(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • किचन क्लिनीक – करमल

    किचन क्लिनीक – करमल

    कोकण गोवा प्रांतात सापडणारे हे फळ.
    ह्या फळाचा उपयोग लोणचे,पाक,मासे अथवा अन्य आमटी मध्ये छान आंबट चव आणायला केला जातो.हे फळ नुसते देखील खायला रसरशीत छान लागते.

    ह्याचे झाड फार मोठे नसते.पाने पातंळ असतात व हा सदाहरित वृक्ष असतो.ह्या झाडाला भरपूर फळे येतात व ह्या झाझापासून आपल्याला छान थंड सावली मिळते.करमलाचे फळ हे शिरांनी युक्त असते तसेच ते कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळे दिसते.

    कच्चे फळ हे आंबट,उष्ण व वातपित्त दोष
    वाढविंणारे असते.तर पिकलेले फळ हे गोड,आंबट चवीचे व थंड असून पित्त शामक असते.

    आता आपण ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:

    १)तोंडाला चव नसणे,जीभेवर जाड पांढरा थर जमणे,तोंड घसा कोरडा पडणे,ह्यात पिकलेली करमले सैंधव व खडीसाखर धालून केलेली चटणी जेवणासोबत खावी.

    २)भुक लागत असून देखील खाल्लेले अन्न नीट न पचल्याने चिकट दुर्गंधयुक्त संडास होणे व त्यामुळे अन्न अंगी न लागणे,अशक्तपणा येणे ह्यामध्ये १ करमल पिकलेले +१/४ चमचा मिरपुड +१/२ चमचा जिरेपूड हे मिश्रण जेवणाच्या मध्ये खावे व मग उरलेले जेवण जेवावे.

    ३)पोटात आग होणे,मळमळणे,भुक न लागणे ह्यात ६ चमचे पिकलेल्या करमलाच रस+ चिमूट सैंधव+१ चिमूट मिरपुड + १ चिमूट जिरेपूड हे मिश्रण दिवसातून दोन वेळा जेवणाच्या आधी घ्यावे.

    कच्ची करमले खाऊ नयेत.

    करमले अतिप्रमाणात खाल्ल्याने संडासला घट्ट होते व दात आंबतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 21, 2016


  • जाणून घ्या तांब्याचे आरोग्यदायी फायदे

    आजकाल आपण पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या सर्रास वापरताना आढळून येतो. खरं पाहता, पाणी हे केव्हाही माती, काचेच्या किंवा तांब्याच्या भांड्यातून पिणे उत्तम ठरते.

