वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे. तुम्ही शब्दांनी, वागण्याने आपल्या भावना किंवा intentions लपवू शकता .. पण तुमचे तेजोवलय काहीही लपवून ठेवत नाही.. तुमच्याबद्दलची सर्व माहिती तुमचं तेजोवलय देत असते.
मधूमेहाच्या रुग्णांसाठी काही उपयुक्त सूचना..
माझ्या वडिलांचा १०mm चा किडनी स्टोन १०MM वरुन ३.५ MM झाला होता त्यानी परत १० दिवसानंतर पुढील ९ दिवस हा उपाय केला आणी सोनोग्राफी केले डॉक्टर पण अवाक झाले होते.
गौतम बुद्धांचे तेजोवलय त्यांच्या शरीरासभोवती 3 मैल पसरलेलं असायचं. ज्या यशस्वी प्रभावी व्यक्ती आपल्याला इतरत्र दिसतात, त्यांचे तेजोवलय सुद्धा अतिशय strong असते. तेजोवलय हे साध्या डोळ्यांना दिसत नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा अविश्वास दाखवतो. पण त्याचे सखोल ज्ञान घेऊन आपणही आपले आयुष्य यशस्वी आणि प्रभावी बनवू शकतो.
नैवेद्य दाखवायचा असो , सवाष्ण बोलवायची असो व ब्राम्हणांना जेवायला बोलावले असो. याप्रसंगी भोजन केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. जाणून घेऊया त्याविषयी ….
तुम्हाला माहितीय का की गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. खरं तर, स्निकर्सच्या एका बार मुळे रक्तातली साखर जेवढी वाढेल त्यापेक्षा जास्त गव्हाच्या ब्रेडच्या दोन स्लाईसेस मुळे वाढते. त्यामुळे जेव्हा लोकांनी गहू खाणं बंद केलं तेव्हा त्यांचं वजन, विशेषतः पोटावरून, खूप मोठ्या प्रमाणात घटलं यात काही नवल नाही. गहू सोडल्यानंतर पहिल्या महिन्यात लोकांचा जाडेपणा खूप इंचांनी कमी होऊ शकतो.
अचानक वाढणारं वजन, जाणवणारा थकवा, गळणारे केस यांसारखे त्रास सुरू झाल्यावर डॉक्टर थायरॉइडची टेस्ट करायला सांगतात. तोपर्यंत थायरॉइड या आजाराविषयी फारसं माहीत नसतं. योग्य आहार तसंच पथ्याच्या आधाराने थायरॉइडचा आजार नियंत्रणात येतो.
समाजात गुरुचरित्राबद्दल फार भाविकतेने बोलतात. मी मात्र अभ्यास म्हणून गुरुचरित्र वाचले. गुरुचरित्रात छत्तिसाव्या अध्यायात ब्राह्मणाच्या कर्माचरणात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत २५ ते ३० वेळा आचमन सांगितले आहे. स्नानाअगोदर लघुशंका आचमन सांगितले आहे. (कामतांच्या गुरुचरित्रात) माझ्या दृष्टीने गुरुचरित्र लिहिणारे सामान्य लेखक किंवा कवी नव्हते. त्यामुळे शेकडो वर्षे गुरुचरित्र टिकून आहे. हल्ली ५० वर्षापूर्वीचे लेखकांचे साहित्य मिळत नाही. गुरुचरित्र मात्र टिकून आहे. म्हणून मी त्या अध्यायातील आचमनांची लिस्ट केली. त्याप्रमाणे आठ दिवस आचमन त्या त्या प्रमाणे करून बघितले. मी संध्या करीत नाही. पण संध्या करायच्या ज्या वेळा आहेत त्यावेळी नुसते आचमन केले . शरीर हलके वाटू लागले. असिडिटी कमी झाली. नंतर आचमनाच्या वेळी जी नावे घेतात ती न घेता फक्त आचमन म्हणजे प्रत्येक वेळी तीन पळ्या पाणी पिऊन पाहिले. तरी तोच फायदा झाला. हे मी माझ्या एक डॉक्टर मित्राला सांगितले. तो म्हणाला, " बरोबर आहे." आपण पाणी कितीही प्यायलो तरी त्यातील थोडेसेच पाणी एका वेळी रक्तात घेतले जाते व अंतरा अंतराने घेतलेले थोडे पाणी रक्तात जाते. त्यामुळे रक्ताची घनता योग्य प्रमाणात राहून ऍसिडिटी, बी. पी. कमी होणारच. हल्लीचे सलाईन तरी काय आहे ? तसेच आहे.
