसे, दुध आणि दही हे पदार्थ वैद्यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावेत. वैद्यांना माहिती नसल्यास हा श्लोक वाचून दाखवावा. आणि अर्थ सांगावा. पण दुध आणि दही यांचा मोह वेळीच सोडावा.

    अग्नीचा विसर पाडोन
    कधीही केले अन्नसेवन ।
    होणार नक्की अपचन
    ऐसे न करावे ।। 18।।

    भुक नसताना जेवणे, घड्याळ सांगते म्हणून जेवणे, सूर्यास्तानंतर जेवणे, ज्या अन्नाने आपल्याला त्रास होतो, हे माहिती असून जेवणे, पहिले खाल्लेले पचले नसताना परत जेवणे, आग्रहाचे जेवणे इ. प्रमेहाचे कारण आहे.

    यंत्रावर विसंबून
    मन भावना मारून ।
    इंद्रियांना गुंडाळून
    आणि त्याला विसरून
    रोगी होईल जीवन ।।19 ।।

    याकरीता,
    अखंड असावे सावधान
    खातापिता ठेवावे भान ।
    आयुष्य जगावे छान
    औषधाविना कायमचे ।।20।।

    इति अल्पमति प्रमेहसंप्राप्ती समाप्ती

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    10.02.2017

      February 10, 2017


  • प्रमोद साळुंखे – आपुलकीने वागणारा फिरस्ता..

    प्रमोद माझा चुलत भाऊ. गांवाकडेच राहिलेला, शिकलेला. लहानपणी माझं गांवाकडे फारसं जाणं झालं नसल्यानं, मला माझा गांव आणि गावातले नातेवाईक तसे फारसे समजले नाहीत. परतु मी जरी गांवी जात नसलो तरी माझ्या गांववाल्यांचं मुंबईतल्यी माझ्या घरी येणं होत असायचं, म्हणून मला त्यातले काही माहित.

      August 20, 2018


  • किचन क्लिनीक – कंदभाज्या – मुळा

    किचन क्लिनीक – कंदभाज्या – मुळा

    मुळ्याचा वापर हा भाजी करायला तर केला जातोच, तसेच सांबार,आमटी,डाळ,कोशिंबीर,लोणचे इ पदार्थ तसेच कोलंबीची मुळा घालून केलेली आमटी हे सर्वच पदार्थ रूचकर व चविष्ट लागतात.

      November 21, 2016