(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – ७

    आत्ता पर्यंत: अंतराळात भ्रमण करून ज्ञानाच्या सीमा वाढवण्याच्या मोहिमेवर टीम पुणेला आय आर एस आर्यभट्टवर कॅप्टन नेमोंनी सहकारी म्हणून स्वीकारलं होतं. सध्या त्रिकोणी ग्रहावर… एरेटॉसथिनिस काका…

      May 12, 2021


  • मराठी अस्मितेचा हुंकार

    शिवसेना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा प्रवास करणारा नेता राज ठाकरे आज आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जी राजकारणात गरुडझेप घेत आहे, ती अनेक राजकीय दिग्गजांना विचारात ठाकणारी आहे. शिवसेना सोडल्यानंतर हा नेता नेमके काय करणार हा अनेकांना प्रश्‍न पडला होता.

      June 14, 2008


  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिवस

    अखिल भारतीय विद्यार्थी परिषदही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी साम्य असलेली विद्यार्थी संघटना आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केली होती. देशातील विविध विद्यापीठांमधील डाव्या विचारांचा पगडा कमी करणं हा अभाविपच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश होता.

      July 9, 2021


  • निमित्त एक पण आपत्ती मात्र अनेक

    इथून पुढे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी प्रगती साधताना जिथे जिथे निसर्गाला धक्का लागेल तिथे तिथे ति झीज भरून काढण्याची जिम्मेदारी देखील आपल्याला उचलावी लागेल. आपण तंत्रज्ञान विकसित करण्यासोबत निसर्गाचा आदर राखायला लागलो की मग आपल्यावर देखील वेगवेगळ्या आपत्तीच्या निमित्ताने घरात बंदिस्त होण्याची वेळ येणार नाही.

      April 5, 2020


  • वॉशिंग मशीन

    वॉशिंग मशिन शिवाय कुठल्याही गृहिणीचे काम चालू शकत नाही. कपडे धुण्यासाठी हे यंत्र वापरले जाते. आता त्यात स्वयंचलित, अर्धस्वयंचलित असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्यांचा आकारही आटोपशीर आहे.

      June 5, 2023


  • समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली गणपतीची संपूर्ण आरती

    समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो. ती फ़क्त 2 कड़वी म्हटली जातात. पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे. ती खालीलप्रमाणे आहे

    सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।

    नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥

    सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।

    कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

    जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

    दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

    रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।

    चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥

    हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।

    रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥

    माथा मुकुट मणी कानी कुंडले ।

    सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।

    नागबंद सोंड-दोंद मिराविले ।

    विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥

    चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।

    खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।

    सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।

    अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥

    छत्रे चामरे तुजला मिरविती ।

    उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।

    ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।

    आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥

    ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।

    ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।

    ताल मृदंग वीणा घोर उमटती ।

    त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥

    लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।

    सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥

    दास रामाचा वाट पाहे सदना ।

    संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना

    ॥ जय ० ॥ ७ ॥

    जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

    दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥

    !!गणपती बाप्पा मोरया!!

      September 8, 2016


  • मौखिक व अमौखिक संवाद

    दोन व्यक्तींमधील संवादात सहसा तिसरी व्यक्ती सामील झालेली नसते. हा संवाद व्यक्तिगत, थेट आणि निकटता निर्माण करणारा असतो, ज्यात शब्द, देहबोली यांचा अंतर्भाव असतो. या संवादामुळे व्यक्तीचं मन वळवणे, एखाद्यावर प्रभाव निर्माण करणे शक्य होतं. या संवादामध्ये मौखिक, अमौखिक संवाद शक्य असतो. त्याचबरोबर अशा संवादात तात्काळ प्रतिसादही मिळत जातो.

      March 22, 2022


  • बेशिस्तीचे बळी!

    प्रकाशन दिनांक :- 30/01/2005

    महाराष्ट्रासह संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारीत मग्न असतानाच सातारा जिल्ह्यातील वाईजवळ असलेल्या मांढरदेव काळुबाई यात्रेत मात्र मृत्यूने आपले तांडव दाखवायला सुरुवात केली होती. अखेर अडीचशेपेक्षा अधिक बळी घेऊनच हे तांडव शांत झाले. चेंगराचेंगरीत इतक्या मोठ्या प्रमाणात जीवहानी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचे सावट पसरले.

      January 30, 2005


  • कोकणातील बागायती फळ शेती

    आम्हाला विकास हवा आहे, पण त्यासाठी मेहनत, पुढाकार, चिकाटी, सहनशीलता या गोष्टीची सुद्धा गरज असते. पण त्या बाबतीत कोकणातला माणूस थोडा कमी पडताना दिसतो. सद्यस्थिती  पाहिल्यास या समूहातील काही उद्योजकांनी काजू प्रक्रिया उद्योगात खूप मोठी भरारी घेतली आहे. यातील काही उद्योजक 2003 साली दिवसाला चाळीस ते पन्नास किलोच्या आसपास काजू बी वर प्रक्रिया करत होते. सद्यस्थिती ते दिवसाला अडीच ते तीन टन काजू बी वर प्रक्रिया करत आहेत.

      April 11, 2023


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सत्तावन्न

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 13-पुष्प पहिले

    तिलक लावल्यावर पुष्प देऊन स्वागत केले जाते. जसे व्यासपीठावरील पाहुण्यांचे, तसेच देवाचे पण !
    यथा लाभोद्भव, कालोद्भव, सुगंधीत पुष्पं समर्पयामी । असं सांगून फुलं वाहिली जातात. "माझ्या शक्तीनुसार, ऋतुनुसार, जी काही शक्य होती ती सुगंधित फुले आणून, ती मी तुला वाहातो आहे, ती तू मान्य करून घे. आणि याच्या सुवासाने नेहेमी प्रसन्न रहा."

    हे कोणाला उद्देशून सांगायचं? ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली त्याला ? की, सृष्टीमधे फुलं निर्माण करणाऱ्याला ? की फुलांमधे सुगंध घालणाऱ्याला ? की एवढी किमया जो करू शकतो त्याला ? या सगळ्या उपचाराची आणि चार दोन फुलांची त्याला आवश्यकता असेल ? नक्कीच नाही. ही विनंती, प्रार्थना या सौंदर्याचा उपभोग घेणाऱ्यांसाठी आहे.

    तुझेच तुजला अर्पण, हा भाव ठेवून हा पुष्पालंकार देवाला वहायचा.

    विविधता म्हणजे काय हे ते या फुलांकडून समजून घ्यावे. त्यांचे रंग, सुवास, उमलण्याच्या वेळा, टिकून रहाण्याचे सामर्थ्य, पुनः नवनिर्मितीसाठी माता होऊन, फळात रूपांतरीत व्हायचं, सारंच अद्भुत !

    हे सारं "तो" कोणासाठी करतोय ?
    फक्त मानवासाठी करीत असेल तर जिथे मानव नाही, अशा ठिकाणी देखील फुले बहरत असतातच की ! पशु पक्ष्यांसाठी ? त्यांच्यासाठी पण नाही. कारण त्यांना तशी सौंदर्यदृष्टी नाही. काहीजण त्यातील फक्त मध घेतात, काहीजण पायाखाली तुडवून जातात.अत्यंत स्वार्थी आणि अरसिक !
    मग ही अलौकिक पुष्प निर्मिती कोणासाठी ?

    त्याच्या स्वतःसाठी !
    त्याच्या स्वतःच्या आनंदासाठी !
    कोणी पाहो अथवा न पाहो....
    तिथे कुणी येवो वा न येवो.....
    देवाच्या चरणावर जावो अथवा सरणावर..
    झाडावरच झुरायचे की कुठेतरी दूर जात लहरायचे....
    औषधे टिकवण्यासाठी आंबवून घ्यायचे की गजऱ्यात जावून बसायचे....
    गंधाने ओथंबून जायचे की गंध दिला नाही म्हणून अबोलीच रहायचे ....
    प्रेमिकेसाठी पलंगावर पहुडायचे की गणिकेसाठी मनगटात जायचे....
    काट्यावर उमलायचे की पाण्यावर डुलायचे...
    उन्हात तापत गुलकंद होऊन घ्यायचे,
    की
    पाण्यात पडून पाणी सुगंधीत करायचे...
    फुल होऊन फुलांकडे पहायचे....
    आणि
    प्रत्येक क्षणाला त्याला स्मरायचे !

    या साऱ्यावर फक्त त्याचाच अधिकार आहे. स्वतःला आनंद व्हावा, असं प्रत्येकालाच वाटतं, कारण प्रत्येकामधेच तो भरून राहिला आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    06.06.2017

      June 6, 2017