      February 17, 2019


  • “वळू”-एका डॉक्यूमेंट्रीचा सिनेमा

    हा..कॅमेराकडे बघून बोला..
    हो..हो तुम्हीच..
    डूरक्याबद्दल बोला..
    वळू म्हणजे देवाला सोडलेला बैल...
    बाया माणसांचा फोटो काडू नये..
    अशा अतरंगी बाईट्सनी वळू हा सिनेमा सुरु होतो..
    आणि मग सुरु होते हास्याच्या सागरातली एक रोलर कोस्टर राईड..
    दोन तासांची अशी राइड जी पूर्ण चित्रपट तुम्हाला खूपच हसवते..
    एका वळूला पकडण्याचा झगडा..त्यावर बनलेली एक अनोखी डाक्यूमेंट्री..आणि त्यातली सर्व बहुरंगी, बहुढंगी पात्रं...
    ही राइड सिनेमा संपल्यावर मात्र तुम्हाला अंर्तमुखही करते..
    याला कारण गिरीश आणि उमेश या कुलकर्णी व्दयांची जबरदस्त पटकथा. पण मी हा लेख या सिनेमावर बेतणार नाहीये. मी फक्त या अविस्मरणीय सिनेमाच्या तितक्याच अविस्मरणीय प्रसंगांवर व संवादांवर लिहीणार आहे.
    आपल्याला एखाद्या सिनेमाचे प्रसंग कशामुळे लक्षात राहतात तर मुख्यतः त्यातल्या संवादांमुळेच. (शोले, दिवार ही उदाहरणे. सलीम-जावेद जोडीकडे ते कसब होते) खरं तर छोट्या प्रसंगातून, संवादातून सिनेमा जेंव्हा पुढे सरकत राहतो तेंव्हा त्याची मजा येते कारण तो सिनेमा आपल्यात हळूहळू झिरपत जातो. ऑन-द-राॕक्स घेतलेल्या स्कॉच प्रमाणे जसे जसे प्रसंगांचे, संवांदाचे बर्फ ग्लासमधे वितळतात तसे तसे त्या सिनेमाची झिंग वाढत जाते..आणि हळू हळू तुम्हाला त्या सिनेमाची नशा चढू लागते.
    वळू सिनेमा बद्दल अगदी तेच झालय...
    आता पहा ना..खरं तर सिनेमाची स्टोरी म्हंटली तर 'वन-लायनर..'
    "एका खेडेगावात मोकाट झालेल्या एका वळूला एक फॉरेस्ट ऑफीसर येउन पकडून नेतो". बस्स..एवढीच स्टोरी. पण इंग्रजीत म्हण आहे. 'The devil is in the details'. वर म्हंटल्याप्रमाणे या कथेची पटकथा होताना या सिनेमात अनेक समांतर कथा गिरीश व उमेश कुलकर्णींनी इतक्या बेमालुमपणे मिसळलेत की हा एक एक बर्फाचा खडा सिनेमा संपेपर्यंत हळूहळू वितळत या स्कॉचची मजा तुम्हाला देत राहतो.
    पात्रे सिनेमात येत राहतात व सिनेमा खुलत जातो.
    फॉरेस्ट ऑफिसर स्वानंद गड्डमवार (अतुल कुलकर्णी), त्याचा डॉक्यूमेंट्री बनवणारा भाउ समीर आणि त्यांचा ड्रायव्हर जगनाडे हा सिनेमाचा मुख्य ट्रॅक. बिबट्या आणी बायसन पकडणाऱ्या गड्डमवारांना जबरदस्ती वळू पकडायला त्यांचे साहेब 'कुसवडे' या गावी पाठवतात. समीरही त्याच्यांबरोबर हा विचार करुन येतो की या वळूला पकडण्यात काही थ्रील असेल तर ते शुट करता येईल. आणि खरंच त्याला जे शुट करायला मिळते ते थरारक असतं हे नक्की.
    सिनेमाची दुसरी ट्रॅक म्हणजे गावचे सरपंच म्हणजे अण्णा (मोहन आगाशे), त्यांची चेंगट बायको (भारती आचरेकर) आणि त्यांचा राइट हँड माणूस म्हणजे जिवन्या (गिरीश कुलकर्णी).
    जीवन्या स्वतःची ओळख 'फारेस्ट' म्हणजे गड्डमवारांना करुन देतानाचा तो सीन फारच अप्रतिम. 'आँ..डाउट काढला व्हय..अवो जीवन सुखदेव चौधरी..अण्णांचा राइट हँड..अण्णानीच सांगीतलं म्हणून सकाळपास्न कुसवडे फाट्याला थांबलोय तुमची वाट बगत..' असं म्हणत हे हसरं पात्र पहिल्याच सिनमधे आपल्याला आणी गड्डमवारांना जिंकून घेतं.
    सरपंच अण्णा म्हणजे तालेवार माणूस. सुपारी कातरत पहिल्या भेटीत फारेस्टला 'स्वानंद गड्डमवारsss..वा..जोरदार नाव आहे..' असे संबोधून सुपारीचा एक तुकडा खायला देत अण्णा त्यांना जेंव्हा सांगतात 'आमच्या कुसवड्याला ऐतीहासीक परंपरा आहे बरं का..!! पानीपतच्या युद्धात आमच्या कुसवड्याची गाढवं गेली होती' असे ते जेंव्हा सांगतात तेंव्हा फारेस्टला ठसका लागतो आणी आपण सोफ्यावरुन हसत खाली येतो..
    जीवन्याची गोड लोभस आई (ज्योती सुभाष) आणी त्याची गुपचुप चाललेली तानी (वीणा जामकर) बरोबरची लव्ह स्टोरी हा या मुख्य ट्रॅक मधला एक साइड ट्रॅक. तानी बोलायला फटकळ. त्यामुळे तिचे डॉयलॉग ही तसेच. जेंव्हा आबा रेणुसे तिला अगदी खेटून आपली बुलेट नेतो तेंव्हा ती आपल्या मैत्रीणीला संगीला म्हणते
    'गावातली समदीच जनावरं माजल्यात जणू..' तेंव्हा आपण लगेच त्याच्याशी रिलेट करतो. वळू (बैल) प्रत्यक्ष सिनेमात येण्याआधीच त्याच्याबद्दलची वातावरण निर्मीती असे अनेक संवादातून होत राहते.
    सरपंच अण्णांचा कट्टर विरोधक आबा रेणुसे (नंदू माधव) व त्याचे चमचे हा सिनेमाचा तिसरा महत्वाचा ट्रॅक. या चमच्यांमधेही नामचीन मंडळी होती जशे की सतीश आबनावे (फक्त सतीश तारें), सुरेश (श्रीकांत यादव) आणि पोपट (सिद्धार्थ झाडबुके).
    या तिघांनी ग्रामीण भागात राजकीय नेत्याला गोड बोलून झाडावर चढवणारे आबाचे चमचे इतके मस्त रंगवलेत की बस्स..
    आबाच्या दोन वर्षाच्या पोरालाही (संपतराव) ते यात सोडत नाहीत. आबाही फुशारकीत 'संपतरावांसाठी तर दिल्लीचा प्लॕन तयार आहे हो..' असे म्हणतात तेंव्हा राजकारणातल्या घराणेशाहीला घेतलेला हा बारीक चिमटा आपल्याला गुदगुल्या करुन जातो.. आणि बिचारे संपतराव आबाच्या अंगावर शू करतात तेंव्हा तिघे आबाची मस्त फिरकीही घेतात.
    आबाला डुरक्याला पकडून गावात हिरो व्हायचं असतं पण अण्णानी फॉरेस्ट ऑफीसरच त्याला पकडायला आणल्याने अण्णांनीच पहिला डाव जिंकलेला असतो. 'आयला या अण्णाच्या....!! न्हाय या फारेस्टच्या आधी डुरक्याला पकडला तर नावाचा आबा रेणुशे नाही' अशी शपथ आबा घेतो तेंव्हा गावातल्या या व अशा राजकीय चढाओढीचा आपल्याला गंमतशीर अनुभव सिनेमाभर येत राहतो.
    संगीता (अमृता सुभाष) आणि शिवा (मंगेश सातपुते) यांची लव्हस्टोरी हाही एक सिनेमातला मजेशीर ट्रॅक आहे. ग्रामीण भागातली एक अल्लड, स्वप्नाळु, प्रेमात पडलेली तरुण पोरगी जशी बोलेल तसेच संवाद संगी च्या तोंडी आहेत. तिचा प्रियकर शिवाही असाच गावठी हिरो. 'संगीवर माझं लव्ह हाय..ती माझी हाय आणी माझीच होणार..' असले संवाद त्याला बरोबर शोभतात.
    असाच एक समांतर ट्रॅक देवळाचा भटजी (दिलीप प्रभावळकर) आणी त्यांची बायको (निर्मीती सावंत) यांचा. घरात संडास नसल्याने गावाबाहेर विधीला सतत जावं लागत असतं आणि डुरक्याची भिती असल्याने बिचारी बायकोही रात्री अपरात्री दिवा घेउन त्याच्यामागे सोबतीला जात असते. त्यात बायकोचा विरोध असूनही तिखट खाणारे भटजीबुवा प्रभावळकरांनी मस्त केलाय. चटणीचा तो प्रसंग आणि बोलता बोलता झालेलः दोघांचे भांडण हा प्रसंग एकदम सुरेख. 'डुरक्याचा सगळ्यात जास्त त्रास आमच्याच घराला होतो. आमच्या ह्यांना जरा पोटाचा त्रास आहे..त्यामुळे रात्री अपरात्री यांना परसाकडला जायला लागतं' असं फारेस्टने बोलावलेल्या गावच्या मिटींगमधे त्या सांगतात तेंव्हा हसू आवरत नाही. 'तुम्ही सरकारचेच आहात ना..मग आमचं संडासाचं काम तेवढं करुन द्या' असे फॉरेस्ट ऑफीसरलाच सांगतात तेंव्हा त्यांच्या विनोदावर हसावं की त्यांच्या निष्पाप भावनेचे कौतुक करावे हेच समजत नाही.
    इतर पात्रेही आपल्या खास संवादांमुळे लक्षात राहतात.
    तानीची वहिनी तिला म्हणते कशी दिसते ग मी तेंव्हा तानी 'प्रिती झिंटाच जणू' म्हणते ते खूप नैसर्गिक वाटतं.
    गावच्या हागीणदारी शेजारी राहणारे सतीश (तारे) जेंव्हा 'हागीणदारी हलवा' म्हणतो तेंव्हा भटजींचा पडलेला चेहराही लक्षात राहणारा.
    कुठल्याही प्रसंगात 'मधल्या हिरीतला गाळ काढून टाका' असे सुचवणारा अण्णांचा नोकर शंकऱ्या (प्रशांत तपस्वी) ही भारीच.
    अण्णासाठी सुपारी घ्यायला दुकानात आलेल्या शंकऱ्याला पैसे घेउन सुपारी न देता (कारण ती संपलेली असते) 'मी संध्याकाळी घेतलेले पैसे देत नसते' असे सुनावणारी सुऱ्याची बायको (अश्विनी गिरी), माहेरहून आल्यावर 'डॉक्यूमेंटरी गावात आली हे तुम्हाला ठाउक हुतं का नव्हतं?' आणि दिवसभरचा 'गल्ला कुठाय?' असे विचारत नवऱ्यावर जो जाळ काढते तो केवळ बघण्यासारखा आहे.
    अशा या अफलातून सिनेमाविषयीच्या बऱ्याच गोष्टी लिहीता येतील. पण इथे कितीही केले तरी मला शब्दात सर्व मांडता येणार नाही. मला सिनेमा पाहून अनेक वर्षे झाली. पण मला आजही यातले कित्येक प्रसंग आणि संवाद अजून जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात.
    तुम्हीही बहुसंख्य गल्लीकरांनी हा मराठीतला 'कल्ट' म्हणावा असा सिनेमा पाहिला असेलच. तुमचा आवडता प्रसंग वा संवाद नक्की कमेंट्स मधे लिहा.
    सर्व गल्लीकरांना दसऱ्याच्या शुभेच्छा!!
    'सिनेमाचे सोने घ्या..अन..सोन्यासारखे रहा..'
    ता.क -
    सतीश तारेंनी निभावलेला सतीश आबनावे डुरक्याविषयी माहिती द्यायला समोर येतो तेंव्हा दोन मिनीटात आपल्या भावमुद्रा व टायमींगने त्यांनी जी रंगत आणलीय ती फक्त एकदा पहा. सतीश तारे हा बाप माणूस का होता हे लगेच कळतं.
    लिंक देतोय.

    निर्मीती सावंत यांची जबरदस्त भटजींची बायको..अफलातून सीन. पाहताना हसून पोट दुखेल.

    वळूचे ट्रेलर

    -- सुनील गोबुरे.

      August 31, 2022


  • फस्ट क्लास’ डब्यातली ‘अक्कल’ आणि ‘सेकंड क्लास’ माणूसकी

    मुंबईच्या लोकल ट्रेनमधला फर्स्ट क्लासचा डब्बा हे विशेष प्रकरण आहे. इथे सर्वजण आपापला सेंट (परफ्युम हो) आणि आब राखून असतात..जरा कोणाशी बोललो तर आपल्या इभ्रतीचं काय होईल या भयंकर काळजीने इथे एकमेकांशी फारसं कोणी बोलतही नाही.

      November 21, 2016


  • टोनी मारिसन – कादंबरी नव्हेच कविता

    काव्यमय भाषेमुळे तिचे गद्य लेखनही पद्यमय झाले. तिची कादंबरी हीच एक कविता बनली. त्यामुळे साहजिकच तिला १९९३ मध्ये साहित्यविषयक नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. टोनी मारिसन हे तिचे नाव.

      August 27, 2023


  • परब्रह्मप्रातःस्मरणस्तोत्रम् सार्थम् – मराठी अर्थासह

    श्री आदिशंकराचार्यांनी रचलेल्या या स्तोत्रात केवळ तीनच श्लोक आहेत. पाठकाचे कायावाचामने अत्युच्च तत्त्वाचे चरणी समर्पण करण्याचा त्याचा उद्देश आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्या मनात येणा-या विचारांचा आपल्या दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम होत असतो. जर आपण ते विचार पवित्र व स्वर्गीय करू शकलो तर आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेने आपली नक्कीच वाटचाल होईल. या दृष्टीने ही पहाटेस करावयाची प्रार्थना निश्चितच महत्त्वाची आहे.

      March 25, 2021


  • करिअर निवडीचे मानसशास्त्र

    करिअरची निवड हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा असतो. अनेकांच्या करिअर निवडीच्या संकल्पना ह्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर ठरलेल्या असतात. बदलत असलेले जीवनमान, वाढत जाणाऱ्या गरजा आणि अपेक्षा, स्पर्धेची समस्या अशा अनेक कारणांमुळे करिअर निवडीच्या बाबतीत अनेक भ्रम आणि संभ्रम निर्माण होत जातात.

      February 5, 2022


  • गावाकडची अमेरिका – पार्श्वभूमी – २

    तसं बघायला गेलं तर भारत हा प्रगतीशील देश तर अमेरिका म्हणजे अतिप्रगत देश. आपल्याकडे ग्रामीण भागातून शहराकडे वळणारा ओघ हा तसा गेल्या काही दशकांतला. आपली शहरी लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या २८%, तर अमेरिकेतली शहरी लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या तब्बल ८२%. थोडक्यात म्हणजे अमेरिका हा एक बहुतांशी शहरी / नागरी लोकवस्तीचा देश आहे. पण जसं मुंबई, पुणे, दिल्ली, बंगलोरू, कोलकोता म्हणजे भारत नाही तसंच न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डी.सी., लॉस एंजेलीस, शिकागो, ह्युस्टन म्हणजे अमेरिका नाही. या छोटया मोठया अतिप्रगत, अद्ययावत, नागरी, शहरी केंद्रांच्या अल्ल्याड पल्ल्याड दुसरी देखील एक अमेरिका विखुरलेली आहे. परंतु एकंदरीत अमेरिकेबद्दलची आपली कल्पना इतकी ठरावीक आणि साचेबंद असते की त्यापलीकडे जाऊन बघण्याची आपल्याला फारशी जिज्ञासा नसते. ‘आपल्या आसपासच्या किंवा कल्पनेतल्या झगमगीत, रंगीबेरंगी, बेगडी, भोगवादी, चंगळवादी अमेरिकेच्या पडद्याआड काही आहे का ? साधंसुधं दैनंदिन जीवन जगणारी, शेतात राबणारी, खाणीत काम करणारी, आपल्या पंचक्रोशीच्या बाहेरचं फारसं जग न बघितलेली, शहरी जीवनाचा वारा न लागलेली, टंचाईने ग्रासलेली, कष्टकरी, देवभोळी अशी एखादी अमेरिका आहे का ?’ असे प्रश्न आपल्याला सहसा पडत नाहीत.

    मला देखील हे प्रश्न पडले नसते. परंतु माझे कार्यक्षेत्र पशुपालनाशी निगडीत असल्यामुळे, आमचे अमेरिकेतील वास्तव्य हे मुख्यत्वे ग्रामीण / निमग्रामीण भागात झाले. आम्ही आयोवा, कनेक्टिकट आणि पेनसिल्व्हेनीया या तीन राज्यांमधे प्रत्येकी दोन ते चार वर्षे राहिलो. यातील आयोवा आणि पेनसिल्व्हेनीया ही बहुतांशी ग्रामीण राज्ये तर कनेक्टिकट हे थोडे आधुनिक आणि औद्योगिकीकरण झालेले राज्य. परंतु त्यात देखील ‘लॅंड ग्रॅंट स्टेट युनिव्हर्सिटी’ म्हटली की ती सहसा ग्रामीण भागातच असायची. त्यामुळे आमचे कनेक्टिकटमधले वास्तव्य देखील तसे निमग्रामीण भागातच झाले. ही तीनही राज्ये अमेरिकेच्या ईशान्य (Northeast) आणि उत्तर मध्य (Upper midwest) भागात येतात. या सर्व ठिकाणी हवामान साधारण सारखेच. तशीच कडाक्याची थंडी आणि ऋतुमान देखील तसेच. कामानिमित्ताने आणि पर्यटनासाठी आजूबाजूच्या म्हणजे व्हरमॉंट, मॅसेच्युसेट्स, न्यूयॉर्क, न्यूहॅंपशायर, साउथ डाकोटा, मिनेसोटा, विस्कॉनसीन, नेब्रास्का, मिसुरी वगैरे राज्यांतून फिरणे झाले होते. पण ही देखील राज्ये बहुतांशी ग्रामीण आणि शेतीप्रधान.

    त्यामुळे आमच्या पाहण्यातली ग्रामीण अमेरिका ही मुख्यत्वे ईशान्य (Northeast) आणि उत्त्तर मध्य (Upper midwest) या भागांतली. अमेरिकेच्या पश्चिम किंवा दक्षिण भागांत फिरायचा योग अजून फारसा आलेला नाही. त्यामुळे ग्रामीण अमेरिकेचे हे वर्णन सर्वच ठिकाणी लागू होईल असे समजणे चूक ठरेल. हा खंडप्राय देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या तिप्पट. भौगोलिक आणि नैसर्गिक वैविध्याने संपन्न. त्यामुळे अमेरिकेच्या ग्रामीण भागाबद्दलचे लिखाण हे सर्वसमावेशक असेल असे मानणेच मुळी गैर. किंबहुना कोणत्याही देशाबद्दल आणि त्यातही अमेरिकेसारख्या खंडप्राय देशाबद्दल लिहीणं म्हणजे आंधळ्या माणसाने हत्ती चाचपडून त्याचं वर्णन करण्यासारखं आहे.

    सात आठ वर्षांत मला ग्रामीण अमेरिका समजली, असे मला अजिबात म्हणायचे नाही. किंवा ग्रामीण अमेरिकेच्या भौगोलिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अंगांवर विद्वत्तापूर्ण आणि अधिकारवाणीने लिहिण्याचा आव देखील मला आणायचा नाही. या लिखाणांत, अमेरिकेच्या आणि भारताच्या ग्रामीण जीवनाची किंवा शेती व्यवसायाची तौलनिक मिमांसा नाही किंवा कसली तात्विक चर्चा नाही. हे एका मध्यमवर्गीय, भारतीय आणि मराठी माणसाने कुतुहलाने केलेलं अमेरिकेच्या ग्रामीण भागाचे वर्णन आहे.
    काही लिहायचे, असा संकल्प सोडून काही इथे आलो नव्हतो. लिहिण्यासाठी विषय शोधण्यासाठी आडवाटेला गेलो नव्हतो. परंतु कामाच्या, व्यवसायाच्या स्वरूपामुळे ग्रामीण / निम ग्रामीण भागात झालेला प्रवास आणि वास्तव्य जसंजसं वाढूं लागलं तसतसं या सर्वस्वी वेगळ्या विश्वाचे धागेदोरे माझ्यापुढे उलगडू लागले. हे जीवन सगळ्यांनाच आवडेल असे नाही. आडवाटेच्या लहानशा गावात, आधुनिकतेपासून काहीसे मागे, शहरी सुखसोयींपासून दूर, असं राहणं कोणी आपणहून पसंत करेल असं देखील वाटत नाही. किंबहुना शहरी लोकांना या आयुष्याचा पटकन उबग येईल. सहसा कोणाच्या वाट्यास न येणारा हा ग्रामीण अमेरिकन जीवनाचा अनुभव आम्हाला उपभोगता आल्यामुळॆ, तो इतरांपर्यंत पोहोचवून बघावा असा विचार सुमारे दोन वर्षांपासून माझ्या मनात घोळू लागला. अमेरिकेमध्येच परंतु मोठमोठ्या शहरांमधे रहाणार्या मराठी लोकांना ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू उमजावा आणि भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्‍या मंडळींना वास्तवाचे थोडे भान यावे, हा त्या मागचा उद्देश. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे हा आंधळ्या माणसाने हत्ती चाचपडण्याचा प्रकार आहे. जे काही बघितलं, समजलं, उमजून घ्यायचा प्रयास केला, ते शब्दबद्ध करण्याचा हा एक प्रयत्न !

      June 8, 2015


  • कालभैरवाष्टक – मराठी अर्थासह

    कालभैरवाष्टक – मराठी अर्थासह

    श्रीमत् आदि शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टक शंकराच्या भगवान कालभैरव या विक्राळ आणि उग्र रूपाचे स्तुतीपर स्तोत्र आहे. रूप रौद्र असले तरी त्याचा स्वभाव अत्यंत सरळ व भक्तांविषयी कणव असणारा आहे. या स्तोत्राचे पठण करण्याने भगवान कालभैरव अत्यंत भयावह भूत प्रेतादिकांना दूर ठेवतो, भीती, दुःख दारिद्र्य, क्लेशांना नष्ट करतो व सर्व संकटे दूर होतात. स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनाला शांती मिळते, आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आपले जीवन निरोगी, श्रीमंत आणि संपन्न बनते, असा भाविकांचा विश्वास व अनुभव आहे.

      September 6, 2020


  • जड झाले (मोठेपणाचे) ओझे !

    एखाद्याची कोठलीही तयारी नसताना आयुष्य त्याला/तिला बखोटं धरून उचलतं आणि जबाबदाऱ्या खांद्यावर सोपविण्यासाठी उभं करतं. शरीर आणि मन मुलांना मोठ्यांचे काम शिरी घेण्यासाठी तयार करतात-बऱ्याचदा मनाविरुद्ध !

      May 23, 2022