वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
।। हेरंबाय नम: अश्वत्थपत्रं समर्पयामि ।।
पिंपळाचा मोठा वृक्ष असतो व त्याला वर्षायू पाने येतात.पाने गुळगुळीत ५-६ सिरा असलेली,लांब टोकदार अग्र असलेली,हृदयाकृती व लांब देठाचे असते.फळ लहान १ सेंमी व्यासाचे गोल असते ते पिकल्यावर लाल होते.
ह्याचे उपयुक्तांग आहेत त्वचा,फुले,पानाचे कोंब,डिंक.हे चवीला तुरट गोड,थंड गुणाचे व जड अाणी रूक्ष असते.पिंपळ हा कफ पित्त शामक आहे.
चला आता आपण त्याचे काही औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)रक्तशुध्दी करीता तसेच त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी पांनांच्या कोंबाचा लेप करतात.
२)जखम भरून येण्याकरीता पिंपळाच्या सालीचे चुर्ण लावतात.
३)रक्तस्रावावर पिंपळाचा चीक लावतात.
४)पिंपळाचे पिकलेले फळ मधासोबत सेवन केल्याने रक्तात वाढलेली उष्णता कमी होते.
५)ज्या स्रीला गर्भधारणेची होत नाही तिला पिंपळाच्या फळाचे चुर्ण दुधासह सेवन करायला दिले जाते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
बर्याच जणांनास्पाॅन्डेलायटीस,व्हर्टिगो म्हणजे मानेतील दोष, पाठदुखी स्लीप डिस्क म्हणजे कंबर दूखी असे त्रास असतात. ह्यासाठी एक सोपा घरगुती उपाय सांगतो.
ह्यासाठी लागणारी सामुग्री - दोन सारख्या आकाराच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या, चटई
१. प्रथम चटई वर उशी न घेता पाठ टेकून झोपावे.
२. ह्या स्थितीत मानेखाली व कंबरेखाली गॅप पडते.
३. एक बाटली मानेखालील गॅप मध्ये आडवी ठेवावी.
४. नंतर दोन्ही पाय जवळ घेऊन कंबर उचलावी. माकड हाडाजवळ दुसरी बाटली आडवी सरकवावी.
५. आता एक एक पाय सरळ करावा. दोन्ही पाय एकदम सरळ करू नयेत. हे महत्वाचे आहे.
६. पाय सरळ केले की डोके जमिनीला टेकवावे. ह्यामुळे पाठीच्या कण्याला ताण येतो. अशा स्थितीत अर्धा मिनिट राहावे..
७. उठताना एकेक पाय जवळ घेऊन कंबर उचलून कंबरे खालील बाटली प्रथम काढावी व नंतर मानेखालची बाटली काढावी. व कुशीवर वळून उठून बसावे.
हा प्रयोग करताना कधीही घाई करू नये शांतपणेच करावा. असे रोज एकदा करावे.
अरविंद जोशी B.Sc.
व्हीडीओ साठी क्लिक करा
https://youtu.be/Xju7asFx6IU
वर्डप्रेसवरील माझ्या “मॅच द होरोस्कोप:माय फिट ,माय साईझ,माय एक्सरसाईझ ” या लेखाचा मराठी अनुवाद वाचकांच्या सांगण्यावरून.
।।गजकर्णकाय नम: तुलसीपत्रं समर्पयामि।।
"मै तुलसी तेरे आंगन की"हे गाणे बऱ्याच जणांना माहीत असेल माझ्या माहीती प्रमाणे हा एक जुना चित्रपट होता.असो थोडक्यात काय हिंदू संस्कृतीत आणी आपल्या आयुर्वेदामध्ये ह्या वनस्पतीला अत्यंत मानाचे स्थान आहे.
आज आपण पहातो बऱ्याच घरांमध्ये तुळशी वृंदावन असते किंवा घरा भोवताली तुळशीचे कुंपण लावतात.कारण तुळस हि रक्षोघ्न आहे अर्थात वाईट शक्ती रोग राई आपल्या घरापासून लांब ठेवते.
सकाळी उठून स्त्रिया शुचिर्भुत होऊन तुलसीला प्रदक्षिणा घालून तिला पाणी वाहतात कारण तुळशीच्या भोवताली प्राण वायू हा अगदी शुद्ध असतो व तिच्या सान्निंध्यात राहील्याने आपले आरोग्य चांगले राहते म्हणूनच कि.किती सोपा व सुंदर उपाय आपल्या संस्कृती मध्ये दिला आहे ना.
तुळसीचे क्षुप हे ०.५-१.५ मी उंच असते व हे वर्षायू असते.हिचे दोन प्रकार आढळतात एक कृष्ण तुळस जी काळसर तांबूस असते व एक श्वेत तुळस जी हिरवीगार असते.ह्याची पाने १-२ सेंमी लांब असून विशिंष्ट तीक्ष्ण सुगंध युक्त असतात.पानाच्या मादीस बाजूस सिरांमध्ये बारीक तैलग्रंथी असतात.फुले तांबूस काळसर असून मंजीरी १२-१७ सेंमी लांब असते.बी लहान,गोल,चपटे,तांबूस धुरकट असते.हिवाळ्यात ह्याला फुले व फळे येतात.
आता आपण ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात:
ह्याची चव तिखट,कडवट असते,ही उष्ण गुणाची असून हल्की,स्निग्ध व तीक्ष्ण असते.तुळशीच्या बिया मात्र गोड,थंड,स्निग्ध व पिच्छील असतात.
हि कफवात शामक व पित्तवर्धक आहे.
आता आपण ह्याचे उपयोग जाणून घेऊ:
त्वचा रोग,सूज ह्यात पानांचा रस/ लेप लावतात.
हिरड्या मधून पु येत असल्यास तुळशीची पाने चघळावी.
संडास मधून आव पडत असल्यास तुळशीच्याबियांची खीर उपयुक्त आहे.
श्वसनविकारांमध्ये तुळस उत्कृष्ट काम करते म्हणूनच खोकला,दमा,उचकी,सर्दी ह्यात तुळशीचा रस मधा सोबत देतात.
तापामध्ये तुळशीचा रस हा मध व मिरीपूड ह्या सोबत दिला जातो.
तुळशीच्या बिया ह्या पुरुषांमध्ये वीर्यवर्धन करायला उपयुक्त असतात.
तुळस ही डास व किटकांचा नाश करते म्हणून अंगणात ह्याचे कुंपण घराभोवताली लावावे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
खायचा चुना पाण्यात चुनकळी घालून तयार करतात. चुनकळी म्हणजे कॅल्शियम आँक्साईड – CaO व यात पाणी घातले की कॅल्शियम हायड्राँक्साईड तयार होते. यालाच खायचा चुना म्हणतात.
तुमचे तेजोवलय ही तुमची पर्सनल सिग्नेचर म्हणता येईल. जो माणूस आंधळा आणि बहिरा आहे, तो सुद्धा त्याच्या जवळ येणाऱ्या इतर लोकांचे अस्तित्व बरोब्बर ओळखतो.. सांगू शकाल , कसे..? कारण, देवाने दिलेल्या पंचेंद्रियां पैकी जेव्हा एखादे काम करत नाही तिथे बाकीची वइंद्रिये अतिसंवेदनशील होतात. ही लोकं इतरांचे अस्तित्व त्यांच्या तेजोवलयावरून ओळखतात. प्रत्येक माणसाकडे तेजोवलय बघायची, ते ओळखायची, त्याचा अर्थ जाणून घ्यायची जन्मजात क्षमता आहे. फक्त ती विकसित करावी लागते.
मनुष्यजीवन सर्वस्वी या श्वास पद्धतीवर अवलंबून आहे. नियंत्रित श्वास हा अतिशय आवश्यक असा विचार आहे.श्वास नियंत्रणाने आपण हवे ते साध्य करु शकतो आणि श्वासावरचे नियंत्रण सुटले तर आयुष्याची माती सुद्धा होवू शकते.
कॅल्शिअमच्या गोळ्या खाण्यापेक्षा या नैसर्गिक चुन्याच्या निवलीचे साइड इफेक्ट नाहीत. हे नैसर्गिक असल्याने शरीरात लवकर शोषले जाते.
ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे. तुम्ही शब्दांनी, वागण्याने आपल्या भावना किंवा intentions लपवू शकता .. पण तुमचे तेजोवलय काहीही लपवून ठेवत नाही.. तुमच्याबद्दलची सर्व माहिती तुमचं तेजोवलय देत असते.
मधूमेहाच्या रुग्णांसाठी काही उपयुक्त सूचना..
Copyright © 2025 | Marathisrushti