आहे ना? आमच्या पूर्वजांनी देवाच्या नावाखाली सामान्य लोकांना शरीर नीट ठेवण्यासाठी शास्त्रच वापरले. फक्त आम्हाला ते माहीत नाही म्हणून टाकाऊ म्हणून आम्ही ते सोडून दिले.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
कांजिण्यांचा सामना करताना फोडांच्या जागेवर येणा-या खाजेवर व तापावर नियंत्रण ठेवणे हे एक महत्वाचे आव्हानच असते. कोमट पाण्याने आंघॊळ करताना अंगाला लावण्यासाठी खाण्याचा सोडा किंवा डाळीचे पिठ वापरावे. हे उपायकारक व फायदेशिर असते. थंड पाण्याने आंघोळ करणे किंवा थंड वातावरणाने खाज वाढण्याची शक्यता अधिक असते.
खाजखुजलीवर उपाय म्हणून डिफेंहिड्रामाईन (बेनाड्रील) किंवा हायड्रोक्सिझेन (ऍटारॅक्स) सारख्या गुणकारी औषधांचा वापर केला जाऊ शकतो. त्या त्या परिस्थितीशी अनुकुल असणारी गुणकारी लोशनही आपण वापरु शकतो. पण लहान मुलांनकडून तोंडावाटे डिफेंहिड्रामाईन (बेनाड्रील) व लोशनचा अतिसेवन किंवा अतिवापर होणार नाही याची दक्षता घेणे फार महत्वाचे आहे. स्टेरॉईडचा समावेश असलेल्या औषधांचा वापर करु नये.
लहान व तरुण मुलांसाठी ऍसप्रिन य औषधाचा वापर टाळावा कारण त्यामुळे Reye's syndrome सारखा जीवनाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता काही प्रमाणात असते. तापावर नियंत्रण आणण्यासाठी ऍसेटामाय्नोफेन औषधाचा वापर करावा. घातक आजार टाळण्यासाठी आय्ब्रुफेनचा वापर टाळावा. कांजिण्या या आजारात त्वचेला वारंवार खाज येत असते अशावेळेस हाताच्या बोटांची नखे कापावी किंवा हातमोजे वापरावे जेणेकरुन त्वचेला ईजा होणार नाही. तोंडातील जखमासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो. शरिरास थंड असणा-या द्रव पदार्थाचे सेवन करावे व गरम, तिखट आणि आंबट पदार्थ (संत्र्याचा रस) टाळावेत.
हात वारंवार धुवावे व शरिरास स्वच्छ ठेवावे जेणेकरुन संसर्ग होणार नाही. जर शरिराला हानीकारक असलेल्या किटाणुंचा संसर्ग झाला असेल आणि तो वाढून ताप पुन्हा येत असेल तर डॉक्टरांना त्वरीत दाखवावे. लहान मुलांना कांजिण्या झाल्या असतील त कुटुंबातील इतर सदस्यांना दक्षता घेण्याबद्दल सांगायला विसरु नका.
त्वचेला चरे पडणे किंवा संसर्ग होणे आयुष्यभराचे दुखणे ठरु शकते. डॉक्टरांना जाऊ दाखवणे गरजेचे नाही हा दृष्टिकोन पुढे आपल्याला पेचात अडकवू शकतो.
ऍसिक्लोविर (झोविरॅक्स), हे संसर्ग रोखणारे औषध आहे. त्वचेला चरे पडण्याच्या पहिल्या दिवसापासून वापरल्याने उपयोगी ठरु शकते. लहान मुलांना या औषधाच्या वपराची आवशक्ता नसते. हे औषध बराच वाढलेल्या आजारासाठी दिले जाते. कारण कांजिण्या हा संसर्गजन्य रोग आहे. अशा संसर्गजन्य वातावरणाचा प्रभाव कमी होईपर्यंत लहान मुलांना शाळापेक्षा घरातच शक्यतो ठेवावे.
कांजिण्यांपासून बचाव.
वॅक्सिनपद्धतीने कांजिण्यापासून बचाव केला जाऊ शकतो (हे राष्टीय आरोग्य व जनता आरोग्य समुहांनी प्रमाणित केले आहे).
लहान व तरुण मुलांसाठी: १२ ते १८ महिन्याच्या मुलांपासून १२ वर्षाच्या सुदृढ बालकांवर (जर त्यांच्या कुटुंबात कधीही कांजिण्या झाल्या नसतील तर) वॅक्सिनपद्धतीने उपचार केले जाऊ शकतात. १३ वर्षे व त्याहुन अधिक वयाच्या बालकांना (जर त्यांच्या कुटुंबात कधीही कांजिण्या झाल्या नसतील तर)चार ते पाच आठवडे वॅक्सिनच्या औषधाच्या दोन मात्रा दिल्या जातात. वॅक्सिनेशन नंतर रोग प्रतिकार शक्तीची पुर्ण कल्पना येत नाही. पुन्हा दिलेल्या वॅक्सिनेशनमुळे पौढत्वाकडे वाटचाल करणा-या मुलांमधे रोग प्रतिकार शक्ती वाढते असे मानले जाते.
पौढत्वासाठी: वरिसेल्लिया वॅक्सिन औषधाच्या दोन मात्रा चार ते आठ आठवड्यांसाठी सुदृढ पौढांना प्रमाणित केल्या जातात. सामाजिक आरोग्य विभागाचे कर्मचारी, दिवसा काळजी घेणारे कर्मचारी विद्यालयाचे कर्मचारी, एकत्रित निवास करणा-यांना व संसर्ग होईल अशा जागेत काम करणा-यांना वॅक्सिनेशनसाठी प्रवृत्त करण्यात आले आहे.
ज्या पौढांना आपल्या रोग प्रतिकार शक्तीच्या पातळीविषयी माहिती नाही अशांसाठी रक्ताचे परिक्षण व निदान करणा-या पद्धती उपलब्ध आहेत. रोग प्रतिकार शक्तीच्या पातळीविषयी माहिती असणे फार गरजेचे असते.
वॅक्सिन ह्या पद्धतीची घातक आजारापासून बचाव करण्याच्या दृष्टिकोनाने निर्मिती करण्यात आलेली आहे आणि हीपद्धत खुपच प्रभावी आहे. वॅक्सिनपद्धतीचा वापर केल्यानंतर क्वचितच कांजिण्या उद्भवण्याची शक्यता असते. कधी कधी वॅक्सिनपद्धतीनेसुद्धा कांजिण्या उद्भवण्याची शक्यता असते.
वॅक्सिनचा प्रॉफेलॅक्सिस झाल्यानंतरही बचावासाठी वापर केला जाऊ शकतो. त्याची लक्षणे दिसायला लागल्यानंतर तिन दिवसात द्यायला हवे. तसेच लक्षणे दिसल्यानंतर चार दिवसात VZIG दिले जाऊ शकते जे अधिक संसर्गापासून बचाव करते.
हे स्थायी संरक्षण देणारे औषध आहे. म्हणूनच काही काळाने पण वेळीच त्याव्यक्तीची आजारातून सुटका होणे गरजेचे आहे
.कांजण्यासाठी
कडुनिंबाची २०० Gm पान +
मिरे 5 gm एकत्र करुन वाटुन चण्या एवढ्या गोळ्या करा
1 गोळी 1 कप दुध
( ७ दिवस)
@ १ चमचा कडुनिंबाचा रस +
४ चमचे खडीसाखर
@ घरातल्या दारात कडुनिंबाची पाने बांधुन ठेवा
@ कुडुनिंबाच्या पानाचा बिस्तरा बनवा वर सफेद चादर किंवा कापड टाकून त्याच्या वर आजारी व्यक्ती ला झोपवा
प्रसारणःराजयोग ग्रुपचे
-- आरोग्यदूत WhatsApp ग्रुपच्या सौजन्याने
।। बटवे नम: दाडीमपत्रं समर्पयामि।।
डाळींब हे फळ जितके पौष्टीक तितकेच दिसायला आकर्षक असून त्याची आंबट गोड चव आपल्या सर्वांनाच आवडते.जसे हे फळ रूचकर लागते तसेच ते औषधी गुणांनी परिपूर्ण अाहे म्हणूनच ह्याची पाने पत्रीमध्ये समाविष्ट केली आहेत.
ह्याचे ३-५ मीटर उंचीचे वृक्ष असते.काण्ड त्वचा धुरकट तांबडी असते व गुळगुळीत असते.पाने ५-७ सेंमी लांब व तीन सेंमी रूंद असून दोन्ही टोकास निमुळती असतात.फुले लाल एकल अथवा क्वचित २-४ च्या गुच्छात असतात.फळ गोल,५ सेंमी व्यासाचे व भरपूर कोष युक्त असते.फलत्वचा चिवट असते.
ह्याचे उपयुक्त अंग आहेत फलत्वचा,मुलत्वचा,व फल.ह्याची चव गोड,तुरट,आंबट असून हे अनुष्ण गुणाचे असते तसेच हल्के व स्निग्ध असते.हे शरीरातील तिन्ही दोष शमन करते.
चला आता ह्याचे उपयोग पाहूयात:
१)सालीचा काढा जखम धुवायला तसेच घशाच्या रोगात उपयुक्त आहे.
२)उल्टी मळमळ ह्यात फळाचा रस उपयुक्त आहे.
३)कृमींवर डाळींबाच्या मुळाचा काढा उपयुक्त आहे.
४)जुलाब होत असल्यास सुकवलेली डाळींबाची साल उपयुक्त आहे.
६)डाळिंबाचे फळ हृदयास हितकर असून रक्त वाढवायला मदत करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti