वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ग्रॅन्ड ओल्ड मॅन ऑफ इंग्लिश क्रिकेट किंवा ‘पोंद्या’ या नावाने ओळखल्या जाणार्या सर पेलहॅम फ्रान्सिस वॉर्नरचा जन्म २ ऑक्टोबर १८७३ रोजी त्रिनिदादमध्ये झाला. २ ऑक्टोबर १९३९ रोजी कर्नाटकातील मंगलोरजवळील मल्कीत बुधिसागर कृष्णाप्पा कुंदरन यांचा जन्म झाला.
September 28, 2010
८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटा - बदलिच्या निर्णयाने मोदी सरकार ने धमाका उडवून दिला. कोणी त्याचे समर्थन करो , कोणी विरोध करो ; पण कोणीही दुर्लक्ष करूच शकणार नाही . " अशाच स्वरूपाचा तो निर्णय आहे . या निर्णयांच्या अंमलबजावणीमुळे अक्षरशः सर्वांनाच या ना त्या प्रकारे स्वतःच्या आर्थिक व्यवहारांचा पुनर्विचार करावा लागत आहे . एक प्रकारे या निर्णयांचा पाठपुरावा हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनत आहे . . . . सरकारच्या समर्थकांसाठी आणि विरोधकांसाठीही .
तेंव्हापासून माझ्या मनात असे येत आहे कि ही कदाचित केवळ सुरुवात आहे. अगदी आर्थिक क्षेत्रापुरता विचार करायचा झाला तर वस्तू आणि सेवाकर ( GST ) ची अंमलबजावणी उशिरात उशीरा ऑगस्ट - सप्टेंबर २०१७ च्या सुमारास होणे, आर्थिक वर्ष सध्याच्या एप्रिल ते मार्चच्या ऐवजीजानेवारी ते डिसेंबर करण्याची घोषणा होणे , वैयक्तिक आणि संस्थात्मक आयकरात दर आणि करपात्र उत्पनाच्या पातळ्यांमधे बदल होणे , जास्तीतजास्त आर्थिक व्यवहार बन्कान्मार्फतच करण्याची सक्ती होणे , बन्कान्मार्फत होणारे व्यवहार हा काही प्रमाणात तरी कर - रचनेचा पाया होणे आणियावर्षी अर्थसंकल्प जरी १ फेब्रुवारी २०१७ ला सादर होणार असलातरी नंतरच्या काळात तो नोव्हेंबर - डिसेंबर मधेच सादर होणे असे बदल होण्याचीशक्यता जरासुद्धा नाकारता येत नाही .
अर्थातच असे बदल फक्त आर्थिक क्षेत्रातच होतील असे मला आधीही वाटत नव्हते . आणि भारतीय लष्कराच्या सर - सेनापतीची नेमणूक करताना दोनआधिकार्यान्ची वरिष्ठता डावलली गेली हे पाहिल्यावर तर जास्तच तसे वाटू लागले आहे . पण त्याचवेळी हेही लक्षात घेतले पाहीजे कि त्याच आठवड्यातसर्वोच्च न्यायालयाच्या सर - न्यायाधीशान्ची निवड करताना अशी वरिष्ठता डावलली गेलेली नाही . त्यात संबंधित न्यायाधीशनी काही अवघड निर्णयघेतले असले तरी सुद्धा !
त्यातच या दोन ( सरसेनापती आणि सरन्यायाधीश ) नेमणुका होत असतानाच त्याच काळात भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्ष - पदी खासदारपूनमताई महाजन यांची नेमणूक , निवड होणे हे मोठे सूचक आहे . राजकीय क्षेत्रातही उलथापालथ होणार अशा अर्थाने ही नेमणूक सूचक आहे . महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री नामदार पंकजाताई मुनढे यांचे पंख येणाऱ्या काळात छाटले जातील असा तर या नेमणुकीतुन दिला जाणारा संकेततर नाही ना हे बघणे महत्वाचे ठरू शकेल . तसे नंतर करायचे असेल तर मुनढे - महाजन गटाच्या मंडळी कडून होऊ शकणार्या संभाव्य विरोधाची धारकमी करण्यासाठी मदत म्हणून तर ही नेमणूक आधीच केली गेली नाहीये ना हे तर येणारा काळच ठरवेल .
