वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ऐक्याचं मुद्दल जर मोडत नसेल आणि भक्तीचा विलास जर करता येत असेल, ऐक्याच्या मुद्दलाला धक्का न लागता म्हणजे अद्वैत अवस्थेला धक्का न लागता जर भक्ती होत असेल तर का न करावी? सागराला बाधा न येता जर त्याच्या वरची लाट त्याच्या वरचा तरंग होऊन मजा जर भोगता येत असेल तर का न भोगावी?
May 7, 2024
एके दिवशी नोकिया कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकाने मला तातडीने, सिंगापूर येथे महत्वाच्या चर्चेसाठी बोलाविले. दोनच दिवसात मी आमच्या दोन वरिष्ठ मॅनेजरांबरोबर सिंगापूरच्या नोकिया प्लांटला पोचलो. चर्चेत त्यांनी आम्हाला सांगितले की मोबाईल फोन बिझिनेस मध्ये वेगाने होत असलेले बदल पाहता पुरवठा साखळीचा सात दिवसांचा कालावधी ते मान्य करू शकत नाहीत. तो वेळ (through put time, TPT) त्यांना चार किंवा त्याहीपेक्षा कमी करून हवा होता.(४२ टक्क्यांनी कमी), आणि तो सुद्धा पुढच्या १२ आठवडयातच, आणि ते जर जमत नसेल तर ते आमच्या ऐवजी दुसरा पुरवठादार शोधणार होते.
April 4, 2026
आपलं वय तीन वर्षे पुर्ण झालं की एक माणूस आपल्या आयुष्यात डोकावतो तो साधारणपणे पुढची सतरा वर्षे आपल्या सोबत असतोच, वेगवेगळ्या रूपांत. हा माणूस म्हणजे ‘शिक्षक’. या वेगवेगळ्या रूपांपैकी काही रूपं, रुपं म्हणण्यापेक्षा काही माणसं म्हणुया, सदैव आठवणीत रहातात. पण आपल्या आयुष्यात निव्वळ हेच शिक्षक असतात का ? मला नाही असं वाटत. या शिक्षकांव्यतिरिक्त इतर अनेक माणसं शिक्षकाच्या रुपात आपल्याला भेटत असतात, अगदी अखेरच्या क्षणापर्यंत.
October 21, 2020
सर्वसाधारण तरूण वयाची पोटात अन्न सामावून घेण्याची क्षमता जास्तीत जास्त 350 ते 400 ग्रॅम असते. आग्रहाने जरी जेवले तरी यापेक्षा जास्त अन्न पोटात राहू शकत नाही. जर जबरदस्तीने ठूस ठूस के भरण्याचा प्रयत्न केला तर उलटी होईल, नाहीतर जुलाब.
August 13, 2016
अग्निची झाली अग्निपरीक्षा ओलांडली ५००० की.मी.ची कक्षा
April 27, 2012
बुधाचे निरीक्षण
बुध ग्रह सूर्यास्तानंतर संध्याकाळी काही वेळ पश्चिम क्षितीजाजवळ दिसतो तर काही महिन्यात हाच बुध ग्रह पूर्व क्षितीजावर पहाटे सूर्योदयापूर्वी दिसतो. बुध हा सूर्यापासून पहिलाच ग्रह आहे. त्यामुळे त्याचे सूर्यापासूनचे अंतर कमी आहे. परिणामी बुध ग्रह सूर्याची पाठ कधीच सोडत नाही. विशिष्ट कालावधीत, सायंकाळी किंवा पहाटे आणि क्षितीजालगत बुध दर्शन होत असल्यामुळे बुध शोधणे म्हटल. तर सोपे आहे म्हटल. तर कठीण आहे.
बुधाचे आगळे वेगळे दर्शन समजावून घेण्यासाठी सूर्यग्रहणाची घटना डोळ्यासमोर आणू. सूर्यग्रहणात पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये पण त्याच्याच पातळीत चंद्र येतो. यामुळे सूर्यबिंब झाकले जाते आणि चंद्राची अप्रकाशित बाजू (काळी बाजू) आपणास दिसते.
बुध ग्रहाची कक्षा सूर्य आणि पृथ्वी यांच्यादरम्यान असल्यामुळे बुध ग्रह सुद्धा पृथ्वी आणि सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेवर या दोघांच्या दरम्यान येऊ शकतो पण... बुध लहान असल्यामुळे तो सूर्याला झाकू शकत नाही. बुधाचा लहान काळा ठिपका सूर्यबिंबावरून सरकत जातो. बुधाच्या लहान बिंबामुळे सूर्याच्या प्रकाश काही अडविला जात नाही. परिणामी बुध ग्रह सूर्यबिंबावरून गेला तरी आपल्याला पत्तासुद्धा लागत नाही.
सूर्यबिंबाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सरकत जाण्याच्या या घटनेलाच बुधाचे अधिक्रमण (transit) किंवा पारगमन असे म्हणतात.
अधिक्रमण कळते कसे?
गणितशास्त्र हे आश्चर्यकारक आणि अचूक शास्त्र आहे. सूर्य, बुध, पृथ्वी, चंद्र इ. ग्रहांच्या भ्रमणामुळे घडून येणाऱ्या गणिताने अधिक्रमणासारख्या विविध घटना केव्हा होणार ते १०० टक्के बिनचूक शोघता येते. हे शास्त्र भूतकाळातही शिरते आणि भविष्यकाळातही डोकावते. १६०७ ते २३०० या ७०० वर्षाच्या काळात बुधाची १४ अधिक्रमणे आहेत.
म्हणजे एका शतकात साधारण १२ ते १३ अधिक्रमणे होतात. सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान दर ११६ दिवसांनी बुध ग्रह येतो. या घटनेला अंतर्युती म्हणतात. म्हणजे खरं तर वर्षातून ३ वेळा तरी अधिक्रमण व्हायला हवे होते नाही का? बुध ग्रह पृथ्वी व सूर्य यांच्या पातळीत फिरत नाही. बुधाची परिभ्रमण कक्षा या पातळीला दोन बिंदूत छेदते. या छेदनबिंदूपाशी अंतर्युती झाल्यासच अधिक्रमण होऊ शकते. अंतर्युती होणे आणि पृथ्वी-सूर्य जोडणाऱ्या रेषेत बुध येणे हे सध्या फक्त मे आणि नोव्हेंबर या महिन्याच्या १० तारखेच्या आसपास घडू शकते. तर आता अशी संधी ९ मे २०१६ रोजी, सोमवारी आली आहे. या अधिक्रमणाचे साक्षीदार आपल्याला व्हायचे आहे.
“मे” महिन्यातील अधिक्रमणाचे वैशिष्ठये
मे महिन्यात घडून येणाऱ्या अधिक्रमणाच्यावेळी बुध ग्रह सूर्यापासून दूर म्हणजे पृथ्वीला जवळ असतो. त्यामुळे बुध बिंब थोडे मोठे दिसते (त्याचा व्यास सुमारे १२ कला असतो). तरीही सूर्यबिंब त्याच्या सुमारे १५८ पट मोठे असते मग आता सांगा ते सूर्याला कसे झाकेल? उलट बुधाचा काळा ठिपकाच सूर्यबिंबावरून सरकताना दिसेल. बुधाने सूर्यबिंबाला एका टोकाशी स्पर्श केला की, आख्खे सूर्यबिंब पार करून दुसऱ्या टोकाशी बाहेर पडण्याच्या या घटनेला साडेसात तास लागणार आहेत. संध्याकाळी पावणेपाचच्या सुमाराला अधिक्रमण सुरु होईल ते रात्री सव्वाबारापर्यंत चालू राहिल. रात्री ८.३० च्या सुमारास या प्रवासाचा मध्य बुधाने गाठलेला असेल. म्हणजे तेव्हा सूर्यबिंबाच्या केंद्रबिंदूजवळ सूर्य असेल.
पण हाय? हा सगळा प्रवास आपल्याला पाहता येणार नाही. सूर्य अस्ताला गेला की, ज्या पडद्यावर हा खेळ आपण पाहणार तो पडदाच गायब होणार. नाही कां? तरी सुद्धा संध्याकाळी ४.४५ पासून सूर्यास्तापर्यंत साधारण दोन तास हा खेळ पाहता येईल
दोन तास तर दोन तास. म्हणतात नां? Something is Better than Nothing....
अधिक्रमण पाहतांना घ्यायची काळजी
बुधाचा काळा ठिपका सूर्यबिंबावर पहायचा म्हणजे सूर्याकडे पहाणे आलेच. मग नुसत्या डोळ्यांनी तर नाहीच नाही पण सौर गॉगलमधूनही (नेहमीचा गॉगल नव्हे) हे पाहता येणार नाही. बुधाचा लहान ठिपका दिसणार कसा? मग टेलिस्कोपचा वापर करावा लागेल. पण त्यालाही विशिष्ट असा सुरक्षित फिल्टर बसवला आहे कां याची पक्की खात्री करावी लागेल. द्विनेत्री म्हणजे binocular मुळीच नको. कारण त्याला फिल्टर बसविलेला नसतो. काही संस्था असे अधिक्रमण दाखवतील. तेथे जाता येईल. तरीही डोळ्यांच्या सुरक्षिततेची पक्की खात्री झाल्याशिवाय अशा कोणत्याही उपकरणातून थेट पाहू नये. अन्यथा डोळे कायमचे बिघडतील. अंधत्वही येऊ शकेल.
पुढील अधिक्रमणे
बुधाचे यानंतरचे अधिक्रमण ११ नोव्हेंबर २०१९ रोजी आहे. पण त्याचीही सुरुवात संध्याकाळी सहाच्या सुमारास असल्यामुळे न दिसण्याऱ्या अधिक्रमणातच त्याची गणना करावी लागेल. १३ नोव्हेंबर २०३२ चे बुध अधिक्रमण दुपारी १२.१५ ते ४.४० या वेळात दिसेल. मे महिन्यात होणारे यानंतरचे अधिक्रमण ७ मे २०४९ रोजी आहे. त्याची सुरुवातही याचप्रमाणे संध्याकाळी पावणेपाचचे सुमारास आहे? तेव्हा डोळ्यांची योग्य काळजी घेऊन अधिक्रमण निरीक्षणाची हीच संधी घ्यायला हवी.
- हेमंत मोने
९८२०३ १६३१५
e-mail : hvmone@gmail.com
आकृतीत बुध अधिक्रमण मार्ग दाखविला आहे. आपण पश्चिमेकडे तोंड करून उभे राहणार. म्हणजे सूर्यबिंबाची उत्तर बाजू साधारण उजवीकडे असेल. सूर्यबिंबाचा पूर्व बिंदू वरच्या बाजूस असेल. हे लक्षात घेऊन बुध अधिक्रमण मार्ग दाखविला आहे.
May 9, 2016
खरं तर आपल्या संस्कृतीचं असं कुठलंच क्षेत्र नाही, जे नागाच्या धारणेनं व्यापलेलं नाही. परंपरेने याला पृथ्वीला मस्तकी धारण करणारा सर्वश्रेष्ठ शेष म्हटलेला आहे. समुद्रमंथनात तर वासुकी नागाची दोरी देव-दानवांनी धरली होती. वास्तुपूजनाच्या विविध विधीत ज्या दहा जणांना बळी अर्पण करण्याची प्रथा होती. त्यात एक बळी वासुकी नागासाठी आहे.
September 10, 2018
अ पासून अ: पर्यंतचे बारा स्वर आणि क पासून क: पर्यंतचा बारा व्यंजनांचा संच असतो म्हणून देवनागरी वर्णमालेत बाराखडी आहे असं समजतात. अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, अॅ आणिऑ या स्वरांची तसंच कॅ अणि कॉ वगैरे व्यंजनांची सोय करणं आवश्यक होतं. या दोन अक्षरचिन्हांचा समावेश केला की देवनागरीची चौदाखडी होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, १९२४ च्या सुमारास भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली. त्यात थोडी लिपीशुद्धीही होती. त्यांची तर्कशुध्द विचारसरणी म्हणजे....क ला वेलांटी लावली तर ‘की’ होते आणि ते आपण स्वीकारलं आहे तर अ ला वेलांटी लावून ‘अि’ का स्वीकारू नये? त्यानुसार इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या चिन्हांबद्दल (अक्षरांबद्दल..स्वरांबद्दल..) अि, अी, अु, अू, अे अै ही स्वरचिन्हं स्वीकारावी.
आ, ओ, औ, अं आणि अ: ही स्वरचिन्हं आपण आधीच स्वीकारली आहेत. अशारितीनं अ ची बाराखडी जर आपण स्वीकारली तर, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या स्वरचिन्हांची आवश्यकता राहणार नाही.
हाच विचार मी पुढे नेला आहे. क ला काना लावला तर ‘का’ होतो तसाच अ ला काना लावून ‘आ’ होतो आणि तो आपण स्वीकारला आहे.
क ला ओकार लावला तर ‘को’ होतो, तसाच अ ला ओकार लावला तर ‘ओ’ होतो. हा ही आपण स्वीकारला आहे.
क ला औकार लावला तर ‘कौ’ होतो, तसाच अ ला औकार लावला तर ‘औ’ होतो...तोही आपण स्वीकारला आहे.
क वर अनुस्वार दिला तर ‘कं’ होतो, तसाच अ वर अनुस्वार दिला तर ‘अं’ होतो, तो ही आपण स्वीकारलाच आहे.
क ला विसर्ग चिन्ह लावलं तर ‘क:’ होतो, तसाच अ ला विसर्ग चिन्ह लावलं तर ‘अ:’ होतो..तोही आपण स्वीकारला आहे.
जर, आ, ओ, औ, अं आणि अ: ही स्वरचिन्हं आपण आधीच स्वीकारली आहेत. तर मग....अि अी अु अू अे अै लाच का स्वीकारू नये?
खरं म्हणजे अै आणि औ हे मिश्र किंवा जोड स्वर आहेत. अै म्हणजे (अ अि) आणि औ म्हणजे (अ अु)
आद्य लिपीकारांना हेच विचार सुचले असते तर इ ई उ ऊ ए ऐ ही अक्षरचिन्हं घडविण्याची गरजच नव्हती.
अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, अॅ आणि ऑ या स्वरांची सोय करणं आवश्यक होतं. ऑगस्ट, ऑक्टोबर, डॉक्टर, बँक, बॅरिस्टर, अॅक्ट,अॅडव्होकेट वगैरे शब्द मराठीत लिहीतांना अर्धचंद्राच्या सहाय्यानं हे अुच्चार लिहिले यातच मराठी लिपीकारांची प्रतिभा दिसून येते. कौतुकास्पद आहे. नाहीतर हे शब्द आगस्ट, आक्टोबर डाक्टर, आडव्होकेट ब्यांक, ब्यारिस्टर, असे लिहावे लागले असते. पूर्वी ते तसे लिहिलेही गेले आहेत.
हिंदीत हेच शब्द बैंक,अैक्ट असे लिहीतात. गुजराथी बांधव ऑ चा अुच्चार ओ असा करतात. ते बॉम्ब ला बोम्ब आणि हॉलला होल म्हणतात. अेकदा, बँकेत, अेक अिसम, लोकर पाहिजे … असं म्हणत होता. बँकेत पैसे असतात, याला लोकर कशी मिळणार? नंतर लक्षात आलं. त्याला बँकेचा लॉकर हवा होता.
पारंपारिक स्वरमालेत ऋ (र्हस्व आणि दीर्घ) आणि लृ (र्हस्व आणि दीर्घ) हे स्वर समजले आहेत. पण ते स्वरांची व्याख्या पूर्ण करू शकत नाहीत. स्वराचा अुच्चार करतांना, ओठ. दात, टाळू आणि जीभ यांचा अेकमेकांशी स्पर्श व्हावयास नको. नाद केवळ घशातूनच यावयास हवा. स्वरांचा दीर्घ अुच्चार करीत राहता येतो. अऽऽऽऽऽऽ किंवा आऽऽऽऽऽऽ. अीऽऽऽऽऽऽऽ अूऽऽऽऽऽऽऽ.
अै आणि औ हे शुध्द स्वर नाहीत, मिश्र किंवा जोड स्वर आहेत. अै म्हणजे (अ अि) आणि औ म्हणजे (अ अु). अैऽऽऽऽऽऽ आणि औऽऽऽऽऽऽऽऽ.
अॅऽऽऽऽऽऽ आणि ऑऽऽऽऽऽऽऽ. म्हणूनच अॅ आणि ऑ हे स्वर समजले जातात.
तसं व्यंजनांच्या बाबतीत होत नाही. कऽऽऽऽऽ.
ऋ आणि लृ अुच्चारतांनाही तसं होत नाही. यास्तव ही अक्षरचिन्हं, स्वर नाहीत म्हणून त्यांचा स्वरमालेत समावेश करता येत नाही. ऋऽऽऽऽऽऽऽ. लृऽऽऽऽऽऽऽऽ
वरील विवेचनानुसार अ ची चौदाखडी येणेप्रमाणे स्वीकारावी ::
अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ अं अ:
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागानं, ६ नोव्हेंबर २००९ रोजी अेका अध्यादेशानं, मराठीचे स्वर आणि व्यंजनं स्वीकारली. त्यात पारंपारिक स्वरांबरोबरच अॅ आणि ऑ हे स्वर स्वीकारले पण अ ची बाराखडी मात्र स्वीकारली नाही, ती आता स्वीकारावी असं वाटतं.
पण जनताजनार्दनानं हे स्वर कित्येक वर्ष आधीच स्वीकारले आहेत. १९७६ साली प्रकाशित झालेल्या प्रा. देशपांडे यांच्या अिंग्रजी-मराठी शब्दकोशात, ऑगस्ट, ऑक्टोबर, बँक,बॅरिस्टर हे शब्द असेच छापले आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, १९३० ते १९३७ या कालखंडात १७ विज्ञाननिष्ठ निबंध आणि २ काव्यं लिहीली आणि हे सर्व साहित्य किर्लोस्कर मासिकानं प्रसिध्द केलं. या सर्व साहित्यात अ ची बाराखडीच वापरली आहे. मीही ही बाराखडीगेल्या ४०-५० वर्षांपासून माझ्या सर्व लिखाणात वापरतो आहे. सावरकरांची ही दोन्ही पुस्तकं माझ्याजवळ आहेत...त्यांचा संदर्भ, मी नेहमी घेतो. ही पुस्तकं, दादरच्या शिवाजी अुद्यानाजवळ असलेल्या सावरकर स्मारकात विक्रीस ठेवलीआहेत.
मराठी विज्ञान परिषद, मुंबअी आणि विज्ञान प्रसार, दिल्ली यांच्या सहकार्यानं, अेप्रिल २०११ मध्ये, ‘मराठीतील विज्ञान विषयक लेखन....कालखंड १८३० ते १९५०’ हा ग्रंथ, दोन खंडात प्रसिध्द केला. या कालखंडात, मराठीतून प्रसिध्द झालेले ९८१ लेख, खूप परिश्रमानं संकलीत करण्यात आले होते. आर्थिक मर्यादा असल्यामुळं, फक्त २० टक्केच लेख निवडावे असं ठरलं. यापैकी वैचारिक लेखांची निवड करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. तेव्हा माझ्याअसं लक्षात आलं की, सुमारे १९३० ते १९४० या कालखंडात, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि काही अितरही नामवंत लेखकांनी अ ची बाराखडी वापरली आहे. त्या काळी संगणक नव्हते. परंतू त्यांनी सुचविलेली ही बाराखडी आजच्या संगणकयुगात फार अुपयोगी आहे असं वाटतं. पण आता ती कुणीच वापरतांना आढळत नाही. असं का व्हावं कळत नाही.
आता ही अ ची चौदाखडी सर्व मराठी प्रेमीजनांनी हट्टानं वापरावी अशी माझी नम्र सूचना आहे. महाराष्ट्र शासन, वृत्तपत्रं, मासिकं, मराठी जाहिरातदार, मराठी शाळा वगैरेंनी ही चौदाखडी वापरावी. असं करण्यानं होणार आहे... मराठी लिपीसमृध्दी.
डोळ्यांना आणि मेंदूला, या बाराखडीची सवय, लवकरच होते. आपणही हीच अक्षरचिन्हं वापरावीत.
ही अक्षरचिन्हं वापरून तयार झालेले काही शब्द ......
अिंद्र, अिन्द्र, अिंदिरा, अिन्दिरा, अितक्यात, अितीहास, अिच्छा ....अिंडिया.
मुंबअी, आअी, अीश्वर, अीशस्तवन, अीशान्य, अीर्षा, अीशान, अीशा ....
अुत्तर, अुपकार, अुपवन, अुकळणं, अुचापत्या, अुंच, अुंट, ....
अून, अूब, अूर, अूस ....
अेक, अेकवीस, अेकाअेकी, अेकादशी, अेकूण, अेकवीरा .....
अैरावत, अैतिहासिक, अैवज, अैवजी, अैहिक ....
हे शब्द वाचतांना काही अडचण आली? लिहीतांनाही कठीण वाटणार नाही.
-- गजानन वामनाचार्य
December 22, 2018
आपण १ मे हा दिवस “महाराष्ट्र दिन” आणि “जागतिक कामगार दिन” म्हणून साजरा करतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून साजरा करतो हे समजलं पण “जागतिक कामगार दिन” हा सुद्धा १ मे रोजीच का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो. त्यासाठीच त्याची पूर्वपीठीका काय आहे ते थोडक्यात समजावून घेण्याचा प्रत्यत्न करणार आहोत.
May 7, 2014
“ज्या वेळी धर्म लयाला जाऊ लागेल, अधर्म प्रबळ होऊ लागेल त्या वेळी, सज्जनांच्या संरक्षणासाठी, दुर्जनांच्या विनाशासाठी आणि धर्माची मुहूर्तमेढ पुन्हा रोवण्यासाठी, प्रत्येक युगात मी जन्म घेईन”. या स्वतःच्या वचनाला जागत, त्याने द्वापारयुगात जन्म घेतला.
December 13, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti