वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
रोजच्या जेवणात असलेल्या तिखट पदार्थात सर्वांना आवडणारा एक चटपटीत आंबट तिखट पदार्थ म्हणजे चटणी.
ही चटणी बहुगुणी औषध आहे. जिरे, मिरी, मिरची, हिंग, कढीपत्ता, चिंच, पुदीना, कोथींबीर या पैकी कोणत्या तरी पदार्थाने नटलेली सजलेली, रंगीबेरंगी चटणी रोजच्या जेवणात असावी. सुकी किंवा ओली कशीही असली तरी चविष्ट लागते. म्हणजे इष्ट चवीची !
डाव्या हाताला असणारी चटणी मधे मधे खाल्ली की उजव्या बाजूच्या इतर पदार्थांची रूची पण आपोआपच वाढत असते.
लसूण, शेंगदाणे, तीळ, नारळ, जवस, कारळे, कांदा यापैकी ( म्हणजे आठवड्यातून दरदिवशी एक कोणत्याही वेगळ्या प्रकारची चटणी केली तरी) त्यातील मुख्य पदार्थ हा एक प्रकारची तेलबी असते.
या बिया आणि इतर वेगवेगळे मसाले कुटले कि त्यातील तेल बाहेर येते. त्यात मीठ घालून ढवळले की, चटणी तयार. यात कुटण्याची पद्धत महत्वाची.
मिक्सरमधून बारीक वाटून होते, पण कुटण्याचा संस्कार होत नाही. संस्कार बदलला कि परिणाम बदलतात, चवही बदलते.
मिक्सर आणि पाटा वरवंटा वापरून केलेल्या चटणी किंवा वाटपामधे फरक पडतोच ना ! मिक्सरमध्ये ब्लेडच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे पाडणे आणि वरवंट्याचा घाव घालून पाट्यावर रगडणे या दोन्ही कृतीतून तेलबीयांमधले तेल बाहेर पडल्यामुळे चवीतही फरक पडतो. म्हणून संस्कार महत्वाचा !
चटणीला चव येण्यासाठी वापरला जाणारा मसाला कच्च्या स्वरूपातच वापरला जातो. हे उघड सत्य आहे.
हे फक्त लक्षात आणून देतो की, चटणीमधले तेल आणि मसाले कच्च्या स्वरूपात वापरले जातात, तर भाज्या या सुसंस्कारीत करून खाल्ल्या जातात. भाज्या कच्च्या नाहीत, मसाले भाजून नाहीत, तर ते जास्त औषधी.
मसाला टिकवण्यासाठी किंवा नीट कुटला जावा, यासाठी तो भाजला जातो. तो परत परत भाजला तर त्यातला दळ, वास, तेल, आणि औषध निघून जाते. पूड होण्यासाठी किंचित गरम करणे इथपर्यंत ठीक आहे, पण खमंग वास आणि परत तेल सुटेपर्यंत भाजणे, म्हणजे त्यातील अंगभूत औषध उडवून लावल्यासारखं आहे. हे निमंत्रित केलेल्या पाहुण्याला, घराच्या दारात आल्यावर, आम्ही आता शिनिमाला जातुय, *तू आता परत जा, असे सांगण्यासारखेच झाले.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
12.11.2016
November 12, 2016
अमेरिकेतील स्यान फ्रान्सिस्को ( San Francisco ) ते स्यान ओजे ( San Jose ) या ८० मैलांच्या पाट्याला ' बे अरिया' ( Bay Area ) असे म्हणतात. हाच एरिया अख्या जगामध्ये ' सिलिकॉन व्ह्याली' म्हणून ओळखला जातो. कॉम्पुटर, हार्ड वेअर, सोफ्ट वेअर ( Soft Ware ) आणि आय. टी. इंडस्ट्रीची ही मक्का म्हणून ओळखली जाते.या खेत्रातील १५० प्रमुख कंपन्यांची मुख्यालये ( Head Quarters ) याच भागात आहेत. यामध्ये इंटेल (Intel ), Apple , गुगल ( Google ), याहू (yahoo ), Oracle , सिस्को ( Cisco ), एच. पी. ( H.P. ),सन मायक्रो ( Sun Micro ), फेसबुक ( Face book ), Twitter , यु ट्यूब ( You Tube ), या प्रमुख कंपन्या आहेत. IBM, डेल (Dell), Microsoft या प्रमुख कंपन्या या भागातील नाहीत. पण या भागाचे महत्व ओळखून व या भागात आपला प्रेझेन्स असावा म्हणून या कंपन्यांनी सिलिकॉन व्ह्याली मध्ये आपली ऑफिसेस थाटली आहेत.
सिलिकॉन व्ह्याली हे एक अजब रसायन आहे. उद्योग व्यवसायातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी येथे घडत असतात.अनेक नवीन उत्पादनाबरोबरच अनेक नवीन कल्पना, नवीन विचार, नवीन परंपरा यांचा जन्म येथे होत असतो.
पहिली गोष्ट म्हणजे येथील बहुतेक प्रमुख कंपन्यांचे संस्थापक हे शाळा- कॉलेजमधील ड्रोप आउट झालेले किंवा शिक्षण पूर्ण न केलेले आहेत. त्यातील बहुतेक जण गरीब- मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेले आहेत. बहुतेक जणांना उद्योग व्यवसायाची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. असे असूनही आज ही मंडळी प्रसिध्धीच्या झोतात आहेत. यातील कित्येक जणांची नावे जगातील अब्जाधीश व्यक्तींच्या यादीत झळकली आहेत. बहुतेकांनी अगदी तरुण वयातच हे यश संपादन केले आहे. खालील यादी बघा.
बिल गेट्स ( Bill Gates ) :- हार्वर्ड मधला ड्रोप औट. Microsoft ची स्थापना. श्रीमंत क्र. २. संपत्ती ५६ अब्ज डॉलर्स म्हणजे २४७५ अब्ज रुपये. वय ५५ वर्षे.
लेरी अलीसन ( Larry Ellison ) :- युनिवर्सिटी ऑफ इलिनॉय ( Illinois ) आणि युनिवर्सिटी ऑफ शिकागो ( Chicago ) मधून ड्रोप औट. Oracle ची स्थापना. श्रीमंत क्र.५. संपत्ती ३९.५ अब्ज डॉलर्स म्हणजे १७७५ अब्ज रुपये. वय ६६
स्टीव जॉब्स ( Steve Jobs ) :- रीड कोलेज ( Reed College Portland ) मधून ड्रोप औट. Apple ची स्थापना. श्रीमंत क्र.११०. संपत्ती ८.३ अब्ज डॉलर्स म्हणजे ३८२.५ अब्ज रुपये. वय ५६.
मार्क झुकेरबर्ग( Mark Zuckerberg ) :- हार्वर्ड मधून ड्रोप औट. Face book ची स्थापना. श्रीमंत क्र.५२. संपत्ती १३.५ अब्ज डॉलर्स म्हणजे ६०७.५ अब्ज रुपये. वय २७
जेरी यांग ( Jerry Yang ) आणि डेव्हिड फिलो ( David Filo ):- दोघेही Stanford युनिवर्सिटी मध्ये पी. एच डी. करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Yahoo ची स्थापना.
जेरी यांग( Jerry Yang )-श्रीमंत क्र.९३८. संपत्ती १.३ अब्ज डॉलर्स म्हणजे ५८.५ अब्ज रुपये. वय ४२.
डेव्हिड फिलो ( David Filo )- श्रीमंत क्र.८७९. संपत्ती १.४ अब्ज डॉलर्स म्हणजे ६३ अब्ज रुपये. वय ४५
सर्जी ब्रिन ( Sergey Brin ) आणि ल्यारी पेग ( Larry Page ) :- दोघेही Stanford मध्ये पी. एच डी करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Google ची स्थापना
सर्जी ब्रिन ( Sergy Brin )- श्रीमंत क्र.२४. संपत्ती १९.८ अब्ज डॉलर्स म्हणजे ८९१ अब्ज रुपये. वय ३८.
ल्यारी पेग ( Larry Peg )- श्रीमंत क्र.२४. संपत्ती १९.८ अब्ज डॉलर्स म्हणजे ८९१ अब्ज रुपये. वय ३७
दुसरी गोष्ट म्हणजे यातील बहुतेक कंपन्या या अत्यल्प भांडवलावर, ग्यारेजेस मध्ये सुरु केलेले अती अल्प लघु उद्योग ( Very Small Scale Industry ) आहेत. आज याच कंपन्यांचे रुपांतर जगातील मोठ्या, प्रतीष्टीठ, दर्जेदार आणि बलाढ्य कंपन्यांमध्ये झाले आहे. बीझिनेससाठी शाळा कॉलेजमधील शिक्षण पूर्ण करणे आवश्यक असतेच असे नाही. तुमच्याकडे जर चांगला बिझिनेस प्लान किंवा कल्पना असेल तर शाळा कोलेजच्या शिक्षणात वेळ घालविण्यात काही अर्थ नाही. कारण हे शिक्षण जरूर भासल्यास तुम्ही नंतर केव्हाही पूर्ण करू शकता. अशी येथील विचार धारा आहे.
माणसाच्या क्वालिफिकेशन, डिग्री, परीक्षेतील मार्क, टक्केवारी, ग्रेड या पेक्षा त्याचा ' Talent ' महत्वाचा! त्याच्या 'पास्ट पर्फोर्मंस ' ( Past Performance ) पेक्षा तो 'फ्युचर 'मध्ये काय करू शकतो हे महत्वाचे. त्याची traditional पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करायची कुवत किती हे महत्वाचे. त्याला किती नवीन कल्पना सुचू शकतात हे महत्वाचे. सिलीकोन व्ह्यालीमधील बोझीनेस हा पाया आहे. म्हणूनच हा भाग जगातील Technology व Talent चा हब ( Hub ) म्हणून ओळखला जातो.
परंतु तेथील बिझिनेस या एवढ्याच क्वालिफिकेशन वर यशस्वी झालेले नाहीत. वरील लोकांमध्ये आहे तो धृढ आत्मविश्वास. स्वतःच्या क्षमतेवर आणि कर्तुत्वावर असलेला पूर्ण विश्वास! आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा आपले उत्पादन/ कल्पना/ आयडिया जास्त चांगली आहे या विषयी असलेली अतूट श्रद्धा! आणि कांहीतरी वेगळे, 'हटके', नवीन करण्याची प्रबळ इच्छा आणि तळमळ. या मुळेच हे बिझिनेस एवढे मोठे होऊ शकले.
माणसाच्या Talent वर त्याला प्रगतीची संधी देणारा हा भाग आहे. या मध्ये जात, पात, लिंग भेद, कातडीचा रंग या गोष्टी आड येवू नयेत याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे अख्या जगातले Talented तरुण सिलीकोन व्ह्यालीकडे आकर्षित झाले नसतील तरच नवल! आज सिलीकोन व्हालीमध्ये जेवढे फोरीन वर्कर्स काम करतात तेवढे जगात कुठेच आढळून येत नाहीत. तसेच त्यांच्या जेवढी विविधता दिसून येते तेवढी जगात दुसरीकडे कोठेच आढळून येणार नाही. या मध्ये हेस्प्यानिक ( म्हणजे mexico तून आलेले व Spanish मातृ भाषा असलेले ) लोक सर्वात जास्त आहेत. त्यानंतर आशियाई लोकांची संख्या आहे. यामध्ये चीनी आणि भारतीय लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर जपानी, कोरियन, तैवानीज, Vietnam मधून आलेले लोक, फिलिपिनो यांची संख्या आहे. त्यानंतर इतर देशातून आलेल्या लोकांची संख्या आहे. आज सिलिकॉन व्ह्यालीमधील ४६ % लोकसंख्या परदेशातून आलेल्या लोकांची आहे. त्या मुळे तेथे खऱ्या अर्थाने जागतिक संस्कृतीचे दर्शन घडते. तसेच भारतातील अनेक राज्यातील लोक तेथे गेले आहेत. त्यामुळे तेथे मिनी भारत दर्शन घडते.
व्यवस्थापन क्षेत्रात या विभागावे अनेक नवीन कल्पना अमलात आणल्या, अनेक नवीन पायंडे पडले. येथे अगदी वेगळ्या प्रकारच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे लक्षात आल्यावर मुलाखतीच्या तंत्रामध्ये ( Interview Techniques ) अमुलाग्र बदल करण्यात आले. हल्ली मुलाखतीमध्ये कोडी ( Puzzles ) विचारण्याची पध्धत बर्याच ठिकाणी अवलंबली जाते. त्याची सुरवात येथूनच झाली. उत्तम मनुष्यबळ पुरविण्याचे काम शाळा, कॉलेजेस आणि Universities करत असतात हे ध्यानात आल्यामुळे तेथील कंपन्यांनी शिक्षण संस्थांबरोबर घनिष्ट संबंध पहिल्यापासूनच ठेवले आहेत. Stanford हि जगप्रसिध्ध University याच भागात आहे. ही खाजगी University जगातील नम.१ ची सर्वोत्तम University समजली जाते. याचे बजेट हे अनेक राष्ट्रांच्या बजेट पेक्षा जास्त असते. SUSJ (State University of San Jose), University of Santa Clara तसेच बर्कले येथील University या चार प्रमुख Universities या भागात आहेत
येथील CEOs नी बॉस या कल्पनेमधेच अमुलाग्र बदल घडवून आणले. कंपनीचा बॉस हा नेहमी सुटा-बुटातच असला पाहिजे. त्याला भली मोठी केबिन असायला पाहिजे. त्याच्या भोवती सेक्रेटरींची टीम असायला हवी अशी जी परंपरा होती ती पार मोडीत काढली. कंपनीचा बॉस हा सुध्धा कंपनीतील इतर साध्या सुध्या वर्कर सारखाच असावा. त्याने पण इतरांसारखेच हॉल मध्ये बसून काम करावे. त्याला केबिन, सेक्रेटरी असा थाट नसावा. तसेच त्याचे कपडे पण सर्व साधारण माणसांसारखे साधे व क्याजुअल असावेत असा नवीन पायंडा पडला.
छोट्या स्टार्ट अप कंपनीचे रुपांतर जगातल्या मोठ्या कंपनीत कसे करता येते हे सिलीकोन व्ह्यालीने दाखवून दिले आहे. श्रीमंतीचे वाटप कसे करता येते. व्यवस्थापन क्षेत्रात किती नवीन कल्पना राबविता येऊ शकतात हे सिलीकोन व्ह्यालीने दाखवून दिले आहे. आज सिलीकोन व्ह्यालीमधील कंपन्या जेवढा रेवेन्यु निर्माण करतात तेवढा जगात दुसरीकडे कोठेच निर्माण होत नाही.
आज भारतीय लीकांना अमेरिकेमध्ये जी इज्जत, प्रतिष्ठा, सन्मान आणि गौरव मिळतो आहे त्यामध्ये सिलिकॉन व्यालीचे योगदान फार मोठे आहे. आज तेथे हजारो भारतीय तरुण अभियंते आणि तंत्रज्ञ तेथील सर्वच कंपन्यांमध्ये उत्तम काम करीत आहेत. अनेक कंपन्यांमध्ये अनेक भारीतीय उच्च पदावर काम करीत आहेत. यामध्ये मराठी लोकांची पण संख्या लक्षणीय आहे. आपण सुध्धा उच्च दर्जाचे काम उत्तम पणे करू शकतो असा आत्मविश्वास भारतीयांमध्ये जागृत करण्याचे फार मोठे काम सिलिकॉन व्हालीने केले आहे.
भारतीय, विशेषतः मराठी तरुणांना यातून बरेच काही शिकता येण्यासारखे आहे.
आज भारताची जागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने घोड दौड चालू आहे. याचा अर्थ आज जागतिक स्तरावर उद्योग व्यवसाय सुरु करण्याची संधी भारतीय तरुणांपुढे चालून आली आहे. मराठी तरुण तरुणींनी या सुवर्ण संधीचा फायदा उठवावा. ज्याप्रमाणे पेशव्यांच्या काळात मराठी झेंडा अटकेपार( जे आता पाकिस्तानात आहे) नेला होता. त्याप्रमाणे उद्योग vyavasayachya nimittane मराठी झेंडा अमेरिका ते new ziland paryant akhya jagat phadakawa. तसेच यापुढे मराठी समजताच बिल गेट्स आणि मार्क झुकेरबर्ग निर्माण व्हावेत हीच शुभेच्छा!
उल्हास हरी जोशी
June 8, 2011 at 11:53 am
June 8, 2011
गाणपत्य संप्रदायात स्वानंद नामक गणेशाच्या लोकात तथा साधकाच्या ब्रह्मरंघ्रातील सहस्त्रदल कमलात भगवान गणेशांचे आसन वर्णिले आहे. त्या सिंधुरानन अर्थात गजमुखी भगवान गणेशांचे मी भजन करतो.
January 7, 2020
‘बाबा’ राम रहिमला वीस वर्षांची सजा ठोठावली हे ठीक झाले, पण आतापर्यंत ज्या राजकीय पक्षांनी अशा बाबांचा पाठिंबा घेऊन मते मिळविली त्यांच्या नैतिकतेचे काय? पैसा व संपत्ती हेच धर्म आणि अध्यात्माचे अधिष्ठान होत आहे. संत कोण व देव कोण याच्या व्याख्या ठरवा नाहीतर सर्वच धर्मांतील बाबागिरीवर कायद्याने बंदी घाला…!
September 1, 2017
गेल्या दोनचार दिवसांत बातमी वाचली की, रुपयाचा फॉरेन एक्सचेंज रेट, ७१.९९ म्हणजे , जवळजवळ ७२ झाला आहे . म्हणजेच, एका डॉलरच्या बदल्यात आपल्याला ७२ रुपये मिळतात . किंवा असंही म्हणतां येईल की एक डॉलर हवा असेल तर आपल्याला ७२ रुपये खर्च करावे लागतात. (Wow ! आपल्या सगळ्यांनाच अगदी धन्य धन्य वाटायला हवं ! )
September 9, 2018
लब्ध्वा सकृत् त्रिपुरसुन्दरि तावकीनंकारुण्यकन्दलित कान्तिभरं कटाक्षम् ।
कन्दर्पकॊटिसुभगास्त्वयि भक्तिभाजः
सम्मोहयन्ति तरुणीर्भुवनत्रयॆऽपि ॥ ४ ॥
खरी बुद्धिमत्ता ती जी इतरांना बुद्धी संपन्न करते. खरे वैभव ते जे इतरांना वैभवसंपन्न करते. त्याच प्रमाणे खरे सौंदर्य तेच की ज्याच्या संपर्काने इतरांना सौंदर्य प्राप्त होते. आई जगदंबेचे सौंदर्य तसेच आहे. तिच्या नेत्र कटाक्षांचे हे आगळे वैभव सांगताना, पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,
लब्ध्वा सकृत् त्रिपुरसुन्दरि तावकीनं-
त्रिपुरसुन्दरि- हे त्रिभुवनसुंदरी !
तावकीनं- तुझी
लब्ध्वा- प्राप्त करून
सकृत्- एकदाच, सहजपणे.
कारुण्यकन्दलित- कारुण्याने परिपूर्ण भरलेली, कारुण्य ओसंडून वाहत असलेली,
कान्तिभरं -तेज:पुंज
कटाक्षम् - नेत्र कटाक्ष.
अशाप्रकारची आई जगदंबेची दृष्टी प्राप्त झाल्यावर होणारा अद्वितीय लाभ आचार्यश्री सांगत आहेत. त्या दृष्टीचे सौंदर्य सांगताना ते म्हणतात,
कन्दर्पकॊटिसुभगा- कंदर्प म्हणजे मदन. सौंदर्याचे आपल्यासमोर असलेले सगळ्यात मोठे परिमाण. त्याच्या कोट्यावधी पट सुंदर अशी ती, कन्दर्पकॊटिसुभगा.
त्वयि भक्तिभाज:- तुझ्या भक्तीला पात्र असणारी.
तरुणी- अन्य समस्त सुंदरी.
सम्मोहयन्ति- मोहित करतात.
भुवनत्रयॆऽपि- तीनही लोकांना.
अर्थात आई जगदंबेच्या वर वर्णन केलेल्या गुणांनी युक्त असलेली कृपादृष्टी प्राप्त झाल्याने त्या सौंदर्याने क्षमता प्राप्त झालेल्या स्वर्गीच्या रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका इत्यादी अप्सरा संपूर्ण त्रिभुवनाला मोहित करतात.
त्यांच्या नजरेतील ती मोहन शक्ती मूलतः आदिशक्तीची आहे.
तिच्या भक्तीने इतरांना ती शक्ती प्राप्त होते हे आईचे खरे वैभव आहे.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 15, 2020
जेवणात अथवा खाण्यासाठी आपण कोणते तेल वापरतो यावरही आपले आरोग्य अवलंबुन असते. आजकाल जेवण बनविण्यासाठी कोणते तेल वापरावे याबद्दल बहुतेक जण जागरुक असतात. अगदीच डॉक्टबरांच्या सल्ल्याने नाही तर सर्वसाधारण माहिती घेऊनच आज तेलाचा वापर केला जातो. ज्या तेलामध्ये फॅट्स कमी अथवा कॅलरिज कमी अशा तेलाचा वापर करण्याकडे सर्वांचा कल असतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात असे लक्षात आले आहे की, ऑलिव्ह ऑईल हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. ऑलिव्ह ऑईल शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी तर करतेच याशिवाय रक्तषदाबाची पातळीही आटोक्याशत ठेवण्यामध्ये ऑलिव्ह ऑईल लाभदायक ठरते. दिवसेंदिवस लोकांना ऑलिव्ह ऑईलचे आरोग्यासंबंधीचे महत्व पटताना दिसत आहे. या दोन महत्वाच्या फायद्यांबरोबरच ऑलिव्ह ऑईलमुळे आणखीही अनेक फायदे होतात. ऑलिव्ह ऑईलमुळे त्वचा तुकतुकीत होते. ऊन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सनबर्न होऊ नये यासाठीही हे फायदेशीर आहे. केस सिल्की आणि मऊ बनविण्यासाठी, त्वचेवर असलेले स्ट्रेच मार्क्सा घालविण्यासाठी, डोक्याकतील कोंड्यापासून मुक्तीन मिळवण्यासाठी अशा अनेक गोष्टींमध्ये ऑलिव्ह ऑईल उपयुक्तस ठरते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 30, 2016
न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!
आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!!
बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!!
यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!!
मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले?
तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते!!
शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती?
तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या?
आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता?
हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते!!
मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते!!
सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते!!
आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो!!
आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो!!
भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो!!
पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो!!
पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो!!
माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का?
कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का?
वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का?
लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का?
आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का?
निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो!!
प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो!!
शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो!!
आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो!!
शिक्षकांचा दर्जा शिक्षणाचा दर्जा शाळेचा दर्जा कॉलेजचा दर्जा ह्या सगळ्याला दोष दिला जातो कारण माझ्या प्रयत्नांचा दर्जा खूपच खालावलेला असतो!!
October 21, 2016
हिंदुराव धोंडे पाटील (निळू फुले) व मास्तर (श्रीराम लागू) यांच्यामधील रंगलेला ‘सामना’ पाहिलेला नाही असा मराठी सिने रसिक विरळाच. या सिनेमातली या दोन अतिशय ताकदीच्या कलाकारांमधील ही अभिनयाची जुगलबंदी म्हणजे आपल्यासारख्या चित्रपट प्रेमींना मेजवानीच आहे.
April 9, 2023
मला आठवते १९८०-९० दशकात मुंबईतल्या सिनेसृष्टीत '"दाऊद के इशारे के बिना यंहा पत्ता भी नहीं हिलता" अशी वाच्यता होती. तस्करी आणि उगाही (वसूली)चा पैसा दाऊद सिनेसृष्टीच्या माध्यमातून दुसर्या धंद्यात वळवायचा. दाऊद सारख्या तस्कारांमुळे आपल्या देश्यातील कोटीपेक्षा जास्त तरुण नशेच्या आहारी गेले, हजारोंच्या संख्येने अपराधी बनले, हे वेगळे. तरीही सिनेसृष्टीने दाऊदचे स्वागत केले. मोठे-मोठे मल्टी स्टारर् सिनेमे बनू लागले, त्यांत बहुतेक वसुली आणि तस्करीचा पैसाच लागत असे, अशी वाच्यता होती. नट आणि नट्यांना दाऊदच्या चरणी सर्वस्व अर्पित केल्याशिवाय सिनेसृष्टीत काम मिळत नाही, अश्या आशयाच्या गाॅसिप सिने पत्रिकांमध्ये वाचायला मिळायचे
१९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. शेकडोंच्या संख्येत मुंबईत लोक मारल्या गेले. दाऊद फरार झाला. आता वाटले होते, सिनेसृष्टीत दाऊदचा प्रभाव कमी होईल. पण तसे घडले नाही. दाऊदची पकड सिनेसृष्टीवर अधिक मजबूत झाली. देशप्रेम, स्वाभिमान इत्यादी विसरलेले, केवळ पैश्यांसाठी नट आणि नट्या परदेशात असलेल्या दाऊदच्या चरणी नाक घासण्यात आणि दरबारात ठुमके धन्यता मानू लागले.
आता प्रश्न येतो आपली जनता आणि सरकार काय करत होती. दुसरा कुठलाही देश असता, तर अश्या कलाकारांवर सिनेसृष्टीत काम करण्यावर कायम बंदी टाकली असती किंवा आतंकवादीशी संबंध ठेवण्यासाठी त्यांना जेलमध्ये धाडले असते. (आपली सरकारने अश्या कलाकारांवर का कार्रवाई केली नाही, हेच समजत नाही). जनतेने हि अश्या कलाकारांचा बहिष्कार केला पाहिजे होता. पण असे घडले नाही. मुंबईचे वाघ म्हणविणार्या नेत्यांनी अश्या कलाकारांचा बहिष्कार करण्याच्या धमक्या वैगरे दिल्या होत्या असे ऐकिवात आहे. बहुतेक त्यांच्या धमक्यांना दाऊद समर्थित सिनेसृष्टीने 'कुत्र्यांचे भुंकणे' याहून जास्त भाव दिला नसावा. ज्या मुंबईत शेकडों लोक मृत्युमुखी पडले, त्याच मुंबईत अनेक नेता किंवा दरबारात ठुमके लावणारे दाउदच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकले अश्याही वाच्यता आहेत. (उत्तर प्रदेशातील गवर्नर श्री राम नाईक यांनी तर उघडपणे आरोप लावले आहेत).
यानंतर हि मुंबईत अनेक आतंकवादी घटना घडल्या. २००८च्या हल्ल्यात जनतेसोबत अनेक पोलीस अधिकारी हि मारल्या गेले. तरीही कराचीत बसलेल्या दाऊदचे नियंत्रण आपल्या सिनेसृष्टीवर कमी झाले नाही. आता तर पाकिस्तानी कलाकार हि सिनेसृष्टीत दिसू लागले. पण भारतात काम करीत असताना, इथे घडणाऱ्या आतंकवादी घटनांचा विरोध त्यांनी कधीच केला नाही. विषयांतर होईल, पण मला आठवते, अलिबाबा चालीस चोर मधले चोर हि ज्या घरात दरोडा टाकायचा असेल त्या घरातले मीठ खात नसे. इथले मीठ खाऊन हि, इथल्या आतंकवादी घटनांचा जर पाकी कलाकार विरोध करीत नाही, तर त्यांना इथे काम देण्यात काय अर्थ. खरे म्हणाल तर सिनेसृष्टीने जी मुंबईमध्ये आहे निदान त्यांनीतरी पाकी कलाकारांवर १९९३ नंतरच बहिष्कार टाकायला पाहिजे होता. आपल्या दुर्दैवाचे कारण असलेल्या दाऊदच्या कठपुतली कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचणारी मुंबईकर/ देशातील सिनेप्रेमी जनतेला काय म्हणावे.
आज काश्मिरात आपले सैन्याचे जवान शहीद झाले. आपल्या देशाचे मीठ खाणार्या पाकी कलाकारांनी या घटनेची निंदा केली नाही. उलटपक्षी पाकिस्तानांत परतून, आपल्या देशाची निंदाच केली, असे ऐकिवात आहे. अश्या पाकी कलाकारांचा बहिष्कार करण्याएवजी, सिनेमा सृष्टीतील सर्व मोठे कलाकार, पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करीत आहे. कारण स्पष्ट आहे, हे सर्व कलाकार आतंकवादी मालकाच्या इशार्यावर नाचणाऱ्या बाहुल्या आहेत. पाकी कलाकारांसोबत अश्या बाहुल्यांचा हि बहिष्कार आपल्या सिनेसृष्टीने/ आपण केला पाहिजे, हीच आपल्या शहीद सैनिकांना खरी श्रद्धांजली असेल.
-- विवेक पटाईत
October 1, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti