वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
संपूर्ण जगात सर्व गुण संपन्न,सर्व श्रेष्ठ पुरुष श्रीरामचंद्र होऊन गेलेतं. रामांनी आपल्या सद्विचार, सद्वर्तन, सदाचार, सद्- व्यवहाराने पूज्य स्थान प्राप्त केले आहे. राम उत्तम पुत्र, उत्तम बंधू, उत्तम मित्र, उत्तम राजा, उत्तम पति, मातृभक्त, पितृभक्त, कर्तव्यकठोर, सत्यप्रतिज्ञ पुरुष होते. एक बाणी, एक वाणी, एकवचनी, एक पत्नी व्रताचे रामांनी आजीवन पालन केले. आदिकवी वाल्मिकींनी राम जसा थोर, आदर्श आहे लिहिले तसाच तो एक मानवही आहे.

कवडी (संस्कृत: कपर्दिका; इंग्रजी: Cowry) हे समुद्रात सापडणारे, एका प्रकारच्या गोगलगाईचे कवच आहे. याचा वापर नाण्याचा शोध लागण्यापूर्वी चलन म्हणून होत असे. तसेच सारीपाट, चौसर इत्यादी खेळांमधे याचा वापर डाव टाकण्यास करण्यात येत असे. साधू-बैरागी-वासुदेव कवडीच्या माळा गळ्यात घालतात. गाई, बैल, घोडे, म्हशी इत्यादींच्या सुशोभनासाठी कवडयांचा वापर करण्यात येतो.
जुन्या काळी कवडीचा उपयोग नाणे म्हणून करीत असत.
'एक फुटकी कवडीपण देणार नाही' अनेकांना बोलताना ऐकलं असेल यामधील फुटकी कवडीची किंमत किती?
अनेकदा लोक रागाने किंवा तिरस्काराने असं म्हणतात. पण या म्हणीचा खरा अर्थ आहे का? असा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय? फुटी कवडी म्हणजे नक्की काय किंवा या कवडीची काही किंमत आहे का? असा कधी प्रश्न उपस्थीत झालाय? आज आम्ही तुम्हाला जुन्या काळात विनिमय प्रणालीमध्ये वापरल्या जाणार्या चलनांबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे. यामध्ये एक रुपया कसा तयार होतो किंवा रुपयापेक्षा आणखी कशाची किंमत होती किंवा काय चलनात होतं, याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. वास्तविक, जुन्या काळात फुटी कवडी हा सर्वात लहान चलन होता. आजच्या जगात, सर्वात लहान रक्कम म्हणजे एक रुपयाचे नाणे. त्याचप्रमाणे भारतीय इतिहासातील सर्वात लहान चलन हे कवडी होते. प्राचीन भारतीय चलनांचा इतिहास खूप जुना आहे.
तुम्हाला एका पैशाचा अर्थ माहित आहे का?
प्राचीन इतिहासात, सर्वात लहान चलन म्हणजे फुटी कवडी. तीन फुटी कवडीची मिळून एक कवडी होते. त्यानंतर दहा कवडी मिळून एक दमडी तयार होते. एवढेच नाही तर दमडीवरही मुद्रा होत्या. दोन दमडींची मिळून एक धेला होतो. तुम्ही अनेकवेळा लोकांना हे देखील बोलताना ऐकलं असेल की ‘तुला दमडीचीही किंमत नाही’ किंवा ‘दिड दमडीचा तू’. या शब्दात वापरली जाणारी दमडी ही अशी वरील प्रमाणे तयार होते. या चलनाबद्दल आणखी जाणून घेऊ
3 फूटी कवडी = 1 पूर्ण कवडी, 10 पूर्ण कवडी = 1 दमडी, 10 दमडी = 1 धेला, 1.5 ढेला = 1 पाई, 3 पाई = 1 जुना पैसा, 4 जुने पैसे = 1 आना, 16 आणे = 1 रुपया. या हिशेबानुसार तेव्हा एक रुपयासाठी तब्बल १०,२४० कवड्या मोजाव्या लागत असत, तर ३० हजार ७२० फुटक्या कवड्या मोजून रुपयाच्या मूल्याची प्रतिपूर्ती होत असे.
मात्र, काळानुसार गोष्टीही बदलल्या. आता बाजारात सर्वात कमी किंमत फक्त 1रुपयाची आहे. चलनाचा हा इतिहास सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कौडी, दमडी, धेला अजूनही तुम्हाला काही दुकानात पाहायला मिळतील, ज्याची किंमत आजच्या काळात खूप जास्त आहे. ती ऐतिहासिक वस्तू असल्यामुळे त्याला जास्त मान आणि महत्व आहे.
कवडी म्हणजे काय?
मृदुकाय (मॉलस्का) संघातील उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गातील एक सागरी प्राणी. कवडी ही संज्ञा कवच असलेल्या जिवंत प्राण्यास आणि प्राणी मेल्यानंतर त्याचे राहिलेले कवच या दोन्हींसाठी वापरतात. उदरपाद वर्गात शंखाच्या आणि बिनशंखाच्या गोगलगायींचा समावेश होतो. कवडी हा शंखाच्या गोगलगायींचा एक प्रकार आहे. यांच्या सु. २०० जाती आहेत. हिंदी महासागर व पॅसिफिक महासागराच्या उष्ण प्रदेशांत हे प्राणी मुबलक प्रमाणात आढळतात. ते प्रवाळ भित्तीबरोबर राहतात. या क्षेत्रात जास्त आढळणार्या कवडी प्रकाराचे शास्त्रीय नाव सायप्रिया मोनेटा असे आहे. सामान्य इंग्रजीत त्याला मनीकौरी म्हणतात. याचे कारण आफ्रिका, भारत इत्यादी देशांत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत चलन म्हणून या गोगलगायींच्या कवचांचा वापर केला जात असे.
कवचाच्या आत या गोगलगायीचे मऊ, लिबलिबीत शरीर असून त्याचे डोके, पाद, अंतरंग आणि प्रावार (त्वचेसारखे आवरण) असे भाग असतात. प्रावाराची कड झालरीसारखी असून त्यावर संस्पर्शके असतात. कवच प्रावाराने अर्धवट किंवा पूर्णपणे झाकलेले असते. कवचाची वाढ होत असताना दोन्ही कडा आत वळून कवचाचा पीळ जवळजवळ झाकून टाकतात. त्यामुळे इतर गोगलगायींत असलेला कवचाचा पीळ त्यात दिसत नाही. कवचाच्या खालच्या बाजूस एक लांब आणि रुंद फट असून कवचाच्या कडांवर दातांसारखी संरचना दिसते. कवडी प्राणी मुख्यत: शाकाहारी असून शैवाल व स्पंज यांच्यावर रात्रीच्या वेळी उपजीविका करतो.
कवड्यांचे प्रकार किती व कोणते?
तसे पाहता बय्राच रंगाच्या व आकाराच्या कवड्या असतात.परंतु पुजे मधे अथवा देवी शृंगारांमधे काही विषेश कवड्यांचा समावेश होतो.
1)महालक्ष्मी कवडी (कवडीवर तपकिरी रंगाचे ठीपके.)
2)आंबिका बट कवडी (खडबडीत व पिवळसर रंगाची )
3)येडेश्वरी कवडी (राखाडी रंगावर हलकेसर पिवळसर छटा )
4.यल्लम्मा कवडी (शुभ्र व दुधासमान निश्कलंक )
कवडीचे उपाय: पूर्वीच्या काळात पैशे म्हणून वापरली जाणाऱ्या कवडीला आताच्या काळात खूप मोल नसले तरी तुमच्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरते. वास्तुशास्त्रानुसार कवडीचा विशिष्ट पद्धतीने वापर केल्यास आर्थिक समस्या दूर होऊ शकतात.
समुद्रात सापडणारी कवडी ही छोटीशी वस्तू आहे. मात्र ती खूप कामाची असते. पूर्वीच्या काळात कवडीचा वापर पैसे म्हणजेच आर्थिक व्यवहारात केला जात होता. आता कवडीचा उपयोग सजावटीसाठी केला जातो.
कवडीचे धार्मिक महत्व:
मात्र असे असले तरी ज्योतिषशास्त्रात आजही कवडीला मोठी किंमत आहे. विविध धार्मिक कार्यात कवडीचा उपयोग केला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार धन प्राप्तीसाठी कवडीचा उपयोग केला जातो. कवडीला माता लक्ष्मीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळं महालक्ष्मीची पूजा करताना पूजेच्या साहित्यात कवडीचा अवश्य समावेश केला जातो. धार्मिक ग्रंथानुसार देवी महालक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती समुद्र मंथनात झाली होती. त्यामुळे कवडी ही धन आपल्याकडे आकर्षित करते असे सांगितले जाते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात कवडीशी संबंधित अनेक उपाय सांगितले जातात.
चला तर मग जाणून घेवूया कवडीचे उपाय…
1. ज्योतिषशास्त्रानुसार, कवडीचा उपाय शुक्रवारी करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. शुक्रवारी पिवळ्या कवड्या महालक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमेसमोर ठेवा. सायंकाळी कवड्यांची पूजा करावी. पूजेनंतर कवड्या दोन भागात विभाजित कराव्या. लाल रंगाच्या कापडात त्या बांधाव्या. एक पोटली कपाटातील तिजोरी कर दुसरी पोटली पर्समध्ये ठेवावी. तुम्हाला आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही.
2. नोकरीची शोध घेत आहात? अनेक अडचणी येत असतील तर तुम्ही कवडीचा उपाय करू शकतात. 11 कवड्या घ्या. त्या एखाद्या मंदिरात अर्पण करा. त्यापैकी 7 कवड्या लाल रंगाच्या कापडात बांधा. इंटरव्यूला जाताना कवड्यांची पोटली सोबत ठेवावी.
3. अकरा कवडीचा उपाय तुम्ही घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी देखील करू शकतात. 11 कवड्या घ्या. त्या लाल रंगाच्या कापडात बांधून ती पोटली घराच्या मुख्य दरवाज्यात लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून घराच्या मुख्य दारावर लटकून ठेवा. ह्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते व घरात सुख समृद्धी नांदते अशी धारणा आहे.
