(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • टाईरोना फरनान्डो स्टेडियम

    टाईरोना फरनान्डो स्टेडियम हे मैदान श्रीलंकेतील मोराट्वा येथे आहे. या मैदानाचा विविध खेळांच्या सामन्यांसाठी किंवा सरावासाठी उपयोग केला जातो.

      July 18, 2023


  • सुभाषित रत्नांनी – भाग ६

    १. चिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः |
    सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ||

    अर्थ :
    चिन्ता आणि चिता सारखी आहे फरक फक्त अनुस्वाराचा. चिन्ता (काळजी) जिवंत माणसाला जाळते तर चिता जीव निघून गेल्यावर (मृताला) जाळते. हे संस्कृत सुभाषित फारच प्रसिद्ध आहे.


    २. नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम्, नष्टा विद्या लभ्यतेऽभ्यासयुक्ता |
    नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम् नष्टा वेला या गता सा गतैव ||

    अर्थ :
    (खूप) कष्ट करून गेलेली संपत्ति मिळवता येते. (विसरल्यामुळे) गेलेली विद्या अभ्यास करून (पुन्हा) मिळवता येते. तब्बेत खराब झाली तर चांगले उपचार करून ति सुधारता येते. पण वेळ (वाया) घालवला तर तो गेला तो गेलाच. (वेळ वाया घालवण टाळावं). वेळेचे महत्व वर्णन केले आहे. गेलेली वेळ किती मौल्यवान असते कारण ती परत येत नाही.


    ३. श्व:कार्यमद्य कुर्वीत पूर्वांण्हे चापराण्हिकम् |
    न हि प्रतीक्षते मृत्युः कृतमस्य न वा कृतम् ||

    अर्थ :
    उद्या करायचे काम आज करावे आणि दुपारनंतर करायचे काम सकाळीच करावे. कारण ह्या माणसाचे काम झाले आहे किंवा नाही याची मृत्यु वाट पाहत नाही.
    कबीराचा दोहा पण हेच सांगतो. कल करे सो आज कर, आज करे सो अब, क्षणमे प्रलय होगा, बहुरी करेगा कब?


    ४. त्वयि मेऽनन्यविषया मतिर्मधुतेऽसकृत् |
    रतिमुद्वहताद्धा गङ्गेवोघमुदन्वति || कुन्ती भागवत १ स्कंध ८ अध्याय

    अर्थ :
    हे मधू राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, गंगेचा प्रवाह ज्याप्रमाणे (न थांबता, सतत) समुद्राकडे झेप घेतो त्याप्रमाणे तुझ्याविषयी माझ्या मनात एकान्तिक (दुसरा कुठलाही विचार न येता फक्त तुझेच चिंतन एवढा एकच) विचार येवो. देवाची भक्ती करतांना खूप तल्लीन व एकरूप होऊन करावी लागते तरच देव तुम्हाला पावतो. म्हणूनच मीरादेवीस श्रीकृष्ण भेटला.


    ५. भारतं पञ्चमो वेदः सुपुत्रः सप्तमो रसः |
    दाता पञ्चदशं रत्नं जामातो दशमो ग्रहः ||

    अर्थ :
    महाभारत हे पाचवा वेद (वेदा इतका पवित्र) आहे. चांगला मुलगा सातवा रस आहे. (अन्नातल्या षड्रसांप्रमाणे सुख देतो). उदार मनुष्य हे पंधरावे रत्नच आहे. जावई नऊ ग्रहांप्रमाणे दहावा ग्रहच आहे. (मंगळ, शनी वगैरे ग्रहांप्रमाणे त्रास देऊ शकतो.)
    हा पण एक प्रसिद्ध श्लोक आहे.


    ६. मृदोः परिभवो नित्यं वैरं तीक्ष्णस्य नित्यशः |
    उत्स्रृज्य तद्द्वयं तस्मान्मध्यां वृत्तिं समाश्रयेत् ||

    अर्थ : (फार) मऊपणाने वागलं तर नेहमी अपमान होतो. खूप तापटपणा केला तर (सगळ्यांशी) भांडणं होतात. म्हणून या दोन्ही गोष्टी सोडून (माणसाने) मध्यममार्ग स्वीकारावा हे उत्तम.


    ७. नारिकेलसमाकाराः दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः |
    अन्ये बदरिकाकाराः बहिरेव मनोहराः ||

    अर्थ:
    सज्जन (नुसत) पाहिल्यावर नारळासारखे (खडबडीत; कडक; कठोर असावेत असे दिसते); पण नारळात ज्याप्रमाणे गोड पाणी; स्वादिष्ट खोबर असतं तसे ते असतात. दुसरे (दुर्जन) बाहेरूनच फक्त बोराप्रमाणे आकर्षक असतात. (पण अनुभव चांगला येत नाही.) पण आतून दुष्टच असतात.


    ८. नभो भूषा पूषा कमलवनभूषा
    मधुकरो वचोभूषा सत्यं वरविभवभूषा वितरणम् |
    मनोभूषा मैत्री मधुसमयभूषा मनसिजः
    सदोभूषा सूक्तिः सकलगुणभूषा च विनयः ||

    अर्थ:
    सूर्य हा आकाशाचा अलंकार आहे. कमळांच्या बागेला भुंगा शोभा आणतो. खरं बोलण्याने वाणी शोभून दिसते. अधिक संपत्ती दान करण्याने सुंदर दिसते. मैत्री हा मनाचा अलंकार आहे. वसंतऋतु मध्ये मदनाचा अस्तित्व शोभून दिसते. सभेमध्ये चांगल वक्तृत्व शोभून दिसते. (तर) नम्रता सर्व गुणांना खुलवते.


    ९. खलः सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यति |
    आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति ||

    अर्थ:
    दुष्ट माणसाला दुसऱ्याच वैगुण्य मोहोरी एवढ असलं तरी डोळ्यावर येत, पण स्वतः मधे मात्र बेलफळाएवढा (मोठा) दोष दिसत असून सुद्धा तो न दिसल्याप्रमाणे वागतो. अशाच अर्थाची मराठीत म्हण आहे. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.


    १०. रिपुशेषं व्याधिशेषं चाग्निशेषं तथैव च |
    पुनः पुनः प्रवर्धन्ते तस्माच्छेषं न कारयेत् ।।

    अर्थ:
    शत्रू, रोग आणि अग्नि या तिघांचा अल्पसा भाग जरी शिल्लक राहिला तरी ते पुनः वाढतात . म्हणून शत्रुचा नाश करताना, रोगावर उपाय करताना आणि अग्नि विझवताना तो किंचितही शिल्लक राहणार नाही असे बघावे. महाराणा प्रताप याने महंमद घोरीला युद्धामद्ध्ये हरवून बारा वेळा जीवदान दिले पण घोरीनेच त्याला शेवटी ठार केले.


    ११. अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम।
    उदार चरिता नाम तु वसुधैव कुटुंबकम ।।

    अर्थ:
    हे माझे, हे दुसऱ्याचे असे असा विचार छोट्या मनाचे लोक करतात. विशाल मनाचे लोक हि पृथ्वी आपले कुटुंब आहे असा विचार करतात.


    १२. उद्यमं सक्षमं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः।
    षडेते यत वर्तन्ते तत्र देवः सहायकृत। ।

    अर्थ:
    प्रयास, साहस, धैर्य, बुद्धि , शक्ति तथा पराक्रम देखील साहाय्य करतात. ज्याच्याकडे हे सहा गुण आहेत त्याला देव देखील साहाय्य करतात.


    १३. धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।
    तस्माद् धर्मं न त्यजामि मा नो धर्मो हतोऽवधीत् ॥
    मनुस्मृति ८. १५

    धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ।
    तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत् ॥
    महाभारत ३.११४.१३१

    एकाच अर्थ असणारे हि सुभाषिते वेगवेगळ्या ठिकाणी उद्धृत झाली आहेत.

    अर्थ:
    (ज्याचा) धर्म नष्ट झाला (तोही) संपून जाईल, जो धर्माचे रक्षण करतो त्याचे धर्म रक्षण करतो. म्हणून मी धर्माचा त्याग करणार नाही किंवा धर्माला नष्ट करणार नाही, कुणीही नष्ट करू नये. तसे केले तर मीच नष्ट होईन, तोच नष्ट होईल.


    १४. उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे।
    असाधुजनसंपर्के यः पलायेत् स जीवति ॥
    चाणक्यनीतिदर्पण अ. ३.१९

    अर्थ: जो माणूस नैसर्गिक आपत्ती, परक्याचा हल्ला, भयानक दुष्काळ, दुष्टांची संगति अशापासून दूर पळून जातो तो जीवंत राहतो. अशा वेळी स्वतःचा जीव वाचवणेच सर्वात जास्त महत्वाचे असते. हिंदी मधल्या म्हणी प्रमाणे सिर सलामत तो पगडी पचास।


    १५. विद्याभ्यासो विचारश्च समयोरेव शोभते।
    विवाहश्च विवादश्च समयोरेव शोभते ॥
    सुभाषितरत्नभण्डागार -सुधर्मादिनपत्रिका

    अर्थ: समान (पातळीवरील) लोकांनी एकत्र विद्या शिकणे आणि विचारविनिमय करणे बरे दिसते, त्याप्रमाणेच समान लोकांमध्येच विवाह आणि वादविवाद होणे चांगले असते.


    १६. गुणी गुणं वेत्ति न वेत्ति निर्गुणो
    बली बलं वेत्ति न वेत्ति निर्बल:।
    पिको वसन्तस्य गुणं न वायस:
    करी च सिंहस्य बलं न मूषक: ॥

    अर्थ: गुणी पुरुषच दुसऱ्याचे गुण ओळखू शकतो. गुणहीन पुरुष ते ओळखू शकत नाहीत. बलवान पुरुषच दुसऱ्याचे बळ (शक्ती) ओळखतो. बलहीन पुरुष हे करू शकत नाही. वसन्त ऋतु आला हे कोकिळा ओळखते, कावळा नाही. वाघाची शक्ती हत्तीचं जाणतो, उंदीर नाही.


    १७. कन्या वरयते रुपं
    माता वित्तं पिता श्रुतम्
    बान्धवा: कुलमिच्छन्ति
    मिष्टान्नमितरेजना:

    अर्थ: विवाहाच्या वेळी कन्येला (वधूला) सुंदर पती पाहिजे असतो. तिच्या आईला सधन जावई पाहिजे असतो. तिच्या वडिलांना विद्वान जावई पाहिजे असतो, तसेच तिच्या नातेवाईकांना चांगले खानदान पाहिजे असते. परंतु बाकी लोक लग्नात केलेल्या फक्त मिष्टान्ना करता येतात.


    १८. अश्वस्य भूषणं वेगो मत्तं स्याद गजभूषणम्।
    चातुर्यं भूषणं नार्या उद्योगो नरभूषणम्॥

    अर्थ: घोड्याचा वेग हि त्याची ओळख आहे, मस्त चाल हे हत्तीचे आभूषण आहे, चातुर्य हा स्त्रीचा अलंकार आहे व सदा उद्द्योगी राहणे हे विद्वान पुरुषाचे लक्षण आहे.


    १९. वॄत्तं यत्नेन संरक्ष्येद् वित्तमेति च याति च।
    अक्षीणो वित्तत: क्षीणो वॄत्ततस्तु हतो हत:॥

    अर्थ:
    आपल्या चारित्र्याचे रक्षण सदैव केले पाहिजे. कारण सदाचारी माणसाच्या साठी चरित्र हेच सर्वस्व असते. पैसा( धन) येते व जाते. गेलेला पैसे परत मिळवता येतो, नष्ट झालेले चारित्र्य पुन्हा मिळवता येत नाही. ती व्यक्ती समाजात तोंड दाखवायच्या लायकीची राहत नाही. मेलेल्या माणसा सारखी त्याची स्थिती असते.


    २०. दिवसेनैव तत् कुर्याद् येन रात्रौ सुखं वसेत्।
    यावज्जीवं च तत्कुर्याद् येन प्रेत्य सुखं वसेत्॥

    अर्थ: मनुष्याला दिवसभर असे (चांगले) काम केले पाहिजे कि तो रात्रभर सुखाने झोपू शकेल. आणि जिवात जीव असे पर्यंत सत्कृत्य केले पाहिजे कि मेल्या नंतर सुद्धा तो सुद्धा सुखी राहील.


    २१. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्।
    सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छति ॥

    अर्थ: जसे आकाशातून पडलेले पाणी कसेही (ओढा, नदी, इत्यादी ) मार्गे शेवटी समुद्राला जाऊन मिळते, तसे कोठल्याही देवतेला केलेला नमस्कार एकाच परमेश्वरास मिळतो.


    २२. मूर्खस्य पञ्च चिह्नानि गर्वो दुर्वचनं मुखे।
    हठी चैव विषादी च परोक्तं नैव मन्यते॥

    अर्थ: मूर्ख लोकांचे पाच गुणधर्म असतात. ते अहंकारी असतात, त्यांच्या तोंडात कायम वाईट शब्द असतात, ते जिद्दी असतात , दुसऱ्या लोकांचे अजिबात ऐकत नाहीत व नेहमी वाईट चेहरा करून बसतात.


    २३. अष्टौ गुणा पुरुषं दीपयंति प्रज्ञा सुशीलत्वदमौ श्रुतं च।
    पराक्रमश्चबहुभाषिता च दानं यथाशक्ति कृतज्ञता च॥

    अर्थ: आठ गुण पुरुषांना शोभतात – बुद्धि, सुन्दर चरित्र, आत्म-नियंत्रण, शास्त्र-अध्ययन, साहस, मितभाषिता, यथाशक्ति दान आणी कृतज्ञता.


    २४. क्षमा बलमशक्तानाम् शक्तानाम् भूषणम् क्षमा।
    क्षमा वशीकृते लोके क्षमयाः किम् न सिद्ध्यति॥

    अर्थ: क्षमा निर्बल लोकांची शक्ती आहे, क्षमा बलवान लोकांचे आभूषण आहे. ह्या जगास क्षमेनेच वश केले आहे. क्षमेमुळे कोणती गोष्ट्य प्राप्त होत नाही? (सर्व गोष्टी प्राप्त होतात).


    २५. अश्वं नैव गजं नैव व्याघ्रम नैव च नैव च।
    अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलघातकः ।।

    अर्थ: (यज्ञा मद्धे) अश्व नाही, हत्तीही नाही, व्याघ्र तर नाहीच नाही पण गरीब बोकडाचा (अजापुत्र) मात्र बळी दिला जातो. देव सुद्धा दुर्बलांना घातक असतात.


    आजकालच्या काळात मोठे मोठे करोडो रुपयांचे घोटाळे होतात. पण त्यात बळी कोण जातो?
    त्याच्या वरचा हा नवीन श्लोक :

    सेक्रेटरी नैव,चेअरमन नैव, मिनिस्टर नैवे च नैवे च ।
    कनिष्ठ लिपिकः बली दद्ध्यात, सी आर दुर्बल घातकः ।।

    अर्थ: (घोटाळ्यात) सेक्रेटरी नाही, चेअरमन, मिनिस्टर तर नाहीच नाही,
    बिचारा कनिष्ठ बाबू चा बळी जातो कारण त्याचा गुप्त अहवाल (सी आर) खराब केला जातो.


    -- डॉ. दिलीप कुलकर्णी
    मोबा: ९८८१२०४९०४
    दिनांक: २३.०४. २०२३

      June 5, 2023


  • सुर्य नमस्कार का घालायचे?

    आपल्याला शाळेत आठवी, नववी मधे शरीर शास्त्रात शिकवलेआहे की--आपल्या पोटात जठर, यकृत म्हणजे मराठीत लिव्हर,प्लीहा,स्वादु पिंड,लहान आंतडे, मोठे आंतडे मुत्र पिंड वगेर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी 22 फूट आहे.

    आता विचार करा. देवाने,निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व 22 फूटाचे आतडे कसे बसविले असेल? 22 फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते आणि आपण जे अन्न खातो त्याचा व्हाल्युम किती? हे कसे? विचार चालेना!! एक दिवस

    फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले, आन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो,प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीरा बाहेर पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवशक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सुर्यनमस्कारात ते होते.

    सुर्यनमस्कारात प्रथम खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर डावा पाय दुमडतो व उजवा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते.नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लॅडला व स्रियाना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो. दिवसभराच्या कामाने संध्याकाळीच आपण दमून जात असू तर सकाळी 5 ते 12 नमस्कार घातले तर दमायला होत नाही. रात्री पर्यंत फ्रेश राहतो व दिवस उत्साहात जातो असा माझा गेल्या 32 वर्षाचा अनुभव आहे.

    1985 साली मला एक गृहस्थ भेटले. वय 72 होते. मला म्हणाले--मला दोन दिवस संडासला झाली नव्हती, डायबेटीस,गुडघे दुखी होती. (हे बोटीवर कॅप्टन होते) 69 व्या वर्षी आयुष्यातील पहिला सुर्यनमस्कार घातला आणि संडासला धावलो. जोशी आता किती नमस्कार घालत असेन सांगा. मी म्हणालो २०-२५ घालत असाल. ते म्हणाले- रोज 156 नमस्कार घालतो माझे सर्व त्रास गेले

    ह्या गृहस्थाचे पासून मी स्फुर्ती घेतली व नमस्कार चालू केले. माझा अनुभव असा की रोज 5 ते 12 नमस्कार तब्बेत चांगली ठेवायला पुरतात.

    नमस्कारासाठी झोपण्या एवढीच जागा लागते. 10 ते 15 मिनीटे लागतात. घरी करणे असल्याने जीमची फी व जाण्या येण्याचा वेळ वाचतो.

    फक्त केले पाहिजे रे !!?

    -- अरविंद जोशी
    B.Sc.

    ९४२१९४८८९४

      April 6, 2017


  • श्री. गंगावतरण

    श्री गंगामाई तूं माते । पावन करिसी सर्वाते ।।
    धुवूनी काढसी पापाते । तुझ्या स्पर्शाने ।। १।।

    जया होई गंगास्नान । जाईल तो उध्दरुन ।
    गंगादेवी पतीत पावन । किर्ति असे तुझी ।।२।।

    कहानी ऐका गंगेची । पृथ्वीवरी अवतरण्याची ।।
    पराकाष्ठा केली प्रयत्नाची । भगीरथाने ।।३।।

    समुद्राचे झाले मंथन । अमृत निघाले त्यांतून ।।
    विष्णु कुंभ हाती घेऊन ब्रम्हास दिले ।।४।।

    जेव्हां राक्षस मातले । कुंभ घेण्या येवूं लागले ।।
    ब्रह्मास कठिण वाटले । त्या क्षणी ।।५।।

    विष्णूंनी केला उपदेश । पार्वती बहिण गंगेस ।।
    आणूनी तिजला स्वर्गास । अमृत शिंपावे ।।६।।

    गंगा होईल आमृतमय । कुंभाची मग भिती न रहाय ।।
    पावन करित ती जाय । स्वर्गातील सर्वाते ।।७।।

    आमृतमय गंगा झाली । स्वग्रातुन वाहु लागली ।
    सर्व देवता संतुष्ट झाली । तिच्या आगमनाने ।।८।।

    सुर्यवंशी राजा भगिरथ । करु लागला तप अविरत ।
    सामर्थ्य चालले वाढत । तयाचे ।।९।।

    तपाची शक्ती महान । तयापुढे नमती सर्वजण ।।
    परमेश्वरही देती मान । तपवस्वी पुढे ।।१०।।

    तपाच्या लहरी ऊठती । स्वर्गात त्या जाऊं लागती ।।
    गंगेच्या चरणीं आदळती । एका मागुनी एक ।।११।।

    तप शक्तीच्या लहरी । गंगेस बैचैन करी ।।
    धावत गेली श्री हरी । तयासी पुसण्या ।।१२।।

    भगीरथाचे तप कठिण । शक्ती त्याची होत महान ।।
    सर्वासाठी ते आव्हान । इच्छा सत्वरी पूरवावी ।।१३।।

    प्रसन्न झाली गंगादेवी । भगीरथासी दर्शन देई ।।
    तुजवर मी प्रसन्न होई । माग वर म्हणाली ।।१४।।

    हे माझें गंगाआई । पृथ्वीवरी तूं येई ।।
    पातकासी दिलासा देई । ह्या भूमीवर ।।१५।।

    भगीरथाची पाहता भक्ती । येण्यासाठी मान्य करिती ।।
    सोडून देई स्वर्गाती । पृथ्वीवरी येण्या ।।१६।।

    नारद आले स्वर्गातूनी । भगीरथा आशीर्वाद देऊनी ।।
    गंगेस रोकती तत्क्षणी । पृथ्वीवरी उडी घेण्या ।।१७।।

    हास्य वदन करुनी । दोघांना सागंती समजावूनी ।।
    परिणाम उडी घेण्यानी । गंगामाईच्या ।।१८।।

    प्रंचड प्रवाह गंगेला । सहन न होई पृथ्वीला ।।
    दुभंगुनी जाई पाताळाला । महान शक्ती मुळें ।।१९।।

    उपाय एक तयावरी । जर शिव झेलील शिरावरी ।।
    नंतर उतरसी पृथ्वीवरी । भार हलका होईल ।।२०।।

    प्रसन्न करावे शिवासी । वर मागावा त्यासी ।।
    मदत करावी गंगेसी । पृथ्वीवरी येण्याते ।।२१।।

    भगीरथ प्रयत्न महान । तपश्चर्या केली कठिण ।।
    शिवासी केले प्रसन्न । वर मागुनी घेती ।।२२।।

    गंगेची महान शक्ती । पृथ्वी माते न पेलती ।।
    घ्यावे तू शिरावरती । उडी घेत समयी।।२३।।

    गंगेने उडी घेतली । गंगेने शिरावर झेली ।।
    गंगा जटेत सामावली । शिवशक्ति मुळें ।।२४।।

    उतरुन प्रथम शिव जटेंत । प्रवाह केला खंडित ।।
    नंतर पृथ्वीवरी उतरुनी । वाहु लागली गंगा ।।२५।।

    एक द्रूश्य आगळे । गंगेने पृथ्वी प्रदाप्रिले ।।
    जमुनी देव सगळे । सोहळा बघती ।।२६।।

    स्वर्गातील अमृत । गंगेच्या रुपात ।।
    पृथ्वी वरुन वहात । जावू लागले ।।२७।।

    पृथ्वीवरील पातक धुतले । तिला पावन केले ।।
    पाप नाशिननी संबोधिले । गंगामाईसी ।।२८।।

    डॉ.भगवान नागापूरकर
    १०- ३०१०८३

    ( दशहरा म्हणजे दहापापे हरण करणारी. हे गंगानदीचे नांव आहे. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमी पर्यंत गंगेचे पूजन, अर्चन, गंगास्तूति वाचन, गंगा स्तोत्र पठण, गंगा स्नान, जलपान, गंगावतरणाच्या इतिहासाचे वाचन या पैकी शक्य असेल ते करुन दशहरा उत्सव साजरा करावा )

      January 10, 2018


  • द्वादशलिंग स्तोत्रम् – २

    द्वादश ज्योतिर्लिंगातील दुसरे स्थान म्हणजे श्रीशैल पर्वतावर असणारे श्री मल्लिकार्जुन क्षेत्र. या स्थानाला दक्षिण कैलास असे देखील म्हणतात.

      September 5, 2020


  • दवोत्सव

    सोसायटीच्या गेटवरचा नवा वॉचमन हसून स्वागत करता झाला आणि त्याने अदबीने बॅरिकेड वर केलं. मीही त्याला ” काय म्हणतंय धुकं आणि थंडीची रात्र कशी गेली ? ” असं विचारलं. त्याने होकारात मान हलवली.

      March 7, 2022


  • डॉ. विल्‍फ्रेड बिगलो

    दुसर्‍या महायुद्धाच्‍या काळात डॉ. ड्वाईट हार्केन यांनी हृदयावर शस्‍त्रक्रिया करण्‍याची एक पद्धत विकसित केली. या पद्धतीने केलेल्‍या शस्‍त्रक्रियेत प्रथम हृदयाला लहानसे छिद्र पाडण्‍यात येत असे. मग त्‍या छिद्रातून हाताचे बोट हृदयात घालून अरुंद झडप (व्‍हॉल्‍व्‍ह) थोडीशी मोठी करण्‍यात येई. हळूहळू हृदयशल्‍यचिकित्‍सकांना यात प्राविण्‍य मिळाले व अशा शस्‍त्रक्रिया सुलभतेने होऊ लागल्‍या. ही झाली ‘क्‍लोज्‍ड हार्ट’ अथवा आंधळी शस्‍त्रक्रिया. या शस्‍त्रक्रियेमुळे कितीतरी रुग्‍णांना फायदा झाला असला तरीही या पद्धतीला बर्‍याच मर्यादा होत्‍या. जर का हृदयाच्‍या आत हात घालून काम केले नाही तर यात शस्‍त्रक्रिया करणे अवघड होते. याशिवाय आणखी एक खूप मोठी अडचण होती ती म्‍हणजे या पद्धतीमध्‍ये रुग्‍णाच्‍या हृदयाचे स्‍पंदन चालूच राहात असे. रक्‍ताभिसरणाचा वेग कमी करून (Temporarily stopping a patient's circulation) शल्‍यचिकित्‍सकांना शस्‍त्रक्रियेसाठी फक्‍त चार मिनिटे इतकाच अवधी मिळत असे. त्‍यानंतर रक्‍तपुरवठा पूर्ववत झाला नाही तर मेंदूला रक्‍तपुरवठा न झाल्‍यामुळे इजा पोहोचण्‍याची शक्‍यता निर्माण होण्‍याचा धोका होता. या पद्धतीला ‘इनफ्लो ऑक्‍लुजन’ असे संबोधिले जाते. त्‍यामुळे हृदयावरील ज्‍या शस्‍त्रक्रियांना चार मिनिटांपेक्षा अधिक काळ लागेल अशा शस्‍त्रक्रिया करणे अशक्‍यच होते.

    डॉ. विल्‍फ्रेड बिगलो यांनी यावर उपाय सुचविला, इतकेच नव्‍हे तर त्‍यावर काम करून ती प्रणाली अंमलातही आणली. बिगलो तेव्‍हा मिनेसोटा विद्यापीठात काम करीत होते. संशोधनादरम्‍यान त्‍यांच्‍या असे लक्षात आले की कॅनडामधील (डॉ. बिगलो कॅनेडियन होते) तीव्र कडाक्‍याच्‍या हिवाळ्यात ‘ग्राऊंड हॉग’सारखे प्राणी हायबरनेशन मध्‍ये जातात. थंडीवर मात करण्‍याचा त्‍यांच्‍यासाठीचा तो उपाय आहे. या कालावधीत त्‍यांच्‍या हृदयाचे ठोके मंदावतात व त्‍यांची उर्जेची गरज कमी होते, त्‍याचा परिणाम म्‍हणून अन्नावाचून ते बरेच महिने जगू शकतात. या संदर्भात विचार करीत असतांना बिगलोंना असे वाटले की ‘खूप कमी तापमान’ हा एक उपाय होऊ शकतो. मग त्‍यांनी प्राण्‍यांवर प्रयोग करून पाहिले. तेव्‍हा त्‍यांच्‍या लक्षात आले की श्‍वानांच्‍या शरीराचे तापमान खूप कमी केले असता त्‍यांच्‍यावर ‘ओपन हार्ट सर्जरी’ बर्‍याच वेळा चार मिनिटांहून अधिक काळ करता येते व त्‍यात प्राणी दगावत नाहीत. बिगलोंनी असे सिद्ध केले की कमी तापमान ठेवले असता मेंदू व शरिरातील उतींची प्राणवायूची गरज कमी होते व त्‍यामुळे रक्‍तपुरवठा जास्‍त काळ रोखून धरला तरी मेंदूला इजा पोहोचत नाही. सप्‍टेंबर १९५२ मध्‍ये डॉ. लीलेहाय आणि डॉ. जॉन लुवीस यांनी या पद्धतीचा वापर करून प्रथमच एका पाच वर्षांच्‍या लहान मुलीवर शस्‍त्रक्रिया केली. या पद्धतीमुळे ती मुलगी शस्‍त्रक्रिया चालू असतांना, दहा मिनिटेपर्यंत हृदयाची धडधड थांबली असतांना देखील जिवंत राहू शकली. ही शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झाली. या उपचारप्रणालीला ‘द हायपोथरमिक अॅप्रोच’ असे संबोधिले जाते. हृदयातील छोटे दोष दुरुस्‍त करण्‍यासाठी ही पद्धत उपयोगी ठरली.

    कॅनडामधील मॅनीटोबा येथे १९१३ मध्‍ये डॉ. बिगलो यांचा जन्‍म झाला. त्‍यांचे वडील देखील डॉक्‍टर होते. त्‍यांच्‍या वडिलांनी कॅनडातील पहिले ‘मेडिकल क्लीनिक’ स्‍थापन केले. १९३८मध्‍ये बिगलो यांनी टोरोंटो विद्यापीठात प्रवेश घेतला. ‘टोरोंटो जनरल हॉस्पिटल’मध्‍ये त्‍यांनी प्रशिक्षणार्थी (सर्जिकल रेसिडेन्‍ट) म्‍हणून काम केले.

    १९४१ मध्‍ये त्‍यांच्‍याकडे एक रुग्‍ण चिकित्‍सेसाठी आला. हिमदंशामुळे (फ्रॉस्‍ट बाईट) त्‍याच्‍या हाताच्‍या बोटांना गॅन्‍गरीन झाले होते. बिगलोंना शस्‍त्रक्रियेद्वारे त्‍याची बोटे कापावी लागली. या घटनेने ते अस्‍वस्‍थ झाले. हिमदंशावर त्‍यांनी काम करण्‍यास सुरुवात केली. या घटनेतून त्‍यांच्‍या आयुष्‍याला कलाटणी मिळाली. बिगलो यांनी सैन्‍यात प्रवेश घेतल्‍यावर युद्धभूमीवरही काम केले. हिमदंश झालेल्‍या कित्‍येक सैनिकांवर उपचार करीत असतांना ‘हायपोथर्मिया’वर ते विचार करू लागले. दुसरे महायुद्ध संपल्‍यावर ते टोरोंटो येथे परत गेले. त्‍यानंतर त्‍यांनी अमेरिकेतील बाल्‍टीमोर येथील जॉन हॉपकिन्‍स रुग्‍णालयात प्रशिक्षण घेतले. १९४७मध्‍ये ते कॅनडाला परतले व ‘टोरोंटो जनरल हॉस्पिटल’मध्‍ये ‘स्‍टाफ जनरल सर्जन’ म्‍हणून काम करण्‍यास सुरुवात केली. १९५०मध्‍ये टोरोंटो विद्यापीठाच्‍या शल्‍यचिकित्‍सा विभागात त्‍यांना नेमणूक मिळाली. १९५३ साली तेथेच ते सहाय्यक प्राध्‍यापक झाले तर १९७० मध्‍ये प्राध्‍यापक झाले. १९८४ साली बिगलो यांनी त्‍यांच्या या संशोधनावरील पुस्‍तक प्रकाशित केले. त्‍याचे नाव होते, ‘कोल्‍ड हार्टसः द स्‍टोरी ऑफ हायपोथर्मिया अॅन्ड द पेसमेकर इन हार्ट सर्जरी’

    बिगलो यांच्‍या कामाची दखल घेऊन त्‍यांना विविध पुरस्‍कारांनी गौरविण्‍यात आले. जैववैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी त्‍यांना १९५९चा गाईर्डनर फाऊंडेशनचा आंतरराष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला. १९८१ साली ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ तर १९९२ साली कॅनेडिअन मेडिकल असोसिएशनचे ‘फ्रेडरिक न्‍यूटन गिसबोर्न स्‍टार अॅवॉर्ड’ देण्‍यात आले. असोसिएशनच्‍या वतीने कोणत्‍याही सदस्‍याला देण्‍यात येणारा हा सर्वोच्च सन्‍मान आहे. त्‍यानंतर पाच वर्षांनी ‘कॅनेडिअन हॉल ऑफ फेम’मध्‍ये बिगलोंना स्‍थान देण्‍यात आले. ‘अमेरिकन असोसिएशन फॉर थोरॅसिक सर्जरी’ तसेच ‘सोसायटी फॉर व्‍हॅस्‍क्‍युलर सर्जरी’चे ते अध्‍यक्ष होते. १९७० ते १९७२ या कालावधीत बिगलो ‘कॅनेडिअन कार्डिओव्‍हॅस्‍क्‍युलर सोसायटी’चे अध्‍यक्ष होते. टोरोंटो जनरल हॉस्पिटलच्‍या हृदयशल्‍यचिकित्‍सा विभागाचे ते वीसपेक्षा अधिक वर्षे प्रमुख होते. सन २००१ मध्‍ये ‘इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ कार्डिओव्‍हॅस्‍क्‍युलर सायन्‍सेस’ तर्फे बिगलो यांना ‘लीव्हिंग लीजंड’या किताबाने गौरविण्‍यात आले. हृदयशस्‍त्रक्रियेला शक्‍यतेच्‍या कक्षेत आणण्‍यात डॉ. बिगलो यांच्‍या संशोधनाचा मोलाचा वाटा आहे. २७ मार्च २००३ रोजी डॉ. बिगलो यांचे निधन झाले.

    –—–—

    डॉ. बिगलो मध्यभागी पेस-मेकरचे कार्य समजावून सांगताना, ऑक्टोबर १९८२

    टोरोंटो विद्यापीठातील बॅन्टींग इन्स्टिट्यूट येथे काम करीत असतानाच, ५०च्या दशकात डॉ. बिगलो पेस-मेकरचे सह-संशोधन केले होते..

      March 24, 2019


  • श्री स्वामी समर्थांच्या हातातील सूर्यमणी

    अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांवर मराठी माणसांची मोठ्या प्रमाणावर श्रद्धा आहे. श्री दत्तगुरुंचे अवतार मानले गेलेल श्री स्वामी समर्थ हे अक्कलोट येथे अनेक वर्षे वास्तव्याला होते. या काळात अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांची स्वामींवर अपार श्रद्धा बसली.

    श्री स्वामी समर्थ व श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांची पहिली भेट जुन्या राजवाड्यातील श्री गणेश पंचायतन मंदिरात झाली होती. तेव्हा श्री स्वामी समर्थांनी गुरूप्रतिपदेच्या उत्सवासाठी आपल्या हातातील सुर्यमणी व पादुका त्यांना दिल्या. स्वामींच्या फोटोमध्ये हा सूर्यमणी पहायला मिळतो.

    प्रत्यक्ष श्री स्वामींनी दिलेल्या या पादुका व सूर्यमणी अक्कलकोट राजघराण्याने मोठ्या श्रद्धेने आपल्या देवघरात जपून ठेवल्या आहेत.

    हा सूर्यमणी आणि पादूका आतापर्यंत राजघराण्याच्या देवालयात नियमितपणे पूजला जातात. मात्र त्यांचे दर्शन सर्वसामान्य नागरिकांना आतापर्यंत उपलब्ध नव्हते.

    अक्कलकोटचे विद्यमान राजे श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) संयुक्ताराजे भोसले यांनी हा सूर्यमणी आणि पादुका यांचे सर्व स्वामीभक्तांना दर्शन घेता

    यावे म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच रविवार, 21 जुलै 2024 रोजी, जुन्या राजवाड्यातील श्री गणेश पंचायतन मंदिरात ठेवण्याचे आयोजन केले आहे. यासाठी राजघराण्याच्या वतीने त्यांनी तमाम स्वामीभक्तांना आमंत्रण दिले आहे.

    आता तो सूर्यमणी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने रविवारी भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे.. त्यासाठी आग्रहाचे निमंत्रण

    गुरुपौर्णिमा, रविवार, दि. २१ जुलै २०२४
    श्री गणेश पंचायतन मंदिर, जुना राजवाडा, अक्कलकोट
    सकाळी ९ ते रात्री ९ वाजता

    अक्कलकोटच्या राजघराण्याने अनुभूती या नावाने एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत श्री स्वामी समर्थांची 108 फूटी भव्य मूर्ती, ध्यान केंद्र, मुल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल इत्यादिंचा समावेश आहे. या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा...

      July 18, 2024


  • नैसर्गिक पूरक उपचार

    आपल्याकडे एक अत्यंत वाईट गोष्ट असते. ती म्हणजे प्रत्येक जण ज्येष्ठ नागरिक उठसूठ डॉक्टरकडे धावत असतो. डॉक्टर औषध देतो. परंतु आपणास काय होते, हे पाहण्याकरिता थोडा वेळ थांबावे. घरातील वडील माणसे अथवा इतर लोक काही तरी तक्रारी सांगतात. हेच उदाहरण म्हणजे रात्री झोपतेवेळी पाणी अजिबात पीत नाही आणि हेच पायात गोळे अथवा वळ येण्याचे कारण होते.

      November 13, 2023


  • महाराष्ट्रातील दत्त मंदिरे आणि संप्रदाय

    श्री गुरुदेव दत्त हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात श्रद्धेने पुजलं जाणारं दैवत. महाराष्ट्रात दत्तभक्ती अत्यंत खोलवर रुजली आहे. दत्तात्रेयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर रस्तोरस्ती दिसतात. श्री गणेशानंतर महाराष्ट्रात कदाचित दत्तमंदिरेच सर्वाधिक संख्येने असतील.

      January 19, 2018