(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सगळेच उच्चपदस्थ दाक्षिणात्यच का ?

    आमची मराठी मुले कुठे कमी पडतात ?

      January 14, 2024


  • पाच चवींनी युक्त औषधी लसूण

    गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे कि खारट रस नैसर्गिकरित्या असणारा एकमेव कंद आहे … खरं पाहायला गेलं तर लसूण खरोखरच अमृत असावा ....

    संस्कृत मध्ये याला रसोन म्हणतात. रस + ऊन म्हणजे एक रस उणे असणारा …

    लसूण हे कांद्याच्या परिवारातील एक कंदमूळ आहे. एलियम सॅटायव्हम या वनस्पतीच्या कंदाच्या पाकळ्या म्हणजे लसूण होय. जगातील अर्जेटिना, बल्गेरिया, चीन, भारत, इटली, मेक्सिको, रशिया, अमेरिका आदी देशांत याची लागवड केली जाते. परंतु उत्पादनात चीनचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. कांद्याप्रमाणे कच्च्या लसणाचा स्वाद आणि चव उग्र असते. परंतु शिजवला असता त्याची चव गोडसर होते. भारतीय मसाल्यांमध्ये, सॉस, चटण्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. अशा या लसणाचे जीवाणूविरोधी, अँटिबायोटिक, अँटिसेप्टिक असे कितीतरी गुणधर्म आहेत. लसणात ऍलिसीन (dllicin) नावाचे सल्फर कंपाउंड आहे. या ऍलिसीनमुळे लसणात ऍण्टीबायोटिक व बुरशीजन्य आजारांना प्रतिबंध करण्याचा गुण दिसून येतो; परंतु या उडणशील द्रव्याचा फायदा मिळविण्यासाठी लसूण चिरणे किंवा चावून खाणे गरजेचे आहे. लसणाची पाकळी तशीच गिळल्यास औषधी गुणांचा फायदा मिळत नाही.

    भारतीय जवळजवळ प्रत्येक घरात भाज्यांत लसूण वापरली जाते. पदार्थाची चव वाढविण्यासाठी लसूण हिचा गुणधर्म आहे. बहुतेक लोक फक्त अन्न शिजविण्यासाठी मसाले वापरत असले तरी लसूण वापरतात. लसूण ही औषध म्हणून फायदेशीर आहे. लसूण अनेक रोगांवर फायदेशीर ठरली आहे.

    लसूण शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. कर्करोग सारख्या गंभीर रोग लढण्यासाठी मदत करते. वैद्यकीयदृष्ट्या कोलोस्ट्रोल कमी करण्यास मदत करते. स्तनाचा आणि कर्करोग कमी करण्यासाठी लसूणीच्या कच्च्या पाकळ्या खाणे केव्हाही चांगल्या. शरीरातील टी-सेल्स, फॅगोसाईट्स, लिंफोसाई्टस आदी प्रतिरोधक तत्व वाढणिवण्यास लसूण मदत करते. प्रतिरोधक घटक आरोहित आणि शरीराची प्रतिकार वाढविण्यासाठी लसूण महत्वाची भूमिका बजावते. वाढता रक्तदाब नियंत्रणात आणण्यात लसूण उपयोगी ठरते.

    लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. आपले हृदय नेहमी तंदुरुस्त ठेवण्यास लसूण मदत करते. शरीरात वाढणार कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल पातळी दूर करणे सोपे आहे. उच्च रक्तदाब आणि रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी लसणाच्या दोन कच्या पाकळ्या खाणे आवश्यक आहे.

    आपल्या वायू पोटात तयार होतो किंवा आपण बद्धकोष्ठता समस्येने अस्वस्थ आहेत तर लसूण आपल्यासाठी खूप फायदेशीर असेल. काही काळ नियमितपणे लसूण खाण्यात समाविष्ट केले तर त्याचा लाभ चांगला होतो. लसूण बारीक करुन गरम दूध आणि गरम पिण्यातून पिणे चांगले. सांधे दुखी किंवा कमर दुखीवर हे पाणी अधिक गुणकारी आहे.

    आपली श्रवण क्षमता वाढविण्यासाठी लसूण चांगली. तिळाच्या तेल्यात लसूण बारीक करुन ते गरम करायचे. थंड झाल्यावर ते तेलाचे काही थेंब कानात टाकल्यास कान दुखणे थांबतो. हे जर तुम्ही नियमित केल्यास तुमची ऐकण्याची क्षमता वाढते. कान दुखण्यावर आराम मिळतो. लसूण अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे.

    लसणाचे उपयोग :
    १. कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात .

    २. लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .

    ३. बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.

    ४. गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .

    ५. किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .

    ६. कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे . हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .

    ७. भूक न लागणे , तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .

    ८. भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .

    ९. हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .

    १०. ३० मि.ली. दुधामध्ये लसणाच्या पाच पाकळ्या घालून दूध चांगलं गरम करावं. दररोज असं दूध प्यायल्याने जुनाट खोकला, दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .

    ११. लसूण मनाची मरगळ घालवतो .

    १२. हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते .

    १३ . लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणार्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .

    १४. तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो ….

    १५. लसूण कीटकनाशक असून दररोज लसूण खाल्याने टीबीचे विषाणू मरण पावतात.

    १६. अँटिबायोटिक औषधांना लसूण हा एक उत्तम पर्याय आहे. लसणाच्या एका कांडीचे चार भाग करून दोन्ही वेळच्या जेवणानंतर अध्र्या तासाने त्यातील दोन तुकडे ठेवून चघळावे नंतर पाणी प्यावे.

    १७. डोकेदुखीवरही लसूण हा रामबाण उपाय आहे. लसणाच्या चार पाकळ्या ३० ग्रॅम मोहरीच्या तेलात घालून ते तेल कोमट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी थांबते. कान दुखत असल्यास हेच तेल कानात घालावे. त्वरीत आराम पडतो.

    १८. ज्वरनाशक असून हाडांतला तापही यामुळे बरा होतो.

    १९. शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. म्हणूनच दैनंदिन आहारात दोन ते तीन लसूण पाकळ्यांचा जरूर वापर करावा.

    २०. संधिवात व आपवाताचा त्रास असणाऱ्यांनी त्यांच्या रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्यास “शूल’ कमी होण्यास मदत होते. लसूण खाल्ल्याने काही लोकांना ऍसिडिटी होते. अशांनी लसूण 2-3 तास दुधात भिजवून मग खावा व भरपूर पाणी प्यावे.

    २१. लसूण हा कर्करोग प्रतिबंधकदेखील आहे. लसूण नियमित खाण्यात असल्यामुळे जठर व आतड्याच्या कॅन्सरचा धोका कमी होतो, असे एका शास्त्रीय पाहणीत आढळून आले आहे. प्राण्यांवर केलेल्या एका संशोधनात लसणामुळे ट्यूमर कमी झालेला आढळून आला.

    काळजी :
    लसूण तीक्ष्ण, उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती, गर्भिणी यांना तो वर्ज्य आहे …..

    जास्त लसूण खाल्ल्याने त्रास झाला तर माठातील थंडगार पाण्यात धने पावडर भिजवून ते पाणी गाळून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाजावे …

    गृहिणींनी भाजी, वरण आमटी व चटणीत लसणाचा सढळ हाताने वापर करावा. त्यामुळे कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहू शकेल.

    आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन

      March 4, 2017


  • भल्लातक/बिब्बा

    माझ्या माहिती प्रमाणे बिब्याचा वापर पूर्वी परिट कपड्यांवर खुणा करून ठेवायला करत असत.तर असा हा बिब्बा औषधांमध्ये काळजीपूर्वक वापरल्यास अमृता समान काम करतो.

    ह्याचा ७-१२ मीटर उंच वृक्ष असतो.काण्डत्वचा काळपट राखाडी असते व तोंडल्यावर त्यातून दाह जनक रस निघतो.पाने ३०-७५ सेंमी लांब असून १२-३० सेंटीमीटर रूंद असतात.हि अभिलट्वाकार असून शाखेच्या अग्रभागी उगवते.फुल एकलिंगी असून हिरवट पिवळे असते.फळ २-३ सेंमी लांब व हृदयाकृती असते.कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर चमकदार काळे असते.पिकलेल्या काळास असतो जो अंगावर उततो.फळाच्यावर नारिंगी लाल रंगाचे मांसल भाग असतो जो खायला उपयोगी असतो.फळात बदामासारंखी बी असते व तिच्यापासून तेल काढतात.

    भल्लातक चवीला तिखट,तुरट,गोड असून उष्ण असतो.तसेच हा गुणाने हल्का,स्निग्ध व तीक्ष्ण असतो.हा कफवात शामक व पित्तकर आहे.

    आता आपण भल्लातकाचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)संडासला अाव पडत असेल व रूग्णाला पित्ताची लक्षणे नसल्यास बिब्याचे तेल तुप साखरेत पाडून पोटात घेण्यास देतात.

    २)अंकुशमुखी कृमींमध्ये अर्थात हुकवर्ममध्ये बिब्ब्याच्या तेलाचा उपयोग होतो.

    ३)वातज किंवा कफज त्वचा रोगात तसेच कोडामध्ये बिब्याचा उपयोग होतो.त्वचारोगामध्ये बिब्बा सिद्ध दुध वापरले जाते.

    ४)भल्लातक सिद्ध दुध किंवा भल्लातक सिद्ध तेल हे मासिकपाळीच्या तक्रारीमध्ये उपयुक्त आहे.

    ५)भल्लातक वातवाहिन्यांच्या आजारात चांगला उपयुक्त आहे म्हणूनच गृध्रसीमध्ये ह्याने सिद्ध दुध वापरले जाते.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      August 29, 2017


  • घरानंतरचं बाहेरचं जेवण..

    फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, आदरणीय वसंत वाघ सरांचा मला महिन्यातून एकदा तरी फोन येतो, ‘गुडमाॅर्निंग सुरेशराव, मी डेक्कनला येतोय. पंधरा मिनिटांत ‘गुडलक’ला या.’ मी लगेचच निघतो. भिडे पुलावरुन पलीकडे गेलं की, दहाव्या मिनिटाला मी गुडलकला पोहोचतो. रिक्षा कडेला घेऊन सर उतरतात. आम्ही दोघे गुडलकमध्ये पलीकडील पॅसेजमधील एक टेबल पटकावतो. वेटरला दोन चहाची आॅर्डर दिल्यानंतर सर बोलू लागतात…

      December 25, 2022


  • अशोक

    हा आंब्याच्या वृक्षा सारखा दिसणारा वृक्ष आहे.हा ८-१० मी उंच असून अशोक वृक्ष कायम हिरवागार असतो.ह्याची पाने ८-१६ सेंमी लांब व आंब्याच्या पानासारखीच दिसतात.ह्याची फुले दाट व गुच्छात येतात ती सुगंधी,आकर्षक व पिवळट तांबड्या रंगाची असतात.ह्याचे फळ ८-२६ सेंमी रूंद व ते चपट्या शेंगाच्या स्वरूपात असतात व ह्यात ४-८ चपट्या बिया असतात.

    अशोकाचे उपयुक्तांग आहे त्वचा,बी,व फुल.अशोक चवीला तुरट,कडू असून तो थंड गुणाचा आहे.हा हल्का व रूक्ष आहे.हा कफपित्त शामक आहे.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)अशोक उत्तम वेदनाशामक असल्याने वेदना असणाऱ्या भागांवर ह्याचा लेप करतात.

    २)मुळव्याधी मध्ये रक्तस्त्राव होत असल्यास अशोक सालीचे चुर्ण उपयोगी आहे.

    ३)ज्या बायकांच्या अंगावर पांढरे जाते त्यांनी अशोक सालीचे चुर्ण तांदुळाच्या धुवणात देतात.

    ४)गरोदर स्त्रिने अशोक घृत सगर्भावस्थे मध्ये नियमीत घेतल्यास गर्भपात होण्याचा धोका टळतो.

    ५)अशोकाचे बी मुत्रल असल्याने मुत्रविकारात उपयुक्त आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      September 18, 2017


  • न्याय झाला, पण..!

    मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीतील पिढीतला न्याय मिळावा यासाठी लाखो करोडो जनसंख्येचे महामोर्चे निघाले. दोषींना फासावर लटकविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली. जणआक्रोशाचा प्रचंड दबाव असल्याने सरकारलाही हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा लागला. विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी सबळ पुरवा नसल्याने दोषींना फासावर लटकविण्याची न्यायालयीन लढाई तशी सोपी नव्हती. परंतु, ऍड. उज्वल निकम यांनी परिस्थतीतीजन्य पुराव्याच्या आधारावर मजबूतपणे युक्तिवाद केला. परिणामी तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा अहमदनगर न्यायालयाने सुनावली आहे. यामुळे कोपर्डीच्या पीडितेला न्याय मिळाला असं म्हणता येईल. परंतु, निकाल झाला असला तरी हा न्याय अजून अपूर्ण आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशावर दोषी अजूनही उच्च न्यायालयात अपील करू शकतात. त्यानंतरही शिक्षा प्रलंबित ठेवण्यासाठी अनेक उपाय दोषींकडे आहेत. त्यामुळे, कोपर्डी घटनेतील आरोपी ज्या दिवशी फासावर लटकविल्या जातील तेंव्हाच पीडितेला पूर्णतः न्याय मिळेल.
    'मनुष्यप्राणी' असा शब्द उच्चारून माणूस देखील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्युक्त केल्या जाते. मात्र मनुष्य हा प्राणी विचारशील, समाजशील असल्याने त्याच्याकडून माणूसपण जपले जाण्याची अपेक्षा केल्या गेली आहे. नैतिकता सभ्यता सद्सदविवेकबुद्धी असे सद्गुण जपत माणूस रानटी अवस्थेतून आजच्या संगणकयुगापर्यंत वाटचाल करत असल्याचे म्हटले जाते, शिवाय माणसाने आज वैचारिक सुसंस्कृतपणाचा एक नवा टप्पा गाठल्याच्या गप्पाही मारल्या जातात. परंतु माणसाचा मूळ रानटी स्वभाव आजही कायम असून त्याच्या स्वभावातील रानटीपणा विकृत होत असल्याचे अवतीभवती सातत्याने घडणाऱ्या घटनांवरून जाणवत राहते. कोपर्डीच्या घटनेत जो अमानुषपणा या नराधमांनी केला तो प्राण्यातील रानटीपणालाही लाजवणारा होता. एखाद्या बलात्काराच्या घटनेचे वर्णन करू नये. पण या प्रकारातील विक्षिप्तपणा अत्यंत घृणास्पद होता. नराधमाने मुलीचे हात-पाय तोडले. ओठांचा चावून चोथा केला होता. केस उपटले होते. तिला प्रचंड वेदना देऊन एका निष्पाप अल्पवयीन मुलीची नृशंस हत्या केली. नरभक्षक प्राण्याला जसं गोळ्या घालून ठार मारल्या जातं तसेच या माणसातील जनावरांना तात्कळ गोळ्या घालून यमसदनी पाठविल्या जावं, अशा उद्विग्न प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या होत्या. परंतु आपल्या न्यायव्यवस्थेचं तत्व जनावरणांनाही मारण्याची परवनगी देत नसल्याने दोषींच्या विरोधात ट्रायल सुरु झाली. आणि आज अखेर या प्रकरणात न्याय आला. न्यायलायाच्या निकालाने समाजमन निश्चितच सुखावले आहे. कोपर्डी पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक केल्या जातेय. दोषींना फासावर लटकविण्याचा निर्णय देऊन न्यायालयाने फक्त पीडितेला न्याय दिला नाही तर या घटनेनंतर आक्रोश करणाऱ्या संपूर्ण महराष्ट्रातील जनतेच्या दुःखावर मलमपट्टी केली आहे. मात्र जखम अजून पूर्ण बरी झालेली नाही. दोषींना फासावर लटकविण्यासाठी अजून संघर्ष करावा लागणार आहे. शिवाय यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठीच्या उपयांवरही मंथन करावे लागणार आहे.
    कोपर्डीसारख्या अमानवीय बलत्कारच्या घटनेत 'न्याय झाला' एवढाच शब्द वापरून हा विषय संपणार नाही तर अनेक गंभीर मुद्दे यासोबत जुडलेले आहेत. शिक्षेची सुनावणी आणि अंलबजावणीत लागणाऱ्या मोठ्या कालावधीमुळे शिक्षेविषयी जनमानसातील धाक आणि विश्वासर्हतेचा प्रश्न जसा समोर येतो तसाच महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्नही अजेंड्यावर घ्यावा लागेल. कोपर्डीत एका निष्पाप मुलीचा बळी गेल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात जणक्षोभ उसळला होता. कोपर्डीच्या पीडितेला न्याय देण्याची मागणी ज्यावेळी करण्यात येत होती. त्याच्या मागे अशी घटना पुन्हा घडू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केल्या जात होती . आज कोपर्डीच्या प्रकरणात न्याय झाला, न्यायालयाने त्यांचे काम चोख बजावले. थोड्या उशिराने का होईना दोषी फासावर लटकविल्या जातील, आणि पीडितेला पूर्ण न्याय मिळेल. मात्र लोकांची अपेक्षा अजून पूर्ण झालेली नाही. कोपर्डी सारख्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. कोपर्डी घटनेच्या निकालाने अशा विकृत प्रवृत्तीवर जरब बसेल, असं ठामपणे म्हणता येणार नाही. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशात कायदे बदलले जागरूकता झाली. तरी कोपर्डीची घटना घडली. यानंतरही बलात्काराचे गुन्हे घडतच आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कायद्यासोबत मानसिकता ही बदलावी लागणार आहे. समाजातील पुरुषसत्ताक व्यवस्था आणि स्त्री विषयीचा भोगवादी दृष्टिकोन हेचं अशा विकृतींना जन्म देते. बलात्काराच्या विकृत विचारांचा जन्म मेंदूतून होतो, त्यामुळे उपचारही मेंदूवरच करावे लागतील.
    विकृत आणि मुजोर मानसिकेतला भयभीत करून अशा कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी कोठारातील कोठार शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. मात्र न्यायप्रक्रियेतील विलंब या उद्देशाला काही प्रमाणत हरताळ फसतो.सत्र न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा दिल्यापासून उच्च ते सर्वोच्च न्यायालय आणि नंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज या प्रवासात दोषीला सवलती तर मिळतात शिवाय शिक्षा अंलबजावणीत उशीर होतो. अर्थात, प्रोसिजर आवश्यक आहेच परंतु या प्रक्रयेलाही काही कालमर्यादा असावी. सत्र न्यायालयाच्या निकालावर उच्च न्यायालयात अपील, नंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशी सारखी शिक्षा कायम ठेवल्यानंतर तरी अंलबजावणीत विलंब होऊ नये. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणातच फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. संपूर्ण गुन्हेगारी मानसिकतेवर जरब बसावा यासाठी हा निर्णय घेतला जातो. त्यामुळे किमान हा हेतू सफल होण्यासाठी तरी अशा खटल्यांमध्ये कालमर्यादा ठरवनियात यावी. आज कोपर्डी घटनेतील निकाल लागला आहे. दोषींना फाशीची शिक्षा देऊन न्यायालयाने मुजोर प्रवृत्तीला जरब बसविण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले, यात शंका नाही. परंतु कोपर्डीच्या दोषींना फासावर लटकावयला १२ वर्ष लागणार असतील तर कायदाचा धाक कसा निर्माण होईल. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशभारतील कायदे बदलण्यात आले होते, या धर्तीवर फाशीच्या शिक्षेअमलबजावणी संदर्भात कालमर्यदा निर्धारित करून त्यानुसार कोपर्डीतील आरोपीना फासावर लटकविल्या गेले तर कोपर्डीच्या पीडितेला खरा न्याय मिळेल..!!

    - ऍड. हरिदास उंबरकर,
    बुलडाणा
    मो. 9763469184

      December 4, 2017


  • बलुचिस्थानची पटकथा

    ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचा WhatsApp वरुन फॉरवर्ड झालेला लेख

      October 22, 2016


  • गणपती रहस्य

    …… अश्या अनेक रहस्यानी भरलेले गणरायाचे रूप आपल्याला अनेक गुणांनी भरपूर करण्याची प्रेरणा देत आहे. आपण त्यांच्या रूपाला न्याहाळताना त्यांच्या गुणांना स्मृति मध्ये ठेऊन त्यांची पूजा अर्चना करावी व आपल्या जीवनातील विघ्न नष्ट करावे.

      September 10, 2021


  • वसुबारस

    चांगले कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

      November 1, 2021


  • श्री नृसिंह अवतारकथा

    प्रल्हादासी करितो नमन बालक असुनी महान
    अणुरेणूंत असे भगवान दाखवूनी देई जगाला ।।१।।

    बघावी सृष्टी ठेऊनी संत द्दष्टी
    त्यासी दिसेल जगत् जेठी सर्व ठिकाणीं ।।२।।

    प्रल्हादाचे तत्वज्ञान प्रभुमय सारे जग् जीवन
    त्यासी घ्यावे ओळखून श्रद्धा द्दष्टीनें ।।३।।

    अपूर्व प्रभू भक्ति उन्मत्त असूरी शक्ति
    संघर्षकथा होती भक्त प्रल्हादाची ।।४।।

    बहूत महान वीर प्रभुपुढे कोण टिकणार
    परि प्रभूसीच वाकवणार प्रल्हाद बालक ।।५।।

    नारद ऋषीं एके दिनीं हिरण्यकश्यपूचे राजधानीं
    पाद्यपुजा स्वीकारुनी गेले प्रसन्न होऊनी ।।६।।

    शिवाची करावी भक्ति मिळवावी तप शक्ति
    सामर्थ्यवान ह्या जगतीं होऊनी करावे राज्य ।।७।।

    नारद राणीस उपदेशीती जो नारायणाचे नाम घेती
    उद्धार ह्या जगती त्याचा होत असे ।।८।।

    गर्भवती तूं राणी भक्तिभाव ठेवतां मनीं
    ईश्वर संस्कार पडूनी बनेल बालक महान ।।९।।

    राजा उपदेश ऐकूनी गेला तपश्चर्येस वनीं
    राणी राजधानी नारायणाचे नामस्मरण करी ।।१०।।

    करुनी तप महान शिवासी केले प्रसन्न
    वरदान घेई मागून वाढवी आपली शक्ति ।।११।।

    असे मागीं वरदान जेणे टळावे मरण
    परि प्रभू लिला महान कसे टाळी ब्रह्मालिखीत ।।१२।।

    पशू अथवा नर राजगृहीं वा बाहेरी
    कुणी न करी ठार हिरण्यकश्यपूला ।।१३।।

    मृत्यु न यावा शस्त्रानीं भय नसावे अग्नीपासूनी
    टाळावे मरण बुडोनी ही इच्छा करी राजा ।।१४।।

    दिवस असो वा रात्र मृत्यु टाळावा मात्र
    निष्प्रभ ठरावे अस्त्र फेकता राजा वरी ।।१५।।

    शिवाचे मिळतां वरदान राजा झाला बेभान
    सामर्थ गेले वाढून शिवकृपेमुळे ।।१६।।

    सामर्थ्यांत असे शक्ति शक्ती ओघांत वाहती
    ओघास दिशा लागती परिणाम दिसण्या योग्य ।।१७।।

    मिळतां योग्य मार्ग होईल चांगला उपयोग
    नम्रतेचा असता भाग मिळालेल्या शक्तिमध्ये ।।१८।।

    दुरुपयोग होता शक्तिचा दुष्परिणाम दिसेल तिचा
    उद्वस्त करी जीवनाचा केंद्र बिंदू अहंकार असतां ।।१९।।

    पावन करुनी शिववर जागृत झाला अहंकार
    मूळचा होता असूर हिरण्यकश्यपू ।।२०।।

    गरोदरपणीं नामस्मरण मंत्र जपूनी नारायण
    महान संस्कार करुन बाळास संगोपिले ।।२१।।

    लागला ईश्वरी ध्यास सतत प्रल्हाद बाळास
    बघे सर्वत्र प्रभूस रात्रंदिनी ।।२२।।

    गोष्ट येता ध्यानीं राजा गेला संतापूनी
    मजविण श्रेष्ठ नाही कुणी सांगु लागला प्रल्हाद बाळासी ।।२३।।

    मीच प्रभूचे ठायी तुझी भक्ति अर्पावी
    इच्छा नारायणाची सोडावी ताकद देई प्रल्हादबाळा ।।२४।।

    नाम नारायणाचे शब्द ते अंतर्मनांचे
    भाव गुंतले ह्रदयाचे प्रल्हादबाळाचे ।।२५।।

    जन्मबीजाचे संस्कार सहजतेने न जाणार
    बाह्य शक्तीचा करी अव्हेर प्रल्हादबाळ ।।२६।।

    धमकावले प्रल्हादासी त्यास जीवे मारण्यासी
    चालू ठेवता नामस्मरणासी नारायणाच्या ।।२७।।

    आत्मा हा अविनाशी समर्पित झाला नारायणाशी
    न देई महत्व देहाशी प्रल्हादबाळ ।।२८।।

    सर्वत्र सोडता प्रभूवर काळजी तोच घेणार
    संशय नसावा त्याचेवर समर्पण करते समयीं ।।२९।।

    प्रल्हादाचा हट्ट बघूनी राजा जाई क्रोधूनी
    ठार करण्या ठरवूनी हूकुम देई प्रधाना ।।३०।।

    पर्वतावरुन लोटले उकळत्या तेलांत ठाकले
    ऐरावताच्या पायीं बांधले सर्व प्रयत्न जाई निष्फळ ।।३१।।

    प्रभू असतां तारणधारी कोण त्यास जीवें मारी
    राजाचे प्रयत्न निष्प्रभ ठरी परमेश्वर शक्तीपुढे ।।३२।।

    राजाचा क्रोधाग्नी पेटला प्रश्न करी प्रल्हादाला
    नारायण कोठें दाखव ? नाश करीन मी त्याचा ।।३३।।

    हे विश्वची प्रभूमय अणूरेणूंत तो होय
    सर्वत्र समावून जाय हीच त्याची लीला ।।३४।।

    ईश्वर आहे महान ब्रह्मांड त्याचा भाग असून
    अंशरुपें जायीं समावून प्रत्येक वस्तूमध्ये ।।३५।।

    महासागरातील नीर अगणीत थेंबांचा बनणार
    थेंबांत सागरी अंश असणार हे घ्यावे समजावूनी ।।३६।।

    'तो नाही' ऐसे ठिकाण न सापडेल ते शोधून
    तुझ्या माझ्यांत ही तो असून वास करीत राही ।।३७।।

    नारायण आहे सर्व ठिकाणीं घ्यावे हे समजावूनी
    हया खांबी तो बसूनी हास्य वदन करी ।।३८।।

    प्रल्हादाचे शब्द ऐकूनी राजा गेला चवताळूनी
    जोरानें लाथ मारुनी प्रहार केला खांबावरी ।।३९।।

    भयंकर होऊनी आवाज कडाडून चमके वीज
    हिरण्यकश्यपू न येई समज ह्या चमत्काराची ।।४०।।

    मानव देही सिंह शिर नखें त्याची भयंकर
    गर्जना देत बाहेर पडला खांबांतूनी ।।४१।।

    रुप आक्रळ विक्राळ जणु भासला महाकाळ
    घाबरुनी सोडी सकळ ओढूनी घेई असुराला ।।४२।।

    सायंकाळचे समयीं भयंकर रुप घेई
    हिरण्यकश्यपूस मारण्या येई नारायण ।।४३।।

    बसूनी उंचावरी घेऊन राजास मांडीवरी
    नखानी पोट चिरी नृसिंह ।।४४।।

    वचनाचे करुन पालन वरदानाचा ठेऊन मान
    नृसिंह आवतार घेवून ठार करी राजाला ।।४५।।

    डोळे मिटूनी नामस्मरण ऐकूनी प्रल्हादाचे भजन
    प्रसन्न होई नारायण दर्शन देई विष्णूरुपे ।।४६।।

    प्रल्हाद झाला पावन प्रभूचे नामस्मरण करुन
    भक्तीचा विजय होऊन अहंकारासी केले नष्ट ।।४७।।

    ।। शुभं भवतु ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    १२- ०११२८३

      January 12, 2018