(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्री ब्रम्हदेव मंदिर

    पुराणांनुसार ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांपैकी ब्रह्मा ही पहिली देवता आहे. तो ब्रह्मांडाचा निर्माता मानला जातो. पुराणकथांनुसार विश्वनिर्मात्याने सर्वप्रथम ब्रह्मांडिय जल निर्माण केले व त्यात एक बीज टाकले. त्यापासून सोनेरी ब्रह्मांडिय अंडे तयार झाले. त्या अंड्यातून एक हजार वर्षांनी सृष्टीकर्त्याने स्वतः ब्रह्माच्या रूपात जन्म घेतला.

  • अंबाजोगाईची योगेश्वरी

    अंबाजोगाई बीड जिल्ह्यातील एका तालुक्याचे गाव म्हणजे भाविक भक्तांचे स्थान जगन्माता योगेश्वरी होय. देवीच्या स्थापनेचा कालावधी पुरातन असून याविषयी ऐतिहासिक उल्लेख प्राचीन शिलालेखात असलेल्या जोगाईचे माहेर या ठिकाणी आढळतो.

  • श्री हरिहरेश्वर मंदिर

    हिरवीगार वनराई, निळाशार समुद्र आणि रुपेरी वाळूच्या किनाऱ्यावर असलेले श्रीवर्धन तालुक्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथे महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. पेशव्यांचे कुलदैवत असलेले हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाची ‘दक्षिण काशी’ म्हणून ख्याती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सरखेल कान्होजी आंग्रे आणि पेशवे घराण्यातील अनेकांनी येथे दर्शन घेतल्याच्या नोंदी आहेत.

  • वणीची सप्तशृंगी

    महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेल्या वणी गावानजीक सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीचे निवासस्थान आहे. या गडाला म्हणजे डोंगराला सात शिखरे असल्यामुळे त्याला सप्तशृंग अथवा वणीचा डोंगर म्हणतात. राम-रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान संजीवनी वृक्षाने बहरलेला द्रोणागिरी पर्वत उचलून आणीत असता त्यातला एक शिलाखंड जिथे पडला तोच हा सप्तशृंगीचा डोंगर आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.

  • बारादेवी मंदिर, परळ व्हिलेज, मुंबई

    1931 साली परळ ते शिवडी रस्ता बांधण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले. त्या वेळेस एक अत्यंत आश्चर्यकारक अशी मूर्ती या उत्खननात सापडली. या मूर्तीचा निर्मितीकाळ हा इसवीसन पाचवे ते सहावे शतक असा आहे. म्हणजेच भारताचा सुवर्णकाळ म्हणून गणलेल्या गुप्त काळातील ही मूर्ती आहे.

  • कार्ल्याची एकवीरा

    मंदिराचे दाराशी एका कमानीला नऊ लहान मोठ्या घंटा टांगलेल्या आहेत. त्यांपैकी एका घंटेवर १८५७ असा आकडा कोरला आहे. अर्थात तो इंग्रजीत असून घंटेचा आवाज लोकांना आकर्षित करतो. देवीच्या सभामंडपावर एक शिलालेख दिसून येतो तो असा की एकवीरा देवीचे जुने मंदिर मुंबईचे नागा पोसू वरळीकर आणि हरिप्पा चरणवीर यांनी बाबूराव कुलकर्णी यांच्या मदतीने इ. सन १८६६ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला.

  • मुंबईची महालक्ष्मी, गव्हर्नर हॉर्नबी आणि दादाजी धाकजी

    सात बेटांची मुंबई एकसंध नव्हती. इथे व्यापार वाढूच शकला नसता. सर्वत्र माजलेली दलदल, सुकत घातलेली मासळी, त्यापासून बनविला जाणारा खताचा कुटाणा,अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि कीटक, भरतीबरोबर खाऱ्या पाण्याने भरून जाणारी सातही बेटे, सतत चिखल यामुळे इथे जमिनीवरून मोठी वाहतूक करणे शक्य नव्हते.

  • जे. कृष्णमुर्ती

    जे. कृष्णमूर्ती यांनी कोणतेही धार्मिक ग्रंथ वाचले नव्हते भगवद्गीता, वेद उपनिषदे, बायबल, कुराण या धार्मिक ग्रंथात कोणता उपदेश सांगितला आहे हे त्यांना माहित नव्हते आणि त्यात त्यांना रसही नव्हता. परंतु भारतीय वेदांतशास्त्रातील अद्वैत दर्शनात प्रकट झालेले चिंतन आणि कृष्णमूर्तींचे चिंतन यात विलक्षण साम्य आढळते असा तत्वाज्ञानाच्या अभ्यासकांचा अभिप्राय आहे.

  • श्री सुवर्ण गणेश मंदिर, दिवेआगर

    श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक निसर्गसमृद्ध व टुमदार गाव. हे गाव प्रसिद्ध आहे ते येथील विस्तीर्ण, स्वच्छ व सुंदर समुद्रकिनाऱ्यामुळे! याच दिवेआगरची एक वेगळी ओळख निर्माण झाली ती येथील सुवर्ण गणेश मंदिरामुळे! नोव्हेंबर १९९७ मध्ये येथे सुमारे १३२० ग्रॅम वजनाचा गणेशाचा सोन्याचा मुखवटा आणि २८० ग्रॅम वजनाचे गणेशाचे दागिने जमिनीत खोदकाम करताना सापडले आणि दिवेआगर संपूर्ण राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आले.

  • श्री दत्तात्रय संप्रदाय

    अत्रि – अनुसूयानंदन प्रभू श्रीदत्तात्रेय महाराजांनी जगदुध्दारासाठी श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती, श्रीमाणिक प्रभू आणि अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ असे चार अवतार धारण केले. ‘विश्वगुरु’ म्हणून उपनिषदकारांनी गौरविलेल्या प्रभू दत्तात्रेयांच्या महान संप्रदायाचे प्राचीनकालापासून चालत आलेले लोकोदाराचे व वैदिक धर्मरक्षणाचे कार्य ज्या चार दत्तावतारांनी पुढे चालविले, त्यांची ओळख करून घेण्यापूर्वी आपण दत्तसंप्रदायाची थोडक्यात माहिती करून घेऊ.