(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पितृदिन

    पितृछत्र हे आकाशासारखे, समुद्रासारखे विशाल, अथांग आहे. साऱ्यांना सामावून घेण्याची ताकद त्यात सामावलेली आहे. लाडात वाढलेली लेक, दुसऱ्याच्या हातात सोपवताना ‘माझ्या काळजाच्या तुकड्याला सुखी ठेवा!’ बाप अतिवेदनेने न बोलताच डोळ्यांनी बोलून जातो. आईसारखे घाय मोकलून रडण्याचे स्वातंत्र्यही त्याला नाही. कारण, सर्वांचं सांत्वन त्यालाच करायचं असतं.

      June 19, 2022


  • मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण..!

    प्रत्येकजण आपल्याला आयुष्यात त्याच्या पद्धतीनुसार जगत असतो. आपल्याला मिळालेल्या आयुष्यावर खूपदा तो नाखूष असतो. तथाकथित सुखाचा सदरा मला का नाही मिळाला ? असा गैरसमज करून घेत आपण आपल्या आयुष्याला दोष देत बसतो. जगी सर्व सुखी असा कोण आहे? हा प्रश्न प्रत्येकाने मनाला विचारला कि उत्तर आपोआप समोर येते..!

      January 15, 2019


  • रूटीन व्हेरिफिकेशनपासून सावधान

    " Everybody must be alert of Fake Phone Calls"

    पनवेल फ्लायओव्हरवर काम करीत असतांना २०१२ ला मी कामोठे, नवी मुंबई येथे रेडी पझेशन घर बुक केलं. त्यासाठी आयडीबीआय बँकेतुन लोन घेतलं होतं आणि त्यासाठी नेरूळच्या शाखेत खातं ऊघडलं होतं.लोनचा हप्ता मोठा होता आणि तो चुकू नये म्हणून मी माझ्या खात्यात पाच सहा हप्त्यांची तरतूद करून ठेवली होती.रक्कम मोठी होती. एप्रिलमध्ये मी ईकडे रहायला आलो.

    जूनमध्ये फ्लायओव्हरचं ऊद्घाटन झालं आणि माझी बदली वडाळ्याला ईस्टर्न फ्री वे वर झाली.
    सप्टेंबरमधल्या एके दिवशी आॅफिसमध्ये बसलो होतो. दुपारची वेळ असेल आणि मला एक फोन आला.
    "क्या मेरी बात सारंगजीसे हो रही है?"
    "हां जी बोलिये, आप कौन?"
    "सर, आयडीबीआय बँकसे एक्झिकेटीव्ह रिंकु बर्मन बोल रहा हूँ|"
    "बोलिये"
    "सर, आपका हमारी नेरूल ब्रँचमे अकांउंट है, उस सिलसिले में रूटीन व्हेरिफिकेशन करना है|"

    असं म्हणुन त्याने माझा अकांउंट नंबर ,जन्मतारीख, पत्ता, फोन नंबर, नॅामिनीचंं नांव सर्व गोष्टी सांगितल्या. त्यानंतर माझ्या अकांउंट मधला बॅलन्स, मागचे चारपाच ट्रान्झॅक्शनस् वगैरे सर्व माहिती दिली आणि हे सर्व बरोबर आहे का विचारलं,मी हो म्हणून सांगितलं. माझी खात्री झाली होती कीं हा बँकेचाच माणूस आहे. हे सर्व सांगितल्यावर तो म्हणाला "सर आपका व्हेरिफिकेशन हो गया है, अब आपके मोबाईलपर एक व्हेरिफिकेशन कोड नंबर आयेगा, मै दूबारा आपको फोन करूंगा आप मुझे वह नंबर बता देना फिर यह प्रोसेस पुरा हो जायेगा|हो सकता है आपको एेखादा डेबिट क्रेडिटका मेसेज आयेगा लकिन ऊसको ईग्नोर करना|"

    त्याने सांगितल्याप्रमाणे कोड नंबरचा मेसेज आला त्यानंतर त्याचा फोन आला आणि मी तो नंबर त्याला सांगितला. कांही वेळानंतर माझ्या खात्यातून पन्नास हजार रूपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्याने ईग्नोर करायला सांगितलं होतं तरी मला शंका आली, मी त्याला लगेच त्याला फोन लावला पण फोन बंद होता. मी नेरूळ ब्रँचमध्ये फोन लावला पण ब्रँच बंद झालेली होती.

    दुस-या दिवशी सकाळी मी नेट बँकींगने माझं अकांउंट तपासलं आणि हादरलोच खात्यातून खरोखरच पन्नास हजार रूपये गेले होते.एका दिवशी एकावेळी पन्नास हजारची लिमिट असल्यामुळे तेव्हढेच गेले होते. लगेेच परत मी रिंकू बर्मनला फोन लावला पण तो बंदच होता. मी ब्रँचमध्ये फोन लावला आणि मॅनेजरशी बोललो,मॅनेजरने ऐकुन सांगितलं की तुमचं अकांउंट हॅक झालं आहे आणि तुम्ही तात्काळ ब्रँचमध्ये या. मी जायला निघालो आणि परत पन्नास हजार रूपये गेल्याचा मेसेज आला.अश्या त-हेने माझ्या खात्यातून एक लाख रूपये गेले होते.

    मी बँकेत पोहचलो, मॅनेजरच्या केबिन मध्ये गेलो, त्याला सर्व गोष्टी सांगितल्या आणि माझं नेट बँकिंग आधी बंद करायला सांगितलं.खरंतर आजची पन्नास हजारांची लिमिट संपली होती त्यामुळे अजून पैसे जाण्याची शक्यता नव्हती. मॅनेजरचे आणि माझे बरेच वाद झाले.त्याचं म्हणणं होतं कीं तो नंबर सांगुन तुम्ही चूक केली. मी त्याला म्हणालो कीं तुमची सिस्टिमच फुलप्रुफ नाही. माझं अकांउंट हॅक झालंच कसं? त्याने ईंत्यंभूत माहिती बरोबर दिली त्यामुळे तो बँकेचाच कर्मचारी असल्याची खात्री पटल्यामुळे मी तो नंबर त्याला दिला.

    सर्व खातं बघिल्यावर लक्षात आलं कीं रिंकु बर्मनने लोखंडवाला कॅाम्प्लेक्समधील ओरिएंटल बँक अॅाफ कॅामर्सच्या शाखेतून हे व्यवहार केले होते.आयडीबीआय बँकेच्या मॅनेजरने तिकडे त्वरीत फोन करून त्यांना सर्व घटना सांगितली आणि रिंकु बर्मनच्या खात्यावरचे सर्व व्यवहार बंद करण्याची विनंती केली.हे खुप त्वरेने झालं पण तोपर्यंत त्या ठगाने एटीएमद्वारे ७६००० हजार रूपये काढून घेतले होते.मी पोलीस केस केली तर पुढेे सर्व सहकार्य करू अशी मॅनेजरने मला खात्री दिली आणि तेथून मी निघालो.मॅनेजरने माझ्या खात्यात गैरव्यवहार झाल्याचं मला लिहून दिलं.

    तेथुन निघुन मी तडक सीबीडी बेलापूरचं नवी मुंबई पोलीस मुख्यालय गाठलं आणि सायबर सेलमध्ये जाऊन तक्रार नोंदवली एफआयआर केला. त्यांनी लवकरात लवकर तपास करायचं आश्वासन दिलं.

    एकदा गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता नाहीच, ते अक्कलखाती जमा करून टाकायचे असं ठरवुन टाकलं आणि कामाला लागलो. एक लाख रक्कम कांही कमी नव्हती. मनात रूखरूख होतीच.एकदोन दिवसांनी माझे एक हितचिंतक आणि आर्थिक सल्लागार श्री. दिपक लाला यांच्या कानावर ही गोष्ट घातली, त्यांनाही ऐकून धक्काच बसला पण त्यांनी रिझर्व बँकेच्या 'बँकिंग ओम्ब्डसमॅन' (लोकायुक्त)कडे मला आॅनलाईन तक्रार करून ठेवण्यास सांगितलं. मी त्याप्रमाणे सर्व कागदपत्र स्कॅन करून अपलोड करून तक्रार नोंदवली.

    ईस्टर्न फ्री वे चं काम जोरात चालू होतं, रोज कोणाची न कोणाची तरी व्हिजिट असायची. हळुहळु कामाच्या रामरगाड्यात मी पैश्यांचं विसरून गेलो होतो. एक दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली आणि तपासाचा आढावा घेतला पण हाती कांही लागलं नाही. रिंकुु बर्मनच्या अकांउंटमध्ये दिलेल्या कळव्याच्याा पत्त्यावर पोलीस जाऊून आले पण तो ही बोगस निघाला.

    डिसेंबरमध्ये एके दिवशी साईटवर एमएमआरडीएचे कमिश्नर आले होते, कामाची पाहणी चालू होती आणि अचानक माझा फोन वाजला,आवाज महिलेचा होता, त्यांनी मला सांगितलं कीं मी बँकिंग ओम्ब्डसमॅन बोलतेय.तुमच्या बँक खात्यात झालेल्या गैरव्यवहाराची आम्ही चौकशी केली आहे आणि त्यात आम्हाला तथ्य आढळुन आलंय.आम्ही ओरिएंटल बँक अॅाफ कॅामर्स लोखंडवाला शाखेला तुमचे एक लाख रूपये देण्याचे निर्देश दिलेले आहेत.तुम्ही तिकडे जावून तुमचे पैसे कलेक्ट करा. ते ऐकुन मला आश्चर्याचा धक्काच बसला.मी त्यांच्याकडे फक्त आॅनलाईन तक्रार केली होती पण त्यांनी सखोल कार्यवाही करून मला माझे पैसे परत मिळण्याचे निर्देश दिले होते.

    दुस-या दिवशी सकाळी मी तिकडे गेलो. तिथल्या बँक मॅनेजरने माझ्याकडून ईंडेम्निटी बाँड लिहून घेतला आणि एक लाखाचा डिमांड ड्राफ्ट मला दिला.

    त्या घटनेनंतर मी सतर्क झालो आणि कोणत्याही अनोळखी कॅालला मी आता कोणताही रिस्पॅान्स देत नाही. प्रत्येकाने हे पथ्य पाळावेत हीच माझी ईच्छा आहे.
    The main reason of sharing this experience is that by mistake if anything goes wrong everybody should know about "Banking Ombudsman"

    - सारंग प. चपळगांवकर. मुंबई. (मुळगाव - बीड )


    -- संकलन : अमित कुलकर्णी
    मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..

      June 14, 2017


  • श्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग २

    हे सर्व ज्या गणेशांच्या कृपेने मिळणार त्यांच्यासाठी आचार्य शेवटच्या ओळीत शब्द वापरतात “एकवर.” अर्थात हे सर्व वर देण्यास एकटे श्रीगणेशच समर्थ आहेत. त्या श्रीगणेशांना सादर वंदन असो.

      January 2, 2020


  • जेवणाची बैठक कोणती ?भाग ५

    जमिनीवर जेवायला बसायचे काही फायदे नावाचा एक मेसेज व्हायरल झाला आहे. तेच परत लिहिण्यात वेळ आणि जागा घालवित नाही.

    वास्तुतज्ञ सांगतात म्हणून नव्हे, पण वैद्यकीय तज्ञ सांगतात, म्हणून मलविसर्जनाची वास्तु देखील बदलण्यासाठी आता धडपड सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे.

    मल विसर्जन करताना पोटावर योग्य तो ताण निर्माण करणार् या स्क्वॅटींग व्यायामावर आज परदेशात संशोधन चालले आहे.

    पाश्चात्य लोकांच्या उंचीला साजेशी म्हणजे कमोडवर बसल्यावर सहजपणे पाय टेकतील अशी उंच कमोडची भांडी त्यानी बनवली. पण त्याच उंचीची भांडी, भारतातही बनवली जाऊ लागली. कमोडवर बसल्यावर, जमिनीला पाय टेकतच नसल्याने, कितीतरी भारतीयांना अक्षरशः लोंबकळत बसावे लागते, हे सत्य आहे. पाश्चात्य अनुकरणाची आणखी किती लाचारी करायची ?
    असो. ! पाय जमिनीवर, जमिनीला टेकलेले हवेत हे महत्वाचे.
    ( हो ! माझ्या काॅम्प्लेक्स मधील चिकित्सालयात, मी तपासणीकक्षातील जमिन शेण मातीचीच ठेवली आहे. आणि तपासणीसाठी बैठकपण भारतीयच ठेवली आहे. मस्त खाली बसून रूग्णांना तपासतो. त्यात लाज कसली ? ) मनापासून ठरवलं तर काहीच अशक्य नाही.

    दुसरा काही पर्यायच नसेल,आणि जिथे जेवायला टेबलखुर्चीचाच वापर करायचा असेल, तिथे न लाजता, खुशाल खुर्चीवर मांडी ठोकून बसावे.

    कोणत्याही खुर्चीवर बसल्यावर पाय अधांतरी रहाता नयेत. टेकलेलेच हवेत. नाहीतर पुढे पाठीला बाक येणे, पीआयडी, चकती सरकणे, असे प्रकार सुरू होतात. हे व्यवहारात दिसते. म्हणून तर पुर्वीच्या मुख्याध्यापकांच्या लाकडी खुर्चीखाली पाय टेकायला, पायपेटीला असते तशी तिरपी फळी ठोकलेली असायची. आता ती पण गेली........
    ........आणि कंबरेला बांधून ठेवणारे बेल्ट मात्र आले.

    जेवताना पण या गोष्टीचे भान हवे.
    पायांना भक्कम आधार हवा,
    पोट आणि ताटात सुरक्षित अंतर ठेवा
    हे वाक्य विसरले जाऊ नये की झाले.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    21.09.2016

      September 21, 2016


  • तुझे जीवनकी डोरसे बांध लिया है

    तुझे जीवनकी डोरसे बांध लिया है

    ती खरी कोण असते? तीचं आणि आपलं खरं नातं काय?फक्त एक भावनिक गुंतवणूक! परस्परांना परतीने सव्याज देण्यात येणारी प्रेम आणि विश्वासाची गुंफण. त्यात नेमकं असतं तरी काय? फक्त झोकून देणं. विरघळण्यासाठी प्रथम पडायला,तर हवं!आपटण्याची भीती नसलेली माणसंच पडायचं धाडस करतात.

      July 15, 2026


  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 4

    दिवसा सूर्य असतो. रात्री सूर्य नसतो.
    सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पचनाला मदत करणारा. म्हणून तर आयुर्वेदात एक वचन आहे, आरोग्यम् भास्कराद् इच्छेत. म्हणजे आरोग्य ठीकठाक ठेवण्यासाठी सूर्याची भूमिका महत्वाची आहे.

    सर्वात शुद्ध काय असते ? अग्नि सर्वात शुद्ध. सूर्य म्हणजे अग्नि. सूर्य म्हणजे शुद्धता. सूर्य उगवला की बाकी सर्व जीवजंतु नष्ट व्हायला सुरवात होते. या सूर्याची उष्णता त्यांना सहन होत नाही, आणि त्यातील काही जीवजंतुंचा जन्म संपतो.

    आपण सूर्याला केंद्रस्थानी मानतो. आपली भूमाता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. केवळ भूमाता नाही तर तिचे सर्व मंगळ, बुध, गुरू, शनि, शुक्र हे सर्व भाऊबंद, आपल्या मुलाबाळांसह याच सूर्याला केंद्र मानतात. आणि त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालत आपली कामे करीत असतात.

    आपण आपली दिनचर्या पाळतो. सकाळी उठतो, रात्री झोपतो. पशुपक्षीदेखील, सकाळी उठतात, रात्री झोपतात. म्हणजेच सर्व निसर्ग या सूर्याच्या अधिकारात काम करत असतो.

    आजच्या वैज्ञानिक नियमानुसार "फोटो सिंथेसिस" ही प्रक्रिया देखील सूर्यावरच अवलंबून असते. पानातील हिरवा रंग देखील याच सूर्यामुळे मिळतो. रक्तातील लाल पेशी वाढायला, कॅल्शियम वाढायला, आणि मुख्य म्हणजे व्हिटामिन डी वाढायला फक्त सूर्य मदत करतो. कोणत्याही प्रकारे व्हिटामिन डी कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. जरी जाहिरातीतून तसे दावे केले जात असले तरी, जाहिरातीमधे दाखवतात, ते सर्व खरे कुठे असते ? असो.

    तर आपण सूर्यवंशी आहोत. सूर्य उगवतो, त्याच्या स्वागताला आपण आधी उठतो, तो मावळला की आपले सर्व व्यवहार बंद करीत झोपी जातो. हा निसर्ग नियम आहे.

    या सूर्याला साक्षी ठेवूनच आपण आपली सर्व महत्त्वाची कामे करीत असतो. जसे नेहमीचे पोटभरतीसाठीचे व्यवसाय, लग्न, मुंज, वास्तुशांत, गृहप्रवेश, होमहवन, वाढदिवस, देवदर्शन, बारसे, इ शुभकार्ये दिवसाचीच केली जातात. कधी विचार केलाय, असं का, असा ?
    तेव्हा उत्तर मिळालं, सूर्य असतो म्हणून.

    तसेच जेवणे हे जर यज्ञकर्म असेल तर ( तर म्हणजे ते यज्ञकर्मच आहे. वदनी कवल घेता...... जाणिजे यज्ञकर्म । ) ते सुद्धा सूर्य असे पर्यंत पार पडले पाहिजे ना !
    म्हणूनच सूर्य असे पर्यंत जेवावे, कारण आपणही याच निसर्गाचा एक हिस्सा आहोत ना !!
    तेच नियम आपणही पाळले पाहिजेत, जे "त्याने" ठरवून दिलेले आहेत.
    निसर्गापुढे आपली बुद्धी म्हणजे किस झाड की पत्ती !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.02.2017

      February 27, 2017


  • कसोटी रक्कम हाताळणीची

    बँकांमधील सर्व कार्यपद्धतीचा अनुभव घेण्याचे भाग्य मला लाभले ते 1984 साली जेव्हा मला  पंजाब नॅशनल बँकेत नोकरी मिळाली तेव्हा. त्याकाळी क्लार्क-कम-टायपिस्ट आणि क्लर्क-कम-कॅशियर अशी वेगवेगळी पदे भरली जायची. कॅशियरचे काम करतांना विशेष भत्ता दिला जातो. मी टायपिस्टचे काम करत असताना रोखपालाचे काम करण्याची वेळ फारशी आली नाही,

      May 8, 2023


  • जीभेची कशी घ्याल काळजी?

    आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती आहे. त्या तुमच्या जीभेवर जास्त प्रमाणात पांढरट थर साचलाय का? असं असेल तर ती निश्चीतच चिंतेची बाब असू शकते.

    दातांसाठी ब्रश करणं जितकं महत्वाचं आहे. तितकंच जीभेची स्वछता राखण पण गरजेचं आहे. तोंड धुताना डॉक्टरांच्यामते जीभ टंग क्लिनरनं स्वच्छ करावी. टंग क्लिनरनं जीभ स्वच्छ करताना जीभेवर जास्त दबाव टाकू नये. दोन-तीन वेळा हलक्या हतांनी टंग क्लिनरचा उपयोग करावा. आपल्या तोंडामध्ये हानिकारक जीवाणूंना जराही थारा देवू नका.
    तोंडाच्या आजारांशी संबंधीत विशेषज्ज्ञ सोनाली बस्सींच्या मते गडद रंगाचे खाद्य पदार्थ खाल्यामुळं जीभेचा रंग बदलतो. परंतु ते एवढे हानीकारक नसते आणि ते टंग क्लिनरच्या साहाय्यानं स्वच्छ करता येवू शकतात. त्यासाठी प्लास्टिकचा किंवा धातुचा टंग क्लिनर वापरता येतो. काही कंपन्याच्या ब्रशच्या मागं जीभ स्वच्छ करण्यासाठीची सोय केलेली असते. ज्यामुळं आपण दातही घासू शकतो. आणि जीभही साफ करू शकतो.

    जीभ स्वच्छ करण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे माउथवॉशचा वापर करणे. अर्ध्या ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून पाच-सहा वेळा गुळण्या करण्यानं सुध्दा जीभ स्वच्छ करता येते. जीभेवर घाण असल्यास ते डिहॉयड्रेशनचं कारण ठरु शकतं. त्यामुळं आपल्या जीभेची काळजी घ्या.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 22, 2017


  • डोकेदुखी दूर करण्याचा घरगुती उपाय

    खायची पानं व एरंडेल तेल
    मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास सुरू झाला की सारा दिवस कटकटीचा जातो. मग त्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही औषध-गोळ्या घेण्यापेक्षा खायची (नागवेलीची पानं) आणि एरंडेल तेल हा घरगुती उपाय नक्की वापरून पहा. खायचे पान थंड प्रवृत्तीचे असल्याने डोकेदुखीच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच एरंडेल तेलामध्ये दाहशामक घटक व त्वचेत लगेच झिरपण्याची क्षमता वेदना त्वरीत दूर करण्यास मदत करतात. (एरंडेल तेल- गुडघेदुखीवर रामबाण उपाय)
    हे मिश्रण कसे बनवावे?
    तव्यावर आवश्यकतेनुसार(काही थेंब) एरंडेल तेल गरम करावे. त्यावर खायची पानं पसरून दाबावीत. थोडी चॉकलेटी रंगाची झाल्यानंतर गॅस बंद करावा.पानं थोडी थंड झाल्यावर या पानांनी डोक्याच्या दुखर्यास भागावर शेक द्यावा. डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी थोडे गरम असतानाच या पानाने डोक्याला शेक द्यावा.
    बडिशेपमध्ये कॅल्शियम, सोडियम, आर्यन आणि पोटॅशियम सारख्या खनिजांचा भरणा असतो. यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यास बडिशेप फायदेशीर ठरते.
    वरील उपाय आपल्या डॉक्टरांना विचारून करावा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०७१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 14, 2016