वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
राहुल द्रविड ही भारताची कसोट्यांमधील पहिली भिंत नाही. त्याच्यापूर्वीही ‘द ग्रेट वॉल’ या नावाने एक भारतीय फलंदाज ओळखला जाई. २३ सप्टेंबर १९५२ रोजी अंशुमन गायकवाडचा (मुंबईत) जन्म झाला. अंशुमनच्या वडलांनी – दत्ताजीराव गायकवाड – १९५९ साली इंग्लंड दौर्यावर गेलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
September 23, 2010
दिवस हा देवांचा आणि रात्र ही राक्षसांची, जंतुंची... सर्व शुभकार्ये दिवसा आणि सर्व निषिध्द कामे रात्रीची. कारण ?
..... त्यांचा रात्रीस खेळ चाले...
काही भारतीय धारणा अश्या आहेत, ज्याचा पुरावा दाखवता येत नाही. पण त्यांचे अस्तित्त्व भारतीय संस्कृतीला मान्य आहे. आता "अणु" कुठे दाखवता येतो ? ती धारणा आहे. दाखवता येणार नाही. गृहीत धरून विज्ञानातला अख्खा परमाणुवाद त्यावर सिद्ध झालाय. केवळ भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा यावर संशोधन सुरू आहे. गाॅडस पार्टीकल ही त्यातूनच जन्माला आलेली संकल्पना होती. विज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी सिद्ध करायच्या आहेत, त्यातीलच एक म्हणजे रात्रीस खेळ चाले.
अदृश्य शक्तींचे प्राबल्य सूर्यास्तानंतर वाढते. सूर्यास्त झाल्यावरच वनस्पती आपले श्वसन बदलवतात.
सूर्यास्तानंतरच पक्षी आपले खानपान थांबवतात.
सर्व प्रकारची शुभकार्ये सूर्यास्तानंतर वर्ज्य सांगितलेली आहेत. ही अंधश्रद्धा नाही. ही धारणा आहे. म्हणून लग्न, मुंज, बारसे, वास्तुशांत, होम, या सारख्या कर्मकांडापासून अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या अग्नियानाच्या प्रक्षेपणाची वेळ देखील सूर्यावर अवलंबून आहे. याला मुहुर्त असा शब्द आहे. पण या शब्दाची सुद्धा काहीजणांना अॅलर्जी आहे. भारतीय परंपरांना छेद देणारी विधान करणं म्हणजे बुद्धीवाद असे काहीजणांना वाटते, म्हणून फक्त सांगितले. असो.
तर रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्य अस्ताला गेल्यावर, तापमानात घट झाल्यावर, दमट वातावरणात, जंतुंचे प्राबल्य जास्ती असते. जे आपल्या स्थूल डोळ्यांना दिसू शकत नाहीत, असे अतिसूक्ष्म जंतु सूर्यास्तानंतर वाढतात. आपण प्रत्येक वेळी सूक्ष्मदर्शी यंत्र घेऊन जंतुंना शोधू शकत तर नाही ना. पण त्यांच्या उत्पत्तीच्या विशिष्ट जागा असतात. जंतुंची वाढ होण्यासाठी विशिष्ट तापमान लागते, विशिष्ट जंतुंना विशिष्ट जागा आणि विशिष्ट हवामानच लागते. हे सर्व वैज्ञानिक सिद्धांत भारतीय संस्कृतीला मान्यच आहेत, किंबहुना भारत हीच या विचारांची जन्मभूमी आहे. म्हणून तर आपल्याकडे शौच अशौच सिद्धांत सांगितला गेलाय.
घरामधल्या कोणत्याही खोलीपेक्षा संडासमधे अनेक प्रकारचे जंतु असतात, वाढतात, हे ओळखूनच मलविसर्जन घरापासून लांब, बाहेर करावे. मल विसर्जन करताना उकीडवे बसावे म्हणजे जंतुसंसर्ग कमी होतो. मलविसर्जन झाल्यानंतर केवळ मलद्वार आणि डावा हातच नाहीत तर दोन्ही पाय, चेहेरा, डोळे सुद्धा पाण्याने धुवावेत, त्यासाठीचे पाणी अगोदरच काढून तयार ठेवावे, ही शुद्धीकरणाची, अंगावरील जंतुसंसर्ग घालवण्याची शास्त्रीय पद्धत नव्हती काय ? पण आज छोट्या मोठ्या शहरात अॅडजेस्ट म्हणून संडास घरातच बांधले जातात, ( पूर्वी घरात खायचे आणि मागे परसाकडे जायचे, आता बाहेर खायचे आणि घरामध्ये येऊन मलविसर्जन करायचे. सुधारणा आणि विकास.)
मलविसर्जन करायला पुनः त्या भांड्यावरच फतकल मारून बसतात, कमोडवर सर्वात जास्त जंतु असतात, हे विज्ञानाने वारंवार सांगून देखील काटकोनात बसून मलविसर्जन. नंतर पाणी सुद्धा वापरत नाहीत. (काही ठिकाणी तर हात धुवायला सुद्धा !!) काहीजणांनी त्यातूनही पळवाट शोधत, आम्ही स्वच्छता करायला डावा हात सुद्धा घाण करत नाही, म्हणून भांड्यालाच जेट स्प्रे बसवलेले असतात.
संडासमधेच ब्रश देखील करतात, तिथेच वर्तमानपत्र, पुस्तक देखील वाचतात.... तिथला सगळा जंतुसंसर्ग परत सर्व घरात आणतोय ? याकडे या बुद्धीवादी वैज्ञानिक लोकांचे लक्ष जात नाही काय ?
पण कसं आहे, ते जे जे करतात, त्यावर काहीही विचार न करता, अनुकरण केले तरी चालते. असं लिहिलं तरी आम्ही (संस्कृतीरक्षक) पुराणमतवादी ठरतो. आहोतच. त्याचा राग न येता, उलट ते भूषणच वाटते.
या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.
असो.
कोणतीही शुभकार्ये करताना पंचांगानुसार अग्निचे स्थान बघून केली जातात. तिथी, नक्षत्र, दिन, रास हे सर्व सूर्याच्या उदयानुसार बदलते. एवढे अनन्य साधारण महत्त्व सूर्याला असताना, केवळ वेळ होत नाही, सवडच नाही असल्या फुसक्या कारणांसाठी.....
...........जाणिजे यज्ञकर्म....... एवढे महत्त्वाचे कर्मकांड सूर्यास्त झाल्यावर करायचे ?
आता याला काय म्हणावे ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.03.2017
March 15, 2017
स्कॉर्पेन वर्गातल्या भारतीय नौदलात समाविष्ट होणाऱ्या सहा पाणबुडयांपैकी ही पहिली पाणबुडी आहे. हिंदी महासागरात आढळणाऱ्या विक्राळ शार्कच्या नावावरुन कलवरी हे नाव देण्यात आले आहे.
February 11, 2018
दोन रुळांमधील सरळ रेषेतील (म्हणजे कमीत कमी) अंतराला गेज म्हणतात. जगात निरनिराळया रेल्वेत वेगवेगळी गेजेस वापरली गेली आहेत.त्याचे सर्वसाधारण वर्गीकरण चार विभागात होते.
February 4, 2023
’झिरो बजेट’ शेती किंवा नैसर्गिक शेती हाच शेतकर्यांच्या समस्यांवरचा एकमात्र तोडगा आहे. जुने तेच सोने होते, हे आता सिद्ध झाले आहे. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ही केवळ गोष्टींच्या पुस्तकात आहे, हे शेतकर्यांनी लक्षात घ्यायला हवे. निसर्गाला आव्हान देऊन आपण उभे राहू शकत नाही. एवढ्या शक्तीशाली जपानचे अवघ्या दोन दिवसात मातेरे झाले. आधुनिक तंत्रज्ञान जोपर्यंत निसर्गाशी इमानदार आहे तोपर्यंत ते ठीक आहे, त्याच्या पुढची पायरी गाठण्याचा प्रयत्न हे तंत्रज्ञान करीत असेल तर शेवटी सगळ्याची माती होणार हे निश्चित!
April 16, 2011
भगवान श्रीगणेशांच्या निवास लोकांला ‘श्रीस्वानंदलोक’ असे म्हणतात. तेथे भगवान गणेश आपल्या सहस्रदल कमळावर विराजमान असतात. त्यांच्या सेवेसाठी अष्ट महानायिका सुसज्ज असतात.
January 17, 2020
वय झाले की हलका आहार घ्यावा असे म्हणतात. पण असा आहार म्हणजे नेमके काय खावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. हलक्या आणि तरीही पोटाची भूक भागवणाऱ्या काही पदार्थाविषयी जाणून घेऊ या. न्याहरी हे दिवसातले पहिले अन्न. न्याहरीला रोज काय वेगळे करावे, त्यातही घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना सोसेल आणि तेवढय़ापुरते पोटही भरेल, असा आहार कुठला, हे प्रश्न जवळपास प्रत्येक घरात कधी ना कधी पडतातच. फार वेगळे काही न करताही वृद्धांना चालेल अशी हलकी न्याहरी करता येते.
पोळी आणि तिळाची चटणी.
पोळी किंवा ब्रेडवर मध आणि चिमूटभर दालचिनीची पूड घालून खाता येईल. *ज्यांना अंडे चालते अशांसाठी ब्रेड आणि उकडलेले अंडे. *ब्रेडला नेहमीचे लोणी लावण्यापेक्षा थोडेसे ‘पीनट बटर’ (शेंगदाण्याचे लोणी) किंवा ‘अल्मंड बटर’ (बदामाचे लोणी) लावून खाता येईल. यातले पीनट बटर आता सहजतेने मिळू लागले आहे. बदामाचे लोणी घरी करता येते. बदाम भिजवून त्याची साले काढावीत आणि थोडेसे पाणी घालून ते गंधासारखे बारीक वाटावेत. ४-५ दिवस टिकणारे हे बदामाचे लोणी ब्रेडवर लावता येईल. साध्या लोण्यात किंवा बाजारात मिळणाऱ्या ‘टेबल बटर’मधून अधिक कोलेस्टेरॉल शरीरात जाण्याची भीती शेंगदाणा व बदामाच्या लोण्यात कमी असते.
*सकाळच्या न्याहरीला सूपसारखा उत्तम आणि ताजेतवाने करणारा पदार्थ नाही. गाजर, मटार, टोमॅटो, कोबी अशा रोज घरात असलेल्या भाज्या वापरून पटकन आपल्या आवडीच्या चवीची सूप बनवता येतील.
*जेवणाच्या आधी अकरा वाजताच्या सुमारास अनेक वृद्धांना काही तरी तोंडात टाकावेसे वाटते. अशा मधल्या वेळेसाठी फळे किंवा सुकामेवा उत्तम. फळांच्या रसांपेक्षा फळे खाल्ली तर त्यातून तंतुमय पदार्थदेखील मिळतात. दातांनी चावण्यास काही समस्या नसेल तर थोडा सुकामेवा जरूर खावा. *दुपारच्या जेवणात वरण किंवा आमटी, भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर हे सगळे पदार्थ असायला हवेत. पण पोटाला जड होऊ नये म्हणून जेवण प्रमाणातच केलेले बरे. जेवणात पुदिन्याची चटणी वगैरे पदार्थ चव तर आणतातच, पण पोटाला पाचकही ठरतात. * दुपारच्या चहाच्या वेळी लाह्य़ा हे उत्तम अन्न. ज्वारीच्या, साळीच्या किंवा मक्याच्या लाह्य़ा, खाकरा, चुरमुरे हे पदार्थ हलके ठरतील. चावण्यास अडचण नसलेल्यांनी खारे दाणे, फुटाणे खाण्यासही हरकत नसावी. जी मंडळी चहा पीत नसतील त्यांनी त्याऐवजी एखादे फळ खावे किंवा ताक प्यावे.
*रात्रीच्या वेळी भाजी आणि भाकरी हे जेवण चांगले. भाजी-भाकरी पोटाला हलकी आहेच, शिवाय त्यातूनही तंतुमय पदार्थ मिळतात. दोन्ही वेळच्या जेवणात ताक घेतले तर पोटाला शांत वाटते. *अनेक वृद्धांना डाळी किंवा उसळी अधिक प्रथिने असल्यामुळे पचत नाहीत. अशांसाठी हे पदार्थ करताना त्यात लसूण, आले, जिरे, मिरे आणि दालचिनी पावडर घातली तर पचनासाठी फायदा होऊ शकतो.
*ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशांनी पोळी किंवा भाकरी करताना त्यात एका पोळी-भाकरीला १ चमचा एरंडेल तेल घालून पाहावे. भाकरीत सहसा तेल घातले जात नाही, परंतु त्यातही एरंडेल तेल घालून चालते.
*अपचनाचा, आमवात यांचा त्रास टाळण्यासाठी सुंठ आणि साखर यांचे एकास चार या प्रमाणात मिश्रण करून ठेवावे. येता-जाता या मिश्रणाची एक-एक चिमूट तोंडात टाकावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- लोकसत्ता
January 18, 2017
२७ डिसेंबर १९११ रोजी जन-गण-मन हे गीत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कलकत्ता येथील कार्यक्रमात सर्वात पहिल्यांदा गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत रचलेले हे गीत भारताचे राष्ट्रगीत होईल असे त्यावेळी कोणाला वाटले ही नसेल.
January 28, 2019
गरोदर स्त्री आणि आयुर्वेद असं समीकरण असलं की ‘गर्भसंस्कार’ हा शब्द कानावर पडलाच म्हणून समजा. गेल्या काही वर्षांत तर मार्केटिंगमुळे गर्भसंस्कार या शब्दाला फार मोठे वलय प्राप्त झाले आहे. प्रत्यक्षात मात्र; आयुर्वेदात गर्भसंस्कार हा शब्द सापडतच नाही!! आयुर्वेदाला अपेक्षित आहे ते सुप्रजाजनन. कै. वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी यांसारख्या सिद्धहस्त वैद्यांनी या संकल्पनेवर सखोल अभ्यास करून आयुर्वेदीय सुप्रजाजननावर प्रात्यक्षिक तसेच लेखन या दोन्ही माध्यमांतून अतिशय महत्वाचे कार्य केले आहे.
सुप्रजाजनन हा शास्त्रीय विषय असल्याने त्याची सुरुवात सध्याच्या गर्भसंस्कार या प्रकरणासारखी गर्भादान झाल्यावर नव्हे तर एखाद्या जोडप्याने ‘चान्स घ्यायचा’ ठरवल्यापासून होते. माता पित्याचे स्वतःचे आरोग्य उत्तम असायला हवे याकरता पंचकर्मांपैकी आवश्यक ती कर्मे वैद्यांच्या सल्ल्याने आणि देखरेखीखाली करून घ्यावी लागतात. अन्यथा आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी परिस्थिती उद्भवते. शेतीचे उदाहरण घ्या ना; आधी जमिनीची मशागत- नांगरणी वगैरे केल्यावरच बी पेरणी होते. नांगरणीशिवाय पेरणी होत नाही. आपल्या शरीराचंदेखील तसंच आहे.
माझ्या एमडी च्या संशोधनाच्या अभ्यासातील निष्कर्षानुसार; सुप्रजाजननासाठी आवश्यक पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत.
१. विवाहपूर्व समुपदेशन
२. विवाहोत्तर समुपदेशन तथा पंचकर्मादि उपचार
३. गर्भधारणा झाल्यावर मातेच्या आहार- विहाराविषयी आयुर्वेदीय मार्गदर्शन तसेच आवश्यतेनुरूप मासानुमासिक औषधी योजना
४. बालकाच्या जन्मानंतर बालक आणि माता यांच्या आरोग्याची आयुर्वेदाच्या दृष्टीने काळजी घेणे
५. बालकांसाठी सुवर्णप्राशन
या प्रत्येक मुद्द्यावर प्रसंगानुरूप सविस्तरपणे लिहिनच. तूर्त ‘गर्भसंस्कार’ नामक मार्केटिंग फंडा थोडा बाजूला सारून प्रत्यक्षात आयुर्वेदाने सांगितलेल्या सुप्रजाजनन या विशाल संकल्पनेकडे डोळसपणे बघायला सुरु करूया. संस्कारांची गरज गर्भाला नसून; सर्वप्रथम माता-पित्यांना आहे हे लक्षात घ्या!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
(लेखक आयुर्वेदीय वंध्यत्व उपचार तज्ज्ञ असून सुप्रजाजननार्थ विवाहपूर्व समुपदेशन करतात.)
February 8, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग तीन
काही वेळा काही विषय परत परत येणार आहेत. कारण त्याविषयाचे गांभीर्यच तसे आहे.
विश्रांती घेताना आपल्या शरीरातील उर्जेवर आतली महत्त्वाची कामे शरीर पूर्ण करून घेत असते. बाहेरचे दार बंद केले तरच बॅकेला आतील कामे उरकता येतात. नाहीतर आव जाव सुरू असेल तर नीट लक्ष देऊन आतली कामे करता येत नाहीत. आणि सारखं आत बाहेर आत बाहेर करावं लागलं की, उगाच शक्ती फुकट जाते.
एखादी मातेला जर काही महत्त्वाची कामे करायची असतील तर बाळाला कसं ती जरा लवकर झोपवते. बाळ झोपले की कसं छान मन लावून काम करता येतं तसं !
फक्त ग्रीष्म ऋतुमधेच दुपारी झोप सांगितलेली आहे. अन्य ऋतुमधे दुपारी झोप निषिध्द आहे. असे का ?
ग्रीष्म ऋतुमधे निसर्गतः शरीरशक्ती कमी असते. सूर्याची थेट किरणे पृथ्वीवर येतात. वातावरणात प्रचंड उष्णता असते. अशा उष्ण वातावरणात जर बाहेर राहून काम केले तर शरीरातील स्निग्धत्व कमी होईल, रूक्षत्व वाढेल. तेज महाभूताचूया ऊष्णतेमुळे शरीरातील जलमहाभूताचे प्रमाण, स्निग्धत्व, गरजेपेक्षा कमी होईल. असे होऊ नये म्हणून दुपारच्या वेळी घरीच सावलीत विश्रांती घ्यायला सांगितलेली आहे.
जेव्हा आपण झोपतो, तेव्हा सर्व अवयव आपल्या कामातून निवृत्त होतात. काम कमी होते. श्रम कमी होतात. घाम कमी येतो. उर्जा वाचते. शक्यी वाचते. ही उर्जेची बचत ही ग्रीष्मात उर्जा मिळवण्यासारखेच आहे. पैसे मिळवण्याबरोबरच पैसे वाचवणे ही पण एक मोठी बचत आहे तसे !
ग्रीष्म ऋतुमधे ही उर्जा बचत करण्यासाठी विश्रांती सांगितली आहे. केवळ ग्रीष्म ऋतुमधेच ताकद कमी असते म्हणून या ऋतुमधे जशी दुपारी विश्रांती घ्यायची असते, तशीच विश्रांती ज्यांची ताकद कमी आहे अशा, बाल, वृद्ध, गर्भवती आणि आजारी माणसांनी देखील घ्यावी.
जागे असताना काही ना काही तरी काम सुरू असते. जेव्हा काम सुरू असते, तेव्हा श्वासगती देखील जास्ती असते. त्यामधे देखील उर्जा संपत असते. आजारी पडल्यावर विश्रांती यासाठीच सांगितली जाते, की ज्यामुळे उर्जेची बचत व्हावी. आणि ही उर्जा अन्य महत्त्वाच्या अवयवांची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी वापरता यावी.
मोबाईलची बॅटरी संपत आली की, आपण कसे मोबाईल कमीत कमी हाताळतो, व्हिडिओ पहाणे बंद, ऑडीयो ऐकणे बंद, डाटा कनेक्शन ऑफ, वायफाय बंद. ब्राईटनेस लो, अननोन नंबरचे काॅल कट करणे, तरच असलेल्या दोन चार टक्के बॅटरी साठ्यावर अत्यंत महत्त्वाचे काॅल करण्यासाठी मोबाईल "स्लीप" मोडला टाकतो, म्हणजेच बॅटरी शिल्लक ठेवतो.
हं आता कळले. आमच्या भाषेत आम्हाला समजावनू सांगितले की पटकन कळते, ती पंचमहाभूते वगैरे डोक्यावरून जाणारे विषय !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
18.05.2017
May 18, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti