वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
विचारांचा वेध घेण्याची सवय असायला हवी त्यातून नीरक्षीरविवेक वृत्ती विकसित व्हायला मदत होते. सर्वंकष सकारात्मक मानसिकता हवी असेल तर विचारांबरोबर समझोता करावा लागतो. हे जुळवून घेणे सुरुवातीला अवघड वाटत असले तरीही सवयीने जमते.
March 15, 2022
नको वीट मानू रघूनायकाचा | अती आदरे बोलिजे राम वाचा |
न वेचे मुखी सापडे रे फुकाचा | करी घोष त्या जानकीवल्लभाचा ||91||
अती आदरे सर्वही नामघोषे | गिरीकंदरें जाइजे दूरि दोषे |
हरी तिष्ठतू तोषला नामतोषे | विशेषे हरा मानसी रामपीसे ||92||
जगी पाहता देव हा अन्नदाता | तया लागली तत्वता सार चिंता |
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे | मना सांग पां रे तुझे काय वेचे ||93||
तिन्ही लोक जाळू शके कोप येता | निवाला हरू तो मुखे नाम घेता |
जपे आदरे पार्वती विश्वमाता | म्हणोनि म्हणा तेचि हे नाम आता ||94||
अजामेळ पापी वदे पुत्रकामे | तया मुक्ति नारायणाचेनि नामे |
शुकाकारणे कुंटणी राम वाणी | मुखे बोलता रव्याति जाली पुराणी ||95||
महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी | जपे रामनामावळी नित्यकाळी |
पिता पापरूपी तया देखवेना | जनी दैत्य तो नाम मूखे म्हणेना ||96||
मुखी नाम नाही तया मुक्ति कैची | अहंतागुणे यातना ते फुकाची |
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा | म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ||97||
हरीनाम नेमस्त पाषाण तारी | बहू तारिले मानवदेहधारी |
तया रामनामी सदा जो विकल्पी | वदेना कदा जीव तो पापरूपी ||98||
जगी धन्य वाराणसी पुण्यरासी | तयेमाजि जाता गती पूर्वजांसी |
मुखे रामनामावळी नित्यकाळी | जिवा हीत सांगे सदा चंदमौळी ||99||
यथासांग रे कर्म तेही घडेना | घडे धर्म ते पुण्य गांठी पडेना |
दया पाहता सर्वभूती असेना | फुकाचे मुखी नाम तेही वसेना ||100||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 8, 2016
ना ना, मला पंचवीस हजार रुपये द्या. शारदा या सुनेनं नाना या सासऱ्यांच्या जवळ सहजपणे मागणी केली. पंचवीस हजार? कशासाठी? नानांना बसलेला आश्चर्याचा प्रचंड धक्का त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटला. शारदा, सून म्हणून या घरात आल्यापासून गेले कित्येक महिने, एक तारखेला आपल्या पगाराचा पंचावन्न हजारांचा चेक नानांच्या हातावर ठेवत होती. तेव्हा नानांना किरकोळ धक्काही जाणवला नव्हता.
September 23, 2023
इमारत बांधकामात हल्ली आरएमसी या संज्ञेचा वापर ऐकू येतो. आरएमसी म्हणजे रेडी मिक्स्ड कॉक्रिट. १० वर्षात या | काँक्रिटचा वापर खूप वाढला आहे. त्यापूर्वी सगळीकडे आणि अजूनही खूप ठिकाणी कॉक्रिटचे मिश्रण छोटया मिक्सरमध्ये बांधकामाचे जागीच बनवले जाते. यासाठी खडी, रेतीचे ढीग आणि सिमेंटच्या गोणींची थप्पीही मिक्सरजवळ लावावी लागते. मग खडी, रेती, सिमेंट मिक्सरच्या खालच्या डब्यात (हॉपर) भरले जाते व सगळे सुके मिश्रण फिरत्या मिक्सरमध्ये ओतले जाते.
January 25, 2023
स्टेन म्हणजे डाग. ज्यावर डाग पडत नाहीत असे पोलाद म्हणजे स्टेनलेस स्टील. त्याच्या न गंजण्याच्या गुणधर्मामुळे स्टेनलेस स्टीलचा रासायनिक उद्योग, समुद्रातील बांधकामे, पाण्यातील बांधकामे अशा बऱ्याच उद्योगांमध्ये मोठया प्रमाणावर वापर होतो. स्वयंपाकघरातसुद्धा स्टेनलेस स्टील वापरले जाते.
May 2, 2023
समाजात रज , तम , आणि सत्व या तिन्ही गुणांची माणसे असतात.या पैकी रजोगुणी माणसांची संख्या प्रचंड आहे.
आपण तमोगुण कसा असतो हे दासबोधातून जाणून घेतले.तमोगुण हा अत्यंत हीन दर्जाचा गुण आहे.त्या पेक्षा बरा आहे तो रजो गुण .या गुणाची माणसे दुस-याला ठार मारण्या पर्यंत जात नाहीत परंतु अशा लोकांना समर्थ अप्पलपोटे असे म्हणतात. माझे घर , माझा संसार , माझे कुटुंब ,माता पिता आणि मुला बाळांची जो फक्त जो सदैव काळजी करतो तो रजो गुणी .चांगले जेवावे,चांगले नेसावे ,चांगले राहावे याच बरोबर जो दुस-याच्या चांगल्या गोष्टींची सतत अभिलाषा बाळगतो तो रजो गुणी.जो तीर्थ , व्रत , आणि पाहुणे यांचे करता काहीही खर्च करीत नाही,ज्याचे मन सदैव पैसा अडका, धान्य,संपत्ती यातच अडकलेले असते आणि जो अत्यंत कंजूस असतो तो रजो गुणी.
मीच सुंदर, मीच बलाढ्य ,मीच चतुर, मीच थोर अशी ज्याची समजूत असते तो रजोगुणी.कपटी,अंतर्यामी मत्सरी, सतत कामवासना ज्याच्या मनात असते आणि दुस-याला जो हीन लेखतो तो रजोगुणी. .जो सतत संसाराच्या चिंतेत असतो आणि माझे कसे होईल याची सतत काळजी करतो तो रजो गुणी.जो पूर्वी जे सुख भोगले त्याची आठवण करतो आणि ते सुख आता भोगता येत नाहीत म्हणून दुखः करतो तो रजो गुणी.
ज्याला विनोद, शृंगार,नाच गाणे ,गायन,याची आवड असते आणि गाणे आणि त्यासाठी हावभाव करणे इत्यादी मध्ये जो रंगून जातो त्याच्या अंगी रजो गुण पुरेपूर भरला आहे असे समर्थ म्हणतात.जो विनाकारण दुस-याची टिंगल टवाळी करतो,विनाकारण सतत हास्य विनोद करतो तो रजो गुणी.जो कलावंत असतो , नाटक पाहण्याचा शौकीन असतो.निरनिराळ्या खेळात पैसे खर्च करतो तो रजो गुणी असे समर्थ म्हणतात.
समर्थ म्हणतात रजो गुणांमुळे वासना प्रपंचात गुंतून राहते.समर्थ रजोगुणाला पूर्ण त्याज्य ठरवत नाहीत पण रजो गुणात पण "शुद्ध रजोगुण" आणि "शबल रजोगुण" हे दोन प्रकार आहेत.
समर्थ म्हणतात हा शबल रजोगुण माणसाला संसारात अडकवतो तर शुद्ध रजो गुण माणसाला भक्ती मार्गात घेवून जातात. संगीत , नाट्य , ,कीर्तन हे जर लोकांसाठी त्यांच्या मनोरंजना साठी जो उपयोगात आणतो आणि ज्यामुळे समाजात आनंद निर्माण होतो तो अतिशय चांगला "शुद्ध रजो गुण" आहे असे समर्थ म्हणतात ---
रज तम आणी सत्व | येणेंचि चाले जीवित्व |
रजोगुणाचें कर्तुत्व | दाखऊं आता ||६||
रजोगुण येतां शरीरीं | वर्तणुक कैसी करी |
सावध होउनी चतुरीं | परिसावें ||७||
माझें घर माझा संसार | देव कैंचा आणिला
थोर | ऐसा करी जो निर्धार | तो रजोगुण ||८||
माता पिता आणि कांता | पुत्र सुना आणी दुहिता |
इतुकियांची वाहे चिंता | तो रजोगुण ||९||
बरें खावें बरें जेवावें | बरें ल्यावें बरें नेसावें |
दुसर्याचें अभिळाषावें | तो रजोगुण ||१०||
कैचा धर्म कैचें दान | कैचा जप कैचें ध्यान |
विचारीना पापपुण्य | तो रजोगुण ||११||
नेणे तीर्थ नेणे व्रत | नेणे अतीत अभ्यागत |
अनाचारीं मनोगत | तो रजोगुण ||१२||
धनधान्यांचे संचित | मन होये द्रव्यासक्त |
अत्यंत कृपण जीवित्व | तो रजोगुण ||१३||
मी तरुण मी सुंदर | मी बलाढ्य मी चतुर |
मी सकळांमध्ये थोर | म्हणे तो रजोगुण ||१४||
माझा देश माझा गांव | माझा वाडा माझा ठाव |
ऐसी मनीं धरी हांव | तो रजोगुण ||१५||
दुसऱ्याचें सर्व जावें | माझेचि बरें असावें |
ऐसें आठवे स्वभावें | तो रजोगुण ||१६||
कपट आणी मत्सर | उठे देहीं तिरस्कार |
अथवा कामाचा विकार | तो रजोगुण ||१७||
बाळकावरी ममता | प्रीतीनें आवडे कांता |
लोभ वाटे समस्तां | तो रजोगुण ||१८||
जिवलगांची खंती | जेणें काळें वाटे चित्तीं |
तेणें काळें सीघ्रगती | रजोगुण आला ||१९||
संसाराचे बहुत कष्ट | कैसा होईल सेवट |
मनास आठवे संकट | तो रजोगुण ||२०||
कां मागें जें जें भोगिलें | तें तें मनीं आठवलें |
दुःख अत्यंत वाटलें | तो रजोगुण ||२१||
वैभव देखोन दृष्टी | आवडी उपजली पोटीं |
आशागुणें हिंपुटी | करी तो रजोगुण ||२२||
जें जें दृष्टी पडिलें | तें तें मनें मागितलें |
लभ्य नस्तां दुःख जालें | तो रजोगुण ||२३||
विनोदार्थीं भरे मन | शृंघारिक करी गायेन |
राग रंग तान मान | तो रजोगुण ||२४||
टवाळी ढवाळी निंदा | सांगणें घडे वेवादा |
हास्य विनोद करी सर्वदा | तो रजोगुण ||२५||
आळस उठे प्रबळ | कर्मणुकेचा नाना खेळ |
कां उपभोगाचे गोंधळ | तो रजोगुण ||२६||
कळावंत बहुरूपी | नटावलोकी साक्षेपी |
नाना खेळीं दान अर्पी | तो रजोगुण ||२७||
उन्मत्त द्रव्यापरी अति प्रीती | ग्रामज्य आठवे
चित्तीं | आवडे नीचाची संगती | तो रजोगुण ||२८||
तश्करविद्या जीवीं उठे | परन्यून बोलावें वाटे |
नित्यनेमास मन विटे | तो रजोगुण ||२९||
देवकारणीं लाजाळु | उदरालागीं कष्टाळु |
प्रपंची जो स्नेहाळु | तो रजोगुण ||३०||
गोडग्रासीं आळकेपण | अत्यादरें पिंडपोषण |
रजोगुणें उपोषण | केलें नवचे ||३१||
शृंगारिक तें आवडे | भक्ती वैराग्य नावडे |
कळालाघवीं पवाडे | तो रजोगुण ||३२||
नेणोनियां परमात्मा | सकळ पदार्थी प्रेमा |
बळात्कारें घाली जन्मा | तो रजोगुण ||३३||
असो ऐसा रजोगुण | लोभें दावी जन्ममरण |
प्रपंची तो सबळ जाण | दारुण दुःख भोगवी ||३४||
आतां रजोगुण हा सुटेना | संसारिक हें तुटेना |
प्रपंचीं गुंतली वासना | यास उपाय कोण ||३५||
उपाये येक भगवद्भक्ती | जरी ठाकेना विरक्ती |
तरी येथानुशक्ती | भजन करावें ||३६||
काया वाचा आणि मनें | पत्रें पुष्पें फळें जीवनें |
ईश्वरीं अर्पूनियां मनें | सार्थक करावें ||३७||
येथानुशक्ती दानपुण्य | परी भगवंतीं अनन्य |
सुखदुःखें परी चिंतन | देवाचेंचि करावें ||३८||
आदिअंती येक देव | मध्येंचि लाविली माव |
म्हणौनियां पूर्ण भाव | भगवंतीं असावा ||३९||
ऐसा सबळ रजोगुण | संक्षेपें केलें कथन |
आतां शुद्ध तो तूं जाण | परमार्थिक ||४०||
त्याचे वोळखीचें चिन्ह | सत्वगुणीं असे जाण |
तो रजोगुण परिपूर्ण | भजनमूळ ||४१||
ऐसा रजोगुण बोलिला | श्रोतीं मनें अनुमानिला |
आतां पुढें परिसिला | पाहिजे तमोगुण ||४२||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
रजोगुणलक्षणनाम समास पांचवा || २.५ ||
-- चिंतामणी कारखानीस
March 10, 2016
त्रिपुरासुर वधाची लीला करताना भगवान शंकरांनी जे विश्वव्यापक रूप धारण केले त्याचा संदर्भ चिंतनात घेऊन आचार्य श्री प्रस्तुत श्लोक सादर करीत आहेत.
August 27, 2020

October 5, 2015
कृष्णविवर म्हणजे आपल्या अतितीव्र गुरुत्वाकर्षणापायी आपल्याकडच्या प्रकाशालासुद्धा बाहेर पडू न देणारी वस्तू. प्रकाशही बाहेर पडत नसल्यामुळे, कृष्णविवराच्या केंद्रापासून ठरावीक अंतरापर्यंत, कुठली घटना घडते आहे, ते आपल्याला बाहेरून दिसू शकत नाही. या अंतराला कृष्णविवराचं ‘घटनाक्षितिज’ म्हटलं जातं. एका दृष्टीनं कृष्णविवराचा हा आकारच! कृष्णविवराचा हा आकार त्याच्या वजनावर अवलंबून असतो. कृष्णविवराचं वजन जितकं जास्त, तितका त्याचा आकार मोठा. जेव्हा दोन कृष्णविवरांचं विलीनीकरण होतं, तेव्हा नव्या कृष्णविवराचं वजन हे दोन्ही कृष्णविवरांच्या एकत्रित वजनापेक्षा कमी असता कामा नये, हे अपेक्षितच आहे. तसंच, विलीनीकरणातून निर्माण झालेल्या या कृष्णविवराचा आकारही, दोन्ही कृष्णविवरं एकत्रित केल्यानंतर अपेक्षित असलेल्या आकारापेक्षा कमी असता कामा नये.
May 5, 2022
उत्तर भारत आणि जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी आणि दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी लष्कर मोठय़ा प्रमाणावर प्रयत्नशील आहे. यामध्ये दरवर्षी किमान ७००-८०० जवान आणि २५ ते ३० अधिकारी शहीद होतात. १९८८ पासून असलेली ही परिस्थिती कायम आहे. ही घुसखोरी थांबवताना सुमारे तीन हजार जवान दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर जखमीही होतात. अनेक जवान आपले हात-पाय, डोळे गमावून बसतात. असं अपंगावस्थेत जिणं किती त्रासदायक असतं हे तर सांगायलाच नको.
August 10, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti