(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मुले हिंसक बनतात तेव्हा…

    विषवृक्षाला विषारी फळे येऊ लागली तर त्यात एवढे दचकण्यासारखे काय आहे? जीवनार्थ संपून अनर्थ माजू लागला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? अजूनही जमिनीची मशागत तर आपणच करतो आहोत ना…!

      June 1, 2010


  • चाट आणि सँडविच

    तर चाट, अर्थात भेळपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, दही बटाटा पुरी, रगडा पॅटीस इ. इ. इ.. अर्थात जीभ चिक्कार चाळवणारे चविष्ट पदार्थ. सोबत भैयाच्या हाताची कमाल आणि खाऊन तृप्त झाल्यावर अखेरीस, उकडून कुस्करलेला बटाटा,. बारीक शेव आणि चाट मसाल्याच्या स्टफ्फिंगसह तोंडात जाणारी गोल पुरीची मुखशुद्धी.

      September 1, 2022


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २९

    या श्लोकात भगवान विष्णूंच्या छातीवर असणाऱ्या श्री व चिन्हाचे वर्णन आचार्य श्री करीत आहेत. यामागे एक पौराणिक कथा आहे.

      January 1, 2021


  • आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग १

    विसाव्या शतकामधे अमेरिकन शेती व्यवसाय आणि एकंदरीतच ग्रामीण जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. विसाव्या शतकाच्या सुरवातीस अमेरिकेची एकूण लोकसंख्या होती ७६ दशलक्ष. या पैकी निम्याहून अधिक वस्ती ही ग्रामीण भागातच एकवटलेली होती. त्यावेळी शेती व्यवसाय हा प्रामुख्याने, प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या लहान लहान फार्म्सवर व्हायचा. (अमेरिकन शेतीच्या संदर्भात, ‘फार्मिंग’ ही संज्ञा किंवा संकल्पना लवचिकपणे वापरायची आहे. धान्योत्पादन आणि पशुपालन हे परस्परांशी संलग्न किंवा पूरक उद्योग असल्यामुळे बरेच फार्म्स हे संमिश्र स्वरूपाचे असतात. त्यामुळे ह्या दोन्ही क्षेत्रांशी निगडीत अशा उत्पादनाला ‘फार्मिंग’ अशा ढोबळ संज्ञेने संबोधले जाते). विसाव्या शतकाच्या सुरवातीस शेती आणि ग्रामीण भागाची अजोड अशी सांगड होती. एकंदर काम करणार्‍या लोकांपैकी ४०% लोक शेती व्यवसायात होते. या प्रचंड मनुष्यबळाला, शेतांवर राबणार्‍या सुमारे २२ दशलक्ष जनावरांची (मुख्यत्वे घोडे, खेचरं, बैल) जोड होती. बहुतेक फार्म्सवर त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार काही धान्यं, कुठे तेलबिया, कुठे फळं, भाजीपाला, जोडीला वराहपालन, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, अशा चार पांच तरी वैविध्यपूर्ण गोष्टींचे संमिश्र उत्पादन व्हायचे.

    याच्या उलट विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून, शेती व्यवसाय हा दिवसेंदिवस संख्येने कमी, परंतु आकारमानाने मोठमोठ्या अशा फार्म्सवर एकवटत चालला आहे. फार्म्सचे संमिश्र उत्पादनाचे स्वरूप लोप पावत चालले आहे आणि त्यांना एका ठरावीक साच्याच्या, यांत्रिक उत्पादन करणार्‍या कारखान्याचे रूप येत चालले आहे. फार्म्सची उत्पादकता कैक पटींनी वाढली आहे. मनुष्य आणि पशुबळाच्या जागी यांत्रिकीकरणाने आपले हात पाय पसरले आहेत. एकविसाव्या शतकातल्या एकूण काम करणार्‍या लोकांपैकी आज केवळ २% लोक शेतीव्यवसायात आहेत. हे मर्यादित मनुष्यबळ सुमारे ५ दशलक्ष ट्रॅक्टर्सच्या मदतीने, पूर्वी जे काम २२ दशलक्ष घोडे, खेचरं आणि बैल करत होते, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक आणि कमी वेळात करत आहेत. दिवसेंदिवस तरूण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे आणि ग्रामीण भागातून, उच्च शिक्षणासाठी, नोकरी व्यवसाया निमित्त शहराकडे जाणार्‍यांचा ओघ वाढतच चालला आहे. याचाच परिणाम म्हणजे, एकेकाळी मुख्यत्वे ग्रामीण स्वरूपाच्या असलेल्या अमेरिकेत आज ग्रामीण भागात जेमतेम २०% लोक उरले आहेत. एके काळी ग्रामीण भागातील बहुतेक सर्व जिल्हे (counties) हे मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायावर अवलंबून असायचे. परंतु २००० साली, एकूण ग्रामीण, निम-ग्रामीण जिल्ह्यांपैकी केवळ २०% जिल्हे मुख्यत्वे शेतीवर अवलंबून होते.

