(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्री आनंद लहरी – भाग १६

    या श्लोकात आचार्यश्रींची प्रतिभा एका वेगळ्याच विषयाला स्पर्श करते. आरंभीच्या तीन ओळीत भगवान शंकरांचे वर्णन आहे. हे वर्णन काहीसे नकारात्मक म्हणता येईल. मात्र त्या नकारात्मकतेच्या आधारे आचार्यश्री चौथ्या ओळीत आई जगदंबेचे वैभव स्पष्ट करीत आहेत.

  • श्री आनंद लहरी – भाग १

    जगज्जननी माॅ त्रिपुरसुंदरी आदिशक्तीचे स्तवन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य महाराज ज्या अपूर्व आनंदाचा अनुभव घेत आहेत त्या आधारे त्यांनी या स्तोत्राचे आनंदलहरी असेच नामकरण केले आहे.

  • श्री आनंद लहरी – भाग २

    भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी आई जगदंबेच्या गुणांचे वर्णन करण्याचा संकल्प तर केला. पण त्यांची पंचाईत झाली आहे की हे वर्णन करावे तरी कसे?

  • श्री आनंद लहरी – भाग १७

    भगवान श्री शंकरांचे केवळ बाह्यरंगच नव्हे तर अंतरंग देखील आपल्यासाठी तितकेच भयावह आहे हे सांगत असताना आचार्य श्री म्हणतात….

  • श्री आनंद लहरी – भाग ३

    जरी परिपूर्ण वर्णनाची अडचण असली तरी जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आई जगदंबेच्या एकेका गोष्टी चे वर्णन करीत आहेत.

  • श्री आनंद लहरी – भाग १८

    आई जगदंबेचा लोकोत्तर सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री येथे एक वेगळाच मार्ग अवलंबित आहेत. त्यांनी त्यासाठी भगवान शंकरांच्या मस्तकावर असणाऱ्या गंगेला आधार केले आहे. ते म्हणतात,

  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – १०

    क्षत्रत्राणकरी महाऽभयकरी माता कृपासागरीसाक्षान्मोक्षकरी सदा शिवकरी विश्वेश्वरी श्रीधरी ।
    दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी
    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी ॥ १०॥

    क्षत्रत्राणकरी- क्षत्र शब्दाचा एक अर्थ आहे संकट. त्यापासून त्राण म्हणजे संरक्षण करणारी.

    महाऽभयकरी- अभय अर्थात सर्व प्रकारच्या भीतीं पासून मुक्ती देणारी.

    सामान्य जीवनात सगळ्यात मोठी भीती असते मृत्यूची. त्यालाच आपण त्राण म्हणजे संकट समजतो. आई जगदंबेच्या कृपेने ही मृत्यूची भीती नष्ट होते. एकदा ही भीती नष्ट झाली की माणूस खऱ्या अर्थाने अभय होतो.

    माता- जसा एखादा बालक स्वतःला आपल्या आईच्या जवळ अत्यंत सुरक्षित समजतो. तसेच सर्व विश्व जिच्या चरणाजवळ सुरक्षित असते ती विश्वमाता.

    कृपासागरी- अपार कृपेचा सागर असणारी.

    साक्षान्मोक्षकरी- प्रत्यक्ष मोक्ष प्रदान करणारी. हा शब्द समजून घ्यायला हवा. मोक्ष ही देहपतनानंतर ची अवस्था. ती प्रत्यक्ष कशी असेल? देहातीत झाल्यावरचा जो आनंद तो मोक्ष. मात्र तोच आनंद ज्यावेळी या देहात प्राप्त होतो त्यावेळी तिला मुक्ती, जीवनमुक्ती असे म्हणतात. हा प्रत्यक्ष मोक्ष प्रदान करते तिला साक्षान्मोक्षकरी असे म्हणतात.

    सदा शिवकरी - सदैव कल्याण करणारी. विश्वेश्वरी- संपूर्ण विश्वाची स्वामिनी. श्रीधरी- श्री म्हणजे वैभव. सकल वैभवाला धारण करणारी.

    दक्षाक्रन्दकरी- दक्षाला कन्या वियोग दुःखात आक्रंदन करायला लावणारी. निरामयकरी- आमय म्हणजे रोग. सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक रोगांपासून मुक्ती देणारी.

    काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.

    भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी-सकल कृपेचा आधार असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा प्रदान कर.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री कनकधारा स्तोत्रम् – १४

    यत्कटाक्षसमुपासना विधि: सेवकस्य सकलार्थ सम्पद:।
    संतनोति वचनाङ्गमानसै-
    स्त्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे।।१४।।

    या जगात भक्तासाठी करण्यासारखे एकमेव कार्य काही असेल तर ते केवळ आणि केवळ महालक्ष्मीची उपासना हेच आहे. अशी अनन्यशरणता सांगत आचार्यश्री येथे आई जगदंबेचे वैभव स्पष्ट करीत आहेत.
    ते म्हणतात,

    यत्कटाक्षसमुपासना विधि:- त्या आई जगदंबेच्या कटाक्षाच्या उपासनेचा विधिच,

    सेवकस्य सकलार्थ सम्पद:- तिचा सेवकांना सर्व अपेक्षित संपत्तीला

    संतनोति- वृद्धिंगत करणारा आहे.

    आई महालक्ष्मीच्या कृपेनेच साधकाला जी जे हवे ते सर्व प्राप्त होऊ शकते. त्याच्या सर्व प्रकारच्या संपत्तींचा विकास होतो.
    येथे त्या कटाक्षां ची उपासना करावी असे म्हटले आहे. मूर्तीची उपासना ठीक आहे. पण कटाक्षांची उपासना कशी करायची? तर उपासनेचे अंतीम फल आहे, उपास्य देवतेचे आपल्याकडे लक्ष जाणे. ती लक्ष जाणे म्हणजे तिने पाहणे. म्हणजे कटाक्ष.
    ती केव्हा पाहील?तर तिला आवडती गोष्ट असेल त्यावेळी. तिला आवडती गोष्ट कोणती? तर भगवान श्रीहरी.
    सोप्या शब्दात आपल्या हृदयात श्रीहरींचे स्थान असेल तर आईची कृपादृष्टी आपल्यावर पडेल.

    यासाठी, मुरारि-मुर नामक राक्षसाचे शत्रु श्रीहरी. कृतयुगामध्ये नाडीजंघ नावाच्या राक्षसापासून मुर नावाचा राक्षस जन्माला आल्याची पुराणात कथा आहे.
    त्याचे आणि भगवान विष्णूंचे प्रचंड युद्ध झाले. ज्यात तो मरेना. त्यावेळी थकून हिमालयात विश्राम करणाऱ्या विष्णूंच्या शरीरातून निघालेल्या शक्तीने त्याचा विनाश केल्याची कथा आहे.

    त्या शक्तीला पुढे उत्पन्ना एकादशी असे नाव पडले. अशा त्या श्रीहरींची,

    हृदयेश्वरीं- हृदयाची स्वामिनी असणाऱ्या,

    त्वां- तुला,

    वचनाङ्गमानसै- वचन म्हणजे वाणीने, अंग म्हणजे शरीराने आणि मानसै: म्हणजे मनाने, अर्थात सर्व मार्गाने, परिपूर्णरीत्या

    भजे- भजत असतो. उपासना करतो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – ११

    अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥ ११॥

    आई जगदंबा पार्वतीला अन्नपूर्णेच्या स्वरूपात भिक्षा मागताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज येथे काही वेगळ्याच भूमिका आपल्यासमोर ठेवत आहेत.

    अन्नपूर्णे सदापूर्णे- या पहिल्याच उल्लेखात हे वेगळेपण लक्षात घेता येते. हे दोनही शब्द वेगवेगळे करून पाहिले तर तो भाव लक्षात येत नाही. अन्न देणारी, सदैव पूर्णता देणारी असे दोन सामान्य अर्थ होतील. पण एकत्रित पाहिले तरच वेगळा अर्थ कळू शकतो.

