(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गोवा राज्य स्थापना दिन

    इंग्रज १९४७ मध्ये भारतातून बाहेर गेले. पण पोर्तुगीज त्यांच्या ताब्यातील प्रदेश सोडत नव्हते. अखेर भारतीय लष्कराने दमण, दीव आणि गोवा हा प्रदेश ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत १९ डिसेंबर १९६१ रोजी जिंकला आणि भारतात विलीन केला. केंद्र सरकारने त्यावेळी दमण, दीव आणि गोवा यांना केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा दिला. नंतर ३० मे १९८७ रोजी गोवा या केंद्रशासीत प्रदेशाला भारताच्या घटक राज्याचा दर्जा देण्यात आला पण दमण आणि दीव यांचा केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा कायम ठेवण्यात आला. यामुळे १९ डिसेंबर हा गोवा मुक्ती संग्राम दिन आणि ३० मे हा गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करतात.

      May 30, 2022


  • एव्हरग्रीन चंद्रशेखर

    मी देव आनंदचा जबरदस्त फॅन आहे. लहानपणापासून मी त्यांचे चित्रपट पहात मोठा झालो. त्याचे ब्लॅक अॅण्ड व्हाईट पासून सप्तरंगी चित्रपटही पाहिले, साठवणीतल्या आठवणीत ते जपून ठेवले.

      December 23, 2022


  • त्वचारोग आणि आयुर्वेद

    त्वचाविकारावर इतर उपचार चालू असताना सोबत खालील उपचार करावेत.

    आयुर्वेदाच्या दृष्टीने अनेक त्वचारोग हे आंतरिक दोषांचे बाह्य स्वरूप आहेत. यासाठी काही पथ्येही सांगितली आहेत. एक सर्वसाधारण नियम म्हणजे दूध,मिठाई यांच्याबरोबर आंबट पदार्थ खाऊ नयेत असा आयुर्वेदाचा सल्ला आहे. दूध-खिचडी, दूध-मासे हे पदार्थही एकत्र घेणे वर्ज्य आहे. मीठ व खारट पदार्थांवरही नियंत्रण आवश्यक आहे. लोणचे,खारवलेल्या मिरच्या, सांडगे,शेवया, इत्यादी पदार्थ या दृष्टीने कमी खावेत. अशी काळजी घेतल्यास त्वचारोग लवकर नियंत्रणात येतात असा अनुभव आहे. ठेवल्यावर आपोआप पाणी सुटणा-या दही, गूळ, इत्यादी वस्तूही त्वचारोग वाढवतात असा आयुर्वेदाचा विश्वास आहे. पोटात जंत असणे, कोठा साफ नसणे हा त्रास असेल तर त्यावर लवकर व नियमित उपचार करणे आवश्यक आहे. या विकारामुळे त्वचारोग लवकर आटोक्यात येत नाहीत.

    पावसाळयाच्या शेवटी होणारे त्वचाविकार हे शरीरातील थोडे रक्त काढल्यास (रक्तमोक्षण) लवकर बरे होतात. यासाठी जळवांचा वापर करता येईल. त्वचारोगाच्या आजूबाजूला किंवा रोगग्रस्त त्वचेवर जळवा लावल्यास लवकर आराम पडतो असा अनुभव आहे.

    आयुर्वेदानुसार साबणाऐवजी बेसनपीठ व तेल वापरल्यास त्वचा निरोगी व स्निग्ध राहण्यास मदत होते. विशेषकरून कोरडी त्वचा असलेल्या व्यक्तींनी अशी काळजी घेणे आवश्यक आहे.

    (अ) आरोग्यवर्धिनी 500 मि.ग्रॅ. दोन वेळा
    (ब) मंजिष्ठा चूर्ण पोटातून रोज दिल्यास आराम पडतो.

    (मात्रा : 1.5 ते 3 ग्रॅ. याप्रमाणे दिवसातून दोन वेळा)

    लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
    संदर्भ : आरोग्यविद्या

    -- आरोग्यदूत वरुन साभार

      August 20, 2016


  • वनस्पती आणि आनुवंशिक संकेत – ४ – झाडांच्या पेशीतील आनुवंशिक तत्व

    आनुवंशिक तत्वं, सजीवांची शरीरं घडवितात हे आता निर्विवादपणे सिध्द झालं आहे. अध्यात्मवाद्यांनी आता या विज्ञानीय सत्याचा स्वीकार केला पाहिजे..आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, सजीव आणि वनस्पती यांच्यातील आनुवंशिक तत्व म्हणजेच त्यांचा आत्मा हेही मानलं पाहिजे.

      December 26, 2016


  • इंजिन ड्रायव्हर्स आणि गाडीचा प्रवास

    इंजिन ड्रायव्हर्स आणि गाडीचा प्रवास

    गाडी चालविण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्य ड्रायव्हरची असते. प्रवासात काही अडचण आली, तर मुख्य ड्रायव्हर आपली जागा सोडून खाली उतरत नाही. ते काम साहाय्यकाचं (असिस्टंट ) असतं.

      September 6, 2022


  • शेतकरी आंदोलनाचे आंतरराष्ट्रीयकरण

    दिल्लीच्या सरहद्दीवर सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस वेगवेगळे वळण मिळत आहे. इतके दिवस शांततापूर्ण रीतीने सुरू असलेल्या या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसेचे गालबोट लागले. आता हे आंदोलन गुंडाळले जाणार! असे वाटत असतानाच शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी आंदोलनाला नवीन ऊर्जा मिळून दिली आणि आंदोलन पुन्हा जोमाने सुरू झाले. आता तर या आंदोलनाचे ट्विटरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे.

      February 11, 2021


  • मालवणचा “सुवर्णगणेश” !

    गणपती आणि गाणपत्य संप्रदायाचा चालताबोलता विश्वकोश म्हणजे कै. जयंतराव साळगावकर ! त्यांनी हे सुवर्णगणेशाचे सुंदर मंदिर मालवणमध्ये बांधले आहे.

    येथे गणपतीचा थाट पूर्णपणे वैभवशाली आहे. गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे. रिद्धी सिध्दीही नेहेमी पाहायला मिळतात त्यापेक्षा वेगळ्या आहेत . गणपतीच्या दोन्ही बाजूंना मूषक जोडी, दोन बाजूंना लामणदिवे,अत्यंत देखणी प्रभावळ आणि राजेशाही चौरंग ही आणखी काही वैशिठ्ये ! गाभारा प्रशस्त आहे.

    त्यामानाने मंडप लहान आहे पण ८ खांब, त्यावरील विविध रूपातील गणेशमूर्ती, विविध दिवे आणि प्रवेशद्वारातील २ हत्ती इत्यादींमुळे तो खूप प्रसन्न आणि आकर्षक वाटतो. भविष्यात येथे येणाऱ्या भक्तांची संख्या अमाप वाढू शकते. त्यादृष्टीने मात्र मोठ्या वाहनांसाठी वाहनथांबा, शिस्तबद्ध दुकाने, प्रसाधनगृहे, थोडे रुंद रस्ते यांचे नियोजन आत्ताच करायला हवे.

    इतके सुंदर मंदिर आपण अवश्य पाहायला हवे.
    -- मकरंद करंदीकर

      April 13, 2017


  • शनिकथा व इतिहास

    आपल्या दैनदिन जीवनात तेजपुंज आणि शक्तिशाली शनीचे आगळे वेगळे महत्व आहे. तसेच शनी सौर जगतातील नऊ ग्रहांमधील सातवा ग्रह आहे. याला ज्योतिष शास्त्रात अशुभ मानले जाते. आधुनिक खगोल शास्त्रानुसार शनीचे पृथ्वी पासूनचे अंतर जवळपास नऊ कोटी मैल आहे. याचा व्यास १ अब्ज ४२ कोटी ६० लाख किलोमीटर इतका आहे.

      November 26, 2017


  • पृथ्वी झुकते आहे

    पृथ्वी झुकते आहे… खरं तर, पृथ्वी साडेतेवीस अंशांनी अगोदरच  झुकली असल्याचं सर्वज्ञात आहे. पण ती आणखी झुकते आहे… पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते आहे, तो अक्ष आणखी कलतो आहे. परिणामी, पृथ्वीचे ध्रुव बिंदूही सरकत आहेत. अक्षाच्या दिशेतला हा बदल पृथ्वीवर होत असलेल्या बदलांमुळे होत आहे. नैसर्गिक कारणांमुळे असे बदल घडून येत असले, तरी या कारणांना अनेकवेळा अप्रत्यक्षपणे मानवी हातभारही लागलेला असतो.

      June 28, 2023


  • ओवाळूं आरती : भाग – १/५

    भारत हा उत्सवप्रिय, सणप्रिय देश आहे. भारतात सण भरपूऽर , आणि, सण म्हटलें की, पूजा-अर्चा-आरत्या आल्याच ! त्यातील ‘आरती’ या विषयावर कांहीं ऊहापोह करावा म्हणून हा लेख.

    भाग -

    भारतातीलच काय , पण सर्व जगातील बरेच लोक ‘अस्तिक’ आहेत. ‘अस्ति’ म्हणजे, ‘(तो/ती/ तें) अस्तित्वात आहे’ . अति-पुरातन काळीं, ‘अस्तिक’ या शब्दाचा अर्थ ‘वेदांना मानणारा’ असा होत असे. कारण वेद हे अपौरुषेय , म्हणजेच ईश्वरीय, मानले जात. परंतु, आतां, म्हणजे गेल्या बर्‍याच शतकांपासून, ‘अस्तिक’ म्हणजे, ‘ईस्वराचें अस्तित्व मानणारा’ असा अर्थ घेतला जातो.

    आदिम काळापासून, जगभर मानवप्राणी ईश्वराचें अस्तित्व मानत आलेला आहे, आणि हा विचार हजारों वर्षें अप्रतिहत सुरूंच आहे, अजूनही आहे. कांहीं काळापासून, ‘नास्तिकपण’, म्हणजे ‘ईश्वराचें अस्तित्व न मानणें’, म्हणजेच ‘निरीश्वरवाद’ , हा विचार समाजातील कांहीं व्यक्ती मानूं लागल्या आहेत. अर्थात्, जसजसा समाजात विज्ञानाचा प्रसार-प्रचार होत गेला, होत आहे, तसतसे, ‘निरीश्वरवाद’ मानणारे ‘बुद्धिवादी’, ‘इहवादी’ लोक कांहीं अंशीं तरी वाढत आहेत. मात्र, ‘इहवाद’ हा भारतास नवीन नव्हे, तर हा अनेक शतकें-सहस्त्रकें जुना आहे. ज्याला ‘चार्वाकवाद’ अथवा लोकायत’ म्हणतात, तें दर्शनशास्त्र इहवादीच आहे. अर्थात्, ‘ईश्वराचें अस्तित्व मानणें’ हा श्रद्धेचा भाग आहे. आणि, बोजड , कंपल्सरी व ‘अंगावर येणार्‍या’ कर्मकांडात न अडकून पडलें, तर, ईश्वरावर (देवावर) भरोसा ठेवून जीवनक्रमण करणार्‍यांना कांहीं अंशीं तरी जीवन सुकर होतें, व त्यांचा मानसिक ताण कमी होतो, हें मानणें क्रमप्राप्त आहे. आपण आरत्यांबद्दल बोलत आहोत, त्यामुळे, ‘अस्तिक्याबद्दलच’ चर्चा करणें अपेक्षित आहे.

    पुढे जाण्यापूर्वी आपण एक गोष्ट ध्यानात घेऊं या, आणि ती आरत्यांच्या संदर्भात महत्वाची आहे. ती गोष्ट अशी की, यहुदी (ज्यू), ख्रिस्ती, इस्लाम हे धर्म एकेश्वरवादी आहेत, म्हणजेच ते फक्त ‘एकच-ईश्वर’ मानतात. तसें हिंदू धर्माचें नाहीं. हिंदू धर्म हा, अगदी वैदिक काळापासून अनेकेश्वरवादी आहे. ‘तेहतीस कोटी’ देव अशी संकल्पना आहेच. तसेंच, ‘अवतार’ ही संकल्पनाही हिंदू धर्मात आहे. अवताराची संकल्पना सुरुवातीला, आणि त्यानंतर बराच काळ, जरी विष्णूच्या संदर्भात निर्माण झाली, तरी नंतरच्या काळात, इतरांच्या बाबतीतही ही संकल्पना मानली जाऊं लागली. गणपतीही वेगवेगळ्या युगांमध्ये पुन्हा-पुन्हां अवतरत असतो, अशी संकल्पना आहेच. हल्लीच्या काळाचा संदर्भ घेतला तर,’शिरडीचे साईबाबा हे सूफी संत, ‘दत्ताचा अवतार’ मानले जातात, तर ‘सत्य साईबाबा’ हे मूळ शिरडीच्या साईबाबांचा अवतार मानले जातात.

    याचा अर्थ असा नाहीं की हिंदू धर्मात एकेश्वरवाद नाहींच. तोही आहे. उदाहरणार्थ , आदि- शंकराचार्यांचा ‘अद्वैतवाद’ म्हणजेच आत्मा-परमात्मा यांचें ऐक्य. अर्थातच, तिथें एकेश्वरवाद हा अध्याहृत आहेच.

    महत्वाची गोष्ट अशी की, हिंदू धर्म हा, एकेश्वरवाद आणि अनेकेश्वरवाद यांच्यातही समन्वय साधतो. वैदिक कालातही इंद्र, मित्र, वरुण, नासत्य (अश्विनीकुमार) इत्यादी दैवतें मानली जात होती. आजही, हिंदू हे, गणपती, शंकर, राम, कृष्ण, विठ्ठल, व्यंकटेश, बालाजी , स्कंद / कार्तिकेय / षण्मुगम् (षण्मुखम् ), खंडोबा, म्हसोबा, वगैरे अनेकानेक नांवांच्या देवांना ; तसेच रेणुका, महालक्ष्मी, दुर्गा, काली, पार्वती, सरस्वती, इत्यादी अनेकानेक नांवांच्या देवींना भजतात. ( ही केवळ उदाहरणें आहेत. त्यामुळे, इतर देव-देवींच्या नांवाचा उल्लेख न केल्याबद्दल क्षमस्व) . आणि, असे अनेक देव-देवी मानूनही, ‘परमेश्वर’, ‘परमात्मा’ ही ‘सर्वश्रेष्ठ’ शक्ती मानलेली आहेच. परत, व्यंकटेश म्हणजे विष्णू, पांडुरंग म्हणजे कृष्ण, राम व कृष्ण हे विष्णूचे अवतार, असें ऐक्य मानलेले आहेच.(ज्येष्ठ संशोधक कै. रा, चिं ढेरे म्हणतात की, विठ्ठल व बालाजी ही ‘लोकदैवतें’ आहेत. म्हणजेंच, विठ्ठल व बालाजी हें एक भिन्न प्रकारचें ऐक्य झालें). त्यामुळे, हिदूंमध्ये अनेक देवतांचें पूजन-अर्चन होतें. याचा अर्थ असा की , ‘unity in diversity’ हें तत्व हिंदूंच्या बाबतीत अनेक अर्थांनी खरें आहे.

    पूजन व अर्चन हे बहुतांशी बरोबरच (together, साथसाथ) जातात. पूजाअर्चा (हिंदीत : पूजा- अर्चन) अशा जोड-शब्दप्रयोग आपण नेहमीच वापरतो. पूजन/पूजा व अर्चन/अर्चा हे संस्कृत शब्द आहेत. व्ही.एस्. आपटे यांचा संस्कृत-इंग्लिश शब्दकोश त्यांचे असे अर्थ देतो : पूजन : To worship, To revere. अर्चन : To salute, To welcome with respect, To honour, To praise, To worship. याचा अर्थ असा की पूजन व अर्चन हे दोन्ही शब्द जवळजवळ समानार्थी आहेत. पण , जर दोन्ही एकच असते, तर त्याच्या जोड-वापरानें पुनरुक्ती झाली असती ( जसें की, ‘पिवळा पीतांबर’). म्हणजेच, दोहोंत थोडाफार तरी फरक आहे, खास करून प्रॅक्टिकली. पूजन हा मुख्यत: कार्मिक (इथें त्याचा अर्थ आहे, ‘कृतीशी संबंधित’) विधी आहे , तर अर्चन / अर्चना हें मुख्यत: ‘वाचिक’ कार्य आहे. ( अर्थात्, अर्चनेच्या संगें थोडीफार कृती येतेच. त्याबद्दल आपण पुढे पाहूं ).

    उपासना व पूजन म्हटलें, तर, तें अनेक देवदेवतांचें तर असतेंच, पण तसेच तें अनेक साधू-संतांचेही असतें. शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांची प्रत्यक्ष पूजा होवो न होवो, महाराष्ट्रीय लोक त्यांची ‘मानसपूजा’ तर करतातच. ( शिवरायांच्या स्वत:च्या काळातील किंवा नंतरच्या काळातील, त्यांच्यावरील पोवाडे आहेत, मराठी-हिंदी काव्यें आहेत, बखरीतील उल्लेख आहेत, पण आरत्या दिसत नाहींत. शिवरायांच्या आधुनिककालीन आरतीचा संदर्भ आपण पुढे जोडूं. पण तात्पर्य काय, तर, महापुरुषांवरही आरत्या असूं शकतात ).

    पूजाविधी पाहिले तर, नेहमीच्या, म्हणजे दररोजच्या (घरातील अथवा मंदिरातील) पूजाविधींबरोबरच, सणासुदीचे पूजाविधी आहेत ; अभिषेक-लग्न-मुंज-गर्भाधान- वास्तुशांती-उदकशांती- नामकरणविधी (बारसें)-व्रतवैकल्यपूर्ती/उद्यापन वगैरे विविध प्रसंगीं करावयाचे पूजाविधी आहेत ; परत, सत्यनारायण, सत्यविनायक असे विशिष्ट पूजाविधी आहेतच.

    अर्चना वा वाचिक ‘वंदन’ अनेक प्रकारचें असतें. प्रार्थना, भजन, कीर्तन, स्तोत्र-श्लोक-ऋचा-मंत्र यांचें पठण, अध्यात्मिक-धार्मिक-भक्तीपंथीय निरूपण, दैवी घटनांचें व देवादिकांशी आणि संतांशी संबंधित कथांचें गद्यपद्यात्मक कथन-गायन , (कधीकधी, संगतीनें नृत्यही) , दैवतांची ( किंवा संतांची / गुरूची ) स्तुती व पदवंदना, नाम-जप, (तपासहित वा त्याव्यतिरिक्त), अशा अनेक प्रकारें हें वंदन होतें. आरत्या हा त्यातलाच एक प्रकार.

    ‘आरती’ या पद्यप्रकाराकडे ‘एक साहित्यप्रकार’ म्हणून आस्वादायचा प्रयत्न करूं नये, कारण साहित्याच्या निकषांवर तोलायचें तें काव्य नव्हेच. अर्थात्, तो जरी एक काव्यप्रकार असला, तरी त्याचा संबंध, श्रद्धा, भक्ती, धार्मिक बाबी, इत्यादी गोष्टींशी असतो. तेव्हां, त्या दृष्टीकोनातूनच ‘आरती’च्या पद्यांकडे पाहणें योग्य ठरेल.

    आरती हा शब्द संस्कृतच्या ‘आरात्रिका / आरात्रिकम्’ या शब्दापासून निर्माण झालेला आहे. त्याचा अर्थ आपटे यांचा शब्दकोश असा देतो : (1) ‘Waving a light in front of an idol’ ; (2) The light.

    म्हणजेच, ‘आरती’ हा शब्द मूलत: ज्योतीशी संबंधित आहे, आरती म्हणजे ‘त्याप्रसंगीं म्हटलेलें पद्य’ हा अर्थ नंतर जोडला गेलेला आहे.

    त्यामुळे, आज असें आहे की,

    • आपण ‘उच्च-रवानें वाचिक उच्चारण’ करतो म्हणजे, मोठ्यानें चालीवर म्हणतो, तीही आरतीच ;

    ( हा अर्थ नंतर प्राप्त झालेला दिसतो) ;

    (अशा प्रकारें मोठ्यानें ‘म्हणण्याला’ --- जें गाण्याच्या क्रियेहून भिन्न आहे ----- उर्दूत, ‘तरन्नुम नें सुनाना’ म्हणतात, अर्थात् तो शब्द उर्दूत साधारणपणें गझलच्या संदर्भात वापरला जातो, तिथें आरतीचा संबंध नाहींच. चालही वेगळी. मात्र क्रिया तीच .)

    • त्याचप्रमाणें, त्या प्रसंगी पेटवलेल्या निरांजनात ज्योत, प्रकाश, हातात घेऊन आपण आराध्याला ओवाळतो, ती ओवाळण्याची क्रियाही (हिंदीत : ‘आरती उतारना’), आरतीच.

    ( हा मूळ अर्थ आहे ) ;

    • आणि, तो निरांजनाच्या ज्योतीचा प्रकाश म्हणजेही आरतीच,

    ( हाही मूळ अर्थ आहे ) .

    आरती मराठीत इतकी भिनली आहे की, मराठीत ‘आरती ओवाळणें’ हा एक वाक्प्रचार झालेला आहे. व्यंगार्थानें, चेष्टेनें, किंवा हिणवूनही, ‘आतां तुझी आरती ओवाळूं कां’, किंवा ‘आरती ओवाळायचीच बाकी राहिली आहे’ अशा प्रकारचे वाक्प्रचार सर्रास वापरले जातात.

    (पुढे चालू )

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      September 5, 2016