(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जहाजावर न दिसलेली भूतं

    एक पेशंट हॉस्पिटलमधून बरा होऊन घरी चालला होता. डीसचार्ज झाल्यानंतर त्याच्या डिलक्स रूमची सफाई करायला आलेला वॉर्डबॉय त्या पेशंट ला म्हणाला साहेब बर झालय तुम्ही जिवंतपणी बाहेर जाताय या रूम मधून, नाहीतर या रूम मध्ये ऍडमिट असणारे बरचसे पेशंट या रुममध्येच जीव सोडतात.

      October 8, 2019


  • डासाच्या पुनरउत्पादनाचे जीवनचक्र – भाग १

    मानवी रक्त शोषल्यानंतर मादी डास प्रजोत्पादनासाठी अनुकूल होते. नराशी संयोग झाल्यावर मादी साधारण ४० ते ४०० अंडी ही स्थिर अथवा संथपणे वाहाणाऱ्या पाण्याच्या डबक्यात घालते. पाण्याच्या जागेच्या योग्य निवडीसाठी ती स्वत:च्या तापमान संवेदकावरील (Antenna) संवेदना पेशींचा उपयोग करते. अंडी गोड्या वा खाऱ्या पाण्यात तसेच चिखलाच्या छोट्या मोठ्या डबक्यातही वाढतात. डासांच्या उण्यापुऱ्या काही आठवड्यांच्या आयुर्मानात १००० ते ३००० नवीन डासांची फौज निर्माण होऊ शकते.

    साधारण दोन दिवसात अंड्यांमधून अळ्या (Larveor Wrigglers) बाहेर पडतात. पाण्यावर तरंगताना त्या शरीरातील छोटया नळी सदृश सोंडेतून श्वासोच्छ्वास करतात. पाण्यातील सेंद्रिय (Organic) पदार्थ व आपलेच कमकुवत असलेले भाऊबंद (Weak Larve) हे त्यांचे खाद्य असते. जीवो जीवस्य जीवनम् !

    अळ्यांत चार वेळा उत्क्रान्ती होत होत वाढ होते व त्यातून कोश (Pupa, Tumbler) तयार होतात. त्यांच्या पाठीवर शिंगासारख्या दोन पोकळ नळ्या तयार होतात. ज्यामधून श्वास घेतला व सोडला जातो. अन्नाची गरज नसल्याने त्यांच्यात काहीही हालचाल नसते. ह्या कोशाच्या आत पूर्णावस्थेत तयार झालेला डास व त्याचे भोवती एक पातळ पारदर्शक पडदा असतो. योग्य क्षण आल्यावर तो पडदा फाटतो व नवीन तयार झालेला डास उडण्यास व आपले कार्य सुरू करण्यास सज्ज होतो. हे जीवनचक्र पूर्ण होण्यास साधारण एक महिन्याचा कालावधी लागतो.

    मादी डासांचे व सूर्यप्रकाशाचे अगदी वाकडे नाते आहे. साधारणपणे त्यांची माणसाजवळ येण्याची वेळ सायंकाळी ५ ते रात्री १० व पहाटे ४ ते ६ पर्यंत असते. त्यामुळे या वेळात घराची दारे, खिडक्या पूर्णपणे अथवा नेटच्या मदतीने बंद असतील व सोबत तेथे मच्छरदाणीचा वापर सर्रास होत असेल तर डासांना पूर्णपणे मज्जाव करणे शक्य आहे. डासांच्या लपण्याच्या जागा म्हणजे कपाटे व पलंगांचे कोपरे, अंगावरून काढून टांगून ठेवलेले कपडे, अडगळीच्या वस्तू असून या जागा शक्यतो जितक्या कमी असतील तेवढा डासांना वावरण्यास व लपण्यासाठी चांगला प्रतिबंध होऊ शकतो.

    अंडी घालण्यासाठी डासांना मनुष्याच्या रक्ताची गरज आहे. परंतु जर मनुष्याने डासांच्या चावण्यापासून कोणताही उदा. मच्छरदाणी वा अन्यमार्गांचा वापर करून बचाव केला तर रक्ता अभावी अंडी टाकता येणार नाहीत या मार्गे डास निर्मूलन मोहीम यशस्वी होऊ शकेल.

    डासांमधील बंडखोरी
    काही Anopheles Gambiae जातीचे मादी डास मलेरियाचे परोपजीवी आपल्या शरीरात वाढवू न देण्यात यशस्वी होतात व एक प्रकारे आपल्या जमातीशी बंडखोरी करतात. त्यांच्या शरीरात एक वेगळ्या तऱ्हेची प्रतिबंधक शक्ती तयार होते ज्यामुळे मलेरियाचे परोपजीवी त्यांच्या शरीरात वाढू शकत नाहीत. अर्थातच मलेरियाचा प्रसार त्यांच्यामुळे होत नाही.

    डासावर उठलेली मानवजात
    क्षुद्र मच्छराने माणसाची झोप सर्वार्थाने उडवलेली आहे. त्यांचा नायनाट करण्यासाठी वेगवेगळे आधुनिक प्रयोग करण्यात येत आहेत.

    १) नपुंसक जातीचे कीटक बनविण्याचे शास्त्र (Sterile Insect Technique) प्रगतीपथावर आहे. नपुंसक बनविलेले नर डास हे डासांच्या समुहात सोडले व जरी मादी डासाशी त्याचा संयोग झाला तरी त्यातून अंडी निर्माण होणार नाहीत. तसेच नर-मादींचे मीलन फक्त एकदाच होत असल्याने एक प्रकारचे कुटुंबनियोजन केले गेल्याने डासांची उत्पत्ती बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकेल.

    २) परोपजीवीमध्ये प्रयोगांमार्फत जर (Fluroescent) चकाकणारा पदार्थ मिसळला तर हा परोपजीवी डासांच्या शरीरात शिरल्यानंतर डासही चकाकतील व अशा डासांना ओळखणे त्यामुळे शक्य होऊ शकेल. डासांचा नायनाट करण्याचा मार्ग यातूनही शोधता येईल.

    ३) माणसाच्या रक्तातून मलेरियाचे परोपजीवी डासांच्या शरीरात शिरतात. त्यांच्या विरुद्ध प्रतिकारक लस शोधून काढून ती लस माणसांना टोचली तर निर्माण होणारी प्रतिपिंड (Antibodies) डासाच्या शरीरात रक्तातून शिरतील. तेथे असलेल्या परोपजीवांचा ते निप्पात करू शकतील. याचाच अर्थ असा की ही डासांविरुद्ध मलेरियाच्या परोपजीवांचा नाश करणारी लस तयार होऊ शकेल. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केल्यास एक महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न मानवजातीपुढे उभा ठाकून आहे असा की नवीन जन्मलेल्या डासांच्या पिढ्या कोणत्या पद्धतीने नेस्तनाबूत कराव्यात. गेले तीन ते चार दशके D. D. T. या Insecticides चा वापर जगभर फार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. डासांच्या पेशींतील ५० जनुके या कीटकनाशकाला दाद न देण्याच्या प्रक्रियेत साथ देतात.

    यामुळे मनुष्य व डास या दोघांमधील हा जीवन - मरणाचा खेळ असाच चालू राहणार आहे.

    -- डॉ. अविनाश वैद्य

      October 12, 2022


  • डीएनएचे उपयोग

    डीएनएचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे अगदी सूक्ष्म जंतूपासून प्रगत मानवापर्यंत सर्व सजीवांत डीएनएची संरचना व घटक सारखेच असते. म्हणजे डीएनएचा एखादा अंश (जनुक) एखाद्या जंतूमध्ये एका प्रथिनाची निर्मिती करण्यास कारणीभूत असेल तर ते जनुक जर आपण दुसऱ्या वनस्पतीमध्ये संकरित करू शकलो तर त्याच प्रथिनाची निर्मिती आपण वनस्पतीत करू शकू.

      November 16, 2023


  • दुर्गेचे पहिले रूप – शैलपुत्री देवी

    दुर्गेचे पहिले रूप – शैलपुत्री देवी

    अस्त्र-शस्त्र : त्रिशुळ
    वाहन : गो माता

    दुर्गेचे पहिले रूप ' शैलपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे.

    नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते.

    या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता.

    एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले
    नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे. परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही. वडीलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना
    भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली.

    सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकरानसांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवर्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती 'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली.

    पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. 'शैलपुत्री' देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.

    -- निखिल आघाडे

      October 2, 2016


  • करंटेपणाची कमाल!

    प्रकाशन दिनांक :- 09/01/2005

    सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सुनामी लाटांनी दक्षिण आशियाई देशांना हादरविले. प्रचंड प्रमाणात प्राण आणि वित्तहानी झाली. सगळ्याच प्रसारमाध्यमात केवळ सुनामीच्या विध्वंसाचीच चर्चा होती.

      January 9, 2005


  • दिवस सोनियाचा की `सोनिया’पुत्राचा

    समजा राहूल गांधींनी ही घराणेशाही स्वच्छता मोहिम अगदी मनावर घेतलीच तरीही आमच्या नेत्यांना काळजी करण्याचे कारण नाही. त्यांना एक मोलाचा सल्ला जाताजाता देउया. Charity begins at home! या न्यायाने राहूलजींनाही सांगून टाका की बाबा आम्ही आमची घराणेशाही संपवतो पण तुमचे काय? तुम्हीही एकदा सांगून टाका ना की मला स्वत:लाही घराणेशाही नकोय. मला पंतप्रधान वगैरे काही व्हायचे नाही. पक्षात कितीतरी आजोबा आणि काका आहेत.. त्यांच्याही इच्छा पूर्ण होउ द्या. होउन दे त्यांना पण पंतप्रधान!

      January 27, 2011


  • हॉब्जचे त्रिशतक आणि बिफीचा तिहेरी बार

    …60,000 प्रथमश्रेणी धावा जमविणारा हॉब्ज हा एकमेव फलंदाज आहे – मोठे डाव खेळलेला नसूनही. त्याला डॉन ब्रॅडमनसारखी मोठ्या डावांची ‘सवय’ असती तर हा आकडा किती फुगला असता याची कल्पनाही करवत नाही.

      August 30, 2010


  • मार्मोरिस प्रवासगाथा: हिमाचल प्रदेश

    मार्मोरिस प्रवासगाथा: हिमाचल प्रदेश

    हिमाचल प्रदेशाची ओळख म्हणजे स्वच्छ निसर्ग, शांत धवल पर्वत, बर्फाचे गालिचे, देवदारांच्या झाडांचा सुगंध आणि अध्यात्माची अनोखी अनुभूति. या प्रवास कथेत आपण धर्मशाळा, डलहौजी, अमृतसर, मनाली आणि शिमला  या सर्व लोकप्रिय स्थानांना जोडणाऱ्या एका संस्मरणीय यात्रेचा अनुभव उलगडून पाहणार आहोत.

      January 1, 2026


  • इरोम शर्मिला आणि मणिपुरच्या खर्‍या समस्या

    इरोम शर्मिला आणि मणिपुरच्या खर्‍या समस्या

    मणिपूरच्या ‘आयर्न लेडी’ इरोम शर्मिला निवडणूक रिंगणात अपयशी ठरल्या. मिडीयामधे इरोम शर्मिला ह्यांच्या पराभवाची चर्चा अजुन चालुच आहे

      April 3, 2017


  • प्राचीन कोकणातील बंदरे

    व्यापार बहराला येण्यासाठी राजकीय स्थैर्य असण्याची आवश्यकता असते. मौर्य काळात आणि पुढे महाराष्ट्रात सातवाहन काळात अशा प्रकारचे राजकीय स्थैर्य मोठ्या काळासाठी उपलब्ध झाले आणि म्हणूनच सातवाहन काळात कोकणातील बंदरांतून पश्चिमेकडील देशांशी आणि विशेषकरून रोमन साम्राज्याशी मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे.

      November 22, 2022