(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • टाटाचे कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल विमान उड्डाण

    १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटांच्या विमानाने कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल उड्डाण केले.

    एअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस या नावाने झाली होती, भारतीय व्यावसायिक जे आर डी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल १९३२ मध्ये टाटा यांनी इंपिरियल एअरवेज साठी मेल घेऊन जाण्याचा करार मिळवला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला.

    १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटाने कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल विमान उड्डाण केले. हे विमान मद्रासला गेले, ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट Neville Vincent यांनी केले, जे टाटाचे मित्रही होते. सुरुवातीला कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवा चालवली, जी कराची आणि मद्रास दरम्यान आणि अहमदाबाद आणि मुंबई मार्गे चालवली. पुढील वर्षात विमान कंपनीने २,६०,००० किलोमीटर उड्डाण केले. यामध्ये पहिल्या वर्षी १५५ प्रवाशांनी प्रवास केला आणि ९.७२ टन मेल आणि ६०,००० रुपयांचा नफा मिळवला.

    टाटा एअर सर्व्हिसेसने मुंबईहून त्रिवेंद्रमला सहा आसनी माईल मर्लिनसह आपले पहिले घरगुती उड्डाण सुरू केले. १९३८ मध्ये त्याचे नाव बदलून टाटा एअरलाईन्स असे करण्यात आले. १९३८ मध्ये कोलंबो आणि दिल्ली जोडले गेले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एअरलाईनने रॉयल एअर फोर्सला त्यांच्या सैन्याच्या हालचाली, पुरवठा वाहून नेणे, निर्वासितांची सुटका करणे आणि विमानांची देखभाल करण्यास मदत केली.

    भारत सरकारने १९५३ मध्ये एअर कॉर्पोरेशन कायदा पास करून आणि टाटा सन्सकडून विमान कंपनीची मालकी खरेदी केली.कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड करण्यात आले. जे आर डी टाटा १९७७ पर्यंत अध्यक्ष म्हणून राहिले.

    २१ फेब्रुवारी १९६० रोजी एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडने ताफ्यात आपले पहिले बोईंग 707-420 समाविष्ट केले. या विमान कंपनीने १४ मे १९६० रोजी मुंबई न्यूयॉर्क सेवा सुरू केली. ८ जून १९६२ मध्ये एअरलाईनचे नाव अधिकृतपणे एअर इंडिया असे बदलण्यात आले. २००० मध्ये एअर इंडियाने चीनच्या शांघायला सेवा सुरू केली.

    २३ मे २००१ रोजी नागरी उड्डयन मंत्रालयाने कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मायकेल मास्करेन्हास यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स २००७ मध्ये एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन झाली. नुकतीच एअर इंडिया परत टाटांच्या कडे आली आहे.

      October 15, 2021


  • भारतातील मोबाईल सेवेची २६ वर्षं

    ज्या कोलकात्यातून १६४ वर्षांपूर्वी पहिली तार पाठविण्यात आली होती त्याच कोलकात्यातून ३१ जुलै १९९५ रोजी पहिला मोबाईल कॉल लावण्यात आला.

      July 31, 2021


  • आपलं स्वयंपाकघर.. भाग तीन

    अॅप्रन वापरणे हे अजुनही मागील पिढीतील स्त्रियांना एखादे फॅड वाटते. ‘उगाचच· कौतुक’ असा सूरही ऐकायला येतो.

      July 27, 2024


  • आहारातील बदल भाग ६० – चवदार आहार -भाग २२

    कडू चव म्हणजे फक्त मधुमेहवाल्यांसाठीच आहे, आमचा काही संबंध नाही, असं नाही. मधुमेह होऊ नये यासाठी देखील रोज खाण्यात कडू असावे.

    जसे तिखटाचा अॅण्टीडोट आंबट आहे, तसे गोडाचा कडू असे समजावे. ज्यांना गोड खूप आवडते त्यांनी अगदी तेवढ्या प्रमाणात नाही, पण कडू जरूर खावे. गोड खाऊन मधुमेह झालाय ना, आता तेवढेच कडू खातो, म्हणजे गोड " नील " होईल, असं नाही हां !

    कडूपणा कमी होण्यासाठी लवण रस उपयोगी होतो. कारल्याची भाजी जास्त कडू व्हायला नको असेल तर फोडींवर मीठ पेरून ठेवतात, मीठामुळे त्याला काही वेळाने पाणी सुटते. फोडी पिळून हे पाणी काढून टाकले तरी थोडा कडूपणा कमी होतो.

    कडू खाताना पण जरा काळजी घ्यावी लागते.
    अति प्रमाणात जर कडू चवीचे पदार्थ पोटात गेले तर पित्त हमखास वाढते. जेवणाच्या पानात कडू चवीची जागा डाव्या बाजूला असते, एवढे लक्षात ठेवावे.

    कारल्याची भाजी किंवा भजी, काही महाभाग तर रोज सकाळी कारल्याचा ज्युसदेखील पितात. मेथीची भाजी अथवा पराठे, मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ते पाणी पिणे, किंवा मेथी पावडर घेणे, भाकरीच्या किलोभर पीठात, दोन तीन चमचे मेथीची पावडर घालणे, शेवग्याच्या शेंगा आणि केळफूलाची भाजी देखील कडवटच असते. असा कडू आहार आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळा ठीक आहे, याने लिव्हर म्हणजे यकृताचे काम सुधारते. पित्ताला उद्दीपना मिळते, पाचक रस नीट पाझरायला मदत होते, जीभेला चव येते. आतड्यातील आमाचे गोळे हलायला, पुढे ढकलायला मदत मिळते.

    पण रोज रोज एवढे कडू खाल्ले तर स्नायुंची ताकद कमी होते. शुक्रजंतु कमी होतात, हे पण लक्षात ठेवावे. अति सर्वत्र वर्ज्ययेत् असे म्हणतात ते चुकीचे नाही.

    किराईत या कडू औषधाप्रमाणेच आणखी एक सुप्रसिद्ध कडू औषध म्हणजे कुमारी, कोरफड, अॅलोवेरा. याचा रस आटवला की त्यालाच काळा बोळ किंवा सबर म्हणतात. बाळऔषधात हा असतो.

    बाळगुटी हल्ली गायबच झालेली दिसते. त्यातील बहुतेक औषधे ही कडूच असतात. अगदी दररोज नको पण आठवड्यातून दोन वेळा, रविवारी आणि बुधवारी बाळाला दोन दोन वळसे अवश्य उगाळून द्यावी. उगाळून झाल्यावर ही गुटीतील कडू औषधे नीट पुसुन, कोरडी करून, ठेवावीत, म्हणजे बुरशी येत नाही.

    जे डाॅक्टर बाळाला बाळगुटी अजिबात देऊ नका, असे सांगतात, त्यांच्या "सिलॅबस" मधे बाळगुटी नसल्याने, त्या औषधांचा त्यांना अभ्यास नसतो, म्हणून त्यांना तसे सांगावे लागते. यात त्यांचा काहीच दोष नाही. हे सर्व डाॅक्टर्स लहानाचे मोठे होत असताना, कडू चवीची बाळगुटी खाऊनच मोठे झालेले आहेत, हे पण लक्षात ठेवावे.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    22.11.2016

      November 22, 2016


  • देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक संस्थेचा स्थापना दिन.

    आपल्या गुरूच्या आज्ञेवरून १ जुलै १९२५ रोजी ‘देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ या संगीत विद्यालयाची स्थापना केली. गिरगावातील प्रार्थना सभेच्या जागेमध्ये विद्यालय सुरू केले. विद्यालयाचे नामकरण श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले .

      July 1, 2021


  • मी येतोय… ५ सप्टेंबरला !!

    विज्या मी येतोय 5 सप्टेंबरला, या वेळेला जय्यत तयारी करशील, 10 दिवस रेलचेल राहिली पाहिजे, साल्या कुठेही काही कमी पडले असे व्हायला नको म्हणून हि आगाऊ सूचना.

    च्यायला, इकडे येण्यासाठी जीव कासावीस होत असतो, वर्षातील 355 दिवस मी कसे काढतो, माझे मलाच ठाऊक. बेचव, रटाळ या शिवाय दुसरे कुठलेच शब्द इकडच्या जीवनाला योग्य नाहीत. आमच्या जगात वर्षभर फार फार तर पंचवीस तीस लोकांचा सहवास, इथे मात्र 10 दिवस लोकांची मला भेटण्यासाठी नुसती झुंबड लागलेली असते. मज्जा म्हणजे काय ते फक्त या 10 दिवसात मला अनुभवायला मिळते.

    सर्वात महत्वाचे आमचे पिताश्री, व माय या दिवसात माझ्याकडे ढुंकूनही पहात नाहीत! काय पाहणार, जे दरवर्षी चालते तेच या वर्षी पण होणार.

    या वर्षी किती हप्ता गोळा केलास?, त्याची आकडेवारी दे, त्यात कट मारलेला मला चालणार नाही, धमकी वजा सूचना आली. मी कोणताच हिशोब कधीच दिला नाही, तरी याला कसे माझे कटींग किती आहे हे समजले ! आमच्या सानिध्यात राहून भलताच बेरकी झाला आहे. आता विचार करावाच लागेल, पार्टी बदलायचा, लवकरच याला बदलून नवीन कुणाची वर्णी लाऊन त्याच्या जीवावर मौज करायची, असा विचार मनात आला. याला डोईजड बनवून चालणार नाही, कारण आम्ही एकतर याच्या येण्याच्या आधी महिनाभर वसुलीला लागतो, त्यासाठी धमक्या द्याव्या लागतात, वेळ प्रसंगी जे शानपट्टी करतात त्यांना हाडांवर नंबर टाकून ठेवा, डाक्टरला जोडताना त्रास नको, असा पंटर मार्फत निरोप द्यावा लागतो, इतके करून बाचाबाची ( बा चा व बा ची) होतेच. हिशोब मागणे, हे मात्र जरा अतीच झाले.

    या वर्षी स्वारी जरा, जास्तच रंगात आली असे दिसते, चक्क म्हणाला, या वेळेस मी सर्व म्हणजे सर्व कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणार आहे. तुम्ही लोक माझ्या नावावर वसुली करता, मज्जा करता, मी काय नुसते पहात राहू?

    पूर्ण दहादिवस मी तुमच्यातील एक म्हणून राहणार आहे, जो गल्ला इथे गोळा होईल, त्यावर माझी करडी नजर राहील. दररोज रात्री समोरचा पडदा पडला की, स्टेज मागे आपली बैठक झालीच पाहिजे. या वेळेस ब्रँड चांगले हवेत, घेतल्यानंतर वास नको म्हणून भरपूर अगरबत्या लाऊन ठेवा. भाविकांचा प्रसाद मी चकणा म्हणून खाणार नाही, सांगून ठेवतो. काजू, बदाम, पिस्ता, जर्दाळू, हेच पाहिजेत, नाहीतर आणाल मसाला शेंगदाणे, बटाटा चिप्स, आणि फारसाण.

    या वर्षी पत्त्यांचे डाव मांडायचेच, मागीलवर्षी पैशावरून बराच वाद झाला, तसा या वर्षी होणार नाही याची दक्षता घे. रमी, तीनपत्ती, झालीच पाहिजे, मी यात सामील होणार नाही, कारण सर्व डाव मीच जिंकणार हे त्रिवार सत्य आहे, आणि काय सांगावे, तुमचा तो पप्या, बाल्या, बंटी, दादा लोक माझ्या पोटाला चाकू लाऊन शेवटच्या दिवशी मी मिळवलेले सर्व घेऊन पसार होतील. बाकी तुमचे हे चलन आमच्या राज्यात चालत नाही, आणि बदलून पण मिळत नाही, त्यामुळे तुमचा तमाशा पाहण्याचाच मी आनंद घेतो.

    यावर्षी मला निरोप देताना कोणती गाणी लावणार, जरा यादी देशील, डीजे जोरदार झाला पाहिजे सांगून ठेवतो, आर्ची परश्या ला बोलावशील, सैराटचा धुडगूस केलास तर गर्दी वाढेल, वसुलीतील सर्व अडका इथेच खर्च होउदे, नाहीतर त्या साक्षी- सिंधू सारख्याचे पोस्टर लाऊन बेरंग करशील. भाजनांचा, किर्तनांचा तर मला अगदी वीट आला आहे. वाजले कि बारा, चोली के पीछे, चुम्मा दे अशी गाणीच लावायची.

    आणि काय रे तुझ्या डोक्यात नसते विचार येऊ लागले आहेत, पोरीबाळी साठी वेगळ्या रांगा म्हणे, अरे येड्या, पोर उनाड असतातच, जरा मुलींची छेड काढली, गर्दीचा फायदा घेऊन, त्यांना हात लावला तर इतकं मनावर घ्यायचे नसते. अचकट विचकट हाव भाव करू देत, काही फरक पडत नाही, जरा नशापाणी केल्यावर असं होतेच, आदर्शवाद मी गेल्यानंतर.

    स्वच्छ पाण्याची मला ऍलर्जी आहे, दर वर्षी तुम्ही लोक मला गटारी सारख्या निर्मळ पाण्यात बुडवता, आता त्याचीच सवय झाली आहे. पर्यावरण वाद्यांचा आयचा घो, खूप माजले आहेत, प्रत्येक सणात काहीतरी दोष काढतातच, म्हणे मला पाण्यात बुडवल्याने मासे मरतात, अरे या विश्वाचा कर्ता करविता मीच आहे, दहा पंधरा हजार मासे मेले तर काय मोठा फरक पडणार आहे? तुम्ही सर्व कायदे झुगारून मला तलावात, नदीत, समुद्रात टाकाच.

    दुसऱ्या दिवशी मी हात पाय मोडलेल्या, तुटलेल्या अवस्थेत तीरावर, पडलेला दिसणार आहे, असुदे. सफाई कामगार मग माझे तुकडे त्यांच्या कचऱ्याच्या गाडीत भरून, घेऊन जातील, आणि गावाच्या बाहेर फेकतील. तसेही आपला धर्म सांगतोच, आत्मा गेल्यावर शरीर नश्वर आहेच, ते नष्ट करायलाच पाहिजे. पण थोडा हा पण विचार करा, तुम्हालाही मेल्यानंतर असेच कचऱ्यात टाकून दिलेले आवडेल का? कुत्री, मांजरे तुमच्या देहाचे लचके तोडतील तर तुमच्या घरच्यांना त्याचे काही दुःख होणार नाही, असे मी समजायचे का? माझी जी अवस्था तुम्ही करताय, तशीच तुमची नको का व्हायला?

    माझ्या उंचीवर बंधने आणणारे, उपदेश देणारे यांना मात्र उलटे टांगून मिरचीची धुरी द्या, या वर्षी माझी उंची किमान 30 फूट असली पाहिजे, आणि हो, वीज आकडा टाकून घ्यायची, वर्गणीतील पैशाने विजेचे बिल भरशील तर मी मुळीच खपवून घेणार नाही.

    तो लोकमान्य उर्फ केशव (बाळ) गंगाधर टिळक, त्याचा तिकडे गेल्यावर चांगलाच समाचार घेतो, लोकांना उगीचच आदर्शवाद, देशाभिमान, सुसंस्कृत, असले सुतकी विचार सुचवण्याचा, तसेच त्यांना सुधरवण्याचे, त्यांचे दुःसाहस यासाठी त्यांना चांगला धडा शिकवतो.

    -- विजय लिमये
    (9326040204)

      September 3, 2016


  • सागरी सुरक्षेत गुणात्मक सुधारणांची गरज

    १७ मे २०१५ला समुद्रात नौदलाच्या बोटीवरून खोल समुद्रामध्ये मच्छिमारांच्या बोटीवरील गोळीबारात सुशांत लुजी (२४) हा खलाशी जखमी झाला .त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘खरिस्ताएल’ या बोटीवरील मच्छिमार बेकायदेशिररित्या समुद्रात टाकलेली जाळी ओढण्याचे काम करीत होते.ओएनजीसी ओइल प्लॅट फॉर्म जवळ रात्रीच्या वेळेस प्रखर लाइट असल्यामुळे जास्त मासे मिळतात.सुरक्षा रक्षकांनी मच्छिमारांना हटकले. नंतर हवेत गोळीबार करण्यात आला.

      May 28, 2015


  • देवपूजेतील शुभकारक साधने

    आपण आपल्या घरात नित्यनेमाने देवपूजा करत असतो. या देवपूजेमध्ये आपण अनेक वस्तूंचा उपयोग करत असतो. ही सर्व साधने आपल्या घरात असतात मात्र त्याविषयी जास्त माहिती बहुतेकांना नसते.

    देवपूजेत आपण हमखास वापरतो त्या वस्तू म्हणजे ताम्हण, घंटा, निरांजन, समई, फुले, नरळ, हळद-कुंकू, पळी-पंचपात्र वगैरे. याशिवाय फुले, अक्षता, गंध, शंख, कलश, भस्म, अगरबत्ती, रुद्राक्ष, विविध प्रकारची पत्री यांचाही देवपूजेत वापर होतो.

    देवपूजेत वापरल्या जाणार्‍या प्रत्येक साधनाला काहीतरी महत्त्व आहे. ही सर्व साधने अत्यंत पवित्र आहेत. या सर्व साधनांच्या वापरामुळे जी फलप्राप्ती होते त्याविषयीही आपल्याला बर्‍याचदा माहित नसते.

    सध्या वास्तुशास्त्र आणि फेंगशुईचे प्रस्थ वाढलेले आहे. त्यामध्ये देलेल्या वस्तूंपासून लाभ होतो असा अनेकांचा समज आहे. काही प्रमाणात हे खरेही आहे. मात्र आपल्या भारतीय संस्कृतीतील देवपुजेच्या विविध साधनांमुळेही आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होतात हे आपण लक्षात घेत नाही आणि उगीचच चायनिज वस्तूंच्या मागे लागतो. आपल्याच घरातील या शुभ साधनांचा श्रद्धापूर्वक वापर केल्यास आपल्याला सुख, समाधान, शांती आणि समृद्धी लाभेल यात शंकाच नाही.

    शुभ गोष्टींची सुरुवात आपण ॐकाराने करतो. ॐ हे ब्रम्ह आहे. ॐ हे अक्षर संपूर्ण विश्वाचे प्रतिक आहे. ओम हा परब्रम्हाचा संकेत असल्यानें ब्रम्हाच्या सर्व रुपांचा म्हणजेच `व्यक्त आणि अव्यक्त', `कालाधीन आणि कालातीत', `दृश्य आणि अदृश्य' रुपांचा वाचक आहे.

    अध्ययनाला प्रारंभ करताना ॐ म्हणून "मला ब्रम्हप्राप्ति होवो" असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे देवपुजेची सुरुवातही ॐकाराने केली जाते.

    `देवपूजेतील साधने' या खास लेखमालेच्या माध्यमातून आपल्याला ओळख करुन दिलेय या सगळ्या पवित्र साधनांची. पौराणिक माहितीव्यतिरिक्त ऐतिहासिक आणि वैज्ञानिक माहितीही देण्याचा प्रयत्न इथे केलाय.

    -- मराठीसृष्टी व्यवस्थापन

      December 28, 2015


  • स्लिप डिस्क

    मणक्यांभोवतीच्या पेशींना इजा होऊन त्या तुटतात तेव्हा स्लिप डिस्क हा आजार होतो. दोन मणक्यांमधील मऊ चकती हालचाल करण्यासाठी, पुढे मागे करता येण्यासाठी या पेशी मदत करत असतात. ही सरकल्यामुळे हा आजार होतो. पाठीचा मणका हा 26 हाडांनी बनलेला असतो. प्रत्येक हाडांमध्ये मऊ चकती असते. ही चकती हाडांचे रक्षण करतेच; परंतु चालताना, पळताना शरीराला बसणार्याय हादर्यांुपासून मणक्याचे रक्षण करण्याचे काम करते. ही चकती दोन भागात असते. चकतीचा आतला भाग मऊ, मांसल असतो तर बाहेरचे कवच कठीण असते. कोणताही जखम किंवा आजारपण यांमुळे चकतीचा मऊ भाग कठीण कवचाच्या बाहेर ढकलला जातो. यालाच स्लिप डिस्क म्हणतात. काही गंभीर स्थितीत स्लिप डिस्कचा इलाज करण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते.
    स्लिप डिस्क होण्याची कारणे
    पाठीच्या कण्यामध्ये स्लिप डिस्कचा धोका संभावतो. कधी तरी चकतीच्या बाहेरील भाग कमजोर होतो, तुटतो त्यामुळे आतील मांसल भाग बाहेर येतो. काही वेळेला चुकीच्या हालचालींमुळेही स्लिप डिस्कचा धोका संभवतो. एखादी वस्तु उचलताना, मणका फिरला किंवा ट्विस्ट होतो, कधी अतिजड वस्तू उचलल्यामुळे पाठीच्या कण्यावर ताण येतो. अशा प्रकारांमुळे स्लिप डिस्कचा त्रास होतो. कमजोर स्नायू, बैठे काम यामुळेही स्लिप डिस्क होऊ शकतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही ही समस्या भेडसावते. काही इतर गोष्टीही तुमच्या मणक्यावरील दाब वाढवतात.
    * झटकन खाली वाकणे
    * नोकरीत जड वस्तू उचलण्याचे काम
    * गाडी चालवण्यासारखी सतत बसून करण्याची कामे
    * धूम्रपान
    * अतिलठ्ठ किंवा वजन जास्त असणे
    * वेटलिफ्टिंग साऱखे वजन जास्त लागणारे खेळ
    * गाडी अपघातात मणक्यांना होणारी दुखापत
    स्लिप डिस्कची लक्षणे
    * असह्य वेदना, बधीरपणा, बहुतेकदा शरीराच्या एका भागात हे त्रास जाणवतात.
    * पाठीतून सुरू होणारे हे दुखणे नंतर पाय आणि हातांपर्यत येते.
    * रात्रीच्या वेळी असह्य वेदना होतात
    * बसताना उठताना देखील असह्य वेदना होतात.
    * कमी अंतर चालून जाणे सुद्धा वेदनादायी ठरते.
    * स्नायूंमध्ये कमजोरी येणे, स्लिप डिस्क झालेल्या जागी मुंग्या येणे जळणं, दुखणे,आदी लक्षणे दिसतात.
    * अर्थात प्रत्येक रुग्णागणिक वेदनांचे स्वरुप बदलत जाते. जर मुंग्या येणे किंवा बधीरपणा जाणवत असेल, तर वैद्यकिय मदत घेणे गरजेचे आहे.
    उपचार
    आजार किती बळावला आहे, त्यावर उपचारांची दिशा अवलंबून असते. मणक्याची चकती तिच्या जागेवरुन किती सरकली आहे, यावरही औषधोपचार काय करावे हे ठरते. ठराविक व्यायामाने औषधांशिवाय रुग्णांना आराम मिळतो. पाठीच्या कण्याला ताण देण्यासारखे व्यायाम पाठ आणि स्नायूंना ताकद देतात. फिजिओ़थेरिपी ने स्लिप डिस्कमध्ये फायदा होतो. त्यातील तज्ज्ञांनी सांगितलेल्या व्यायामाने तुमच्या पाठीचे स्नायू मजबूत होऊन तुमचे दुखणे कमी होईल.
    स्लिप डिस्क आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गांभीर्य वाढून नसांना कायमस्वरुपाची इजा होऊ शकते. काही अपवादात्मक परिस्थितीत स्लिप डिस्कमुळे पाय किंवा पाठीच्या नसांचा आजार होतो. त्याला कॉडा इक्विना असे म्हणतात. हा त्रास उद्भवल्यास मुत्राशय किंवा आतड्यावरील नियंत्रण गमावण्याची भीती असते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- डॉ. रामदास जाधव

      December 30, 2016


  • नवीन नोटांचे राजकारण

      November 30, 2016