राजकीय क्षेत्रात होऊ शकणारा एक संभाव्य बदल म्हणजे २०१७ - १८ सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत संमत झाल्यानंतर केंद्रीय मंत्री -मंडळात होऊ शकणारे बदल . असे बदल होतील असे जर ग्रुहित धरले तर त्यापैकी एक बदल असा असू शकतो कि विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री मा . श्री. अरुण जेटली यांची अर्थखात्यातून बदली . अशी बदली जर झालीच तर जेटली ग्रुह , संरक्षण किंवा परराष्ट्र - व्यवहार यांपैकी कोणत्या खात्याचे तेमंत्री बनतील हे बघणे उदबोधक ठरेल .
कारण अरुण जेटली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत विश्वासातले मंत्री आहेत . २०१४ च्या मोदी लाटेत अम्रुतसर सारख्या लोकसभा मतदार -संघातून निवडणूक हरूनही ते अर्थसारख्या महत्वाच्या खात्याचे मंत्री आहेत . सुरवातीस तर अर्थखात्याबरोबरच संरक्षण खात्यासारख्या दुसऱ्याअतिशय महत्वाच्या खात्याचा कार्यभार त्यांच्याकडे होता .
त्यामुळे अरुण जेटली यांची अर्थखात्यातून बदली झालीच तरी ती परराष्ट्र - व्यवहार , संरक्षण किंवा ग्रुह अशा अतिशय मान्यवर आणि महत्वाच्या खात्यातच होण्याची शक्यता आहे . विद्यमान परराष्ट्रमंत्री मा . सुषमाजी स्वराज यांची नुकतीच एक मोठी सर्जरी झाली आहे . त्यामुळ मा . श्री . अरुण जेटली हे जर अशा संभाव्य फेरबदलात परराष्ट्रमंत्री झालेच तर सुषमाजी लोकसभा सभापती होण्याची शक्यता आहे . भाजपाचे ज्येष्ठ नेते मा . श्री .लालकृष्ण अडवाणीजी यानी अलीकडेच संसद न चालल्याबद्दल केलेल्या निषेधाची दखल घेतल्याचा संकेत त्यातून दिला जाऊ शकतो . सुषमाजी तशाही अडवाणी गटाच्या मानकरी असल्याची चर्चा माध्यमात होत असते हे लक्षात घेता तोही भाग असेल . निदान असू शकतो . तसे झाल्यास लोकसभेच्या सध्याच्या सभापती मा . सुमित्राताई महाजन यांचा समावेश एकतर केंद्रीय मंत्रीमंडळात होऊ शकतो ( अटलजीन्च्या मंत्रीमंडळात त्यामंत्री होत्याच . ) किंवा एखाद्या मोठ्या राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ति होऊ शकते .
अशा संभाव्य फेरबदलात जेटली साहेब परराष्ट्रमंत्री होण्यास एकच अडचण वाटते आणि ती म्हणजे स्वतः पंतप्रधान मा . श्री . नरेंद्र मोदी यांचे स्वतचेया खात्यात इतके सातत्यपूर्न लक्ष असते कि जेटली साहेबांसारखा त्यांचा अत्यंत विश्वासू मंत्री ते या खात्यास देतील का ? मात्र खरंच तसेच झाल्यास सध्या एम. जे . अकबर आणि व्ही . के . सिंग असे दोन मातब्बर राज्यमंत्री परराष्ट्र खात्यात आहेत . त्यातल्या अगदीच दोघांचीही या खात्यातून जरीबदली झाली नाही तरी निदान एकाची तरी होईल अशी शक्यता आहे .
जर अशा संभाव्य फेरबदलात जेटली साहेब परराष्ट्रमंत्री झाले नाहीत तर दुसरी शक्यता म्हणजे ते केंद्रीय ग्रुहमन्त्रि होतील . मात्र ते उत्तर प्रदेशच्याविधान - सभा निवडणुकात काय निकाल लागतो यांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल . उत्तर प्रदेशात भाजपाचे राज्य त्या निवडणुकात आल्यासमा . श्री . राजनाथसिंगजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यास ही शक्यता जास्त आहे .
मा . श्री . अरुण जेटली अशा संभाव्य फेरबदलात जर ग्रुह किंवा परराष्ट्रमंत्री न झाल्यास संरक्षणमंत्री होण्याचीही शक्यता आहे . सध्याचे संरक्षणमंत्री मा. श्री . मनोहर पर्रिकर यांची कार्यक्षमता , निस्प्रुहता , निरलसता , बुद्धीमत्ता या कशाचाच प्रश्ण नाही . पण एका विशिष्ट वयाननन्तर सार्वजनिक पदीन राहण्याचा त्यांचा स्वतचाच स्वयंघोषीत निर्णय आणि काही कालापूर्वीच्या त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी " संरक्षण खात्यात स्थिरावलो आहे , पणदिल्लीत नाही " हे उत्तर यावरून ही शक्यता वाटते .
मा . सुषमाजी स्वराज यांच्या बाबत वाटणारी अजून एक शक्यता म्हणजे विद्यमान राष्ट्रपति मा .श्री . प्रणबकुमार मुखर्जी यांची राष्ट्रपतिपदाचा कार्यकालसंपल्यावर त्या पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत सुषमाजी भाजपाच्या उमेदवार असू शकतात . ज्येष्ठतेच्या निकषांवर मा . श्री . लालकृष्ण अडवाणी हेत्यासाठीचे उमेदवार असायला हवे . पण सद्यस्थितीत ती शक्यता कमी वाटते . याची खात्री पटल्यामुळे तर खासदारकी सोडण्यास असल्याची चिडचिडत्यांच्याकडून व्यक्त झाली असेल का ? मा . श्री . शरद पवार हे राष्ट्रपति पदाचे उमेदवार असण्याची शक्यता त्यांच्या समर्थकांना वाटत असली ,मोदीसाहेब अधूनमधून पवार साहेबान्बद्दल कौतुकास्पद उदगार काढत असले , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . श्री . देवेंद्र फडणवीस यांनी जरी आत्ताच्यास्थानिक संस्थाच्या निवडणुकात नाव घेऊन टीका केली नसली तरी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रपति पदासाठीच्या उमेदवारीला मोदी साहेबांचा भाजपपाठिंबा देण्याची शक्यता आजमितिला तरी फार कमी वाटते . पण भाजपाने पुरस्कृत केले नाही तरी जर पवार साहेब राष्ट्रपति पदासाठी उभे राहिले तरशिवसेना काय भूमिका त्यावेळी घेते हे बघणे महत्वाचे ठरेल . मा . प्रतिभाताई पाटील यांना मराठी महिला या मुद्द्यावर दिलेल्या पाठिंब्याच्या जरपुनरावृत्ति झाली तर त्यावेळी भाजप - शिवसेना यांचे परस्पर - संबध हा विषय त्यावेळी पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ शकतो .
अरुण जेटली साहेब यांची जर अर्थखात्यातून बदली झालीच तर नवीन अर्थमंत्री कोण असेल ? राज्यसभा tv ला त्यांनी नोटाबंदीच्या संदर्भात दिलेल्यामुलाखतीनंतर डॉ . नरेंद्र जाधव यांच्या नावाची त्या पदासाठी काहीजण चर्चा करत आहेत . पण पंतप्रधानांची कार्यपद्धती लक्षात घेता ती शक्यता फारकमी वाटते . मा . श्री . पीयूष गोयल भाजपाचे राष्ट्रीय खजिनदार असूनही , मोदी साहेबांचे जुने निकटवर्ती असूनही पीयूष गोयल एकदम पूर्ण कॅबिनेटमंत्री झाले नव्हते हे इथे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल . सध्याचे रेलवे मंत्री सुरेश प्रभू यांची शक्यता तुलनेने जास्त वाटते . पण माझा अंदाज असाआहे कि जर खरोखरच नवीन व्यक्ति केंद्रीय अर्थमंत्री बनन्याची संधी असेलच तर ती व्यक्ति पीयूष गोयल असेल . त्यांची मोदी सरकार मधलीआजपर्यंतची कामगिरी , त्यांची शैक्षणिक पात्रता , नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ज्ञला खडे बोल सुनावन्याचे त्यांनी दाखवलेले धाडस या गोष्टीइतकेच याबाबत महत्वाचे ठरू शकेल असा घटक म्हणजे मा . नरेंद्र मोदी यांची त्यांनी गेली अनेक वर्ष केलेली पाठराखण . याबाबत मा . अरुणजेटली आणि पीयूष गोयल यांच्यत असणारे साम्य म्हणजे नरेंद्र मोदी हे अश्वमेध विजेते योद्धे आहेत हे त्यांनी फार पहिल्यापासूनच ओळखले . गोवाअधिवेशनात मोदिन्च्या नावाची अधिक्रुत घोषणा ही फार फार नंतरची बाब आहे . जेटली - गोयल यांनी त्याच्या कितीतरी आधीपासून मोदी साहेबांनासक्रिय पाठिंबा दिला आहे . याबाबत मा . निर्मलाजी सीतारामन आणि मा . श्री . जयंत सिन्हा यांची नावेही चर्चेत येऊ शकतात . पण या सगळ्यांतमा . श्री . पीयूष गोयल यांचे पारडे अरुण जेटली साहेबांची जागा घेण्यास मला जड वाटते .
जर कदाचित खरोखरच श्री . पीयूष गोयल हे केंद्रीय अर्थमंत्री झालेच तर आजमितिला त्यांच्याकडे असणारा " एकत्रित " उर्जा खात्याचा कारभार मा .श्री . जयंत सिन्हा यांच्याकडे जाऊ शकतो . श्री . जयंत सिन्हा यांची अर्थखात्याचे राज्यमंत्री म्हणून असणारी अत्यंत वाखाणणयाजोगी असणारीकामगिरी आणि आजपर्यंत नोटा - बदलीच्या निर्णयाबाबत केंद्र सरकारची बाजू जर सर्वात जास्त प्रभावीपणे जर कोणी मांडली असेल तर ती श्री जयंतसिन्हा यांनी हे दोन घटक याबाबत नक्कीच त्यांच्या बाजूने उभे राहतील . पण जर यदाकदाचित या खात्याचे मंत्री म्हणून जर जयंत सिन्हा यांना संधीमिळाली नाही तर ती संधी मा . निर्मलाजी सीतारामन यांना मिळेल असा माझा अंदाज आहे .
अजून एक ओझरता , पुसटसा विचार किंवा शक्यता . . . अगदीच लगेचच होईलच असेही नाही . . . पण मला वाटणारी शक्यता म्हणजे आपल्यामहाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री मा . श्री . देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश . शब्द समावेश असा आहे . वर्णी असा नाही . त्यामुळेजेंव्हा केंव्हा असा बदल होईल तेंव्हा मा . श्री . देवेंद्रजी फडणवीस यांना केंद्रात चांगलेच खाते मिळेल . आणि जर खरोखरच देवेन्द्रजी केंद्रीय मंत्री झालेतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मा . श्री . प्रकाशजी जावडेकर किंवा मा . श्री . चंद्रकांतदादा पाटील यांना मिळू शकेल .
अर्थातच हे सगळे अंदाज आहेत . पंतप्रधान मा . श्री . नरेंद्र मोदी यांची खासियतच मुळी सर्वांचे अंदाज ( चांगल्या अर्थाने )'चुकवन्याची आहे .
(ही माझी वैयक्तिक मते आहेत . )
-- चंद्रशेखर टिळक
C - 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ .
राजाजी पथ .
डोम्बिवलि ( पूर्व ) .
पिन . . . ४२१२०१ .
मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
E-Mail : tilakc@nsdl.co.in
December 21, 2016
रेल्वेच्या विस्तारामुळे मालाच्या देशांतर्गत वाहतुकीत प्रचंड प्रमाणात वाढ होत गेली असून, त्याचा आलेख दिवसेंदिवस चढताच आहे. त्याचबरोबर परदेशांशी होणारी आयात व निर्यात यांतही भरघोस भर पडलेली आहे. शेतीच्या अर्थव्यवस्थेत तर क्रांतीच घडविली गेली. रेल्वेद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीमुळे देश प्रगतीच्या वाटेने चालू लागला व त्यामुळे आज भारत स्वत:च्या पायांवर खंबीरपणे उभा आहे.
आसाममधील चहा व ज्यूट; राणीगंजमधील कोळसा; उत्तरप्रदेश व महाराष्ट्र यांत बनणारी साखर; पंजाब, हिमाचल प्रदेशातली फळं; अशा अनेक गोष्टींचं वितरण भारतभर करणं आता सहजपणे शक्य झालं आहे. सर्वांत स्वस्त आणि खात्रीची अशी पोस्ट योजना व पार्सल्स भारताच्या कानाकोपऱ्यांतील दुर्गम जागी रेल्वेमुळेच पोहोचू शकतात. नवीन तयार होणाऱ्या मोटारी, दुचाकी वाहनं, थेट प्रत्येक प्रांतातील गावांपर्यंत पोहोचतात.
रेल्वेमुळे दुष्काळाच्या वेळी अन्नधान्याचा त्वरित पुरवठा तर होतोच, परंतु काही वेळा पाणी सुद्धा पोहचवलं गेलं आहे. सन २०१६ मध्ये लातूर (मराठवाडा) येथे रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला.
डिझेल, पेट्रोल, तसेच थंडगार दुधाचे कंटेनर्स घेऊन मालगाडीचे डबे सतत धावत असतात. मेल एक्सप्रेस गाड्या धावत असताना काही वेळा मालगाड्यांना बराच वेळ खोळंबून ठेवलं जातं. एखादी मालगाडी जर प्रवासीगाड्यांना थांबवून ठेवून पुढे काढली गेली तर प्रवासी किती अस्वस्थ होतात! परंतु खरं पाहता रेल्वेचं ५५ ते ६० टक्के उत्पन्न या मालवाहतुकीमधूनच मिळत असत. युद्धकाळात तर मालगाडी आपल्या सैन्याची जीवनवाहिनीच असते.
-डॉ. अविनाश वैद्य
August 27, 2022
भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत शत्रू असले तरी एक अशी वस्तू आहे जी दोघांमध्ये समान आहे. आंबा हे भारत व पाकिस्तान यांचे राष्ट्रीय फळ आहे. आंब्याचं झाड हे बांगलादेशाचे राष्ट्रीय झाड आहे आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्हही आहे.
आंब्यांचा उगम -
आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक फळ आहे. आंब्यांचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे, परंतु दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियामधले मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षाचा जीवाश्मांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम याच भागात झाला असे मानण्यात येते.
अवीट गोडीच्या या फळाला कोकणाचा राजा असेही संबोधले जाते. एप्रिल ते जून हा या फळाचा हंगाम आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीत आंब्याला विशेष महत्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात.
आंब्याचा मोहर -
आंब्याच्या फुलांना मोहर असे म्हणतात. त्याला एक प्रकारचा मंद सुवास असतो. आंब्याचे फळ हे वनस्पतीशास्त्रातील ''drupe" या प्रकारातील असते. या प्रकारात फळाच्या बाहेरील भागात गर असून आतमध्ये कोय असते.
आंब्याचा माच -
कृत्रिमरीत्या आंबा पिकवण्यास आंब्यांचा माच लावणे असे म्हणतात. एखाद्या खोलीत वाळवलेले तणस वा भाताचे वाळवलेले गवत पसरुन त्यावर झाडावर पिकण्यास सुरुवात झालेल्या कैर्या ठेवतात. त्यावर पुन्हा गवत वा तणसाचे अच्छादन करतात. साधारणत: १०-१५ दिवसांत, झाकल्या गेल्यामूळे निर्माण झालेल्या उष्णतेने आंबा पिकतो.
आंब्याचे झाड -
आंब्याचे झाड हे साधारणपणे ३५ ते ४० मीटर एवढा उंच असते. आंब्याची पाने सदाबहार असतात. पानांचा आकार १५ ते ३५ सेंटिमीटर लांब, तर ६ ते १६ सेंटिमीटर रुंद असतो. कोवळे असताना पानांचा रंग काहीसा केशरी-गुलाबी असतो व तो जलदपणे उजळ आणि गडद होतो. पाने जशी मोठी होतात, तसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो.
आंब्यांचा आकार -
आंब्यांच्या जातीप्रमाणे त्याच्या फळाच्या आकारात बराच फरक असतो. साधारणपणे आंब्याच्या फळाचा आकार १० ते २५ सेंटिमीटर लांब, तर व्यास ७ ते १२ सेंटिमीटर असतो. फळाचे वजन २.५ किलोग्रॅमपर्यंत असू शकते.
June 1, 2016
मुंबईचे आद्य रहिवासी म्हणजे कोळी. मुंबईमध्ये कोळी समाज मुंबई ही ‘मुंबई’ म्हणून ओळखली जाण्यापुर्वीपासून वास्तव्यास आहे. म्हणून तर मुंबई ही कोळ्यांची असे सांगतात.
November 2, 2018
अहंतागुणे सर्वही दुःख होते | मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते |
सुखी राहता सर्वही सूख आहे | अहंता तुझी तूचि शोधूनि पाहे ||161||
अहंतागुणे नीति सांडी विवेकी | अनीतीबळे श्र्लाघ्यता सर्व लोकी |
परी अंतरी सर्वही साक्ष येते | पःमाणांतरे बुेि सांडूनि जाते ||162||
देहेबुेिचा निश्र्चयो दृढ झाला | देहातीत ते हीत सांडीत गेला |
देहेबुेि ते आत्मबुेि करावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||163||
मने कल्पिला वीषयो सोडवावा | मने देव निर्गूण तो वोळखावा |
मने कल्पिता कल्पना ते सरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||164||
देहादीक पःपंच हा चिंतियेला | परी अंतरी लोभ निश्र्चीत ठेला |
हरीचिंतने मुक्तिकांता वरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||165||
अहंकार विस्तारला या देहाचा | स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा |
बळे भ्रांति हे जन्मचिंता हरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||166||
बरा निश्र्चयो शाश्र्वताचा करावा | म्हणे दास संदेह तो विसरावा |
घडीने घडी सार्थकाची करावी | सदा संगती सज्ज्नाची धरावी ||167||
करी वृत्ति जो संत तो संत तो संत जाणा | दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा |
उपाधी देहेबुेिते वाढवीते | परी सज्जना केवि बाधू शके ते ||168||
नसे अंत आनंत संता पुसावा | अहंकार विस्तार हा नीरसावा |
गुणेविण निर्गूण तो आठवावा | देहेबुेिचा आठवो नाठवावा ||169||
देहेबुेि हे ज्ञानबोधे त्यजावी | विवेके तये वस्तुची भेट घ्यावी |
तदाकार हे वृत्ति नाही स्वभावें | म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे ||170||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 22, 2016
‘महिला दिन’ प्रत्यक्ष साजरा करा अथवा करूं नका, पण समाजातील पुरुष व स्त्री या दोन्ही घटकांनी ‘fair treatment’ चा मंत्र सदैव ध्यानात ठेवणें मात्र गरजेचें आहे. तोच समाजसुधारणेचा गाभा आहे.
March 6, 2018
शरीर हे क्षणभंगूर आहे , मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर ‘ अवयव दान ‘ करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयव दान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरता मर्यादित नसून शरिराचे सुमारे 10 विविध अवयव आपण दान करू शकतो. फक्त त्यासाठी पाहिजे पुरेशी माहिती व तुमची इच्छा…
गेल्या २० वर्षात फक्त ७५४ लोकांनीच अवयवदान करून इतरांना जीवनदान दिलेले आहे. या आकड्यावरूनच अवयवदानासंबंधी किती मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे, हे लक्षात येईल.
मनुष्य देहातून प्राण निघून गेल्यावर त्या पार्थिवाला पंचतत्वात विलीन करण्याच्या प्रत्येक धर्माच्या आपापल्या पद्धती आहेत. पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी यात मानवी शरीरासोबत, त्याच्या शरीरातील वेगवेगळे अवयवसुद्धा नष्ट होतात. या शरीरातील काही अवयव आजच्या अत्याधुनिक वैद्यकीय प्रगत शास्त्रामुळे दुसऱ्या रुग्णांमध्ये प्रत्यरोपीत करून त्याला जीवनदान देता येते. अर्थात ही प्रक्रिया सोपी मुळीच नाही. प्रथमत: समाजात जागृती निर्माण होणे, नंतर उच्च वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे, तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशासनाचे सहकार्य अशा अनेक गोष्टींच्या सहकार्यानेच अवयव प्रत्यारोपण प्रत्यक्षात शक्य होते. आपण संक्षेपमध्ये देहदान अवयवदानबाबत माहिती करून घेऊयात.
देहदान : यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर संपूर्ण देहाचेच दान करण्यात येते. देहदान हे मेडिकल कॉलेजमध्येच केले जाते. या देहाचा उपयोग शिकाऊ डॉक्टर यांना प्रशिक्षण देण्यासाठी होतो. यातूनच चांगले डॉक्टर्स तयार होतात याच डॉक्टरला समाज पुढे देवासमान मानतो.
मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहाची उपयोगिता संपल्यावर सन्मानाने तो देह पंचतत्वात विलीन केला जातो. देहदानाचे फॉर्म मेडिकल कॉलेज या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांकडे उपलब्ध आहेत. नागरिकांनी फॉर्म भरून जवळच्या नातेवाईकांची सही घेतल्यास तुमची इच्छा त्यांच्याही लक्षात येईल ती व्यक्ती मृत झाल्यास देहदान करणे सोपे जाईल. फॉर्म भरला म्हणजे देहदान होईलच, असे नाही. जर जवळच्या नातवाईकांनी नकार दिला तर देहदान होऊ शकत नाही. आणि फॉर्म भरला नसेल मृत्यूनंतर जर जवळच्या नातेवाईकांनी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली तर देहदान होऊ शकेल. देहदान करण्यासाठी जवळच्या मेडिकल कॉलेज अथवा सामाजिक संस्थेला फोन करणे एवढेच पुरेसे आहे. देहदान हे जास्तीत जास्त ५-६ तासांत होणे गरजेचे आहे.
अवयवदान : मनुष्य काही कारणाने अती कोमात जातो मेंदू मृत (brain dead) झाल्यावरच अवयवदान करता येते. डॉक्टरांचे सर्व प्रयत्न थकतात रुग्ण कोमातून बाहेर येण्याची शक्यता संपते रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर जिवंत असतो. अशा परिस्थितीत काही अवयवांचे दान करता येते.
आपल्याला डोळे, त्वचा, यकृत, हृदय, मूत्रपिंड, प्लीहा यासारख्या अवयवांची अमुल्य भेट मिळालेली आहे. निसर्गाने दिलेली ही भेट आपल्या मृत्यूनंतर इतर गरजू रूग्णांना तुम्ही दान देऊ शकता. या अवयवदानाने मृत्यूच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या रूग्णांना दुसरे जीवन जगण्याची संधी मिळते व मृत्यूनंतरही आपण दुसर्याच्या शरीरात जिवंत राहू शकतो. अवयवदानाच्या उदात्त कार्याला जाती-धर्माचे, दर्जाचे अथवा लिंगाचे बंधन नाही. सद्य परिस्थितीत देशात सुमारे 5 लाख मूत्रपिंड, 50 हजार यकृत, 2000 हून अधिक हृदय विकारांनी ग्रस्त रूग्ण असून या रूग्णांना अवयवांची गरज आहे. मूत्रपिंड विकारावर कृत्रिम रक्त शुद्धिकरण हा पर्याय आहे. परंतु यकृत, हृदय, फुप्फुस विकारांनी त्रस्त रूग्णांना असा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी नवीन अवयव प्रत्यारोपण हाच एकमेव मार्ग आहे. जागतिक पातळीवर विचार करता मृत्यूनंतर अवयवदान करण्याचे प्रमाण भारतात अत्यल्प आहे. सामाजिक व कौटुंबिक जनजागृतीच हा बदल घडवून आणू शकेल.
श्री.संजीव, वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
January 2, 2017
त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट हे दोन महायुद्धाच्या मधल्या कालखंडात खेळले. त्या काळात क्रिकेटच्या खेळाडूंना खूप प्रसिद्धी मिळत असे. ते जेव्हा अपील करत असत तेव्हा त्यांचा आवाज हा मोठा होता , अपील करताना ते मोठयाने विशिष्ट शब्द म्हणजे ‘ ऑझ दॅट ‘ हे शब्द बोलत . ह्याचा खरा उच्चार ‘ हाउज दॅट ‘ असे . पुढे तो शब्द खूप पॉप्युलर झाला. त्यामुळे ते अनेकांच्या लक्षात रहात असत.
July 19, 2021
मुंबईत माटोळी पाहायला मिळणे हेच दुर्मिळ आहे. गोव्यामध्ये माटोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. एकेका माटोळीला ४०० किंवा त्याहूनही अधिक फळे- भाज्या बांधल्या जातात.
August 27, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti