वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
चित्तपावन ब्राह्मण वर्गात हे व्रत विवाहानंतर सलग पाच वर्षे करतात. त्याचा विधी थोडा भिन्न आहे. सकाळी देवीची पूजा करतात. त्यापूर्वी तुळशीची पूजा करून तेथील विवाहास जेवढी वर्षे झाली असतील तेवढे खडे आणून देवीजवळ ठेवतात. १६ पेरांची दुर्वा किंवा सोहळा धाग्यांचा रेशमी दोरा घेऊन विवाहास जेवढी वर्षे झाली असतील तेवढ्या गाठी मारतात.
श्रीकृष्णा नदी ही साक्षात् विष्णुस्वरूप व वेणी ही शिवस्वरूप असून या दोन्ही नद्या एकरूपाने अभिन्नपणे वाहतात म्हणूनच कृष्णा नदीला केवळ कृष्णा हे नाव नसून तिला कृष्णावेणी असे संबोधतात. अशा या दोन नद्या व शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती मिळून पंचगंगा असे सात नद्यांचे मिलन या क्षेत्री झाले आहे.
आपले आयुष्य उभे करणे हे कष्टाचे काम असते हे खरेच, पण कृतार्थ आणि कीर्तिमान जीवन उभे करणे हे तर आणखीनच कष्टाचे काम आहे. त्यासाठी एखाद्या मोठ्या ध्येयाचा ध्यास घ्यावा लागतो. एखादे स्वप्न पाहून, ते पूर्ण करण्यासाठी अविश्रांत श्रम करावे लागतात. असे कितीतरी थोर लोक आपल्या आजूबाजूला असतात.
दसऱ्याला सांस्कृतिक पैलूही आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. जेव्हा शेतकरी आपल्या शेतात सोनेरी पीक उगवल्यानंतर अन्नधान्याची संपत्ती घरी आणतो तेव्हा त्याचा आनंद आणि आनंद टिकत नाही. या आनंदाच्या प्रसंगी, तो देवाच्या कृपेचा स्वीकार करतो आणि तो प्रकट करण्यासाठी त्याची पूजा करतो.
दशश्लोकी निर्वाणदशकात श्रीमद् आदि शंकराचार्यांनी वेदांताचे सार सांगितले आहे. या रचनेच्या नावाशी साधर्म्य असलेले शंकराचार्यांचेच निर्वाण षटकही प्रसिद्ध आहे. नर्मदा तीरी एका गुहेत श्री गोविंदपादाचार्यांची भेट झाल्यावर त्यांनी विचारलेल्या ‘ तू कोण आहेस? ’ या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ही दोन स्तोत्रे ! परंतु दोघांची जन्मकथा एकच असली तरी त्यांच्या विषय मांडणीमध्ये फरक आहे
२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन्ही राष्ट्रीय सणांचं महत्त्व आणि गांभीर्यही आपण विसरत चाललो आहोत. शाळेतल्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना तर हे दोन्ही दिवस शिक्षेसारखे वाटतात. गेल्या २६ जानेवारीच्या आदल्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक दिसले. त्यांना नमस्कार केला.

