वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दुसर्या महायुद्धाच्या काळात डॉ. ड्वाईट हार्केन यांनी हृदयावर शस्त्रक्रिया करण्याची एक पद्धत विकसित केली. या पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेत प्रथम हृदयाला लहानसे छिद्र पाडण्यात येत असे. मग त्या छिद्रातून हाताचे बोट हृदयात घालून अरुंद झडप (व्हॉल्व्ह) थोडीशी मोठी करण्यात येई. हळूहळू हृदयशल्यचिकित्सकांना यात प्राविण्य मिळाले व अशा शस्त्रक्रिया सुलभतेने होऊ लागल्या. ही झाली ‘क्लोज्ड हार्ट’ अथवा आंधळी शस्त्रक्रिया. या शस्त्रक्रियेमुळे कितीतरी रुग्णांना फायदा झाला असला तरीही या पद्धतीला बर्याच मर्यादा होत्या. जर का हृदयाच्या आत हात घालून काम केले नाही तर यात शस्त्रक्रिया करणे अवघड होते. याशिवाय आणखी एक खूप मोठी अडचण होती ती म्हणजे या पद्धतीमध्ये रुग्णाच्या हृदयाचे स्पंदन चालूच राहात असे. रक्ताभिसरणाचा वेग कमी करून (Temporarily stopping a patient's circulation) शल्यचिकित्सकांना शस्त्रक्रियेसाठी फक्त चार मिनिटे इतकाच अवधी मिळत असे. त्यानंतर रक्तपुरवठा पूर्ववत झाला नाही तर मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे इजा पोहोचण्याची शक्यता निर्माण होण्याचा धोका होता. या पद्धतीला ‘इनफ्लो ऑक्लुजन’ असे संबोधिले जाते. त्यामुळे हृदयावरील ज्या शस्त्रक्रियांना चार मिनिटांपेक्षा अधिक काळ लागेल अशा शस्त्रक्रिया करणे अशक्यच होते.
डॉ. विल्फ्रेड बिगलो यांनी यावर उपाय सुचविला, इतकेच नव्हे तर त्यावर काम करून ती प्रणाली अंमलातही आणली. बिगलो तेव्हा मिनेसोटा विद्यापीठात काम करीत होते. संशोधनादरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की कॅनडामधील (डॉ. बिगलो कॅनेडियन होते) तीव्र कडाक्याच्या हिवाळ्यात ‘ग्राऊंड हॉग’सारखे प्राणी हायबरनेशन मध्ये जातात. थंडीवर मात करण्याचा त्यांच्यासाठीचा तो उपाय आहे. या कालावधीत त्यांच्या हृदयाचे ठोके मंदावतात व त्यांची उर्जेची गरज कमी होते, त्याचा परिणाम म्हणून अन्नावाचून ते बरेच महिने जगू शकतात. या संदर्भात विचार करीत असतांना बिगलोंना असे वाटले की ‘खूप कमी तापमान’ हा एक उपाय होऊ शकतो. मग त्यांनी प्राण्यांवर प्रयोग करून पाहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की श्वानांच्या शरीराचे तापमान खूप कमी केले असता त्यांच्यावर ‘ओपन हार्ट सर्जरी’ बर्याच वेळा चार मिनिटांहून अधिक काळ करता येते व त्यात प्राणी दगावत नाहीत. बिगलोंनी असे सिद्ध केले की कमी तापमान ठेवले असता मेंदू व शरिरातील उतींची प्राणवायूची गरज कमी होते व त्यामुळे रक्तपुरवठा जास्त काळ रोखून धरला तरी मेंदूला इजा पोहोचत नाही. सप्टेंबर १९५२ मध्ये डॉ. लीलेहाय आणि डॉ. जॉन लुवीस यांनी या पद्धतीचा वापर करून प्रथमच एका पाच वर्षांच्या लहान मुलीवर शस्त्रक्रिया केली. या पद्धतीमुळे ती मुलगी शस्त्रक्रिया चालू असतांना, दहा मिनिटेपर्यंत हृदयाची धडधड थांबली असतांना देखील जिवंत राहू शकली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या उपचारप्रणालीला ‘द हायपोथरमिक अॅप्रोच’ असे संबोधिले जाते. हृदयातील छोटे दोष दुरुस्त करण्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरली.
कॅनडामधील मॅनीटोबा येथे १९१३ मध्ये डॉ. बिगलो यांचा जन्म झाला. त्यांचे वडील देखील डॉक्टर होते. त्यांच्या वडिलांनी कॅनडातील पहिले ‘मेडिकल क्लीनिक’ स्थापन केले. १९३८मध्ये बिगलो यांनी टोरोंटो विद्यापीठात प्रवेश घेतला. ‘टोरोंटो जनरल हॉस्पिटल’मध्ये त्यांनी प्रशिक्षणार्थी (सर्जिकल रेसिडेन्ट) म्हणून काम केले.
१९४१ मध्ये त्यांच्याकडे एक रुग्ण चिकित्सेसाठी आला. हिमदंशामुळे (फ्रॉस्ट बाईट) त्याच्या हाताच्या बोटांना गॅन्गरीन झाले होते. बिगलोंना शस्त्रक्रियेद्वारे त्याची बोटे कापावी लागली. या घटनेने ते अस्वस्थ झाले. हिमदंशावर त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. या घटनेतून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. बिगलो यांनी सैन्यात प्रवेश घेतल्यावर युद्धभूमीवरही काम केले. हिमदंश झालेल्या कित्येक सैनिकांवर उपचार करीत असतांना ‘हायपोथर्मिया’वर ते विचार करू लागले. दुसरे महायुद्ध संपल्यावर ते टोरोंटो येथे परत गेले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील बाल्टीमोर येथील जॉन हॉपकिन्स रुग्णालयात प्रशिक्षण घेतले. १९४७मध्ये ते कॅनडाला परतले व ‘टोरोंटो जनरल हॉस्पिटल’मध्ये ‘स्टाफ जनरल सर्जन’ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९५०मध्ये टोरोंटो विद्यापीठाच्या शल्यचिकित्सा विभागात त्यांना नेमणूक मिळाली. १९५३ साली तेथेच ते सहाय्यक प्राध्यापक झाले तर १९७० मध्ये प्राध्यापक झाले. १९८४ साली बिगलो यांनी त्यांच्या या संशोधनावरील पुस्तक प्रकाशित केले. त्याचे नाव होते, ‘कोल्ड हार्टसः द स्टोरी ऑफ हायपोथर्मिया अॅन्ड द पेसमेकर इन हार्ट सर्जरी’
बिगलो यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. जैववैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांना १९५९चा गाईर्डनर फाऊंडेशनचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९८१ साली ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ तर १९९२ साली कॅनेडिअन मेडिकल असोसिएशनचे ‘फ्रेडरिक न्यूटन गिसबोर्न स्टार अॅवॉर्ड’ देण्यात आले. असोसिएशनच्या वतीने कोणत्याही सदस्याला देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. त्यानंतर पाच वर्षांनी ‘कॅनेडिअन हॉल ऑफ फेम’मध्ये बिगलोंना स्थान देण्यात आले. ‘अमेरिकन असोसिएशन फॉर थोरॅसिक सर्जरी’ तसेच ‘सोसायटी फॉर व्हॅस्क्युलर सर्जरी’चे ते अध्यक्ष होते. १९७० ते १९७२ या कालावधीत बिगलो ‘कॅनेडिअन कार्डिओव्हॅस्क्युलर सोसायटी’चे अध्यक्ष होते. टोरोंटो जनरल हॉस्पिटलच्या हृदयशल्यचिकित्सा विभागाचे ते वीसपेक्षा अधिक वर्षे प्रमुख होते. सन २००१ मध्ये ‘इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेस’ तर्फे बिगलो यांना ‘लीव्हिंग लीजंड’या किताबाने गौरविण्यात आले. हृदयशस्त्रक्रियेला शक्यतेच्या कक्षेत आणण्यात डॉ. बिगलो यांच्या संशोधनाचा मोलाचा वाटा आहे. २७ मार्च २००३ रोजी डॉ. बिगलो यांचे निधन झाले.
डॉ. बिगलो मध्यभागी पेस-मेकरचे कार्य समजावून सांगताना, ऑक्टोबर १९८२
टोरोंटो विद्यापीठातील बॅन्टींग इन्स्टिट्यूट येथे काम करीत असतानाच, ५०च्या दशकात डॉ. बिगलो पेस-मेकरचे सह-संशोधन केले होते..
।।गजकर्णकाय नम: तुलसीपत्रं समर्पयामि।।
"मै तुलसी तेरे आंगन की"हे गाणे बऱ्याच जणांना माहीत असेल माझ्या माहीती प्रमाणे हा एक जुना चित्रपट होता.असो थोडक्यात काय हिंदू संस्कृतीत आणी आपल्या आयुर्वेदामध्ये ह्या वनस्पतीला अत्यंत मानाचे स्थान आहे.
आज आपण पहातो बऱ्याच घरांमध्ये तुळशी वृंदावन असते किंवा घरा भोवताली तुळशीचे कुंपण लावतात.कारण तुळस हि रक्षोघ्न आहे अर्थात वाईट शक्ती रोग राई आपल्या घरापासून लांब ठेवते.
सकाळी उठून स्त्रिया शुचिर्भुत होऊन तुलसीला प्रदक्षिणा घालून तिला पाणी वाहतात कारण तुळशीच्या भोवताली प्राण वायू हा अगदी शुद्ध असतो व तिच्या सान्निंध्यात राहील्याने आपले आरोग्य चांगले राहते म्हणूनच कि.किती सोपा व सुंदर उपाय आपल्या संस्कृती मध्ये दिला आहे ना.
तुळसीचे क्षुप हे ०.५-१.५ मी उंच असते व हे वर्षायू असते.हिचे दोन प्रकार आढळतात एक कृष्ण तुळस जी काळसर तांबूस असते व एक श्वेत तुळस जी हिरवीगार असते.ह्याची पाने १-२ सेंमी लांब असून विशिंष्ट तीक्ष्ण सुगंध युक्त असतात.पानाच्या मादीस बाजूस सिरांमध्ये बारीक तैलग्रंथी असतात.फुले तांबूस काळसर असून मंजीरी १२-१७ सेंमी लांब असते.बी लहान,गोल,चपटे,तांबूस धुरकट असते.हिवाळ्यात ह्याला फुले व फळे येतात.
आता आपण ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात:
ह्याची चव तिखट,कडवट असते,ही उष्ण गुणाची असून हल्की,स्निग्ध व तीक्ष्ण असते.तुळशीच्या बिया मात्र गोड,थंड,स्निग्ध व पिच्छील असतात.
हि कफवात शामक व पित्तवर्धक आहे.
आता आपण ह्याचे उपयोग जाणून घेऊ:
त्वचा रोग,सूज ह्यात पानांचा रस/ लेप लावतात.
हिरड्या मधून पु येत असल्यास तुळशीची पाने चघळावी.
संडास मधून आव पडत असल्यास तुळशीच्याबियांची खीर उपयुक्त आहे.
श्वसनविकारांमध्ये तुळस उत्कृष्ट काम करते म्हणूनच खोकला,दमा,उचकी,सर्दी ह्यात तुळशीचा रस मधा सोबत देतात.
तापामध्ये तुळशीचा रस हा मध व मिरीपूड ह्या सोबत दिला जातो.
तुळशीच्या बिया ह्या पुरुषांमध्ये वीर्यवर्धन करायला उपयुक्त असतात.
तुळस ही डास व किटकांचा नाश करते म्हणून अंगणात ह्याचे कुंपण घराभोवताली लावावे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हा मोठा वृक्ष असतो. हल्ली रस्त्याचे कडेनी बरीच ही झाडे लावलेली असतात. ह्याला एप्रिल, मे, जून व नंतर नोव्हेंबर,डिसेंबर मधे सोनेरी पिवळ्या रंगाची फुले येतात. रस्त्यावर फुलांचा सडा पडतो, रस्ता पिवळा होतो. अख्खे फुल खाली पडते. फुल नाजूक असते फुलाच्या पाकळ्या पिवळ्या असून देठाला विटकरी रंग असतो. ह्या फुलाचा रक्ताभिसरणावर उपयोग होतो असे माझे संशोधनात आले.
2005मधे मला एकदा चक्कर आली म्हणून बी पी बघितले. 85--150 होते. म्हणून ह्या फुलांचा प्रयोग केला. ह्याची 15-20 फुले रात्रभर ग्लासभर पाण्यात ठेवली. सकाळी फुलं बाजूला करून ते पाणी अर्धी अर्धी वाटी चार वेळा घेतले. दुसरे दिवशी बी पी नाॅर्मल होते.
माझे सासूबाईंना सकाळी सहा वाजता उठताना चक्कर येत होती. उठून बसता येत नव्हते. (आॅगस्ट 2006). म्हणून बी पी पाहीले. ते 140--240 इतके होते. सुदैवाने ताम्र शेंगीचे पाणी तयार होते. त्याचे डोस तासातासानी दिले. आठ वाजता चक्कर कमी झाली. व त्या उठल्या. ह्या आधी मी डाॅ.तांबेना फोन केला होता त्यानी एक गोळीचे नाव सांगितले. व दुपारी एक वाजता बी पी घेऊन सांगा. असे सांगितले दहा वाजता केमिस्टचे दुकान उघडते. तो पर्यंत सासूबाई कामाला लागल्या. त्यानी गोळी नको सांगितले. डाॅ. तांबेनी सांगितले होते म्हणून एक वाजता बीपी पाहीले तर 90--140 होते. नंतर दोन दिवसात ताम्रशेंगीचे पाणी देऊन बी पी नाॅर्मल आले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. साधे रस्त्यावर पायदळी तुडवले जाणारे फुल निसर्गाने किती औषधी बनविले आहे. डाॅक्टरला सहा वाजता बोलावले असते तर अँब्यूलंस करून ICUत चार दिवस ठेवले असते.
आमचे शेजारी राहणारे श्री. गायधनी (वय 70चे पुढे ) याचे बीपी 100--200 झाले म्हणून डाॅ.नी त्याना अॅडमीट होण्यास सांगितले. त्यांची अॅडमीट होणयाची इच्छा नव्हती. त्यांना मी माझेकडील ताम्रशेंगीचे पाणी दिले तीन डोस अर्ध्या, अर्ध्या तासानी दिल्यावर ते शांत झोपले. सकाळी दोन डोस घेतल्यावर बीपी बघीतले ते 85--140 होते
वरील अनुभव अचानक वाढलेल्या बीपीचे आहेत. परंतु ज्यांचे बीपी कायम हाय असते अशांना मी फुले सुकवून पावडर करून रोज अर्धा चमचा पाण्या बरोबर घेण्यास सांगितले. ज्यांनी केले त्याचे बीपी महीना भरात नाॅर्मलवर आले.
ताम्रशेंगी फुलांचे पाणी करणे---एका ग्लासभर पाण्यात 15ते20 फुले रात्रभर किंवा 8--10 तास ठेवावीत.नंतर पाणी गाळून 50 मिलीचा एक डोस असे आवशकते नुसार 4ते 6 डोस घ्यावेत
ताम्रशेंगीच्या फुलांची पावडर करणे--पिशवीभर फुले सावलीत चांगली सुकवावीत.नंतर मिक्सर मधे घालून पावडर करावी. रोज सकाळ संध्याकाळ अर्धा,अर्धा चमचा पाण्याबरोबर घ्यावी.
अरविंद जोशी B.Sc.
गौरव अपार्टमेंट,विश्वमेडीसिन मागे, सनसिटी रस्ता, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे
फोटो पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा
https://drive.google.com/file/d/0B_d0-zthRBc1ZEJQVXhMeXhtZVU/view?usp=drivesdk
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सव्वीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
आई तेच सांगतेय, जे आयुर्वेदातील ग्रंथकार सांगत आहेत फक्त काळाचा आणि त्यामुळे शब्दांचा फरक पडलाय एवढंच.
संसार टिकायला हवा असेल, तर उठसूठ माहेरचं कौतुक सासरी सांगू नये. माझ्या माहेरी अस्सं होतं, तस्सं होतं. इथपर्यंत ठीक आहे. पण हे सर्व तुमच्याकडे नाहीच आहे, असं सासरला डिवचून सांगण्याची काही आवश्यकता नाही. इथे वाद वाढत जातात. ताण वाढतात. त्याचा परिणाम रोगावस्था.
मनावरचा प्रत्येक ताण हा त्याच क्षणाला स्नायुपर्यंत पोचत असतो. आणि तिथेच राहतो, जोपर्यंत तो मनातून जात नाही. असे असंख्य ताण मनावर साठलेले असतात, याचा ताण स्नायुंना सहन होत नाही. मग एखादा स्नायु आखडला जातो. किंवा ताणला असेल तर त्याच अवस्थेत राहतो. मग वेदना निर्माण होते. ही वेदना मनातून, ताणातून निर्माण झालेली असल्याने नुसत्या वेदनाशामक गोळ्या खाऊन, या मनातील वेदना कशा कमी होतील ?
अनेक रुग्ण वेदना हे लक्षण घेऊन जेव्हा वैद्यांकडे जातात, तेव्हा त्या वेदना शरीरातील कारणामुळे निर्माण झालेल्या आहेत की मानसिक कारणामुळे, हे शोधून काढावे लागते. नुसत्या व्हिटामिनच्या गोळ्या खाऊन या वेदना कधीच कमी होत नाहीत. त्यासाठी वेदनेच्या मुळापर्यंत जाऊन पोचणे आवश्यक आहे.
समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही, एवढी सावधानता बोलताना बाळगली तर अनेक वेदना निर्माण होण्यापूर्वीच आपण थांबवू शकतो.
माहेरचे अति कौतुक जसे मुलीने करू नये, असे आईला वाटते, तसेच मुलाच्या आईने पण आपल्या मुलाला हे सुनावले पाहिजे की, सांगे वडीलांची किर्ती, तो एक मुर्ख. आपण आपल्याच घराण्याचे कौतुक उगाळण्याची काही आवश्यकता नसते. जो काही पुरुषार्थ दाखवायचा आहे, तो स्वकर्तृत्वावरच दाखवावा म्हणावं. बापजाद्यांच्या किंवा पिढीजात पुण्याईमुळे जे काही मिळाले आहे, त्याची टिमकी वाजवायची काही गरज नाही.
छत्रपती संभाजी राजेंना समर्थ रामदास स्वामींनी केलेला उपदेश इथे लक्षात घेण्यासारखा आहे. शिवरायांच्या पश्चात शंभूराजे अस्वस्थ होते, त्या अस्वस्थपणामुळे काही निर्णय चुकीचे घेतले जात आहेत, असे जेव्हा समर्थांच्या कानी गेले, तेव्हा एक खरमरीत पत्र समर्थांनी, वडीलकीच्या नात्याने शंभूरायांना लिहिले.
"पाणवठी तुंब निघेना" अशी सुंदर उदाहरणे देऊन शेवट "तरीच म्हणावे पुरुष" इथपर्यंत केलेली कानउघाडणी प्रत्येक पुरुषाने अभ्यासली पाहिजे. संसार स्वतःचा असो वा जगाचा, आत्मभान जागृत ठेवले गेले पाहिजे.अन्यथा विनाश अटळ आहे.
ही समिक्षा, हा विवेक सतत जागृत हवा. म्हणजे देहाचे असो, वा देशाचे आरोग्य चांगले राहातेच. प्रत्येकाचे वैचारिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून केलेला उत्सव हा सगळ्यांनाच कल्याणकारी असतो.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१५.०८.२०१७
टेनिसक्षेत्रात जागतिक पातळीवर गेली काही वर्षे सेरेना आणि व्हिनस विल्यम्स या काळ्या (किंवा निग्रो) बहिणी अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून वावरत आहेत. त्यांची नावे, त्यांचा खेळ, त्यांची चपळाई, त्यांचे टेनिसच्या खेळातील वादातीत प्रभुत्व आणि जागतिक पातळीवरील कोणत्याही स्पर्धे तील त्यांचे अढळ-अजिंक्यपद, या सर्वांची आपल्याला आता सवयच झालेली आहे.
ज्या पदार्थांमध्ये उष्मांक किंवा कॅलरीज खूप जास्त प्रमाणात असतात व इतर पोषक द्रव्ये अगदीच कमी प्रमाणात असतात, असे पदार्थ फास्टफूड किंवा जंकफूड या प्रकारात मोडतात.
इमारतीची निर्मितीप्रक्रिया आर्किटेक्टने आराखडा बनवण्याने सुरू होते. तेव्हा त्यांनी इमारतीवर विशेष लक्ष द्यायला हवे. जसे इमारतीचा आकार साधा हवा. उगाच कुठले तरी कलात्मक संदर्भ देत तो वेडावाकडा करू नये. उभा किंवा आडवा आकार खूप निमुळता करू नये. इमारतीला खूप कोपरे नसावेत. लांब लांब बाल्कन्या नसाव्यात. इमारतीच्या बाह्य सुशोभीकरणासाठी जास्तीचा भार टाकू नये.
२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन्ही राष्ट्रीय सणांचं महत्त्व आणि गांभीर्यही आपण विसरत चाललो आहोत. शाळेतल्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना तर हे दोन्ही दिवस शिक्षेसारखे वाटतात. गेल्या २६ जानेवारीच्या आदल्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक दिसले. त्यांना नमस्कार केला.
“प्राण” या संस्कृत शब्दाचा अर्थ जीवन असा आहे, तर “यम” म्हणजे शिस्त, नियंत्रण, नियमावली आणि पारंगतता होय. “प्राण” याचा दुसरा अर्थ श्वास असा होतो. याचे करण श्वास नसेल, तर जीवन असणार नाही. श्वसन हे शरीरातील स्वायत्त कार्य होय आणि त्याच्यावरच आपणास नियंत्रण करावयाचे असते.
“आपल्या आयुष्यात दोन क्षण अतिशय शक्तिशाली असतात. यातील पहिला क्षण आपण जन्माला येतो तो आणि दुसरा आपण जन्माला का आलो, हे कळतं तो..” हे वाक्य आहे केनिया या देशातील एका तरुणाचे. त्याचं नांव बोनिफेस म्वांगी.
Copyright © 2025 | Marathisrushti