वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
तुलसीचे झाड अंगणीं । सर्वांच्या घरातुनी ।।
त्याचे महत्त्व जाणूनी । गृहलक्ष्मीसाठीं ।।१।।
पवित्रता धर्म एक । घर गृहस्थीचे सुख ।।
पवित्रतेचे प्रतीक । तुलसी असे ।।२।।
तुलसीचे झाडास । परमेश्वराचा सहवास ।।
गृहसुख त्या घरास । लाभत असे ।।३।।
तुलसी झाडास मोठेपणा । मिळत असे 'वर' मिळोन ।।
कथा ऐकवी चित्त देवून । सकळ जन हो ।। ४।।
राजा नामें जालंदर । होता तो आसुर ।।
स्वभाव त्याचा क्रूर । गरीब जनांसाठी ।। ५ ।।
तयाची पत्नी सती । त्यास पतिव्रता लाभती ।।
महान तिची पतिभक्ति । वृंदा नाम तिचे ।। ६ ।।
पतिसी मानती देव । अर्पूनी त्याचे चरणीं भाव ।।
पुजिती त्यासी सदैव । मनोभावे ।। ७।।
राजाने देवांना जिंकूनी । बंदी त्यांना करूनी ।।
त्रास सर्वांना देवूनी । हा हा:कार माजविला ।। ८।।
प्रत्यक्ष शिव आला लढण्यास । मारण्या जालंदरास ।।
सोडविण्या देवांचा त्रास । त्याचे कडून ।।९।।
अपूरी पडली शिवशक्ती । मरण त्यास न येती ।।
कोण त्यास वाचविती । प्रश्न पडला शिवे ।।१०।।
ब्रह्म आले सत्वर । पूजा करुन विश्वेश्वर ।।
सुचविती उपाय त्यावर । दैत्यास मारण्याचा ।। ११।।
वृंदा आहे सती महान । पतिवृता शक्ती कठीण ।।
त्या शक्तीमुळे रक्षण । दैत्याचे होई ।।१२।।
तिचा पती धर्म । नष्ट करावा हे मर्म ।।
विष्णूसी सांगावे हे कर्म । करणे करिता ।।१३।।
पतिवृता हरण करणेसाठीं । कारस्थान केले जगतजेठीं ।।
दैत्यनाशा पोटीं । घात केला वृंदेचा ।।१४।।
दैत्य रुप घेवूनी । पती आहे हे भासवूनी ।।
पातिवृत्या नष्ट करोनी । वृंदासी फसविले ।। १५।।
प्रकार आला ध्यानीं । पतिधर्म गेला डागळूनी ।।
खिन्न झाली मनी । सती वृंदा ।। १६।।
शाप दिला संतापूनी । मानव जन्म घेवूनी ।।
पत्नी विरहाचे दु:ख मनीं । सहन करावे लागेल ।। १७।।
विष्णू 'राम' अवतरला । आजन्म विरह सोसला ।।
दु:खी, कष्टी आला । सीते साठीं ।। १८ ।।
वृंदेचे जेव्हां पावित्र जाई । रक्षणकवच दूर होई ।।
शिव दैत्यास मारण्या येई । त्याच वेळीं ।। १९।।
दु:खाचा डोंगर कोसळला । पति व पतिधर्म गेला ।।
जगण्यास अर्थ न उरला । वृंदेसाठी ।। २०।।
पति वियोग होतां । सती गेली पतिव्रता ।।
परमेश्वर तिज दर्शन देतां । आशिर्वाद दिला ।।२१।।
परमेश्वरांनी वर दिला । तुलसीचे रूप मिळेल तिला ।।
विष्णुचे सानिध्य लाभण्याला । तिचे भोवतीं ।।२२।।
घरातील अंगण । त्यांत तुलसी वृंदावन ।।
आनंद सुख समाधान । त्या घरी वसे ।।२३।।
पूजा आभिषेकांतील तीर्थ । अर्पूनी जल वृंदावनांत ।।
भाव भक्तीचे मनोरथ । तुलसी ठायी ठेवावे ।। २४।।
सौभाग्यवती ही सति । पतिव्रतेची एक शक्ति ।।
तुळशीच्या आशीर्वादे मिळती । गृहलक्ष्मींना ।।२५।।
तुळसी अंगणीं वसे । संरक्षण वलय असे ।।
दु:ख ना तेथे दिसे । त्या घरामाजीं ।।२६।।
( तुलसी विवाह कार्तिक शुक्ल द्वादशी ते पौर्णिमेपर्यंत )
शुभ भवतू
डॉ. भगवान नागापूरकर
८- २५११८३
गहू खायचा नाहीतर तांदुळ !
एखाद्या गोष्टीची इतकी सवय होते, की नंतर सोडताना खूप त्रास होतो.
गहू बंद केला तर
कल्पना सुद्धा करवत नाही.
मग डब्यात काय देणार ?
यांना काय सांगायला जातेय,
आम्हाला वेळच नाही,
आता एवढ्या वर्षात काही झालं नाही, आता काय होणारे ?
नुसतं हॅवाॅक आहे झालं !!
सुशिक्षित, विचार करणाऱ्या सुगृहिणीकडून अश्या काॅमेंटस ऐकाल्या की, त्यांना सांगावेसे वाटते, एक महिनाभर गंमत म्हणून, व्रत म्हणून, अक्कल गहाण टाकून, पूर्वग्रहदूषित ठेवून, गहू बंद करून पहावा. गहू बंद केला तर, अनेक नवीन पर्याय सुचु लागतील. याचा वापर केल्याने सजण आणि सर्वजण खुश होतील.
गव्हाऐवजी कोकणात तीन चार पर्याय उरतात. तांदुळ, नाचणी, उडीद आणि मका
कोकणाशिवाय अन्य प्रदेशात ज्वारी, बाजरी, मका ही धान्ये पण पोटभरतीची आहेत. किंवा धान्ये एकत्र करून पण वापरता येतील. भाजून ठेवली तर आणखीन चांगले. थालीपीठ आणि लोणी, एकत्र केलेल्या पीठाची धिरडी, उत्तप्पा, दशम्या, पराठे, घावन, वडे, एवढे उत्तम प्रतीचे पर्याय असताना त्या चपातीत जीव का गुंततो ते कळत नाही. ( चपाती एकेकाळी मलापण खूप आवडत होती. पण एकदा (प्र)देशप्रेमाचे भरते आले आणि आवडतीची, नावडती झाली ! )
मुंबैत तर चपाती पण नाही. नुसता वीतभर लांबीचा फुलका. पीठाचा गोळा चार पाच वेळा इकडून तिकडून फिरवला, एका बाजूने भाजल्या सारखा होईपर्यंत परतून लगेच तवा बाजुला करून गॅसवर शेकलं की लगेच डब्यात.
कोळश्याच्या शेगडीवर भाजलेला फुलका मात्र मस्त दिसतो. कमी वेळात कोणताही अन्नपदार्थ तयार करू नये, त्याच्यावर पूर्ण अग्निसंस्कार झाला पाहिजे. हे लक्षात ठेवावे.
पोळी करण्याचं कसब वेगळंच असतं. कणीक थोडीशी लाटून घेऊन, तेल पीठ लावून त्रिकोणी घडी करून पुनः तिचा आकार गोल करणं ही कला आहे. नाहीतर ऑस्ट्रेलिया, जपान भाजले जातात. थोडा वेळ जास्ती जातो, म्हणून सेकंदावर धावणाऱ्या मुंबईत पोळी नाही. पोळीला चपाती हा शब्द कुठुन आला माहीत नाही.
पोळी म्हटली की, पुरणाची पोळी, गुळाची पोळी, बेसनाची खमंग पोळी आठवते. प्रदेशानुसार यांची नावे बदलत जातात. काहीजण यालाच मांडे पण म्हणतात. बेसन तव्यावर ऑम्लेटसारखे फ्राय केलेतर त्याला पोळा असेही म्हणतात.
ज्यांना उपाय करायचा असेल त्यांनी जरूर असा बदल करून पहावा, नाहीतर आहेच मग. बटाट्याची भाजी आणि चपाती....
सांगायचे काय तर एवढे प्रकार उपलब्ध आहेत.
नाहीतर मराठमोळ्या सदाबहार भाकऱ्या. आफळेबुवांच्या भाषेत, तानाजी भाकरी म्हणजे दीड फूट लांब रूंद. फक्त हातावर वाढवत नेलेली ही भली मोठ्ठी भाकरी न तुटता, गरगरून फुगत, तव्यावरून ताटात येईपर्यंत तश्शीच रहाते, हे वैशिष्ट्य.
बाजरीच्या तीळ लावून खमंग खरपूस भाजलेल्या भाकरीवर लोण्याचा गोळा. आणि बरोबर वांग्याची भाजी आणि लसणाचे तिखट.
आठवणींच्या प्रदेशात जायचं नाही असं ठरवलं तरी मन सारखं जात रहातं. जायला काही हरकत नाही, पण येताना येववत नाही. इतकंच.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
30.10.2016
सर्व धान्यामध्ये तांदुळाला महत्त्वाचे स्थान असून तांदुळापासून केलेला भात हे उदर भरणाचे साधन आहे.
क्षत म्हणजे भोक पडणे. ज्या धान्याला भोक पडत नाही ते धान्य म्हणजे तांदूळ असून त्याला अक्षता म्हटले जाते. पूजेच्यावेळी देवांवर आणि लग्नप्रसंगी वधूवरांवर कुंकूमिश्रित अक्षता टाकल्या जातात. याचे कारण असे की देवाने आपल्यावर कृपा करावी व वधूवरांचे जीवन सुखी व्हावे हा त्यामागील हेतू असतो.
मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मूर्तीच्या खाली अक्षता ठेवूनच मूर्तीची स्थापना केली जाते. कारण मूर्तीचा क्षय होऊ नये.
झोपताना उशीच्या खाली चारसहा अक्षता पुडीत बांधून ठेवल्यास झोप शांत लागते. अणि चित्त, मन व बुध्दी स्थिर राहुन त्याला बाधा येत नाही.
ओंकाराच्या आज्ञेनुसार ब्रम्हदेवाने अक्षतांची निर्मिती केली त्यामुळे प्रसन्न होऊन सर्व मंगलकार्यात अक्षतांना प्राधान्य दिले जाईल असा वर ओंकाराने ब्रम्हाला दिला अशी कथा पुराणात असल्यामुळे अक्षतांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्त्री-पुरुषांचे भाळी कुंकूम तिलकावरही अक्षता लावल्या जातात ज्यायोगे त्यांना प्रत्येक कार्यात यश प्राप्त व्हावे.
पंढरीची वाट -
पाऊले चालती,
माऊली माऊली -
गजर मुखातुनी.
भागवताची पताका -
घेऊनी सोबत ,
भाबडे दिसे ते रूप -
वारकऱ्यांचे.
मनी एक भाव -
दर्शनाचा ठाव,
दुजा न विचार -
हृदयी वसे.
भजन कीर्तनाचा -
उसळे कल्लोळ,
टाळ मृदुंगाची मिळे -
साथ तया.
मेळा वारीचा -
वेगे वेगे चाले,
ओढ भेटीची मनी -
विठुरायाच्या.
कळस पडे दृष्टीस -
दुरून राऊळाचा ,
आस दर्शनाची -
वाढे अता .
क्षण एक मिळे रूप -
पहावया त्याचे ,
अष्टसात्विक जागती -
भाव सारे.
इतुक्या मायेने विठू -
घेती तुझे नाव,
दुजा कुणा नशिबी -
हे भाग्य नाही.
साजिरे गोजिरे उभे -
रूप पंढरीत,
वेड सकल जनां -
लावितसे,
वेड सकल जनां लावितसे.
राम कृष्ण हरी
प्रासादिक म्हणे
--प्रसाद कुळकर्णी
वयाची पन्नाशी ओलांडली की किमान ५० % लोकांना सतावणारा आजार म्हणजे सांधेदुखी. अगदी लहान वयात होणारे सांध्यांचे विकारही बरेच आहेत पण अशा विकारांचे गांभीर्य विशेष नसते व ते खास औषधोपचार न करताही बरे होतात. तरुण वयात आणि उतार वयात होणारे सांध्यांचे विकार मात्र त्रासदायक ठरतात,
९८) श्री भ्रमराम्बाष्टकम्-७धन्यां सोमविभावनीयचरितां धाराधरश्यामलां
मुन्याराधनमेधिनीं सुमवतां मुक्तिप्रदानव्रताम्।
कन्यापूजनसुप्रसन्नहृदयां काञ्चीलसन्मध्यमां
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।७।।
धन्यां - धन्य असलेली. धन्यता ही जीवनातील अशी एक सुंदर अवस्था आहे की जेथे काहीही मिळवायचे बाकी नसते. कृतार्थ. सार्थक. आई जगदंबा तशी आहे. सोमविभावनीयचरितां- सोम म्हणजे चंद्र. विभावनीय अर्थात सुंदर. चरित अर्थात चारित्र्य. आचरण.
आई जगदंबेची प्रत्येक लीला चंद्राप्रमाणे शुभ्र, प्रसन्न ,आल्हाददायक आहे.
धाराधरश्यामलां- धारा म्हणजे पर्जन्यवृष्टी. त्यात धारांना धरणारा तो धाराधर म्हणजे मेघ. त्याप्रमाणे सावळ्या वर्णाची असलेली.
भारतीय संस्कृतीत मेघ:शाम हा सौंदर्याचा रंग वर्णिला आहे.
मुन्याराधनमेधिनीं- मुनी म्हणजे ऋषिमुनी. त्यांचे आराधना म्हणजे साधना. तर मेधिनी म्हणजे भूमी.
अर्थात ऋषीमुनींच्या उपासनेचे आधारस्थान.
सुमवतां- सुम म्हणजे पुष्प. विविध फुलांनी अलंकृत असलेली.
मुक्तिप्रदानव्रताम्- साधकांना मुक्ती प्रदान करणे हे जिचे व्रत अर्थात अत्यंत आवडते कार्य आहे अशी.
कन्यापूजनसुप्रसन्नहृदयां- कन्यांचे पूजन केल्यामुळे जिचे मन अत्यंत प्रसन्न होते अशी. काञ्चीलसन्मध्यमां- कांची म्हणजे मेखला, कंबरपट्टा. त्याने मध्यमा म्हणजे कंबर शोभून दिसणारी.
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबा भ्रमरांबेचे मी भजन करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
एकूणच इथला भारतीय समाज, हा गतानुगतिकतेत अडकलेला आहे. प्रचंड अंधानुकरण आणि “बाबा वाक्यं प्रमाणम!!: हे इथल्या जीवनाचे प्रमुख सूत्र मांडता येईल. ज्या प्रमाणे मुली नको तितक्या पुढारलेल्या आहेत, त्याच प्रमाणे मुले देखील, अमेरिकन संस्कृतीचे तसेच अनुकरण करीत आहेत, न्यूयॉर्क मधली fashion हा इथल्या जीवनाचा मूलमंत्र आहे. केसांचे वळण(जीवनाला कसलेच “वळण” नाही!!), कपडे त्याच प्रमाणे घालायचे इत्यादी.
भारनियमनाच्या काळात कुठलेही कार्यालय किंवा खादे गृहसंकुलही वीज खंडित झाल्यानंतरही प्रकाशित राहू शकते, ते इलेक्ट्रिक जनरेटरमुळे इलेक्ट्रिक जनरेटरचा आता तर आवाजही येत नाही त्यामुळे त्याला सायलंट पॉवर असेही म्हटले जाते. लेक्ट्रिक जनरेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर हे विद्युत ऊर्जेत केले जाते.
तुझ्या नामी
पांडुरंग
आम्ही सारे
झालो दंग।।१।।
वारकऱ्या
सवे संग
भाव भक्ती
नाही भंग।।२।।
गाती सारे
हे अभंग
हा अबीर
घे सुगंध।।४।।
नाम जप
हा व्यासंग
तुझ्या दारी
मी पासंग।।५।।
या जगतात
तू अथांग
लागे कसा
तुझा थांग।।६।।
कशी करू
सेवा सांग
नाही फिटे
तुझे पांग।।७।।
हरी हरी
हाच चंग
भक्तीला नं
चढे गंज।।८।।
भजनात
चढे रंग
दर्शनास
लावू रांग।।९।।
विठू माझा
सांगोपांग
चंद्रभागी
हे अभ्यंग।।१०।।
i
साद येता माहेरची.. याद ही वृंदावनाची… कानी गाज घुंगराची… मन जाई माहेरी ।।१।।
Copyright © 2025 | Marathisrushti