(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • ताजुद्दीन बाबा ।। श्री गुरुदेव दत्त ।।

    गुरुस्वरुपात पूजला जाणारा श्रेष्ठ देव म्हणजे श्री दत्तात्रेय होय. म्हणूनच “श्री गुरुदेव दत्त" असा दत्तात्रेयांचा जयघाष केला जाते. श्री दत्तात्रेय हे गुरुतत्त्वाचे आदर्श स्वरुप आणि योग साधनेचे उपास्यदैवत आहे. शैव, वैष्णव आणि शाक्त या निन्ही संप्रदायायत दत्तात्रेयांची उपासना श्रध्देने केली जाते. दत्तात्रेयांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांची तत्त्वे एकवटलेली आहेत. यामागील रहस्य जाणून घेण्याकरता दत्तात्रेयांची जन्मकथा माहीत असणे आवश्यक आहे. अत्री ऋषी आणि अनसूया यांचे पुत्र दत्तात्रेय होय. अत्री ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र चित्रकूट पर्वतावर पयस्विनी नदीच्या काठी त्यांचा आश्रम होता. अत्री ऋषी उग्र तपश्चर्या करत असत. अत्यंत औचित्त्य पूर्ण अशा त्यांच्या या तपोबलाच्या तोजाने कर्दम प्रजापती संतुष्ट झाले आणि आपल्या अनसूया नावाच्या कन्येचा अत्रींशी विवाह लावून दिला. अनसूया ही नावाप्रमाणे असूया रहित होती. तिने तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले होते. अनुसूया ही पतिव्रता स्त्री होती. तिच्यातपश्चर्येच्या तेजाने आणि पतिव्रत्याच्या बळाने ब्रह्मा, विष्णु, महेश हे तिन्ही देव प्रभावित झाले होते. प्रत्यक्ष इंद्राला देखील आपले स्थान डळमळीत झाल्याची भीती वाटू लागली, आणि त्याने ब्रह्मा, विष्णू, महेश यांना विनवणी केली. तिन्ही देवांनी अनसूयेचे सत्वहरण करण्याचे ठरविले त्याप्रमाणे अत्री ऋषी स्नानासाठी गंगेवर गेले असता अत्री ऋषींच्या आश्रमात तिघेही अतिथी रूपात प्रगट झाले. तिघांनी अनसूयेकडे इच्छाभोजनाची मागणी केली. अनसूयेने अतिथींचे स्वागत करून सर्व स्वयंपाक केला आणि वाढावयास आली असता निघांनी तिला नग्न होऊन वाढ अशी आज्ञा केली. अतिथीच्या इच्छेचा मान राखणे आपले कर्तव्यच आहे, असे मानून त्यांचा अतस्थ हेतूही जाणला. क्षणभर विचार करून अनसूयेने आपल्या पतीचे स्मरण केले आणि अतिथींवर तीर्थाचे सिंचन केले. तत्क्षणीच त्या तिघांचे तीन बालकात रुपांतर झाले. अत्री ऋषी गंगेवरून परत येताच अनसूयेने ती तीन बालके त्यांच्यासमोर ठेवून नम्रमणे म्हटले "स्वामिन् देवेन् दत्तम. ”अत्री ऋषींनी त्यांना “दत्त" असे नाव दिले.

    ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या भार्या आपल्या पतीच्या शोधात अत्री ऋषींच्या आश्रमात आल्या. अनसुयेने आपल्या पतीचे रुपांतर बालकात केल्याचे पाहून तिघीही दुःखी झाल्या. त्यांनी अनसूयेला विनवणी केली आणि अनसूयेने तिन्ही बालकांचे पुन्हा त्रिदेवात रुपांतर केले. त्रिदेवांनी आपला पराभव मान्य केला. ब्रह्मा व महेश तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात निघून गेले. कालांतराने ब्रह्मा चद्र (सोम) झाले आणि महेश दुर्वास झाले. परंतु विष्णु मात्र दत्त रूपात अत्री आणि अनसूयेच्या इच्छेनुसार त्यांच्याजवळच त्यांचे पुत्र म्हणून राहू लागले. ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचे प्रतीक म्हणून दत्ताने ब्रह्माचा कमंडलू आणि महेशाचा शूल हातात धारण केला. सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या या देवता मानल्या जातात.