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
विभूतियोग नावाचा दहावा अध्याय
श्रीभगवानुवाच ।
भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १
श्री भगवान म्हणाले,
महाबाहु पार्था तू असशी माझा प्रिय मित्र
म्हणुनि सांगतो तुझ्या हितास्तव परमज्ञानसूत्र १
न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ २
कळलो नाही मी देवाना वा महर्षिंनाही
मूळ मीच सार्या देवांचे आणि ऋषींचेही २
यो मामजन्मनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ।
असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३
मज अजन्म अन् अनंत जाणी जो नर निर्मोही
मी जगदीश्वर कळते ज्या तो पापमुक्त होई ३
बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः ।
सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ ४
मति, ज्ञान, संशयनिवृत्ती, क्षमा, सत्य, निग्रह,
सुखदु:ख तसे जननमरण अन् भय, निर्भय भाव, ४
अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ ५
समत्वबुध्दी, तृप्ति, अहिंसा, तप अन् दातृत्व,
यश, अपयश या साऱ्यांचा हो माझ्यातुनि उद्भव ५
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ ६
चार महर्षी अन् सप्तर्षी तसे मनु समष्टी
(पाठभेद: सात महर्षी, चार पुरातन, तसे मनु समष्टी)
या सार्यांना जन्म मजमुळे, अन् त्यातुन सृष्टी ६
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।
सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ ७
माझ्या कर्मांवर, सामर्थ्यावर धरि विश्वास
तो होतो ममभक्तिपरायण कर्मयोगी खास ७
अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ ८
उगमस्थान मी अन् सार्यांचा माझ्यातुन उपज
बुध्दिवंत हे जाणुनि भजती भक्तीपूर्वक मज ८
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ ९
भक्तिपूर्वक चित्त मजमधी गुंतवुनी सांगती
परस्परां मजविषयी, आणि स्वत: त्यात रमती ९
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०
प्रेमाने जे योगि भक्त मम सेवेमधि गर्क
त्यांना मी मजकडे यायचा दावितसे मार्ग १०
तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ ११
त्यांवरती अनुकंपा म्हणुनी तदंतरी जातो
ज्ञानाच्या तेजाने तेथिल अंधारा हटवितो ११
अर्जुन उवाच ।
परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥ १२
अर्जुन म्हणाला‚
अजर, अमर, आदिदेव, दिव्य तुम्हि आहा सर्वव्यापी
परब्रह्म तुम्हि, परमात्मा तुम्हि, परमधामही तुम्ही १२
आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा ।
असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १३
ऋषी असित, देवल, देवर्षी नारद, व्यासमुनी
असेच म्हणती आणि ऐकतो तुमच्याहीकडुनी १३
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १४
सत्य हेच मज मान्य, केशवा, तुम्ही सांगता ते
व्यक्तिमत्व तुमचे ना माहित देवदानवाते १४
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥ १५
भूतमात्र निर्मिता सर्व तुम्हि जगत्पती माधवा,
तुम्हास अंतर्ज्ञाने कळते तुम्ही कोण, देवा १५
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।
याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १६
कळल्या ज्या तुम्हा, सांगाव्या मजला मधुसूदन,
प्रवृत्ती तुमच्या ज्यायोगे राहता जग व्यापून १६
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १७
कसे करावे चिंतन, तुम्हा कसे आळवावे?
मज सांगा कुठकुठल्या रूपे तुम्हा ओळखावे? १७
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥ १८
अपुल्या शक्ती आणि महत्ता सांगा विस्तारून
अमृतमय ते बोल ऐकण्या आतुर मम कर्ण १८
श्रीभगवानुवाच ।
हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १९
श्री भगवान म्हणाले‚
हे कुरूश्रेष्ठा, तुला सांगतो ठळक ठळक माझ्या शक्ती
विस्ताराला अंत न माझ्या अशीच माझी प्रवृत्ती १९
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ २०
मीच अंतरात्मा रे ब्रह्मांडातिल साऱ्या भूतांचा
कुंतिसुता मी आदि, मध्य मी, तसा अंतही मी त्यांचा २०
आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् ।
मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ २१
मी आदित्यांतिल विष्णू, अन् मीच सूर्य तेजसांतला
वाऱ्यामधला मरिचि मी, तसा शशांक नक्षत्रांमधला २१
वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥ २२
वेदांमध्ये सामवेद मी, देवांमधला देवेंद्र
इंद्रियांमधे मन, अन् भूतांतिल जीवाचे मी केंद्र २२
रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ २३
रूद्रगणांचा मी शंकर, अन् कुबेर मी यक्षांमधला
अष्टवसूतिल पावक मी, अन् मेरूही पर्वतांतला २३
पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥ २४
पुरोहितांतिल मुख्य म्हणति ज्या तो मी आहे बृहस्पती
सेनानींमधि कार्तिकेय मी, जलाशयांमधि सरित्पती २४
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ २५
महर्षींमधी भृगुऋषी मी, ॐकार असे ध्वनींत मी
यज्ञांमधला जपयज्ञ, हिमाचलहि तसा निश्चलांत मी २५
अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः ।
गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥ २६
वृक्षांमध्ये पिंपळ, तैसा नारद देवर्षींमधला
गंधर्वांमधि चित्ररथ, तसा कपिलमुनि सिध्दांमधला २६
उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥ २७
सागरातुनी निर्मिति ज्याची तो अश्वांतिल उच्चश्रवा,
हत्तींमधि ऐरावत, तैसा नराधीप मी मनुज जिवां २७
आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥ २८
शस्त्रांमध्ये वज्र, तसा मी कामधेनु गायींमध्ये
जीवनिर्मितीमधि मदन मी, अन् वासुकि सर्पांमध्ये २८
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥ २९
नागांपैकी अनंत मी, अन् पाण्यासाठी वरूणहि मी
नियमनकर्ता यम मी आणिक, पितरांमधला अर्यम मी २९
प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ ३०
नियंत्रकांतिल काळ मी, तसा दैत्यांमध्ये प्रल्हाद
पशूंमधी मी सिंह, आणखी पक्षिगणांमधला गरुड ३०
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् ।
झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी ॥ ३१
वेगवान वारा मी, आणि शस्त्रधरांमधि दाशरथी
मत्स्यांमधे मकरमत्स्य, अन् सरितांमध्ये भागिरथी ३१
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ ३२
सृष्टीचा आरंभ, अंत, अन पार्था, मीच असे मध्य
विद्यांमधि अध्यात्म मीच, अन् वादींमधला मी वाद ३२
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च ।
अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ ३३
अक्षरांतला ‘अ’कार मी, अन् समासांतला मी द्वंद्व
अक्षय ऐसा काल मीच, अन् ब्रह्मदेव मी चतुर्मुख ३३
मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् ।
कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ ३४
सर्वांसाठी मी मृत्यू, अन् येणार्यांस्तव जन्महि मी
श्री, कीर्ति, वाचा, बुध्दी अन् धृती, श्रुती, नारींमधि मी ३४
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ ३५
स्तोत्रांमधला बृहत्साम मी, अन छंदांमधि गायत्री
मासांमधला मार्गशीर्ष, अन् ऋतूराज जो वसंत मी ३५
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ ३६
कपटींसाठी द्यूत मीच, अन् तेजस्वींचे मी तेज
व्यवसायांतिल यशही मी, अन् बलवानांचे मी ओज ३६
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः ।
मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ ३७
वृष्णींचा वासुदेव मी, अन पांडवामधे धनंजय
मुनींमधी मी व्यासमुनी, अन् कवींमधी शुक्राचार्य ३७
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥ ३८
दण्डकांतला दंड मी, तसा विजिगीषूंमधली नीति
गुपितांमध्ये मौन मीच, अन ज्ञानींमधली विज्ञप्ती ३८
यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥ ३९
आणि अर्जुना मीच आहे रे बीज भूतमात्रांचे या
माझ्याविरहित नसे कुणिहि तुला या इथे आढळाया ३९
नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥ ४०
ना गणती अन् अंतही तसा नाही रे माझ्या रूपा
तुज सांगितली ती तर केवळ थोडिच रूपे, परंतपा ४०
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम् ॥ ४१
सुंदर अन् तेजस्वी ऐशा असती ज्या सार्या गोष्टी
माझ्या तेजाच्या अंशांतुन होते त्यांची उत्पत्ती ४१
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥ ४२
तरी अर्जुना, हवे कशासाठी हे विस्तारित ज्ञान
अंश सूक्ष्मसा माझा राही जगताला या व्यापून ४२
इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥
अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
विभूतियोग नावाचा दहावा अध्याय पूर्ण झाला.
-- मुकुंद कर्णिक
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी गुणत्रयविभागयोग नावाचा चौदावा अध्याय.
विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या सर्वसत्ताधीश परमात्म्याविषयी अंतःकरणात प्रेम निर्माण होणे याचे नाव भक्ती. ही सारी सृष्टी त्या ईश्वराचीच विविध रूपे आहेत असे वाटू लागणे, त्याअनुरूप आपला व्यवहार होणे ही भक्तीची परिसीमा
सप्टेंबर २०१९ महिन्याचा गुरुतत्त्व विशेषांक दत्तमहाराजांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र गाणगापूर स्थित जय गुरुदेव आश्रम ट्रस्टचे संस्थापक ब्रह्मलीन परमपूज्य जगन्नाथ चिंतामण पाठक गुरुजी यांच्या जीवनावर आधारित आहे.
“भक्तकामकल्पदुम" श्रीमद्गुरुचारत्र” हा पाचवा वेद म्हणून मानल्या गेलेल्या परमाण प्रासादिक अलैकिक ग्रंथाची इ. स. १९५४ सालापासून गेली ६० वर्षे सातत्याने शेकड पारायणे करुन त्याद्वारे "ग्रंथ हेच गुरु” हे तत्त्व आपल्या आचार-विचार- उच्चारांनी सिध्द करणारे तसेच श्रीगुरुचरित्र ग्रंथात सांगितलेली वैदिक साधना अंगीकृत करुन श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाराजांशी तादाम्य पावून समर्पितवृत्तीने अलौकिक शांत जीवन जगणारे शांत प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री पाठक गुरुजी.
कडक शिस्तीच्या पोलिस खात्यात सुमारे चार दशके नोकरी करत असतानाही दत्तभक्तीच्या पाऊलवाटेवर आपले संपूर्ण जीवन तन्मयतेने समर्पित करणारी परमश्रध्दाळू गुरूकृपांकित व्यक्ती म्हणजे पाठक गुरुजी पूर्वी होते महत्त्व । ब्राह्मणांसी देवत्त्व । वेदबळे नित्यत्त्व । भुसूर म्हणती त्या काजा । श्रीगुरुचरित्र अध्याय २६.२४ या ओवीची आजही सत्यता पटवून देणारे भुदेव म्हणजे परमपूज्य पाठक गुरुजी. संसारात राहूनहीप्रयत्नपूर्वक परमेश्वराची कृपा प्राप्त करून घेता येते याचे स्वानुभूवात्मक उदाहरण म्हणजे पाठक गुरुजी.
आपल्या सर्वाच्या सहवासात राहून त्यागी, निस्वार्थी भावनेने वर्तन करीत नि:स्यीम उपासना करून झालेल्या ईश्वरी प्रेरणेने पवित्रतेची दैवी स्पंदने देऊ शकणारे नवे एकांतमय उपासना स्थान निर्माण करून त्या स्थानात वास्तव्य करणाऱ्याला निरपेक्ष ईश्वरीप्रेमाचे संस्कार मिळावेत एखादी “श्रीगुरुकृपा” महात्म्य प्राप्त केलेले महान “जगन्मित्र" म्हणजे आदरणीय पाठक गुरुजी.
मुक्काम पोस्ट नांदेड तालुका: धरणगाव, जिल्हा: महाराष्ट्र येथील श्रीराममंदिराचे मुख्य पुजार श्री. चिंतामण आत्माराम पाठक यांचे ज्येष्ठ सुपुत्र पिढ्यानपिढ्या “श्रीराम" उपासक “पाठक" या ब्राह्मण घराण्यात श्रीदत्तमहाराजांना केलेल्या नवसामुळे पाठकगुरुजींचा जन्म झाला. बालपणापासूनच आई- वडिलांच्या धार्मिक स्कारांमुळे गुरुसेवा आणि ईश्वरभक्ती मनावर बिंबली गेली. घरच्या श्रीराममंदिरापासून सुरू झालेला अध्यात्माचा श्रीगणेशा, शिक्षणोत्तर पितृआज्ञा प्रमाण मानून केलेल्या विवाहानंतर दत्तभक्तीकडे वळला. श्रीगुरुचरित्र या परमप्रासादिक ग्रंथाची पारायणसेवा हीच लौकिक उनत्तीची आणि आपल्या अलौकिक उध्दाराची गुरुकिल्ली आहे याबद्दल अनुभूतीपूर्वक मनाची खात्री पटली. गुरुजींबद्दल त्यांच्या आईने मनी बाळगलेली नोकरी करण्याची इच्छा आणि वडिलांनी अपेक्षिलेली नोकरी करण्याची आणि वडिलांनी अपेक्षिलेली भिक्षुकी या दोन्ही इच्छांना यथोचित मान देऊन गुरुजींनी आपल्या चार दशकांच्या नोकरीच्या कालखंडात नोकरी आणि भिक्षुकी यांचा योग्य समतोल राखत दत्तभक्ती वृध्दिंगत केली. पहाटे तीन ते रात्री १२ वाजेपर्यतच्या आपल्या व्यस्त लौकिक दिनचर्येतून स्वतःसाठी मिळालेला फावला वेळ गुरुजींनी श्रीगुरुचरित्र पारायणसेवा करीत सत्कारणी लावलो. प्रथमतः नोकरीतील भ्रमंती, देवदर्शनासाठी तीर्थाटन आणि सेवानिवृत्तीनंतर ईश्वरी इच्छेने सोपवलेल्या दत्तकार्यासाठी “गगनभरारी" ही गुरुजींनी "अनवाणी” पायांनी केली. धर्मपत्नी माईंच्या गृहकृत्य दक्षपणामुळेच जगाचा संसार सांभाळणाऱ्या गुरुजींचा प्रपंच परमार्थरूप झाला.
शंभरहून अधिक गायत्री पुरश्चरणे आणि अखंड श्रीगुरुचरित्र पारायणसेवा आपल्या आयुष्यात करणारे परमपूज्य गुरुनाथबाबा दंडवते हे गुरुजींना सद्गुरु म्हणून लाभले आणि बद्रीनाथ या प्राचीन तीर्थक्षेत्री गुरुजींना दंडवतेबाबांकडून गुरुमंत्र मिळाला. गुरुमंत्राच्या अखंड अनुसंधानाने पारायणसेवेमुळे आणि अंगकृत केलेल्या गायत्री उपासनेमुळे ईश्वरी सत्य कळण्याचे भाग्य गुरुजींना लाभले. प्रयत्नांती परमेश्वर !
निवृत्तीनंतर दत्तभक्तीतच रममाण झालेल्या या पाठक दांपत्यांच्या घरात अक्षरक्षः स्वर्ग अवतरला. पूर्वसुकृतामुळे आणि ईश्वरकृपेने कित्येकांना गुरुजींच्या सत्संगतीचा परमलाभ झाला आणि त्यांच्या श्रध्दाशील हृदयांत दत्तभक्तीची चैतन्यमयी पाऊले उमटली.
जयासी प्रसन्न होय गरु । तयाचे घरी कल्पतरु । चिंतिले फळ देतसे ।।
श्रीमद गुरुचरित्र अध्याय ४६.४१
याचे सवौत्कृष्ट उदाहरण म्हणजे शारिरीक अपंगत्त्वामुळे शाळेची पायरीही न चढलेल्या श्री. महेश मनोहर पाटील यांनी पाठकगुरुजींच्या आशीर्वादामुळे संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथ “हस्तलिखित केला! याचा प्रत्यय ज्यांनी घेतला ते खरोखरच भाग्यवान ! ही दत्तकृपेची अनुभूती गुरुजींच्या माध्यमातून दत्तदर्शनासाठी येणाऱ्या कित्येक दत्तभक्तांच्या जीवनांतही पाझरली आणि जय गुरुदेव भक्तपरिवाराचा उदय झाला. माहीम येथील स्वगृही मग दर गुरुवारी दत्तदरबार भरू लागला.
ईश्वर डोळयांना दिसत नाही पण त्यांची ईशकार्यातून अनुभूती येते. गुरुजींची दत्तभक्तीची इमारत फळाला आली. आणि श्रीदत्तमहाराजांच्या प्रेरणेने श्री क्षेत्र गाणगापूर या त्यांच्याच युगानुयुगे असलेल्या सिध्दभूमीत दत्तभक्तांना श्रीगुरुचरित्र या दत्त सांप्रदायिक प्रमाणग्रंथाची पारायणसेवा अल्प खर्चात करणे सूकर व्हावे या उदात्त हेतूने खिशात कोणतीही आर्थिक बचत नसतानाही “श्रीगुरुदेवनिवास” या वास्तूची निर्मिती झाली.
ऐक शिष्या नामकरणी । तू गुरुभक्ती शिरोमणी ।
तुझी भक्ति श्रीगुरुचरणी । लीन होय निर्धारी ।।
“निमित्त माझे करूनि लीला श्रीदत्तगुरु करिती" अशी मनाची नामधारकाप्रमाणे संपूर्ण शरणागत अवस्था ठेवून दैनंदिन लौकिक व्यवहार श्री दत्तमहाराजांच्याच इच्छेने आणि कृपाशीर्वादामुळे होत आहेत. असा भक्तीचा आदर्श लोकांसमोर ठेवणारे गुरुजी प्रसिध्दीपासून नेहमच पराडमुख राहिले. “मी चालत नाही, मला भगवंत चालवतो!” “मी दत्ताचा आहे आणि माझ्याकडून होणारे प्रत्येक कार्य हे श्रीदत्तमहाराजांचे आहे" अशी प्रबळ जीवननिष्ठा अंगी बाळगून, येणारा
प्रत्येक क्षण, घडणारी प्रत्येक घटणा आणि दारात येणाऱ्या व्यक्तीचे आगमन श्रीदत्तमहाराजांच्या संकेतानुसारच आहे असा साक्षीभाव मनी बाळून त्याला यथोचित न्याय गुरुजी देत. “मज आवडे अथवा न आवडों । “तु” जे इच्छिसी तेंचि घडो । हे मागण्या अवघडों, जीभ माझी ! असे गुरुजी प्रार्थनेतही म्हणत.
सद्गुरु दंडवतेबाबा गुरुजींना “जगन्मित्र” या नामाभिधानाने संबोधले. जग आणि मित्र दोन्ही शब्दांचा अर्थ व्यापक सखोल आहे. जगाचा मित्र तो जगन्मित्र ! वसुधैव कुटंबकम् या न्यायाने पाहात आपल्या प्रेमळ, संवेदनशील मनाने त्यांच्या लॉकेक - अलौकिक प्रश्नांना कवेत घेत, करुणामय वात्सल्याने त्यांना दत्तभक्तीकडे वळवला. “महाराज सांभाळतील" असे संबोधून जणू भक्तांच्या क्षेमकल्याणाची ग्वाही देणाऱ्या या “जगन्मित्राला” कोटी कोटी प्रणाम.
भक्तगणांना तारणारा हा भूदेवच ! ज्यांच्या मनाचे निवासस्थान सदैव श्रीदत्तमहाराज श्रीक्षेत्र गाणगापूर. “अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त" हा गुरुजींचा श्वास ! श्रीगुरुचरित्र ग्रंथ हा गुरुजींचा प्राण आणि “श्रीगरुदेवनिवास" हा उपक्रम हा त्यांचा ध्यास, अगदी प्राणांपलीकडे !
गुरुजींनी दिनांक २० ऑगस्ट २०१४ रोजी डोंबिवली येथील त्यांचे द्वितीय सुपुत्र संजय यांचे घरी देह ठेवला. मूर्तीच्या स्वरूपात गुरुजी आश्रमात पुन्हा सगुणरूपांत अवतरित आहेत. आश्रमात आजही क्तांना त्यांच्या असलेल्या चिरंतर आस्तित्ताची जाणीव होत आहे, स्वप्नदृष्टान्तामार्फत शिष्यांना अलौकिक मार्गदर्शन मिळत आहे. आणि गुरुजींमार्फत गुरुतत्त्वाच्या सोबत - सहवासाचे नित्य प्रत्यंतर आजही भक्तांना येत आहे. “श्रीगुरुचरित्र” घडत आहे !
श्रीगुरुचरित्र पारायणाद्वारे श्रीगुरु श्रीमननृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी सेवारत व्हा आणि आपली लौकिक उनत्ती आणि पारमार्थिक उददार करून घ्या. हीच मानवी जीवनाची गुरुकिल्ली आहे. असा पाठकगुरुजींचा सर्व भक्तांसाठी संदेश आहे.
म्हणे सरस्वती गंगाधरू । जवळी असता कल्पतरु । न ओळखिसी अंधवहिरू । वाया कष्टती दैन्यरीती ।।३७।।
भजा भजा हो श्रीगुरुसी। जें जें काम्य तुमचे मानसी । सिध्द होईल त्वरितेंसी । आम्हा प्रचिती आली असो ।। ३८ ।।
श्री गुरुचवित्र अध्याय ४७ वा
“या भारताची लोकशाही । होवोनि अध्यात्मिक लोकशाही वरो आदर्शशही। कृष्णकृपे, दत्तकृपे, स्वामीकृपे” असे गुरुजींचे श्रीदत्तमहाराजांकडे मागणे आहे.
श्रीगुरुदेवनिवास या स्थापन झालेल्या आश्रमात श्रीगुरुचरित्र पारायणसेवा अखंड चालू राहावी ही त्यांनी सांगिललेली त्यांची मनोकामना आज भक्तगणांच्या आश्रमात होण्याऱ्या पारायणसेवेमुळे फलद्रुप होताना दिसत आहे.
।। श्री गुरुदेव दत्त ।।
-– श्री. संतोष शामराव जोशी
साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ५ वा, (अंक २९)
Copyright © 2025 | Marathisrushti