(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • देवा तुझ्या दारी आलो

    देवा तुझ्या दारी आलो

    उलाढाल’ या चित्रपटासाठी संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले हे गाणे जबरदस्त हीट झाले आहे. विविध वाहिन्यांवरील संगीत स्पर्धेत सहभागी स्पर्धकांकडून तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतही ते हमखास गायले आणि वाजवले जाते. हे गाणे स्वतः अजय गोगावले यांनी गायले असून अजय-अतुल यांच्या खास शैलीमुळे गाण्याला एक वेगळेच  परिमाण मिळाले.

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३६

    पाण्याची प्रशंसता भाग एक

    पाणी म्हणजे जीवन जर योग्य वेळी, योग्य काळी, योग्य स्थळी, योग्य मात्रेमधे प्यायले तर !

    हे विश्व पाण्यातूनच निर्माण झाले आहे. प्रत्येक प्राणीमात्राला जगण्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. असे पाणी न मिळाल्यास तोंडाला कोरड पडते, शरीर चैतन्यहीन होते. अवयव शिथील होतात, आणि शेवटी मृत्यु येतो. पाण्याशिवाय कोणत्याही प्राण्यांचे कार्य चालूच शकत नाही, मग तो रोगी असो वा निरोगी, पाणी हेच जीवन आहे.

    निरोगी राहाण्यासाठी वाग्भटजी म्हणतात,
    जेवणाच्या आरंभी पाणी प्यायल्याने मनुष्य बारीक होतो.
    जेवणाच्या नंतर पाणी प्यायले असता, माणूस स्थूल होतो.
    तर जेवताना पाणी प्यायले असता मनुष्य सडसडीत राहातो.

    तो मूळ संदर्भ असा आहे.
    समस्थूलकृशा भक्तमध्यान्तप्रथमाम्बुपा : ।

    भक्तस्यादौ जलं पीतमग्निसादं कृशांगताम् ।
    अंते करोति स्थूलत्वं ऊर्ध्व चामाशयात्कफम
    मध्ये मध्यांगतां साम्यं धातूनां जरणं सुखम् ।।

    जेवताना देवाचे स्मरण करून पहिली आपोषणी घेतात. घसा ओला होण्यापुरतेच हे पाणी सांगितले आहे. नंतरचा घास अडकू नये, म्हणून घसा थोडा ओला करून घेणे. एक पळी पाणी उजव्या हाताची तर्जनी आंगठ्याच्या मुळाशी लावून तळहातावर छोटा खळगा करून त्यात एकच पळी पाणी घेतात......

    देवपूजे मधेदेखील कोणत्याही कार्याच्या सुरवातीला आपोषणी घेतात.
    केशवाय... नारायणाय....माधवाय नमः।
    इथेपण तीनच पळ्या पाणी सांगितले आहे....

    पाणी भरपूर प्यायचा नियम जर आपल्या संस्कृती मधे असला असता तर तिथे एक पळीभर ऐवजी, एकेक पेलाभर किंवा एकेक तांब्याभर पाणी प्यायला का सांगितले जात नाही?

    "कारणाशिवाय पाणी पिऊ नये. जेवणापूर्वी पाणी पिऊ नये, पाणी प्यायचे असल्यास एक पळीभरच पाणी प्यावे" हा संदेश यातून मिळतो.

    जेवणापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने पोटातील पाचक स्राव कमी होतात.भूक मारली जाते. जेवण कमी जाते, त्यामुळे बारीक व्हायला होते. शरीर कृश होते, म्हणून असे करू नये.

    हो. हे आधी ठरवले पाहिजे की, आपण सडसडीत असले पाहिजे. जाड पण नको. आणि बारीक पण नको. केवळ बारीक दिसण्यासाठी, डाएटींगच्या नावाखाली, पाणी पित रहाणे हा रानटी क्रूरपणा आहे. कृपया असे करू नये. आम्ही आमच्या विचारधाराच बदलून टाकल्या आहेत. आम्ही आमचे आदर्शच बदलून टाकले आहेत.

    आमचे आदर्श जर दीपिका नि कॅटरीना असतील तर जीवनात वादळं आल्याशिवाय राहाणार नाही. काय दीपक लावायचे आहेत, ते कर्तृत्वात दाखवा. नुसते 'फिगर फिगर' करण्यात काही अर्थ नाही. शरीर अगदी नाजूक आखीव रेखीव, पण जरा काम सांगितले की कंबर जाते मोडून !

    तरूणांचा आदर्श सुद्धा संजय दत्त नको, तर बटुकेश्वर दत्त हवा. पाश्चात्य विचारांचे पाणी जोखणारा आणि त्यांच्या तोंडचे पाणी पळवणारा !!

    कृश होणे, बारीक होणे हे, 'अशक्त होणे' या अर्थी आहे, हे लक्षात घ्यावे. म्हणून शहाण्या माणसानी जेवणापूर्वी पाणी पिऊ नये.

    तोंडातील लाळ औषधी असते, पण सकाळी सकाळी तोंड धुवायच्या अगोदरची नाही. रात्रभर तोंडात तयार झालेली, किडलेल्या दाढांमधे भरून राहिलेली, लाळ औषधी कशी असेल ? राजा भोज यानी लिहिलेल्या एका ग्रंथातील संदर्भ असं सांगतो, पण वाग्भटजी असं कुठेही सांगत नाहीत.
    आपले राजे केवळ युद्धच करत नव्हते तर ग्रंथ देखील लिहित होते. आमच्या छत्रपती शंभुराजांच्या संस्कृतमधे लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथाचे नाव तरी आठवत असेल. हे सर्व प्राचीन ग्रंथ खरंतर शालेय अभ्यासक्रमात असायला हवेत. असो.

    गोऱ्या कातडीचे लोक काय सांगतात, यापेक्षा आपल्या परंपरा आणि आमचे आप्त काय सांगतात, ते जास्त महत्वाचे. त्यांनी नक्कीच चार पावसाळे जास्त बघितलेले आहेत.

    थोडा विश्वास दाखवूया, आमच्या आप्तांवर !
    त्यांनी आखून दिलेल्या चालीरीती वर !!

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    12.01.2017

  • दोन्ही अर्थसंकल्पाची तयारी कशी होते ?

    दोन्ही अर्थसंकल्पाची कशी होते ? कोण याची निर्मीती करते ? कोणत्या प्रिटींग प्रेसमधून याची छपाई केली जाते ?या प्रक्रियेत कोण कोण सहभागी होते ?बजेटमधील काही महत्वाच्या बाबी फुटल्या जाऊ नयेत यासाठी कोणत्या उपाययोजना तयार केल्या जातात ? अशा प्रकारचे प्रकारचे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडत असतात.

    अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया ही अत्यंत क्लितष्ट, जबाबदारीचे तसेच जोखमीचे काम असते. त्यामुळे हे काम करणारे सर्वजण रात्र आणि दिवस एक करून अर्थसंकल्प तयार करतात. या अर्थसंकल्पाची सुरूवात ही एका सोहळ्याने होते. हलवा सोहळा असे या सोहळ्याचे नाव आहे. हा सोहळा वर्षानुवर्षापासून सुरू आहे.

    नवीन अर्थसंकल्पाची तयार करण्याची प्रक्रिया सप्टेंबरपासून सुरू होते. म्हणजेच याची सुरूवात सर्क्युरलरच्या माध्यमातून होते. देशातील सर्वात महत्वाच्या आणि सर्वच विभागात सरकारकडून एक सर्क्युरलर पाठविण्यात येते. ज्यात त्या-त्या विभागाला आगामी वर्षभराच्या खर्चाची माहिती, त्यांच्या वर्षभरातील नव्या योजनांची आणि त्यावर होणाऱ्या खर्चाची इतंभूत माहिती देणे आवश्याक असते. प्रत्येक विभागातून देण्यात येणाऱ्या ही माहिती अर्थसंकल्पाच्या निर्मीतीत अत्यंत महत्वाचे मानले जाते. यानंतर कोणत्या वस्तूवर किती कर आकारला जायचा याविषयी स्टेकहोल्डर्स रायसीना हिल्सवर येवून याविषयी चर्चा करतात.
    अर्थसंकल्पाच्या निर्मीतीमध्ये हा टप्पा अत्यंत महत्वाचा मानला जातो. कारण यामुळेच आगामी वर्षभरात देशात घडामोडी घडत असतात. त्यामुळे अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हितचिंतकांची एक बैठक घेण्यात येते. या बैठकीत सरकार आणि त्यांच्या मित्रपक्षांना अपेक्षित असणारे सर्व बदल बैठकीनंतर करण्यात येत असतात.

    जेव्हा अर्थसंकल्पासाठी आवश्ययक असणारी सर्व माहिती गोळा केली जाते त्यानंतर पुढे सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे टाईपिंग आणि प्रिटींगचा. या टप्प्यावर सर्वच उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची करडी नजर असते. यातम उच्च पदस्थ अधिकारी, प्रिंटींग टेक्नि शियन आणि स्टेनोग्राफर एक प्रकारे शेवटचे सात दिवस तर कैद असल्याप्रमाणेच काम करत असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबियांशीदेखील बोलण्याची परवानगी नसते. जर एखाद्या अधिकाऱ्याच्या कुटुंबात आपत्कालिन परिस्थिती आलीच तर त्यांना केवळ संदेशाच्या माध्यमातून माहिती देण्याची परवानगी असते. परंतू, संबंधित अधिकाऱ्याला त्याच्या कुटुंबियाशी बोलण्याचा अधिकार नसतो.

    संयुक्तत सचिवांच्या अध्यक्षतेखालील इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमवर आणि त्यांच्या फोन कॉल्सवर बारिक नजर ठेवतात. खास करून स्टेनोग्राफरवर जास्त पाळत ठेवली जाते. अर्थसंकल्पाची कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी त्यांचे संगणक नॅशनल इन्फॉर्मेशन सेटरच्या सर्व्हरपासून वेगळे ठेवले जातात. एवढेच नाही तर नॉर्थ ब्लॉकमध्ये एक पावरफुल मोबाईल जॅमर लावण्यात येते जेणेकरून कोणत्याही अधिकाऱ्याकडून इथली माहिती बाहेर पडता कामा नये.

    केंद्रीय अर्थमंत्र्यांचे संसदेतील अर्थसंकल्पाचे भाषण हे सर्वात गोपनिय कागदपत्रे असतात. त्यामुळे याची छपाई अर्थसंकल्पाच्या दोन दिवस अगोदर मध्यरात्रीच करण्यात येते. दरम्यान, ज्याठिकाणी या भाषणाची तयारी करण्यात येते त्या स्टेनोग्राफरच्या विभागात अर्थमंत्र्यासह इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी कधीही भेट देवू शकतात त्यामुळे याठिकाणची सुरक्षितता ही देशातील सर्वोच्च मानली जाते. पुर्वी अर्थसंकल्पाची छपाई ही राष्ट्रपती भवनातून होत होती मात्र १९५० मध्ये अर्थसंकल्प संसदेत सादर होण्याच्या अगोदर लिक झाल्यानंतर इथून होणारी छपाई थांबविण्यात आली. त्यानंतर मिंट रोडच्या एका ठिकाणी याची छपाई करण्यात येत होती. मात्र १९८० पासून ते आजपर्यंत अर्थसंकल्पाची छपाई ही नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंटमध्ये करण्यात येत आहे. अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांची निर्मीती ही नॉर्थ ब्लॉकमध्ये करण्यात येते. अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमध्ये पुर्णपणे वेगळे ठेवण्यात येते. त्यांना जोपर्यंत अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करत नाहीत तोपर्यंत सुट्टी देण्यात येत नाही ज्यावेळी अर्थसकंल्पाचे संसदेत वाचन पुर्ण होते त्याचवेळी या अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी देण्यात येते.

    दरम्यान, यासर्व प्रक्रियेनंतर संसदेत अर्थसंकल्पाचे केंद्रीय अर्थमंत्री सादरीकरण करतात. तसेच संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी राष्ट्रपतींच्या मंजूरी घेणेही बंधनकारक असते. तसेच संसदेत सादर करण्याच्या अगोदर युनियन कॅबिनेटच्या समोर अर्थसंकल्प सादर करण्यात येते. दरम्यान,सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पाचे अर्थमंत्री वाचन करतात. दरम्यान, यानंतर संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा होते. साधारण ही चर्चा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून पुढे चार दिवस चालते. या चर्चेनंतर संसदेचे अध्यक्ष संसदेत सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अनुदानवर मतदान घेते आणि त्यांनतर विनीयोग विधेयक मंजूर करण्यासाठी मतदान होते. या मतदानानंतर ७५ दिवसांच्या आत हे विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपतिकडे पाठविण्यात येते.त्यानंतर राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतरच अर्थसंकल्पाची प्रक्रिया पुर्ण होते.

    संकलन संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग छत्तीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेबेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग छत्तीस

    बाबा सांगतात...

    सांगेन गोष्टी हिताच्याच चार....

    निरोगी राहण्यासाठी काय करावे, हे आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहात आहोत. केवळ औषधे घेणे म्हणजे आरोग्याची प्राप्ती नव्हे.
    तहान लागल्यावर विहिर खणण्यापेक्षा पुढे तहान लागणार आहे, हे आधीच ओळखून, पाण्याचा शोध घेऊन ठेवावा. पाण्याला "जीवन" असा आणखी एक पर्यायवाची शब्द सांगितलेला आहे. जीवन सुखी होण्यासाठी सावध तो सुखी. नाहीतर सुखाच राहाणार. समुद्री चहुकडे पाणी पिण्याला थेंबही नाही. अशी अवस्था होऊ नये, याकरता आधीच विचार करावा, असे आयुर्वेद सांगतो.

    याचा अर्थ असा नव्हे की, भविष्यात हाताच्या एखाद्या बोटाला चुकुन, अपघाताने, जखम झाली तर, "या जखमेचे रूपांतर पुढे कर्करोगात होऊ नये, म्हणून आत्ताच हे चांगले बोट आपण ऑपरेशन करून काढून टाकूया" असे म्हणण्यासारखे आहे. नाही का ? याला "प्रिकाॅशन" असे म्हणता येईल का ? आज व्यवहारात याला "प्रिकाॅशन" असे गोंडस असे नाव दिले जात आहे, आणि भीती उत्पन्न करून नको ती शस्त्रकर्मे जसे गर्भाशय निर्हरण, सिझेरीयन, अपेंडिक्स, थायराॅईड, पित्तखडे, मूतखडे आणि अगदी ह्रदयातील ब्लाॅकदेखील, लगेच इमर्जन्सीच्या नावाखाली, ही शस्त्रकर्मे केली जात आहेत. हे मी नव्हे तर अमीरखान सारखा सत्यशोधक सत्यमेव जयते मधून सांगतोय. पद्मभूषण डाॅ. बी एम हेगडे देखील आपल्या युट्युब मधील अनेक व्हिडिओ मधून सांगताहेत. हे व्हिडिओ शांतपणे यु ट्युबवर जरूर पहावेत.

    मनात भीती कधी उत्पन्न होते ? जर अभ्यास नसेल तर. जर एखाद्या विषयाचा अभ्यास झालेला असेल तर परीक्षेत नापास होऊ अशी भीती वाटण्याचं काही कारणच नाही. अमुक गोष्ट केल्यावर, ती जाणून घेतल्यावर, तुला भीती वाटण्याचे काही कारणच नाही, याची खात्री पटली की, भीती उत्पन्न होतच नाही, असे विवेकानंद म्हणतात. म्हणजेच अज्ञान हीच सर्वात मोठी भीती आहे. ही अंधश्रद्धा नाही. मी जर आरोग्याच्या नियमांचे योग्य रितीने पालन करत असेन, तर मला भविष्यात काही रोग होईल, अशी भीती वाटण्याचे काही कारणच नाही.

    रोग झाल्यावर काय करावे, हे अभ्यासण्यापेक्षा रोग होऊ नयेत, म्हणून काय काय करावे, हे आयुर्वेदात खूप सखोल सांगितलेले आहे.

    रोग होऊ नये, यासाठी शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक या चारही गोष्टींचा साकल्याने विचार करावा. केवळ दिनचर्या, रात्रीचर्या, ऋतुचर्या, आहार विहार पथ्यापथ्य पालन करणे म्हणजे स्वस्थवृत्त नव्हे, हा शारीरिक अंतर्गत एक भाग झाला. इतर गोष्टी दुर्लक्षून कश्या चालतील ? आपल्याला जर पूर्ण आरोग्य मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असतील, तर सर्व गोष्टींचा विचार आणि अभ्यास करायलाच हवा. म्हणून हा आयुर्वेदीय हितोपदेश.

    काही जणांच्या मनात अज्ञानामुळे, अजूनही शंका आहेत, की " आई बाबा सांगतात" हे आयुर्वेदाच्या कोणत्या पुस्तकात सांगितले आहे ?
    कृपया आपली जातीयवादी विकृत दृष्टी, निदान आरोग्याच्या क्षेत्रात तरी, जरा बाजुला ठेवावी.

    जसे अग्निवेश, चरक, सुश्रुत होऊन गेले, तसे त्यानंतरच्या काळात 'वाग्भट' हे ग्रंथकार होऊन गेले. नागार्जुन, शारंगधर, काश्यप इ. अनेक ऋषी, आणि त्यांचे शिष्योत्तम, ही आरोग्य रहस्ये काळानुरूप त्यात योग्य ते बदल करीत, पुढील पिढीला देत गेले.

    गुरूशिष्य संवाद रुपात हे ज्ञानदान करण्याची भारतीय परंपरा जशी भगवद्गीता सांगितली, तशीच गुरूशिष्य संवादरुपी विवेचन या आयुर्वेदीय ग्रंथामधे देखील दिसते. शिष्य प्रश्न विचारतात, आणि गुरू त्या शंकेचे समाधान करतात. अशी ही परंपरा. पण दुर्दैवाने ही गुरुकुल शिक्षण परंपरा बंद पडली आणि महाविद्यालयीन चाकोरीबद्ध शिक्षण सुरू झाले....

    आई आणि बाबा हेच मोठे गुरू आहेत. जीवनाचे सार, चार हिताच्या गोष्टी, तेच अधिकाराने सांगत असतात. गुरुशिष्य परंपरा आई बाबा सांगतात, या नावाखाली सांगण्याचा हा प्रयत्न "वाग्भट" या ग्रंथाधाराने सुरू आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • प्रेमगंध..

    “प्रेम” या शब्दाचा इतका गैरवापर केला गेला आहे की प्रत्येक चरणावर या प्रश्नांबद्दल प्रश्न उठविले जातात. प्रेमाची तुलना वारंवार वासनाशी केली जाते. प्रेमाची तुलना मैत्री म्हणजे पक्की मैत्रीशी ही केली जाते. जर हे खरे प्रेम असेल तर ते कसे असेल..?

  • अचूकतेची चाचणी

    गॅलिलिओनं सोळाव्या शतकाच्या अखेरीस, पिसा इथल्या झुकलेल्या मनोऱ्यावरून केलेला एक कथित प्रयोग सर्वपरिचित आहे. या प्रयोगात गॅलिलिओनं वेगवेगळ्या वजनाचे दोन गोळे पिसाच्या झुकलेल्या मनोऱ्यावरून खाली टाकले व हे गोळे जमिनीवर पोचायला लागणारा वेळ मोजला

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – अळू

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – अळू

    साधारणपणे पावसाळयात अगदी भरपूर उगवणारी हि पालेभाजी तशी सगळ्यांच्याच पुष्कळ आवडीची.अगदी खमंग चुरचुरीत अळुवड्या म्हणा,अळुचे फतफते म्हणा किंवा हरतालिकेला केली जाणारी ऋषिची भाजी ह्या सगळ्याच पदार्थांची चव अगदी लाजवाब लागते त्यामुळेच आपले सर्वांचेच विशेष प्रेम ह्या भाजीवर आहे(तसे काही महाभाग असतील ज्यांना हि भाजी आवडत हि नसेल पण ती संख्या तशी नगण्यच समझावी).

    अळुचे रोप हे ११/२ -२ फुट लांब उगवते,ह्याची पाने मोठी व पसरट असतात.आणि ह्यावर पावसाचे पाणी चिकटून रहात नाही त्यामुळेच काही क्षणभंगुर गोष्टींना अळवावरचे पाणी ह्या म्हणीने संबोधले जाते.

    ह्याचे काळा,पांढरा,हिरवा,गर्द हिरवा असे अनेक प्रकार असतात.त्यातील फिकट हिरवा पातळ पानांचा प्रकारास तेर असं म्हणतात आणी ह्याच्या पानांची भाजी आंबट चिंचेचा वापर न करता केल्यास भरपूर खाजते.

    खायला काळा व गर्द हिरवा अळु उत्तम.अळुची चव हि तुरट गोड असते आणी हा थंड असतो त्यामुळे हा शरीरात वात व कफ दोष वाढवतो व पित्त कमी करतो.

    ह्या अळुचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत बरंका ते आता थोडक्यात पाहूयात:

    १)गळु फुटण्यास अळुची पाने व देठ वाटून त्याचा पोटीस गळूवर बांधावा.

    २)बाळंतीणीस दुध वाढायला जेवणामध्ये नियमीत थोडी अळुची भाजी खायला द्यावी.

    ३)जखमेवर अळुच्या पाल्याचा रस वाटून लावल्यास त्यातील रक्त स्त्राव बंद होतो व जखम लवकर भरते.

    ४)अळुच्या पानांचे देठ मीठासोबत वाटावेत व बंद व सुजलेल्या गाठी बसण्यास लेप करावा.

    ५)सर्वांगाची आग होत असल्यास अळुची भाजी,फुल्के व तुप ह्यासोबत खावी.

    अळुची भाजी जास्त खाल्ल्यास पोटात वात धरतो व बद्धकोष्ठाचा त्रास होतो.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • महादेवाच्या पिंडीचे रहस्य

    भगवान महादेवाच्या पूजेबद्दल काही महत्त्वाची माहिती……..

  • सदाबहार चित्रपट ‘पडोसन’ची पन्नास वर्षे

    काही विनोदी सिनेमे असतात असे जे आज ही आपणास मनमुराद आंनद देतात आपल्या कुटुंबियां सोबत ‘पड़ोसन ‘हा सिनेमा बघण्याची आज ही मज्जा काही आगळीच असते. अगदी हसवत ठेवणारा सिनेमा..

  • मन्ना लिजा

    पॅरिसमधील जगप्रसिद्ध लुव्र संग्रहालयाला रोज हजारो पर्यटक भेट देतात. १९५६ सालची गोष्ट आहे, नेहमी प्रमाणे संग्रहालयामध्ये पर्यटकांची गर्दी होती. त्यातील एका माथेफिरू पर्यटकाने जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र पाहताना आपल्या हातातील दगड दहा फुटावरील चित्राच्या दिशेने भिरकावला. तो दगड चित्राला लागून तेथील रंग खरवडला गेला.