    एक गोष्ट निर्विवाद आहे ती म्हणजे अमेरिका हा दानशूर देश आहे. दुसर्‍या महायुद्धापासून, जगाच्या कान्याकोपर्‍यात नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, उपासमारी सारखी संकटे जिथे जिथे उद्भवली आहेत, तिथे तिथे अमेरिकेएवढी सातत्याने सढळ हाताने मदत फारच कमी देशांनी केलेली आहे. यामागील राजकारण, अर्थकारण, व्यापारी वृत्ती, युध्दपिपासू भूमिका, वगैरे छटांचा विचार बाजूला ठेवला तर सामान्य अमेरिकन माणसाच्या दानीपणाबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही. अर्थात अमेरिकन माणसाचे खिसे जगातील इतर अनेक सामान्य माणसांच्या खिशापेक्षा गरम आहेत ही गोष्ट खरी. परंतु केवळ खिशात पैसे असून चालत नाही; सत्कारणी दान देण्यासाठी तशी वृत्ती देखील लागते आणि ती सामान्य अमेरिकन माणसात निश्चितच आहे.

    दुसर्‍या महायुद्धाच्या पूर्वी ही मदत मुख्यत्वे सर्व सामान्य नागरिकांकडून होत असे. महायुद्धानंतर बेचिराख झालेल्या युरोपियन देशांना मदत करण्यासाठी, राष्ट्राध्यक्ष ट्रुमन यांच्या प्रशासनाला, एखाद्या मोठ्या केंद्रवर्ती संस्थेची गरज भासू लागली. त्यावेळी गाजलेल्या ‘मार्शल प्लॅन’ अंतर्गत, अमेरिकेने युरोपला तब्बल १३ अब्ज डॉलर्सची मदत केली. पुढे याच ‘मार्शल प्लॅन’च्या धर्तीवर परंतु लहान प्रमाणात, आफ्रिका, एशिया आणि मध्य व दक्षिण अमेरिकेतील गरीब देशांना मदत पुरवण्याचा उपक्रम जारी करण्यात आला. त्यानंतर आलेल्या विविध राष्ट्राध्यक्षांच्या प्रशासनांनी देखील हा मदतीचा ओघ अव्याहत चालू राखण्याची काळजी घेतली. या मदतीमधे आर्थिक पाठबळ आणि तंत्रज्ञानाबरोबरच अन्नपदार्थांचा देखील मोठाच वाटा असायचा.

    अमेरिकेत नैसर्गिक साधन संपत्तीची काही कमतरता नाही. अफाट पसरलेली सुपीक जमीन, मुबलक पाणी, पोषक हवामान, आधुनिक वैज्ञानिक संशोधनाचे भक्कम पाठबळ आणि एकंदरीत कृषी / पशुपालनाचे कित्येक दशकांपासून होत आलेले यांत्रिकीकरण, यामुळे अमेरिकेने कृषी / पशुपालनाच्या क्षेत्रांमधे जगामधे अव्वल स्थान पटकवावे यात काही नवल नाही. या अफाट कृषी उत्पादनाच्या जोरावर अमेरिका जणू काही जगाचे धान्य कोठारच बनून गेली. त्यामुळे जगाला मदत पुरवण्याच्या भव्य – दिव्य योजनांमधे, अमेरिकन शेतकर्‍यांनी उगवलेल्या धान्य आणि पशुजन्य अन्नपदार्थानी सिंहाचा वाटा उचलावा ही गोष्ट ओघाने आलीच. गेल्या ५०-६० वर्षांत या मूळ कल्पनेचा गाभा जरी तोच राहिला असला तरी त्यात फरक हा झाला आहे की, १९६० साली एक अमेरिकन शेतकरी जगातील सुमारे २६ लोकांना खाऊ घालत होता तर २००८ सालचा एक अमेरिकन शेतकरी जगातील सुमारे १४४ लोकांना पुरेल एवढं अन्न उत्पादन करत आहे.

      October 20, 2015


  • छत्रपती शिवाजी महाराज

    आदरणीय गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो , आज मी जगाचा इतिहास बदलवणा-या श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माझे विचार मांडणार आहे.

    १९ फेब्रुवारी १६३० रोजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि ३ एप्रिल १६८० रोजी त्यांचा मृत्यू रायगडावर झाला. आजवर अनेक राजे होऊन गेले परंतु पन्नास वर्षांचे आयुष्य लाभलेला हा राजा इतिहासात अमर झाला. शहाजीराजे आणि जिजबाइन्च्या या पुत्राने चालणे पिचलेल्या महाराष्ट्राला स्वत:चे राज्स्वराज्य दिले. याच मराठी राज्याने पुढे १८१८ पर्यंत जवळजवळ पुर्ण भारतावर अंमल चालवला.

    लहानग्या निजामाला मांडीवर घेऊन शहाजीराजांनी अहमदनगरच्या निजामशाहीचा कारभार पहिला. अल्पकालाच्या या अनुभावाने त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पहिले. हे स्वप्ना पूर्ण केले ते शिवरायांनी. लहान असताना महाराजांनी जिजाऊ मासाहेबांच्या तोंडून रामायण- महाभारतातील अनेक कथा ऐकल्या. त्यांच्यावर संस्कार झाले ते शूर, निधड्या, कर्तव्यदक्ष राजांचे. यातून घडलेल्या महाराजांनी मग रांगड्या मावळ्यांचे सैन्य बांधून आधी आदिलशाही, मग मोगल सत्तेचा पराभव केला व साकार झाले स्वराज्य.

    अफजलखानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेला वध, सिद्दी जौहरच्या पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यातून सुटका, साहिहीस्तेखानाची लाल महालात छाटलेली बोटे, आग्र्याहून सुटका, सुरतेची लुट किती तरी घटना महाराजांच्या कुशल युद्धानितीची साक्ष आहेत.

    महाराजांनी कुणावरही अन्याय होऊ दिला नाही. त्यांनी दिलेल्या आज्ञापत्रातील सुचना आजही पाळल्या पाहिजेत. यात त्यांनी प्रजेवर अन्याय करण्यास, झाडे तोडण्यास ,मनाई केली आहे.

    महाराजांनी बांधलेले स्वराज्य इतके मजबूत होते कि त्यांच्या मृत्युनंतरही मराठे सत्तावीस वर्षे मोगलांशी लढतच राहिले. महाराजांनी घडवलेले हे सैन्य भारतभर दिग्विजय करत फिरले. इंग्रज, पोर्तुगीज, हब्शी यांना समुद्रावरच रोखून धरण्याकारीता महाराजांनी आरमार उभे केले. असे सर्व बाजूंनी संरक्षित केलेले मराठी स्वराज्य मग खूप मोठे झाले. महाराजांच्या त्या प्रेरणादायी आठवणींनी आजही महाराष्ट्राला स्फूर्ती मिळते.

    धन्यवाद.

    जय शिवाजी जय भवानी.

    ---------------------------------------------------------------------------------------------------

    देवव्रत राजेंद्र चौरे, ५वी अ १, महात्मा स्कूल ऑफ अकॅडेमिक्स अंड स्पोर्ट्स, न्यू पनवेल.

      February 19, 2015


  • संयुक्त राष्ट्रसंघाचा वर्धापन दिन

    ‘युनो’चा उद्देशच जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे हा आहे. ही जबाबदारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मार्फत पार पाडली जाते.

      October 24, 2021


  • स्वतंत्र झालो, स्वातंत्र्य कुठे?

    भारत इंठाजांच्या गुलामगिरीतून मुत्त* झाला; स्वतंत्र झाला. बघताबघता या घटनेला 59 वर्षे उलटली. या 59 वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.

      August 13, 2006


  • आपण सुसंस्कृत मुखवटे घातलेले विकृत माणसं

    आपण सुसंस्कृत मुखवटे घातलेले विकृत माणसं

    वासुदेव, पिंगळा, पोतराज इत्यादी पात्रे मला कधीच संस्कृती वाटली नाही..उलट भटक्यांच्या पिळवणुकीची सांस्कृतिक व्यवस्थाच वाटत आलीय.

      January 14, 2024


  • महर्षी व्यास, आणि महाभारतकालीन जीवनाचे कांहीं पैलू

    महाभारत हें महाकाव्य भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. महाभारताचे मुळ रचयिते व्यास महर्षी आहेत, हें आपल्याला माहीत असतेंच. व्यास हे केवळ या ग्रंथाचे रचयिते नव्हते, तर त्यांचा त्याच्याशी प्रत्याप्रक्षपणें संबंधही आहे. आपण व्यासांबद्दल जरा माहिती करून घेऊं या; आणि त्याचबरोबर महाभारतकालीन जीवनाच्या कांहीं पैलूंकडेही नजर टाकूं या.

      January 1, 2018


  • गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – ६

    आत्ता पर्यंत: टीम पुणे त्रिकोणी ग्रहावर उतरली. यानातून बाहेर येऊन शहराकडे निघाली. वाटेत एक नदी आडवी आली. बोट बरोबर समोरच्या तीरावर असलेल्या कॅनॉल मध्ये न्यायची होती. स्टीअरिंग जॅम झाले होते आणि प्रवाह खूपच जोरात होता. बोट कॅनॉल मधे नाही नेता आली तर…

      May 8, 2021