4. दृष्ट लागण्यापासून घरातील सदस्यांचे रक्षण करण्यासाठी कवडीचा वापर केला जातो. वास्तुशास्त्रानुसार वाईट नजरेपासून रक्षण करण्यासाठी पिवळ्या रंगाची कवडीचे ताईत बाधूंन हातावर परिधान करा. असे केल्याने वाईट नजरेपासून संरक्षण मिळते असे मानले जाते.
5. आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी शुक्रवारी पांढर्या रंगाची कवड्या घ्या आणि त्यात पांढरे केशर आणि हळद भिजवा. यानंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात असे मानले जाते.
6. ज्योतिष शास्त्रामधील उपायांनी भाग्य बाधा दूर होऊन प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. याप्रकारची एक वस्तू आहे पिवळी कवडी. मान्यतेनुसार पिवळी कवडी महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि याच कारणामुळे लक्ष्मी पूजेमध्ये कवडीचे विशेष महत्त्व आहे.
शिव पार्वती सारीपाट खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले त्यानी जगदंबा मातेच्या हातातील कवडीकडे पाहताच प्रश्न केला की माते या कवडीत असे काय आहे की ही आपणास एवढी प्रिय आहे? जिच्या निर्णयासमक्ष साक्षात महादेव हरवता आहात आपण? त्यावर महादेवीनी सारीपाटावरील एक कवडी नारदमुनींच्या हाती देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणून देण्यास सांगितले. नारद मुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन इंद्र देवांच्या दरबारी पोहोचले. तिथे कवडीतूल्य धन मागताच सर्वप्रथम चंद्र देवांनी व देवेंद्राने विनोदमय हास्य केले. कुबेराने छोटा तराजू घेऊन एका पारड्यात कवडी व दुसर्या पारड्यात द्रव्य टाकले. पारडे समतोल होईना. तराजु विशाल झाला कुबेर भांडार खाली झाले. पण कवडीतूल्य धन होईना देवता गणांनी मनोमन क्षमा मागून देवराज इंद्राने स्वत:चा मुकुट देखील पारड्यात टाकला किंतु जगदंबेच्या एका कवडीला तोलेल एवढे धन पर्याप्त नाही झाले. देवराज इंद्रासह सर्व देव शिव-शक्ती समीप आले. अपराध क्षमापन केले. या अपराधाच्या क्षमापने प्रित्यर्थ इंद्र व चंद्र देवांनी कल्होळ तिर्थाची निर्मिती केली. हेच तुळजापुरातील कल्होळ तिर्थ जे इंद्र व चंद्र देवानी बांधले असुन ब्रम्हदेवांनी पृथ्वीवरील सर्व जलतिर्थांना येथे येण्यास सांगितले या तिर्थांचा एकत्र कल्लोळ झाला तेच हे पवित्र कल्होळ तीर्थ होय. तेव्हापासून कवडीला अपार महत्त्व प्राप्त झाले.
राजे महाराजे कवड्यांच्या माळा परीधान करत असत. कारण कवडी ही सागरातून निघालेली असल्याने रत्नासमान मोत्यासमान मानली जाते. पेशवाई काळातही या कवड्यांच्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असत.
लक्ष्मीपूजन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी पूजन केले जाते आणि तिला महानिषाची रात्र देखील म्हणतात. तांत्रिक पद्धतीनुसार दिवाळीच्या पूजेमध्ये कवडी पूजेसोबत काही उपाय केल्यास धनसंपत्ती वाढते आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. हे उपाय केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वादही कायम राहतो. चला जाणून घेऊया या दिवाळीत करावयाच्या उपाययोजना.
या उपायाने लक्ष्मी मातेची कृपा होईल
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी ५ पिवळ्या कवड्या आणि ९ गोमती चक्रे देवीकडे ठेवा. त्यानंतर पूर्ण विधीपूर्वक लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात कवड्या आणि गोमती चक्र बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी राहते. तसेच लक्ष्मी मातेच्या कृपेने कधीही आर्थिकसंबंधी कोणतीही अडचण येत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू ‘पार्थ पवार यांना आपण कवडीचीही किंमत देत नाही’ असे म्हटल्यानंतर जवळजवळ विस्मरणात गेलेली कवडी पुन्हा चर्चेत आली आहे. एकेकाळी चलनवलनासह दागिने, देव्हाऱ्यातही आवर्जून असणारी ही कवडी सध्या दुर्मिळ झाली असून, तिला आता मूल्यही प्राप्त झाले आहे, हे विशेष.
मोगल काळापासून म्हणजे इ. स. १५२६ ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे १९४७-४८पर्यंत कवडीचा चलनात उपयोग होत होता. आता कवडीला होलसेलमध्ये दोन रुपये तर किरकोळ बाजारात पाच रुपये किंमत आहे. यानुसार कवडीने २० हजार ते ५० हजार पट जास्त वाढ नोंदवली असून, तिचे मूल्य आता रुपयाच्या पुढे गेले आहे. यानुसार कवडीला किती महत्त्व आहे, हे अधोरेखित व्हावे.
कवडी येते कुठून?
कवडी ही शंख शिंपल्याबरोबरच समुद्रातून शोधली जाते. गुजरात, गोवा, कोकण आदी समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागातून कवडी मुख्यत: धार्मिक स्थळांवर विकायला येते. साधारण चारशे रुपये किलोप्रमाणे ती सध्या मिळते. एका किलोत आकारानुसार दोनशे ते अडीचशे कवड्या बसतात. रामकुंड, त्र्यंबकेश्वर आदी धार्मिक स्थळी शंख-शिंपल्यांबरोबरच कवड्याच्या माळा विकणारे पथारीवाले असतात. व्यक्तीच्या गरजेनुसार व त्याच्या आर्थिक कुवतीनुसार पाच रुपये ते अगदी काळी कवडी असेल तर ५० रुपयांपर्यंतही ती विकली जाते.
शास्त्रीय महत्त्व
शास्त्रीय दृष्ट्या सायप्रिइडी कुलातील सायप्रिया वंशाच्या सागरी गोगलगाईंच्या शंखांना कवडी म्हणतात. कवड्या विविध रंगांच्या, चकचकीत व सुंदर असल्यामुळे शंख-शिंपल्यांचे संग्राहक त्या मौल्यवान मानतात. सारीपाट, चौसर आदी खेळांमध्ये कवड्यांचे महत्त्व होते. म्हणूनच आजही या खेळातील सोंगट्यांना ‘कवड्या’ असेच म्हटले जाते. सोन्याला ज्याप्रमाणे गंज लागत नाही, अगदी तसेच कवडीही कायमस्वरुपी गुळगुळीत, चकचकीत आणि एका आकाराची असल्याने तिचा पूर्वापार दागिन्यांमध्ये वापर केला गेला आहे.
धार्मिक क्षेत्रातही आहे कवडीला महत्त्व
मराठी विश्वकोषातील माहितीनुसार दक्षिण भारतात रेणुका, एल्लम्मा, मातंगी, मरीआई, भवानी, महालक्ष्मी इ. नावांनी गाजलेल्या देवींच्या उपासनाक्षेत्रात कवडीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोंधळी, भुत्ये, पोतराज, मातंगी, जोगती, जोगतिणी हे देवीचे उपासकवर्ग आपल्या अंगाखांद्यांवर कवड्यांचे अलंकार परिधान करतात.
गोंधळ्यांच्या, भुत्यांच्या, मातंगी- जोगतिणींच्या गळ्यांत कवड्यांच्या माळा असतात; भुत्यांचा शंकाकार टोप बाहेरून कवड्यांनी मढविलेला असतो. ते गळ्यातही कवड्यांच्या माळा घालतात.
जोगतिणींच्या ‘जगां’ ना कवड्या गुंफलेल्या असतात. काखेत अडकविलेल्या भंडाराच्या पिशव्यांनाही कवड्या लावलेल्या असतात. मातंगींच्या परड्या कवड्यांनी सजविलेल्या असतात आणि या सर्व उपासकवर्गांच्या कंठातून गळ्यात असलेली देवीप्रतिमा ज्या जाड वस्त्रपटावर जडवलेली असते, तो पटही कवड्या गुंफून शोभिवंत केलेला असतो. प्रत्यक्ष देवालाही कवड्यांचा श्रृंगार प्रिय असल्याची धारणा देवीविषयक लोकगीतांत वारंवार व्यक्त झालेली आहे. तंत्रविद्येतही कवडीला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रातही कवडीला महत्त्वाचे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा कवड्यांची माळ परिधान करीत असत.
विवाहामध्ये कवडीचे स्थान
-आंध्र प्रदेशात विवाहानंतर वधूपित्याला कवडी भेट दिली जाते.
-ओरिसातही रूखवतात कवड्या दिल्या जातात.
-राजस्थानात विवाहप्रसंगी वधू-वराच्या मस्तकी लोंबतील अशा पद्धतीने कवड्या बांधल्या जातात.
-आसाममध्ये वडिलधारी मंडळी नवदाम्पत्यासमोर कवड्यांचा खुळखुळ आवाज करतात.
कवड्यांची माळ तुळजापुरात नवरात्रात आवर्जून घेतली जाते.
(टीप: येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक मान्यतेवर आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी.
मोबा. ९८८१२०४९०४
इ मेल : dkkul@yahoo.com
२६/०७/२०२४
दवणा (Artemisia pallens) ही एक सुगंधी वनस्पती आहे, जी अॅस्टेरेसी (Asteraceae)
कुळातील आहे. याला संस्कृतमध्ये 'दमनक' आणि मराठीमध्ये 'दवणा' असे म्हणतात. ही वनस्पती लहान औषधी वनस्पती किंवा झुडुपांच्या वंशात येते आणि झेरोफिटिक निसर्गात वाढते. जी भारतात तिच्या नाजूक सुगंधासाठी खूप मौल्यवान आहे. देशाच्या बहुतेक भागांमध्ये ती सामान्यतः हार, पुष्पगुच्छ आणि धार्मिक प्रसादांमध्ये वापरली जाते.
दवणा म्हटलं कि सर्वांना जोतिबाच्या डोंगरावर देवाला वाहायला दिलेली लहान वाळलेली अखंड लहान झाडे आठवतात. दवणा सुगंधी तर आहेच मात्र त्याचे धार्मिक महत्वही तेवढेच आहे ... त्यामुळे दवण्याची संस्कृत मधली सगळी नावे अतिशय सात्विक आणि धार्मिक आहेत उदा. तपस्वीपुत्र, पवित्रक, पुंडरीक, ब्रह्मजटी, वामन इत्यादी.
दवना (दवन):-हॉट टच.
कन्नड भाषेतील दवना हे अॅस्टेरेसी (सूर्यफूल) कुटुंबातील आर्टेमिसिया इंडिका विल्ड या वनस्पतीशी ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीचे नाव आहे ज्याचे खालील समानार्थी शब्द आहेत: आर्टेमिसिया इंडिका व्हेर. नेपलेन्सिस, आर्टेमिसिया एशियाटिका.
हिंदी भाषेत दवना [दवना] हे अॅस्टेरेसी (सूर्यफूल) कुटुंबातील आर्टेमिसिया निलागिरिका (CB Cl.) पॅम्प. या वनस्पतीशी ओळखले जाणारे एक वनस्पती आहे ज्याचे खालील समानार्थी शब्द आहेत: आर्टेमिसिया वल्गारिस आर्टेमिसिया वल्गारिस वर. निलागिरिका. दवणा सह्याद्रीत सर्वत्र आढळतो. मात्र त्याचा वास कडवट असल्याने हाच दवणा म्हणून त्याकडे लक्ष जात नाही. साधारण कॉंग्रेस या तणाशी अत्यंत साधर्म्य असलेली हि वनस्पती आहे पण दवणा थोडा वेगळा असल्याने ओळखता येतो. कापरासारखे एक उडनशील असे तेल दवण्यात असते त्यामुळे तो वाळवलेला दवणा अत्यंत सुगंधी असतो .
दवणा/दमनक ह्याचे २-३ मीटर उंच दाट उगवणारे सुगंधी क्षुप असते. फांद्या अंगठ्या एवढ्या जाड असतात.ह्याची पाने १५-१७ सेंमी लांब व रूंद असतात.पानाच्या मागील पृष्ठावर पांढरी लव असते.
पानांमध्ये आणि फुलांमध्ये आढळणारे आवश्यक (Essential) तेल त्याच्या बारीक आणि नाजूक सुगंधासाठी मौल्यवान आहे आणि उच्च दर्जाच्या सौंदर्यप्रसाधने आणि परफ्यूममध्ये वापरले जाते. एस्टर (६५%), हायड्रोकार्बन्स (दवानाच्या तेलाच्या २०%), आणि ऑक्सिजनयुक्त संयुगे देखील असतात (१५%). दवानाच्या विशिष्ट वासासाठी जबाबदार असलेले मुख्य घटक एस्टर आहेत.
दवनाचे आवश्यक तेल, जे तपकिरी, चिकट द्रव आहे आणि त्याला समृद्ध, फळांचा वास आहे.
दवनाच्या सुगंधी तेलाची किंमत रु. २००० प्रति लिटर आहे. त्यामुळे सध्या शेतकरी याची शेती करण्याकडे वळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय व्यापारात, विशेषतः अमेरिका आणि जपानमध्ये, जिथे ते केक, पेस्ट्री, तंबाखू आणि पेये चवण्यासाठी वापरले जात आहे, बरीच प्रतिष्ठा मिळवली आहे.
चैत्र महिन्यात देवांना दवणा का वाहतात याची कथा-
चैत्र महिन्याच्या पहिल्या पक्षात सर्व देवांना दवणा वाहिला जातो त्या संदर्भात एक कथा सांगितली जाते.
शिवाच्या क्रोधातून कालभैरव प्रगटला, प्रगट होताच त्यानं ब्रम्हदेवांच पाचवं मस्तक तोडले ते त्याच्याच डाव्या हाताला ब्रम्हहत्या होऊन चिकटलं त्यातून गळणारं रक्त प्यायला कुत्री पिशाचं गोळा झाली तर त्यांचा आणि या उग्र बटूच्या भय निर्माण करणाऱ्या रव म्हणजे आवाजामुळे याला भैरव असं नाव मिळालं. साक्षात पितामहांना शासन झाल्यान सगळी सृष्टी घाबरून गेली. भैरवाला आवर घालण्यासाठी विष्णूंनी त्याला शाप दिला सर्वांच दमन करणारा तू वनस्पती होशील तत्क्षणी तो उग्र भैरव उग्र वासाची वनस्पती झाला तोच दमनक अर्थात दवणा ! असा हा भैरव दवणा झाल्यावर विष्णूंनाच दया आली त्यांनी त्याला मूळ रूपात आणून दवण्याला वर दिला आज पासून तू आम्हाला सर्व देवांना प्रिय होशील चैत्र महिन्यात आम्ही तिथीवार तुला धारण करु( उदा तृतीया गौरी चतुर्थी गणपती पंचमी लक्ष्मी षष्ठी कार्तिक-- पौर्णिमा सर्व देव) चतुर्दशी ही तुझी हक्काची तिथी तेव्हा तू स्वत: आणि एकवीरा हा दवणा धारण करा. याला अनुसरून आजही आपण चैत्र महिन्यात देवाला दवणा अर्पण करतो ज्योतिबाच्या पायथ्याशी पन्हाळा तालुक्याचे वैशिट्य म्हणजे फक्त ह्याच तालुक्यात दवण्याची शेती केली जाते. याचे फुल ज्योतिबाला प्रसन्न करण्यासाठी वापरतात /वाहतात. भाविक लोक जसे गणपतीला दुर्वा,महादेवाला बेल वाहतात तसेच ज्योतिबाला दवणा वाहतात. दवणा वाळवून ठेवता येतो. नंतर पाण्यात ठेवला कि तो फुलतो. दवणा खराब होत नाही. ताजा दवणा मार्च - एप्रिल मद्धे मिळतो. महाराष्ट्रात विदर्भ, शनी शिंगणापूर, पुणे जिल्ह्यातही तो आढळून येतो.
दवणा वनस्पतीचा वापर अनेक प्रकारे केला जातो:
धूप आणि सुगंध:
दवणा पानांचा उपयोग धूप म्हणून केला जातो, तसेच गजरा आणि वेणीमध्येही सुगंधित करण्यासाठी वापरतात. वात,पित्त,कफ या त्रिदोषाचे दमन करणारी ही औषधी वनस्पती आहे. दवणा हा सुगंधी,चवीला कडू आणि तिखट आहे. या वनस्पतीपासून बाष्पनशील तेल मिळते,हे तेल दाट व सुगंधी असून ते उच्च प्रतीच्या अत्तरात मिसळतात. तसेच दवण्याचा वापर पुस्तकांमध्ये ठेवण्यासाठी केला जातो.
औषधी गुणधर्म:
दवणा तेलाचा उपयोग सुगंधचिकित्सा (अरोमाथेरपी) मध्ये होतो, तसेच ते आयुर्वेदिक औषध म्हणूनही वापरले जाते.
अन्न आणि पेय:
काही ठिकाणी दवणा पानांचा उपयोग चहा किंवा इतर पेये बनवण्यासाठी करतात.
.
याचे बरेच औषधी उपयोग आहेत.
1) अंगावरून कमी जाणे:-
बऱ्याच भगिनींना अंगावरुन खुप कमी जाते, विटाळ साफ होत नसल्याने, त्यांचा स्वभाव काहीसा चिडचिडा होतो. स्वभावात तापटपणा ही आढळून येतो, तापटपणापाशी हे कारण असेल, याचा विचारही कुणी करत नाही, त्या बि चारा स्त्रीला दोष दिला जातो. काही स्त्री रुग्णात त्याचा अनुभव अशा स्त्रियांना पाळीच्या वेळी अर्धाचमच्या दवना पावडर गरम पाण्याबरोबर दोन वेळा घ्यावी, विटाळ चांगला साफ होतो. सोबत बाकीचे ही औषधे घ्यावी लागतात.
गर्भाशयाच्या बऱ्याच विकारावर, एक चमचा तीळ तेलात, अर्धा चमचा दवणा पावडर द्यावी. वंध्यत्वाच्या रुग्णात, त्याचा चांगला वापर होतो, पाळी साफ झाल्यामुळे, अंडी चांगल्या पद्धतीने फुटली जातात, व लवकरच Good news ही घरात मिळाली जाते.
2) झोप येत नाही:-
उत्तम भूक लागणे, पोट साफ असणे, निद्रा चांगले असणे. या तीन गोष्टी चांगले असल्या तर शरीर चांगले असते. बऱ्याच वयस्कर व्यक्तींना रात्रीची झोप लागत नाही, तऱ्हे तऱ्हेच्या गोळ्या उपयोगी पडत नाहीत. अशांना काही औषधोपचार व सकाळी दवणा पाण्यात भिजवून ते पाणी रात्री घेणे, व रात्री पाण्यात घेऊन सकाळी ते घेणे. दूध खडीसाखर बरोबर घेतले तर छान आराम पडतो.
3) कडकी :-
खाण्यापिण्यातील दोषामुळे, शरीरात खूप उष्णता वाढते, ताप आल्यासारखे वाटते, हुशारी वाटत नाही, हात पाय जळजळ करतात. अशा लोकांची कडकी कमी करण्यासाठी दवणा उपयुक्त पडतो, दूध खडीसाखरेबरोबर तो द्यावा, खूप तापट स्वभाव असलेल्या व्यक्तीस त्याची कडकी कमी करण्यासाठी, बाकीच्या औषधाबरोबर दवनाचे डोस दिल्यामुळे तापटपणा कमी होतो.
4) किरकिर रुग्णाचा अनुभव:-
एका वैद्याचा अनुभव असा आहे: दुनियाभरचे डॉक्टर झाले तऱ्हे तऱ्हेची इंजेक्शन झाले. दुनियाभरच्या तपासण्या झाल्या, "मी बरा आहे "असा एक व्यक्ती म्हणतच नव्हता, मला खूप मोठा आजार झाला आहे. घडीभरात हात दुखते, पोटात दुखते, लघवी साफ होत नाही, पोट जड वाटते डोकं दुखतंय, ना ना लक्षणे तो सांगायचा. माझ्याकडील एक बरा झालेला रुग्ण यांना घेऊन माझ्याकडे आला, थोड्या चर्चेनंतर, दुखरी नस लक्षात घेऊन त्यांना काही औषधांबरोबरच, दवना पावडरही दूध खडीसाखर यातून घ्यायला सांगितले. थोड्याच दिवसानंतर बरीचशी लक्षणेही बंद झाली, रुग्ण छान पैकी दैनंदिन कामे करू लागला, असा हा आपला आयुर्वेद.
5) तोंडाचे आजार:-
बऱ्याच जणांना तोंडात चट्टे पडतात, कधी दातातून रक्त पडते, त्यांनी दवण्या च्या पाण्याने गुळण्या कराव्यात, व दवणा दूध खडीसाखरेबरोबर द्यावा, छान पैकी आराम पडतो. जेव्हा कष्टाचे काम करून माणूस थकतो, तेव्हा दवण्याचा एकदा नक्की प्रयोग करून पहावा.
देवाला ज्या वनस्पती वाहता त्याचे औषधी उपयोग भरपूर आहेत, दवण्याचा नुसता स्पर्श ही तुम्हाला शांत राहण्यास प्रवृत्त करतो, देवधर्म करायला गेलात तर यांची महती जरूर जाणून घ्या, ज्यांच्या अंगात रक्त ही कमी आहे त्यांना काही औषधाबरोबर दवण्याची पावडरही वापरली तर त्याचा गुण येतो. गुराखी गुरांना जखम झाली की दवण्याच्या पाण्याने जखम धुतो व दवण्या ची पट्टी जखमेवर लावतो.
6. विदर्भातील प्रचलीत नाव ''दवणा'' ऊन लागने (sun-strok) साठी राम बाण उपाय, तेथील लोक हे अनेक वर्षांपासून याचा उपयोग सनस्ट्रोक साठी करत आहेत.
7. थोडीशी वनस्पती, बडीशेप,गाठी किंवा खडी साखर पाण्यात भिजत ठेवावे व गाळुन प्यावे. ऊन, हातपाय दुखने, थकवा लगेच जातो.
दवणा मधील रासायनिक घटक:
दवणा (Artemisia pallens) या वनस्पतीमध्ये अनेक रासायनिक घटक असतात, ज्यामध्ये दवनोन (Davanone), दवन इथर (Davana ether), दवना फुरान (Davana furan), आणि लिनूल (Linalool) हे प्रमुख आहेत. या घटकांमुळे दवणा तेलाला विशेष सुगंध येतो.
सेंद्रिय दवना आवश्यक तेलाचे आरोग्य फायदे:
ऑरगॅनिक दवना आवश्यक तेले (Essential oil), जगभरातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी उपचारात्मक आणि आरोग्यदायी फायद्यांसाठी प्रसिद्ध आहेत. सेंद्रिय दवाना विविध कारणांसाठी वापरले जाते जसे की जखमा जलद बरे करणे, सामान्य सर्दी बरे करण्यास मदत करणे आणि थकवा, मासिक पाळीतील पेटके, मळमळ आणि दैनंदिन जीवनात सामान्यतः येणाऱ्या इतर समस्यांशी सामना करणे.
काही प्रमुख आरोग्य फायदे खालीलप्रमाणे आहेत-
१. अँटीमायक्रोबियल गुणधर्म - सेंद्रिय दवाना एसेंशियल ऑइल, हा एक प्रमुख घटक आहे ज्याने अनेक जीवाणू आणि बुरशींविरुद्ध अँटीमायक्रोबियल क्रियाकलापांसह कार्य करण्यासाठी फायदेशीर क्रिया दर्शविली आहे जे व्यक्तींमध्ये विविध रोगांना कारणीभूत ठरतात.
२. दाहक-विरोधी प्रभाव - दावनोन आणि दिवान इथर सारखे दावन तेलातील अनेक प्रमुख घटक, सध्याच्या काळात होणाऱ्या काही प्रमुख आजारांविरुद्ध लढण्यासाठी दाहक-विरोधी गुणधर्म प्रदर्शित करण्यात फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. या आवश्यक तेलाच्या दाहक-विरोधी गुणधर्मामुळे ते स्थानिक आणि सुगंधी दोन्ही परिस्थितीत व्यक्तींच्या दाहक स्थितींना तोंड देण्यासाठी प्रमुख संभाव्य तेलांपैकी एक बनते.
३. अँटिऑक्सिडंट क्रियाकलाप - सेंद्रिय तेलात वरील दिलेल्या अँटिऑक्सिडंट्सची उपस्थिती जगभरातील लोकांच्या दैनंदिन जीवनात तणाव आणि थकवा दूर करण्यास मदत करते. या प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स पेशींच्या आरोग्यात तेलाचे योगदान आणि एखाद्या व्यक्तीला हृदयरोग आणि त्वचेच्या ऍलर्जीचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
४. भावनिक कल्याण - अद्वितीय सुगंध आणि अनेक वेगवेगळ्या सुरकुत्या आणि सुगंधांमध्ये मिसळण्याची त्याची क्षमता सर्व परफ्यूम उद्योगांसाठी अद्वितीय बनवते. या प्रकारचे सुगंध आणि सुरकुत्या तणाव, चिंता आणि चिंताग्रस्त ताण हाताळण्यासाठी फायदेशीर आहेत आणि अरोमाथेरपी आणि स्पामध्ये वापरल्यास मूड वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी देखील वापरले जातात. दवाना आवश्यक तेलात उपलब्ध असलेले हे अँटीऑक्सिडंट्स शांत आणि आरामदायी वातावरणाची भावना वाढविण्यासाठी वापरले जातात.
५. मासिक पाळीला आधार -
समृद्ध गुणधर्म असलेले दवाना तेल हे जगभरातील महिलांच्या मासिक पाळीच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी शतकानुशतके पारंपारिकपणे वापरले जात आहे. दवाना हे विविध स्वरूपात प्राचीन काळापासून महिलांच्या मासिक पाळीच्या आरोग्यावर उपचार करण्यासाठी वापरले जात आहे ज्यामुळे त्यांना आरामदायी वातावरण मिळते आणि त्यांना यश मिळते. तेलाचे समृद्ध गुणधर्म मासिक पाळीच्या दरम्यान पेटके बरे करण्यास आणि महिलांना निरोगी राहण्यास मदत करतात.
६. कामोत्तेजक गुणधर्म -
तेलाच्या गोड आणि फळांच्या सुगंधासाठी जबाबदार असलेले हे घटक कामोत्तेजक गुणधर्म असल्याचे मानले जाते, ज्यामुळे वेगवेगळ्या आवडी आणि गरजा असलेल्या व्यक्तींसाठी सुगंध आणि मसाज तेलांच्या विविध नोट्स तयार करण्यासाठी ते सर्वात लोकप्रिय पर्यायांपैकी एक बनते.
७. दवण्याचा सुगंधी पदार्थात पुष्कळ उपयोग होतो.
दवण्याची झाडे घराच्या आसपास लावल्याने घरात सर्प येत नाहीत. दवणा तिखट, शीतळ, कडू, तुरट, व सुगंधी असून कुष्ठ, कंडू, संग्रहणी व ग्रहपीडा यांचा नाश करतो. सर्पाच्या विषावर दवण्याच्या मुळ्या व पाने देतात अगर त्याचा रस काढून देण्यात येतो. गुरांसहि हे औषध दिल्यानें गुण येतो. गर्मीवर दवणा, व मरवा यांचा सर काढून प्याला असतां गुण येतो.
चंदन व दवणा यांच्यात शीतलता देण्याची क्षमता सारखीच असली, तरी चंदन फक्त ओले असतांनाच शीतलता देऊ शकते, तर दवणा दिवसभर शीतलता देऊ शकतो.
असा हा दवणा ज्याची माहिती खूप जणांना नसते पण त्याचे अध्यात्मिक व औषधी महत्व निर्विवाद आहे.
संदर्भ:
डॉ. विलास जगन्नाथ शिंदे यांचा लेख
प्रमोद तांबे यांचा लेख
गुगल वरील अनेक लेख व माहिती.
सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
२८.०५. २०२५
श्रावण महिना घेऊन येतो आनंद, उत्साह आणि जगण्याची नवी उमेद. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण उत्सवाच्या निमित्ताने सर्वांसह मिळून आनंदाने घालवायला असे सण समारंभ नक्कीच हवे असतात. वर्षभराची ऊर्जा देणारा हा श्रावण महिना आरोग्य,पर्यावरण,संस्कृतीचा सर्वांगीण विचार करणाराच आहे असे म्हणता येईल.
प्रभु श्री राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूरपासून ५५ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे.
श्री कौपीनेश्वर मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर ठाणे शहराचे एक भूषण आहे. मासुंदा तलावाच्या पूर्वेला हे मंदिर उभे आहे. मुंबई गॅझेटिअर (ठाणे) पान क्र. ३५४ वर या मंदिराविषयी माहिती मिळते. त्यातील वर्णनाप्रमाणे हे ठाण्यातील सुप्रसिद्ध मंदिर सर्वात मोठ्या म्हणजे चौतिस एकर भूभाग व्यापणाऱ्या ठाण्यातील प्रसिद्ध मासुंदा तलावाच्या पूर्वेच्या काठी उभे होते.
चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातीचा इतिहास हा मुख्यतः स्थलांतराचा इतिहास आहे. इ.स. १३०५ मध्ये मांडवगडच्या पतनानंतर महाराष्ट्रात मुख्यतः कोकण आणि मावळ प्रांतात जी कायस्थ प्रभु कुटुंबे स्थलांतरित झाली त्यांनी ते रहात असलेल्या परिसरातच अध्यात्मिक आधार शोधायचा प्रयत्न केला.
ब्रह्मा-विष्णू-महेशाच्या या मूर्ती सुबक असून त्या एकाच कलाकाराने कोरलेल्या दिसून येतात.
भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागते. त्यावरील शिल्प हेमाडपंती असून तिथे नारदमूर्तीचे दर्शन घडते. पुढे गेल्यानंतर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर ब्रह्मदेवाने जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली, तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तीर्थास धाऊन आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला.
श्री महालक्ष्मी देवीच्या नित्य निवासाने पुनित झालेले महाराष्ट्रातील महाक्षेत्र करवीर वा कोल्हापूर या नावाने ओळखले जाते. हे क्षेत्र प्राचीन शक्तिपीठ असून पुराणमताप्रमाणे याला १०८ कल्पे झाली आहेत. अठरा पुराणांपैकी काशीखंड, पद्मपुराण, देवीभागवत, हरिवंशपुराण, स्कंदपुराण आणि मार्कंडेय पुराणात करवीर क्षेत्राचा उल्लेख सापडतो.
Copyright © 2025 | Marathisrushti