    दत्तात्रेयांनी अत्री ऋषींच्या आदेशानुसार गौतमी नदीच्या काठी शिवोपासना करून योगसिध्दी आणि ब्रह्मज्ञान प्राप्त केले. दत्तात्रेय हे स्वेच्छाविहारी आहेत. माहूर हे दत्तात्रेयांचे शयनस्थान समजले जाते. पांचळेश्वरी ते स्नान करतात आणि कोल्हापुरी भिक्षाटन करतात. दत्तात्रेयांचा निवस सतत औदुंबर वृक्षाखाली असतो. म्हणून दत्तभक्त तेथे बसून गुरुचरित्राचे पारायण करताता. तीन मुखे ही ब्रह्मा, विष्णू महेश या त्रिदवांचे समन्वय दाखविणारी आहेत. या त्रिदेवांचे प्रत्येकी दोन प्रमाणे सहा हात आहेत बह्माच्या हातातील जपमाला व कमंडलू हे सत्तां चे, तपस्व्याचे प्रतीक आहे. विष्णूच्या हातातील शंख आणि चक्र ही आयुधे रज तत्त्वाचे प्रतीक तर महेशाच्या हातातील त्रिशूल आणि डमरू तम तत्त्वाचे म्हणजेच संहाराचे प्रतीक आहे. दत्तात्रेयांचा वेष हा मस्तकावर जटाभार, पायात खडावा, अंगाला विभूती लावलेली, काखेत झोळी लटकविलेली, व्याघ्रांबर परिधान केलेली मूर्ती म्हाणजे दत्तात्रेय अवधूत दिगंबर योगी असल्याचे प्रतीक आहे. दत्तात्रेयांच्या मागे उभी असलेली कामधेनू हे पृथ्वी चे प्रतीक आहे, तर त्यांच्या आजूबाजूला असलेले चार श्वान हे चार वेदांचे प्रतीक आहेत. दत्तात्रेयांची उपासना गुरु स्वरूपाता केली जाते म्हणून ते गुरुदेव आहेत. परमार्थमार्गात गुरुसंस्थेला अतिशय महत्त्व आहे. दत्तात्रेय हे परमगुरु असल्यामुळे सर्व संप्रदायात ते श्रेष्ठ मानले जातात. दत्तसंप्रदाय हा सर्वात महान संप्रदाय मानला जातो. योगशास्त्र मंत्रशास्त्र आणि उपासनाशास्त्र यांचे संवर्धन करण्याचे महान कार्य दत्तसंप्रदायाने केले आहे. उपनिषदकारांनी प्रभू दत्तात्रेयांना विश्वगुरू म्हणून यथार्थपणे गौरविले आहे. दत्तभक्तीचा प्रसार हा जातीभेदातीत, संप्रदायातीत किंबहुना धर्मातीत आहे म्हणूचन महानुभाव, नाथ, वारकरी आणि सतर्थ संप्रदायात दत्तात्रेयांविषयी अत्यंत आदर आणि श्रध्दा आहे. दत्तात्रेय हे विष्णूचे अंश असून अत्री आणि अनसूयेचे पुत्र असले तरी त्यांचा जन्म अयोनिसंभव आहे. भुतप्रेत, पिशाच्यादींचे दत्तात्रेय हे कर्दनकाळ आहेत.

    भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रत: ।
    दूरादेव पलायंते दत्तात्रेय नमामि तम् ।।

    स्मरण करताच प्रगट होणारी द त्त ही देवता आहे. त्यांच्या स्मरणाने वाईट शक्तींचा तात्काळ विनाश होतो असे दत्तावतारी श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी वरील श्लोकातून सांगितले आहे. दत्त म्हणजे देणे. ज्यांनी आपल्या परमभक्ताला सर्व काही दिले आहे. दत्तात्रेयांचे दुसरे नाव अवधूत. म्हणजे, सर्व प्रकृतीविकारांना धुऊन टाकणारा आणि भक्ताला निर्गुणाची अनुभूती देणारा. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" दत्तात्रेयांचा साधनमंत्र. दिगंबर म्हणजे दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे असा, म्हणजेच सर्वव्यापी श्री म्हणजे लक्ष्मी ज्याच्या पायाशी आहे तो म्हणजे श्रीपदा वल्लभ म्हणजे लक्ष्मीचा स्वामी अर्थात साक्षात श्री विष्णू.

    अशी ही सर्वव्यापी सर्वत्र संचारी स्मर्तृगामी, युगानयुगे, शतकानुशतके अखिल मानव जातीचा उददार करणारी आणि परमभक्तांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारी जागृत, श्रेष्ठ गुरुदेवता म्हणजे श्री दत्तात्रेय !

    -–प्रज्ञा कुलकर्णी, (डोंबिवली)

    मो. ९९२०५१३८६६

    साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ४ था, (अंक २८)

  • श्रीयमुनाष्टकम् – मराठी अर्थासह

    श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या या आठ श्लोकांच्या स्तोत्रात यमुनेच्या अथांग पात्राचे, यमुनेच्या आठ दैवी शक्तींचे वर्णन, तसेच कृष्ण-कृष्णप्रिया-कालिंदी यांच्या लीला हळुवारपणे उलगडल्या आहेत.

  • मनाची भक्ती

    एक माणूस होता, त्याच्या पत्नीने त्याला महामूर्ख ठरविले. ही गोष्ट त्यांच्या अंतःकरणाला फार बोचली. त्याला वाईट वाटले आणि त्याने आपल्या पत्नीचा त्याग केला. प्रौढावस्थेत विद्याध्ययनास सुरुवात केली. दीर्घकाल निरंतर अभ्यास व दृढ निश्चयाच्या बळावर तो संस्कृतचा महाकवी कालिदास झाला.

  • हयग्रीवोत्पत्ति

    श्रावण पौर्णिमेला भगवान विष्णूंच्या हयग्रीव अवताराची उत्पत्ति झाली. हयग्रीवाच्या उत्पत्तिबद्दल निरनिराळ्या कथा आढळतात. याची मूर्ती कशी असावी याबद्दल पांचरात्रात सांगितले आहे. चार हातांचा, तीन हातात शंख, अक्षमाला, व चौथा हात व्याख्यान मध्ये. याच्या मूर्ती कर्नाटकांत नुग्गेहळ्ळी येथे आहेत. मूर्ती उभी, अष्टभुजा, पायाखाली राक्षसाला तुडवणारी आहे तर दुसरी चतुर्भुज, विश्वपद्मावर बसलेली आहे.

    -श्री करंदीकर गुरुजी

  • भूलोकीचे वैकुंठ म्हणून नावाजलेले शेगांव.

    प्रेमभक्तीचा प्रचंड महापूर शेगांव रस्त्यावर धो-धो वाहत होता. समुद्राला जणू भरती आली आणि लाटावर लाटा किनाऱ्यावर येऊन धज्ञकत होत्य, त्या लाटातील अमृतमयी सिंचनाने सारे भक्तगण न्हावून निघाले होते. टाळमृदंगाच्या गजरातील तो अनुपम सोहळा भावभरल्या अश्रुपूर्ण नंत्रांनी बघताना क्षण्काल काळाचे भान हरपले. कितीतरी वेळ रस्त्याच्या मधोमध असलेल्या उंच डिव्हायडरवर निश्चल शरीराने भावपूर्ण अंत:करणाने सारे प्राण डोळ्यात साठवून घेताना मनात आल खरच देव अशा साध्या भाळ्या भाविकांच्या हृदयातच निश्चितपणे नांदतो.

    अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हातून, डोक्यावर खांदयावर स्वतःचा बोजा सावरीत दिंडीत सामील झालेले वारकरी आपल देहभान विसरून टाळ मृदंगाच्या लयदार गजरात नाचतांना पाहून मन तृप्त झाल्याशिवाय राहात नाही. प्रत्यक्ष प्रेमभक्ती काय असते याचा अनुभव घ्यायचा असेल तर रामनवमीला शेगावी होणारा दिंडी सोहळा याची देही याची डोळा अवश्य बघावा. तो बघायला मिळणे अनुभवणे खरोखरीच महद्भाग्याचं लक्षण आहे. ते महद्भाग्य सर्व भक्तगणांना आज शेगांवी निश्चितच मिळाले.

    आज हजारो दिंड्या शेगांव रस्त्यावरून टाळमृदंगाच्या लयीत भजने म्हणत एकाच ओढीने चालत होत्या. लोहचुंबकाच्या कक्षेत येणाऱ्या लोखंडाला लोहचुंबक जसा आपल्याकडे ओढून घेतो तसे सर्व वारकरी श्री महाराजांच्या कक्षेत येताच ओढल्याप्रमाणे जावू लागले.

    श्री महाराजांच्या पादकांच्या परिस स्पर्शाने आपल्या जिवाचं सोन करण्यासाठी लागलेली ओढ मनाला लागलेला ध्यास सर्व वारकऱ्यांच्या डोळ्यातून स्पष्टपणे जाणवत होता. हे सर्व दृश्य पाहून सांग पुलकीत होत होतं. दिंडीत घुसून मनसोक्त नाचावसं वाटत होत, परंतु श्री महाराजांनी दिंडीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवल्याने, वाहवून जाण योग्य नव्हतं, आणि शेगाव संस्थानच्या शिस्तबद्ध नियोजनाचा माझ्या भावनिक उर्मीने अजाणतेपणाने का होईना अपमान झाला असता. संस्थानचा आदर्श नजरेसमोर ठेवून वागणारा मी, मला असं करून कस चालेल? स्वतःच्या मनाला समजावीत जडअंतकरणाने सर्व विहंगम दृष्ये डोळ्यात साठवून मुक्कामाचा रस्ता धरला.

    आजचा दिवस माझ्यासाठी खरोखरीच सुवर्णदिन म्हणावा लागेल. श्री गजानन महाराज संस्थानकडून प्रसादरूपाने टाळ-मृदुंग मिळावेत ही बरीच वर्षे अतृप्त राहिलेली इच्छा श्री महाराजांनी आज पूर्ण केली. जणुकाही आमच्या सेवेला, भक्तीला पुर्णरूप प्रदान केलं. आता आणखी काही मिळवायची इच्छा राहिली नाही. मनात आलेल्या सर्व गोष्टींची महाराज लीलया पुर्तता करतात हे पदोपदी अनुभवतांना जीवन धन्य झाल्यासारखे वाटते. जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत श्री महाराजांची सेवा ह्या पामराकडून घडो ती त्यांनी करवून घेण व श्रीचरणाजवळ स्थान मिळो एवढीच इच्छा ! साधे आचरण, निर्मळ अंतःकरण आणि निष्ठायुक्त भक्ती भगवंताला प्रिय असते असे सर्व संताच्या शिकवणीचे सार आहे. दांभिकता आणि कर्मठपणाबरोबरच भोंदुगिरी वर संतांना चौफेर हल्ले केले. जगद्गुरु तुकारामांच्या अभंगगाथेत, संत एकनाथांच्या भारुडात, असे कितीतरी दाखले मिळतात ज्यात बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरिती यावर कडाडून हल्ला केलेला दिसून येतो.

    आजही धर्माच्या नावाखाली भोळ्याभाबड्या भाविकांना लुटण्याचे काम स्वतःला मठाधिपती, महाराज, संत म्हणवणारे लोक करीत आहेत. भोळ्या भाविकांनी अशा दांभिक गुरुंपासून सावध राहिले पाहिजे. श्री गजानन महाराजांकडे अनन्य भावानं शरण गेल्यास निश्चितच आजही ते योग्य मार्ग दाखवतात. भक्त पुंडलीकाला जसे सावध केले तसे आपणालाही करतील यात शंका नाही. त्या साठी आपली भक्ती पुंडलिकाप्रमाणे खरी व दृढ असणे गरजेचे आहे. वारी पुर्ण होऊ दे मग खुशाल ज्वर येऊ दे! नाहीतर मरण ते मी आनंदाने स्विकारीन असे म्हणणाऱ्या पुंडलिकाची पायदळ वारीवर किती प्रेम, किती निष्ठा होती. हे समजण्याकिरता पायदळ वारीच केली पाहिजे त्यात काय सुख असते हे आम्ही सलग दहा पदयात्रेत अनुभवलं आहे.

    शेगावं संस्थानच्या श्रीरामनवमी उत्सवाला शेंगावी जाण्याचा योग मात्र अनेक वर्षांनी आज आला. उत्सवातील आनंद सोहळा बघून मन तृप्त झाले. रीरामनवमीला दुथडी भरून वाणाऱ्या नदीसारखा वारकऱ्यांचा दिंडीसमूह दरवर्षी श्री गजाननाच्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या गजरात लाखोच्या संखेनी शेगांवी येतो हे केवळ ऐकून माहित होतं. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मात्र आज होत होता.

    प्रत्येक वारीत सहभागी असलेल्या दिंडीत २ ते ३ महिला डोक्यावर तुळस पाण्याची कळशी घेवून चालत असतात. आपले वय विसरून तुळाशीवृंदावन सावरत त्या आपल्या लाडक्या "गजानन बाबाला" भेटायला अधीर होऊन पळत असतात.

    चालण्यचा थकवा असला तरी वरकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तृप्ततेचा आनंद दिसतो. कडक उन्हा तडाखा सोसत दिंडीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगी असलेल्या सहनशीलतेचे आणि निरामय भक्तीचे आपणाला दर्शन घडते.

    अतिशय शिस्तबद्धरितीने हजारो दिंड्या आपल्या वारकऱ्यांना घेऊन नगरप्रदक्षिणा करत असतात. ते सार दृश्ये इतकं लोभसवाणं असतं, इतकं मनोहारी असतं की त्यावरून जराही नजर ठळू नये.

    संध्याकाळच्या श्री महाराजांच्या पालखी सोहळ्याच वर्णन करण हे लेखनीचं काम नव्हे. तो सोहळा प्रत्यक्ष बघणे भाग्यात आले तर त्यासारखा अत्यूच्च आनंदाचा क्षण नाही. प्रत्येक भक्ताने हा अनुभव घ्यावाच. साखर गोड असते हे सत्य असलं तरी त्याची गोडी ती खाल्याशिवाय कळत नाही.

    हजारो दिड्यांचं शिस्तबद्ध नियोजन करताना कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, अस्वच्छता नाही. भव्य अशा अनेक शामीयान्यात हजारो दिंड्यांची राहण्याची, जेवणाची चोख व्यवस्था संस्थानाचे सेवेकरी अतिशय श्रद्धेने, काटेकोरपणे डोळ्यात तेल घालून सांभाळत असतात. महाराजांच्य सेवेबरोबरच त्यांच्य भक्तांची सेवा करण्यात संस्थानच्या सेवेकऱ्यांना धन्यता वाटते. एवढ्या प्रचंड गर्दीचं नियोजन अतिशय शिस्तबद्ध रितीने करणारे व ते सांभाळणारे सेवक खरोखरच धन्य होत. दिंडीच्या मार्गावर शुभ्र वेषातील सेवेकरी हजारोंच्या संखेने संस्थानला नियमित सेवा देतात.

    श्रीमहाराजांनी समाधिमूर्वी दिलेल्या वचनावर दृढ श्रद्धा ठेवून संस्थेचे कार्य अन्याहतपणे चालू असून ह्या सर्व सेवाकार्याच श्रेय श्री महाराजांना अर्पण करणारे, संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त प. पू. शिवशंकर भाऊ पाटील म्हणजे श्री महाराजांच्या चरणी वहिलेला समर्पित जीव. श्री महाराज प्रत्यक्ष भक्तांच्या हृदयात कसा नांदतो याचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे प. पू. शिवशंकर भाऊ पाटील होय.

    प्रचंड अशा कारभारावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आणि क्षमता त्यांना श्रीमहाराजांकडून भरभरून मिळाली याचं कारण त्यांची श्री महाराजांवर असलेली दृढ श्रद्धा होय. काटेकोरपणे नियमांच पालन, स्वच्छता व सुव्यवस्था असणारी भरतातील एकमेव संस्था म्हणजे श्रीगजानन महाराज संस्थान शेगांव होय.

    सायंकाळच्या नेत्रदिपक पालखीचा सहभाग असलेल्या दिंड्यांच्या पुढे गावातील सर्व बॅण्डपथके आपल्या सर्व ऐश्वर्यासह दिंडीत सामील होतात. त्या मागोमाग मानाच्या दिंड्या, मधोमध श्री महाराजांचे तीन सजवलेले अश्व लयबद्ध पावले टाकीत चालतात. त्यांना सोबत असते डौलदार भारदस्त चालीच्या दोन हत्तींची. श्री महाराजांची वैभवशाली पालखी संस्थानच्या शिस्तबद्ध वारकऱ्या सोबत निघत असते. एका लयीत चालणारे ध्वजधारी उंच असे ध्धराज सरळ रेषेत उंच धरुन चालत असतात. परिटघडीच्या पांढऱ्या शुभ्र पोषाखातील संस्थानचे वारकरी एका लयीत भजने म्हणत चालताना त्यांच्या कडक शिस्तीतून व्यवस्थानातील उत्तुंगता लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

    “श्री गजानन महाराज संस्थानचे वेवेकरी" हा खरोखरीच प्रबंधाचा विषय ठरू शकेल इतकी त्यांची सेवा नियमांचे काटेकोर बंधन पाळून अविरतपणे चालू आहे कारण “मी गेलो सेसे मानू नका । भक्तीत अंतर करू नका । कदा मजलागी विसरू नका । मी आहे येथेच।।” या श्रीमहाराजांच्या वचनावर त्यांची दृढ श्रद्धा आहे. आपली प्रत्येक गोष्ट श्री महाराज बघतात हा उच्चतम भाव सर्व सेवेकऱ्यांच्या हृदयात नांदताना आपणाला पदोपदी दिसून येतो. हा उच्चतम कोटीचा भाव आपल्या कुशल व कल्पक नियोनाद्वारे शेगाव संस्थान आज वर्षानुवर्षे जोपासत आहे आणि भविष्यातही जोपासत राहील यात शंका नाही.

    “सर्वे भवन्तु सुखिन:” हे संस्थानचे घोषवाक्य असून या घोषवाक्याबरोबरच "शिवभावे जिवसेवा' आणि “सेवा हीच साधना" या व्रताचा अंगीकार करता अनेक सेवाकार्ये अविरतपणे चालू आहेत. रंजल्या गांजलेल्यंना जीवनावश्यक वस्तू आणि मोफत औषधोपचार अतिदुर्गम भागात पुरवण्याचे कार्य खरोखरीच वाखणण्यासारखे आहे. संस्थानचे कार्य अनेकांनी आदर्श घ्यावा असेच आहे. भुलोकीचे नंदनवन शोभावे असा “आनंदसागर" प्रकल्प साडेतीनशे एकर जमिनीत अतिशय कल्पकतेने साकारला आहे.

    हे सारं घडत ते कृपासागर असलेल्या श्री गजानन महाराजांच्या कृपेने आणि पेरणेने यावर संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त प. पू. श्री शिवशंकर भाऊ पाटील यांची नितांत श्रद्धा आहे. श्रीमहाराजांच्या चरणी संपुर्णतः शरणागत असलेले, संपुर्णपणे श्रीमहाराजांचे कृपापात्र असलेले भाऊ पाटील ज्यांच्या अंगी नम्रता, लिनता, कर्तव्यतत्परता यांचा सुरेख संगम पाहावयास मिळतो संपूर्ण महाराजमय झालेले प. पू. शिवशंकर भाऊ पाटील म्हणजे कार्तव्याचा, निष्ठेचा, प्रेमभक्तीचा महामेरू होय. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या विषयी लिहिण्यास लेखणी थीटी पडावी असे त्यांचे कर्तृत्व महानच नव्हे तर गगनाला गवसणी घालणारे आहे. सेवा, भक्ती, समर्पण आणि त्याग ह्य उच्च जीवन मुल्यांना १९६९ पासून आजतागायत अखंडपणे व्यवस्थापक ह्या पदावर कार्य करीत असताना जोपासले आहेत. अशा थोर विभूतीच्या केवळ दर्शनानेसुद्धा साधकाच्या हृदयात खऱ्या भक्ती प्रेमाचा उदय झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही हे त्रिवार सत्य आहे. “शिवशंकर भाऊ पाटील । कारभार करी अंगे सकल । अतिप्रसन्न त्यासी भक्तवत्सल श्री गजानन महाराज ।।"

    ज्या ज्या वेळी पालखी किंवा दिंडीचा विषय चर्चिला जातो त्या त्या वेळेस पाटील घराण्यातील एका तेजस्वी व्रतस्थ वारकऱ्याची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. ते व्रतस्थ वारकरी म्हणजे पुरूषोत्तम भाऊ पाटील होय.

    श्री गोमाजी महाराज यांनी कुकाजी पाटलांना स्वप्न दृष्टांत देऊन मृत्यूपत्र करण्यास सांगितले. मृत्यूपूर्वी सर्व संपत्तीची योग्य सोय लावावी व त्या बरोबरच "पंढरीच्या वारीचे व्रत वंश परंपरागत अखंड चालवावे" असाही संकेत दिला गेला. तो ही मृत्युपत्रात नमूद केला गेला. आजतागायत ते व्रत पाटील मंडळी जोपासत आहेत.

    एक व्रतस्थ वारकरी म्हणून १९६८ ते १९८० एक तप सलगपणे श्री महाराजांच्या पालीखीसोबत श्री पुरूषोत्तम भाऊ पाटलांनी पायी वारी केली. यात कधीही खंड पडला नाही. प्रत्यक्ष द्वितीय चिरंजीव पांडूरंग पाटील यांच्या लग्न सोहळ्यास ते हजर राहू शकले नाहीत. कारण त्या वेळेस श्री गजानन महाराजांच्या पालखी सोबत ते पायी वारीत होते. आध्यात्मिक कार्यास, प्रापंचिक कर्मा ऐवजी प्रथम प्राधान्य द्यावं हा आदर्शच वरील प्रसंगातून दिसून येतो.

    श्री गजानन महाराजांच्या पालखीच्या पायदळ वारीत संस्थानच्या नियमांचे काटेकोर आणि शिस्तबद्ध पालन करीत तब्बल १२ वर्षे श्री पुरूषोत्तम भाऊ पाटील यांनी श्रींची सेवा केली, श्री महाराजंच्या लीला महात्म्याचा प्रभावीपणे प्रसार व प्रचार वारीच्या माध्यमातून केला. अनेक वारकऱ्यांना संस्थानशी कायमचे जोडले, त्यांच्यात डोळस भक्तीची ज्योत जागवली.

    तीच धुरा आज समर्थपणे श्री गजानन महाराज संस्थान अतिशय सुत्रबद्ध नियोजनाद्वारे अविरतपणे सांभाळत आहे. आजमितीला शेगांव संस्थानरच्या प्रमुख उत्सवात लाखो दिंड्या येताना आपणास दिसतात त्याचे बीज खऱ्या अर्थाने पाटील वंशानेच "गुरुआज्ञा प्रमाण मानून पेरले. " नियम, शिस्त स्वच्छता आणि कारभारातील पारदर्शकता यांचे काटेकोर पालन श्री कृपेने, श्री शिवशंकर भाऊ पाटील १९६९ पासून आजतागायत.

    सर्वेसर्वा असूनही निष्ठावानसेवक रूपाने कार्य करीत आहेत. कुठलाही डामडैल न बाळगता तब्बल ४२ वर्षे श्रीमहाराजांची सेवा निष्ठेने अविरतपणे करीत आहेत. त्यांचे पुत्र श्री निळकंठदादा पाटील यांनीही आपले जीवन श्री चरणी वाहीले आहे.

    श्री हरी पाटील ते श्री निळकंठ पाटील या प्रवासातील सर्व पाटील मंडळींनी शेगावमध्ये भक्तीप्रेमाचा सात्वीक मळा फुलवला, तो सदा टवटवीत राहील याची खबरदारी घेतली, त्याला शिस्त व नियमांचे कुंपण घातले. श्रीमहाराजांच्या सेवेबरोबरच श्रींच्या भक्तांची सेवा व्हावी हा परमोच्च विचार श्रीगजानन महाराज संस्थान करीत आहे. संस्थनच्या अनेक सेवा प्रकल्पातून आपणास ते दृश्य स्वरूपातून पहावयास मिळत आहे.

    कर्मयोगी श्री शिवशंकरभाऊ पाटील म्हणजे सात्वीकता, नम्रता आणि त्यागाचं मुर्तिमंत प्रतिक म्हणून श्री महाराजांच दर्शन घेतल्यानंतर ओढ लागते श्री शिवशंकरभाऊंच्या भेटीची. प्रत्येक वारीस त्यांची भेट घेणं शक्य नसलं तरी त्यांच्या आठवणीने माझे कर आपोआप जुळतात. निष्ठा आणि कर्माचा सागर असलेल्या भाऊंना माझा कोटी-कोटी प्रणाम !

    --श्री बाळकृष्ण कुलसंगे

    संस्थापक: श्री गजानन महाराज मंदिर
    उल्हासनगर - ३ जि. ठाणे

    मो. ९४२२६७०४४८
    साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ३ रा (अंक २७)

  • श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय तेरावा – क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग योग

    इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी क्षेत्रक्षेज्ञत्रविभागयोग नावाचा तेरावा अध्याय….

  • राष्ट्रधर्म

    मातृभूमीला मातृतुल्य मानले गेले आहे. ज्या देशाचे आपण नागरिक आहोत. ज्या भूमातेने आम्हास जन्म दिला. साधन-सुविधांच्या ‘माणूस’ बनवले ती भूमी खचितच आई आहे. म्हणूनच तर आम्ही आपल्या देशाला भारत माता संबोधतो. माणूस ज्या देशाचा नागरिक असतो तिथेच त्याला प्राथमिक शिक्षण व ज्ञान मिळत असते.

  • श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय नववा – राजविद्याराजगुह्य योग

    अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
    ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
    राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः

    इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
    ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
    राजविद्याराजगुह्ययोग नावाचा नववा अध्याय


    श्रीभगवानुवाच ।
    इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
    ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १

    श्री भगवान म्हणाले,
    निष्कपटी तू म्हणुन तुला हे गुह्यज्ञान देतो
    जे जाणुन घेता अशुभातुन मुक्तिलाभ होतो १

    राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
    प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥ २

    जे गुह्य अति अन् श्रेष्ठ असे साऱ्या विद्यांमध्ये
    पवित्र, उद्बोधक, सोपे अन् उचित धर्मामध्ये २


    अश्रद्धानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप ।
    अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ ३

    यावर नाही श्रध्दा ज्यांची असे पुरूष, पार्था
    मला न मिळता पुन: भोगिती जन्ममृत्युगर्ता ३

    मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
    मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ॥ ४

    अदृष्यपणे व्यापुनि आहे मी सारे जगत
    माझ्या ठायी प्राणिमात्र पण मी नच त्यांच्यात ४

    न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ।
    भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥ ५

    असे असुनिही माझ्यामध्ये प्राणिजात नसती
    पहा ईश्र्वरी करणि, करी मी जरि त्यांची निर्मिती ५

    यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् ।
    तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ६

    सर्व दिशांना वाही वारा राहुनि आकाशात
    तशी समज तू, जीवसृष्टि ही माझ्यामधि स्थापित ६

    सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् ।
    कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥ ७

    कल्पांती हे सर्व जीव माझ्यांत विलिन होती
    नवकल्पारंभी मी त्यांची करी पुन्हा निर्मिती ७

    प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ।
    भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥ ८

    प्रकृतीस अनुसरून जाहले जे जे परतंत्र
    पुन:पुन्हा निर्माण करी मी असे भूतमात्र ८

    न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ।
    उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ ९

    हे जे माझे कर्म, मी करी उदासीनतेने
    म्हणून ना मज बंधक होते ते सर्वार्थाने ९

    मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् ।
    हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥ १०

    माझ्या नजरेखाली करते प्रकृति ही निर्मिती
    याच कारणाने जगताला पार्था, येते गती १०

    अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
    परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ ११

    मनुष्यदेहामधि पाहुनि मज मूढ न ओळखती
    परमेश्र्वर जगताचा मी या सत्या ना जाणती ११

    मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः ।
    राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥ १२

    कर्म, ज्ञान, मन तसेच आशा हो निष्फळ त्यांच्या
    जे मोहाने जाति आहारी असुरी वृत्तीच्या १२

    महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः ।
    भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ १३

    पवित्र वृत्ती धारण करती जे महानुभाव
    भजती मजला अनन्यभावे जाणुनि अधिदेव १३

    सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः ।
    नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ १४

    निश्र्चयपूर्वक सदैव करती माझे संकीर्तन
    योगाचरणी होउन करती भक्तीने वंदन १४

    ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते ।
    एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥ १५

    तसे इतरही यज्ञ करूनि वा विविध अन्य रीती
    एकत्रित वा अलगपणे मम उपासना करती १५

    अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम् ।
    मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥ १६

    मी यज्ञ, तसा मंत्र मीच, मी अग्नि, तूप मीच
    मी समिधा, अन् तर्पणही मी, औषधही मीच १६

    पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः ।
    वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव च ॥ १७

    जगताचा आधार, पिता अन् माताही मीच
    मीच पितामह, चतुर्वेद मी, ॐकारहि मीच १७

    गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् ।
    प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम् ॥ १८

    मी सर्वप्रभू, सर्वगती, अन् सर्वसाक्षी, भर्ता
    शरणसखा मी, उगम स्थिती मी, मी निर्गमकर्ता १८

    तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च ।
    अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥ १९

    मीच आवरी अथवा सोडी उन्हा पावसाला
    अमृत अन् मृत्यू दोन्ही मी भल्या वाइटाला १९

    त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा
    यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।
    ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक-
    मश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥ २०

    साम, यजु, ऋक् या वेदांतिल कर्मे आचरुनी
    माझी पूजा करिती स्वर्लोकाचि आस धरुनी
    ते पुण्यात्मे देवेंद्राच्या स्वर्लोकी जाती
    अन् केवळ देवांस प्राप्य जे भोग तेहि घेती २०

    ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं
    क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
    एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना
    गतागतं कामकामा लभन्ते ॥ २१

    स्वर्गाच्या उपभोगानंतर जसे सरे पुण्य
    मर्त्यलोकि मग जन्म घ्यावया हो पुनरागमन
    अशा प्रकारे वेदत्रयीतिल कर्में करणाऱ्या
    करावया लागती स्वर्ग−भू अशा कितिक वाऱ्या २१

    अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
    तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ २२

    अनन्यभावे चिंतन माझे करूनी मज भजती
    त्यांच्या निर्वाहाची देतो, पार्था मी शाश्र्वती २२

    येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ।
    तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ॥ २३

    दुसऱ्या देवांवरच्या श्रध्देने करती यजन
    विधिवत् ना तरि पर्यायाने करती मम पूजन २३

    अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।
    न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥ २४

    कारण साऱ्या यज्ञांचा मी स्वामी अधिदैवत
    मजविषयी अनभिज्ञ म्हणुनी ते असती मार्गच्युत २४

    यान्ति देवव्रता देवान्पितृन्यान्ति पितृव्रताः ।
    भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥ २५

    देवव्रती देवांस, तसे पितृव्रती पितरांस
    जे ज्यांशी प्रामाणिक, मिळती जाउनिया त्यास
    अवलंबुन आहे हे ज्याच्या त्याच्या श्रध्देवरती
    माझ्यावर निष्ठा ज्यांची ते मज येउनि मिळती २५

    पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
    तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ २६

    पान, फूल, फळ, वा केवळ जल करती मज अर्पण
    निष्ठापूर्वक, ते प्रेमाने मी करतो ग्रहण २६

    यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
    यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ २७

    कौंतेया, जे भक्षण करिशी, हवन, दान करिशी
    सारे काही मज अर्पण कर जे जे आचरशी २७

    शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः ।
    संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ २८

    कर्माचे परिणाम शुभाशुभ जे असतिल काही
    मुक्त होउनि त्या सर्वांतुन मिळशिल मज ठायी २८

    समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ।
    ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥ २९

    मज सारे सारखे, कुणि नसे प्रिय वा अप्रिय
    भक्त आणखी माझ्यामध्ये नसे अंतराय २९

    अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
    साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ३०

    दुराचारी जरि भक्त, मानि मी साधूसम त्यास
    कारण त्याचे भक्तिमधि मन स्थिर असते खास ३०

    क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।
    कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥ ३१

    शीघ्र मिळे धर्मात्मापद त्या शांतीही शाश्र्वत
    कौंतेया, मम भक्त कदापी नसे नाशवंत ३१

    मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः ।
    स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ॥ ३२

    किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।
    अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥ ३३

    सत्वशील, ब्राह्मण वा राजर्षी जे क्षत्रीय
    पुण्यवंत मम भक्तीने जे ते तर नि:संशय,
    ममाश्रयाने नारी वा नर, वैश्य, शूद्रयोनी
    हे देखिल चिरशांति मिळवती, पार्था घे ध्यानी ३२
    दु:खवेदनापूर्ण अशा या मर्त्यलोकात
    वास्तव्य तुझे, म्हणुनि अर्जुना, हो माझा भक्त ३३

    मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
    मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ॥ ३४

    भक्तीपूर्वक मनात स्मरूनी कर मजला नमन
    या मार्गाने येशिल मजप्रत, हे कुंतीनंदन ३४

    इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
    ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
    राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥

    अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
    ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
    राजविद्याराजगुह्ययोग नावाचा नववा अध्याय पूर्ण झाला.

    -- मुकुंद कर्णिक.

  • हनुमान जन्मोत्सव’ – भगवान हनुमानाच्या उत्सवाचा दिवस

    २१ व्या शतकातही हनुमान जन्मोत्सवाचे महत्त्व पूर्वीसारखेच आहे. गेल्या काही शतकांमध्ये जग आमुलाग्र बदलले असताना, भगवान हनुमानाचे गुण, जसे की शक्ती, धैर्य, भक्ती आणि निस्वार्थीपणा, हे अजूनही महत्त्वाचे आहेत. हे गुण आपल्यात बाणवण्याचा श्रद्धाळू लोक प्रयत्न करतात.

  • कर्ता आणि ज्ञाता

    कुंभार व्हायचे ठरवणाऱ्या माणसाला काहीतरी घडवायचे असते मातीतून. त्याच्या बोटांची आणि मातीची दोस्ती पटकन् जमते. हा त्याचा अंगभूत गुण असतो (संचित. म्हणजेच गुणसूत्रांबरोबर आलेले वैशिष्ट्य). पण हा माणूस उत्तम कुंभाराकडे शिकतो सुद्धा.