    अन्न हा मानवी जीवनाचा आधार. त्यालाही ब्रह्म म्हटले. पण ते सामान्य अन्ना बाबत. ते अन्न चार-पाच दिवसावर टिकत नाही. सदैव टिकणारे ते खरे अन्न. ते तोंडाने घेता येत नाही. ते श्री गुरुमुखातून कर्णात पाझरते. त्या शास्त्रज्ञानाला, ब्रह्मज्ञानाला शाश्वत अन्न म्हणतात. ते प्रदान करणारी जी तिला साद आहे, "अन्नपूर्णे सदापूर्णे. "

    शङ्करप्राणवल्लभे- ती भगवान शंकरांची प्रिया आहे. ते शंकर आहेत तर ही शांकरी. कल्याणकारिणी.

    ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं- ना देवी अन्नपूर्णा सामान्य आहे ना तिला मागितलेले अन्न. मागणी ज्ञानवैराग्याच्या सिद्धीसाठी आहे. त्याच भिक्षेची मागणी आहे. कोणाला? तर पार्वतीला. आत्तापर्यंत अन्नपूर्णा म्हणत होते. आताच पार्वती का? तर त्या शब्दातच खेळ आहे.

    कधी काळी जी सती होती ती शंकरांना सोडून दक्षयज्ञात गेली. शेवटी जळाली. नष्ट झाली. का? तर शंकरांना सोडून गेली. त्यांच्या चरणाशी स्थिर राहिली नाही. मग नष्ट झाली.

    दुसऱ्या जन्मात पार्वती झाली. पर्वत कन्या. अचला, अविचला झाली.

    माझी वृत्ती ईशचरणी अशीच अविचल राहो हीच भिक्षा मागायची आहे. त्या सदैव आनंददायी, ज्ञानवैराग्य सिद्धिदायिनी भिक्षेसाठी पार्वतीला मागणे...

    भिक्षां देहि च पार्वति !

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री कनकधारा स्तोत्रम् – १५

    सरसिजनिलये सरोज हस्ते धवलतमांशुकगन्धमाल्यशोभे।भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम्।।१५।।

    आई जगदंबेला प्रसन्नतेची प्रार्थना करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री तिचे गुण वैभव वर्णन करीत आहेत.

    ते म्हणतात हे आई जगदंबे! तू कशी आहेस ? तर,

    सरसिजनिलये- सरसिज म्हणजे कमळ तर निलये म्हणजे निवास करणारी. आई जगदंबा कमळात निवास करते. इथे केवळ एका फुलाचा विचार नाही. ते प्रतीक आहे.

    कमळ जसे चिखलात जन्माला येते, त्यानंतर पाण्यात वर चढते, पाण्याने स्वतःवरील चिखल काढते. त्यानंतर वर हवेत येते आणि सूर्याच्या दिशेने झेपावते. तशी ज्या साधकाची वृत्ती पार्थिवापासून तेजापर्यंत विकसित होत जाते, त्या साधकाच्या मनात निवास करणारी ती खऱ्या अर्थाने सरसिजनिलया.

    सरोज हस्ते- हातात कमल धारण करणारी. अर्थात अशा वृत्तीने युक्त असणार्‍या साधकांना उन्नसाठी हात देणारी.

    धवलतमांशुक- धवल म्हणजे पांढरे. त्याला तम प्रत्यय लावला. ज्यावेळी अनेक गोष्टीत तुलना करून ह्यापैकी सर्वश्रेष्ठ असे वर्णन करायचे असते त्यावेळी तम प्रत्यय लावतात.अर्थात धवलतम म्हणजे अत्यंत पांढरेशुभ्र, अंशुक म्हणजे रेशमी वस्त्र.

    गन्धमाल्यशोभे- गंध म्हणजे चंदनतिलक. माल्य म्हणजे मोत्यांच्या माळा. या सगळ्यांनी शोभून दिसणारी.

    भगवति- भग म्हणजे तेज, ऐश्वर्य. त्याने युक्त असणारी ती भगवती.

    हरिवल्लभे- भगवान श्रीहरींची वल्लभा म्हणजे प्रियतमा.

    मनोज्ञे- अत्यंत मनोहारी असणारी. भक्तांच्या मनात निवास करणारी. त्यांचे मन हरण करणारी. त्रिभुवनभूतिकरि- संपूर्ण त्रिभुवनाचे भूती म्हणजे कल्याण करणारी.

    ती आई महालक्ष्मी,

    प्रसीद मह्यम्- माझ्यावर प्रसन्न होवो. मला सर्व ऐश्वर्यदायक गोष्टी प्रदान करो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड